डु आयडी आणी चपला
आज बर्याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले?
एकीकडे तर मिपावर प्रवेश संपादित असुनही भारंभार डु आयडी निघतात आणि दुसरीकडे जेन्युइन लोक बॅन होतात. हे काय गौडबंगाल आहे? त्यातपरत सुहास, विमे, संक्षी वगैरे डु आयडी घेउन काड्या घालणार्यातले नाहित म्हणजे मग या कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आहेत त्या यांच्या नाहित. जर हे डु आयडी चालतात तर मग जेन्युइन लोक का नाहित?
मिपावर प्रवेश संपादित असतानाही (आता नसेल तर मला माहिती नाही. पुर्वी तरी होता) हे डु आयडी (सरळसरळ नामसाधर्म्य असणारे) कसे तयार होउ शकतात?
मिपावर जर लोक बॅन होणार असतील तर त्यांना का बॅन केले आणि कधी (आणी कोणाकोणाला) हे देखील लोकांना कळायला हवे. किमान इतर लोक त्याच चुका परत करणार नाहित.
डु आयडींना पायघड्या आणि इतरांना चपला असा प्रकार मिपावर जाणुनबुजुन होणार नाही ही कल्पना आहे. पण मग जालीय हत्या झालेल्या आयडींचे अपराध तरी लोकांना कळाले पाहिजेत आणि डु आयडींना बॅनही केले गेले पाहिजे असे मला तरी आपले वाटते.
सुहास, संक्षी, विमे वगैरे बॅन नसतील आणी माझी माहिती / समजूत चुकीची असेल तर आनंदच होइल.
इतरांची मते जाणुन घेण्यास उत्सुक
आपलाच नम्र
मृत्युं जय
हा सुहास डोक्यावर पडलाय . अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो .त्यांनतर मनसे च्या धाग्यावर ही असेच व्ययक्तीक भाषा वापरली गेली. त्यानंतर सुहास ने आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांची भाषा चुकली हे मान्य आहे.पण आंतरजालावरील माहिती वाचुन स्वतःला शहाणे समजणारे लोकांनी, जमिनीपातळीवर काम करणार्याची अक्कल काढु नये. * हे मत माझे वेयक्तीक आहे *