कोणी अडवले ?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Azam-Khan-SP-Mukhtar-Abbas-Naqvi-pakistan/articleshow/45602314.cms
नुकतीच ही बातमी वाचली . आझम खान हे माझे अत्यंत आवडते नेते आहेत . अगदी अकबरुद्दीन ओवेसींच्या पाठोपाठ त्यांच्याच नंबर लागतो माझ्या आवडत्या नेत्यांच्या लिस्ट मध्ये :) त्याची विधानेही फार सुंदर असतात , मागे "मी ताजमहल पाडायचे ठरले असते तर नेतृत्व केले असते " असे विधानही त्यांनी केले होते .
पण त्यांनी ह्या येथे केलेल्या विधानावर जरा शंका उत्पन्न झाल्याने हा काथ्याकुट करीत आहे ...
'आम्ही पाकिस्तानात जायला निघालो होतो. आमच्यासाठी पाकचे दरवाजेही खुले होते. पण तेव्हा आम्हाला थांबवण्यात आले. सरदार पटेल, महात्मा गांधी आणि नेहरूंसारख्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. त्यामुळेच मुस्लिम भारतात राहिले.'
हे खरे आहे का ? पटेल गांधी नेहरु वगैरे महात्मा लोकांनी "प्लीज प्लीज प्लीज पाकिस्तानात जाऊ नका " असे म्हणत खरंच आझम खान ह्यांचे रस्ते अडवुन धरले होते का ? की आमरणउपोषण सुरु केले होते ? गांधींनी अखंड भारत का नाकारला ह्या युगप्रवर्तक पुस्तकात अखंड भारत नाकारुन महात्माजींनी भारतावर केलेल्या प्रचंड उपकारांचे वर्णन केले आहे म्हणे , त्यात ह्या प्रकाराबद्दल काही माहीती आहे का ? की इतरत्र काही रेफरन्सेस आहेत ?
असे अजुन काही रेफरन्सेस अभ्यासु आणि व्यासंगी मिपाकरांच्या वाचनातील असतील तर त्यांची माहीती मिळावी म्हणुन हा काथ्याकुट :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015