Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते

स
सांगलीचा भडंग
Wed, 02/18/2015 - 22:16
🗣 166 प्रतिसाद
अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात . त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ? १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ? आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ? २.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ? साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ? ३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ? सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही . तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ? आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ? ४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ? तुम्हाला काय वाटते ?

प्रतिक्रिया द्या
37960 वाचन

💬 प्रतिसाद (166)
स
स्रुजा गुरुवार, 02/19/2015 - 01:28 नवीन
नंबर ३ आणि ४ वर सगळ्यांची मतं वाचायला आवडतील. माझी मतं अजून तयार नाहीत या मुद्द्यांवर.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/19/2015 - 03:54 नवीन
मला वाटते भारतीय सॉफ्टवेयर उद्योग सुद्धा उत्क्रांत होईल, आधी फ़क्त कोड बेस्ड आउटसोर्सिंग असणारा हा व्यवसाय होता, इंफोसिस फिनाकल घेऊन आले तेव्हा पासुन बहुदा "प्रोडक्ट" बेस्ड सॉफ्टवेयर डेवलपमेंट सुरु झाली, आजमितिस भारताचा सॉफ्टवेयर धंदा हा "कोड updating" अन कोड एनहांसमेंट चा होता तो आता ओरिजिनल सोर्स कोड्स मेकिंग पर्यंत जाईल असे वाटते (मी सरकारी नोकर आहे साधा, माझे अंदाज हे एका प्रतितयश सॉफ्टवेयर कंपनी मधे सीनियर सॉफ्ट असलेल्या एका मित्राच्या व्यु वर आधारले आहेत, ते बरोबर असावेतच असा आग्रह नाही जाणकार लोकांनी मला चुकलो तिथे दुरुस्त करावे)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 04:47 नवीन
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ? आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?
सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. तुम्ही मॅनेजर झालात म्हणुन शिकायचं बंद थोडीचं होणारे? लागणारी कौशल्यं बदलतील. प्रत्यक्ष टेक्निकल कामामधे लागणार्‍या गोष्टींची त्या त्या मॅनेजरला माहिती हवीचं. मी एका दुसर्‍या धाग्यावर एच.आर. विषयी एक प्रतिसाद लिहिला होता तोचं इथे लिहितो. जर तुम्हाला तुमच्या हाताखालच्या किंवा सहकारी लोकांकडुन नेमकं काय अपेक्षित असेल आणि ते काम कसं करायचयं हेचं माहिती नसेल तर तो मॅनेजर एक चांगला "लीडर" होउचं शकतं नाही. आय.टी. विषयी माहिती नाही जास्तं पण बहुतेक हे सर्वचं क्षेत्रांना लागु पडावं.
२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ? साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?
णो आयडीया. आयटीवाला नसल्याने आयटी क्षेत्रामधल्या पगार सोडुन बाकीच्या गोष्टींची माहिती नाही =))
४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात आहे. जर अजुन स्पर्धा निर्माण झाली तर आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही. कमी पगारात राबवुन घ्यायचा जो फंडा (तु नही तो कोई और काम करेगा इस्से कम दाम मे दृष्टीकोन) मेकॅनिकल इंडस्ट्रीमधे गेल्या काही वर्षांमधे सुरु झालाय तोचं तिकडेही सुरु होईल बहुधा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 06:30 नवीन
स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात आहे. जर अजुन स्पर्धा निर्माण झाली तर आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही
म्हणजे तुझ्यामते आयटी हमालांचं अजून शोषण चालू झालेले नाही??? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 08:44 नवीन
माहित नाही रे. माझे आयटीवाले मित्र तर कायम खुश असतात. कमीत कमी कटकटी तरी करतं नाहीत. सो आय्ड्या नै बॉ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सांगलीचा भडंग गुरुवार, 02/19/2015 - 09:04 नवीन
शोषण सध्या चालू नसले तरी आधी बर्याच सवलती होत्या त्या हळू हळू काही हॊउ लागतील . सध्या शनिवार - रविवार सुट्टी असते पण काही काळाने हे बंद होईल . कामाचे तास वाढतील ( ओफ़िशिअल ), हा आत काही लोकांना हे शोषण वाटू शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मदनबाण गुरुवार, 02/19/2015 - 07:51 नवीन
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ? हे प्रत्येकालाच शक्य होइल असे नाही ! प्रत्येकाची परिस्थीती ही वेगळी असते आणि त्यामुळे एखाद्याला जी गोष्ट जमेल ती दुसर्‍याला देखील जमेल असे नाही. अनेक वर्ष सातत्याने ताणात / हायपर टेंशन मधे काम करण्याने तसेच शिफ्ट मधे काम केल्याने प्रचंड प्रमाणात मेमरी लॉस होतो,तसेच फिजीकल फिटनेस राहत नाही याचा सुद्धा परिणाम नविन टेक्नॉलॉजी शिकताना होतो. २.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ? अजुनही आपल्या इथे बरेचसे काम हे सपोर्ट चे होते. परंतु हे ठेवुन सुद्धा इतर अनेक क्षेत्र आहेत जिथे प्रचंड वाव आहे. हिंदूस्थानच्या आयटी इंडस्ट्रीला ४० पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अ‍ॅव्हरेज आयटी हमालाचे वय हे ३५ आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ही इंडस्ट्री वयस्य हमालांनी त्रस्त आहे ! कॉल सेंटर / बीपीओ नंतर आयटी इंडस्ट्रीत वयाचा क्रायटेरिया, जॉब बदलण्याचा ट्रेंड हा वेगवान आहे. येणारा काळ लक्षात घेता अनेक आयटी प्रोफेशनल्स वरती {ज्यांचे वय ३५ आणि अधिक आहे } पिंक स्लीपची तलवार चालवली जाईल असे वाटते ! यात मुख्यत्वे दोष कोणाचा ? कंपन्या त्यांच्या नफा पाहणारच ! परंतू त्यांनी नफा पाहताना त्यांच्या कंन्स्ल्टंट साठी काही विशेष मेहनत घेतली आहे असे फार कमी वेळा आणि ठराविक कंपन्यां मधेच हे झालेले दिसुन येइल. येणारा काळ हा डेटा मॅनेजमेंट / इन्फरमेशन मॅनेजमेंटचा असेल. ३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ? अत्यंत कठीण प्रश्न ! मुळात तो रिटायर होइ पर्यंत त्याला कंपनीने कामावर ठेवलेले असेल का ? हा मुख्य प्रश्न आहे ! ४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ? मुळात आपल्या कंपन्यांनी विदेशी कंपन्यांना तुम्ही द्याल त्या पेक्षा कमी किंमतीत कामे करुन देउ ही घाणेरडी सवय इतके वर्ष लावुन ठेवली आहे. आम्ही दर्जेदार काम करु आणि त्या दर्जानेच पेमेंट केले जावे आणि दर्जा उत्तम ठेवल्यास तुमचे काम हिरावुन घेण्याचा धोका नक्कीच कमी होइल. आयटी इंडस्ट्रीला त्यांचा माईंड सेट आधी बदलण्याची गरज आहे ! @ स्पॅरो मामा जर तुम्हाला तुमच्या हाताखालच्या किंवा सहकारी लोकांकडुन नेमकं काय अपेक्षित असेल आणि ते काम कसं करायचयं हेचं माहिती नसेल तर तो मॅनेजर एक चांगला "लीडर" होउचं शकतं नाही. आय.टी. विषयी माहिती नाही जास्तं पण बहुतेक हे सर्वचं क्षेत्रांना लागु पडावं. पूर्णपणे सहमत, परंतु उत्तम स्कील सेट असणार्‍याकडे उत्तम मॅनेजमेंट स्कील असेलच असे नाही हे देखील लक्षात ठेवायला हवे. आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही. कमी पगारात राबवुन घ्यायचा जो फंडा (तु नही तो कोई और काम करेगा इस्से कम दाम मे दृष्टीकोन) मेकॅनिकल इंडस्ट्रीमधे गेल्या काही वर्षांमधे सुरु झालाय तोचं तिकडेही सुरु होईल बहुधा. आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष चालु आहे, परंतु या क्षेत्राला "युनियचे" संरक्षण नाही ! कामाच्या ताणाने / स्वरुपाने आयटी प्रोफेशनल्सच्या पर्सनल लाईफची आणि हेल्थची पार वाट लागली आहे ! हाय ब्लड प्रशर, हार्ट प्रॉब्लेम, मेंटल डिसऑर्डर तसेच ड्र्ग्स अ‍ॅडिक्शन मधे अडकणे आहेच. आयटी प्रोफेशनल्सचा पगार अनेक जणांना जास्त वाटतो, परंतु ज्या पटीत ते कंपनीला कमवुन देत असतात त्या मानाने तो काहीच नसतो... निदान सध्याच्या काळात तरी हेच चित्र आहे. बरेचसे आयटीवाले अगदी रोबोटिक लाइफ जगतात ! राहत्या जागेच्या भाड्यापोटी महिन्याला १२-१५ हजार तसेच खाण्या-पिण्यावर खर्च धरल्यावर हातात उरणारा पगार हा फारच कमी असतो. काही वाचनिय दुवे :- Once the preserve of youth, IT staffing enters middle age A New Trend of Suicides in India Why Bangalore is India's suicide capita India: High Tech Mirage ‘डिजिटल अंधार युग’ येणार?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 08:52 नवीन
@मदनभाचा: सहमत. पण जर फायनान्शिअल स्टेबिलीटी, ग्रोथ आणि जॉब सिक्युरिटीचा विचार केला तर आयटी सारखं क्षेत्र नाही. ह्यापैकी जॉब सिक्युरिटी हा मुद्दा हल्ली डळमळीत व्हायला लागलाय हे खरं, पण अगदी गाळं क्वालिटी, कशीबशी पास झालेली, कंपनीमधे दुसर्‍याकडुन कामं बिनदिक्कतं करुन घेणारी लोकंसुद्धा आयटीमधे जाउन ऐटीतं रहातात. आणि त्यांच्या मुळे चांगले आणि डिझर्व्हींग उमेदवार मागे पडतात. हे थोडं अवांतर झालं बाकी एक घटना व्यनि करुन सांगीन किंवा आपल्या गृपावर टाकतो. हा द रा ल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/19/2015 - 09:04 नवीन
टाका इथेच. आमालाबी हा द र ण्या त लय विंट्रेष्ट हाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मदनबाण गुरुवार, 02/19/2015 - 09:21 नवीन
ह्यापैकी जॉब सिक्युरिटी हा मुद्दा हल्ली डळमळीत व्हायला लागलाय हे खरं, पण अगदी गाळं क्वालिटी, कशीबशी पास झालेली, कंपनीमधे दुसर्‍याकडुन कामं बिनदिक्कतं करुन घेणारी लोकंसुद्धा आयटीमधे जाउन ऐटीतं रहातात. आणि त्यांच्या मुळे चांगले आणि डिझर्व्हींग उमेदवार मागे पडतात. काही अंशी सहमत... परंतु मागच्या फायनॅनशिअल क्रायसिस नंतर आयटी इंड्रस्ट्रीची पुंगी वाजली ती अजुन तशीच आहे ! दुसर्‍या कडुन काम करुन घेणे हे सुद्धा स्कील सेट आहे बरं का ! ;) पण काही काळाने ते अंगाशी येउ शकते.कंपन्याना आता आयटी हमाल नकोत तर आयटी माथाडी कामगार हवेत ! त्यामुळे गाळं क्वालिटी भरली गेली तर जवाबदार कंपनीच नाही का ? ती घटना इथे टाका बिनधास्त ! वरती एक्का काका आहेच काय झाल तर प्रतिसाद संपादित करायला तप्तर ! :) बाकी हल्ली आयटीचा विषय आला की काय ठावूक मला माझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारणारे एक गॄहस्थ { माझ्याच कंपनीतले एक मॅनेजर } आठवतात ! अगदी कमी वयात ब्रेन हॅमरेज ने गेले ते ! :( Dr P Satish Chandra is the director of India’s National Institute of Mental Health and Neurosciences. He says the pressures on young IT workers can sometimes become intolerable. “Expectations from the young professionals are very high - the demands from their jobs is very high. In the early years, they may be able to handle the challenge but as the time passes their needs are different, their family needs are different; with this in mind, what happens is, the pressure mounts.”

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मदनबाण Fri, 05/12/2017 - 16:40 नवीन
आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष चालु आहे, परंतु या क्षेत्राला "युनियचे" संरक्षण नाही ! Layoffs in IT companies: Is it time for trade unions to come into play? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys defers salary hikes till July; no job cuts planned IT cos had firing list ready 5 years back Techie, and worried about layoffs? These 20 skills can help you stay relevant
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
उ
उदय Fri, 05/12/2017 - 19:40 नवीन
"युनियनचे" संरक्षण नाही >> अतिशय योग्य. युनियन आली की कंपन्या काँपिटिटिव्ह राहू शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विटेकर गुरुवार, 02/19/2015 - 06:38 नवीन
अर्थाचे दोन प्रकार आहेत १. मुख्य अर्थ २. गौण अर्थ मुख्य अर्थ म्हणजे जिथे संपत्ती निर्माण होते असे निर्माण करण्याचे काम... प्रत्यक्ष वस्तु उत्पन्न होतात ..शेती अथवा वस्तुंचे उत्पादन गौण अर्थ म्हणजे उत्पादित वस्तूंचे अथवा शेतीमालाचे कृत्रिम रित्या मूल्यवर्धन ! दलाली , सेवा या गोष्टी म्हणजे गौण अर्थ होय. मुख्य अर्थ निर्माण करनारी यंत्रणा कायमस्वरुपी आणि जगाच्या हिताची असते . गौण अर्थ बाजारपेठ मध्यवर्ती ठेऊन निर्माण होत असतो. बाजारपेठ ही सतत बदलणारी असते आणि म्हणूनच गौण अर्थ हा सतत खाली- वर होत असतो. काही दिवस वकिलांची चलती होती .. मग मेक्यानिकल इन्जिनीयर आणि आता आय टी ... चालायचेच ! फक्त मुख्य अर्थ वाल्यांना जगात मरण नाही ! .
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग गुरुवार, 02/19/2015 - 08:58 नवीन
मुंबई मधल्या ज्या कापड गिरण्या बंद झाल्या तिथे पण वस्तु उत्पादन होत होते . त्या पण काळाच्या मागे बंद पडल्या . जास्त ऑटोमेशन मुले कामगार लोकांची गरज कमी झाली त्यामुळे मुख्य अर्थ किव्वा गौण अर्थ असा काही नसेल पण ज्या वेळी ज्या क्षेत्राची चलती आहे तिथे जास्त पैसा मिळणार . प्रत्तेक क्षेत्रामध्ये चढ उतार असणारच . बेंक , टेलेकोम कंपनी , विमा क्षेत्र , माल वाहतूक हे तुमच्या म्हणण्या प्रमाणे गौण अर्थ मध्ये येत असतील पण सध्या ग्लोबल एकोनोमि आणि मुक्त व्यापार व्यवस्थेमध्ये हि क्षेत्रे फार महत्वाची आहेत . म्हणजे समजा भारतात टोमेतो चे उत्पादन बरेच होते आणि ते निर्यात करायचे असतील तर वाहतूक , साठवण , कस्टमर मिळवणे या गोष्टी वर बराच खर्च येऊ शकतो ....म्हणजे मरण सगळ्यांना आहे मुख्य अर्थ किव्वा गौण अर्थ असा काही नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
कपिलमुनी गुरुवार, 02/19/2015 - 09:21 नवीन
आयटीवाले आणि नॉन आयटीवाले हा सध्याचा सर्वात मोठी जातीभेद आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 02/19/2015 - 10:00 नवीन
मला वाटते आता यापेक्षा वेगळे क्रांतिकारक असे सॉफ्टवेअर निर्माण होण्याचे दिवस संपले आहेत. उत्पादन क्षेत्रात सी एन सी च्या रूपाने आणखी काही काळ काहीतरी बाहेर येत राहील त्याला योग्य असे सॉफ्टवेअर बनत राहील. पण जी क्षेत्रे केवळ सॉर्ट, सेपरेट अशा वर अवलंबून आहेत त्यातील स्कोप संपलेला असेल. काळजी खरी अशी आहे की येत्या काही वर्षात सुतार, शिंपी. सोनार हे धंदे पार लयाला जातील.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 12:37 नवीन
सद्ध्याही सी.एन.सी. टेक्नॉलॉजी जवळजवळ मॅचुअर लेव्हलला पोचली आहे. टुलआता माझ्या मते सायमल्टेनिअस मशिनिंग मधे जास्तं शोधं लागायला हवेत. पाथ ऑप्टिमायझेशन आणि स्मार्ट मशिनिंग मधे जे काय बदल होतील तेवढेचं. आणि ३-डी प्रिंटर मधे सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सोत्रि गुरुवार, 02/19/2015 - 10:49 नवीन
वायटू के नंतरची भारतीय आयटी इंडस्ट्री काही तुरळक अपवाद वगळता प्रामुख्याने 'बॉडी शोपिंग'ह्याच प्रकाराची होती. क्लायंटला जसे कुशल प्रोग्रामर्स लागतील तसे ते पुरवायचे, असे सोप्पे मॉडेल होते. त्यात अनुभव गाठीशी आल्यावर 'मॅनेज्ड सर्व्हिसेस' असे ऑनसाईटवरच काम घेणे सुरू झाले. १९९९-२००० च्या डॉटकॉम बबलच्या बुडबुड्यातल्या झीलीयन डॉलर्सच्या नुकसानीनंतर 'ऑफशोअर' मोडेल तेजीत आले, तसे ते चालूच होते पण त्यातला फायदा आता 'अर्थ'पूर्ण झाला होता. इथून 'मॅनेजर' ही जमात भारतीय आयटी इंडस्ट्रीत तयार झाली. सुरुवातीला हे मॅनेजर्स हॅन्ड्स ऑन असावे लागायचे पण कालांतराने त्याची गरज उरली नाही आणि एका मोठ्या क्रायसिसची मुहुर्तमेढ रोबली गेली. सॉफ्टवेयर बांधणीच्या क्षेत्रात यायचे आकर्षण तर सर्वांना खुणवू लागले पण 'मॅनेजर' हे पद जास्त भुरळ पाडू लागले कारण कोडींग करायची जरजच उरली नाही मॅनेजर्सना. कसली मज्जा ना! सॉफ्टवेयर बांधणीच्या उद्योगात जायचे पण सॉफ्टवेयर बांधणीचे कामच करायचे नाही! पण जसे जसे बाजारपेठेला सॉफ्टवेयर बांधणीच्या उद्योगाची कल्पाना येऊ लागली तसा ग्राहक जागरूक होऊन कमी किमतीत सॉफ्टवेयर बांधणीची मागणी करू लागला. स्पर्धाही वाढत गेली आणि प्रॉफिट मार्जिन कमी होऊ लागले. ह्याच्यात आयटी उद्योगाने शहाणे होण्याऐवजी 'फ्रेशर्स भरती' हा स्वस्त मनुष्यबळाचा मार्ग पकडला. ह्यामुळे 'मॅनेजर' हे प्रस्थ आणखिणच गब्बर झाले. ह्या सर्वामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री ही खर्‍या अर्थाने 'अ‍ॅक्चुअल सॉफ्टवेयर बांधणी'च्या विभागात पुढे गेलीच नाही (काही तुरळक अपवाद वगळता). त्यामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री 'टॉप हेवी' होऊन ओव्हरहेड्स वाढत गेले. मोड्यूल लीड, टीम लीड, प्रोजेक्ट लीड, मॅनेजर, सिनीयर मॅनेजर, ग्रुप मॅनेजर... हे काय आहे? कोडींग कोण करणार? अनुभव वाढला की कोडींग करण्याची मॅच्युरीटी वाढते पण इथे मॅनेजर बनून कोडींग करायचेच नाहीयेय, अशी आजची स्थिती आहे! आता परदेशी कंपन्यांना भारतातच सॉफ्टवेयर बांधणीचे दुकान उघडणे सोपे वाटू लागल्याने त्या तसे करू लागल्या आहेत. त्यांना मॅनेजर्स 'नको असतात' आणि घेतले तरी ही ते हॅन्डस ऑन हवे असतात कारण त्यांनी भारतात दुकान सॉफ्टवेयर बांधणीसाठी उघडलेले असते न की 'बनियागीरी करायला'. तमाम मॅनेजर्स आणि नॉन हॅन्ड्स ऑन मंडळींसाठी (३५-४० च्या वयातील) हा 'वेकअप कॉल' समजावा. TCS चे नुकतेच झालेले ले ऑफ्स हे फक्त ट्रेलर होते. - (हॅन्ड्स ऑन) सोकाजी
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 11:18 नवीन
++११११११११११११११११११११११११ १ निरिक्षण...जर ३०+ वय असूनसुध्धा कोडींगचे काम मागितले तर लगेच शिक्का मारतात रिस्पाँसिबीलीटी नकोय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
संदीप डांगे गुरुवार, 02/19/2015 - 11:30 नवीन
अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद. मी नेहमी म्हणतो की इतके जर आपले आयटी वाले हुशार तर एक साधी ओएस का नाही बनवली आज्पतुर... बनवली असल्यास सांगावे. मला तरी म्हाइत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/19/2015 - 12:11 नवीन
कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत बांधली नसलेला सिव्हिल इंजिनियर सुपरवायझर म्हणुन चालु शकतो. ते कसे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
संदीप डांगे गुरुवार, 02/19/2015 - 12:18 नवीन
गवंडीकाम आणि कोडींग मध्ये काहीच फरक नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/19/2015 - 12:32 नवीन
तसेच कधीही कोडींग नाही केलेला माणुस मॅनेजर म्हणुन चालायला काहीच हरकत नाही. अवांतर - गवंडीकाम बरेच अवघड असते. कोडींग साठी आयटी आय काढल्या पाहीजेत, ग्रॅज्यएशन ची काही गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चिरोटा गुरुवार, 02/19/2015 - 15:49 नवीन
कोडींग साठी आयटी आय काढल्या पाहीजेत, ग्रॅज्यएशन ची काही गरज नाही.
कोडिंग कशासाठी करताय हे महत्वाचे. पे-रोल सिस्टिम बनवायला साधे कोडिंग चालेल.ट्रेडिंग सिस्टिम्,जिथे मिलिसेकंद महत्वाचा असेल तिथे कोडिण्ग पलिकडे अनेक गोष्टी माहित पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
S
sagarpdy Fri, 02/20/2015 - 19:24 नवीन
इंजिनियर पोरं येउन गलिच्छ कोड लिहितात, iti काढले तर ... कल्पनेनेच शहारे आले ! अर्थात चांगलं कोडिंग साठी डिग्री पेक्षा चांगला intuition जास्त आवश्यक आहे, हे माझं मत. (http://www.paulgraham.com/knuth.html) ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती जमते असे नाही.ज्यांना नाही जमत ते लवकरात लवकर मॅनेजर होण्याच्या घाईत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ट
टवाळ कार्टा Fri, 02/20/2015 - 20:32 नवीन
ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती जमते असे नाही.ज्यांना नाही जमत ते लवकरात लवकर मॅनेजर होण्याच्या घाईत असतात.
प्रचंड सहमत...पण त्यापेक्षा महत्वाचे आहे सोल्यूशन डिझाईनींग साले ८०% लोक ठिगळे लावण्यात धन्यता मानतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
अ
अत्रन्गि पाउस Fri, 02/20/2015 - 20:46 नवीन
हि कला आहे हे सत्यच बरेच लोक मान्य करत नाहीत ..त्यामुळे रचतात विटेवर वीट ...उडाला तर पक्षी ..बुडाला तर बेडूक .सोल्युशन डिझाईन ह्यासाठी आपल्या लोकांना नं वेळ नं धीर ...अर्थात सकाळी रुपया गुंतवला तर संध्याकाळी सव्वा रुपया निघाला नाही तर 'समदा घाटा' ह्या मानसिकते मधे व्यवसाय करणाऱ्यांना ह्यात फार वावगे वाटत नाही ... अर्थात हे फक्त आयटी नाही बरे का ... रस्ते/ बिल्डिंगा /कुठलीही सिस्टीम घ्या हे असेच दिसेल ... साधे उदाहरण घ्या ठाण्याचा माजिवडे नाका ते कॅडबरी सिग्नल हा पट्टा बघा ... १. माजिवडे नाक्याला मुंबई कडे जातांना जी वळणे घ्यावी लागतात ती अतिशय संतापजनक आहेत ...ती वळणे घेऊन हायवे ला लागावे तर उजवीकडून येणारा फ्लायओव्हरवरून येणारी वाहने कडकडून भेटायला आल्यासारखी ... २. पलीकडे ज्युपिटर हॉस्पिटल, एका बाजूला उच्चभ्रू हॉटेल दुसर्या बाजूला प्रचंड व्हीव्हीयाना मॉल ...ह्या सगळ्या इमारतीतील मिनिटाला डझनावारी वाहने आतबाहेर करतात ती इवल्याश्या सर्व्हिस रोड वर...एखादी अम्ब्युलन्स अडकली कि अडकली ... जाऊ देत उगीच डोक फिरवून घेण्यात अर्थ नाही ...:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मदनबाण Sun, 02/22/2015 - 09:50 नवीन
ठाण्याचा माजिवडे नाका ते कॅडबरी सिग्नल हा पट्टा बघा ... १. माजिवडे नाक्याला मुंबई कडे जातांना जी वळणे घ्यावी लागतात ती अतिशय संतापजनक आहेत ...ती वळणे घेऊन हायवे ला लागावे तर उजवीकडून येणारा फ्लायओव्हरवरून येणारी वाहने कडकडून भेटायला आल्यासारखी ... २. पलीकडे ज्युपिटर हॉस्पिटल, एका बाजूला उच्चभ्रू हॉटेल दुसर्या बाजूला प्रचंड व्हीव्हीयाना मॉल ...ह्या सगळ्या इमारतीतील मिनिटाला डझनावारी वाहने आतबाहेर करतात ती इवल्याश्या सर्व्हिस रोड वर...एखादी अम्ब्युलन्स अडकली कि अडकली ... जाऊ देत उगीच डोक फिरवून घेण्यात अर्थ नाही ...:( अगदी ! पेव्हर ब्लॉकचे रस्ते म्हणजे तुमच्या सुंदर रस्त्यांच्या स्वप्नाला लागलेला शाप आहे ! शरीरातली हाडं आणि हाड हलण म्हणजे काय ? याचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे अवश्य यावे. या हायवेजवर लोकांसाठी स्कायवॉक जवळपास कुठेच नाही. लोकांना हायवे क्रॉस करताना पाहताना हल्ली फारच भिती वाटते... सर्व वयोगटातील लोक असा जीव घेणा प्रकार रोज करतात ! मला रोजचा हा प्रवास म्हणजे रोजचा मॄत्युशी लढाच वाटतो. रस्ते कसे बांधतात याची कप्लनाच इथल्या राज्यकर्त्यांना ठावूक नाही आणि ती सामान्य जनतेला ते अनभवु देखील देणार नाहीत.हिंदूस्थानात उत्तम पद्धतीचे नुसते रस्ते जरी बांधलेत तरी सुद्धा देशाची उत्तम प्रगती होउ शकते... असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jiya Re... - { Jab Tak Hai Jaan }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/22/2015 - 09:54 नवीन
सहमत बाणा.... ह्या छपराडांना रस्त्यावरुन चालायला लागायला पाहिजे मग समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/22/2015 - 10:00 नवीन
सहमत ! पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता केवळ स्वतःच्याच प्रगतीतच रस असलेल्या राजकारण्यांना सोडून देशाच्या प्रगतीत रस असलेल्या राजकारण्यांना मते द्यायला सुरुवात करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नितिन थत्ते Sun, 02/22/2015 - 16:40 नवीन
आता दिली ना यंदा मतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/22/2015 - 19:55 नवीन
थांबा, थांबा साहेब. तुमचे घोडे आताच उधळवून नका. इतकी घिसाडघाई करणे हा आमचा स्वभाव नाही जनतेने नक्की योग्य प्रकारे मत दिले की नाही हे भविष्यच ठरवेल. कारण... "भूतकाळात सतत अपेक्षाभंग झालेला असताना आंधळेपणे कोणाचीही पाठराखण करण्यापेक्षा किंवा कोणाचाही सतत आंधळा विरोध करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांवर काय कारवाई होत आहे आणि त्याचे योग्य कार्यकालात योग्य ते परिणाम झाले की नाही हे उघड्या डोळ्यांनी पाहून आपले मत ठरवणेच शहाणपणाचे असते." असे आमचे ठाम मत आहे. या सर्वामधे पक्ष आणि व्यक्ती गौण असतात... जमिनीवरचे वट्ट काम महत्वाचे असते. आम्हाला कोणताही रंग अथवा झूल पेहेनण्याचा शोक नाही हे तुमच्या ध्यानात आलेले दिसत नाही... तेव्हा असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ह
हाडक्या Tue, 02/24/2015 - 16:44 नवीन
सहमत.. त्याचबरोबर.. दिलीत ना मतं ? "मग आता भोगा फळं" किंवा "आता गप्प बसा आणि त्यांना काम करु द्या" हे दोन्ही गजर मान्य नाहीत. मतं देऊन कर्तव्य संपलं किंवा मत दिलय म्हणून त्यांनाच समर्थन द्यायची नैतिक जबाबदारी वगैरे देखील मान्य नाही. थोडक्यात, या सर्वामधे पक्ष आणि व्यक्ती गौण असतात... जमिनीवरचे वट्ट काम महत्वाचे असते.
आम्हाला कोणताही रंग अथवा झूल पांघरण्याचा शोक नाही हे तुमच्या ध्यानात आलेले दिसत नाही... तेव्हा असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नितिन थत्ते Tue, 02/24/2015 - 19:11 नवीन
>>जनतेने नक्की योग्य प्रकारे मत दिले की नाही हे भविष्यच ठरवेल. कारण... म्हंजे, मत देताना योग्य की अयोग्य ठरवायचा मार्गच नाही म्हण्टा? नेहमीच ट्रायल एरर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/24/2015 - 19:47 नवीन
थत्ते साहेब, पूर्वानुभव म्हणूनही काही गोष्ट असतेच, तो चांगला अथवा वाईट कसाही असू शकतो. मानवाने आपली बुद्धी वापरून त्याचा उपयोग पुढची कृती ठरवण्यासाठी करायचा असतो, हे विसरून कसं चालेल ? शिवाय, कधी कधी निवड करताना, "दगडापेक्षा वीट मऊ" हा वाक्प्रचार कामी येतो. पण तरीही, वस्तुस्थितीमध्ये, भविष्यातला दर अनुभव "भूतकालातला चांगला अनुभव भविष्यात तसेच घडेल अशी शास्वती देत नाही." अश्या लिखीत-अलिखीत संवैधानिक इशार्‍यासह येतो. त्यामुळे अगदी पूर्ण विश्वास ठेऊन मत दिले असले तरी, निवडलेल्या नेत्याचे प्रामाणिक परिक्षण चालू ठेवायचे असतेच, किंबहुना तो पक्ष्/नेता आपला अगदी आवडीचा असला तरी आणि अगदी तो पक्ष/नेता शतकभर अथवा जास्त आस्तित्वात असला तरी ! हे न केल्यास लोकशाही संपून सरंजामशाही सुरू होते याची पैशाला पासरी उदाहरणे दिसतील... फक्त फक्त डोळे उघडून आजूबाजूला प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे... बस्स ! लोकशाहीतसुद्धा कोणत्याही पक्ष/नेत्याच्या पायावर आपली सर्व बुद्धी अर्पण करून आंधळेपणाने वागायचे नसते ही समज काहींना असते, काहींना नसते. नसल्यास, असे लोक आपला मार्ग चुकला हे ध्यानात आल्यावरही ते नाकारत राहतात, पूर्वीचाच हट्ट चालू ठेवतात, माझा (चुकलेला) मार्गच बरोबर आणि इतर सर्व झूट आहे असे म्हणत राहतात. याला मानसशास्त्रात "डिनायल मोड" असे म्हणतात. अर्थात तुमचे पूर्वीचे लिखाण बघता तुम्हाला हे सगळे पटेलच असे नाही. पण तरीही मी "अत्यंत आशावादी" असल्याने वरचा संवैधानिक इशारा जितका राजकारणात लागू पडतो तितकाच माणसाच्या व्यक्तीगत गैरसमजूतींनाही लागू पडतो असे मानतो. म्हणूनच केवळ हा खटाटोप ! इतकेच. बाकी चालूद्या ! या धाग्यात झाले तितके अवांतर खूप झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
वेल्लाभट Tue, 02/24/2015 - 12:50 नवीन
एकदम अ‍ॅग्रीच म्हणजे. विवियाना ला परवानगीच कशी दिली कळत नाही. असो. ठाण्यात कुठेशी आपण? सहज हं. मी नौपाड्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अत्रन्गि पाउस Tue, 02/24/2015 - 17:28 नवीन
जन्म गेला हो त्या नौपाड्यात व्य णी करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ख
खटपट्या Wed, 02/25/2015 - 07:43 नवीन
शालेय जीवन नौपाड्यात घालवले. बरे वाटले, कोणीतरी आहे नौपाड्याचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
म
माझीही शॅम्पेन Sun, 03/01/2015 - 08:06 नवीन
विवियाना ला परवानगीच कशी दिली कळत नाही
आम्ही विवियाना मध्ये पडीक असतो त्यामुळे आम्हाला हि नाही आवडत अस कोणी विचारलं कि :) अम्बुलंस जुपिटर मध्ये घुसण्याची जबाबदारी जुपिटर वर पण आहे , त्यांना मागच्या बाजूने सहज गेट उघडू शकतात पण ते तस करत नाहीत दुसरी गोष्ट जुपिटर दुचाकी वाहनांना काही अतर्क्य कारणाने प्रवेश नाकारते (पार्किंग साठी) ते सर्व दुचाकी वाले विवियाना मध्ये पार्क करतात तिसरी गोष्ट साधारण उच्च मध्यम वर्गासाठी असलेल हे इस्पितळ बाहेरच्या चारचाकी वाहनांना फार कमी प्रमाणात पार्किंग करून देत , ते सर्व विवियाना पैसे मोजून पार्किंग करतात , तेंव्हा आमच्या विवियानाच्या नावाने बोंबलू नका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 02/21/2015 - 03:31 नवीन
५००००% सहमत रे टका. खरं तर चुका ह्या दुरुस्तं केल्या पाहिजेत. हल्ली सगळ्यांचा कल त्या झाकुन ठेउन वरवरच्या गोष्टी चकाचक ठेवण्यावर असतो. वेळ मिळाला तर एक जिलबी होंडाच्या व्हाईट अटायर पॉलिसीवर टाकीन. तुमच्या कपड्यावर शॉप फ्लोअर वर ऑईल चा डाग दिसला तर कुठेतरी काहीतरी चुकतयं. ती गोष्ट दुरुस्तं केल्याशिवाय पुढे कामं होतं नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रन्गि पाउस Mon, 02/23/2015 - 17:54 नवीन
बराय तिथे खालील वाक्ये म्हणणारे कुणी एतद्देशीय नाहीत .. -चाय्यला एक डाग पडला तर काय झाले -साला आता तो जप्पू पिडेल ..@#$त प्रोदक्षान चा @#$@#...साला xxxx लाखचा नुकसान -तो डाग पडला म्हणजे ३ मिली ओईल वेस्ट ..साला नुकसान...तुझ्या बापाने आणला का रे वेस्ट करायला ओईल .. -हा साला मालक पण xत्या आहे .. ऑटोमोबाईल प्रोडक्सन लाईन मध्ये कवा सफेद कपडा घालते के ?? -साला कलसे एक स्पेयार शर्ट रखो रे बाबा ऐसा कूच हुअवा तो फटाफट बदली कर ने ...वो सस्ता गिरेगा... . . . . ये जपानी प्रोसेस वाले साले बेपारी लोग ला लय सतावते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 18:21 नवीन
=)) खरयं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 18:35 नवीन
फार चुकीची उदाहरणे...ही वाक्ये भारतातील कोणत्याही भाषेत खपून जातील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 02/21/2015 - 09:08 नवीन
उत्तम सोल्यूशन डिझाईनींग... "वापरण्यासाठी कमीत कमी प्रशिक्षणाची जरूरी असलेली आणि कमीत कमी श्रम, वेळ व वित्त खर्च करून वापरणार्‍याला जास्तीत जास्त अपेक्षित साध्य साधून देणारी प्रणाली म्हणजेच उत्तम संकल्पना असलेली प्रणाली (well-designed solution). उत्तम संकल्पना असलेल्या प्रणालीच्या मागे किती का किचकट तंत्रज्ञान असेना, त्याचा वापरणार्‍याला त्रास व्हायला नको, किंबहुना ते त्याला दिसले/समजले नाही तरच बेहत्तर !" (A well-designed solution is the one that allows user to extract the highest level of the expected benefits after the least amount of training; and with the least expense of time, effort and money. A well-designed solution does not bother or even expose the user to the technological excellence and efforts that may have been employed to construct it.) अर्थातच, उत्तम संकल्पना असलेली प्रणाली तयार करणे येरागबाळ्याचे काम नोहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अमेरिकन त्रिशंकू Sat, 02/21/2015 - 14:27 नवीन
मधे कधीतरी अ‍ॅपल आयपॅड्बद्दल एक कथा ऐकली होती. खरंखोटं माहित नाही. अ‍ॅमेझॉनच्या जंगलतील आदिवासींच्या ५-६ वर्षाच्या मुलांना - ज्याना आधुनिक तंत्रज्ञानाचा अजिबात गंध नाही - आयपॅड्स खेळायला हातात दिली. पाच मिनिटाच्या आत सर्व मुलं त्यावर गेम्स खेळू लागली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Sat, 02/21/2015 - 14:37 नवीन
हे अमेरिकन काहीही पिल्लू सोडुन देतात आणि जग त्यावर आंधळा विश्वास ठेवतं. पहील्यांदा हाती घेतल्यावर काहीच माहीत नसतांना कुठलीही प्रणाली लिलया हाताळणं हे अचाट बुद्धिचे काम आहे. असं असतं तर सामान्य वयस्कर मंडळींना अजिबात कष्ट न पडते ते शिकायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू
ट
टवाळ कार्टा Sat, 02/21/2015 - 15:33 नवीन
अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात हुशार अस्तात हे मान्य पण...
असं असतं तर सामान्य वयस्कर मंडळींना अजिबात कष्ट न पडते ते शिकायला.
लहान मुलाला काही नविन नवीन गोष्ट दाखवायला गेलो की ती वस्सकन बोलत नाहीत "ह्या...ठेव तो तुझा आयपॅड-फायपॅड बाजूला...आयपॅड नस्ताना सुध्धा आम्ही संसार केलेच ना....कुठे काही अडलं?" मुद्दा इतकाच की लहान मूल जे शिकवाल ते शिकते कारण त्यांच्यात इगो, मानापमान याची जाणिव नस्ते या जाणीवा जशा जशा वाढतात तशी तशी शिकण्याची कुवत कमी होत जाते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 02/21/2015 - 16:36 नवीन
अगदी सहमतं. शिवाय लहान मुलांना नवीन गोष्ट म्ह्णलं की आधी त्यांची उत्सुकता जागी झालेलीचं असते. त्यातं मग जर संगणक किंवा तत्सम वस्तु असेल तर मग विचारायलाचं नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
संदीप डांगे Sat, 02/21/2015 - 20:34 नवीन
लहान मूल जे शिकवाल ते शिकते हाच मुद्दा आहे टकाभाऊ, प्रश्न आयपॅड कित्ती उपभोगकर्ताभिमुख (user friendly) आहे याचा टेंभा मिरवण्याचा आहे. त्यासाठी ते उदाहरण देतात आदिवासी मुलांचे. म्हणजे त्यांचा मेंदू शहरी लोकांच्या तुलनेत तंत्रज्ञान वापरण्याच्या बाबतीत कमी आहे हा एक यांचा अहंगंड. तर 'त्यांनाही' आमचे आयपॅड वापरता येते म्हणजे बघा कित्ती कित्ती सोपे आहे. त्या मुलांना टेपरेकॉर्डर पासून बंदूकीपर्यंत, सायकलपासून रणगाड्यापर्यंत काही दिले तरी ते पाच मिनिटांत चालवायला शिकतील. आमच्या शेजारच्या चार वर्षाच्या चिमुरड्याने घरासमोर उभी असलेली गॅससीलेंडरची तीनचाकी गाडी उभ्याउभ्या पाच मिनिटांत सुरु करून चांगली ६०-७० फूट पळवली ते स्वत:च्या डोळ्यांनी पाहीले आहे. दुसरा वयाचा प्रश्न. सामान्यतः विशिष्ट वयापुढे गेल्यावर शिकण्याचा उत्साह (जीवन-मरणाचा प्रश्न नसेल तर) कमी होतो. हीच आयपॅड झिडकारणारी पिढी त्यांच्या बाल्यावस्थेत, तरुणपणी रेडीओ आणि तत्कालिन तंत्रज्ञानाशी (वापरायला लवकर शिकता यावे यासाठी) कशी झटापट करत होती हे त्यांना आठवतच असेल. प्रत्येक नव्या पिढीला नवे नवे शिकायला आणि शोधायला भन्नाट आवडते. हेच सत्य, बाकी सारे मार्केटींग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 02/22/2015 - 05:38 नवीन
तुम्ही "god must be crazy" बघाच...एखादी गोष्ट आदिवासी जर ५ मिनीटांमधे शिकत असतील...ते सुध्धा त्यांचा आधुनिक जगाशी काहीही आणि कधीही संपर्क नसताना...तर ती वस्तु उपभोगकर्ताभिमुख (user friendly) आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा