आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते
अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे
ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली
अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल
ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे
वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात .
त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत
तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ?
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?
२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?
३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?
सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही .
तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ?
आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ?
४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
तुम्हाला काय वाटते ?
पाच मिनिटाच्या आत सर्व मुलं त्यावर गेम्स खेळू लागली होती."पाच मिनिटाच्या आत" ही जरा जास्तच अतिशयोक्ती झाली :) पण काही दिवस संगणक हातात आला तर पूर्वी संगणकाचा काहीही संपर्क नसलेली मुलेही कोणत्याही मदतीशिवाय त्याचा यशस्वीपणे मूलभूत वापर करू शकतात हे डॉ सुगत मित्रा नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे. ते संशोधन Hole-in-the-wall या नावाने प्रसिद्ध आहे. इ स १९९९ मध्ये दिल्लीतील त्यांचे ऑफिस आणि कालकाजी या झोपडपट्टीमध्ये असलेल्या कुंपणाच्या भिंतीत एक छिद्र पाडून त्यातून त्यांना एक संगणक टच-स्क्रीनच्या सहाय्याने वापरता येईल अशी सोय केली. काही दिवसातच त्या झोपडपट्टीतील लहान मुले तो संगणक वापरायला शिकली. हा प्रयोग नंतर अनेक ठिकाणी यशस्वीपणे केली गेला आहे. यासाठी त्यांना TED सन्मान दिला गेला आहे. अधिक माहिती इथे मिळेल."सिस्टिम चालणे" हा मला यूजर म्हणून फार दरिद्री बेंचमार्क वाटतो.सहजपणे फार भारी बोलून गेलात ! *ok* जसे : आधुनिक मानव अगदी गेल्या ८०-९०,००० वर्षांपासून करतच आला आहे. पण पहिला पायाने, मग घोड्यावरून, मग घोड्याच्या गाडीतून, मग यांत्रिक गाडीने (तिची तर इतकी व्हर्शन्स झाली की सांगू नका), मग रेल्वे आली, मग विमाने उडायला लागली, आणि आतातर रॉकेट वापरून माणसाला चंद्र व मंगळावर रहायला जायची स्वप्ने पडताहेत... तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या "ट्रान्स्पोर्टेशन सिस्टीम्स"च आहेत नाही का ? पण, एकीपेक्षा तिच्या पुढची कितीतरी फरकाने वेळ-श्रम-आरामाचा फायदा करून देतात यात कोणाला संशय आहे का ? "मानवी जीवनाच्या कित्येक सर्वसामान्य गोष्टींचे झालेले ई-एनेबल्मेंट" ही मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि सर्वात जलद झालेली क्रांती आहे *... फक्त ती आपल्या डोळ्यासमोर इतकी जलद झाली आहे की आपण तिला गृहीत धरतो आहोत आणि तिची व्याप्ती सहज ध्यानात येत नाही... जसे आपल्या रोज डोळ्यासमोर असणार्या बालकाची वाढ आपल्या ध्यानात येत नाही पण दोन-चार वर्षांनी भेट देणारा पाहुण्याच्या तोंडी, "किती मोठा झालाय हा दोनेक वर्षांत?" असे वाक्य येते ! ================== * संगणक क्रांतीपूर्वीची जागतिक मानवी जीवनावर सर्वांगीण परिणाम करणारी क्रांती-- जिला आपण "औद्योगिक क्रांती" म्हणतो-- इ स १७६० ते १८४० अशी १८० वर्षे चालू होती आणि तिने जगाच्या केवळ १०% टक्के लोकजीवनात फरक पडला होता. त्याविरुद्ध, संगणकाने आपल्या जीवनात किती फरक पडला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने; अ) संगणकाचा तडक अथवा दुरान्वयाने संबंध नसणार्या किती गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ? आणि आ) त्या गोष्टी रोजच्या जीवनातून काढून टाकल्या तर काय होईल ? या फक्त दोनच प्रश्नांचीच उत्तरे शोधावीत !मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questionsतमाम मॅनेजर्स आणि नॉन हॅन्ड्स ऑन मंडळींसाठी (३५-४० च्या वयातील) हा 'वेकअप कॉल' समजावा. TCS चे नुकतेच झालेले ले ऑफ्स हे फक्त ट्रेलर होते.१०००% खरं आमच्या हापिसात पण सध्या तीच परिस्थिती आहे. मॅनेजर जास्त पण एकही धड चांगला टेक्निकल अर्किटेक्ट नाही. कस्ट्मर तिकडे बोंबा मारतो आणि इथे मॅनेजर हात वर करुन मो़कळा होतो, "I don't have the required resource available". पिरॅमिड उलटा झाला आहे. इथुन पुढे मी फक्त मॅनेजर आहे माझा फारसा टेक्नॉलॉजीशी संबंध येत नाही असं कोणी म्हणालं तर त्याची नोकरी धोक्यात आहे हे नक्की.