मला माहीत असलेले रामायण
(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)
________________________________________________________
आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.
सीता ही भूमीकन्या होती.
________________
वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?
दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ?
नवर्याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ?
बलात्काराने स्त्री उपभोगणार्या वानराला मृत्युदंड दिला.
तोच गुन्हा करणार्या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला.
निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली.
१. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला.
२.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता.
______________________
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
मग शूर्पी अनार्या कशी ?
रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे.
पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो?
बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय.
आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली.
अशी कथा मी वाचलेली आहे.
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात.ज्याने ब्रम्ह जानले तो ब्राम्हण. सगळेच अनार्य असतात. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. जो हे काहीही करत नाही तो अनार्य. तोच अनार्य शब्द आज अनारी.......असा प्रवास करत करत अनाडी झालाय. जो आर्य नाही तो अनार्य. न-आर्य हेच न-आर्य आजचे नायर(आर्य नसलेले).आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत.जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. मग हे सुसंस्कृत आहेत की नाहीत?देवही चुकत होते आजही चुकतात आणि पुढेही चुकतील.याबाबतीत सहमत. त्याचे कारण असे आहे... देव मानवी आणि मूर्त स्वरूपात असू शकतो अशी कल्पना असणार्या धर्मांतले बहुसंख्य देव प्राचीन कालातल्या असामान्य व्यक्ती असाव्या असे मला वाटते. त्यांचे वचन/आचरण हे पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरावे यासाठी त्यांच्या जीवनातले प्रसंग कथेच्या स्वरूपात पिढी दरपिढी प्रथम बोली परंपरेने पुढे आले आणि नंतर तेच लिखित स्वरूपातही केले गेले. आपल्या पूर्वजांच्या बोधकथा सांगण्याची ही बोली परंपरा लेखनव्यवस्था विकसित झाल्यानंतर आजही भजन-कीर्तन-भाषण इत्यादी स्वरूपात कायम आहे. ज्या संस्कृतींत आजही लेखी भाषा नाही त्यांत (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन मूलवासी) हे समाजप्रबोधनाचे स्वरूप अजूनही तसेच बोलीभाषेतील पूर्वजांच्या कथांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मानवी समाज इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत होत गेला याचे भाषा हे प्रमुख कारण आहे. कारण भाषेमुळे मानवात एका पिढीचे ज्ञान दुसर्या पिढीकडे, पहिल्या दोन पिढ्यांचे ज्ञान तिसरीकडे, पहिल्या तीन पिढ्यांचे ज्ञान चौथीकडे... असा ज्ञानाचा प्रवाह पिढीगणिक अधिकाधिक विशाल आणि प्रगल्भ होत राहिला आहे आणि भविष्यात होत राहणार आहे. बोली भाषा आवश्यक तेवढी आणि लेखी भाषा अजिबात विकसित न झाल्याने ज्ञानाचा ओघ इतर प्राण्यांत मातापित्याकडून-अपत्याकडे असा केवळ एकाच पिढीच्या अंतरापर्यंतच मर्यादित राहिला आहे. जेव्हा संस्कृती विकसित होत गेल्या आणि एका समाजातील लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हा जिवंत अथवा जवळच्या आठवणीतील माणसाच्या म्हणण्याला मान देणे हे कमी होत गेले. कारण डोळ्यासमोर असलेल्या माणसाचे किंवा नजिकच मृत झालेल्या (पण प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याला पाहिलेली माणसे जिवंत असणार्या) माणसाचे पाय मातीचेच होते याचा जिताजागता पुरावा समोर असतो. अश्या माणसाला देव म्हणणे कठीण जाते. देवच काय पण संत-महात्म्यांनाही त्याचे मोठेपण ते मेल्यावरच त्यांच्या पाठीराख्यांनी बहाल केलेले आहे. अश्या देवत्वाची गरज सामान्य माणसालाच वाटली असे नाही. राजे-सम्राटांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी देवाचा पाठींबा-अधिष्ठान भरीस घालून आपले स्थान बळकट केलेले आहे... त्यासाठी मी देव आहे म्हणणार्या राजाची नावे फारशी आठवणीत राहिली नाहीत (त्यांची नावे फारतर जुलूमी राजा / राक्षस म्हणून शिल्लक उरली आहेत). प्रथम हुशार माणुस आणि मृत्यनंतर देवाचा अंश / अवतार म्हणवले जाणारे काही कालाने त्यांच्या विरोधकांचेही देव बनले आहेत... कृष्णाचे उदाहरण याबाबतीत आदर्श ठरावे (संदर्भ: इरावती कर्वे यांचे "युगान्त"). यामुळे, समाजाच्या खूप जुन्या आठवणीतिल ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व निवडणे जास्त सोईस्कर असते. त्याचे दोष नीट साफसूफ करून, त्याच्या गुणांना सोन्याचा मुलामा चढवून प्रदर्शित केले म्हणजे एकदम १००% आदर्श विभूती बनते... त्यात पिढी दरपिढी भर पडत गेली की मग देवत्व अस्तित्वात येते ! आता काय कोणाची बिशाद की त्यात काही दोष शोधून काढेल ! महाभारत आणि रामायण ह्या अश्याच प्राचीन कथा आहेत. त्या प्रथम बोधकारक इतिहास अश्याच लिहिल्या गेल्या असेच दिसते. म्हणून मूळ कथांत प्रत्येक माणूस त्याच्या राग-लोभासकट असलेला "माणूस" दाखवलेला आहे. महाभारतात हे विषेशत्वाने दिसते म्हणून ते काव्य इतिहासाला जवळचे आहे. रामायणात ते कमी प्रमाणात असले तरी रामाचे बोलणे-वागणे १००% दैवी/चांगले/दोषातीत होते असे दाखवलेले नाही... त्याकाळच्या समाजातील संकेतांप्रमाणे सत्ताधारी माणसाला आपले महत्व आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आवश्यक असेच होते.. मग ते वनवासात जाणे असो, वालीवध असो किंवा सितात्याग असो. या लेखाच्या प्रतिसादात रामाच्या विरोधात जी अवतरणे दिली आहेत ती याचीच उदाहरणे आहेत. देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल. एकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे उघडे पडलेले मातीचे पाय झाकण्यासाठी त्याच्या पाठीराख्यांची काय आणि कशी धडपड चालू असते याची उदाहरणे आजच्या काळातल्या नेता- आणि बुवा- मंडळींकडे पाहिले तर पैशाला पासरी सापडतील. मग जर अशी व्यक्ती शेकडो वर्षांपासून देवत्व प्राप्त झालेली असली तर त्याच्याबद्दलच्या इतिहासात असे शेकडो "सोईस्कर" पाठभेद झाले तर नवल काय ? आंधळेपणाने देवत्वाच्या मागे जाण्यात सर्वात वाईट गोष्ट अशी की, मूळ बोली-लेखी इतिहासाचा मूळ उद्देश (कथेतल्या चांगल्याचे अनुसरण करा आणि चुकांवरून बोध घेऊन त्या टाळा) मागे पडतो आणि कथेतले चांगले ते चांगलेच ठेवून (कदाचित फुगवून सांगून) आणि प्रसंगी प्रतिक्षिप्त कथा घुसडून वाईटाचे समर्थन करणे सुरू होते... अश्या तर्हेने एक चांगली ऐतिहासिक बोधकथा विवादास्पद (आणि कधी कधी हास्यास्पद) दंतकथा बनत जाते... आणि त्यांच्या पाठीराख्यासाठी शिव-राम-कृष्ण हे ज्यांच्यापासून "विचारपूर्वक बर्यावाईटाचा बोध घ्यावा अशी महान व्यक्तिमत्त्वे" न राहता "स्वतंत्र विचाराला स्थान न देता १००% निर्दोष मानलेले, पूजेचे साधन आणि सर्वस्वी लीनता अपेक्षणार देव" बनतात. असे करण्याने आपण आपल्या प्रगल्भ प्राचीन वारश्याचा उपयोग "वैचारिक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी" होण्याऐवजी "स्वतःच्या चुका ओळखून त्या दुरुस्त न करता त्यांच्यावर पांघरूण ओढणारा, स्वमग्न, अल्पसंतुष्ट आणि स्वसंतुष्ट समाज" बनण्यास होतो. (देव असेल/असावा असा संशय असणारा, पण देव म्हणजे नक्की काय ते माहित नसलेला आणि देव भेटल्यास त्याला विचारण्यासाठी काही प्रश्नांची यादी तयार असलेला) इए