Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?

ब
बाबा पाटील
गुरुवार, 10/02/2014 - 09:22
🗣 85 प्रतिसाद
गांधी....... काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंदुकीच्या गोळीला हे माहिती नसते रे समोरचा कोन आहे,अथवा तलवारीच्या धारेला वेदना नसते,ती असते जिवंत प्राण्याला.आभासी जगात बाता मारण्यापेक्षा किती जणांनी रस्त्याने अथवा कॉलेजमध्ये आया बहिणींच्या छेडछेडाची विरोध केलाय. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते. दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर..... अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्‍याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते.

प्रतिक्रिया द्या
16029 वाचन

💬 प्रतिसाद (85)
प
प्यारे१ Fri, 10/03/2014 - 12:40 नवीन
नाऊ धिस इज आय कॉल अ 'रॉ य ल' प्रतिसाद! एकदम आवडला. या रे पोरांनो. ठरवा काय ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ट
टवाळ कार्टा Fri, 10/03/2014 - 17:50 नवीन
होउन जाउदे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 18:12 नवीन
कट्टा? कधी? कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/03/2014 - 19:29 नवीन
होउ दे खर्च...मु.वि. आहेत समर्थ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 19:45 नवीन
का नाही.. पक्षी-तीर्थाला आमची कधीच ना नसते...... पक्ष्यांचा बंदोबस्त पाटील करणारच आहेत. तीर्थ मी घेवून येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 07:43 नवीन
अगदी लांब जायचे नसेल तर इथे वाघोली जवळ एक निसर्ग म्हणुन ढाबा आहे , गावरान कोंबडी,रस्सा + सुक्क बरोबर सुकट व ज्वारीची अथवा बाजरीची भाकरी,एक नंबर जेवन असत. कधी बसताय सांगा,कोंबड्या माझ्याकडुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा Sat, 10/04/2014 - 10:49 नवीन
होउन जाउदे...इथे आज पुणेकर टान्ग मारणार असे वाटतेय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
म
मुक्त विहारि Sat, 10/04/2014 - 19:16 नवीन
त्याचे काय तसाही पक्षी मेलेलाच आहे.जाता-जाता त्याच्या बरोबर ४ तीर्थाचे थेंब पण जावू दे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
अ
अर्धवटराव Sat, 10/04/2014 - 19:51 नवीन
च्यामारी.. उगाच त्या पवित्र अहिंसावादी आत्म्याला धाग्यावर धागे अन् हज्जार बायटी प्रतिसाद देऊन त्रास देण्यापरिस असलं काहि खाय-प्यायचं विंट्रेष्टींग बोलाना राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
म
मुक्त विहारि Sun, 10/05/2014 - 04:58 नवीन
कुणीही येवो अन कुणीही जावो, आपले पोट आपल्यालाच भरायचे आहे. असो, कट्ट्यासाठी हार्दिक निमंत्रण.... बाद्वे, इतर मिपाकर गांधीवादावर चर्चा करत असतांना, दुसर्‍या मिपाकरांचा पक्षी-तीर्थ कट्टा ठरला देखील.ह्यालाच म्हणतात खरी मिपाशाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ट
टवाळ कार्टा Sun, 10/05/2014 - 07:28 नवीन
कृपया तारीख कळवणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2014 - 09:36 नवीन
बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. कारण ह्या पैकी कुठल्याच विषयात मला प्रत्यक्ष अनुभव कांही नाहीए. त्यामुळे काहीच बोलत नाही.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 10/03/2014 - 18:26 नवीन
>>>धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. एवढेच, नाही तर मला असे वाटू लागले आहे, मी कुठल्याच लायकिचा नाही व मी आता या पुढे, लेखणी, किबोर्ड हातात धरू पण नये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ध
धडपड्या Fri, 10/03/2014 - 10:15 नवीन
स्वयत्तता आणि स्वातंत्र, ह्या वेगवेगळ्या टर्मस् आहेत का? कारण गांधी आधी स्वायत्तता मागत होते, नंतर त्यांनी क्रांतिकारकांना पाहून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, असे बरेच उल्लेख वाचण्यात आलेत... हे खरे आहे का?
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 15:32 नवीन
स्वायत्तता - म्हणजे मर्यादित स्वातंत्र, यात चलन, परराष्ट्र्,व संरक्षण ही खाती जेत्या राष्ट्राकडेच असतात व इतर खाती वसाहतीकडे असतात्,किंवा यालाच वसाहतीचे स्वातंत्र असेही म्हणतात,१९३५ च्या कायद्याने बर्‍यापैकी वसाहतीच्या स्वातंत्र्याकडे वाटचाल चालु होती,तर स्वातंत्र म्हणजे निरंकुश/ निर्विवाद सत्ता. म्हणजेच सध्याचा भारत देश. अभ्यासकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 10/04/2014 - 10:25 नवीन
>>> काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, बापूंच्या अहिंसेचे समर्थन करणारेच शस्त्रास्त्रे बाळगून हिंसा करताना दिसतात. >>> आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते. तुमच्यासारखा बापूंचा समर्थक पिस्तुल का वापरतो? टगे आडवे आले तर अहिंसक मार्गाने त्यांचे हृदयपरीवर्तन करायचे, त्यांचा मार्ग चुकला हे त्यांना प्रेमाने समजावून सांगायचे, हृदयपरीवर्तन होईपर्यंत उपोषण करायचे, मौन पाळायचे, निषेध करायचा ... पण त्यासाठी शस्त्र कशाला जवळ हवे?
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 10:36 नवीन
वरती आख्खा उतारा त्याच्या स्पष्टीकरणात घातला आहे जरा वाचायचे कष्ट घ्या आणी परत परत फिरुन भोपळे चौकात येवु नका.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 10/04/2014 - 10:56 नवीन
स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही. आणि गांधीवाद्यांनी इतक्या लगेच लगेच संयम सोडणं बरं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ब
बाबा पाटील Sat, 10/04/2014 - 15:09 नवीन
हे तर आमच्या पिताश्रींनाही पटत नव्हत हो, हळु हळु त्यांना काही गोष्टी लक्षात आल्यावर मात्र ते खंबिर मागे उभे राहिले. जाउ द्या ना आपला धागा गांधी बाबावर आहे माझ्यावर नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 10/04/2014 - 17:14 नवीन
बरोबर आहे. धागा गांधीजींवर आहे, तुमच्यावर नाही. परंतु तुम्ही गांधींजींच्या मार्गाचे समर्थन करताकरता स्वतःकडे स्वसंरक्षणार्थ शस्त्र आहे असं लिहिलंत आणि ते जरा विसंगत वाटलं, म्हणून प्रतिसाद दिला. बाकी काही नाही. उलट स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचे धाडस तुमच्याकडे आहे आणि आम्हाला शस्त्र बाळगण्याचे धाडस स्वप्नात सुद्धा होणार नाही हेही तितकंच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ब
बोका-ए-आझम Sun, 10/05/2014 - 07:09 नवीन
स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले हा प्रश्नच चुकीचा आहे.प्रत्येक घटकाचा - गांधीजी,सुभाषबाबू यांसारख्या नेत्यांपासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्यात सहभाग घेतलेला आहे. स्वातंत्र्याचां मक्ता आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसला हवा होता म्हणून त्यांनी गांधींच्या नावाचा वापर केला आणि अशी परिस्थिती निर्माण केली की आज जर गांधी असते तर त्यांनी काँग्रेसवर अब्रूनुकसानीचा दावा केला असता!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 10/05/2014 - 07:44 नवीन
आज जर गांधी असते तर त्यांनी काँग्रेसवर अब्रूनुकसानीचा दावा केला असता!
ह्ये ब्येष्ट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पिवळा डांबिस Sun, 10/05/2014 - 07:58 नवीन
प्रती श्री. बाबा पाटील, या धाग्यावर मध्ये पडणार नव्हतो, कारण गांधीजीची माणूस म्हणुन वा नेता म्हणून गौरवी व्यक्त करणारे व्होकल सभासद या संस्थळावर अल्पमतात आहेत... परंतु, त्याहुनही स्वतः शस्त्र धारण करणारे, आणि त्यानुसार येणार्‍या जबाबदार्‍या समजणारे, त्यामुळे येणारा आत्मविश्वास समजू शकणारे सभासद हे त्याहूनही कमी (अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच!) आहेत. अनुभवावीण फुकाची वाफ दवडणारेच अधिक!! त्यामुळे माणसाच्या व्यवसायाचा त्याच्या शस्त्रधारणतेशी संबंध नसतो. माणसाला त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य आयुष्य असतं याच्याशी पूर्णतः सहमत!!!
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Mon, 10/06/2014 - 09:08 नवीन
समजावुन घेतल्या बद्दल शतशः आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुधीर Sun, 10/05/2014 - 09:33 नवीन
महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून हा कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकातल्या पहिल्या भागाचा सारांश अलिकडेच लिहिला. गेले ५ दिवस बाहेरगावी होतो म्हणून मिपावर २ ऑक्टोबरला प्रकाशित करू शकलो नाही. या लेखातले काही प्रतिसाद वाचनीय वाटले.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Mon, 10/06/2014 - 09:13 नवीन
कृपया हा लेख मि.पा.वर स्वतंत्र पोस्ट करावा. यावर आणखी चर्चा घडायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
स
सुधीर Mon, 10/06/2014 - 11:06 नवीन
धन्यवाद डॉक्टर. सदर विचार कुरुंदकरांचे आहेत (शिवरात्र मधले) मी फक्त ते थोडक्यात मांडले आहेत. आणि या पुस्तकावर अतृप्तआत्मा यांनी सुंदर सारांश आधीच लिहिला आहे. http://www.misalpav.com/node/20754
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
स
सौंदाळा Mon, 10/06/2014 - 10:23 नवीन
सुधीर, लेख आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
प
प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 07:49 नवीन
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते. खरे तर वैचारिक दृष्ट्या
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 07:53 नवीन
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास , तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते ( कदाचित जास्तच असेल ). १९०० सालाच्या आधीपासुन च निवड्णुका होउन नगरपालिका होत होती, नंतर राज्य विधी मंडळ पण झाले, नंतर संसद पण होती. कायदे समान होते, शिक्षण, नोकरी करण्यात काही अटकाव नव्हता. जमिन विकत घेण्यात, व्यवसाय चालू करण्यात काही बंधने नव्हती. नक्की स्वातंत्र्य नव्हते म्हणजे काय प्रॉब्लेम होता? ( सामान्य माणसाच्या दृष्टीने )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
सुधीर Mon, 10/06/2014 - 19:43 नवीन
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? या प्रश्नाचे उत्तर देण्याची सध्यातरी माझ्यात कुवत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुरुंदकरांच्या जागर मध्ये मिळेल अशी आशा आहे. धर्म, त्यानुसार आलेल्या परंपरा,(कालपरिवर्तनामुळे आणि) परंपरेमुळे होणारे अन्याय, शोषितांची मानसिकता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरता लागणारी मानसिकता, क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूलभूत गाभा, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विषयांवर विवेचन करणा-या "गांधी एक चिंतन" या लेखात मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/06/2014 - 08:34 नवीन
भारतात बरीच संस्थानं चालू होती, इंग्रज स्वार्थासाठी त्यांच्या मनमानीकडे काहिसे दुर्लक्ष करायचे .खर्या अर्थाने स्वातंत्र्य नव्हते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 09:12 नवीन
ठीक आहे, मी संस्थाने नसलेल्या, इंग्रज अधिपत्याखालच्या भारता बद्दल बोलतोय. अशी २-३ तरी उदाहरणे आहेत का की ज्यात सामान्य माणसाला स्वातंत्र्य नव्हते असे म्हणता येइल १९४७ च्या आधी. जी काही थोडी बंधने होती ती १९१० नंतर कमी कमी होत चालली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ऋ
ऋषिकेश Mon, 10/06/2014 - 12:01 नवीन
वा वा! (इथेच जरा उचकपाचक करून) बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार जन्तेच्या त्याच नेत्याबद्दलच्या बदललेल्या भावना यावर कोणीतरी अभ्यासपूर्ण लेख लिहावा असे सुचवतो :P (तुच लिहि असे म्हणणार्‍यांस आगाऊ क्षमस्व!)
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Mon, 10/06/2014 - 15:42 नवीन
तात्याला बोलवा,त्यांच्या इतक परखड कोनी नाही लिहु शकत्,हा प्राणी ब्लड बॉर्न शिवसैनिक आहे त्यामुळे भक्तांना अंमळ जुलाब लागु शकतात्,पण मत फार परखड असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा