Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पेशावरमधील शाळेवर हल्ला - पेरले तेच उगवले

श
श्रीगुरुजी
Tue, 12/16/2014 - 15:33
🗣 121 प्रतिसाद
आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे. 'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे. १९४७ साली स्वतंत्र देश मिळाल्यावर देशाचा विकास करण्याऐवजी पाकिस्तानने गेली ६७ वर्षे फक्त काश्मीर या एकाच विषयावर लक्ष केंद्रीत करून युद्ध, अतिरेकी हल्ले, धर्मांध प्रचार अशा भयंकर मार्गांनी येनकेनप्रकारेण काश्मीर परत मिळवायचा प्रयत्न केला. आपल्या देशाचा विकास व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, उद्योगधंदे वाढावेत, देशाची आर्थिक स्थिती सुधारावी इ. महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त लष्कर, शस्त्रास्त्रे, युद्ध, दहशतवाद इ. वरच पाकिस्तानने भर दिला. भारताबरोबर ४ वेळा युद्ध करून हात पोळून घेतले. १९८९ पासून सातत्याने भारतात दहशतवादी पाठवून भारताला 'हजार जखमा' करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. भारतात दहशतावादी कृत्ये करणार्‍या दाऊद, टायगर मेमन, भटकळ बंधू, हफीझ सईद, मसूद अझर इ. भयंकर दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना शस्त्रास्त्रे, आर्थिक मदत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे समर्थन केले. लहान कोवळ्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना मदरशात पाठवून सतत धर्म व जिहाद चे ब्रेनवॉशिंग करून अनेक तरूण पिढ्या बरबाद केल्या. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईद, मुंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार दाऊद व मेमन बंधू, भारतात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करणारे भटकळ बंधू अशा दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देऊन पाकिस्तान भयंकर घोडचूक करीत आहे. आज पाकिस्तानला आपल्याच कृत्याची भयंकर किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानला आवरणारा या जगात कोणताच देश नाही का? खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे. पाकिस्तानला अजूनही सुधारण्याची संधी आहे. दहशतवाद्यांची मदत बंद करून व मदरशातून दिले जाणारे धार्मिक व जिहादी शिक्षण बंद केले तर अजूनही पाकिस्तान योग्य त्या मार्गावर जाऊ शकतो. अन्यथा असे हल्ले परत परत होत राहतील व कधी पाकिस्तानातील, कधी भारतातील तर कधी इतर कोणत्यातरी देशातील निरपराध नागरिकांना याची भयंकर किंमत मोजावी लागेल.

प्रतिक्रिया द्या
36127 वाचन

💬 प्रतिसाद (121)
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 13:34 नवीन
तुम्हा लोकांना खरेच असे वाटते का की पाकी लष्कर तालिबानांविरुद्ध काहे कारवाई वगैरे करते आहे? १० लाख खडे लष्कर, ज्यांना कुठल्याही सीमांवर रहायची गरज नाही ( एका बाजुला भारत, जो काही आगळीक करणार नाही आणि दुसर्‍या बाजुला इराण - ज्याला सुन्नी तालिबान नकोच आहेत) त्यांना तालीबान नष्ट करायला वर्षानुवर्ष लागतात ह्या वर तुमचा विश्वास आहे का? पाकी लष्कर दाखवण्यापुरते असली नाटकी कारवाई करते, ६ महीन्यात लाखाच्या आसपास असलेल्या तालीबानांपैकी फक्त १००० मारले. जे तालिबानी मारले ते फक्त दोन कारणांनी १. तिथल्या लोकल आर्मी कमांडर शी पंगा घेतला. तालिबान चे आर्थिक व्यवहार प्रचंड आहेत आणि त्यातला वाटा लष्करी अधिकार्‍यांना येत असतो. तिथे काहीतरी गडबड झाली. २. तालिबान्यातच शेकडो ग्रुप आहेत, त्यातल्या एका ग्रुप ने दुसर्‍या ग्रुपचा काटा काढण्यासाठे लष्कराचा उपयोग करणे नेहमीच घडते. भारतात जसे एका टोळीच्या गुंडाचा एनकाउंटर करण्यासाठी दुसरी टोळी पैसे देते तसे आहे हे. पाक लष्करानी मनापासुन ठरवले तर एक महीना पण नाही लागणार
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 06:12 नवीन
>>> भविष्यातला भयानक धोका :- ज्या पद्धतीने सातत्याने पाकिस्तान आर्मी, एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी हल्ले होत आहेत,त्यातुनच पुढे ह्या अतिरेक्यांच्या हाती आण्विक अस्त्रे लागण्याची शक्यता बळावत चालली आहे, अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हातात पडावीत किंवा अतिरेकी अण्वस्त्रांच्या जवळपास पोहोचावेत अशी माझी इच्छा आहे. असे झाले तर अमेरिका व इतर सामर्थ्यवान राष्ट्रे खडबडून जागी होतील व तातडीने पाकिस्तानात सैन्य घुसवून अतिरेक्यांचा नि:पात करण्याच्या मागे लागतील. अन्यथा जोपर्यंत अतिरेकी स्थानिक नागरिक किंवा भारत/अफगाणिस्तानातील नागरिक मारत आहेत, तोपर्यंत ही राष्ट्रे अतिरेक्यांकडे काणाडोळा करतील.
म
मदनबाण Wed, 12/17/2014 - 06:42 नवीन
असे झाले तर अमेरिका व इतर सामर्थ्यवान राष्ट्रे खडबडून जागी होतील व तातडीने पाकिस्तानात सैन्य घुसवून अतिरेक्यांचा नि:पात करण्याच्या मागे लागतील. गुरुजी कुठल्या जगात आपला वावर असतो ? ज्या अमेरिकेला अफगाणिस्तान मधे आपले सैन्य ठेवणे आणि पोसणे कठीण जात आहे, ती अमेरिका पाकिस्तानात सैन्य पाठवेल का फक्त कल्पना विलास असु शकतो ! तालिबानला निर्माण करणारी,प्रशिक्षण देणारी आणि हत्यार पुरवणारी अमेरिकाच आहे हे आपणास ठावुक नाही की काय ? पाकिस्तान ज्या पैश्यावर आणि हत्यारांवर पोसला पोसला तो देखील अमेरिकेचाच, आणि हा पैसा आणि शस्त्रे हिंदुस्थाना विरुद्ध वापरली जात आहेत हे अमेरिकेला ठावुक नाही असे म्हणणे दुधखुळेपणाचे ठरेल ! अमेरिकेने या पद्धतीचा वापर करुन आपली आर्थीक गती कमी केली आणि तालिबानचा वापर करुन रशियाला नामोहरम केले. अमेरिकेने देखील मोस्ट वॉटेंड जाहिर केलेला हाफिद सईद आणि मुंबई आणि इतर हल्ल्याचा सुत्रधार पाकिस्तानात मुक्तपणे संचार करतो आणि त्याच्या सभेला येडी पाकिस्तानी प्रजा हजेरी लावते हे जगाला आणि अमेरिकेला दिसत नाही काय ? बादवे अमेरिकेने हाफिद सईदला अटक करण्यासाठी $10m जाहिर केले आहे हे आपल्या ठावूक असेल ही अपेक्षा. आधीच मर्कट तशातच मद्य प्याला । मग वृश्चिकदंश झाला त्याला ॥ मग झाली तयाला भूतबाधा । काय वर्णू लीला त्या कपिच्या अगाधा ॥ अशा पाकिस्तानी दहशदवादी मर्कटांच्या हाती ही अणवस्त्रे लागणे हे धोकादायकच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 07:34 नवीन
अजूनपर्यंत हाफिझ सईद किंवा दाऊद वगैरे मंडळींनी अमेरिकेवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे अमेरिका त्यांच्या मागे गेलेली नाही. हाफिझ सईदविरूद्ध अमेरिकेने बक्षीस जाहीर केले असले तरी अमेरिका त्याचा बंदोबस्त करण्यासाठी अजून फारशी उत्सुक नाही कारण त्यांच्या कारवायांची अमेरिकेला फारशी झळ पोहोचलेली नाही. तथापि जर भविष्यात अतिरेक्यांच्या हाती अण्वस्त्रे पडली तर त्यांचा वापर सर्वप्रथम भारताऐवजी इस्राईल व इंग्लंड, फ्रान्स अशा देशांविरूद्ध केला जाईल. अशावेळी अमेरिका व इतर देशांना नक्कीच या अतिरेक्यांचा बंदोबस्त करावा लागेल.
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 12/17/2014 - 07:50 नवीन
जूनपर्यंत हाफिझ सईद किंवा दाऊद वगैरे मंडळींनी अमेरिकेवर हल्ला केलेला नाही. अच्छा,म्हणजे अमेरिका हल्ला होण्याची वाट बघते आहे तर ! ;) हाफिझ सईदविरूद्ध अमेरिकेने बक्षीस जाहीर केले असले तरी अमेरिका त्याचा बंदोबस्त करण्यासाठी अजून फारशी उत्सुक नाही कारण त्यांच्या कारवायांची अमेरिकेला फारशी झळ पोहोचलेली नाही. मग बक्षिस टाईमपास साठी जाहिर केले असावे ! तथापि जर भविष्यात अतिरेक्यांच्या हाती अण्वस्त्रे पडली तर त्यांचा वापर सर्वप्रथम भारताऐवजी इस्राईल व इंग्लंड, फ्रान्स अशा देशांविरूद्ध केला जाईल. अशावेळी अमेरिका व इतर देशांना नक्कीच या अतिरेक्यांचा बंदोबस्त करावा लागेल. हे कशावरुन ? बरं हल्ला करण्याचे प्रयत्न तर ते आत्ता पण करत आहेत ! { ISIS followers urged to attack Times Square हे गुगल करा बरं...} शिवाय पाकिस्तानने त्यांच्या इतिहासा नुसार लढलली युद्ध ही आपल्या देशा बरोबरच केली आहेत, अणुबॉम्बचा वापर ते हिंदूस्थानावरच आधी करतील...शिवाय हे राष्ट्र आपल्या शेजारीच आहे बरं का... काल जी घटना घडली तिथुन दिल्ली हे अंतर अंदाजे ८०० किलोमिटर आहे. बाकी आपल्या सुरक्षतेची काळजी आपणच घेतली पाहिजे, अमेरिका येउन तारणहार बनेल ही भ्रामक कल्पना बाळगणे सुज्ञपणाचे लक्षण आहे का ? जाता जाता :- बाकी मुंबईत सिसिटीव्ही कॅमरे लागले का ? लागले असतील तर ते चालु आहेत का ? याचा आढावा मिडाया मंडळींनी आता करावाच... तसेही आत्म सुरक्षतेच्या बाबतीत आपण फार सतर्क आहोतच नाही का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 07:56 नवीन
>>> अच्छा,म्हणजे अमेरिका हल्ला होण्याची वाट बघते आहे तर ! नक्कीच. जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत अमेरिका अशा भानगडीत पडत नाही. >>> मग बक्षिस टाईमपास साठी जाहिर केले असावे ! बक्षिस का जाहीर केले त्याची कल्पना नाही. परंतु ज्या तर्‍हेने अमेरिका लादेनच्या मागे लागली होती तसे हाफीझ सईदच्या बाबतीत अजिबात दिसत नाही. >>> हे कशावरुन ? बरं हल्ला करण्याचे प्रयत्न तर ते आत्ता पण करत आहेत ! { ISIS followers urged to attack Times Square हे गुगल करा बरं...} शिवाय पाकिस्तानने त्यांच्या इतिहासा नुसार लढलली युद्ध ही आपल्या देशा बरोबरच केली आहेत, अणुबॉम्बचा वापर ते हिंदूस्थानावरच आधी करतील...शिवाय हे राष्ट्र आपल्या शेजारीच आहे बरं का... काल जी घटना घडली तिथुन दिल्ली हे अंतर अंदाजे ८०० किलोमिटर आहे. बाकी आपल्या सुरक्षतेची काळजी आपणच घेतली पाहिजे, अमेरिका येउन तारणहार बनेल ही भ्रामक कल्पना बाळगणे सुज्ञपणाचे लक्षण आहे का ? >>> तालिबान्यांचा भारतापेक्षा अमेरिका, इस्राईल, इंग्लंड या देशांविरूद्ध जास्त राग आहे. लादेनचेही तसेच होते. त्याने भारताविरूद्ध फारसे काही केलेले नाही.
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 12/17/2014 - 08:09 नवीन
नक्कीच. जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत अमेरिका अशा भानगडीत पडत नाही. परत चूक... अमेरिकाच अश्या सगळ्या भानगड्या निर्माण करते ! नाहीतर त्यांची शस्त्रे कोण विकत घेइल ? बरं माझ्या माहिती प्रमाणे शस्त्रास्त्रे आणि पॉर्न या पलिकडे अमेरिका काही जास्त निर्माण करत नाही. ;) बक्षिस का जाहीर केले त्याची कल्पना नाही. परंतु ज्या तर्‍हेने अमेरिका लादेनच्या मागे लागली होती तसे हाफीझ सईदच्या बाबतीत अजिबात दिसत नाही. ह्म्म... ज्या लादेनला अमेरिकेने घडवला त्यालाच मारला ! सईद काही संत-महंत नाही, त्याच्यावर इनाम घोषीत करण्याचे काही तरी प्रयोजन असणारच ना ? जितके अतिरेकी कमांडर आत्ता पर्यंत निर्माण झाले ते सगळे अल्लाला भेटायला आणि सुंदर पर्‍यांबरोबर क्रिडा करायला जन्नत यात्रेवर गेले...लादेनही गेला फक्त व्हाया समुद्रमार्ग... तेच सईदचे देखील होइल आणि व्हावे ही इच्छा. बरं लादेनला शोधायला बरीच वर्ष गेली, तो पर्यंत अमेरिकेने अफगाणिस्तानचा वापर मुक्तपणे वेपन टेस्टिंगसाठी केला... त्यांचा प्रवास तोराबोरा व्हाया वजिरिस्तान ते अबोटाबास पर्यंत झाला.असो... लादेनचेही तसेच होते. त्याने भारताविरूद्ध फारसे काही केलेले नाही. हेच तर लादेनचे टार्गेट अमेरिका होते तर सईदचे हिंदूस्थान आहे ना ? मग चिंता / काळजी आपल्याला करायला हवी,अमेरिका कशाला करेल ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 15:24 नवीन
>>> परत चूक... अमेरिकाच अश्या सगळ्या भानगड्या निर्माण करते ! नाहीतर त्यांची शस्त्रे कोण विकत घेइल ? बरं माझ्या माहिती प्रमाणे शस्त्रास्त्रे आणि पॉर्न या पलिकडे अमेरिका काही जास्त निर्माण करत नाही. अमेरिका अश्या भानगडी निर्माण करते हे खरे आहे. परंतु ती भानगड त्यांच्यावरच उलटली तर अमेरिका नक्कीच ती भानगड नष्ट करायचा प्रयत्न करते. (उदा. लादेन). जर ती भानगड स्वतःला त्रासदायक नसेल तर अमेरिका त्याकडे चक्क दुर्लक्ष करते. १९८० च्या दशकात अमेरिकेने अनेक खलिस्तानवाद्यांना आश्रय दिलेला होता. अजूनही काही खलिस्तानवादी अमेरिकेत सुखाने रहात आहेत. अमेरिकेने खलिस्तानवाद्यांविरूद्ध कधीही भूमिका घेतलेली नाही कारण त्यांनी अमेरिकेला त्रास दिलेला नाही. लादेनने अनेक प्रकारे अमेरिकेला त्रास दिला. येमेन बंदरातील अमेरिकी पाणबुडीवर हल्ला (ज्यात १७ अमेरिकी नौसैनिक गेले), केनया व सुदानमधील अमेरिकी दूतावासावर हल्ला, सौदीतील अमेरिकी सैनिक रहात असलेल्या इमारतीवर स्फोटकांनी भरलेला ट्रक घुसविणे आणि शेवटी जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ला. यामुळेच अमेरिकेने लादेनला मारले. दाऊद, मेमन बंधू, भटकळ बंधू, हाफीझ सईद, मसूद अझर हे भारताविरूद्ध दहशतवादी कृत्ये करीत आहेत. त्यांनी अमेरिकेविरूद्ध फारसे काही केलेले नाही. त्यामुळे अमेरिका त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार. परंतु त्यांच्या किंवा तालिबान्यांच्या हातात अण्वस्त्रे लागण्याची शक्यता निर्माण झाली तर त्याच क्षणी अमेरिका त्यांच्या मागे हात धुवून लागेल. >>> लादेनचेही तसेच होते. त्याने भारताविरूद्ध फारसे काही केलेले नाही. हेच तर लादेनचे टार्गेट अमेरिका होते तर सईदचे हिंदूस्थान आहे ना ? मग चिंता / काळजी आपल्याला करायला हवी,अमेरिका कशाला करेल ? भारत पाकिस्तानात उघडपणे किंवा लपून राहणार्‍या अतिरेक्यांविरूद्ध अमेरिकेसारखी कारवाई करू शकत नाही हे एक दुर्दैवाने कटु सत्य आहे. भारत प्रोअ‍ॅक्टिव्ह नाही, भारत फक्त रीअ‍ॅक्टिव्ह आहे. त्यातून मतांसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन आहेच. (१९९३ मध्ये काश्मिरमधील मशिदीत लष्कराने वेढा घालून अडकविलेल्या ७-८ अतिरेक्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन देण्यात आले कारण २-३ महिन्यांनी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक होती). अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील अतिरेक्यांना मारण्यासाठी अमेरिकेनेच पुढाकार घ्यायला हवा आणि दहशतवाद आपल्या अंगावर शेकल्याशिवाय अमेरिका कारवाई करणार नाही हे निश्चित.
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टवाळ कार्टा Wed, 12/17/2014 - 07:58 नवीन
बाकी मुंबईत सिसिटीव्ही कॅमरे लागले का ? लागले असतील तर ते चालु आहेत का ? याचा आढावा मिडाया मंडळींनी आता करावाच... तसेही आत्म सुरक्षतेच्या बाबतीत आपण फार सतर्क आहोतच नाही का ?
फारच अपेक्षाबुवा तुमच्या :)
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टवाळ कार्टा Wed, 12/17/2014 - 06:42 नवीन
घंटा....त्याऐवजी...हाम्रिका त्यांच्याशी मांडवली करेल...त्यांच्या काठीने आशियातले चीन, भारत आणि रशिया यांना झुंजवत ठेवायला
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भाते Wed, 12/17/2014 - 07:23 नवीन
घरी गेल्यावर याविषयीच्या बातम्या आणि चर्चा पहात असताना काही मुद्दे लक्षात आले. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानची फाळणी होऊन बांग्लादेश अस्तित्वात आला. हा दिवस आपण विजय दिवस म्हणुन साजरा करतो. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. काल, १६ तारखेला अश्या प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो याची पुर्वकल्पना तिथल्या गुप्तचर खात्याकडुन (?) ३ दिवस अगोदरच देण्यात आली होती. तरीही पाकिस्तानी सैन्य यापध्दल गाफिल राहिले. यातली सर्वात धक्कादायक बातमी अशी कि या हल्ल्याला तिथल्या सैन्याचा पाठिंबा (!) होता. आपलीच जनता (त्यातही स्त्रिया आणि लहान मुले) अश्या क्रुर हल्ल्यात मारले जात असताना निगरगट्ट असणारे हे सैन्य आपल्यासाठी किती धोकादायक ठरु शकते याची जाणिव आपल्याला या घटनेमुळे झाली.
म
मदनबाण Wed, 12/17/2014 - 07:28 नवीन
तरीही पाकिस्तानी सैन्य यापध्दल गाफिल राहिले. यातली सर्वात धक्कादायक बातमी अशी कि या हल्ल्याला तिथल्या सैन्याचा पाठिंबा (!) होता. याचे मुख्य कारण पाकिस्तानी सैन्य,आयएसआय आणि कट्टर पंथी हे एकाच माळेचे मणी आहेत. पाकिस्तानी सैन्यात वरच्या पदांवर असलेले अधिकारी हे कट्टरपंथी आणि आयएसआय ची प्यादीच आहेत. कबिलाई अतिरेकी म्हणतात तुम्ही आमची माणसे,मुले मारलीत आता आम्ही तुमची माणसे, मुले मारु ! आणि याचेच प्रत्यंतर वारंवार घडुन आलेले आहे. या बद्धल आत्ताच इकडे वाचले :- आम्ही जे केलं ते योग्यच – तहरीक ए तालिबान

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
↩ प्रतिसाद: भाते
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 07:50 नवीन
>>> काल, १६ तारखेला अश्या प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो याची पुर्वकल्पना तिथल्या गुप्तचर खात्याकडुन (?) ३ दिवस अगोदरच देण्यात आली होती. तरीही पाकिस्तानी सैन्य यापध्दल गाफिल राहिले. यातली सर्वात धक्कादायक बातमी अशी कि या हल्ल्याला तिथल्या सैन्याचा पाठिंबा (!) होता. निव्वळ सैन्य नव्हे तर त्या प्रांतातील सरकारसुद्धा मुद्दाम गाफील राहिले असणार. पेशावर प्रांतात इम्रानखानच्या तेहरिक्-ए-इन्साफ या पक्षाचे सरकार आहे. दस्तुरखुद्द इम्रानखानला तेहरिक्-ए-तालिबान विषयी सहानुभूती आहे. किंबहुना इम्रानखानचा उल्लेख "क्लीन शेव्हड् तालिबानी' असा केला जातो. अवांतर - इम्रानखान हा क्रिकेट खेळाडू म्हणूनसुद्धा मला कधीही आवडला नाही. अत्यंत खडूस, कुजका व अजिबात खिलाडूवृत्ती नसलेला होता तो. त्याच्या कारकीर्दीत भारताविरूद्ध जेव्हा जेव्हा एकदिवसीय सामने झाले तेव्हा प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने कधीही पूर्ण ५० षटके गोलंदाजी केली नाही. तो आपल्या संघातील खेळाडूंना मुद्दाम वेळकाढूपणा करायला लावून ५० पेक्षा कमी षटके टाकायला लावायचा. अगदी १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत सुद्धा पाकड्यांनी ४९ षटकेच टाकली होती.
↩ प्रतिसाद: भाते
आ
आतिवास Wed, 12/17/2014 - 08:21 नवीन
झालेल्या दु:खद घटनेवर काही अंदाधुंद प्रतिसाद उबग आणणारे आहेत. कुणाच्या मृत्यूवर आणि तेही दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूवर जुन्याच वादविवादाला पुन्हा/ नव्याने सुरुवात करणे विलक्षण आहे. पण ते असो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहेच. ते नेहमी दुधारी असते हेही माहिती आहे. जे गेले ते "जात्यात'' होते, आपण "सुपात" आहोत, इतकं तरी भान राखलं पाहिजे असं मी स्वतःला पुन्हा एकदा सांगतेय!
प
प्यारे१ Wed, 12/17/2014 - 10:55 नवीन
घटना दुर्दैवी आहे. मरणाराला किमान का मेलो हे तरी समजायला हवं. मारणाराला आपण का मारतोय हे ठाऊक हवं. त्यातही शाळकरी मुलांना मारुन काय मिळणार हे समजण्याची मानसिकता ह्या ब्रेनवॉश केलेल्या प्रोग्राम्ड अतिरेक्यांना समजत नसतंच. ह्या घटनेनंतर पाकीस्तान सुधारावं ही इच्छा आहे पण वरच्या काही प्रतिसादांमधून जे समजलंय त्यावरुन 'इन जनरल पठाणी आणि पाकिस्तानी लष्कराच्या मानसिकतेवरुन' तसं वाटत नाही.
क
क्लिंटन Wed, 12/17/2014 - 11:27 नवीन
ह्या घटनेनंतर पाकीस्तान सुधारावं ही इच्छा आहे पण वरच्या काही प्रतिसादांमधून जे समजलंय त्यावरुन 'इन जनरल पठाणी आणि पाकिस्तानी लष्कराच्या मानसिकतेवरुन' तसं वाटत नाही.
तशी इच्छा सगळ्यांचीच आहे पण तशी शक्यता फारच धूसर आहे त्याचे काय? :( आणि समजा पाकिस्तान वरकरणी सुधारले तरी ती सुधारणा फार काळ टिकायची फार शक्यता नाही.शेवटी "लडके लिया पाकिस्तान हसके लेंगे हिंदूस्तान" (की उलटे) ही त्यांची मनोवृत्ती आहे आणि त्यात कायमस्वरूपी सुधारणा होईल अशी आशा बाळगणेही भाबडेपणाचे आहे. तशी सुधारणा झाली तर चांगलेच आहे पण ती होणार नाही ही शक्यता सगळ्यात जास्त हे गृहित धरून आपण गाफिल राहिले नाही पाहिजे.
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 12/17/2014 - 11:40 नवीन
मी भारताच्या अथवा भारतीयांच्या दृष्टीकोनातून म्हणत नाहीये. त्यामुळं आपलं सावध राहण्याचं काम आपल्याला झकत करावंच लागणार आहे. आज आपलीच पोरं मारली जात आहेत म्हणून तरी त्यांचं हे जीवघेणं खूळ त्यांच्या मानगुटीवरुन उतरलं जावं अशी सदिच्छा व्यक्त करतोय. हे त्यांना जाणवलं तर असल्या उद्योगांतून बाजूला वळतील असा भाबडाच आशावाद. पण घटनाक्रमावरुन बदला घेतला गेला आहे असंच वाटतंय. पाक सेनाधिकार्‍यांची मुलं तिथं शिकत आहेत तिथं जाऊन रक्तपात करु जेणेकरुन पाकी आर्मीला समजेल असं काहीसं चित्र सामोरं येतंय. पाकीस्तान स्वतःच्या खड्ड्यात पडून स्वतः मरणार आहे नि मरता मरता भारतासाठी फार मोठा लोचा करुन जाणार आहे.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 12/17/2014 - 15:05 नवीन
छे हो तसे काही होणार नाही. एक उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याच आसपास बघायला मिळते ते लिहितो.फेसबुकवर, मिपावर आणि इतर अनेक ठिकाणी राजकारणावर खडाजंगी चालत असते.आपल्या विचारांपेक्षा वेगळा विचार कोणी करत असेल तर त्याची बोलताना-लिहितानाही संभावना करताना कधी तोल निसटतो हे आपल्यासारख्या शिकल्यासवरलेल्या (आणि बंदुक हातात उचलून कोणत्याही कारणाने इतरांचे मुडदे पाडायची सुतराम शक्यता नसलेल्या) लोकांनाही समजत नाही.उदाहरणार्थ मोदीविरोधी असेल तर देशद्रोही, मोदी समर्थक असेल तर नमोरूग्ण किंवा मोदीभक्त,२०११ मधला अनुभव-अण्णांच्या उपोषणाला विरोध असेल तर भ्रष्टाचार समर्थक इत्यादी इत्यादी गोष्टींनी इतरांची संभावना केली गेलेली आपण सगळेच बघतो.आपणही कमी-अधिक प्रमाणात त्यात सामील असतो.एकूणच काय की एखादी भूमिका अधिक ताठरपणे घेतली असेल तर ती बदलणे फारच कठिण असते. पाकिस्तानचा जन्मच मुळी हिंदूद्वेषावर झालेला.भारताचा सर्वनाश करायला हजार वर्षे गवत खाऊन राहू पण अणुबॉम्ब बनवू ही त्यांची मानसिकता.आणि त्या कट्टरतेच्या जोरावर गेल्या ३० वर्षात हजारो लोकांना त्यांनी ठार मारले आहे. भारताविरूध्द निर्माण केलेला भस्मासूर जरी त्यांच्यावर उलटत असला तरी त्या भस्मासूरापेक्षा भारत हाच मोठा शत्रू ते मानणार. आपल्यासारख्या शिकल्यासवरलेल्यांना जर ताठर भूमिका बदलणे कठिण जाते तर आपल्यापेक्षा अनंतपटीने जास्त ताठर आणि कट्टर लोक आपली भूमिका सहजासहजी बदलतील असे मला तरी वाटत नाही. या हल्ल्यानंतर तालिबान हाच भारतापेक्षा आमचा मोठ शत्रू वगैरे बडबड चालू असली तरी ती किती काळ टिकेल आणि त्यातून नक्की काय निष्पत्ती होईल याविषयी फारशी आशावादी परिस्थिती आहे असे मला तरी वाटत नाही.
↩ प्रतिसाद: प्यारे१
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 15:28 नवीन
+ १ सहमत. एवढे होऊनसुद्धा अजूनही पाकिस्तानला वाट चुकलेला धाकटा भाऊ असे समजणारे 'विचारवंत' भारतात आहेत.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गजानन५९ Wed, 12/17/2014 - 11:23 नवीन
तालिबान्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप चिमुकल्यांना.... एक माणूस म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून मनापासून श्रद्धांजली....(हे लिहावे लागतेय हेच खरे तर माणुसकीचे दुर्दैव ) पाकिस्तानात झालेला कालचा हल्ला, मागच्या आठवड्यात सिडनीत झालेला हल्ला हेच दर्शवतो कि जगातले कुठलेच ठिकाण जसे सुरक्षित नाही तसेच दहशतवादी कुठलीच दयामाया कुणाला दाखवणार नाहीत. हल्ला पाकिस्तानात झाला म्हणून आपण सुरक्षित आहोत अथवा आपल्या इथे काही होऊ शकत नाही असे विचार करायचे दिवस खरे तर मुंबई हल्ल्यानंतरच सरले. उद्या हेच माथेफिरू लोक आपल्या देशात घुसू शकणार नाही हे म्हणणे तर खूपच धाडसाचे होणार आहे. दिवस खरच धोकादायक बनत आहेत आणि हा दहशतवाद कधी आपला दरवाजा ठोठावेल हे आपल्याला समजणार देखील नाही.
प
प्रदीप Wed, 12/17/2014 - 15:41 नवीन
नेहमीप्रमाणेच चांगला आहे. पण
खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे.
ह्याविषयी मात्र मतभेद आहे. आपणच उदाहरण दिलेल्या पूर्व तिमोरची, अशाच प्रकारच्या 'बाहेरील शक्तीने मिळवून दिलेल्या स्वातंत्र्यात' परिस्थिती काय आहे? आपापसात मारामार्‍या, सुंदोपसुंदी- अगदी रामोस- होर्टा ह्या प्रमुख नेत्याच्या वधाचा (अयशस्वी) प्रयत्न इत्यादी रामायण तेथे घडले आहे. स्वातंत्र्य मिळवण्याची व स्वतःची उन्नती साधण्याची उर्मी, जनतेत आतून यावी लागते.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा