Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....

न
निमिष सोनार
Wed, 06/25/2014 - 13:14
🗣 167 प्रतिसाद
महत्वाची सुचना: ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!! चर्चेचा विषय: निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ? कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे. धन्यवाद!!!

प्रतिक्रिया द्या
84839 वाचन

💬 प्रतिसाद (167)
स
संजय क्षीरसागर Fri, 06/27/2014 - 09:37 नवीन
इथे कुणीही भाव चलित किंवा लग्न कुंडली दाखववून, जातकाचं भवितव्य विचारत नाहीये. तस्मात, तज्ञ असण्याचा प्रश्नच नाही. तज्ञाचा अर्थ भविष्याच्या वर्तांकनातली अचूकता आहे आणि ऋषीतुल्यांकडे जाण्यापूर्वी, ज्या कुंडलीवरुन ते भविष्यवाणी करणार, ती कुंडलीच एक निरर्थक आकृती आहे काय? असा प्रश्न आहे. ज्या विषयाचे आपण अभ्यासक आहात त्यात कुंडलीचा आणि भविष्याचा काय कार्य-कारण आहे, इतपत उत्तर तरी (चर्चेत भाग घेतल्यानं) आपल्याला माहिती असावं अशी अपेक्षा आहे. जर एखादा मुका, दुसर्‍या बहिर्‍याला गाणं ऐकवत असेल, तर दोघांनाही मैफिल चांगली चाललीये असंच वाटत राहील. मुळात मुका गाऊ शकतो का (पक्षी, कुंडली या डिझाईनला काही अर्थ आहे का) आणि बहिरा ऐकू शकतो का (पक्षी, त्या निरर्थक कागदावरनं कुणीही ऋषीतुल्य काही अंदाज बांधू शकेल का?) या प्रश्नाला उत्तर देता यायला हवं.
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
ज
ज्ञानव Mon, 06/30/2014 - 06:50 नवीन
जर मी बहिरा आहे तर मी मुक्याच्या गाण्याला का जावे? जावे तर जावे आणि तो मुकाच आहे म्हणून (मला तोंड दिले आहे म्हणून आणि ऐकू काही येतच नाही म्हणून) ओरडावे? ये हजम नाही हुआ दोस्त. (बाकी उदाहरण दोघांना हि लागू आहे म्हणजे (पक्षी : ज्योतिषाचे समर्थक आणि विरोधक)
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ब
बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 10:07 नवीन
यांच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक पान इ वरुन "आपण वर्तवलेले भविष्य अचूक कसे आले" अशा कथा सोडुन मूलभूत प्रश्नाला उत्तर देण्याच्या एखाद्या प्रयत्नाची लिंक देउ शकाल का आपण??
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
स
सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 10:44 नवीन
त्यांच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक पानावर त्यांनी काय लिहायचे हा त्यांचाच अधिकार आहे. त्यांनी काय लिहायचे काय नाही याची सक्ती तर करता येणार नाही. तसेच त्यांनी पूर्वी कोणाशी अशी चर्चा केली होती का, उत्तरे दिली होती का, त्याचा रिपोर्ट त्यांनी त्याच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक वर का नाही लिहला हे कशाला पाहीजे, तुम्हाला चर्चाच करायची आहे ना मग सरळ गाठा त्यांना , विचार तुमचे प्रश्न , करा चर्चा , घोडे कुठे आडलयं? ह्यातल्या बर्‍याच जणांचे निवासस्थानांचे, कार्यालयाचे पत्ते अगदि सहज उपलब्ध आहेत , तेव्हा त्यांना समक्ष भेटून चर्चा नाही का करता येणार ? त्यासाठी वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक हेच कशाला पाहिजे ? असे इंटरनेट्च्या माध्यमातून , पड्द्या आडून आडून का ब्ररे ? तुमच्या जागी मी असतो तर लिंका द्या, हे द्या ,ते द्या , हे नाही अन ते नाही अशा लंगड्या सबबी नक्कीच सांगत बसलो नसतो. सरळ पत्ते हुडकून काढले असते, समक्ष भेटलो असतो ,चर्चा केली असती , आहे काय आणि नाही काय , हे मला जे वाटले ,जे सहज सुचवले.ते लिहले ते सुद्धा 'लिंका' द्या अशी मागणी माझाकडे केलीत म्हणून बर का तेव्हा राग मानू नका.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 11:01 नवीन
असे इंटरनेट्च्या माध्यमातून , पड्द्या आडून आडून का ब्ररे ?
अहो आजच्या काळातील ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे माध्यम आहे ते. आजच्या काळात असे आक्षेप घेणे हे अज्ञान लपवण्यासाठीच घडु शकते..
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
स
सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 12:43 नवीन
हे मान्य , ते तसे नाही असे मी कधीच म्हणालेलो नाही. माझा आक्षेप इंटरनेट व त्या माध्यमातून होणार्‍या ज्ञान संपादनाला नाहीच आपण गैरसमज करुन घेतलेला आहे. पण त्याच बरोबर इंटरनेट आले म्हणजे ज्ञान सपादनाचे इतर् सर्व मार्ग ब्ंद करा असे तर नाही ना? त्या ज्योतिर्विदांनी आपल्याला हवी असलेली माहीती इंटरनेट माध्यमातूनच द्यावी , आपल्याशी चर्चा ही इंटरनेट माध्यमातूनच करावी हा आग्रह का? मी पड्द्या आडून शब्दप्रयोग केला त्यात काय चूक आहे कारण कोणी कसलीही आयडि घेऊन , काहीही इमेल अड्रेस वापरुन , स्वतःचा चेहेरा व ओळख लपवून काही करु शकतो ते इंटरनेट या च्या माध्यमातूनच / पड्द्या आडूनच शक्य होते ना? जेव्हा एखादी स्वच्छ हेतू असलेली, सभ्य व्यक्ती प्रत्यक्ष भेट्ते तेव्हा नाव गाव कदाचित खोटे सांगेल पण तिला निदान चेहेरा तरी लपवता येणार नाही. इंटरनेटच्या माध्यमा पेक्षा ह्या प्रत्यक्ष भेटीत जास्त खुलेपणा, पारदर्शी पणा असेल नाही का? चर्चे साठी मला धारे वर ध्ररुन काहीच साध्य होणार नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते . मी सुचवल्या प्रमाणे जर आपण या तज्ञांना , ग्रंथकारांना समक्ष भेटलात तर चांगली चर्चा होण्याची शक्यता आहे असे नाही का वाट्त आपल्याला? सगळ्यात मह्त्वाची गोष्ट 'कोण हे बाळ सप्रे ?" अस प्रश्न त्यांनाही पडू शकतो बर का, तेव्हा तुमची ही क्रेडेन्शीअल्स एकदा तपासून बघा म्हणजे झाले (फक्त ती मला सांगत बसू नका, त्याचा मला काही उपयोग नाही) . मी आधीच्या एका प्रतिसादात म्हणाल्या प्रमाणे 'सामना' बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यात व्हायला हवा, उगाच कोणीही उठावे माझ्याशी चर्चा करा म्हणावे इतकी ही तज्ञ मंडळी रिकामटेकडी, वाटेवर पडलेली नाहीत. मला वाट्ते आवश्यक तो सर्व खुलासा जो मला देणे शक्य होते तो दिला आहे , आता यावर आणखी काही चर्वण करणे म्हणजे एकतर 'वेड पांघरुन पेड्गाव ला जाणे ' असा अर्थ होइइल , सबब आणखी वितंडवाद नकोत हीच विनती.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 13:07 नवीन
अंनिस/ नारळीकर यासारख्या लोकांनी जाहीरपणे विचारल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देउ शकलेले लोक प्रत्यक्ष भेटल्यावर उत्तरे देउ शकतील हा तुमचा मुद्दा हास्यास्पद आहे.. तिथेही हे ऋषीतुल्य आम्हाला काही सिद्ध करायची गरज नाही असा पवित्रा घेतात .. हे माहित नसल्यासारख करणे म्हणजे 'वेड पांघरुन पेड्गाव ला जाणे '..
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 06/29/2014 - 12:06 नवीन
+++१११
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 07:54 नवीन
बाकी तुमच्या यादितल्या धोंडोपंत आपटे यांनीदेखिल अवांतर म्हणत असल्या प्रश्नांपासुन पळ काढला आहे मिसळपाववर.. बाकी वेगळा धागा जरी काढला असेल कोणी तर चर्चेत कधी सहभागी होत नाहित ते..
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
स
सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 08:58 नवीन
कोणाला उत्तर द्यायचे कोणाला नाही, कोणाशी चर्चा करायची कोणाशी नाही हा धोडोंपंतांचा वैयक्तीक अधिकार आहे ,आणि तो त्यांनी वापरला असता त्यांच्यावर पळपूटेपणाचा आरोप करणे सभ्यतेचे लक्षण आहे असे मला वाटत नाही.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 09:40 नवीन
त्यांनीदेखिल असेच प्रश्नकर्त्याला असभ्य ठरवले पण त्यामुळे उत्तर नसण्याचे सत्य लपुन राहिले नाही..
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
स
संजय क्षीरसागर Fri, 06/27/2014 - 08:00 नवीन
मी कुणी हिंदकेसरी मल्ल नाही आणि तुम्ही दिलेल्या दीर्घ प्रतिसादावरुन, तुम्हीही लुंगेसुंगे दिसत नाही; तस्मात चर्चा प्रस्ताव ठेवला होता. आपण चर्चेची असमर्थता दर्शवल्यानं, मी तो मागे घेतो. बिफोर आय क्लोज, आपण म्हटले आहे:
सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत.
माझा प्रतिसाद कुंडली या मुलभूत गोष्टीवरच होता, कारण ती सर्व ज्योतिषशास्त्राचा आत्मा आहे. तिच्याशिवाय ज्योतिषशास्त्राला भविष्याच्या वर्तांकनाची दिशा मिळणं असंभव आहे. थोडक्यात, ज्या होकायंत्रानं दिशा शोधायची ते गंडलेलं असेल तरी दिशा दाखवेलच, पण ती उत्तर दिशाच असेल याची खात्री नाही. एखादे वेळी आनमान धक्यानं दिशा बरोबर निघेलही पण मग ते शास्त्र नाही. तो फक्त अडल्यानडलेल्या तितक्याच अज्ञानी व्यक्तीनं दिलेला मानसिक दिलासा आहे. माझ्या इथल्या हितचिंतकांचा रोष पत्करुन, नम्रपणे नमूद करतो की, नामस्मरण ही जशी काल्पनिक देवाची सुटकेसाठी केलेली याचना आहे. त्यानं फक्त पुजारी गब्बर होतात आणि भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं निव्वळ योगायोग असतो. तद्वत ज्योतिषशास्त्रानं, मोबदला घेणारे ज्योतिषी श्रीमंत होतात. आणि जातकाच्या हाती केवळ, चातकासारखी पावसाची वाट पाहाणं उरतं.
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
ध
धन्या Fri, 06/27/2014 - 11:08 नवीन
(2) आपला ज्योतिषशास्त्रा वर चर्चा करण्याचा उद्देश चांगला आहे हे मान्य ,पण म्हणून काय दिसेल त्या कोणाही लुंग्यासुग्याला (म्हणजे मी) चर्चेचे प्रस्ताव देत फिरणार का ? ज्याच्याशी चर्चा करायची तो निदान आपल्या बरोबरीचा तरी आहे ह्याची खात्री तरी नको का करुन घ्यायला , श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!
हे खासंच. :) तुमच्या ऋषीतुल्यांच्या यादीमधील श्री रॉबर्ट स्वबोधा आणि श्री हार्त दी फऊ या दोघांनी मिळून लिहिलेलं Light On Life: An Introduction to the Astrology of India हे पुस्तक वाचलं होतं. पुस्तकांतर्गतच खुप विरोधाभास होता. असो.
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
श
श्रीगुरुजी Fri, 06/27/2014 - 09:26 नवीन
>>> माझ्या इथल्या हितचिंतकांचा रोष पत्करुन, नम्रपणे नमूद करतो की, नामस्मरण ही जशी काल्पनिक देवाची सुटकेसाठी केलेली याचना आहे. त्यानं फक्त पुजारी गब्बर होतात आणि भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं निव्वळ योगायोग असतो. दुर्दैवाने हे नमूद करावसं वाटतंय की "नामस्मरण" या विषयी आपले अत्यंत गैरसमज आहेत. तुमच्या वाक्यातील "काल्पनिक देव", "सुटकेसाठी केलेली याचना", "फक्त पुजारी गब्बर होतात", "भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं" इ. वाक्ये तुमचे नामस्मरणाविषयी मूलभूत अज्ञान अथवा गैरसमज अथवा पूर्वग्रह अथवा तिन्ही दर्शवितात. नामस्मरण ही कोणत्याही स्वरूपात केलेली याचना नसून, सुटकेसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी नामस्मरण केले जात नाही. त्याचप्रमाणे नामस्मरण करायला कोणताही पुजारी सांगत नाही किंवा तसा आदेश देत नाही. नामस्मरणामुळे भक्ताची कोणत्याही प्रसंगातून किंवा संकटातून सुटका होत नाही. तसे झाल्यास तो योगायोग असतो. त्याचा नामस्मरणाशी संबंध नसतो, कारण नामस्मरण हे संकटातून सुटण्यासाठी केले जात नाही आणि त्या हेतूने कोणी नामस्मरण केले तरी तशी सुटका होत नाही. "नामस्मरण" या विषयावर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी अत्यंत सोप्या शब्दात विवेचन केले आहे. ते आपण पूर्वग्रह व गैरसमज दूर ठेवून निव्वळ उत्सुकता या भावनेने वाचल्यास आपल्या काही शंका/कुशंका/समज/गैरसमज नक्कीच दूर होतील.
स
संजय क्षीरसागर Fri, 06/27/2014 - 10:00 नवीन
या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे. आणि त्यावर समर्पक उत्तरं दिली आहेत. मी इथे आवांतर करु इच्छित नाही.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 06/28/2014 - 10:32 नवीन
>>> नामस्मरणावर प्रदीर्घ चर्चा या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे. आणि त्यावर समर्पक उत्तरं दिली आहेत. मी इथे आवांतर करु इच्छित नाही. तुमची उत्तरे किती "समर्पक" असतात हे केजरीवालांशी संबंधित धाग्यांवर अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही वर संदर्भ दिलेल्या लिन्कवर जाण्याची गरजच नव्हती. आधीच अंदाज आला होता. परंतु तरीसुद्धा गंमत म्हणून तुम्ही दिलेल्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर संपूर्ण धागा न दिसता केवळ तुमचा स्वतःचा एकच प्रतिसाद दिसला. तो प्रतिसाद म्हणजे कोणत्यातरी सभासदाने आधी दिलेल्या प्रतिसादाचा प्रतिवाद होता. तुमचा तो प्रतिवाद म्हणजे आधीच्या सभासदाने दिलेल्या एका प्रतिसादातील काही निवडक वाक्ये उचलून प्रत्येक वाक्याला प्रतिवाद म्हणून तुमचे एकच वाक्य होते. तुम्ही प्रतिवाद म्हणून दिलेली स्वत:ची वाक्ये अर्थातच अपेक्षेनुसार निरर्थक होती. अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या ५-६ वाक्यांना तुम्ही "सविस्तर व समर्पक उत्तरे" म्हणत आहात. धन्य आहे!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 06/30/2014 - 07:45 नवीन
तिथे लिंक दिलेल्या प्रतिसादापासून पुढे चर्चा झाली आहे.
या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे
त्यामुळे तुम्ही चर्चा वाचलीच नाही, हे तुमचा खालील प्रतिसाद दर्शवतो:
तुम्ही दिलेल्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर संपूर्ण धागा न दिसता केवळ तुमचा स्वतःचा एकच प्रतिसाद दिसला.
काही न वाचता सुद्धा, आपण जी स्वैर विचार उधळण केली आहे त्याची कल्पना असल्याने, आपल्याला कितपत समजू शकेल याची शंका होतीच. तस्मात, आपण नामस्मरण करत राहाणे इष्ट.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 06/30/2014 - 09:29 नवीन
>>> त्यामुळे तुम्ही चर्चा वाचलीच नाही, हे तुमचा खालील प्रतिसाद दर्शवतो: मी ती संपूर्ण चर्चा वाचलेली आहे. त्यातील तुमचे विनोदी विचारधन व इतरांनी स्पष्टपणे त्यातील फोलपणा दाखवून दिलेले प्रतिसाद देखील वाचलेले आहे. तुम्ही माझ्या याआधीच्या प्रतिसादाला प्रत्युत्तर म्हणून त्याच चर्चेतील एक लिन्क पाठविलीत. त्या लिंकवर टिचकी मारल्यावर फक्त तुमचा एकट्याचाच एकच प्रतिसाद दिसतो. एखाद्या प्रतिसादाला "उत्तर द्या" या लिन्कवर टिचकी मारल्यावर त्या चर्चेतील फक्त तोच प्रतिसाद एका नवीन पानावर उघडतो. तुम्ही या नवीन पानाची लिन्क दिलेली आहे. मूळ धाग्याची लिन्क दिलेली नाही. आपला एकमेव प्रतिसाद म्हणजे चर्चेचे सार आहे, असा तुमचा गोड गैरसमज किंवा स्वतःबद्दल भ्रम असावा. असो. >>> काही न वाचता सुद्धा, आपण जी स्वैर विचार उधळण केली आहे त्याची कल्पना असल्याने, आपल्याला कितपत समजू शकेल याची शंका होतीच. तस्मात, आपण नामस्मरण करत राहाणे इष्ट. आधी लिहिल्याप्रमाणे मी संपूर्ण धागा वाचला आहे व त्यातील तुमचे विनोदी प्रतिसाद देखील वाचले आहे. त्यात न समजण्यासारखं काहीच नाही. मला विनोद चांगलाच समजतो. तुमच्या प्रतिसादातील सर्व विनोद मला समजले. ज्याप्रमाणे तुमचे केजरीवाल व "आम आदमी पक्ष" यांविषयी गोड गैरसमज व भ्रम होते, तद्वत् तुमचे स्वतःविषयी गोड गैरसमज व भ्रम आहेत. ज्याप्रमाणे तुमचे भाजप व मोदींविषयी गैरसमज व पूर्वग्रह होते, तद्वत् तुमचे ज्योतिषशास्त्राविषयी व नामस्मरणाविषयी गैरसमज व पूर्वग्रह आहेत. तथापि निवडणुकपूर्व काळात व नंतर केजरीवालांच्या मर्कटलीलांमुळे तुमचे त्यांच्याविषयीचे गोड गैरसमज दूर होऊन भ्रम दूर झाला. तसेच निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजप व मोदींविषयीचे तुमचे गैरसमज व पूर्वग्रह दूर झाले. अगदी तसेच आताही होईल. काही काळातच तुमचे ज्योतिषशास्त्राविषयीचे व नामस्मरणाविषयीचे गैरसमज व पूर्वग्रह दूर होऊन तुमच्या मनातील अज्ञानरूपी काळोख दूर होऊन तुमच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडेल याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 06/30/2014 - 20:56 नवीन
सांगण्यापेक्षा, नामस्मरणावर तुमचा अनुभव, नव्या पोस्टमधे लिहा. माझं हे विधान आहे : देव हा भ्रम आहे आणि नामस्मरणानं तो गवसेल ही भ्रामक समजूत आहे. (एक कोटी रामनाम वगैरे!). नामस्मरणानं एखाद्याला देव वगैरे दिसायला लागला तर त्याचा भ्रम सघन झाला आहे याचा तो पुरावा ठरतो. थोडक्यात, नामस्मरणाची परिणिती व्यक्ती भ्रमिष्ट होण्यात होते. आता इथे उगीच केजरीवाल वगैरे बाष्कळ बडबड करण्याऐवजी नाम-महात्म्यावर स्वतंत्र लेख लिहा आणि मी माझं वरचं विधान तिथे सिद्ध करुन दाखवतो.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ध
धन्या Fri, 06/27/2014 - 14:27 नवीन
माझीही देव, नामस्मरण संदर्भातील मते बरीचशी संक्षींच्या मतांसारखीच आहेत. अर्थात ही माझी मते मागच्या दोन अडीच वर्षांत बनलेली आहेत. त्यामागे माझं या काळात मी केलेलं अफाट वाचन हे कारण आहे. मात्र अशी मते बनण्याआधी पंचवीस वर्षांहून अधिक काळ "त्याच्या ईच्छेशिवाय पानही हलत नाही" याच मताचा होतो. त्यामुळे मी कुठल्याही मतावर टीका करताना "उचलली बोटे आपटली कीबोर्डवर" असला प्रकार करत नाही. तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे ते पुस्तक माझ्याकडे आहे. हार्डबाऊंड बांधणी असलेलं, मुखपृष्ठावर महाराजांचं चित्र असलेलं हे पुस्तक पाहताक्षणी घ्यावसं वाटलं मला. मात्र अजून वाचलेलं नाही. आता जरुर वाचेन. मात्र या बाबतीतलं एक निरिक्षण असं आहे की जेव्हा देव, धर्म, नामस्मरणाच्या संदर्भात काही प्रश्न विचारला तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अमक्या अध्यायात छान सांगितलंय, समर्थांनी दासबोधात अमक्या दशकाच्या अमक्या समासात हे समजावलं आहे अशीच उत्तरे मिळतात. सारांश असा की, नामस्मरण या विषयावरचे तुमचे स्वतःचे मत वाचायला आवडेल. :)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 09:46 नवीन
ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारणा अचूक भविष्य वर्तवणारे ज्योतिषी पाहिलेले आहेत. पण ज्योतिष्याच्या नावाने थोतांड पसरवणारेच जास्त, बाकी चालु द्या.
श
श्रीगुरुजी Fri, 06/27/2014 - 09:48 नवीन
>>> ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारणा अचूक भविष्य वर्तवणारे ज्योतिषी पाहिलेले आहेत. पण ज्योतिष्याच्या नावाने थोतांड पसरवणारेच जास्त, बाकी चालु द्या. संपूर्ण सहमत
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले Fri, 06/27/2014 - 10:03 नवीन
शास्त्र ह्या शब्दाची तुमची व्याख्या तरी काय ? अवांतर : मी ऑफीसच्य डस्टबीन मधे कागदाचा बोळा अचुकपणे फेकु शकतो ५-६ फुटावरुन ! मग बोळाफेकशास्त्राविषयी काही पुस्तके लिहावीत असा मानस आहे !!
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
आ
आदिजोशी Fri, 06/27/2014 - 13:55 नवीन
कोणतीही वस्तू कुठूनही फेकली तर ती सभोवतालच्या गोष्टी लक्षात घेता कुठे जाऊन पडेल हे शास्त्राने सांगता येतेच की. जरूर लिहा पुस्तक ह्या विषयावर. लोकांच्या उड्या पडतील (तुमच्यावर नव्हे, पुस्तकावर.)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चित्रगुप्त Sat, 06/28/2014 - 18:10 नवीन
प्राचीन भारतीय साहित्यात ज्या 'शास्त्रां'चा उल्लेख मिळतो, त्यापैकी काही अशी: कल्पशास्त्र, व्याकरणशास्त्र,निरुक्त, ज्योतिषशास्त्र, छंदशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, कोक/कामशास्त्र, संगीतशास्त्र वगैरे... याखेरीज आणखीही असतील, त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. मलासे वाटते शालेय शिक्षणाच्या संदर्भात 'सायन्स' या शब्दाला समानार्थी म्हणून 'शास्त्र' या जुन्या संस्कृत शब्दाची योजना केली गेली, तिथेच गोची झाली, आधुनिक पाश्चात्त्य 'सायन्स' चे निकष या 'शास्त्रां' ना लावणे बरोबर नाही. अलिकडील एका धाग्यात वात पित्त कफ इ. चाचण्यांद्वारे 'सिद्ध' करता येते का वगैरे चर्चा झाली. याविषयी 'नाडिपरिक्षा' ही खरी चाचणी असते, तिथे रासायनिक चाचण्यांचे प्रयोजन नाही.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मूकवाचक Sat, 06/28/2014 - 18:13 नवीन
+१
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मृत्युन्जय Sun, 06/29/2014 - 08:27 नवीन
तुम्ही किती सुंदर आणि नेम धरुन कुंथता यावरही तुम्हाला पुस्तके लिहिता येतील. कशावर काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. मी स्वानुभावाधारित विधान केलेले आहे. बाकी आपली मर्जी.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मूकवाचक Fri, 06/27/2014 - 12:46 नवीन
+१
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बबन ताम्बे Fri, 06/27/2014 - 15:59 नवीन
यंदाच्या लोकसभा निवडणूकीचे निकाल किती ज्योतिष्यांचे बरोबर आले?
ध
धन्या Fri, 06/27/2014 - 16:03 नवीन
ज्यांचे भाकीत बरोबर आले ते खरे ज्योतिषी बाकीचे ढोंगी. त्यात आकडेवारी कशाला हवी.:D
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
च
चित्रगुप्त Sat, 06/28/2014 - 17:55 नवीन
काही लोकांना भविष्यातील घटना आधी कळू शकतात, याचा मला स्वतःला बरेचदा अनुभव आलेला आहे, आणि लंबकाच्या सहाय्याने मी स्वतः देखील असा भविष्याचा वेध घेऊ शकलेलो आहे. या अनुभवाविषयी मागे एका धाग्यात लिहिले होते. बाकी काहीतरी सिद्ध करणे, अमूक एक शास्त्र आहे वा नाही, वगैरे चर्चांपेक्षा खरेच कुतुहल/कळकळ असेल, तर प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त श्रेयस्कर, आणि आज ना उद्या असे प्रसंग जीवनात घडून येणारच.
श
श्रीगुरुजी Sat, 06/28/2014 - 19:00 नवीन
इथे काही मंडळींचा ज्योतिषावर अजिबात विश्वास नाही असं दिसतंय. एक प्रयोग करता येतील. या मंडळींनी मिपावर काही तज्ज्ञ ज्योतिषांना आपल्या पत्रिका द्याव्यात. त्या ज्योतिषांनी त्या पत्रिकांवरून भूतकाळातील काही घटना अचूक ओळखल्यास ज्योतिषात काहीतरी तथ्य आहे असे मानता येईल.
स
सरळमार्गी Sat, 06/28/2014 - 21:58 नवीन
ज्योतिष जाणणार्‍यांना / या विषयात रुचि असणार्‍यांना इथे अशी वागणूक मिळत असताना, एकतरी तज्ञ ज्योतिर्विद मिपा वर शिल्लक राहीला असेल का ? आणि कोणी चुकुन माकुन रेंगाळत असलाच तर केवळ या अशा काही लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या पत्रिका अभ्यासून कशाला उत्तरे देत बसेल? आणि का म्हणून तो आपले श्रम व वेळ ह्यांच्यावर खर्च करेल ? हे म्हणजे सापाला दुध पाजण्यातलाच प्रकार ! आणि असे कोण लागून गेले आहेत हे लोक की यांच्या विश्वास बसण्यावर / न बसण्यावर ज्योतिषशास्त्राचे भवितव्य अवलंबून आहे? नसला त्यांचा विश्वास तर नसुदे काय फरक पडतो?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 22:26 नवीन
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि थोर कार्यकर्ते कै. नरेंद्र दाभोळकर आणि मिपाकर प्रकाश घाटपांडे यांनी एक संशोधन प्रबंध लिहिलाय ज्यात अतिशय साध्या सांख्यिकी निकषावर ज्योतिषाला तोलून पाहिले असता नाणेफेकीद्वारे रँडमलि ५०% भाकिते बरोबर येतात त्याहीपेक्षा कमी अ‍ॅक्युरसी असल्याचे आढळले आहे. ही पहा लिंक. http://www.currentscience.ac.in/Downloads/article_id_096_05_0641_0643_0.pdf फक्त ३ पानांचा हा प्रबंध आहे. यात नक्की काय चुकले आहे ते कळाले तर ज्योतिषाबद्दल अजून अभ्यास करणे सोपे होईल. पण जन्तेला ३ पानेही वाचण्यात वेळ घालवायची इच्छा नाही, शिवाय जे ज्योतिषावर टीका करतात त्यांच्यावर संपादक मंडळाचा अपमान करण्याचा अश्लाघ्य आरोप करण्यातच रस आहे. चोर ते चोर शिवाय किती ते शिरजोर!!! अतिशय खेदजनक वृत्ती आहे ही. (हे पर्सनली तुम्हांला उद्देशून नाही हेवेसांनल.)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 08:51 नवीन
पण तज्ञ , अभ्यासू ज्योतिर्विदाने केलेली भाकीतें नाणेफेकीच्या कौला पेक्षा जास्त तपशिलवार असतात याचा अनेकांना अनुभव आलाय, या सध्याच्या धाग्यावर सुद्धा काही सभासदांनी असे अनुभव आल्याचे लिहले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर , समजा एक २३ वर्षाचा युवक नुकतेच महाविद्यालयिन शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात आहे , या परिस्थितीत 'नाणेफेक ' केली तर उत्तर हो / नाही असेच असू शकते ना ? छापा का काटा , हेड ऑर टेल असेच असते ना तुमच्या नाण्यात ? आता तोच युवक एखाद्या तज्ञ , अभ्यासू (हे दोन्ही शब्द मी ठळक केले आहेत) ज्योतिर्विदा कडे हीच समस्या घेऊन जातो , तेव्हा त्याला 'हो' / नाही हे उत्तर तर मिळेलच त्याशिवाय
  • नोकरी कधी लागेल
  • कोणत्या प्रकाराची असेल
  • कोणत्या क्षेत्रातली असेल
  • नोकरी निमित्त सध्याचे राहण्याचे ठिकाण सोडून दूर जावे लागेल का
  • नोकरी सुखावह असेल का,
  • नोकरीत प्रगतिच्या संधी कितपत आहेत
  • नोकरीत वरिष्ठांशी संबंध कसे राहतील
  • ही मिळालेली नोकरी किती काळ टिकेल
  • नोकरी फार काळ टिकणारी नसेल तर त्याचे कारण काय असू शकेल..
  • नोकरी लाभदायक ठरेल का व्यवसाय
  • कोणत्या क्षेत्रातली नोकरी / व्यवसाय लाभदायक ठरु शकेल
  • नोकरी सांभाळून व्यवसाय करता येईल का
  • आई वडिल, भाऊ बहिण, पत्नी वा अन्य जवळच्या नात्यातल्या व्यक्तीच्या नावावर धंदा केल्यास तो लाभदायक ठरेल का
  • व्यवसायाचे योग असतील तर ते केव्हा
  • व्यवसाय स्वतंत्र करणे लाभदायक ठरेल का भागीदारीतला
  • भागीदारीतला व्यवसायच जर असेल तर भागीदार केव्हा मिळतील, ते कसे असतील
  • व्यवसाया साठी लागणारे कर्ज उपलब्ध होईल का
  • व्यवसाय करतान सरकार दरबार च्या काही अडचणीं येऊ शकतात का
  • नोकरी / व्यवसाया निमित्त परदेश गमनाचे योग आहेत का , असल्यास केव्हा
अशा अनेक अंगाने त्या तरुणास मार्गदर्शन मिळू शकते. आणि हे सर्व एका जन्मकुंड्ली वरून ( अथवा प्रश्नकुंडली) वरुन बघता येते (जीला इथे कचर्‍याचा टोपलीत फेकून दिले आहे! ) नाणेफेकीचा कौल ही इतकी माहीती देऊ शकेल? 'वडा पाव ' पण पोट भरण्याचे काम करतो म्हणून त्याची 'गुजराथी थाळी' / 'फाईव्ह कोर्स' डिनर शी तुलना करायची का?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ध
धन्या Sun, 06/29/2014 - 12:15 नवीन
नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात? तर मग इथे श्रीगुरुजींनी म्ह्टल्याप्रमाणे काही पत्रिकांची नोकरी संदर्भात चाचणी घेता येऊ शकते. घ्यायची का? :)
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
स
सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 13:12 नवीन
ज्योतिष जाणणार्‍यांना / या विषयात रुचि असणार्‍यांना इथे अशी वागणूक मिळत असताना, एकतरी तज्ञ ज्योतिर्विद मिपा वर शिल्लक राहीला असेल का ? आणि कोणी चुकुन माकुन रेंगाळत असलाच तर केवळ या अशा काही लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या पत्रिका अभ्यासून कशाला उत्तरे देत बसेल? आणि का म्हणून तो आपले श्रम व वेळ ह्यांच्यावर खर्च करेल ? हे म्हणजे सापाला दुध पाजण्यातलाच प्रकार ! आणि असे कोण लागून गेले आहेत हे लोक की यांच्या विश्वास बसण्यावर / न बसण्यावर ज्योतिषशास्त्राचे भवितव्य अवलंबून आहे? नसला त्यांचा विश्वास तर नसुदे काय फरक पडतो? ?
↩ प्रतिसाद: धन्या
स
सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 13:25 नवीन
>> नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात? >> हो! कै ज्योतिंद्र हसबे, कै सुरेश शहासने तसेच श्री सुनिल गोंधळेकर , श्री कनक बोस्नीया यांनी चालवलेले 'केपी झाईन' हे ई माग्याझीन (जे मोफत आहे ), श्री श्री नाथ यांचे अस्ट्रोव्हिजन हे ई माग्याझीन , श्री के. सुब्रमनीयम व श्री के हरिहरन यांनी लिहलेली सुमारे ३० च्यावर पुस्तके आणी ईतर अशी अनेक पुस्तकांमधून अशा प्रश्नांची लिलया उत्तरे दिलेल्या सोडवलेल्या शेकडो केसस्टडीज आहेत. त्या नुसत्या वरवर चाळल्या तरी कळेल. बाकी श्री राबर्ट स्वबोधांच्या पुस्तकात विसंगती आहेत असे विधान करण्या ईतपत अभ्यास / आवाका असलेल्या व्यक्तीने "नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात?" असा प्रश्न करावा याचे नवल वाटले ! 'कुछ तो गडबड है दया..."
↩ प्रतिसाद: धन्या
स
सरळमार्गी Sat, 06/28/2014 - 23:49 नवीन
तुमच्या बद्दल आणि थोर कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विषयी नितांत आदर व्यक्त करुनच हे लिहीतो आहे. माझा कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही आणि तसा अर्थ कोणीही कृपया काढू नये ही विनंती: आपण डॉ. दाभोळकर यांचा उल्लेख करतान यांच्या नावापुढे कै. लावले आहे ते अंधश्रद्धेचे प्रतिक नाही का? कै हे 'कैलासवासी' चे लघुरुप असावे अशी माझी तरी समजूत आहे, त्यात चूक असेल तर मी माझी पुढील सर्व विधाने मागे घ्यायला तयार आहे व बिनशर्त माफीही मागायला तयार आहे. मनुष्याच्या शरीरात म्हणे आत्मा असतो आणि मनुष्य मृत झाल्यावर तो आत्मा त्याच्या पार्थिव शरीरापासून अलग होतो आणि मग तो 'कैलास' किंवा 'वैकुंठ' वासी होतो ही आम्हा अंधश्रद्ध लोकांची तितकीच अंधश्रद्ध कविकल्पना! हे झाले हिंदू धर्मियांच्यात, बौद्ध / ख्रिश्चन / मुस्लीम धर्मियात सुद्धा काही वेळा ''बुद्धवासी' / 'ख्रिस्त वासी' / 'पैगबर वासी' असे लिहलेले पाहीले आहे ह्या सगळ्या अंधश्रद्धा नाहीत का? अहो कोणि बघितलाय तो आत्मा, आणी तसा तो असल्यास व्यक्ती मृत झाल्यावर त्या आत्म्याचे नक्की काय होते ? तो आत्मा कैलासाला गेलाय का वैकुंठाला का आणखी कोठे ते कसे ठरवणार, काय पुरावा आहे त्याचा ? मुळात असे कैलास, वैकुंठ वगैरे काही आहे का ? तुम्ही कै.. नामाभिधान वापरले आहेत म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या कडे असायला हवी नाही का? मग कधी सांगता आम्हाला? मी व्यक्तीशः डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना मानतो, त्यांच्या विचाराचा आदर करतो, त्यांच्या नावा आधी कै. लावण्याला माझा जर सुद्धा आक्षेप नाही , कृपया गैरसमज करुन घेऊ नका. पण ज्यांची हयात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात गेली , ते काम करताना त्यांना हौतात्म्य आले त्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांना तुम्ही त्यांच्या मृत्यू नंतर आमच्या सारख्या अंधश्रद्धांच्या लायनीत उभे केलेले फारसे पटले नाही एव्हढच सांगणे आहे. मी एक सुचवू का ? जसे लष्करातल्या सेवानिवृत्त अघिकार्‍याच्या नावा नंतर कर्नल (रिटायर्ड) लिहतात तसे काही तरी नामाभिदान एखादि व्यक्ती जी 'आत्मा, कैलास, वैकुंठ ई. गोष्टी न मानणारी होती तिच्या बाबतीत वापरले पाहीजे, बघा पटते का . आणि दाभो़ळकर साहेब खरोखरिचे डॉक्टर होते तेव्हा त्यांचा उल्लेख करताना तो डॉ. नरेंद्र दाभोळकर असा व्हायला हवा , तो त्यांचा मान आहे (तुम्ही अनावधनाने विसरला आहात म्हणून ही एक नम्र विनंती, )
ब
बाळ सप्रे Sun, 06/29/2014 - 06:35 नवीन
मृत व्यक्तिच्या नावामागे "कै" लावण्याविषयीचा विचार एकदम चपलख.. योग्य प्रतिशब्द शोधायला हवा ..
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 06/29/2014 - 12:05 नवीन
कैलासवासी असा शब्द न वापरता ... सावरकरांनी योजलेला संपूर्ण ऐहिक शब्द पुढे करतो.आपण दिवंगत म्हणतो..त्याप्रमाणे..अश्या व्यक्तिस मृत्युंगत , संबोधावे.
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
स
सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 13:05 नवीन
मृत्युंगत हा शब्द जरा उच्चारायला जड्शीळ आहे , बर्‍याच जणांना जोडाक्षरे चे , रुकारा चे उच्चार करण्याचे वांधे आहेत हे मी रोज बघतोय, खोटे वाट्त असेल लोकांना 'पुष्पगुच्छ' हा शब्द म्हणायला सांगा बघा कीती जण पहिल्याच प्रयत्नात न चुकता न अडखळता म्हणू शकतात ते ! पण मी काय म्हणतो, कैलासवासी म्हणायचे का नाही ? नसल्यास दुसरा पर्याय काय यावर एखादा स्प्येशल धागा का नाही काढत !
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/30/2014 - 08:59 नवीन
मयत असा शब्द पोलिस रेकॉर्डात वापरतात. आठवा पुलंचे "बापाचे नाव येशा, मयत"
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
ब
बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 13:01 नवीन
मुद्दा काय आणि तुम्ही बोलताय काय? मूळ पेपरबद्दल बोला. त्या पेपरमध्ये तुम्हांला चूक काय वाटतं इतकं सांगा. माझ्या प्रतिसादातलं एक वाक्य उचलून प्रतिसाद फुलवू नका. मूळ मुद्दा पेपरचा, तो सोडून मी दाभोळकरांना कै का म्हटले आणि डॉ का म्हटले नाही इ. चर्चा लक्ष वेधण्यासाठीच आहे कारण मुद्द्याचं बोलण्यासारखं तुमच्याकडे नाहीच. जे बोलायचं ते पेपरबद्दल बोला. कुणाला राजमान्य राजश्री का म्हटलं नाही आणि अमुक का म्हटलं वगैरे मुद्दे बालिश आहेत अन सर्वांत मुख्य म्ह. त्यामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. हे इतकं सोपं करूनही समजत नसेल तर इलाज नाही. आणि राहता राहिला तपशीलवार भाकिताचा मुद्दा.. ज्योतिष कितीही डीटेल्ड माहिती देण्याचा दावा करीत असूदे, काही भाकिते तरी हो/नाही या क्याटेगरीत बसतात. तिथे नाणेफेकीपेक्षा जास्ती वारंवारितेने भविष्य अचूकपणे वर्तवण्यात ते अक्षम ठरलेले आहे हे पेपरने सिद्ध केलेय. इतक्या बेसिक लेव्हलवर सुद्धा जर गंडत असेल तर बाकी फाफटपसारा काय कामाचा? 'काही भाकिते चुकतात' बद्दल सांगायचे तर, ९० आणि १० दोघेही १०० पेक्षा कमीच आहेत, पण म्हणून दोन्ही एक असा दावा असेल तर..हॅ हॅ हॅ, चालू द्या.
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
अ
अनुप ढेरे Sun, 06/29/2014 - 13:46 नवीन
कुंडली भविष्य जास्तं अचूक असतं का नाडी भविष्य?
च
चित्रगुप्त Sun, 06/29/2014 - 16:46 नवीन
कुंडली भविष्य जास्तं अचूक असतं का नाडी भविष्य?
कुतुहलापोटी मी नाडी आणि कुंडली द्वारे भविष्य जाणून घेण्याचा उपद्व्याप केलेला आहे. नाडी मधे भविष्य असे काहीच सांगितले गेले नव्हते (माझ्या बाबतीत तरी) नुस्ते मोघम काहीतरी गोलमाल सांगितले होते, जे मला मुळीच पटले नाही. ओळखीच्या झालेल्या ज्योतिषांकडे मी बर्‍याच जणांना घेऊन गेलो, आणि बहुतेक प्रत्येकाने काही ना काही ठीक सांगितले. या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मूकवाचक Sun, 06/29/2014 - 17:04 नवीन
"या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे." - पूर्णपणे सहमत. त्यामुळेच संख्याशास्त्रीय चाचण्यांचा निष्कर्ष निर्णायक मानणे मला तरी जमणार नाही. बाकी अस्तित्व जगड्व्याळ असणे किंवा 'अस्तित्वात' शक्यता या पातळीवर पराकोटीची अनिश्चितता असणे शक्य असणे वगैरे गोष्टी या संदर्भात 'वाईड बॉल' आहेत. असो.
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ब
बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 17:10 नवीन
म्हणजे गूढ अंतःप्रेरणा असेल तर 'या स्थानात अमुक योग असेल तर माणूस मरतो' छाप नियम आपोआपच रद्द झाले. मग तर १२ भागवाली कुंडली बनवणे अन ज्योतिष वर्तवणे या बाबतीतले ठोकताळे निरुपयोगीच नाहीत तर मुळातच निरर्थक आहेत. त्यामुळे गूढ अंतःप्रेरणा आणि कुंडली इ. वरून ज्योतिष वर्तवणे या दोहोंपैकी एकच गोष्ट खरी आहे असेच म्हटले पाहिजे.
↩ प्रतिसाद: मूकवाचक
म
मूकवाचक Sun, 06/29/2014 - 17:15 नवीन
दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत. दोन्हीत तथ्यांश आहे. तशी प्रेरणा असलेल्या व्यक्तीला पत्रिकेचा गाईडलाईनसारखा उपयोग होऊ शकतो. मला वाटते या बाबतीतल्या शक्यता नेहेमी एक किंवा शून्य अशा बायनरी स्वरूपाच्या नसतात. हा निव्वळ गणिती प्रकार असता तर आजच्या संगणक युगात सगळे फलादेश संगणकात फीड करून सगळ्या ज्योतिष्यांना बेकार करता आले असते.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 17:48 नवीन
० किंवा १ हे बायनरी नसले म्हणून बरोबर येण्याच्या टक्केवारीला काही महत्त्व आहे की नाही? की १० मार्क आणि ९० मार्क पडलेल्या दोघांनाही १०० पेक्षा कमी म्हणून नापास करणार? बरोबर येण्याची टक्केवारी फक्त पत्रिकाधारे ज्योतिष पाहून काढली असता नाणेफेकीद्वारे येणार्‍या अचूकतेपेक्षा कमी आहे असे त्या पेपरमध्ये सिद्ध केलेले आहे. तुमचा विश्वास नसेल तर करा तसाच एक कंट्रोल्ड एक्स्पेरिमेंट आणि दाखवा रिझल्ट्स. किमान ५०% पेक्षा जास्त वेळेस तुम्ही म्हणता तसे रिझल्ट आले तर आत्ता या क्षणी तुमचं म्हणणं मान्य करतो. एका बाजूचा व्यवस्थित मांडलेला विदा मी सादर केलाय. तुम्हांला ती बाजू पटत नाही तर दुसर्‍या बाजूचा विदा नीट मांडा. इतकेही करण्याची तयारी जर नसेल तर मग आमची मुक्ताफळे बोचायचं काम नाही. निव्वळ गणिती आणि सांख्यिकीय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जर समजत नसेल तर इलाज नाही. गणिताआत २+२=४ होतात, तर सांख्यिकीत दोन 'जवळ-जवळ' किंवा 'लांब-लांब' वाटणार्‍या गोष्टी खरेच तशा आहेत किंवा नाही याचा निर्णय घ्यायचे शास्त्र आहे. काटेकोरपणा म्हणजे २+२=४ ही व्याख्या अज्ञानमूलक , शास्त्रद्वेष्टी आणि तितकीच हास्यास्पद आहे. तेव्हा निव्वळ 'मला आणि माझ्या ओळखीतल्या काही लोकांना असे अनुभव आलेत म्हणून पत्रिका बरोबर असते' याला आधार नाही. योग्य ती शिस्त पाळून साधारण ५०-१०० लोकांचा विदा जमवा आणि निष्कर्ष सांगा. या प्रयोगात लागेल तितकी सांख्यिकीय मदत मी स्वतः कराञला तयार आहे. ज्योतिषवाल्यांनी ज्योतिषाचा विदा द्यावा, त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन. तयारी असेल तर बोला, नपेक्षा मुक्ताफळे बोचतात इ.इ. टाहो बंद करा.
↩ प्रतिसाद: मूकवाचक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा