Welcome to misalpav.com
लेखक: अनिल तापकीर | प्रसिद्ध:
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन ताळ्यावर येते हा पद्धतशीर पसरवलेला गैरसमज आहे ,याला कोणताही मानसशास्त्रीय आधार नाही.

दुनियेचं राहू द्या, स्वतःचा अनुभव लिहा! कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा एक पैलू समजला गेला आहे. अजपा म्हणजे काय याची सांगितलेली प्रक्रिया वाचून देखिल, परिणाम काय होईल हे कुणाच्याही लक्षात येईल. न तुम्हाला स्वतःचा अनुभव, न कल्पनाशक्ती; आनंदात राहा.

कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा एक पैलू समजला गेला आहे. कल्पनाशक्ती आणि वास्तव यात फरक असतो हे समजण्यासाठी विशेष बुद्धीमत्ता लागत नसावी नै ? ;) अजपा म्हणजे काय याची सांगितलेली प्रक्रिया वाचून देखिल, परिणाम काय होईल हे कुणाच्याही लक्षात येईल. अजपा म्हणजे काय हे न-वाचताच कल्पनेच्या जिलब्या पाडता हे देखील कुणाच्याही लक्षात येईल बरं का... ;) न तुम्हाला स्वतःचा काही वाचायची इच्छा, न समजुन काही घेण्याची वॄत्ती; जिलब्या पाडत राहा. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

तुम्ही नामस्मरणाच्या कोणत्या स्टेजला आहात आणि किती वर्ष साधना चालू आहे ते सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फालतू लिंका आणि कमेंटस करण्यापेक्षा अजपा म्हणजे काय, तो सिद्ध झाल्यावर मनात नेमका काय बदल घडतो आणि पर्यायानं त्याचा जीवनावर काय परिणाम होतो ते इथे लिहा, मग बघू.

आधी तुम्ही गीता न-वाचता त्यावर भाष्य करु कसे शकता ? ते सांगा बरं... ;) परत सांगतो... श्वासावर लक्ष द्या पाहु... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

जो विषय तिथल्या तिथे संपवत चला. तो विषय होता त्या वेळी असेच अवांतर उद्योग केले होते. आता, अजपा म्हणजे काय ते स्वतःच्या शब्दात सांगता येत नाही. वैखारी निषिद्ध तर ती उल्लंघून पुढच्या स्टेजला कसं जायचं याचा पत्ता नाही. त्यात पुन्हा (मला दिलेल्या पहिल्या प्रतिसादात) हा घोळ घातलायं !:
तोंडाने जिभेवाटे नामस्मरण चालु आहे,पण मन मात्र चारही दिशेला भटकत आहे अशा वेळी भगवंताशी एकरुपता कशी साधता येइल ?
मंत्रानं भगवंताशी एकरुपता साधते? नामस्मरणानं एकसंध आणि मुद्देसूद विचार करण्याची क्षमता हळूहळू कशी संपते याची झलक, प्रतिसादातूनच दाखवायचं ठरवलंय का?

जो विषय तिथल्या तिथे संपवत चला. तो विषय होता त्या वेळी असेच अवांतर उद्योग केले होते. हॅ.हॅ.हॅ जिलबी बाबा तुमच्या जिलब्याच अवांतर असतात त्याचे काय ? *LOL* तसेही गीता न-वाचता त्यावर भाष्य करण्याच्या बाता तुम्ही करता,सर्व संत मंडळींनी जे सांगितले त्याला चूक ठरवता. मग तुमचा प्रतिसाद हा जिलब्या नाही तर काय आहे जिलबी बाबा ? मंत्रानं भगवंताशी एकरुपता साधते? हॅ.हॅ.हॅ... च्यामारी पहिल्या प्रतिसाद संतवाणी वाचली नाहीत त्याखाली कबीर वाणी वाचली नाहीत ! मनात कोणताही इतर विचार केला नाही तर ज्याचे नाम घेतो त्याच्याशी एकरुपता का होणार नाही ? जिथे मनोभाव नसेल त्या साधनेला अर्थच कुठे उरतो ? असो... तुमच्या जिलब्या पाडणे चालु ठेवाच. आम्ही मोजु. *LOL* परत एकदा :- अजुन तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नाहीये... हॉट इज धिस जिलबी बाबा. *LOL* जाता जाता :- जिलबी बाबा हा वरचा व्हिडीयो तुमच्यासाठी नाही बरं का... ज्यांना पहायचा असेल ते पाहतीलच. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

मनात कोणताही इतर विचार केला नाही तर ज्याचे नाम घेतो त्याच्याशी एकरुपता का होणार नाही ?
असा एकरुप होण्यासाठी कुणीही नाही, तो केवळ मंत्र जपणार्‍याचा कल्पनाविलास आहे. असो, शेवटी (फोटो बरा वाटला म्हणून) विडिओ ऐकला. त्यावरनं आपल्या एकूण साधनेची कल्पना आली. आपण बहुदा मंत्रोच्चारणाच्या `लास्ट स्टेजला' गेलेले दिसता! काही दिवसात इहलोकावरच आपल्याला कृष्णधाम दिसू लागेल! माझा पहिला प्रतिसाद (मुलाखत घेतल्यावीना) सार्थ करुन दाखवल्याबद्दल धन्यवाद!

असा एकरुप होण्यासाठी कुणीही नाही, तो केवळ मंत्र जपणार्‍याचा कल्पनाविलास आहे. असं तुम्हाला वाटते हाच तुमचा कप्लना विलास आहे जिलबी बाबा. :ROFL: शेवटी (फोटो बरा वाटला म्हणून) विडिओ ऐकला. अर्रेच्या... अजपा जप ची लिंक दिली तर ती वाचली नाहीत,पण व्हिडीयो पाहिलात ! श्वासावर थोडेफार लक्ष केंद्रित झालेले दिसतय ! गुड कीप इट अप. :ROFL: आपण बहुदा मंत्रोच्चारणाच्या `लास्ट स्टेजला' गेलेले दिसता! काही दिवसात इहलोकावरच आपल्याला कृष्णधाम दिसू लागेल! पुन्हा एकदा कप्लना विलास ! आपण आपले जिलबी बाबा हे नाव सर्वार्थाने खरे करु दाखवलेत. :ROFL: माझा पहिला प्रतिसाद (मुलाखत घेतल्यावीना) सार्थ करुन दाखवल्याबद्दल धन्यवाद! हॅहॅहॅ... ते गीता न-वाचता त्यावर भाष्य करण्याच कसब दाखवा की जरा... तुमची देखील चांगली मुलाखात घ्यायला तयार आहोच. :ROFL: मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

अशीच साधना सुरु ठेवा. काही दिवसातच तुम्हाला, इतरांना जे दिसत नाही ते दृगोचर होऊ लागेल. इतकंच काय इतरांना ऐकू न येणारे दिव्य ध्वनी कानात घुमू लागतील. जे दृगोचर होतंय ते इतकं स्पष्ट दिसू लागेल की तुम्ही भर रस्त्यात त्याच्याशी बोलू देखिल लागाल! तुम्हाला जगाची पर्वा करण्याचं काही कारणच उरणार नाही. तुमच्या भोवती तुमच्या मार्गानं जाणारे असंख्य अनुयायी मिळतील. आणि त्यांच्या गराड्यात तर तुम्हाला, आपण `परातत्त्वाला' उपलब्ध झालो याची पदोपदी खात्री पटेल. अश्या `हवाबाणबाबांना' लोक `पोहोचलेला माणूस' समजतील. सायकिअ‍ॅट्रीत यालाच `भ्रमिष्ट होणं' म्हणतात... पण तुम्हाला त्याची फिकीर करण्याचं काही कारण नाही.

जिलबी बाबा तुम्हालाच फक्त कल्पना विलासाच्या जिलब्या पाडण्या पलिकडे काही जमत नाही ! तेव्हा तुमचच डोक चेक करायची खरी गरज आहे बरं का... सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो हे देखील तुम्हाला कळत नाही, तेव्हा तुम्हाला भ्रमिष्ठ म्हणजे काय ते कळणे सुद्धा महाकठिण झाले आहे. तशीही प्रतिसाद न-वाचता जिलब्या पाडण्याची तुमची सवय जुनीच असुन तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख इथेच झाली होती. तसेच वैचारिक जिलब्या टाकायला "विशेष" गुण लागत नाहीत हे सुद्धा आधीच सांगुन झाले आहे बरं का जिलबी बाबा. तेव्हा गेट वेल सुन ! जाता जाता :- मनाची रुणुझुणू रुणुझुणू अती वाढली की जिलबी बाबा जिलब्या टाकायला लगेच तयार होतात. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !

त्या स्टेजला आपण हळूहळू पोहोचता आहातच. सगळीकडे भगवंत दिसू लागला आणि रात्रंदिन मंत्रघोष ऐकू येवू लागला की (कुणाला तरी) नक्की, इथे कळवायला सांगा. सदस्यांना मंत्रजपाचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो ते पाहण्याचे सौख्य लाभेल आणि पुन्हा कुणीही असले प्रयोग करणार नाही.

सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो! चला स्वतः बद्धल खात्री पटली तर तुम्हाला ! ;) { आता ही केस पूर्ण बंद करतो. } *LOL* पुढच्या प्रतिसादासाठी स्रॉरी सॉरी जिलबीसाठी जागा रिकामी ठेवली आहे, कारण शेवटची जिलबी आपलीच हा तुमचा हातखंडा ठावुक आहे...आणि तो तुम्ही नक्कीच पूर्ण करणार याची खात्री देखील आहे. *LOL* जाता जाता :- सध्या जिलबी किती रु. किलो आहे ? *LOL* आणि हो खालची सही तुमच्यासाठी नाही बरं का... उगाच उघडुन बघाल ! *LOL* मदनबाण...... आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !

ही क्लॅरिटी आहे. तुमचं त्या विपरित, सगळंच धुसर होतंय. रटाळ जपासारखे तेचते निरर्थक शब्द चालू झालेत. चालू द्या.

>>> जिलबी बाबा तुम्हालाच फक्त कल्पना विलासाच्या जिलब्या पाडण्या पलिकडे काही जमत नाही ! तेव्हा तुमचच डोक चेक करायची खरी गरज आहे बरं का... +१११११११११११११.... जिलबीबाबा ४ थ्या प्रकारातले आहेत. आपल्याला काहीच कळत नाही हेच त्यांना कळत नाही.

शालेय वयात १५ ऑगस्ट, सव्वीस जानेवारी वगैरे दिवशी गावभर कर्णकटु आवाजात "अब तुम्हारे हवाले वतन साथियों" "जरा आंख मे भरलो पानी" "वतन की राह मे ..शहीद हो" वगैरे गाणी ठाणाणा वाजत असायची, आणि जीव नकोसा व्हायचा. त्यानंतर काही दिवस इच्छा नसताना या गाण्यांचा अजपा जप मनात धिंगाणा घालायचा, आणि काही करणे मुश्किल व्हायचे. अलिकडे काही दुकानदार दुकानात 'मच्छर भगाओ - कम- गायत्री मंत्राचे मशीन लावून ठेवतात, त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो. अश्या दुकानात पाच मिनीटे थांबल्यावरही नंतर बराच वेळ तो अजपा जप चालू रहातो. या अनुभवावरून अजपा जप कसा असावा याची थोडीशी कल्पना आहे, आणि 'भीक नको, पण कुत्रं आवर' अशी स्थिती होत असणार अजपा वाल्यांची. म्हणूनच मी पहिल्या प्रतिसादापासून 'स्वानुभवाधीष्ठित माहिती द्यावी, असा आग्रह धरला आहे, परंतु धागाकर्त्याने वा अन्य कुणी तसे केलेले नाही.

त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो. ते मशीन आणि त्यातून होणार्‍या शब्दगळीचे चित्र एकदम डोळ्यासमोर उभे केलेत ! =))

त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो.
ते सुध्दा अनुराधा पौडवाल की कोणातरी स्त्रीच्या आवाजात ... खरं तर स्त्रीयांना गायंत्री मंत्र म्हणायला बंदी आहे / निषिध्द आहे ! (टाकली काडी *biggrin* मिपाय स्वाहा: ... मिपाय इदम् न मम् !)

खरं तर स्त्रीयांना गायंत्री मंत्र म्हणायला बंदी आहे / निषिध्द आहे !
असं नक्की कुठल्या धर्मशास्त्रात आहे? मुंज झालेली व्यक्ती हा मंत्र म्हणू शकते आणि प्राचीन काळी स्त्रियांचीही मुंज होत असे.

गायत्री हा वेदोक्त मंत्र आहे ( ऋग्वेद ४,६२,१० ) स्त्री आणि शुद्रांना वेदोक्ताचा अधिकार नाही (त्यांच्यासाठी पुराणोक्त मंत्र आहेत) म्हणुन स्त्रीयांनी गायत्री मंत्र म्हणाणे निशिध्द आहे !

जन्मना जायते शुद्रः संस्कारात भवेत् द्विजः | वेद-पठत भवेत् विप्र ब्रह्म जनातति ब्राह्मणः |
हा रेफरन्स लावला असेल बहुधा ! सो लेट मी करेक्ट माय सेन्टेन्स ...
गायत्री आणि समस्त वेदोक्त मंत्राचा अधिकार फक्त "द्विजांनाच" आहे !

बरं मग ब्रह्मवादिनी बायकांचे काय? त्यांना निषिद्ध नव्हता तो. विधिवत् मुंज बिंज करून जानवे परिधान करून गायत्री मंत्रच का, वेदांची सूक्ते त्या पठण करीत असत.

त्यांची मुंज झाली नव्हती का ? तसे असल्यास ते निशिध्दच म्हणावे लागेल ... मोडस ऑपरॅन्डी हा फॉलॉ व्हाय्लाच पाहिजे , जर सुशिक्षित लोकच त्याला फाटे फोडायला लागले , अन पळवाटा शोधायला लागले तर मग लवकरच तो मोडस नामशेष होईल !

वर स्पष्टच म्हटले आहे की मुंज झाली होती म्हणून. बरं, बाकी मुंज न होता गायत्री मंत्र म्हटल्याने काही आभाळ कोसळत नाही. तथाकथित पावित्र्यही भंगत नाही. मनातला भाव हा शेवटी महत्त्वाचा असतो.

बाकी मुंज न होता गायत्री मंत्र म्हटल्याने काही आभाळ कोसळत नाही.
>>> आणि गायत्री मंत्र मुळीच न म्हणल्यानेही आभाळ कोसळत नाही ! आपल्या धर्मात कोनावरच कसलीच सक्ती नाहीये , ज्याला जे करायचे ते करायला तो फ्री आहे ! पण काही विधीनिशेध आहेत हे पाळले पाहिजेत . ज्याला खरंच भक्तीभावने गायत्री मंत्राचे पठण करायचे असेल त्याने विधीवत मुंज करुन घ्यावी , ती करायची नसल्यास इतर पुराणोक्त मंत्र आहेतच की .... मुंजही करणार नाही अन गायत्रीच म्हणणारच असा हट्टाग्रह कशासाठी ? ह्यातील भाव काही भक्तीयुक्त वाट्ट्त नाही ! आता सध्यातरी आम्हाला गाय्त्री मंत्राचे काही कौतुक नाही पण जेव्हा पुरश्चरण करायचे मनात येईल तेव्हा विधीनिषेध पाळुनच करु :) अवांतर : बाकी ह्या विधीनिषेध वरुन एक किस्सा आठवला , एकदा सज्जनगडावर एक असाच हट्टाग्रही माणुस समर्थांच्या समाधीकडे / रामाच्या मुर्तींकडे पाय करुन बसला होता , त्याला जाऊन असे का करतोस बाबा म्हणुन एकाने विचारले तर म्हणतोय कसा की "जळी स्थळी काष्ठी पाषाणी देव आहे " ... तिथल्यातिथे जाऊन सन्नकन कानाखाली वाजवायचा विचार आणि हा डायलॉग मनात आला होता की "माज्या हातातही देव आहे अन तुझ्या गालातही अन ह्या आलेल्या आवाजातही *biggrin* " पण तेवढ्यात ते प्रकरण एका रामदासींनी हातळले ... आमच्या हातुन एक स्टंट हिरावला गेला किंव्वा विसोबा खेचरांसारख्या गुरुंची भेट :)

त्यामुळे जर कुणाला मुंज न करता गायत्री मंत्र म्हणायचा असेल तर हट्टाग्रह इ.इ. लेबले लावणेही काही योग्य नाही. मुंज न करता गायत्री मंत्र म्हणायचा लोकांना अट्टाहास आहे हे तुमचे पर्सेप्शन आहे. ते खरेच कशावरून? याची आणि सज्जनगड एपिसोडची तुलना इतक्यासाठी योग्य नाही, की स्वतःचा पॉइंट प्रूव्ह करण्याच्या नादात एक्स्ट्रीम उदा. दिलेले आहे. अशी एक्स्ट्रीम उदा. दिल्याने मूळ मुद्दा आजिबात सिद्ध होत नाही. केस बाय केस हे बदलत असतं. पुराणोक्त मंत्र आहेतच की, वैदिक मंत्र कशाला? हा सवाल करायची अ‍ॅथॉरिटी तुम्हांलाच काय, कुणालाही नाही. जर कुणी अशा भ्रमात असेल, तर सुदैवाने त्यांना फाट्यावर मारण्यासारखी परिस्थिती आज आहे. कधीकाळी ती नव्हती.

तर सुदैवाने त्यांना फाट्यावर मारण्यासारखी परिस्थिती आज आहे.
मी हेच म्हणतोय ना ! तुम्हाला विधीनिषेध मान्य नसतील तर संपुर्ण प्रथाच फाट्यावर मारा ना ! दॅट्स इट ! गायती काय की सज्जनगड काय .... मुळ बेस लाईन इतकीच आहे की सोप्पे सोप्पे नियम जरी आपल्याला फालतु वाट्ट असतील तरी ते पाळले पाहिजेत , जर नसतीलच पाळायचे तर त्या भानगडीतच कशाला पडा ? जे नियम पाळुन करतात त्यांना चीडवायला / डिवचायला काय ???????????? बाकी "विधीनिषेधांना फाट्यावर मारणार आन मनाला वाट्टेल तेच करणार " ह्याला मराठीत हट्टाग्रह म्हणतात असा माझा समज आहे !

मुळ बेस लाईन इतकीच आहे की सोप्पे सोप्पे नियम जरी आपल्याला फालतु वाट्ट असतील तरी ते पाळले पाहिजेत , जर नसतीलच पाळायचे तर त्या भानगडीतच कशाला पडा ? जे नियम पाळुन करतात त्यांना चीडवायला / डिवचायला काय ????????????
म्हणजे एखाद्या प्रथेतले काय अन किती घ्यावे याचे मूलभूत स्वातंत्र्यही प्रत्येकाला असू नये म्हणता? असे म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे आणि तो का मान्य करावा? बरं हे तथाकथित डिवचणे म्हणजे तरी काय? इतर लोकांनी गायत्री मंत्र म्हटला हे पाहून त्या मंत्रावर मोनॉपॉली सांगणार्‍यांच्या पोटात का दुखावे हे मला कोणीतरी सांगा. एक चार ओळींचा मंत्र म्हणण्याची साधी इच्छा व्यक्त केली तर त्याला हट्टाग्रह म्हणणे, मंत्र काय तो विशिष्ट अल्पसंख्यांनीच म्हटला पाहिजे असा आग्रह धरणे हे माझ्या मते हट्टाग्रहात मोडते. बाकी चालू द्या.

जाऊ दे रे ब्याटमाना ! वेदोक्त कि पुरणोक्त यावादात शाहु छत्रपतींची बदनामी करण्यापर्यंत या दुराग्रही लोकांची मजल गेली होती!! या दुराग्रहात टिळकांसारखा व्यासंगी माणुसही आघाडीवर होता,तिथे प्रगोसारख्या पामरांकडून कसल्या लॉजिकल स्पष्टीकरणाची अपेक्षा करत आहात!!!

तुम्ही गप्प बसाहो नेफळे ...तुम्हाला वेद नको आहेत पुराणेही नको आहेत टिळकही नको आणि शाहुही नको आहेत ... तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे ... एक तर तुम्हाला वेदांविषयी आदर नाही तरीही वेदोक्तच पाहिजेल ...बर दिले तर नियमानुसार पाळणार नाही अन नाही दिले तर राडा करनार .... तुम्हाला व्यवस्थित ओळखुन आहेत सगळे !!

वेदोक्त दिले तर.... पुरणोक्त दिले तर.....>>>>> देणारे तुम्ही कोण? वाडवडीलार्जीत इस्टेट असल्यासारखे दावे का करतातय? वेद पुराणे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काय? वेद अपौरुषेय आहेत, याचा अर्थ कुणाचाही तिर्थरुपाची खाजगी मालमत्ता नाही, ज्याला जसे योग्य वाटेल तसे त्याने त्यातला सार घ्यावा ,कुणा प्रगोबिगोच्या परमिशनची गरज नाही.

चला काहीही कारणाने का होईना ... तुम्ही वेदांमधील सार घ्यायला तयार झालात हेच खुप झाले :) (पणत्वैयक्तिक टीका करुन तुम्ही परत तुमची "पातळी" दाखवत आहातच म्हणा )

वेद पुराणांच्या बाबतीत एका विशिष्ट समाजाने पझेसीव्ह व्हायचे कारण नाही! ती त्या समाजाची खाजगी मालमत्ता नाही ,एवढेच मला सांगायचेय!!

वेद पुराणांच्या बाबतीत एका विशिष्ट समाजाने पझेसीव्ह व्हायचे कारण नाही! ती त्या समाजाची खाजगी मालमत्ता नाही ,एवढेच मला सांगायचेय!!
बरं मग कधी येताय वेदोक्त मंत्र म्हणायला ? तुमच्या नावाने आपण एखादा छोटासा यज्ञच करुयात की !!

एखाद्या प्रथेतले काय अन किती घ्यावे याचे मूलभूत स्वातंत्र्यही प्रत्येकाला असू नये म्हणता? असे म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे आणि तो का मान्य करावा?
हेच लॉजिक सर्वत्र लावणार काय ? सिलेक्टीव्ह सिलेक्शनचे मुलभुत स्वातंत्र्त्य ... ह्म्म ?? तसे असले तर वे वाक्य सवे करुन ठेवत आहे ... पुढे मागे कुठेतरी क्वोट करेन सविस्तर चर्चेच्या रेफरन्स साठी :)

अवश्य. पण याचा बादरायण संबंध सिलेक्टिव्ह रीडिंगशी लावण्यात काही हशील नाही, कारण दोहोंत क्वालिटेटिव्ह फरक आहे. इथे फक्त निरुपद्रवी उपासना आहे, तर तिकडे जाणूनबुजून केलेला विपर्यास आणि अंततोगत्वा चिखलफेक आहे.

निरुपद्रवी कशी ? धर्माचे नियम न पाळता केली उपासना(जे की बर्‍याच वेळा ढोंग / दांभिकता असते) ही धर्माचे नियम पाळुन उपासना करणार्‍यांसाठी उपद्रवच असतो !

चार ओळीचा मंत्र म्हटल्याने नक्की कुणाला आणि कसला उपद्रव होतो ते मला अजूनही कळालेलं नाही. पण अशा वांझोट्या चर्चांत अडकून पडलेल्या समाजावर मूठभर अल्पसंख्य परकीयांनी कसं काय राज्य केलं असेल ते उमगलं. एकीकडे असली एक्स्क्लूझिव्हिटी दाखवायची आणि दुसरीकडं अन्य धर्मीयांच्या धर्मप्रसाराला लोक बळी पडतात म्हणून ओरडायचं! स्वतःच दारे बंद करून घेतली तर लोक घरात येत नैत म्हणून ओरडण्यापैकी प्रकार आहे हा. याला काहीच अर्थ नाही.

तुम्हाला काय वाटतं .... इतर धर्मात असे विधीनिषेध डू & डोन्ट्स नसतात ? की जे असतात ते फाट्यावर मारायचे स्वातंत्य्र असते ? की जे लोक असे फाट्यावर मारतात त्यांना खुप मोठ्ठा आदर मिळतो ?

या असल्या बिनबुडाच्या विधीनिषेधांमुळेच सर्व धर्म गुंडाळून ठेवायची गरज आहे.. त्यापेक्षा तुम्ही आपले धर्म म्हणजे धारण करणे किंवा एक जीवनपद्धती या सेफ व्याख्येवर या मग काय कोणालाच प्रॉब्लेम नसतो !! कारण तुमचे हे असले विधीनिषेध म्हणजे हिंदु धर्म नव्हेच असे सांगणारे अनेक हिंदु धर्माभिमानी भेटतील.. :-)

इतर धर्मांत काहीही का असेना, एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच लोकांना स्वीकारायला हिंदू म्हणवणारे कुचकुचतात. त्यामुळे असल्या प्रथा तरी बिनकामाच्या आहेत. अवघा हिंदू एक इ.इ. बाता मारणार्‍यांना जर साधा एक मंत्र इतरांनी म्हटल्यामुळे त्रास होत असेल तर घंट्याचं एकीकरण होणारे. आणि बाकी धर्मांत काय होतं याची फिकीर मी का करावी हा एक वाईड बॉल सोडून देत आहे. चालुद्या.

एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच लोकांना स्वीकारायला हिंदू म्हणवणारे कुचकुचतात.
>>> मुळीच नाही ... आधी म्हणल्याप्रमाणे पुराणोक्त मंत्र आहेतच की !
त्यामुळे असल्या प्रथा तरी बिनकामाच्या आहेत. अवघा हिंदू एक इ.इ. बाता मारणार्‍यांना जर साधा एक मंत्र इतरांनी म्हटल्यामुळे त्रास होत असेल तर घंट्याचं एकीकरण होणारे.
मंत्र म्हणल्याने कोणाला त्रास कशाला होतोय ? मी वरच म्हणले आहे की हिंदु धर्म फ्री आहे ...ज्याला जे हवे त्याने ते करावे ... कोणी अडवणारे नाहीये ... मी मुद्दा इतकाच मांडतोय की जे विधीनिषेध पाळुन हे सर्व करतात त्यांच्या साठी हा भोंदुपणा आहे बस्स इतकेच !!
आणि बाकी धर्मांत काय होतं याची फिकीर मी का करावी
>>> कारण तुम्हीच तर म्हणालात ना की असल्या विधीनिषेधांमुळे धर्मांतर होतात .... मी इतकच दाखवुन देतोय की असले विधीनिषेध सर्वच धर्मात असतात !

आधी म्हणल्याप्रमाणे पुराणोक्त मंत्र आहेतच की !
वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र कुणाला पाहिजेत ते ते त्याप्रमाणे घेतील, तुम्ही ठरवायचं काम नाही. हा फालतूचा अहंकार बिनबुडाचा आहे, कालबाह्य आहे. हे ठरवणारे तुम्ही कोण? ग्रंथांतले सगळेच्या सगळे आहे तस्से सर्व काळी घ्यायचे हा वेडपटपणा कशासाठी? हिंदू धर्मही काय सर्वकाळ एकसारखाच होता काय?
विधीनिषेध पाळुन हे सर्व करतात त्यांच्या साठी हा भोंदुपणा आहे बस्स इतकेच !!
तथाकथित विधिनिषेध म्हणजे बर्‍याचदा निव्वळ कर्मकांड असते, बस्स इतकेच! त्याला बाकीच्यांच्या दृष्टीने काडीचेही महत्त्व नाही. नुसता दंभ असतो कैकदा..
कारण तुम्हीच तर म्हणालात ना की असल्या विधीनिषेधांमुळे धर्मांतर होतात .... मी इतकच दाखवुन देतोय की असले विधीनिषेध सर्वच धर्मात असतात !
हा हा हा. अन्य धर्मांतील विधिनिषेधाचा नकार मी कधीच केलेला नाही, फक्त विधिनिषेध हिंदू धर्माला कसे भोवले हे सांगतो आहे. अन्य धर्मांतील विधिनिषेध कसे का असेनात. आपल्याला काय भोवले हे पाहण्याची इच्छाच नसणे ही सोयीस्कर आत्मविस्मृती झाली. याचा झाला तर तोटाच होईल. बसा मग आपापल्या पोथ्यापुराणांत, जगाशी याचमुळे संपर्क तुटतो आणि परकीय येऊन राज्य करून जातात. सुदैवाने हे मत अलीकडे बहुमतात नाही त्यामुळे चालूदे.

कन्क्लुडींग कमेन्ट फ्रॉम माय साईड : द्विजांनी वेदोक्त मंत्र म्हणले अन इतरांनी पुराणोक्त म्हणले तर त्यात काही उच्च नीच नाही ... आमच्या साठी वेद आणि पुराण दोन्हीही श्रेश्ठच आहेत ! ज्यांना जे म्हणायचेत त्यांनी ते म्हणावेत ... पण जे विधीनिषेध पाळुन धर्माचरण करतील ते विधी निषेध न पाळता धर्माचरण करणार्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत ( हे वैयक्तिक मत आहे, तुमच्यालेखी फाट्यावर मारणारे श्रेष्ठ आणि नियम पाळणारे कनिष्ठ असे असु शकेल , त्याला कोणाचीच हरकत नाही , हिंदु धर्मात वाट्टेल ते स्वातंत्र्य आहे ज्याला जे हवे त्याने ते मत बनवावे ) ही माझी कन्क्लुडींग कमेन्ट ! तुमचा प्रतिसाद सविस्तर पणे वाचुन , कधी तरी कट्ट्याला चर्चा करु . बाकी नेफ़ळेरावांना ह्या निमित्ताने वेदातील मंत्र म्हणण्याची इच्छा झाली ह्या बद्दल आनंद व्यक्त करुन मी माझे चार शब्द संपवतो *biggrin*