भोसरीचा जितेंदर सिंग!
http://www.loksatta.com/pune-news/atlast-jitendra-singh-arrested-664165/
भोसरी ह्या पुण्याजवळील गावात प्रियदर्शिनी नामक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.
त्या शाळेत आठवीत शिकणार्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत आणि वर्गात मराठी बोलण्याचा अक्षम्य आणि गंभीर गुन्हा केला त्यामुळे त्यांना संस्थेच्या प्रमुखाने शरीरावर वळ उठेपर्यंत मारहाण केली.
ह्या संस्थेचा भोसरीचा* संचालक जितेंद्र सिंग ह्याला शेवटी अटक केली गेली. मराठीचे माहेरघर मानलेल्या पुण्याच्या एका उपनगरात मराठी बोलण्याला गुन्हा मानला जाणे म्हणजे नेत्रदीपक प्रगती म्हटली पाहिजे.
मला वाटते ह्या भोसरीच्या* सिंगाला उत्तम मराठी बोलता येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल.
*सदर विशेषणाचा अर्थ शक्यतो भोसरी गावचा रहिवासी असा घ्यावा ;-)
💬 प्रतिसाद
(94)
म
मंदार कात्रे
Sun, 07/13/2014 - 13:08
नवीन
लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे.
सहमत ...श्लेष चांगला पकडलाय !
;)
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sun, 07/13/2014 - 14:18
नवीन
>>मराठीचे माहेरघर मानलेल्या पुण्याच्या
पुण्याला विद्येचे माहेरघर मानलेले ऐकले आहे.
- Log in or register to post comments
ए
एसमाळी
Sun, 07/13/2014 - 14:21
नवीन
माहेर माहेर विश्रांती ठाव- यामुळे विद्या तेथे विश्रांती घेते का ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 07/13/2014 - 14:37
नवीन
चुक जितेंद्र सिंग याची नाहेये...त्या शाळेला परवानगी देणार्यांची आहे...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 07/13/2014 - 14:39
नवीन
आपली प्रगती अशीच उलट्या दिशेने सुरु राहुदे मग आपल्यात आणि प्राण्यांत फरक नाही उरणार
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 07/14/2014 - 09:15
नवीन
शत प्रतिशत सहम्त ! मै भी यही बोलने वाला था ! ऐसे फंदामेन्टालिस्ट मराठी लोगोंके वजह से हमारी बम्बै मे बवाल मचा हुवा है ! अब ये घाटी लोग हमारे पुना मे भी ऐसे बवाल निकाल के राष्ट्रभाषा हिंदी एवं विश्वभाषा अंग्रेजी के खिलाफ लोगोंको भडका रहे है !
ये बहुतही निंदनीय बाब है ! सच मे ऐसे मराठी लोगोंकी गणना प्राणीयोंमेही करनी चाहिये !
- Log in or register to post comments
ब
बालगंधर्व
Mon, 07/14/2014 - 09:31
नवीन
सर्व्याना महित पदले अहे केइ जितेन्दर सिन्ग हा कुहुप कुरुर मानुस अहे. महनुनच तो भोसरिचा* अहे. मी मराटी झी मराटि हाम आझा बाना आहे. अप्ल्या महरस्त्रात मराटीसाथी राजेनी अनि मवल्यानी रत्क सान्दले. त्या रज्यात मराटीचा अपमान आपन सहण कर्नार नाहि.
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 07/14/2014 - 09:37
नवीन
अहो, बालगंधर्व असा आय्डी घेतला म्हणून चार-चार ताना घ्यायची आवश्यकता नव्हती! ;)
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 07/15/2014 - 19:20
नवीन
मोकलाया दाहि दिशा आठौले...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 07/14/2014 - 11:58
नवीन
माझा आक्शेप
यासाठी होता यापेक्शा वेगळे कायद्याच्या चौकटीमधे बसणारे मार्ग सुध्धा आहेत... आणि चुक शाळेला परवानगी देणार्यांची आहे... आणि त्यांच्यामधे एखादा तरी मराठी अधिकारी असणार जो झोपा असणार
बाकी चालुदे...
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 07/14/2014 - 14:17
नवीन
ह्या असल्या लेच्यापेच्या मनोवृत्तीच्या मुळेच आजवर मराठी माणसाचे नुसकान झाले आहे तरीही मराठी माणसाला काही अक्कल येत नाही
संकट समये प्राप्ते वयं पंचाधिकं शतम हे अजुनही कळत नाही मराठी लोकांना !तुम्ही बसा एकामेकावरच खापर फोडत अन बाहेरच्यांना घेवुदे फायदा !!
चालुच रहाणार हो ... अशी पेबळी मनोवृत्ती असेल तर असले प्रकार चालुच रहाणार !
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 07/15/2014 - 07:35
नवीन
टाळ्या ... मुद्दाच समजला नाही त्यामुळे जौदे...मला कंटाळा आलाय आता
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 07/15/2014 - 07:52
नवीन
तुमचा मुद्दाच खोडुन काढलाय हे ही तुम्हाला समजलेले दिसत नाहीये *biggrin* ... असोच !
आता बघुया तुम्हाला किती कंटाळा आलाय
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 07/13/2014 - 16:20
नवीन
आधी इंग्रजी शाळेत पोरं घालू नयेत आणि घातली तर इंग्रजीची सक्ती होते म्हणून रडू नये.
पालकांना शाळेत इंग्रजीशिवाय इतर भाषा बोलायला बंदी आहे हा नियम माहित नसेल यावर माझा विश्वास नाही आणि हा नियम माहिती असूनही मुलांना त्या शाळेत घातले जात असेल तर पालकही तितकेच दोषी आहेत. शिवाय इतर कारणांसाठी शाळेत मुलांना शिक्षा होत नसेल असेही नाही. पण असो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 07/13/2014 - 16:29
नवीन
+११११११११११
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 07/13/2014 - 18:20
नवीन
पालकांची चूक कशी? शाळेने वाट्टेल ते नियम बनवावेत आणि ते पालकांनी स्वीकारले असे समजावेत हे उफराटे तर्कट आहे. शाळेचे नियम हे कायद्याच्या कक्षेत बसणारेच पाहिजेत. महाराष्ट्रातील शाळा जर मराठीवर बंदी घालत असेल आणि मराठी बोलणार्यांना अमानुष मारहाण केली जाईल असा नियम ठरवत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. मग ती इंग्रजी माध्यमाची शाळा असो वा कन्नड वा उर्दू.
आम्ही तुमच्या शाळेत मुले दाखल करणारच आणि तुम्ही असले जाचक बेकायदेशीर नियम लादता कामा नये असे म्हणण्याचा हक्क पालकांना आहे. शुल्क भरणारा ग्राहक म्हणून तो त्यांचा हक्क आहे.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 07/13/2014 - 21:03
नवीन
बेकायदेशीर नियम आहेत हे पालकांना आधीच माहित होते की नाही? मग त्यांनी आधीच तक्रार का केली नाही?
मुळात हे अगतिक ग्राहक आहेत आणि यांना कसेही वागवले तर चालते असा या शाळांचा (रास्त) समज व्हायची वेळ का आली याचा विचार करण्याची गरज आहे.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Mon, 07/14/2014 - 03:15
नवीन
मुलांनी मराठी बोलले तर त्यांना अमानुष मारहाण केली जाईल असा नियम बनवायची हिंमत ती शाळा दाखवेल असे वाटत नाही. त्या भोसरीच्या संचालकाने आपला मराठीवरील राग त्या मुलांवर काढला असावा.
प्रियदर्शिनी शाळेबद्दल आपल्याला काही जास्तीची माहिती असेल तर ती जरूर सांगा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 07/14/2014 - 06:47
नवीन
या प्रश्नाचे दोन पैलू आहेत
१)इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी सोडून दुसर्या कोणत्याही भाषेत बोलू नये अस नियम असणे हे एक आहे. (मग यात हिंदी/ गुजराती सुद्धा आहे.)
२) मुलांना अमानुष मारहाण करणे.
यापैकी पहिली गोष्ट बर्याच शाळांच्या नियमात आहे आणि हे नियम आपण शाळेत दखल घेतो तेंव्हा आपल्या कडून पूर्ण संमती सकट सही करून घेतले जातात. या गोष्टीला भाषिक रंग दिला जाऊ नये असे मला वाटते. मुंबईत मला माहित असलेल्या बर्याच अशा शाळा ( ज्यात कोनव्हेन्ट शाळा प्रकर्षाने येतात) आहेत. जेथे मुल जर इंग्रजी सोडून दुसर्या भाषेत बोलले तर मुलांना ५० ते १०० रुपये दंड होतो आणि हा दंड पालकांना शाळेत येउन भरावा लागतो . याचा परिपाक म्हणून पालक मुलाला इंग्रजी बोलण्याची सक्ती करतात ( १०० रुपये भरण्यापेक्षा शाळेत खेप मारण्याची कटकट टाळण्यासाठी).
"शुल्क भरणारा ग्राहक म्हणून तो त्यांचा हक्क आहे."
बर्याच क्लब च्या नियमावलीत पुरुषानी बूट घालून येणे आवश्यक आहे. जीन्स ची पयंत चालत नाही ( यात बरोबर कि चूक या वादात न पडता) असे नियम करणे क्लबच्या मुलभूत हक्कात येतात असे उच्च न्यायालयांनी वेळोवेळी आपल्या निकालांमध्ये म्हटले आहे. शुल्क भरणाऱ्या ग्राहकाचा हक्क हा सरकारी शाळेत ग्राह्य धरला जाईल जर खाजगी विनाअनुदानित शाळेत आपल्याला जायचे असेल तर त्यांनी कायद्याच्या अखत्यारीत राहून केलेली नियमावली आपल्याला मान्य करावीच लागेल. नाही तर तेथे आपण प्रवेश घेऊच नका. यावर सरकार कोणतीही सक्ती करु शकत नाही. (खाजगी विना अनुदानित संस्थांच्या प्रवेशा बत) असा सर्वोच्च न्यायालयाच्या ११ न्यायाधीशांच्या पूर्ण घटनापीठाने दिलेला निर्णय आहे. (यामुळेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशात बजबजपुरी माजली आहे हा भाग वेगळा याची विदा मी सवडीने देतो)
दुसरा भाग मुलाला अमानुष मारहाण करणे हा सर्वथैव निंदनीय आहे आणि याचासुद्धा ते मुल मराठी आहे कि हिंदी भाषिक आहे याच्याशी संबंध नसावा. या बद्दल जितेंद्र सिंग यांच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच झाली पाहिजे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Mon, 07/14/2014 - 06:58
नवीन
हेच म्हणायचे आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/15/2014 - 07:48
नवीन
>> असे नियम करणे क्लबच्या मुलभूत हक्कात येतात असे उच्च न्यायालयांनी वेळोवेळी आपल्या निकालांमध्ये म्हटले आहे. शुल्क भरणाऱ्या ग्राहकाचा हक्क हा सरकारी शाळेत ग्राह्य धरला जाईल जर खाजगी विनाअनुदानित शाळेत आपल्याला जायचे असेल तर त्यांनी कायद्याच्या अखत्यारीत राहून केलेली नियमावली आपल्याला मान्य करावीच लागेल. <<
प्रश्न हा एखाद्या क्लबाच्या मूलभूत हक्कात एखादी गोष्ट बसते की नाही इतका अल्प अखत्यारीचा नाही आहे. कारण शाळा आणि क्लबात फरक आहे. आपल्या मराठी भूमिवर असली थेरे कायद्याचा आधार घेऊन कोणी करू पाहत असेल तर ती जरूर धुडकवावी. आमच्या कंपनीत देखील मराठीत बोलल्यावर 'नो रिजनल लँग्वेज' असे ऐकवले होते मला त्यावर मी 'देन प्लीज से नो फॉर हिंदी अॅज वेल' असे मी म्ह्टले कारण 'फ्रॉम अॅन अमेरिकन कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू हिंदी इज अल्सो अ रिजनल लँग्वेज. हेन्सफोर्थ आय विल चेक व्हेदर यू से द सेम टू हिंदी स्पिकींग पीपल अॅज वेल. इफ नॉट, आय विल कंटीन्यू डिसओबेइंग यू' असे ठणकावून नक्कीच सांगावे.
शाळांचे नियम, शाळांबाबतचे सरकारी नियम या बाबतीत सनदशीर मार्गाने काही सगळेच प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे कधी कधी शिवसेना मार्गाचा अवलंब करणे योग्य असते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/15/2014 - 09:18
नवीन
पुपे साहेब
मी सुरुवातीसच म्हटले आहे कि "इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी सोडून दुसर्या कोणत्याही भाषेत बोलू नये अस नियम असणे हे एक आहे. (मग यात हिंदी/ गुजराती सुद्धा आहे.)"
तेंव्हा त्यात मराठी किंवा हिंदी असा वाद येऊ नये. तेंव्हा आपला "जर हिंदी चालत असेल तर मराठी चालेल हा मुद्दा गैरलागू आहे.
जर माध्यम इंग्रजी निवडले असेल तर मी मराठीतच बोलणार हा अट्टाहास आहे. आपल्याला जर मराठीचा इतका जाज्वल्य अभिमान असेल तर मराठी माध्यमात घालावे.( दुर्दैवाने मराठी माध्यमाच्या शाळा सरकारी नियमांमुळे फारश्या चांगल्या राहिलेल्या नाहीत हि आज वस्तुस्थिती आहे).
राहिली गोष्ट शिवसेनेची. त्यांची स्वताची मुले तरी कुठे मराठी माध्यमात शिकली आहेत? आदित्य ठाकरे स्वतः बॉम्बे स्कोटीश शाळेतून शिकला जेथे मी सांगितलं तसा इग्रजी सोडून इतर भाषात बोलल्यास पालकांना स्वतः येऊन दंड भरायला लावायचा हा नियम आहे.
जाऊ द्या साहेब आपलाच दाम खोटा असताना वाद कशाला घालायचा.
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
Tue, 07/15/2014 - 09:40
नवीन
हाहा हाहा हाहा !!!... सहमत सुबोध.........
मुळात "भोसरी" ह्या गावात किंवा पुण्याच्या उपनगरात जो काही प्रकार घडला तो नक्कीच निन्दनीय आहे. पण "नक्की" काय घडलंय.. याची शहनिशा होणे अत्यंत महत्वाचे आहे. "गाववाल्यां"चा माज ओसंडून वाहणार्या या उपनगरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातात... याचेच एक मोठ्ठे अप्रूप वाटते. असो...
"जितेन्द्र सिन्ग" यांचे सोशल आणि पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स बहुतेक कमी पडले असावेत. नाहीतर मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी मुलांना मरेस्तोवर मारण्याच्या घटना भोसरी'ला नवीन नाहीत. त्याचप्रमाणे ज्या अंगणात आपल्याला नाचता येत नाही... ते अंगण लोकांना वाकडेच वाटते. "ही" घटना तर फक्त एक निमित्तमात्र आहे....
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/15/2014 - 11:47
नवीन
कॉन्टॅक्ट कमी पडले नसावेत. या जितेंंद्रसिंह साहेबांचे डंपर हायवेवरून ज्या संख्येने आणि वारंवारितेने ये जा करतात त्यावरून असे वाटत नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 07/15/2014 - 12:50
नवीन
धागा गेला खड्ड्यात ! यांनी भोसरी वरचा जुना स्कोर इथे सेटल केला ..
तुमच्या कल्पनेमधला भोसरी बदलला आहे आता ..आणि माज करणार्या गाववाल्यांच्या पोरांनी इंग्रजी शिकू नये का ?
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
Tue, 07/15/2014 - 14:39
नवीन
कपिलमुनी... भोसरी'बद्दल कधी स्कोअर-सेटल करण्यासारखे काहीच घडले नव्हते. उलट 'भोसरी' येथे पान्डव राहून गेल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे आपण आधी कन्फर्म करावे. आणि गाववाल्या पोरांनी जरूर इंग्रजी शिकावे. उलट ती तर त्यांची गरज आहे. पण शिकत असताना शिक्षणसंस्थेचे नियमही पाळावेत, अशी माफक अपेक्षा आहे. गुंडागर्दी करून सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत ना!!!! ..
तसेच वर माझ्या प्रतिसादात मी हे देखील लिहिले आहे, की " नक्की मारहाण किती व कश्यासाठी झालेली आहे, याची सखोल चौकशी व्हावी. कारण "हे" लोक कितीही शिकले किन्वा तुमच्या भाषेत सुधारले.. तरी "गावठी पॉलिटिक्स" यांच्या रक्तातच असते..... असो... कपिलमुनी... तुम्हीदेखील भोसरी'चे असाल..तर या गोष्टी तुम्हाला माहित असतीलच... कृपया मनाला लावून घेऊ नये.... माझे वक्तव्य हे घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. :)
कृपया धाग्याशी संबंधित बोलावे. ताजमहाला'चा इतिहास मी मागील एका धाग्यावर स्पष्ट केला होता. तो "तेजोमहाल"- शिवमंदिर असल्याचे सिद्धही झालेले आहे.
* उर्वरीत वैयक्तिक प्रतिसाद संपादित.
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
Tue, 07/15/2014 - 15:41
नवीन
http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5608647216075752592&SectionId=5171561142064258099&SectionName=Pune&NewsDate=20140709&NewsTitle=20%20students%20beaten%20up%20in%20Bhosari%20school
http://www.mid-day.com/articles/12-students-from-pune-school-thrashed-for-speaking-in-marathi/15436191
वर दिलेल्या सकाळ व मिड-डे यांच्या लिंक्स मध्ये स्पष्ट लिहिले आहे, की या मुलांना शाळेत इंग्रजी बोलण्यासाठी या आधीही १८-२० वेळा सौम्य शब्दांत वॉर्निन्ग देऊन झालेली होती. परन्तु तरीही ते मुद्दाम मराठीत बोलत होते. तसेच शिक्षकांशी बोलताना अर्वाच्य भाषेचाही प्रयोग करत होते. ही मुले आठवी'तली असल्यामुळे शिक्षकांनी सांगितलेले न समजण्याइतकी लहान नक्कीच नाहीत. त्यामुळे शिक्षकांना यांच्यावर हात उचलावाच लागला. नॉर्मली शहरी भागात "असे" प्रकार घडताना दिसत नाही.. किमान पुण्यात तरी! :) .. :)
शिक्षकांना शिवीगाळ करणे, संस्थेच्या नियमानुसार वॉर्निन्ग देऊन सांगितले तरी मुद्दाम मराठीतच बोलणे इ. प्रकार जर १४-१५ वर्षांच्या मुलांकडून घडत असतील.. तर त्यांना आवरणे व त्यांना सुसंस्कार शिकवणे. हे केवळ त्यांचे (सुसंस्कृत) पालकच करू शकतात. वाईट याचेच वाटते, की या काही मुलांमुळे बाकीच्या चांगल्या मुलांचे नुकसान होते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/15/2014 - 12:02
नवीन
असहमत खरे साहेब. मुलांनी एकमेकात तासाच्या मधे कोणत्या भाषेत बोलावे यासाठी कडक कायदे असावेत याला माझा विरोध आहे. शाळेत तासिका चालू असताना, पीटीच्या वेळेला इंग्रजीत बोलावे अशी भूमिका असणे ठीक परंतु मी मित्रांशी किंवा त्यानी माझ्याशी इतर वेळेला मराठीत बोलणे यासाठी शाळेचा विरोध असणे याला माझा विरोध नक्कीच आहे. आणि महाराष्ट्रात असताना असा नियम कोणी करत असेल तर तो आपण ग्राहक म्हणून नक्कीच मोडून काढावा.
झाला प्रश्न मराठी आणि इतर भाषांचा तर हे जितेंद्रसिंह उत्तर भारतीय असावेत आणि उत्तर भारतीयांची मराठीला दाबायची प्रवृत्ती सर्वत्र दिसते त्यासाठी असल्या सो कॉल्ड (तथाकथित) नियमांचा वगैरे आधार घेतला जातो. त्याचा मुकाबला प्रतिझुंडीनेच होऊ शकतो.
राहीला प्रश्न नेत्यांची मुले कोणत्या शाळेतून शिकली याचा, तर नेत्यांच्या धोरणाचा जनतेला काय फायदा होतो आहे हे ठरवून जनतेने योग्य धोरणाचा फायदा उठवावा. आणि हो ही बॉम्बे स्कॉटिश विद्यार्थी मिळत नाहीत पन्नासवेळा कधी अॅडमिशन घेताय म्हणून फोन करत असते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/15/2014 - 15:51
नवीन
पुपे साहेब,
आपला कशाला संमती आहे आणि कशाला विरोध आहे हा आपला वैयक्तिक मताचा भाग आहे. मी फक्त असे करणे कायदेशीर आहे का यावर भाष्य केले. तसे पाहिले तर पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या PICT (pune Institute of Computer technology) या संस्थेत विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना सुद्धा (dress code) पोशाखाची सक्ती आहे. आता अभियांत्रिकी की महाविद्यालयात ड्रेस कोड असावा का आणि तशी सक्ती करण्याचा अधिकार त्या संस्थेला आहे काय? हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे. पण तसा नियम करण्याचा कायदेशीर अधिकार त्यांना आहे आणि ज्यांना ते पटत नाही त्यांनी तेथे प्रवेश घेऊ नये किंवा नोकरी करू नये.
भाषिक अस्मितेचा आणि अभिमानाचा प्रश्न आला कि आपण तलवारी घेऊन उभे राहतो.पण मुंबईत असणार्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील निम्मी महाविद्यालये हि भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्यांका साठी असून त्यातील ५१ टक्के जागा ते आपल्या भाषिक बांधवाना देतात ( यात मुसलमान अंजुमन इस्लाम ख्रिस्ती फादर आग्नेल,डॉन बॉस्को, जैन, गुजराती सोमैया , सिंधी थडूमल आणि दाक्षिणात्य SIES येतात ).
यावर कोणी( राजकीय पक्ष धरून) आवाज उठवताना दिसत नाही.
~ राहिल्या सरकारी संस्था तेथे ५१ टक्के आरक्षण आहेच (जे आता ७३ टक्के होऊ घातले आहे). म्हणजे फक्त ४९ टक्के जागा फक्त बुद्धिमत्तेसाठी आहेत. ~
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 07/15/2014 - 18:03
नवीन
निव्वळ हास्यास्पद दावा. ४९ टक्के जागा बुद्धिमत्तेसाठी व उरलेल्या ५१ टक्के जागा मठ्ठ दगडांसाठी की काय! असो.. सरकारी संस्थांमधील आरक्षित जागांमध्ये प्रवेश घेणारे व शिकणारे बुद्धीमान नसतात व अनारक्षित जागांमध्येच प्रवेश घेणारे तेवढे बुद्धिमान असतात हा दावा निव्वळ हास्यास्पद आहे.
बाकी चालू द्या (माझ्या परवानगीची गरज आहेच असे नाही!)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/15/2014 - 18:50
नवीन
साहेब
बारावीच्या PCM मध्ये ३६ % मिळालेल्या विद्यार्थ्याला मुंबईच्या जे जे रुग्णालयात प्रवेश मिळाला आहे. (अशा डॉक्टरकडे आपण जाणार का? ) आणि खुल्या वर्गात ८७. ३ टक्क्याला मिळाली नाही. तफावत असावी पण किती? दहा ते पंधरा टक्के ठीक आहे. (४१ टक्के?)
आमच्या मित्राने मागास म्हणून एम बी बी एस आणि एम एस केले आणि शेवटी कोणी रुग्ण येईनात म्हणून एक दिवस महाराष्ट्र शासन राजपत्रात आपले कांबळे आड नाव बदलून ब्राम्हण आड नाव लावले.त्याच्या स्वतःच्याच शब्दात अरे आमचेच लोक येत नव्हते "अरे हा "आपल्यापैकी" आहे याच्या कडे नको.
कम्युनिस्ट विचार सरणी "बुद्धिमत्ता हि जन्मजात नसून ज्या वातावरणात वाढता त्यावर ठरते " हि कालबाह्य आणि चुकीची ठरलेली आहे.
असो आपले मत आपल्यापाशी
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 07/15/2014 - 19:00
नवीन
बारावीला PCM ऐवजी PCB चे निकष ग्राह्य धरत होते असे वाटते. प्रवेशपरीक्षा येण्यापूर्वी एससी-एसटी-ओबीसी-एनटी वगैरे मागास जातींसाठी मार्कांचा निकष ४५ टक्के व खुल्या जागांसाठी मार्कांचा निकष ५० टक्के होता. पीसीएमला ३६ टक्के मार्क मिळूनही पीसीबीला जास्त मार्क मिळणे शक्य आहे.
बाकी अमुकतमुकला १०० टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळाला नाही अशीही अॅनेकडोटल उदाहरणे ऐकली आहेत.
पेमेंट सीट्सबद्दल आपले काय मत आहे? ती बंद करावीत का? की पैशे भरल्याने बुद्धीमत्ता आपोआपच येते? बाकी शिक्षणाचा आणि आयुष्यातील प्रगतीचा फारसा संबंध नसतो असे चिंत्य मत येथेच वाचले आहे त्यामुळे त्या विषयावर चर्चा करण्याचा हेतू समजला नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 07/16/2014 - 06:16
नवीन
पी सी एम नव्हे पी सी बी असायला हवे टंकन दोषाबद्दल क्षमा.
अभियांत्रिकीला हा ५० टक्क्याचा निकष होता वैद्यकीय प्रवेशासाठी नाही.
पेमेंट सीट ला सुद्धा तसाच निकष असावा याबद्दल दुमत नाही. पैसे भरल्यावर नुसती शिकायचीच नव्हे तर शिकवायचीही अक्कल येते.
जातीप्रमाणे १० ते २० टक्के गुण हे आधिक (ग्रेस) द्यावे. अगदीच ३६ टक्के म्हणजे फारच वाईट आहे.
राहिली गोष्ट एखाद्या परीक्षेत मुलाला चांगले गुण मिळाले नाहीत तर मुलगा हुशार नाही असा मुळीच अर्थ नाही.
शैक्षणिक यशाचा आणि आयुष्यातील यशाचा १० टक्के संबंध आहे असे माझे आजही मत आहे. परंतु काही बाबतीत विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपली तेवढी पात्रता असणे आवश्यक आहे उदा. लढाऊ विमानाचा वैमानिक (फायटर पायलट) होण्यासाठी आवश्यक असलेली PABT टेस्ट पास न करता आपण एखाद्याला आरक्षणातून असा वैमानिक बनवला तर काय होईल?
तसेच एकाच वर्गात एकाच शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी पोलिस उप निरीक्षक म्हणून भरती होतात. एक जण आरक्षणातून ७ व्या वर्षी निरीक्षक म्हणून बढती मिळवतो आणि खुल्या वर्गातील उपनिरीक्षक १५ वर्षे पर्यंत लटकत बसतो( एवढे कमी नाही तर त्याने पोलिस प्रशिक्षण अकादमीत शिकवलेला ६ वर्षे कनिष्ठ असलेला विद्यार्थी त्याच्या डोक्यावर ठाणे अंमलदार म्हणून वरिष्ठ बनून येतो यात कोणती गुणवत्ता आहे?
राहिली गोष्ट मराठी अस्मितेची त्याबद्दल मी वर म्हटलेच आहे कि आपण जर गुजराती सिंधी कच्छी मद्रासी असाल तर आपल्याला भाषिक अल्पसंख्यांक आणि ख्रिस्ती, मुसलमान असाल तर धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून अभियांत्रिकीत आरक्षित जागा मिळतात याबद्दल आपली अस्मिता जागी होत नाही. पण एखाद्या गैर मराठी माणसाने मराठी मुलांना मारहाण केली तर लाथा बुक्क्यांनी तुडवायची भाषा होते. हेच जर तो माणूस मराठी असता तर एवढी चर्चा झाली नसती. मग त्याला भाषिक रंग नव्हे तर माणुसकीचा अभाव असा रंग आला असता.
Losing sight of the wood for the trees अशी आपली अवस्था आहे.
आज हि परीस्थिती शिक्षणात आहे उद्या नोकर्यात आणि घरांच्या सोडतीत झाली तर आश्चर्य वाटू नये.
असो
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 07/16/2014 - 12:49
नवीन
जर वैद्यकीय प्रवेशाला निकष नव्हता तर बारावीला ३६ टक्के गुण मिळवणारा मुलगा अपात्र आहे हे आपण कसे काय ठरवू शकतो?
आरक्षणाचे सध्याचे नियम माहीत नाहीत पण आरक्षणाबाबत तुमचा गैरसमज असावा. खुल्या जागांसाठी असलेली परीक्षा आणि राखीव जागांसाठी असलेली परीक्षा यात फरक नाही. एकदा प्रवेश मिळाल्यावर दोन्ही गटांना सारख्याच परीक्षा व तोच अभ्यासक्रम असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने आरक्षणातून प्रवेश घेतल्याने तो कमकुवत असल्याचे सिद्ध होत नाही. जर तो ती परीक्षा पास झाला नाही तर तो डॉक्टर किंवा वैमानिक होऊच शकणार नाही.
अॅनेक्डॉटल उदाहरणे भरपूर आहेत. दुसरे समांतर उदा. रोहन नारायण मूर्ती हे इन्फोसिसमध्ये १५-२० वर्षे काम करणाऱ्यांच्या डोक्यावर उच्च अधिकारी म्हणून गेले. निव्वळ अॅनेक्डॉटल उदाहरणे घेण्यापेक्षा एकंदर सांख्यिकीचा विचार करावा.
जिथे जिथे आरक्षण सर्वप्रथम सुरु झाले ती महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात ही राज्ये तथाकथित गुणवत्ताधारित राज्यांपेक्षा लवकर प्रगती करु लागली. सामाजिक न्याय व अार्थिक प्रगती यांचा जवळचा संबंध आहे.
अमुकतमुक डॉक्टरला ३६ टक्के मिळाल्याने एमबीबीएसला प्रवेश मिळाला होता हा निकष लावण्याइतकी डॉक्टरची माहिती मला त्या डॉक्टरकडे जाताना असत नाही. तो एमबीबीएसची परीक्षा पास झाला आहे की नाही इतपतच असते. तुम्ही ज्याला बुद्धिमत्ता म्हणता ते परीक्षेत गुण मिळवण्याचे कौशल्य असते. क्लास लावला, घोकंपट्टी केली की असे गुण मिळतात. - खरी बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शाळेतून ड्रॉपआऊट होतात. शास्त्रज्ञ होतात किंवा स्वतःची कंपनी चालू करतात. (थोडक्यात त्यांना ३६ टक्केही गुण मिळत नाहीत!) बाकी जन्माधिष्ठित बुद्धिमत्ता ठरवण्याचे प्रयोग भारतात हजारो वर्षे करुन झाले आहेत. आता निदान मुलांची पार्श्वभूमी, शैक्षणिक संस्कारांचा इतिहास वगैरे पाहून प्रवेश दिले जात असल्याने परिस्थिती सुरळीत होत आहे याचा मला आनंद वाटतो.
बाकी मराठी अस्मितेच्या चर्चेत मला रस नाही.
इत्यलम
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 07/16/2014 - 16:07
नवीन
मी तो अपात्र आहे असे कुठे म्हटले आहे ? आणि अपात्र ठरविणारा मी कोण? माझे म्हणणे एवढेच आहे कि दोन्हीत काहीतरी तुलना असावी.
वैमानिकाची परीक्षा PABT पास होण्यासाठी आरक्षित व्यक्तीला कमी पात्रतेचा निकष ठेवला नाही यावर आपण बोलणे टाळून जेवढे सोयीस्कर तेवढेच बोललात. PABT पास होत असेल तर तो आरक्षित कि अनारक्षित हा वाद येणारच नाही. दुर्दैवाने वैद्यकीय प्रवेशा बाबत असा काटेकोर निकष नाही.
शिवाय कल्याणकारी सरकारने एक वर्षाचा अभ्यासक्रम करून होमियोपथी किंवा आयुर्वेद किंवा युनानी डॉक्टरना आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्यास परवानगी दिली आहेच. त्यात पैसे वाले धनदांडगे आहेतच. बढीया है!!!!!.
उद्या राष्ट्रपती अंगरक्षक म्हणून सैनिक निवडतात त्याचा निकष हा सहा फुट उंची असा आहे. त्यावर तुम्ही असे म्हणू शकता कि साडेपाच फुटाचा माणूस कमी दर्जाचा आहे का? तसे नसेलही पण मुल मुद्दा हा आहे कि राष्ट्रपतीनचे अंगरक्षक हे त्यांचे हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्यापेक्षा उंच असावे म्हणजे हल्ला झाल्यास त्यांना चारही बाजूनी ते सुरक्षित करू शकतील. आता यात तुम्ही राष्ट्रपती "गेले" तरी चालतील किंवा पाच फुटाचा गुरखा सुद्धा चांगला अंगरक्षक बनू शकेल असे फाटे फोडाल तर मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही.
प्रवेश देताना आपण कोणता तरी निकष लावता ना ? मग त्या निकषात आरक्षणासाठी काही वेटेज द्या त्या निकषाला अर्थ नाही असे म्हणून नुसती टीका करण्यापेक्षा आपण एखादा दुसरा मार्ग सुचवा कि? कि आपल्या म्हणण्याप्रमाणे गुणवत्ता हा निकषच नाही. मग बोलणेच खुंटले.
अॅनेक्डॉटल उदाहरणे नव्हेत पण महाराष्ट्र पोलिस मध्ये बढतीचे निकष जातीनिहाय बदलतात हि वस्तुस्थिती आहे. आपल्याला हवे असेल तर माहितीच्या अधिकाराचा वापर करून पहा
एक मात्र नक्की आहे कि जर आरक्षणातून झालेल्या डॉक्टरने काढलेल्या रुग्णालयात पाय ठेवण्यासाठी "सगळेच" लोक बिचकतात हि वस्तुस्थिती आहे.मग बाकी तुम्ही काहीही वाद घाला.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/15/2014 - 19:03
नवीन
एकदा अॅडमिशन मिळाल्यानंतर पुन्हा पास होण्यासाठी आरक्षण नसते ना?
तो माणूस एमबीबीएस, एमएस झाला ह्याला काहीच अर्थ नाही का?
शैक्षणिक हुशारी वाढवता येते असं मला वाटतंय. दहावीला ५८% बारावीला ५६% मिळालेला मुलगा डिप्लोमाला राज्यात दहावा येतो (इथपासून) मेरीटवर डिग्री करतो नि पीजी सुद्धा करतो. मिपावर सुद्धा अनेक जण असतील.
लई गोंधळ उडतोय राव!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 07/15/2014 - 19:46
नवीन
१००% सहमत !!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 07/16/2014 - 10:52
नवीन
पूर्ण सहमत!!!!
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 07/16/2014 - 10:45
नवीन
१००% सहमत!
असले हास्यास्पद दावे ऐकले की हसण्यावारीही नेववत नाही.. दया येते!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sun, 07/13/2014 - 16:51
नवीन
रामदास काकानी साम्गितलेली एक म्हण आठवली.
आधी गुंतू नये.... गुंतल्यावर मग कुंथू नये
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 07/13/2014 - 17:09
नवीन
*ROFL*
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 07/13/2014 - 17:31
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sun, 07/13/2014 - 18:12
नवीन
अगदी अगदी... पालकांनाच सोस असतो. तसली शिक्षा झाली म्हणून लगेच मराठी प्रेमाचे उमाळे आलेत एक्दम. ती शिक्षा झाली नसती तर सगळ्यांनी गप पाळले असते नियम. त्यामुळे मराठीचा जाज्वल्य अभिमान आणि अमानूष शिक्षा हे एकत्र करायची गरज नाही. दोन वेगळे इशूज आहेत.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 07/13/2014 - 18:27
नवीन
इथे लोक इंग्रजी माध्यमात शिकणार्या मुलांबद्दल आणि त्याच्या पालकांबद्दल अकारण हिणकस शेरे मारत आहेत. इंग्रजी माध्यमात शिकणे ही गरज बनली आहे. तसे केल्याने त्या व्यक्तीला मराठीबद्दल तिरस्कार असे मानणे चूक आहे. भारतातील सगळ्या क्षेत्रात उच्च शिक्षण हे इंग्रजीतच असते. त्यात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. असे असताना अट्टाहासाने सगळ्यांनी आपापल्या मुलांना मराठी माध्यमातच अशी अपेक्षा बाळगणे खुळचटपणाचे आहे. उलट इंग्रजी माध्यमात शिकणार्यांना अन्य प्रकारे मराठीची गोडी लावणे जास्त व्यवहार्य ठरेल. सिनेमे, मालिका, गाणी, पुस्तके, भाषणे ह्या अनेक मार्गाने मराठी जोपासली जाऊ शकते. केवळ मराठी माध्यमातून शिकणाराच तो मराठीप्रेमी अशी मांडणी आततायीपणाची आहे.
इंग्रजी माध्यमात शिकणार्या लोकांना मराठीवर प्रेम करायचा हक्कच नाही असे काहीतरी बिनडोक आणि टोकाचे विचार इथे मांडले जात आहेत त्याचा मी तीव्र विरोध करतो.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 07/13/2014 - 20:57
नवीन
इंग्रजी शिकणे ही गरज आहे इतपत मान्य आहे, पण इंग्रजी माध्यमात शिकणे ही गरज नव्हती आणि नाही.
आणि इंग्रजी माध्यमातच शिकायचे असेल तर इंग्रजीच बोलले पाहिजे हा नियम चूक नाही.
इथे फक्त मुलांना अमानुषतेने वागवण्याचा प्रश्न आहे. भाषेचा काहीही संबंध नाही.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Mon, 07/14/2014 - 03:13
नवीन
निव्वळ इंग्रजी शिकणे नव्हे तर इंग्रजी माध्यमातून शिकणे हीच आज गरज बनली आहे. आज मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे. किती हुषार विद्यार्थी शिक्षक बनण्याचे स्वप्न बघतात? तेही मराठी माध्यमाचे? जवळजवळ कुणी नाही. दुसरे काही जमत नसेल तर शिक्षक बना अशी वृत्ती बनली आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात बर्या शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. सामान्य माणसाकडून ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जावे आणि केवळ तत्त्वाकरता त्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात धाडावे अशी अपेक्षा अवाजवी आहे.
त्यामुळे इंग्रजी माध्यम अपरिहार्य आहे. आणि तिथे प्रवेश घेतलेल्या लोकांचा दु:स्वास करण्याऐवजी त्यांनाही मराठीबद्दल प्रेम निर्माण करता आले तर त्याचा जास्त उपयोगी ठरेल.
इंग्रजी माध्यमात शिकायचे असेल तर फक्त इंग्रजीच बोलले पाहिजे हा अट्टाहास अनाकलनीय आहे. मराठी भाषेला तिलांजली देऊनच इंग्रजी माध्यमात शिकता येते असा काही गंड आपण बाळगत आहात असे दिसते. हा अत्यंत निराधार आहे.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 07/14/2014 - 13:57
नवीन
आज मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे कारण काल मराठी लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवून पैशांच्या थैल्या घेऊन इंग्रजी शाळांच्या दारात रांगा लावल्या.
आता सापळ्यात अडकलेल्या माकडासारखी अवस्था होणे स्वाभाविक आहे.
असो, मुलांना मारल्याबद्दल जितेंद्रसिंगवर कायदेशीर कारवाई व्हावी; पण त्याला लाथाबुक्क्यांनी वगैरे मारुन मराठी शिकवण्याचा खुळचटपणा करण्याऐवजी आपल्या आजूबाजूला राहणार्या इंग्रजाळलेल्या मराठी पोरांना समृद्ध मराठी बोलता, वाचता कसे येईल याची काळजी केल्यास बरे. इत्यलम.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/15/2014 - 07:52
नवीन
सहमत आहे ननि. इंग्रजी माध्यमाचा बागुलबुवा आपणच केला आहे उगाचा परंतु आता पुण्यातही घराच्या जवळ चांगल्या मराठी शाळांची अनुपलब्धता आणि त्यामुळे जवळच्या इंग्रजी शाळेत पाल्याला घालावे लागण्याची अगतिकता यामुळे इंग्रजी शाळेत मराठी बोलण्याबद्दल सुवर्णमध्य काढणे गरजेचे झाले आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 07/13/2014 - 17:31
नवीन
हुप्प्या बाबा धागा काडुन पलाला काय?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 07/13/2014 - 18:01
नवीन
मुळात असला काही नियम करणे हाच एक जबरदस्त मूर्खागमनीपणा आहे. धाग्याशी पूर्णपणे सहमत आहे. लै माज आहे असल्या दीडदमडीच्यांचा. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पायजे - शक्यतोवर कायदेशीर पद्धतीने. याचिका इ. दाखल केली पाहिजे याविरोधात.
अवांतरः तमिळनाडूमध्ये असा नियम असतो किंवा कसे, याबद्दल पाहिले पाहिजे. तिथली लोकं मातृभाषेबद्दल लै आग्रही आहेत हे तर सर्वांस ठाऊक आहेच.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »