नमस्कार मित्रांनो एक सल्ला हवा होता..........
नमस्कार, मी इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.त्यानंतर मी एक वर्ष एका कंपनीत काम केले. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला प्रत्येक कामाची भिती वाटते.सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यंत.....जेव्हा मी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा आज आपल्याला काय काम सांगतील? या विचाराने घाबरुन एकदम कापायलाच लागायचो.दुसर्या कंपनीत काहीतरी फरक पडेल म्हणून कंपनी बदलली पण तिथेही तसेच मला एकच काम चार पाच वेळा सांगत असत पण आधीच असणार्या भितीमुळे ते नीट लक्षातच राहात नसे.माझ्या बरोबरचे सगळे माझ्या पुढे गेले.पण माझ्या या प्रॉब्लेममुळे मी अजुनही तिथेच आहे.माझ्या मित्रांना याबद्द्ल सांगितल तर त्यांपैकी काहींनी तात्पुरता माझा आत्मविश्वास जागवला.पण त्याचा कायमसाठी काहीही फरक पडला नाही तर काहीजण मी एक मानसिक रोगी आहे असे समजुन त्यांनी माझ्याशी कायमचा संपर्क तोडला.खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले.थोडक्यात सांगायचे तर मी एक दुसरा मि.बीन आहे .जर मला कोणते महत्वाचे काम सोपवले तर नक्की मोठा अपघात होउ शकतो तसे एकदा कंपनीत झाले पण होते.माझे साहेब दिवसभर मला काय काम सांगावे याच काळजीत असायचे.
मला काय झालेय? हा माझा स्वभाव बद्लायचा मी खुप प्रयत्न केला पण स्वभावाला ओषध नसते असं म्हणतात ते खरेच आहे.मी काय करु ? कंपनी सोडुन देउन मला झेपेल ते काम शोधु की अजुन काही???????सगळे मला हसतात.
💬 प्रतिसाद
(77)
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/30/2014 - 06:43
नवीन
प्यारे बुवा ,
लाल रंग पाहुन जसा बैल उधळतो तसे करु नका, तुम्ही उगाच अशी चित्ताची शांती ढळु देवु नका . प्रवचन्कारांनी कसं गरीब गायी सारखं असलं पाहिजेल ...
. वगैरे वाक्यातुन आपली मनाची चंचलता मत्सरभाव लोकांपुढे मांडणे तुमच्या सारख्या बुवांना शोभुन दिसत नाही .
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पुजनाचे || हे तुकोबांनी सांगुन ठेवलय, ध्यानात घ्या .
जे अज्ञ जन भरकटले आहेत त्यांना मार्गदर्शन करा ... भवसागरात तुम्ही उडी मारलीच आहेत तर तारुन न्या ह्या सामन्य जनांना .
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे |
भयातीत ते संत आनंत पाहे |
तया पाहता द्वैत काही दिसेना |
भयो मानसी सर्वथाही असेना ||
मुळातच भीती हाच एक भास आहे ...ह्यावर एक फक्कड प्रवचन होवुन जाऊदे
आणि आता शांतपणे प्रवचन सुरु करा .
:D
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 12/30/2014 - 08:33
नवीन
इन जनरलच 'मोठे व्हा'! ;)
बाकी भीती हा भास आहे हे माहिती असणं आणि तसा अनुभव येऊन त्यावर मात करणं हे महत्त्वाचं आहे हे बरीक खरेच.
भारतीय मानसशास्त्र त्या दृष्टीनं मोलाची मदत करतं खरं पण हल्ली सगळ्या भारतीय गोष्टींना नाक मुरडायची सवय लागली आहे आपल्याला. त्यामुळे पास!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/30/2014 - 08:46
नवीन
भारतीय या नावाखाली नेमका गाळच खपवणे हे बाकी प्रवचनकारांना मस्त जमते. धन्य हो प्यारेबुवा की!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 12/30/2014 - 08:53
नवीन
>>> गाळच खपवणे
उदाहरण द्या.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/30/2014 - 09:02
नवीन
अनेक उदा. आहेत, पण अर्थात कुणी काही बोलले तरी दुकान काही बंद होणार नाही, सो व्हाय बॉदर? :)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 12/30/2014 - 09:06
नवीन
एखादं द्या हो मालक. बाकी बोलूच. उगाच बाल वॉशिंग्टन असल्याचं पुराव्यानं शाबित करु नका.
कुठला गाळ खपवला ते सांगा.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/30/2014 - 10:20
नवीन
ज्ञानमार्गाच्या अवहेलनेचा गाळ खपवणं हे सर्वत्र दिसतंच आहे की. :)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/30/2014 - 08:52
नवीन
जसे भीती हा भास आहे तसेच , लहान मोठे हाही भास आहे , होणे - न होणे हाही भासच आहे रादर जे जे काही द्वैत भासते तो साराच भास आहे बुवा .
कधी लक्षात येणार तुमच्या हे ?
पास नापास हाही भासच आहे :D
अवांतर : निर्विकार गुरुदेवांची फार राहुन राहुन आठवण आली बुवा आज तुमच्यामुळे :D
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 12/30/2014 - 08:53
नवीन
ब्वारं!
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/30/2014 - 08:59
नवीन
उगाच वर देखंलं बरं म्हणु नका बुवा , समजुन घ्या , उमजुन घ्या .
मी सांगतो त्यावर चिंतन मनन करा मग "पशा डोक्यावर पडलाय " वगैरे मत्सरयुक्त विधाने करायला प्रवृत्त करणारा मोहरुपी चिखल बुध्दीवरुन आपोआप विरुन जाईल आणि तुम्हाला सत्य प्राप्ती होईल !
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ||
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 12/30/2014 - 09:04
नवीन
खिक्क्क!
अगा जे झालेचि नाही, त्याचि वार्ता पुससी काही?
तुमच्या थोर विचारांचे वारु भलतीसलतीकडे धावू देऊ नका म्हणजे जमेल.
'पश्या डोक्यावर पडलंय' हे म्हटलेलं दिसतंय नि 'आमचं' दिसत नाही होय रे चोरा? त्यामुळं तो मत्सर वगैरे ठेव तुझ्याकडंच. :)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/30/2014 - 09:13
नवीन
बुवा बुवा बुवा असं काय करता ?
"आमचं" म्हंणलं म्हणुन "पश्या डोक्यावर पडलंय" ह्या वाक्याच्या आतुन येणारा मत्सराचा दुर्गंध कसा लपवता येईल ?
खरा योगी कसा मनाचा पावन हवा , कोणी डोक्यावर पडलेला असला तरीही तो आमचा आहे ही भावना जास्त बलवान असल्याने त्याने कधीही तो डोक्यावर पडलाय असे विधान केले नाही पाहिजे . उलट त्याला सांभाळुन घेणारे विधान करेल तोच खरा योगी .
जेव्हा लोक म्हणाले की हा ज्ञाना रेडा आहे तेव्हा माऊली काय म्हणाले की तरीही त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे , आमच्यात काही द्वैत असे नाही .
तुम्ही असं असणं अपेक्षित आहे बुवा !!
असे कुजकट विधान करणारा मत्सर हाच खरा तुमचा शत्रु आहे . आप:परभाव सोडुन द्या . आमचा तुमचा असे काहीच नाहीये , आपण सारे एकच आहोत , हे जे काही द्वैत भासत आहे तो मोह आहे बुवा .
विश्वात्मक व्हा बुवा विश्वात्मक व्हा :)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 12/30/2014 - 09:27
नवीन
चालतंय.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/30/2014 - 09:54
नवीन
शाब्बास !
प्रगति आहे :)
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 12/30/2014 - 07:58
नवीन
मी पुन्हा एकदा सांगतो. दुसरं काहिही करण्यापूर्वी त्वरित मानसोपचाराकडे जा. आत्ता लगेच जा.
- Log in or register to post comments
च
चेतन677
Tue, 12/30/2014 - 16:40
नवीन
मी या आधी ज्या मानसोपचार तज्ञाकडे गेलो होतो तो मला म्हणाला होता की गोळ्या तुला आयुष्यभर घ्याव्या लागतील.मी गोळ्या संपल्यावर मी पुन्हा मेडिकलमध्ये गेलो तर त्या मेडीकलवाल्याने गोळ्या देण्यास नकार दिला आणि मला पुन्हा डाॅक्टरला भेटायला लावले.आणि त्या डाॅक्टरने पुन्हा त्याच गोळ्या दिल्या ज्या त्याने आधी दिल्या होत्या आणि परत फी सुध्धा घेतली आणि परत म्हणे की गोळ्या संपल्यावर परत माझ्याकडे ये(म्हणजे हा शहाणा परततेच गोळ्या देणार) आणि हा डाॅक्टर संगमनेर मधला एक नांमांकीत मानसोपचार तज्ञ आहे ज्याचे लेख पेपर मध्ये येतात.मला असं का होतं तेही नाही सांगितलं त्याने फक्त गोळ्या लिहुन दिल्या...पैसे पण मी कसेबसे जमा केले होते.3000 खर्च करूनही घंटा काही फरक नाही.त्यापेक्षा मी.बीन बनुन राहिलेलं काय वाईट???
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/31/2014 - 04:02
नवीन
चुकीचा विचार आहे मित्रा. दुसरी एखादी आवडतं क्षेत्र आहे का तुझ? जिथे तुला छंद आणि व्यवसाय एकत्र करता येईल असं? तु अभियंता आहेस. मग आपल्या विषयांशी संबधित क्लासेस चालु करु शकतोयस. त्यामधे कुठलाही धोका नाही. शॉप फ्लोअर वर काम करायला जमत नाहीये तर मग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधे जा. तिथे डेडलाईन्स असतील शॉपफ्लोअर एवढी टेन्शन्स नक्की नसतील. तुला ब्ल्यु कॉलर लोकांच्या रफ वागण्याबोलण्याचं टेन्शन येतयं का? ते लोकं रफ असतील, पण त्यांच्याशी मिळवुन जुळवुन घेतलं की ते तुम्हाला सहकार्य करतात बरोबर.
बाकी तुझ्या माहितीकरता म्हणुन सांगतो. त्या ज्या गोळ्या असतात त्यांच्या दिर्घकालीन सेवनाचे दुसरे दुष्परिणाम असतात. मेंदुच्या केमिकल रिअॅक्शन्स मधे बदल होऊन डो़कं शांत आणि ताळ्यावर राहावं अश्या त्या गोळ्या असतील असा माझा कयास आहे. तेव्हा डॉक्टरची भेट घेतल्याशिवाय त्या गोळ्या दिर्घकाळ नं घेणचं श्रेयस्कर. बाकी ऑल द बेस्ट.
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Wed, 12/31/2014 - 04:33
नवीन
जॅक भाईशी सहमत आहे.
डॉक्टर उगाच काहीही सल्ले देणार नाही. एकंदर बायोलॉजिकल सायकल, झोप वगैरे बर्याच गोष्टींवर ही औषधे परिणाम करू शकतात. मेडीकलवाल्याने गोळ्या देण्यास नकार दिला यात बरंच काही येतं.
बाकी पर्यायांचा नीट विचार कर. गोष्टी विसरतो आहेस तर लिहून काढून एक-एका गोष्टीवर फोकस कर. न जमणार्या गोष्टींचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी बरेच जण स्वतःहून मदत करायला लागतात.
करायला पुरी दुनियाभर कामे आहेत. तुला काय आवडतं ते शोध.
- Log in or register to post comments
प
पी. के.
Tue, 07/26/2016 - 11:03
नवीन
मी.बीन बनुन राहिलेलं काय वाईट???
मी.बीन... स्वतःवर प्रेम करणारा, जगाची पर्वा न करणारा, छोट्या छोट्या गोष्टात आनंद शोधणारा, दुसऱ्याला टशन देणारा, भले आता कूच नाही पण कॉन्फिडन्स कायम हाई ठेवणारा मी.बीन काय वाईट.
मी तर म्हणतो प्रत्येकात थोडा तरी मी.बीन असावा.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 12/30/2014 - 09:22
नवीन
एका दिवसात आजार बरा करणारा अक्सर इलाज सापडेल अशी आशा करु नका. चांगल्या मानसोपचाराची गरज आहे, ते टाळु नका.
तुम्हाला मनात कुठेतरी वाटतय का कि समस्येचं निराकरण सहज शक्य आहे, बस पेचेचाननेकी देर है? तुम्ही स्वतः काहि प्रयत्न केला असेल आणि त्यात तात्पुरतं यश आलं असेल तर तोच धागा परत जुळवायचा प्रयत्न तुमचं मन करतय. असं असल्यास गिव्ह इट अ कन्सीस्टण्ट ट्राय. प्राणायाम, व्यायाम, ध्यान वगैरे अभ्यासाने भितीवर मात करता येते असा अनेकांचा अनुभव आहे. तुम्हाला जे काहि जमेल ते प्रयत्नपूर्वक काहि काळ नेटाने करा.
शेवटी भिती हा एक प्रकारचा केमीकल लोचा आहे. आणि शरीरात रासायनीक बॅलेन्स हेच त्याचं समाधान आहे. ऑल द बेस्ट.
- Log in or register to post comments
च
चेतन677
Tue, 12/30/2014 - 14:36
नवीन
मी रोजच इथे असतो..स्नेहांकिताजी काही मदत हवी असल्यास नक्की कळवा!!!!!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 12/30/2014 - 16:02
नवीन
मदत कुणाला हवी आहे नक्की ???
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 12/31/2014 - 04:20
नवीन
बहुतेक मलाच हवी असावी *biggrin*
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/31/2014 - 05:03
नवीन
इथल्या १०० लोकांचे प्रत्येकी १०० नखरे सांभाळता सांभाळता, तसचं मी, टवाळ कार्टा (असे अनेक नग) वगैरे वगैरे डोकेदुख्या, झालचं तरं आप्पासाहेब काफळे, ताईसाहेब फुरसुंगीकर, नेटफिशर अश्या डुआयडींशी तोंड देता देता संपाद्क मंडळावर मान'सिक' परिणाम नक्की होतं असणार. =))
तस्मात मदत ही हवीचं =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 12/31/2014 - 05:18
नवीन
चायला आपल्याला "आप्पासाहेब काफळे, ताईसाहेब फुरसुंगीकर, नेटफिशर" अशा मिपाप्रसिध्धांच्या बरोबर बशिवल्याचे बघितल्यावर ड्वाळे पाणावळे :)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 01/08/2015 - 20:46
नवीन
तुम्ही फार त्रोटक माहिती दिली आहे. कुठलाच मनोविकार चुटकीसरशी बरा होत नाही. धीर बाळगणं अतिशय आवश्यक आहे. अनेक डॉक्टर अप्रामाणिक आहेत हे खरे आहे पण बरं व्हायचं असेल तर डॉक्टरवर विश्वास ठेवणंही अतिशय आवश्यक आहे. मानसिक रोगावरची औषधांच्या बाबतीत सगळेच फार्मसिस्ट काळजी घेतात. त्यामुळे निव्वळ तुम्ही मागितली म्हणून त्या फार्मसिस्टने औषधे दिली नाही हे फार योग्य केले. अनेक मनोरुग्ण अशी औषधे गोळा करुन ठेवून नंतर आत्महत्या वगैरे करण्यासाठी वापरतात. शिवाय तुम्हाला सुरुवातीला दिलेला औषधाचा डोस योग्य आहे की नाही हे तपासल्याशिवाय ती औषधे रिपीट करायची सूचना डॉक्टर देऊ शकत नाही. कदाचित त्याला डोस व्यवस्थित अॅडजस्ट करावा वाटत असेल.
तुम्ही म्हणताय की की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील असं डॉक्टरनं सांगितलं. (मला वाटत नाही अगदी कायम औषधं घ्यावी लागतील) पण जर बरं वाटणार असेल तर औषधं घेत राहिली तर काय फरक पडतो? डायबेटिसचे रुग्ण जन्मभर इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात की. ब्लडप्रेशरचे रुग्णही कायम गोळ्या घेत असतात. निव्वळ कायम औषधं घ्यावी लागतील या चिंतेपायी एन्क्झायटीचा त्रास वाढवून घेतलेले काही जण ओळखीचे आहेत. कायम औषधं घ्यावी लागतील म्हणून उपचारच सुरु करायचा नाही हा चुकीचा दृष्टीकोण आहे.
डॉक्टरवर विश्वास ठेवा. थोडा व्यायाम वगैरे सुरु करा. विशेषतः ध्यानासारखे श्वासाचे व्यायाम फार उपयुक्त आहेत. हळूहळू नक्की बरे व्हाल.
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Tue, 07/26/2016 - 08:23
नवीन
काही फरक?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2