Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

क
क्लिंटन
Mon, 02/09/2015 - 14:11
🗣 163 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन. तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी. धन्यवाद क्लिंटन

प्रतिक्रिया द्या
37758 वाचन

💬 प्रतिसाद (163)
प
पिलीयन रायडर Tue, 02/10/2015 - 07:05 नवीन
मला राजकारणातलं अजिबात म्हणजे अजिबात काहिही कळत नाही, तरीही एक प्रतिसाद द्यायची खुमखुमी आहेच.. आप निवडुन येणार हे तसंही कळालं होतंच.. किरण बेदी हा सगळ्यात मोठा गाढवपणा होता.. केजरीवाल की किरण बेदी असं मला विचारलं असतं तर मी सुद्धा कदाचित केजरीवालांना निवडलं असतं.. असो.. मागच्या वर्षी सुद्धा केजरीवालांना पहिल्याच फटक्यात चांगल्या जागा मिळाल्या होत्या, ते मुख्यमंत्री सुद्धा झाले.. ह्याही वर्षी त्यांना दणकुन जागा मिळाल्या आहेत. फक्त मागच्या वर्षी त्यांची प्रतिमा ही "अत्यंत स्वच्छ, पारंपारिक राजकारणापेक्षा वेगळं काहीतरी देणारा पक्ष, शिकल्या - सवरल्या, जाणत्या लोकांचा पक्ष" वगैरे होती. ती तशी फारशी आता रहिली नाहीये... नसावी.. केजरीवाल माणुस किती घोळ घालु शकतो हे त्यांनीच मागच्या १ वर्षात दाखवलय.. आप आता "अजुन एक राजकीय पक्ष" म्हणून निवडुन आला असावा.. अजुन एक नेहमीचीच निवडणुक झालीये, अजुन एक "राजकारणी"च निवडुन आलाय.. मला तरी फार काही वेगळं घडेल असं वाटत नाहीये.. फक्त गोष्टी फुकट वाटणे आणि काही झालं की धरणं धरणे हे दोन वैताग पुढे कमी व्हावेत अशीच इच्छा... (* - मला वाटतं म्हणुन मी लिहीलं.. का वाटलं असं? ह्याला उत्तर नाही.. म्हणून मी माझी मत तुम्हाला पटवुन द्यायला बांधील नाही.. वसावसा अंगावर येऊ नये..)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 02/10/2015 - 07:11 नवीन
जाम खुश...मुफ्त पाणि,मुफ्त वीज,मुफ्त वायफाय,मुफ्त घर.......मुफ्त जेवन देणार असेल तर दिल्लीला राहायला जाणार आम्ही.........
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/10/2015 - 07:34 नवीन
मला प्रचंड मजा येतेय! फेसबुकपासून, व्हॉट्सअ‍ॅपपासून काही परिचितांपर्यंत अनेकजण जे गेले काही आठवडे अव्याहत स्पॅमिंग करत होते आज भुमिगत झालेत! त्यातील काही वीर ते धाडस करताहेत त्यांपैकी भयाण विनोदाची झालर चढवण्यात व्यग्र आहेत तर काही हे शासकीय कर्मचार्‍यांना वेळेवर हाफिसात यायचे नव्हते म्हणून झाल्याचे सांगण्यात! आणि हे बचावात्मक तोकडे प्रयत्न तर अधिकच करूण भासत आहेत! ५०%हून अधिक मते तिरंगी लढतीत मिळवणे, ९०% च्या आसपास जागा जिंकणे! वॉव! काय मॉस्टरस विजय आहे! आआपच्या नियोजनाला हॅट्स ऑफ! ३०-३२% मतांसह विजय मिळवल्यानंतरही जग जिंकल्याच्या थाटात काही इंच छाती वाढवणार्‍यांना, दिल्लीकरांनी काँग्रेसमुक्त विधानसभेत फार जागा ठेवलेली नैय्ये! बेसिकली, मला फारच मजा येतेय!
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 02/10/2015 - 07:38 नवीन
हाहाहा!!! मलाही..अगदी गुदगुल्या वगैरे होत अस्ल्यासारखा हस्तोय सकाळपासून!! आज तरी मजेचा दिवस आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
विलासराव Tue, 02/10/2015 - 07:39 नवीन
मलाही मजा येतेय बर्यापैकी. त्यात ही भर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 07:35 नवीन
या प्रचंड मोठ्या विजयातून असे स्पष्ट दिसते की मी जे काही आडाखे बांधले होते ते चुकले. मतदानाची टक्केवारी मी अजून बघितलेली नाही.तरीही असे दिसते की दिल्लीत दुरंगी लढत झाली.कॉंग्रेस जागा घेणार नाही तरीही १०-१२% मते घेईल असे वाटले होते.तसे झाले असायची चिन्हे कमी. आघाडीच्या दोन पक्षांना ८५-९०% च्या आसपास मते मिळणे याला दुरंगी लढत म्हणता येईल.भाजपने २०१३ च्या तुलनेत फार मते गमावली नसतील (कदाचित आणखी मते मिळवली सुध्दा असतील) अशी माझी ’हंच’ आहे.पण कॉंग्रेस समर्थकांनी आपला पक्ष जिंकणे शक्य नाही हे लक्षात घेऊन एकगठ्ठा आआपला मतदान केले असे दिसते.त्याचप्रमाणे बसपाने २००८ मध्ये १४% आणि २०१३ मध्ये ५.५% मते घेतली होती त्यापैकी बरीचशी मते आआपला गेलेली असावीत असे दिसते.म्हणजेच मला वाटत होते की आआप ५०% पेक्षा जास्त मते मिळवू शकणार नाही असे वाटत होते ते चुकीचे ठरलेले दिसते.दुरंगी लढतीत जर आघाडीवर असलेल्या पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षापेक्षा १५% पेक्षा जास्त मतांची आघाडी असेल तर पहिल्या क्रमांकावरील पक्ष असा जबरदस्त स्वीप करू शकतो. म्हणजे आआपला ५०-५१% आणि भाजपला ३५-३६% मते असतील तर आआप ९०% जागा नक्कीच जिंकू शकतो. म्हणजे कॉंग्रेस आणि बसपा आआपची मते खातील आणि आआप ५०% ओलांडू शकणार नाही हा माझा अंदाज चुकला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 08:19 नवीन
एका वाहिनीवरील वृत्तानुसार मतांची टक्केवारी अशी आहे. (कंसात डिसेंबर २०१३ मधील मतांची टक्केवारी) आआप - ५४% (२९.९%), भाजप - ३२% (३४.५%) आणि काँग्रेस - ८% (२४.५%) भाजपची सुमारे २.५०% मते कमी झालेली दिसताहेत. मतांच्या टक्केवारीत भाजपला फारसा फटका बसलेला दिसत नाही. आआपला तब्बल २४-२५ टक्के मते जास्त मिळाली. त्यातील १६-१७ टक्के मते काँग्रेसकडून आलेली दिसताहेत. इथेच मुख्य फरक पडला. दुसर्‍या एका वाहिनीवरील चर्चेत सांगण्यात आले त्यानुसार काँग्रेसने आआपला वॉकओव्हर द्यायचे ठरविले होते. त्यामुळे त्या पक्षाने फारसा प्रचार केलाच नाही व पैसेही हात राखून खर्च केले. बर्‍याच झोपडपट्ट्यात काँग्रेसचे एकही पोस्टर नव्हते व तिथले कार्यकर्ते आआप उमेदवाराचा प्रचार करत होते. भाजपचे नाक कापण्यासाठी आपली स्वतःची स्पेस आआपला व्यापून देणे ही काँग्रेसची घोडचूक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 19:35 नवीन
का मी खाली बोलतो ते का असु शकत नाही. कॉन्ग्रेस ची १० % वोट भाजप ला गेले आणि भाजपचे ११ % आप ला गेले . म्हणजेच भाजपचे पण पारंपारिक लोक आप कडे वळलेच नाहीत असे ठोस आपण बोलु शकत नाही. आकड्यांचय खेळात हे चालते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बॅटमॅन Tue, 02/10/2015 - 07:49 नवीन
काय दणका तेच्यायला. दिल्लीचा मोदी झाला केजरीवाल. एकच नंबर. आतातरी बीजेपीचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 07:53 नवीन
बाकी भाजप ला इतक्या कमी जागा मिळाल्या तर त्याना विरोधी पक्ष नेते पद पण मिळणार नाही म्हणे . लैच धुव्वा उडाला मग
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Tue, 02/10/2015 - 08:03 नवीन
केजरीवाल आणि आप यांचे अभिनंदन आणि शुभेछ्चा! अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी आपने या निवडणुकीत केली आहे. हा भाजपला मोठा झटका आहे, मोदी सरकराने जनतेची कामे करायला सुरुवात करावी नुसती भाषणबाजी उदंड झाली आणि हो 'जीता तो मोदी , हारा तो किरण बेदी' असे चालणार नाहि. मोदींच्या ९ महिन्याच्या कारभाराची दिल्लीकर जन्तेने दिलेली ही पोचपावती आहे. इथून पुढे तरी प्रधानसेवक उठसुठ राज्याराज्यात फिरून विरोधकांना 'बाजारू, नक्षलवादी बना' असा पोरकट प्रचार करून पदाची शान घालवणार नाहीत अशी आशा करुयात.नकारात्मक प्रचार करायचा, हिंदू -मुस्लिम ध्रुवीकरण करायचं या सगळ्यांना लोकांनी एक सणसणीत चपराक दिली आहे. काल दुसर्या एका धाग्यावर लिहिलेलं इथे परत डकवतो.. दिल्ली राज्य लहान आहे (पूर्ण राज्याचा दर्जा पण त्याला नाही). केंद्र शासित प्रदेश, महानगरपालिका आणि दिल्ली राज्य सरकार अश्या ३ पातळ्यावर दिल्लीचा कारभार चालतो तरीपण दिल्लीसाठी मोदी /शहा यांनी खूप जोर लावला कारण राज्य लहान असले तरी देशाची राजधानी आणि इथल्या मिडीयामुळे चर्चेत राहते आणि देशभर इथल्या घटनांचा परिणाम पडतो, दखल घेतली जाते (डिसेंबर २०१३ मध्ये भाजपने मप्र, छत्तिसगढ, राजस्थान जिंकले मात्र चर्चा जास्त झाली ती दिल्लीतल्या आपच्या जागांची!). दिल्लीत अपयश आले तर देशभर प्रतिसाद उमटणार आणि लोकसभा २०१४ नंतर उधळलेला वारू रोखला जाणार या भीतीने मोदी/ शहा आणि त्यांची फौज केजरीवर तुटून पडली (खरे तर महाराष्ट्रात त्याला थोडा ब्रेक लागलाच होता मात्र आधी एनसीपीबरोबर मिलीभगत उघड झाल्यावर पब्लिकने केलेल्या छीथुमुळे यांनी सेनेला बरोबर घेवून प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला) . दुसरे असे कि केजरीवाल कसा का असेना प्रामाणिक आहे आणि जिद्दी आहे. शहरी सुशिक्षित मध्यमवर्ग आपकडे खेचला गेला होता, लोकसभेत परत तो भाजपकडे वळाला. मोदींचा कारभार आहे असाच चालत राहिला तर परत हा वर्ग केजरीवालकडे आशेने पाहू शकतो हे भाजपचे चाणक्य जाणून आहेत म्हणून ते आणि त्यांची फौज केजरीला टार्गेट करत आहेत. यांचा प्रचार काय तर मफलरवाला, खुज्लीवाल, अनार्कीस्ट वगैरे वगैरे आणि काही मोदिभक्त फेबुवालवर आप कसा देशद्रोही आहे, आपला मुस्लिम देशातून (पाक, सौदी) फंडिंग होते याच्या 'मनघडंत' कहाण्या रंगवत आहेत. प्रतिस्पर्धी आटोपत नसेल तर हिंदू- मुस्लिम अस ध्रुवीकरण करायची भाजपची जुनीच सवय आहे मात्र केजरीवाल दिल्लीतल्या सर्व समाज घटकांत लोकप्रिय आहे उद्या जर आप बहुमताने जिंकली आणि केजरीवाल मुख्यमंत्री झाला तर तो आपल्याला नडणार हे भाजपेयी जाणून आहेत आणि म्हणून केजरीवर इतके तुटून पडत आहेत.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/10/2015 - 08:10 नवीन
बरोब्बर बोललास रे दुश्यन्ता. भाजपावाले जेवढे अरविण्दला टार्गेट करतील तेवढी त्यांची मते कमी होतील.गेल्याच वर्षी येथेच मिपाकरांनी अरविंदची यथेच्छ टिंगल केली होती."आप" संपला म्हणून पेढे वाटायचे बाकी ठेवले होते. ह्या निकालातून सगळेच काही ना काही शिकतील अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 08:21 नवीन
आआप ही खाप पंचायत आहे आणि केजरीवाल खोटारडा आहे असे तू सुद्धा मागील वर्षी म्हणत होतास की रे माईसाहेब. आता टोपी बदललीस का रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/10/2015 - 08:03 नवीन
अरु व त्याच्या पक्षाचे अभिनंदन. सकाळपासूनच चहा,आरारूट बिस्किटे,गुड-डे बिस्कीटे खात टी.व्ही.बघणे चालु होते.अरू व त्याचा पक्ष सत्तेवर येणार हे भाजपा-अध्य़़क्ष-अमितच्या बोलण्यातून जाणवत होते.गेल्या आठवड्यातच 'दिल्ली निकालांचा व केण्द्र सरकारच्या कामगिरीचा संबंध लावू नये' असे तो म्हणाला होता. किरण बेदी ह्यांना पक्षात घेऊन मोठी घोडचूक केली.आता "आमची मते कमी झाली नाहीत' असे भाजपावाले म्हणत आहेत. हे म्हणजे- मला परी़क्षेत कमी मार्क्स मिळाले पण माझा विषयाचा अभ्यास पक्का होता' म्हणण्यासारखे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 08:12 नवीन
अरू व त्याचा पक्ष *lol* *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
पिशी अबोली Tue, 02/10/2015 - 08:29 नवीन
किरण बेदी 'ह्यांना'???? आप जिंकल्याचा एवढा परिणाम की चक्क माई लोकांना आदरार्थी सम्बोधू लागल्या????? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
द
दुश्यन्त Tue, 02/10/2015 - 08:07 नवीन
बाकी भाजप ला इतक्या कमी जागा मिळाल्या तर त्याना विरोधी पक्ष नेते पद पण मिळणार नाही म्हणे . लैच धुव्वा उडाला मग ७ पेक्षा तरी आम्ही भाजपला विरोधी पक्ष नेतेपद देवू असे कुमार विश्वास म्हणत आहेत . भाजपने पण यातून बोध घ्यावा. लोकसभेत झाला एवढा पोरखेळ खूप झाला आता कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद द्यावे. एवढे पण घाबरू नये आणि प्रधान सेवकांनी सभागृहात आपली उपस्थिती वाढवावी
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 08:13 नवीन
इथेच उद्धट भाजप नेतृत्व आणि आप मधला फरक कळतो . बाकी सत्या फिल्म मधला एक भारी संवाद आहे . "मौका सबको मिलता है ."
  • Log in or register to post comments
ट
टिल्लू Tue, 02/10/2015 - 08:20 नवीन
किरण बेदीची सिट गेली. शोक्क्ड!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 08:45 नवीन
हो .. वाटले नव्हते ही सीट जाईन. जसे टीव्ही वर निकाल + आघाडी दाखवतात, तसे नेट वर कोणत्या साईट वरती असे दिसेल. मी साईट बघतोय पण तसे टीव्ही सारखे कुठेच दिसत नाहिये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिल्लू
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 08:21 नवीन
किरण बेदी हारल्या म्हणे !
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 08:23 नवीन
किरण बेदींचा कृष्णानगरमधून पराभव झाला अशी पी.टी.आय ची बातमी आहे असे आताच एन.डी.टि.व्ही वर जाहिर केले गेले आहे. ही जागा भाजपच्या हर्षवर्धन यांनी गेल्या वेळी ३७% आघाडीने जिंकली होती.भाजपने ही जागा कधीच गमावली नव्हती.याचाच अर्थ असा किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून आणणे पक्षावर जोरदार बॅकफायर झाले आहे.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काम केलेले दिसत नाही.अन्यथा इतकी सुरक्षित जागा गमावणे शक्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 08:28 नवीन
जबरदस्त विजयाबद्दल केजरीवाल आणि आआपचे अभिनंदन आणि शुभेच्छा! या निवडणुकीत भाजपचा अगदी पालापाचोळा झाला. काँग्रेसला तर भोपळाही फोडता आला नाही. केजरीवालांनी "Promising the Moon" अशा प्रकारची आश्वासने दिली आहेत. व्यावहारिक दृष्ट्या ती पूर्ण करणे अवघड आहे. तब्बल ५४% मते व ९०% हून अधिक जागा मिळवून आआप सत्तेत येत आहे. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊन व अवास्तव आश्वासने पूर्ण करता आली नाहीत तर केजरीवाल केंद्रावर खापर फोडून पुन्हा एकदा राजीनामा देतील असं वाटतंय. निदान आता तरी केजरीवालांनी नाटकीपणा सोडावा. आताच एका वाहिनीवर पाहिले. आपल्या शेजारी उभ्या असलेल्या पत्नी व वडीलांची केजरीवालांनी ओळख करून दिली आणि नंतर सांगितले की माझी पत्नी केंद्र सरकारी सेवेत आहे व तिला सरकार त्रास देईल अशी भीति आहे. आता हे नाटक कशाला? त्यांच्या पत्नीला सरकाराला त्रास द्यायचा असता तर याआधीच्या दोन्ही सरकारांनी त्रास दिला नसता का? एवढा मोठा विजय मिळवून सुद्धा हा भंपकपणा कशाला?
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Tue, 02/10/2015 - 09:30 नवीन
केजरीवालांनी "Promising the Moon" अशा प्रकारची आश्वासने दिली आहेत.
निदान आता तरी केजरीवालांनी नाटकीपणा सोडावा.
आआपला प्रचंड बहुमत मिळाल्याने आता आश्वासने पूर्ण न करण्यासाठी कोणतेही कारण शिल्लक नाही.
काही महिन्यांपूर्वी एका विशिष्ट व्यक्तीमत्वाविषयी अगदी याच टायपातले उद्गार काढणार्‍यांना "भक्तांनी" दीलेली उत्तरे आठवली आणि Irony म्हणजे काय याचा प्रत्यय आला. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 09:50 नवीन
माझे ही म्हणणे असे आहे की पुर्वग्रहदुषित द्रुष्टिकोण कायम का ठेवायचा. वेळ उत्तर देइलच आणि नाही जमले तर पुन्हा निवडनुका आहेतच. तेंव्हा पडतील मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
अ
असंका Tue, 02/10/2015 - 08:31 नवीन
किरण बेदींबद्दल वाईट वाटतंय......
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 08:39 नवीन
लेटेस्ट आकडे: आआप-६७, भाजप-३ १९८४ मध्ये कॉंग्रेसने दिल्लीत ६९% मते मिळवली होती आणि जबरदस्त स्वीप केला होता. तसेच २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला ७० पैकी ६८ जागांवर आघाडी होती.आआप या विक्रमाशी बरोबरी करतो की मोडतो आणि इतर सगळ्या पक्षांचा पूर्ण व्हाईटवॉश करतो ते बघायचे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 08:47 नवीन
साईट देता येइल का लेटेस्ट आकडे , जसे टीव्ही वर दाखवतात तसे बघण्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
त
तुषार काळभोर Tue, 02/10/2015 - 09:47 नवीन
सर्वात विश्वासार्ह http://eciresults.nic.in/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 08:48 नवीन
आआपला सर्व ७० जागा मिळाव्यात असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 08:47 नवीन
एक चांगलं झालं. आआपला प्रचंड बहुमत मिळाल्याने आता आश्वासने पूर्ण न करण्यासाठी कोणतेही कारण शिल्लक नाही. अर्थात केंद्राने माझ्या योजनांना निधी पुरवला नाही हे राखीव कारण केजरीवालांनी खिशात ठेवलं असणारंच. मागील वर्षी केजरीवालांचा राजीनामा म्हणजे, प्रेक्षकात बसून फलंदाजावर टीका करणार्‍या प्रेक्षकाला हातात बॅट देऊन खेळायला बोलावल्यावर आणि आपल्याला गोलंदाजी खेळता येत नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर अशक्य अशी धाव घ्यायचा प्रयत्न करून मुद्दाम स्वतःहून धावबाद होऊन पंचांवर आणि नॉनस्ट्रायकरच्या काँग्रेसच्या फलंदाजावर दोषाचं खापर फोडण्यासारखं होतं. आता त्याच प्रेक्षकाला पुन्हा एकदा फलंदाजीची संधी मिळाली आहे. नॉनस्ट्रायकरला काँग्रेसचा नसून आआपचाच फलंदाज आहे. गोलंदाज व क्षेत्ररक्षकही आआपचेच आहेत. पंच सुद्धा आआपचेच आहेत. असे असूनसुद्धा फलंदाज बाद झाला तर आपल्याला खेळता येत नाही हे कबूल करण्यापेक्षा चेंडू पडताना साईटस्क्रीन समोर कोणतरी हलत होतं आणि म्हणून लक्ष विचलीत झाल्यामुळे मी बाद झालो असे फुसके कारण फलंदाज देतो का ते बघायचं.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 08:53 नवीन
दिल्लीचा अर्थ संकल्प हा ४०,००० कोटी रुपयांचा आहे, आणि ती काही थोडकी रक्कम नाहिये. आपण थोडा वेळ तर दिला पाहिजे असे वाटते. हे तर मॅच सुरु न होताच, फलंदाज बाद होण्यासच मैदानात उतरले आहेत असे म्हणण्यासारखे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 09:43 नवीन
आपण थोडा वेळ तर दिला पाहिजे असे वाटते.
तोच तर कळीचा मुद्दा आहे. वेळ द्यायला हवे हे अगदी बरोबर आहे.मला स्वत:ला ’फुलपाखरू’ मानसिकता अजिबात आवडत नाही. माझ्यासारखा विचार करून ज्या नेत्यावर विश्वास दाखविला आहे त्याला निदान ३-४ वर्षांचा वेळ दिला पाहिजे असा विचार मतदार इन जनरल करताना दिसत नाहीत. आता मतदारांना सगळे काही इन्स्टन्ट हवे असे दिसते.विशेषत: नेत्याला मॅन्डेट मोठे प्रचंड मिळाले असेल तर अशा अपेक्षा वाढीला लागतात. व्ही.आय.पी कल्चर बंद करणे, वीजेचे दर कमी करणे, पाणी फुकटात देणे वगैरे त्या मानाने सोप्या गोष्टी आहेत.तरीही हे वीजेचे दर कमी करायचे असतील तर वीज वितरण कंपन्यांना सबसिडी द्यायला हवी.अन्यथा या कंपन्या कोर्टात गेल्या तर ते प्रकरण लटकू शकेल.शीला दिक्षित यांच्या सरकारने २००१-०२ मध्ये या कंपन्यांबरोबर करार केले होते आणि या कंपन्यांना वीज वितरणाचे अधिकार दिले गेले होते. तो करार मोडायचा असेल तरी तो नक्की कोणत्या परिस्थितीत आणि कसा मोडावा हे त्या करारातच स्पष्ट केलेले असते (सर्वच करारात असे असते). मनात आले म्हणून केजरीवाल असा करार मोडू शकणार नाहीत.शेवटी केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत कोणी अनभिषिक्त सम्राट नव्हे.त्यांना हे सगळे करारमदार, कायदेकानू नक्कीच लागू पडतील. केजरीवालांची खरी कसोटी लागेल इतर आश्वासनांच्या पूर्ततेच्या वेळी. १. ५०० नव्या शाळा बांधू असे एक आश्वासन पक्षाने दिले आहे.पाच वर्षात ५०० नव्या शाळा म्हणजे दरवर्षाला सरासरी १०० नव्या शाळा आणि दर आठवड्याला सरासरी जवळपास २ नव्या शाळा काढल्या तरच ते शक्य आहे.तसेच प्रत्येक शाळेला किमान २ एकर जागा हवी.म्हणजे दिल्लीमध्ये एक हजार एकर जागा मिळायला हवी.तितकी जागा उपलब्ध आहे की नाही याची कल्पना नाही.शाळा बांधायला नक्की किती खर्च येतो याची कल्पना नाही. २. पूर्ण दिल्लीमध्ये फुकटात वाय-फाय देऊ असे आणखी एक आश्वासन आहे.माझ्या ५०० स्क्वेअर फुटाच्या घरासाठी इंटरनेट आणि वायफायसाठी मी दर महिन्याला जवळपास ३०० रूपये भरतो.दिल्ली शहर हे मुंबईच्या सुमारे अडीच पटींनी मोठे आहे.म्हणजे हे आश्वासन पूर्ण करायचे असेल तर किती खर्च येईल? ३. दोन लाख पब्लिक टॉयलेट बांधू हे आणखी एक आश्वासन आहे.म्हणजे दर वर्षी ४० हजार पब्लिक टॉयलेट बांधून व्हायला हवीत आणि दररोज सुमारे ११०!! अशी इतर अनेक आश्वासने आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की स्वत: केजरीवालांनी ही आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा उंचावून ठेवल्या आहेत.त्या पूर्ण करता आल्या नाहीत तर नेतृत्वाविषयी असंतोष वाढायला वेळ लागणार नाही.विशेषत: इतके अभूतपूर्व बहुमत मिळालेले असताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 09:50 नवीन
शाळा, टॉयलेट, वाय-फाय इ. च्या आश्वासनावर विसंबून जनता मत देते असे मला वाटत नाही. मुळात या मूलभूत गरजाच समजल्या जात नाहीत. त्याऐवजी फुकट पाणी, विजबिलात ५०% सवलत या जास्त आकर्षक व मते खेचणार्‍या घोषणा आहेत. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांना फुकट वीज द्यायला सुरूवात केली होती. त्याचा जबरदस्त फायदा मिळाला होता. अर्थात निवडून आल्यावर लगेचच ती योजना रद्द करण्याचा शहाणपणाही काँग्रेसने दाखविला होता. २००८ मध्ये शेतकर्‍यांना ७२,००० कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्याच्या योजनेचा २००९ मध्ये काँग्रेसला प्रचंड फायदा झाला होता. जनतेला अशाच योजना आवडतात. स्वच्छता, टॉयलेट, वाय-फाय, शाळा अशा आश्वासनांना जनता भुलेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 09:56 नवीन
किलंट्न जी आपले विचार आणि मुद्दे बरोबर. बघुया पुधे काय होते ते . परंतु सकारत्मक .. त्य दिशेकडे भ्रष्टाचार मुक्त वाटचाल चालु होत आहे या बद्दल मला आनंद आहे. राजकारण दिसते तेव्हडे सोप्पे नाहिच हे दिसते आहेच. बघु या. परंतु बीजेपीच योग्य पर्याय होती आणि लोक चुकीचे होते हे सर्रास म्हणने योग्य नाही असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नांदेडीअन Tue, 02/10/2015 - 08:53 नवीन

फेसबुकवर माझ्या मित्र यादीमध्ये अनेक अमराठी मित्र आहेत. सगळ्यांना समजावे म्हणून मी हा पोस्ट हिंदी भाषेतून लिहिला होता. तोच इकडे कॉपी-पेस्ट करतोय, त्याबद्दल माफ करा. नियमबाह्य असेल तर नियंत्रकांनी खुशाल उडवून टाकावे.

================================================================ सुपडा साफ । ऎतिहासिक विजय । एक ‘भक्त’ दोस्त ने इस जित का एक लाईनमें ही विश्लेषण कर दिया । उसने कहा ये असत्य पर सत्य की विजय है । आज मुझे जो खुशी हो रही है, वो बयान करने के लिए मेरे पास वाकई में शब्द नहीं है । पर जो विचार मन में है, कम से कम उन्हे तो मै बयान कर ही सकता हूं । मेरे कुछ दोस्त केहते थे की केजरीवाल भगौडा है, नक्सली है, खांसता है, अराजकतावादी है, आतंकवादी है, देशद्रोही है, CIA एजंट है, भ्रष्टाचारी है, नौटंकीबाज है, पता नहीं और क्या क्या है, पर है जरूर । दिल्ली की जनता ने आज उनको बता दिया की ये बचकाने आरोप कितने खोखले थे । ३०० एम.पी. + आधा दर्जन कॅबिनेट मिनिस्टर्स + तीन मुख्यमंत्री + खुद प्रधानमंत्री + पेड मिडिया + रिसोर्सेस + पैसा + संगठन के हजारो कार्यकर्ता + किरण बेदी + बाबा राम रहिम इन सब लोगों को दिल्ली की जनता ने बता दिया की हमे काम करनेवाली सरकार चाहीये, आप लोगों की नकारात्मक सोच और भाषण नहीं । इतना जबरदस्त बहुमत मिला है, पर फिर भी कुछ लोग दिल्ली की जनता को कोस रहे है के उन्होंने आम आदमी पार्टी को चुनकर बहोत बडी गलती की है, अब पुरे देश को खामियाजा भुगतना पडेगा वगैरा वगैरा... भाईयों, अब तो आंखे खोल दो । ४९ दिन की सरकार के काम देखकर उन्हें वोट करनेवाली जनता पागल और आप फेसबुकी पंडित सच ऎसा तो नही हो सकता ना ? लोकसभा मे आप लोगों जैसे ही ये दिल्ली की जनता भी मार्केटिंग के जाल में उलझकर पछता रही थी । पिछले ९ महिनों मे भाजपाने इतने अच्छे काम किये दिल्ली और पुरे भारत में की दिल्ली की जनता ने उन्हें वोट ही नही दिया । लाखों दिलों की धडकन, और उतने ही लोगों के आदर्श महामहिम बिन्नी जी लगभग १८ हजार वोटों से पिछे चल रहे है । जिस त्रिलोकपुरी मे दंगे कराने की कोशिश की गई थी, उस जगह भाजपा के प्रत्याशी ३० हजार वोटों से पिछे चल रहे है । किरण बेदी जी सिर्फ १ हजार वोटों से आगे चल रही है । खुद डिबेट को बुलाकर बाद मे विधानसभा में डिबेट करेंगे ऎसा कहा था इन्होंने । अगर किरण जी जित गई तो कम से कम वहां तो डिबेट करेंगी वो । खैर, आपको चिढाना मेरा मकसद नहीं है । बस इतनी सी प्रार्थना है की आंखे खोलकर देखो अपने आसपास । कट्टरतावाद समस्यायें सुलझाता नहीं बल्की बढाता है । ये बात दिल्ली के तो समझ में आ गई । आप भी जल्दी समझ जाओ तो आपके लिए ही अच्छा है । इस हार से सबक लेकर अगर भाजपा-कॉंग्रेस (और अन्य तमाम पार्टीयां) जनता के काम करना शुरू कर दे तो इससे अच्छी बात और क्या हो सकती है ? आम आदमी पार्टी की जरूरत ही नही रहेगी फिर तो. आम आदमी पार्टी के इस ऎतिहासिक विजय के तीन प्रमुख कारण जो मुझे लगते है, वो है : १) आम आदमी पार्टी की नियत २) ग्राऊंड लेवल पर काम करने वाले कार्यकर्ता ३) दिल्ली की जनता दिल्ली की जनता का जितना शुक्रीया अदा किया जाये उतना कम है । देश की राजनिती को बदलकर रख देनेवाली पार्टी को जिताकर उन्होंने पुरे भारत के सामने एक आदर्श रखा है । और एक महत्त्वपूर्ण बात... पिछले एक-दो साल में कई जगह पर डिस्कशन, डिबेट किया । वैसे मैने कभी किसी पर पर्सनल अटॅक किया नही, जबान कभी फिसलने नहीं दी । पर फिर भी कोई अगर मुझसे नाराज है तो उससे माफी मांगना चाहता हूं । आशा करता हूं की आप मुझे माफ कर देंगे । सोचा था ४-५ लाईन लिखकर खतम कर दूं, पर थोडा ज्यादा लंबा खिंच गया. जाते जाते आपको भविष्य मे न्युज चॅनल और कुछ फेसबुक वॉलपर आनेवाली खबरें बता देता हूं । - मुख्यमंत्री बनने के २ घंटे बाद भी जनलोकपाल बिल पास नही हुआ । - ४ घंटे हो गये, अभी भी दिल्ली की जनता फ्री WiFi के लिये तरस रही है । - सरकार के ६ घंटे पुरे हो चुके है फिर भी १० लाख CCTV नही लगाये है । - केजरीवालने आज २ की बजाय ३ रोटीयां खाई हैं । तिसरी रोटी के लिये क्या दुबई से फंड आया है ? - १० घंटों के बाद भी भ्रष्टाचार पुरी तरह से रूका नही है और इसलिये दिल्ली की जनता हा हाल बेहाल है । - केजरीवालने गिता की कसम खाते वक्त उसपर बांया हाथ रखा, हिंदू धर्म का अपमान । - पुरे २४ घंटे हो चुके है फिर भी केजरीवालने पेट्रोल के दाम नही घटाये है । - अब तक का सबसे बडा स्टींग ऑपरेशन, केजरीवाल के मंत्री हॉटेल में चाय पिते पकडे गये । अब इजाजत दिजिये, कुछ दोस्तों को पार्टी देने जाना है । ;)

  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 02/10/2015 - 09:33 नवीन
मुख्यमंत्री बनने के २ घंटे बाद भी जनलोकपाल बिल पास नही हुआ । - ४ घंटे हो गये, अभी भी दिल्ली की जनता फ्री WiFi के लिये तरस रही है । - सरकार के ६ घंटे पुरे हो चुके है फिर भी १० लाख CCTV नही लगाये है । - केजरीवालने आज २ की बजाय ३ रोटीयां खाई हैं । तिसरी रोटी के लिये क्या दुबई से फंड आया है ? - १० घंटों के बाद भी भ्रष्टाचार पुरी तरह से रूका नही है और इसलिये दिल्ली की जनता हा हाल बेहाल है । - केजरीवालने गिता की कसम खाते वक्त उसपर बांया हाथ रखा, हिंदू धर्म का अपमान । - पुरे २४ घंटे हो चुके है फिर भी केजरीवालने पेट्रोल के दाम नही घटाये है ।
नाही हो.. ही 'आआप'वाल्यांची खासियत आहे. २००४च्या बातम्या २०१५त झळकवणे इत्यादी.. आता तेच जिंकले म्हटल्यावर हे सगळं कोण करणार? ;-) असो. आआपचे आणि केजरीवालांचे जबरदस्त अभिनंदन.. पाच वर्षं आहेत हातात. सुयोग्यरित्या वापरावीत, हीच अपेक्षा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 09:42 नवीन
>>> आम आदमी पार्टी के इस ऎतिहासिक विजय के तीन प्रमुख कारण जो मुझे लगते है, वो है : १) आम आदमी पार्टी की नियत २) ग्राऊंड लेवल पर काम करने वाले कार्यकर्ता ३) दिल्ली की जनता माझ्या दृष्टीने आआपच्या विजयाची २ मुख्य कारणे आहेत. (१) फुकट पाणी, वीजबिलात ५०% घट यासारखी अत्यंत लोकानुययी आश्वासने आणि (२) काँग्रेसने आआपला दिलेला वॉकओव्हर. भाजपच्या मतात जेमतेम २-३ टक्के घट झाली आहे परंतु आआपची मते तब्बल २४-२५ टक्क्यांनी वाढली आहेत. काँग्रेसची मते २४.५% टक्क्यांवरून ८% टक्के इतकी कमी झाली आहेत. हा प्रामाणिकपणाचा, स्वच्छ कारभाराचा विजय आणि अहंकाराचा पराभव वगैरे नुसत्या वावड्या आहेत. खरी कारणे ही दोनच असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
अ
असंका Tue, 02/10/2015 - 09:50 नवीन
आपण खरंच भाजपाचे पक्षपाती आहात का याबद्दल आता शंका यायला लागली आहे. लक्षात घ्या, ज्या लोकांनी निवडून द्यायचे आहे, त्यांची 'फुकटे' वगैरे शब्दात संभावना करून आपण लोकांच्या मनात भाजपा बद्द्ल अनुकूल भावना कशा निर्माण करणार? म्ह्णजे जो फुकट देइल असे म्हणतो त्याच्या मागून फक्त ती फुकट गोष्ट हवी म्हणून एवढे लोक गेले? धन्य!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 09:57 नवीन
मी फुकटे हा शब्द वापरलेला नाही. फुकट पाणी, विजबिलात ५०% सवलत इ. लोकानुययी घोषणांमुळे लोकांनी मते दिली असे म्हटले आहे. मी आधीच्या एका प्रतिसादात महाराष्ट्रातील २००४ मधील शेतकर्‍यांना फुकट वीज योजना, २००८ मधील ७२,००० कोटी रूपयांची कर्जमाफी ही उदाहरणे दिली आहेत. तीच इथेही लागू पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
क
काळा पहाड Tue, 02/10/2015 - 10:32 नवीन
निवडून देणारे लोक फुकटे नसतात असं म्हणायचंय का? बाकी मी काही भाजपाचा पक्षपाती नाही. त्यामुळे मी तरी त्यांना फुकटेच म्हणणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
क
कपिलमुनी Tue, 02/10/2015 - 10:50 नवीन
तुम्हाला अजून शंका येतेच कशी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 10:27 नवीन
नान्देडियन - मिपा वर मागच्या वेळेस केजरीवाल ने शपथ घेऊन १० दिवस झाले नव्हते आणि त्यांचा performance जज करणारा धागा तयार झाला होता . यावेळेस शपथविधी झाल्यावरच धागा तैयार होईल बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 10:33 नवीन
केजरीवालांनी मागील वेळी शपथविधी झाल्यावर काही मिनिटातच प्रत्येक घरी प्रति महिना २०,००० लिटर मोफत पुरविण्याची घोषणा केली होती आणि लगेचच दुसर्‍या दिवशी वीजबिलात सवलत जाहीर केली होती. जो मुख्यमंत्री इतक्या वेगात निर्णय घेतो त्याच्या निर्णयांची समीक्षा वेगात होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
क
कपिलमुनी Tue, 02/10/2015 - 12:28 नवीन
बहुधा काळे धन परत आणून काही भाजपेयींच्या अकांउंटमध्ये जमा केले आहे वाटतं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुधीर Tue, 02/10/2015 - 09:31 नवीन
भाजप मधले इतर दबलेले गट आता जास्त सक्रीय होतील. "पूर्ण बहुमत" हा आजकालचा ट्रेंड आहे का? का आघाडी/युती ला लोकं कंटाळले आहेत? विरोधी पक्ष असा काही राहतच नाही. मला अजूनही हा प्रश्न पडलाच आहे "फेवरेट पार्टीचा" उमेद्वार सरसकट निवडून देण्याचे फायदे-तोटे काय आहेत?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/10/2015 - 09:51 नवीन
महाराष्ट्र व काश्मिरकडे बघून असा ट्रेंड वगैरे असेलसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
क
क्लिंटन Tue, 02/10/2015 - 09:58 नवीन
"पूर्ण बहुमत" हा आजकालचा ट्रेंड आहे का? का आघाडी/युती ला लोकं कंटाळले आहेत?
हो असे दिसते.गेल्या काही वर्षात पूर्ण बहुमत मिळायचा कल वाढलेला दिसतो.अगदी उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही मतदारांनी २००७ आणि २०१२ मध्ये एका पक्षाला निर्विवाद पूर्ण बहुमत दिले होते.
मला अजूनही हा प्रश्न पडलाच आहे "फेवरेट पार्टीचा" उमेद्वार सरसकट निवडून देण्याचे फायदे-तोटे काय आहेत?
"फेवरेट पार्टीच्या" नावावर दगड जरी उभा राहिला त्याला निवडून देणे ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे.महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अनेक उमेदवारांना उभे केले होते.आआपनेसुध्दा ७० पैकी १० उमेदवार इतर पक्षांतून आयात केलेले होते.यातून राजकारणातील संधीसाधूपणाला नक्कीच चालना मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
म
मित्रहो Tue, 02/10/2015 - 10:20 नवीन
"फेवरेट पार्टीच्या" नावावर दगड जरी उभा राहिला त्याला निवडून देणे ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे
हे पटत असले तरीही असे नाही केले तर त्रिशंकू परिस्थिती येते त्याचे दुष्परिणाम बघितलेलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
पिंपातला उंदीर Tue, 02/10/2015 - 11:22 नवीन
दिल्लीतील यशाबद्दल केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी देशभरातून फोन खणखणत असताना काही फोन लक्ष्यवेधी ठरले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत दुय्यम स्थान मिळालेल्या शिवसेनेकडून केजरीवाल यांचे खास अभिनंदन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केजरीवाल यांना फोन केला व त्यांच्या भरघोष यशाबद्दल अभिनंदन केले. ट्विटरवर ही माहिती देताना 'एक वर्ष सत्तेशिवाय काढल्यानंतर दिल्लीकरांनी आपल्याला हवा तोच पर्याय निवडला आणि 'आप'ला भरभरून यश दिले...दिल्लीचेही अभिनंदन', असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेना-भाजप युती तुटताना त्याचे खापर आदित्य यांच्यावर फोडणाऱ्या भाजपला हा चिमटा तर नाही ना, अशी शंका घ्यायला या अभिनंदानाने पूर्ण वाव आहे. सोर्स - महाराष्ट्र टाईमस महारश्त्र्म
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा