" पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र"
विदर्भाचे जौ द्या.. तो तर एक अर्वाचीन प्रश्न आहे आणि मिपावरील चर्चा पाहल्यास नवराज्यकर्त्याना हा प्रश सोडविण्याच्या अनेक टिप्स मिळतील. त्यामुळे हा प्रश्न आता चुटकी सरशी सुटेल असा विश्वास वाटतो.
पण त्यानिमित्ताने " पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र" असावे असा प्रस्ताव मांडतो. वास्तविक हा प्रस्ताव तसा फार प्राचीन ! किती प्राचीन ते वल्लीशेट ना विचारा , किमान " वाकाट्क" काळ तरी असेल , पण मुद्दा तो नाही , स्वतंत्र पुण्याचा आहे !
- पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक दरी प्रचंड खोल आणि रुंद ही आहे. ( पुण्यातल्या पुण्यात देखील विविध दर्या आहेत, जसे की नदी पलिकडचे आणि अलिकडचे , पण त्याचा विचार नंतर करु) ही दरी आपण मिपावरही अनेक वेळा अनुभवली असेलच.
- जे पूण्यात आहे ते इतरत्र नाही आणि जे पुण्यात नाही (पुणे तिथे खरे म्हणजे काय उणे ?) त्याची पुण्याला गरज नाही.जसे की मुंबईची लोकल पुण्याला नको आहे , नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको )
- पुण्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. वास्तविक खर्या इतिहास हा पुण्याचाच ! बाकीचे सारे इतिहास विषयापुरते !आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- पुणे आज ही ऐतिहासिक शहर आहे ,इथल्या जाज्वल्य परंपरांचा इथल्या लोकांना प्रचंड अभिमाण आहे ! उदा. टांगेवाले गेले आणि रिक्षावाले आले .. पण मग्रुरी? तीच ....! घोडे गेले, सायकली गेल्या , स्वयंचलित आल्या पण रस्त्यावर आपलेच घोडे दामट्ण्याचे पुणेरी रक्त ? अजूनही तेच आहे ! आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- बारभाई गेले पण पुण्याच्या सोसायट्यांमधील कारस्थाने ? .. अजून सुरुच आहे. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- पुण्यातील बाळंतपणाच्या हॉस्पिटलमधील खोल्याखोल्यात " विद्वान" जन्माला येतात, जिज्ञासूनी अधिक माहीती घ्यावी.
आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
यांसारखे अजून बरेच मुद्दे आहेत आणि प्रस्ताव पुढे जाईल तसे अधिकाधिक सुचत जातील. तुमचे काय मत आहे या प्रस्तावावर?
सदा-शिवि-स्तानश्लेष... मस्तच हो ब्याटमन भौ ! ( "बॅ" लिहायला शिकायचे ! हे " बॅ " चोप्य -पेस्त केलयं , नाहीतरी आमचे स्वराष्ट्र बान्धव लगेच विचारतील... ह्या ह्या ह्या , हे कसे लिहलेन म्हणून ? ( उपशन्का- सानुअनासिक लिपीत असे लिहितात? ) तेव्हा हा अगाऊ - म्हण्जे आडवान्स खुलासा केला आहे ) (पानपतोत्तर काळात पुण्यकराष्ट्रातील काही घराणी दक्षिणेकडे ( "रमणा"नव्हे हो... दक्षिण दिशा ) सरकली... बहुधा मिरज प्रांतात .. तिथली पूर्वापार पुण्यकीय तैल बुद्धी अजून शाबूत आहे .. याचे समाधान वाटले )सर्वांचे चितळे पोटभरीचितळे कुणाचे ही पोट भरत नाहीत .... स्वतः चे सोडून ! दमड्या टिचवल्या शिवाय बाकरवडीचा चुराच काय वास देखील घेऊ देत नाहीत ते !