Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १

श
श्रीगुरुजी
Mon, 08/25/2014 - 09:04
🗣 75 प्रतिसाद
मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती). (१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का? (२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते? (३) हिंदी चित्रपटाचे नाव सुरूवातीला हिंदीत, इंग्लिशमध्ये व नंतर उर्दु/अरेबिक मध्ये दाखविले जाते. हिंदी वगळता याच इतर २ भाषात नाव का दाखवितात? मल्याळम्, तेलगू, पंजाबी इ. सर्व भारतीय भाषांमध्ये नाव का दाखवित नाहीत? (४) पूर्वीच्या गिअरच्या स्कूटर्सच्या गिअरची रचना जरा विचित्र असायची. पहिला गिअर टाकताना तो उलटा आपल्या दिशेने फिरवायला लागायचा. नंतर विरूद्ध दिशेने फिरविल्यानंतर न्यूट्रल गिअर व नंतर ओळीने दुसरा, तिसरा व चौथा गिअर असायचे. मोटारसायकलचे गिअर देखील असेच असतात. गिअर्सचा क्रम १-न्यूट्रल-२-३-४ असा असायचा. त्याऐवजी गिअर्सचा क्रम न्यूट्रल-१-२-३-४ असा व्यवस्थित क्रमाने का नव्हता? (५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत? (६) एखादा मुलगा/मुलगी खूप खर्चिक मागणी करायला लागला/ली तर पूर्वीची माणसे "तुझे चोचले पुरवायला आम्ही काही लॉर्ड फॉकलंड नाही लागून गेलो" असे उपहासात्मक उद्गार काढून ती मागणी धुडकावून लावत असत. फॉकलंड नावाचे अर्जेंटिना देशाच्या जवळ एक छोटे बेट आहे. पण हा लॉर्ड फॉकलंड कोण होता? तो खूप श्रीमंत आणि उधळ्या होता का?

प्रतिक्रिया द्या
28359 वाचन

💬 प्रतिसाद (75)
ब
बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 08:12 नवीन
+१ उष्ण थंड, कफ वात पित्त या संकल्पना अमूर्त आहेत (Abstract concepts). त्यांना संशोधन करुन मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आयुर्हित गुरुवार, 08/28/2014 - 09:45 नवीन
हजारो वर्ष सफल झालेले संशोधन वाचुन समजावून घेतले जाण्याचे कष्ट करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही असे म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 10:17 नवीन
चव हा गुणधर्म (वर्णन करण्यास abstract असला तरी) जीभ हा त्याचा सेंसर आहे या दृष्टीने concrete संकल्पना आहे. तापमान हा गुणधर्म त्वचा हा सेंसर अथवा एखाद्या पदार्थाचे त्यामुळे होणारे प्रसरण या दृष्टीने concrete संकल्पना आहे. रंग हा गुणधर्म डोळे हा सेंसर या दृष्टीने concrete संकल्पना आहे. अशा प्रकारे पदार्थाची प्रकृती या आयुर्वेदीय गुणधर्माविषयी मूलभूत सेंसर किंवा मापनाची प्रक्रिया उद्धृत करणारे स्पष्टीकरण कुठे आहे ते जरुर सांगावे. समजून घेण्याचे कष्ट घेण्यासाठी बरेच जण आतुर आहेत. उदाहरणांवरुन उलट स्पष्टीकरण नकोय. उदा. बर्फ म्हणजे थंड, वाफ म्हणजे गरम किंवा आंबा म्हणजे गोड, मिरची म्हणजे तिखट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित गुरुवार, 08/28/2014 - 21:51 नवीन
शीत- उष्ण गुण- गुणधर्म व शरीरातील कार्य. साभारः बाबा पाटील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/25/2014 - 14:26 नवीन
दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे. दुध व मांसाहार : कित्येक मांसाहारी पदार्थांत क्रिम टाकतात आणि ते कोणत्याही समस्येशिवाय लोक चवीने वारंवार खातात. दही व मांसाहार : अनेक प्रकारचे मांस दह्यात मरिनेट करतात असे ऐकून आहे. दुध व फळे : हे टाळायचे तर फ्रूट सलादच नव्हे तर केळ्याचे शिक्रणही टाळावे लागेल. थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये : असं कसं, असं कसं ? फ्राईड आइस्क्रिम आमचा अत्यंत आवडता पदार्थ आहे. पाककलाविषारद आणि अन्नशास्त्रज्ञांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
स
सूड Mon, 08/25/2014 - 17:39 नवीन
>>असं कसं, असं कसं ? बर्‍याच दिवसांनी हे वाचून सविताताई प्रभूणे आठवल्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/25/2014 - 18:30 नवीन
तोच हेतू होता ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्यारे१ Mon, 08/25/2014 - 18:32 नवीन
सूड - द चूकशोधक प्रभूणे नाही, प्रभुणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आयुर्हित Wed, 08/27/2014 - 01:29 नवीन
दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे एकत्र खाल्ल्याने ह्या पदार्थातील गुणधर्म विसंगति मुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे अतोनात नुकसान होते व ती भ्रमित होते(programme gets corrupted). त्यामुळेच सोरायसिस, ऑस्टीओ आर्थरायटिस/वात विकार व ल्युपस सारखे गंभिर व प्राणघातक आजार होतात. ह्या गोष्टी सुद्धा पाककलाविषारदांना व अन्नशास्त्रज्ञांना शिकवल्याच गेल्या पाहीजेत. थंड व गरम पदार्थ एकत्र खाल्ले तर असमान प्रसरणामूळे दातांची क्षती होते व दात तुटू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
श्रीगुरुजी Tue, 08/26/2014 - 10:33 नवीन
>>> नख, केस प्रमाणेच खुरात मेलेल्या पेशी असल्याने वेदना/जखम होत नाही बैलांना पूर्ण आडवे पाडून व त्यांचे चारही पाय बांधून तळपायात नाल ठोकताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असताना मी पाहिले आहे. त्यामुळे नाल ठोकताना त्यांना वेदना नक्कीच होत असणार. म्हणजेच तळपायात जिवंत पेशी असणार. >>> ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो. लहानपणी एखाद्या मुलाने दह्यात/ताकात गूळ घालू का असे विचारल्यावर मोठी माणसे, "काय आज नशा करायचीय का?" असे विचारायचे. एका मोठ्या व्यक्तीने दही/ताकात गूळ घातल्यावर आंबल्यामुळे अल्कोहोलसारखा परीणाम होतो असे सांगितले होते. हातभट्टीवाले आंबवलेल्या मिश्रणात गूळ, नवसागर इ. घालतात असे वाचले होते. त्यामुळे दही/ताक + गूळ हे मिश्रण काहीतरी विचित्र पदार्थ तयार करत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Wed, 08/27/2014 - 01:43 नवीन
पाय बांधल्यामुळे ते त्यातून सूटायची धडपड करतात व त्यातुन त्यांना इजाही होते व त्यामुळेच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात हे खरे आहे. ताजे दही/ताक + गूळ हे योग्यच आहे. अनारसे सोडले तर गुळ घालून आंबवलेली एकही पाक्रू मलातरी सध्याला माहित नाही. लहान मुलांना घोळणा फुटुन नाकातून रक्त येण्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याला गुळ खावु देवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ए
एस Mon, 08/25/2014 - 11:26 नवीन
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?
हे खिळे तिरपे ठोकले जातात. गुरांच्या तळपायांना टापा असे म्हणतात. त्या आतून थोड्या पोकळ असतात. खिळा ह्या पोकळीत असेपर्यंत जनावराला तो लागत नाही. नाल ठोकणे हे फार कौशल्याचे काम आहे. टापा ह्या डांबरी किंवा खडकाळ रस्त्यावर चालून झिजू नयेत म्हणून मारल्या जातात.
(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?
शासन असलेली राज्यव्यवस्था ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे ज्यात राज्याचा प्रमुख हा मोनार्क म्हणजेच लोकांनी न निवडलेला/वंशपरंपरागत असा असतो आणि दुसरा म्हणजे राज्यप्रमुख हा लोकनिर्वाचित असतो. (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निवडणूक.) यालाच 'रिपब्लिक' असे म्हणतात. भारत हा स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी रिपब्लिक बनला. या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. त्याआधी १५ ऑगस्ट १९४७ पासून देशाचे राज्य हे १९३५ च्या 'गवर्न्मेंट अ‍ॅक्ट ऑफ इंडिया' नुसार चालत होते. नव्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात. राष्ट्रपतींची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या लोकांकडून होते. हे पद वंशपरंपरागत नसते. त्याचबरोबर राष्ट्रपतींना पदावरून लोकांनी निवडून दिलेली संसद महाभियोगाद्वारे दूर करू शकते. देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावे चालतो. प्रत्येक पदाची नेमणूक राष्ट्रपतींच्या नावे केली जाते. अगदी पंतप्रधानसुद्धा राष्ट्रपतींनी नेमलेला असतो. असेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संबंधांचेही आहे. म्हणून संसदेच्या किंवा विधानमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला राष्ट्रपती आणि राज्यपाल हे अनुक्रमे संबोधित करतात. त्याला अभिभाषण असे म्हणतात. राष्ट्रपती हे त्यांचे सर्व निर्णय हे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार घेतील अशी घटनादुरुस्ती (मला आठवत नाही केव्हा) करण्यात आली. त्यानुसार त्यांचे अभिभाषणही हे सरकारने तयार करून दिलेले असते. ह्या अभिभाषणात राष्ट्रपती त्यांच्या सरकारची भावी ध्येय्यधोरणे इत्यादी जनप्रतिनिधींपुढे मांडत असतात. माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन ह्यांनी अभिभाषणाचा पायंडा मोडून त्याऐवजी मुलाखत द्यायची सुरुवात केली होती. ह्यात सरकारचे फारसे नियंत्रण नसल्याने तेव्हाच्या सरकारने ही नवी पद्धत बंद करायला लावली. बाकी प्रश्नांना पास.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/25/2014 - 14:49 नवीन
बहुतेक सर्व लोकशाही देशांत अभिभाषण लिहीणे हा देशाच्या सर्वोच्च शासकिय अधिकार्‍याचा (हेड ऑफ गव्हर्नमेंट) हक्क असतो. कारण तो/ती त्याच्या/तिच्या कार्यकालात काय करू इच्छितो/ते याचा आराखडा अभिभाषणात अपेक्षित असतो. जर सर्वोच्च शासकिय अधिकारीच (हेड ऑफ गव्हर्नमेंट) देशाचा सर्वोच्च अधिकारी (हेड ऑफ स्टेट) असला/असली तर तोच/तीच अभिभाषण लिहीतो/ते आणि वाचतो/ते; उदा. अमेरिकन प्रेसिडेंट. संविधानिक राजेशाही असलेल्या यु के मध्ये इंग्लंडच्या राणीचे पार्लमेंटमधले "State Opening of Parliament" अभिभाषणही सत्तेत असलेले सरकार लिहून देते आणि राणी ते वाचते.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 08/25/2014 - 20:14 नवीन
(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?
याचं उत्तर जरा अधिकारी लोक देतील का? स्पेक्युलेशन नको.
  • Log in or register to post comments
आ
आसिफ Tue, 08/26/2014 - 19:39 नवीन
घोडा/ बैल यांची खुरे मॄदु असल्या कारणाने खडकाळ /डांबरी रस्त्यावर चालल्यामुळे झिजतात. काही वेळा खडे टापांच्या आतील नाजुक भागात घुसल्याने जनावराला इजा होउन चालणे अवघड होते. जनावराला नाल मारताना त्याची जुनी नाल काढली जाते ,झिजलेली वाढलेली खुरे साफ केली जातात, खडे असतील तर काढुन नवीन नाल मारली जाते. नवीन नाल ही खुराच्या आकारा प्रमाणे बनवलेली असते, घोड्यासाठी एकच नाल तर बैलासाठी त्याच नालेचे दोन भाग केलेले असतात. नाल मारण्यासाठी वापरले जाणारे खिळे खास त्याच कामासाठी बनवलेले असतात. हे खिळे सरळ ना मारता तिरके मारले जातात त्यामुळे खिळे नाले पासुन पाऊण ते एक ईंच अंतरावर येतात. हे खिळे तोडुन तिथे वाकवुन कानशीने खिळे ,खुर घासुन समतल केले जातात. घोड्याला नाल मारताना खाली पाडले जात नाही, ज्या पायावर नाल मारायची आहे तो पाय दुमडुन नाल मारली जाते.काही घोडी खुप मस्तवाल असतात त्यांना मात्र खाली पाडुन नाल मारण्याशिवाय पर्याय नसतो. बैलाला मात्र नेहमी खाली पाडुन नाल मारल्या जातात, खाली पाडताना सर्व सावधगिरी घेतली जाते. बैलाने त्याचे पाय झाडु नयेत म्हणुन करकच्चुन बांधले जातात इतकेच. नाल मारल्यामुळे जनावराला चालणे सुकर होते, खुराची झिज होत नाही. ~आसिफ.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 08/27/2014 - 05:59 नवीन
खूप छान माहीती आसिफ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आसिफ
ऋ
ऋतुराज चित्रे गुरुवार, 08/28/2014 - 09:33 नवीन
आंबा हे उष्ण फळ उन्हाळ्यात कोकणात मोठ्या प्रमाणावर का येते? द्राक्ष हे थंड फळ हिवाळ्यात नाशिकला का येत असेल? ही फळे खावून लोक आजारी पडावीत व तेथील वैदूंची पोटे भरावीत असा निसर्गाचा हेतू आहे. अहो पपई खाउन गर्भपात करण्याच्या(पहिल्या महिन्यात) प्रयोग माझ्या मित्राने त्याच्या बायकोवर केला होता. प्रयोग फसला, छानपैकी गुटगुटीत मुलगी जन्माला आली. मित्र अजुनही म्हणतो मी चूकून पिकलेले डांगर खायला दिले असेल, पपईच्या गुणाची मला खात्री आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/28/2014 - 09:51 नवीन
पपई खाण्यामागे असे करण्याचा हेतू हा अप्रिय वाटला. पण तो विषय वेगळा. मुद्दा असाय की मुळात पपई उष्ण असल्याने गर्भपात होतो आणि थंडमुळे होत नाही हे कसे? उष्ण = गर्भपात? उष्ण = दाह, उष्ण = तापमान, उष्ण = वेदना , उष्ण = आगआग .. आले उष्ण.. कारण ते खाल्यावर आग होते. ते अंगाला चोळले की आग होते. असे लॉजिक आहे काय ? आईसक्रीम खायला थंड असते पण ते वास्तविक आयुर्वेदिक संकल्पनेत उष्ण असावे..(चुभूदेघे) उष्ण असणे आणि गर्भपात किंवा तत्सम परिणामांचा एकमेकांशी संबंध कसा येतो? सर्दी ही व्हायरसमुळे होते हे ऑब्जेक्टिव्हली दाखवले गेले आहे. पण थंड गुणधर्माचे पदार्थ खाल्ल्याने हे व्हायरस जागृत होतात का? थंड गुणधर्माच्या पदार्थात असे काय असते की ज्याने हे व्हायरस सक्रिय होतात. व्हायरसबियरस वगैरे काही नसतातच.. तसे मानणे हेच खोटे आहे असे म्हणणे म्हणजे मूलभूत सत्यपरिस्थितीच नाकारणे. ते जमणे कठीण आहे. शेवटी तर्कनिष्ठ जे जे सर्व पथींमधे आहे ते अलाईन होणे ही खरी होलिस्टिक चिकित्सा. थंड गुणधर्माचा पदार्थ खाल्ल्याने सर्दी / खोकला / म्युकस कसे / का होते याची कॉजल रिलेशनशिप शोधली जाताना दिसली नाही. पपईने अमुक एक अपाय होतही असेल, पण त्यात पपईतले कखग या नावाचे काहीतरी संयुग कारणीभूत असेल (टॉक्सिक इफेक्ट) असा विचार न होता केवळ उष्ण थंड यातच ते बसवले जाते. मॉडर्न मेडिसिनमधे अगदी सरळसरळ विषाचीही प्रक्रिया पेशींवर कोणत्या मेकॅनिझमने होऊन त्यायोगे मनुष्य कसा मरतो याचे थेट कारण शोधून सांगितलेले असते. (नागाचे विष मज्जासंस्थेतल्या पेशींना नेमके काय डॅमेज होते, आणि कोणा सापाचे विष रक्तातले घटक कसे विघटित करते) पण केवळ शीत किंवा उष्ण किंवा उग्र किंवा अमुकजन्य या गुणांमुळे मृत्यू ओढवतो असे म्हटलेले नसते. आतड्यांचा दाह, जुलाब हा अनेक केमिकल्समुळे होऊ शकतो. त्यातली काही केमिकल तिथे सूज उत्पन्न करत असतील किंवा काही आतड्याच्या हालचालीवर परिणाम करत असतील.. किंवा आणखी काही. तस्मात ते उष्ण पडले इतकेच न म्हणता नेमके काय झाले त्याचे तपशीलवार रासायनिक कारण कळले तर अधिक नेमके टारगेटेड उपाय करता येतील. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण "अमुक खाऊन पहा की तमुक जाणवेल" म्हणून तो पदार्थ उष्ण या प्रकारच्या मांडणीमधे मूळ संकल्पनेचे कारण मिळत नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
ब
बाबा पाटील गुरुवार, 08/28/2014 - 17:44 नवीन
दोन शास्त्रांमधला फरक लक्षात घ्या,प्रत्येक गोष्टीत तुलना करत गेले तर पदरात काहीच पडणार नाही, दोन्ही शास्त्रे आपपाल्या ठिकाणी आहेत्,त्यांना त्यांच्याच जागी ठेवा एकत्र घुसळायला गेलात तर काहीही उपयोग होणार नाही,त्यापेक्षा बेसिक समाजावुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
द
दादा कोंडके गुरुवार, 08/28/2014 - 20:35 नवीन
सहमत. आयुर्वेद समजून घेण्यासाठी आधी त्यावर श्रद्धा असावी लागते. श्री डॉ. बालाजी तांबे यांचे लेख वाचून सुरवात करावी असा सल्ला देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
आ
आनन्दा गुरुवार, 09/11/2014 - 03:54 नवीन
दोन शास्त्रांमधला फरक लक्षात घ्या,प्रत्येक गोष्टीत तुलना करत गेले तर पदरात काहीच पडणार नाही, दोन्ही शास्त्रे आपपाल्या ठिकाणी आहेत्,त्यांना त्यांच्याच जागी ठेवा एकत्र घुसळायला गेलात तर काहीही उपयोग होणार नाही,त्यापेक्षा बेसिक समाजावुन घ्या.
एक्झॅक्टली, तिथेच तर प्रोब्लेम अहे. दोन्ही शास्त्रांचे जाणकार ही दोन शास्त्रे एकत्र आणायलाच तयार नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
र
रेवती गुरुवार, 08/28/2014 - 18:21 नवीन
बापरे! काय हो तुमचा मित्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/28/2014 - 10:27 नवीन
पाश्चिमात्य देश किंवा भारतातील शहरांत राहणारे लोक तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले असतात असे वाटते. मग बर्‍याच हॉलीवूड किंवा बॉलीवूड पटात जेव्हा व्हिलन हिरोला किंवा त्यांच्या कुटुंबाला मारायला येतो तेव्हा ते घराचा दरवाजा उघडतात आणि व्हिलन किंवा त्याचे कामगार आत घुसतात. हे हुशार घरमालक आपल्या दरवाज्याला पीपहोल का ठेवत॑ नाही ?
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे गुरुवार, 08/28/2014 - 14:41 नवीन
अहो ब-याच वेळी दाराला कडी अथवा लॅचच नसते. हिंदी चित्रपटात व्हिलन अणि त्याची गँग डायरेक्ट दरवाजा ढकलून मोठ्या घरात घुसते. ते पण रात्रीचे. कधी कधी हीरो देखील व्हिलन किंवा हिरोइनच्या (बापाच्या) मोठ्या बंगल्यात असाच घुसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
श
श्रीगुरुजी Fri, 08/29/2014 - 08:41 नवीन
हिंदी चित्रपट आणि तर्कशास्त्र यांचा ३६ चा आकडा आहे. हिंदी चित्रपटांचा आनंद घ्या. कृपया असे का आणि तसे का नाही याचा विचार करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा