Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टोपणनाव

प
पगला गजोधर
Fri, 01/30/2015 - 08:09
🗣 121 प्रतिसाद
नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ? आंतरजालावर टोपणनाव घेणार्यांना, नाव आडनाव शहर धंदा दिला की लोकं लगेचच, त्या व्यक्तीचे/चा/ची, जात, धर्म,आहारपद्धती, व्याकरण, राजकीय-मत, बद्दल मनात पूर्वग्रह बनवून मोकळे, एवढंच काय तुम्ही कुठल्या पेठेत, मध्यवर्ती कि उपनगर, आलेल्या पाहुण्यांना चहा देता कि नाही, देशभक्त आहात कि नाही, जातीयवादी आहात कि नाही, अस्सल मराठी आहात कि नाही, इस्राइल-पालेस्टेन संघर्षाबाबत तुमचा stand, वैगरे बाबत ठरवून मोकळे होतात कि काय, असे वाटूनच टोपणनाव धारण करताना ‘लोकांनी आपल्या विचारांवरून आपल्याला ओळखावे, उगा आपलं नाव गावच्या फंदात पडू नये’, असं तर वाटत नसेल ना ? खर्या नावाने वावरणार्यांना, ‘टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्यास बहाल करण्यासारखे’ तर वाटत नसेल ना ? प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ नेहमी म्हणतात, की "माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच, नव्हे हा तर त्याचा बेसिक Instinct आहे". आंतरजालाने व्यक्त होण्याची हि सुविधा दिलेली आहे, पण काहीजन टोपणनाव घेऊन व्यक्त होतात. ५ जुलै १९९३ रोजी 'न्यू यॉर्कर' मधे, प्रसिध्द झालेले व्यंगचित्र, आजसुद्धा लागू आहे. [संधर्भ “”http:://en.wikipedia.org/wiki/On_the_Internet,_nobody_knows_you%27re_a_dog””] ऐका आंतरजालीय रिसर्चमध्ये असे आढळले कि ऐकून ४०% आंतरजालीय टोपणनावाने वावरतात, १०० आंतरजालीय पुरुषांमध्ये ६६%+ टोपणनावाने वावरतात, तर १०० आंतरजालीय महिलांमागे ३०% पेक्षा कमी महिला टोपणनावाने वावरतात. म्हणजेच एकुणात पुरुषांची महिलांच्या तुलनेत टोपणनावाने वावरण्याची प्रवृत्ती अधिक असते. वयापरत्वेही टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो, त्यातल्या त्यात फक्त पुरुष सभासदांच्या वयाचा अभ्यास केला असता, जसे की सरासरी वय (३९ वर्षे ) - टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्ती (६७ %+ पेक्षा जास्त) , (३० वर्षे )- (३३-६६%) , (४५+ वर्षे )- (३३% - पेक्षा कमी) त्या रिसर्चमध्ये असे आढळल की लोकं नाव लपवण्यासाठी नाही तर (ऐकून टोपणनाव घेणाऱ्यात ७०%)प्रायवसीसाठी टोपणनाव धारण करतात. What makes this finding interesting is that there is an increased desire for identity control across all major social networks as people become more privacy conscious. उरलेली लोक संवेदनशील विषयावर व्यक्त होता यावे, किंवा आपले खरे नाव, आपल्यात दडलेल्या 'स्व'ला योग्य न्याय देवू शकत नाही असे वाटते म्हणून टोपणनाव धारण करतात. (उदा एखादे काल्पनिक ४० वर्षीय श्री गंगाधर त्रंबकजी घोडनदिकर, उभी हयात भाषेचे प्राध्यापक म्हणून समाजात वावरत असले, तरी त्यांच्या दडलेल्या स्व मध्ये ते स्वतःला, ‘गरीबांचा कैवारी दुर्जन्नांचा संहारी’ वैगरे वैगरे पाहत असतील तर ते टोपणनाव सुपरम्यान, रॉबिन-हूड तत्सम प्रकारातील घेतील) त्यांची सार्वजनिकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतला हा मोठा प्रोत्साहक असतो, कि जे खऱ्या नावानिशी शक्य नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे. सर्वेमधील जवळ जवळ ९५% आंतरजालीय लोकांनी सांगितले की, टोपणनावाकडून मिळणारा सल्ला व खर्या नावाकडून मिळणारा सल्ला, एकसारखाच विश्वसनीय असतो, म्हणजेच टोपणनाव वापरल्यामुळे व्यक्तीच्या आंतरजालावरील विश्वासार्ह्यतेत अजिबात फरक पडत नाही. Have you ever discovered new product, service or business through online comments ? या प्रश्नावर जवळजवळ ६०% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. नावात काय आहे ? हे लिहिणारा प्रसिद्ध नाट्यलेखक 'विलीयम शेक्सपियर', हे देखील ऐक टोपणनावच होते. माझे टोपणनाव हे माझे व्यक्तिमत्व लपवण्यासाठी केलेला उपद्व्याप नसून, मुळी तेच माझे व्यक्तिमत्व आहे.---पगला गजोधर

प्रतिक्रिया द्या
24966 वाचन

💬 प्रतिसाद (121)
अ
अजया Sat, 01/31/2015 - 10:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आनन्दिता Sat, 01/31/2015 - 21:53 नवीन
दंतोत्पाटिका
अग्ग्ग्ग्गगगगग =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ब
बाबा पाटील Sat, 01/31/2015 - 08:28 नवीन
माझ्या क्रिकेट टीम मधल्या डेंटिस्ट लोकांना आम्ही दातपाडे मंडळी असेच म्हणतो,आणी त्यातले दोघे साले खरच तसे आहेत्,साल्यांचा बाउंसार बर्‍याचदा बॅट्समनच्या थोबाडावर आदळतो, मागच्याच महिन्यात आमच्या एका फिजिशियनचे दोन दात अश्याच प्रकारे पाडले गेले होते.आणी त्याचा मारुतीराया करुन टाकला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/31/2015 - 13:43 नवीन
बाबासाहेब बी डी एस चा पूर्णावतार ( फुल फोर्म) "बत्तीस दातांचा सत्यानाश" असाच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 14:01 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा Sat, 01/31/2015 - 14:12 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/31/2015 - 14:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अजया Sat, 01/31/2015 - 15:04 नवीन
दोन डाॅक्टर(Myself Broken Bones and Spirit)वाले आणि दोन कम्पाऊंडर लईच हसताएत.यांच्या बत्तीस दातांचा सत्यानाश करायची इच्छा कशी पूर्ण करावी? तिसरे स्वतःच बत्तिशी दाखवत आहेत.त्यांच्यापासूनच सुरुवात करते *aggressive*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अजया Sat, 01/31/2015 - 14:19 नवीन
आमच्या व्यवसायबंधुंकडे जायची वेळ तुमच्यावर येवो *biggrin*
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 16:22 नवीन
त्याच्यावरुन आठवण झाली, आमच्या एका डेंटीस्ट मैत्रिणीला आम्ही "दातं कोरुन पोटं भरणारी" म्हणतो. त्यावर तिचं ठरलेलं उत्तर असतं "३२ च्या ३२ दात घशात घालेनं म्ह्णुन"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ब
बाबा पाटील Sat, 01/31/2015 - 14:32 नवीन
*biggrin* :-D :D +D =D :biggrin:
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/31/2015 - 14:58 नवीन
मला वाटतं की टोपन नावाने लिहिणा-यांना वाटेल तसं लिहिता येतं आणि वावरता येतं. मी मागेही लिहिलं होतं की भविष्यात प्रत्येक आयडीला आधार कार्ड किंवा तत्सम ओळख पत्र असल्याशिवाय जालावर वावरता येणार नाही असा नियम केला तर काय होईल ? आपण समाजात वावरतो तेव्हा आपली ओळख असते आणि ओळख असणा-यांना एक सामाजिक संकेत पाळावे लागतात. सामाजिक संकेत पाळले नाही की कायदेशीर कार्यवाहीला सामोरं जावं लागतं. सामाजिक संकेत पाळायचे नाहीत, आपण कोण आहोत लोकांना कळु द्यायचं नाही आणि अभिव्यक्त व्हायचं यासाठीही टोपन नावं लोक वापरत असावीत असे मला वाटते. मनात असलेली भिती जावी आणि ओळख व्यक्त न होता मनातल्या भावना व्यक्त करता याव्यात यासाठी अशा आयडींना कदाचित फायदाही होत असावा. पण, टोपन नावांनी वावरणारी लोक भित्रे असतात असं माझं व्यक्तिगत मत आहे. बाय द वे, मिपावर टोपन नावाने वावरणा-यांना वरीजनल आयडी देण्यात येईल अशी घोषणा केली तर किती लोक वरीजनल नाव देण्यात यावे असा आग्रह धरतील ? काही लोक मला वरीजनल नावाचा आयडी द्यावा असा आग्रह धरतील यावर माझा विश्वास आहे. -दिलीप बिरुटे (वरीजनल नावाने आ.जालावर वावरणारा)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/31/2015 - 18:59 नवीन
हे काय ? साडेपाच तास झाले तरी अजून धूर पण नाही ??? (फूsss... फूsss... फूsss... ;) :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बॅटमॅन Sat, 01/31/2015 - 20:41 नवीन
स्वतःच्या खर्‍या नावाने जालावर वावरणे म्हणजे मोठा तीर मारणे असा समज पाहून मजा आली. सामाजिक संकेतांच्या नावाखाली दडपशाही करणार्‍यांना टोपणनावे गैरसोयीची वाटणे अगदी साहजिक आहे. पण अशी विचारसरणी आता मागे पडते आहे हे बरेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 06:19 नवीन
आपल्याला इतकं काय जिव्हारी लागलंय. तुम्ही राहु द्या की तुमचं टोपननाव. उलट टोपननावाने खुप तीर मारता येतात हे मला चांगलं माहिती आहे. मागे अशाच चर्चेत आम्हाला टोपननाव मिळालं नाही तर आम्ही जालावर वावरणं सोडून देऊ असंही कोणी तरी म्हटल्याचं आठवतं, त्यात काही विशेष नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 07:59 नवीन
बॅट्याच्या प्रतिसादावर असले कोणीतरी लिहिणार असे वाटलेच होते पण त्याचा मुद्दा एका प्राध्यापकाला न समजलेला बघून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे काय ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 08:09 नवीन
व्यक्तिगत रोखाचं टोपन नावाने असं काहीही बरळता येतं हा एक नवा मुद्दा. बाकी, काही शरम वगैरे काही वाटून नका घेऊ... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 08:42 नवीन
पण जे काही लिहिले आहे तेच बघायचे की...कोणी लिहिले आहे याला का महत्व द्यावे आणि भारतासारख्या देशात जिथे RTI चा उपयोग करणार्यांचा खूनसुध्धा होतो तिथे स्वतःच्या नावाने सगळेच लिहिता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 09:11 नवीन
आयडी काय लिहिते ते महत्वाचेच आहे. एखादा टोपननावाने लिहितो आणि नेहमी चांगलेच लिहितो त्यांच्याबद्दल सोडून देऊ. पण, टोपननावाने समजा तुम्ही मला कोणतंही भांडन झालेलं नसतांना '' मी तुला पाहुन घेईन, तुला अक्कल नाही, तुझा गळा दाबेन'' असं तुम्ही लिहु शकता. पण, तेच जर तुम्ही माझ्या परिचित आहात मी तुम्हाला ओळखतो की तुम्ही एका बीएसएनल कंपनीत नौकरी करता हे माझ्याबरोबर आपण सर्वांना माहित आहे, तर तुम्ही मला असं लिहु शकाल काय ? लिहु शकणार नाही. कारण आपण एक सामाजिक संकेत पाळतो. टोपननाव असतं तेव्हा असं काही विचार करायची गरज नसते, असे मला वाटतं. दिली ना शिवी आपलं काय होणार, एक तर प्रतिसाद अप्रकाशित होतील किंवा आयडीवर ब्यान येईल. मुळ आयडीने लिहाल आणि आंजावर तुम्हाला नियमित लिहायचंच असेल तेव्हा यासर्व गोष्टींचा विचार करावा लागेल असं मला वाटतं. बाकी, राहीलं सुरक्षिततेचा प्रश्न. आपली खासगी माहिती आपण कितीतरी ठिकानी सार्वजनिक केलेली असते. नाव, पत्त्यासकट माहिती पुरवलेली असते. रेशन, गॅस, फोन, मोबाईल, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, इ.इ. तेव्हा आपले सरसकट खुन होतात का ? नाही. टोपननावाने वावरतांना (लिहितांना) खुप सुरक्षित वाटतं आणि वरीजनल आयडींनी लिहिलं की जरा असुरक्षित वाटतं हा एक मुद्दा ग्रहित धरु तर टोपननावाने आंजावर वावरण्याचे फायदे तोटे तुम्ही अगदी मनमोकळेपणाने लिहाच. आणि उद्या संस्थळावर वावरतांना संस्थळचालकास आंजावर वावरणा-या सदस्यांना आपली सर्व माहिती यापुढे द्यावी लागेल असं शासनाने आदेश काढले तर टोपननावाने वावरणारे संस्थळावर वरीजनल आयडीनी वावरतील का ? जरा कळु द्या तुमची मतं ! ( व्यक्तिगत रोखाचं लिहायचं सोडून चर्चा करु, भांडन नाही) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 09:52 नवीन
जो पर्यंत संस्थळचालकाला दिलेल्या माहितीचा दुरुपयोग होणार नाही याची खात्री आहे तोपर्यंत संस्थळचालकाना माहीती देण्यास काहीच हरकत नाही...पण लिहिताना स्वतःचे खरे नाव सगळ्यांना दिसते त्यामुळे समोरचा वाचणारा त्या माहितीचा दुरुपयोग करणार नाही याची काहिच हमी नाही त्यामुळे तोटे होउन नंतर निस्तरण्यापेक्षा मुदलात तोटा होउ नये याची काळजी घ्यावीच...माहिती कधीही शेयर करता येते पण आधीच शेयर केलेली माहीती नंतर पुसता येत नाही ( व्यक्तिगत रोखाचं लिहायचं सोडून चर्चा करु, भांडन नाही) मिपापे अपुन कुच्चबी दिल पे नै लेता...बिन्दास लिख्खनेका मेरे सात बातां कर्ते टैम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बॅटमॅन Sun, 02/01/2015 - 11:08 नवीन
सोडा हो. सामाजिक संकेत इ. च्या नावाखाली हडेलहप्पीचे समर्थन करणार्‍यांना हे समजेल अशी आशा करणे व्यर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Sun, 02/01/2015 - 11:08 नवीन
तुम्ही राहु द्या की तुमचं टोपननाव.
ते माझं मी पाहीन हो. सेव्हॉयर काँप्लेक्स नका येऊ देऊ फुकटचा. :) तदुपरि तीर मारणार्‍यांना मारू द्यावेत या मताचा मी आहे. चालूद्या तीरंदाजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 16:00 नवीन
तुम्च्यासारखे हजारो पाहिलेत जालावर मला कशाला कोम्लेक्स येतोय. दम असेल तर वरीजनल नाव घेऊन वावरा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 16:05 नवीन
कश्याला उग्गीच वाद...गप्पा मारान्नू...हादाडी करवान्नू...कट्टानी लाईफ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 16:22 नवीन
तुमचा अभ्यास कळलाय. प्लीज. तुम्ही कशाला वादात पडताय. :) (तुम्हाला तर मला उपप्रतिसाद टाकायचंयही जिवावर येतं) तुमचं वाचन किती, तुमचा अभ्यास किती तुम्ही बोलता किती, तुम्ही लिहिता किती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 17:01 नवीन
माझा अभ्यास नक्कीच तुमच्यापेक्षा फार फार कमी आहे (किंबहूना बर्याच मिपाकरांपेक्षा फार फार कमी आहे) तरीसुध्धा माझे ४ पैसे... आज्काल मिपावर वादावादी जास्तच जाणवायला लागली आहे असे वाटायला लागले आहे (जवळ जवळ दर दुसर्या धाग्यात) म्हणून माझा "कश्याला उग्गीच वाद...गप्पा मारान्नू...हादाडी करवान्नू...कट्टानी लाईफ" हा प्रतिसाद जास्त करून बॅट्यासाठी होता पण कदाचित तुम्ही जास्त मनावर घेतलात...असो ( व्यक्तिगत रोखाचं लिहायचं सोडून चर्चा करु, भांडन नाही) हे तुम्हीच लिहिलेले आणि त्यावर मी लिहिलेले की मिपापे अपुन कुच्चबी दिल पे नै लेता...बिन्दास लिख्खनेका मेरे सात बातां कर्ते टैम तरीसुध्धा तुम्ही तुमचा अभ्यास कळलाय. प्लीज. तुम्ही कशाला वादात पडताय. Smile (तुम्हाला तर मला उपप्रतिसाद टाकायचंयही जिवावर येतं) तुमचं वाचन किती, तुमचा अभ्यास किती तुम्ही बोलता किती, तुम्ही लिहिता किती. हे लिहिलेत...यावर खालील पैकी जो अ‍ॅप्लिकेबल असेल तो प्रतिसाद वाचावा व दुसरा सोडून द्यावा जर हे फक्त मी मनावर घेतो की नाही इतकेच चेक करण्यासाठी लिहिले असेल तर मी इतकेच म्हणेन की असे लिहिणारे तुम्ही मिपावर पहिलेच नाही आणि शेवटचे तर नक्कीच नाहीत...मैनू फर्क नै पैंदा :) पण जर फक्त मला "गप्प बसा" असे सांगायला असे लिहिले असेल तर ... मी कधी बोलायचे आणि कधी बोलायचे हे मी ठरवतो...तुम्ही सुचना केलीत त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही...भारतीय लोकशाहीचा १ नागरिक या नात्याने तो तुमचा हक्कच आहे...पण मी मिपापे अपुन कुच्चबी दिल पे नै लेता...बिन्दास लिख्खनेका मेरे सात बातां कर्ते टैम असे लिहिले असतानासुध्धा स्वतःहून टोमणा मारलात...उग्गीच?? यातला तुम्ही कोणता प्रतिसाद निवडलात ते इथेच धाग्यावर सांगा (व्यनी वगैरे छुपाछुपी नको) मग तुमच्या प्रतिसादावर उपप्रतिसाद द्यायचा की नाही...दिला तर कसा द्यायचा ते ठरवेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 17:08 नवीन
बाकी, तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचं अजिबात कारण नाही. मी प्रतिसाद लिहितांना कोनालाच व्य.नि. फिनी करत नाही. जे असतं ते शंभर टक्के धाग्यावर मग मान असो की अपमान. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 17:15 नवीन
इतके टंकूनसुध्धा पहिला प्रतिसाद घेतलात की दुसरा ते लिहिलेच नाहीत...माझा अंदाज आहे की दुसरा पण म्हटले नक्की करून घेऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 17:18 नवीन
माझा पास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 17:28 नवीन
छान...आता कसे क्लियर केलेत...यापुढे मिपावर तुमच्या प्रतिसादांना उपप्रतिसाद देणार नाही असा शक्य तेव्हडा प्रयत्न करेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
य
यसवायजी Sun, 02/01/2015 - 17:12 नवीन
दम असेल तर वरीजनल नाव घेऊन वावरा...! काय पण लॉजिक हाय? मान गए!! फ़क्त नावावरुन कुणाच्या xxमध्ये किती दम आहे ते ठरवता येते? .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 17:15 नवीन
निनावी नावाने वाटेल ते लिहिता येतं. वरीजनल नावाने वाटेल तसं लिहिता येत नाही, असं माझं मत आहे. वाटल्यास तुम्हीही वरीजनल नावाने किती लिहिता येतं. आणि टोपननावाने किती आणि कसं लिहिता येतं ते नक्की पाहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Sun, 02/01/2015 - 17:26 नवीन
निनावी नावाने वाटेल ते लिहिता येतं. वरीजनल नावाने वाटेल तसं लिहिता येत नाही याचा मला समजलेला अर्थ असाकी,वरीजनल नावामुळे लिहिण्यावर बंधने येतात. म्हणजेच एखादी व्यक्ति पुर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. (पोटात१ आणि ओठावर १ ऎसे)। तुम्ही असे नसाल (नाहीच), पण मग अशा खऱ्या नावामुळे फ़ायदा काय? कुणाचा? आणि तुमच्या दृष्टीने टोपण नावाचा तोटा काय? कुणासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टवाळ कार्टा Sun, 02/01/2015 - 17:19 नवीन
ब्रोब्र ना..."काश्मिर भारताचे आहे हे" मिपावरच्या "श्रीगुर्जी" आयडीने लिहिणे आणि "माईसाहेब कुरुंदीकर" आयडीने लिहिणे...फरक आहे ना ;) अवांतर - "श्रीगुर्जी" आणि "माईसाहेब कुरुंदीकर" ही नावे इथे फक्त उदाहरणे म्हणून लिहिलेली आहेत...त्या आयडींचा आणि या प्रतिसादांचा काहीही संबंध नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
सुबोध खरे Tue, 02/03/2015 - 09:02 नवीन
@ टवाळ कार्टा ओ त्या कुरुन्दिकर नसून कुरसुन्दीकर आहेत. त्यांच्या "ह्यांना"असे नाव वाकडे केलेले चालणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हाडक्या Tue, 02/03/2015 - 11:15 नवीन
काय हो खरेकाका, माईंचे "हे" पण मग "शांतपणे" दंबूक घेऊन येतात का ? :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा Tue, 02/03/2015 - 11:17 नवीन
आय माय स्वारी बर्का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Sun, 02/01/2015 - 18:25 नवीन
अरेरेरे...यत्ता चौथीतल्यासारखी च्यालेंज देता? फीलिंग ज्यामच नॉस्टॅल्जिक. वाढदिवसाच्या कचकून शुभेच्छा बरं का प्राडॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/02/2015 - 06:54 नवीन
फीलिंग नॉस्टॅल्जिक असु द्या. प्रयोग आपल्यावर करायला काय हरकत आहे ? प्रयोगासाठी आपण योग्य आयडी आहात असे मला वाटते. आपल्या प्रतिसादातला मोकळे ढाकळेपणा वरिजनल आयडीने दिसतो का ? आव्हान स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं ! बाकी, बड्डेच्या माझ्याही तुम्हाला शुभेच्छा आहेतच... :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 08:35 नवीन
या गोष्टी तुम्हांला या जन्मी कळणे नाही हे बाकी कळून चुकलंय आता. तस्मात वाढदिवसाच्या शुभेच्छा! शान्ति:पुष्टिस्तुष्टिश्चास्तु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/02/2015 - 09:08 नवीन
जगातल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या समजायला माणसाला अनेक जन्म लागतील,मलाही तुमच्या न कळल्या गोष्टी समजायला आणखी एखादा जन्म लागू शकतो हे मला मान्य. पण माझा मुद्दा असा आहे की वरिजनल आयडीने लिहितांना तुमच्यात किती फरक पडतो, किती परिणाम करते मुळ ओळख...ओळख लपविण्याचं खरं कारण काय असू शकेल असं मला तुमच्या निमित्तानं समजुन घ्यावं वाटत आहे, बघा कसं जमतं ते मी फार मागे तर तुमच्या लागू शकत नाही ना, नै का ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 10:07 नवीन
जे लोक विचारांपेक्षा व्यक्तीला महत्त्व देतात त्यांनाच खर्‍या ओळखीचे अप्रूप आहे, बाकीच्यांना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/02/2015 - 12:05 नवीन
उलट अनामिक व्यक्तींच्या विचारांना काहीही महत्व नसतं. (असे अनामिक विचार वाट्सपवर फिरत असतात, क्षणभर वाचतो आणि आपण ते विसरुन जातो) माणुस आणि त्यांचा विचार एकमेकांशी जोड्ला गेलेला असतो त्या त्या व्यक्तीच्या विचारांना महत्व असतं. ”महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला आणि त्यांनी कोणतेही प्रश्न सोडविण्यासाठी अहिंसात्मक मार्गाचा विचार मांडला. अल्बर्ट आइंस्टीन हे भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांनी सापेक्षातावादाचा सिद्धांत मांडला. कोणतंही शिक्षण न घेतलेल्या बहिणाबाई चौधरी यांची कविता आयुष्यात येणा-या उत्तम अनुभवांची कविता असते. म.फुल्यांनी बहुजन समाजाला शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. वरील सर्व उदाहरणावरुन प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचा विचार आयुष्यभर त्यांच्याशी निगडीत राहीला. म.गांधी, अल्बर्ट आइंस्टीन, बहिणाबाई, म.फुले यांनी वास्तविक जीवनात आणि खासगी जीवनात जे केलं असेल ते आपल्या समोर आलं म्हणुन आपण सर्वांना व्यक्ती विचाराचं महत्व पटतं. व्यक्ती आणि त्याचा विचार हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही सारखाच वाटला पाहिजे, असे मला वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 13:34 नवीन
"गुणा: पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः" हे विसरलात की काय हो? महात्मा फुलेंचं आडनाव फुले नसतं तर तुम्हांला काय फरक पडला असता? फुले हे नाव महत्त्वाचं की त्यांचे विचार? मुसलमान नाव दिसले की त्याकडून राष्ट्रभक्ती, उच्चवर्णीय नाव दिसले की प्रो-दलित दृष्टिकोन आणि पुरुषाचे नाव दिसले की स्त्रीप्रधानता वदवून घेऊ पाहणारी मनोवृत्ती अशातूनच तयार होते. अशी उदाहरणे मआंजावर कैक पाहिली आहेत. कर्त्याऐवजी कर्म महत्त्वाचं वाटत नसेल तर उद्या गुन्हेगाराचीही जातपात पहावयास कमी करणार नाही तुम्ही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संदीप डांगे Mon, 02/02/2015 - 13:45 नवीन
डॉक्टरसाहेब, तुमचा युक्तिवाद वरकरणी पटत असला तरी काही प्रश्न उभे राहतात. १. विचार ह्याची नक्की काय व्याख्या असावी? म्हणजे एखादा कुजकट टोमणा हा काही विचार होऊ शकत नाही. तसेच एखादा विचार स्वतः आचरणात आणला तरच त्याचे महत्व प्रस्थापित होते काय? एखादी कल्पना किंवा विचार स्वबळावर उभी राहू शकत नाही का? आता योग्य ते उदाहरण आठवत नाही पण कदाचित याचा इतिहासात काही पुरावा असेल. २. भूमिकांची अदलाबदल केली तर विचारांचे महत्व कमी होते काय? म्हणजे सुभाषबाबूंनी सत्य अहिंसा यावर व्याख्यान दिले तर ते त्यांच्या एकंदर आयुष्याशी सुसंगत नाही म्हणून नक्की कुणाचे अवमुल्यन होईल? सुभाषबाबूंचे कि अहिंसेचे? विचारांवर कुणाची मालकी असते काय? ३. टोपणनाव घेतल्याने दमन न होता मोकळेपणाने प्रदर्शित होता येते हा बॅट्मॅन यांनी मांडलेला विचार अर्धवट वाटत आहे. माझ्या मते गर्दीमागे दडून "मारो इसको" असा तोंड लपवून ओरडणारा गर्दीचा पुढारी नसतोच आणि त्याची पुढे येउन झाल्या किंवा होणाऱ्या प्रकाराची जबाबदारी घेण्याची धमक नसते. टोपणनाव घेऊन कुणी कुजकट टोमणे आणि निरर्थक वाद घालत असेल तर त्याला स्वातंत्र्याचा उपमर्दच म्हणावा लागेल. टोपणनाव घेणाऱ्याला उत्तरदायित्व घ्यायची भीती वाटते का? ४. माझा चौथा प्रश्न बॅट्मॅन यांना आहे. टोपणनाव घेतल्याने अभिव्यक्तीमध्ये खुलेपणा नेमका कसा येतो आणि खरे नाव वापरून त्याची गळचेपी कशी होते हे जर सोदाहरण सांगता आले तर तुमचे मत समजायला बरे पडेल. चाललेल्या चर्चेवरून मला वरचे मुद्दे सुचले. आता माझे व्यक्तिगत मत. आज मी जळी, स्थळी खऱ्या नावानेच वावरतो, भविष्यात पण तसेच करेन. मला कुठेही कसल्याच बाबतीत अभिव्यक्त होण्याची भीती वाटत नाही. मी चुकीचा असेल तर योग्य व्यक्ती मला बरोबर काय ते सांगेलच. व्यक्त झाल्याशिवाय माझे विचार चुकीचे का बरोबर हे कळणारच नाही. कुठलाही मान-अपमान-टोचणी लावून घेत नाही. त्यासाठी टोपणनाव घेण्याची जरूर वाटत नाही. गम्मत म्हणून किंवा जसे वर एकेठिकाणी सांगितल्याप्रमाणे एकसारखी खूप नावं असली तर टोपण नाव गरजेचे असू शकते. पण ओळख लपवणे चुकीचे वाटते. सतत विनोदी लिहिणाऱ्याने पोटतिडकीने काही गंभीर लिहिले तर आणि सतत गंभीर व वैचारिक लिहिणाऱ्याने निखळ विनोदी टिप्पणी केली तर लोक बावरतात हेही खरेच. लोक नावाला प्रस्तुत अनुभवावरून व्यक्तिमत्व चिकटवतात असा अनुभव आहे. आंतरजालावरील विचारांवरून खऱ्या वैयक्तिक आयुष्यात व्यक्तीवर विशिष्ट लेबल लावून व्यवहार होत असेल तर ते चुकीचेच आहे. हे टाळण्यासाठी टोपणनाव वापरत असावेत. तेंव्हा अजून एक प्रश्न उभा राहतो कि असे टोपणनाव घेऊन विचार मांडणाऱ्या व्यक्तीची विश्वासार्हता किती? खूप गोंधळ होतोय यार… उत्तर द्या कुणीतरी… कुठल्याही नावानी द्या पण उत्तर महत्वाचे … बघा परत गोंधळ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 13:50 नवीन
आंतरजालावर टोपणनावाने वावरले तर फालतूचा त्रास होत नाही हा फायदा आहे. व्हायचा तो होतोच काही वेळेस पण जनरली कमी. ते फीचर कुणी ट्रोलिंगसाठी वापरत असेल तर तो दोष त्या ट्रोल माणसाचा आहे, त्या फीचरचा नाही. मआंजावर उदाहरणे पाहिली आहेत याची. खर्‍या नावाने लिहिणार्‍यांना मुद्दाम जातधर्मविषयक खोचक प्रश्न विचारले गेलेले पाहिले आहेत. असला फालतूपणा नको असेल तर पाहिजे कशाला कटकट? असा विचार करून जर टोपणनाव घेतले तर ते घेणारी व्यक्ती भ्याड आहे असा समज करून घेणे ही त्या समज करून घेणार्‍याची वैचारिक पातळी दर्शवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/02/2015 - 14:18 नवीन
आपली वैचारिक पातळी फार उंचीची आहे, हेही मला मान्य आहे. एवढ्या प्रतिसादात मला हा एक चांगला मुद्दा वाटला की फ़ालतूपणाचा त्रास होत नाही. अगदी मान्य आहे हा मुद्दा. मुळात समोरच्याने टोपननावाला थेट शिवी दिली तर ती मुळ आयडीला ती तितकी लागत नाही. टोपननावाने वावरण्याला एकाच्या बदल्यात दोन शिव्या देता येतात हाही एक फ़ायदा असतो. मुळ आयडीवर त्याचं कोणतंही ओझं येत नाही, हा फ़ायदा. एक दिली तर दोन देता येतात. मुळ आयडीला तसं करता येत नाही. टोपननाव घेणारी व्यक्ति भ्याड असतात असं मी तरी म्हटलेलं नाही ती लोक भित्री असतात असं मी म्हटलं आहे, माझं मत चुक असेलही (ती भित्री नसतात हे सीद्ध झालं तर मला आनंदच वाटेल) भित्री यासाठी म्हणतो की आपली ओळख जालावर सिद्ध झाली तर उगं कटकटी नको असा एक विचार असतो त्यांची भीती साधार असेल पण मी म्हणतोय उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील आज वास्तव समाजात वावरताना जे अनुभव येतील तेच इथे येतील आशाही भागाचा विचार व्हावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:23 नवीन
उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील आज वास्तव समाजात वावरताना जे अनुभव येतील तेच इथे येतील आशाही भागाचा विचार व्हावा.
जर समजा खर्‍या नावाची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील का? बहुधा हो. त्यामुळे लोक अनेक गोष्टी लिहिताना बिचकतील. समाजात अनेक अप्रिय अनुभवही येत असतात. खरे नाव दिले तर तेवढ्यावरून लोक सुतावरून स्वर्ग गाठतील. आत्ताही गळ टाकणार्‍यांची संख्या कमी नाही, तेव्हा तर अजूनच त्रास होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संदीप डांगे Mon, 02/02/2015 - 14:53 नवीन
खर्‍या नावाने लिहिणार्‍यांना मुद्दाम जातधर्मविषयक खोचक प्रश्न विचारले गेलेले पाहिले आहेत. असला फालतूपणा नको असेल तर पाहिजे कशाला कटकट?
ओके. गॉट इट.
असा विचार करून जर टोपणनाव घेतले तर ते घेणारी व्यक्ती भ्याड आहे असा समज करून घेणे ही त्या समज करून घेणार्‍याची वैचारिक पातळी दर्शवते.
भ्याडपणाचा अर्थ समजला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/02/2015 - 14:23 नवीन
डांगे साहेब, प्रतिसाद आवडला. प्रतिसादातला मनमोकळेपणाने भावला. चर्चेतल्या मुद्द्यांवर अजुन लिहितो. तो पर्यन्त केवळ पोच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा