आम आदमी पक्षातील दुही......
आम आदमी पक्ष एक फार मोठा विजय मिळवून दिल्लीच्या गादीवर बसला. श्रीयुत केजरीवाल हे गाजावाजा करत मुख्यमंत्री झाले. परंतु लगेचच ह्या पक्षाला ग्रहण लागेल असे वाटू लागले आहे. पक्षाचे मुख्य रणनीतीकार समजले जाणारे योगेंद्र यादव आणि उच्चशिक्षित, यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास आप मध्ये मोठी फुट पडण्याचा संभव आहे. असे घडल्यास आप दिल्ली नीट सांभाळू शकेल असे वाटते का??? का पुन्हा मागील प्रसंगाप्रमाणे केजारीवालांना मुख्यमंत्री पद सोडावे लागेल. आणि असे घडलेच तर दिल्लीमधील जनतेचा लोकशाही वरील विश्वास उडेल एवढे नक्की......
आप च्या विजयामुळे तसा मला फार आनंद झाला नाही. पण पुढील ५ वर्ष त्याचं कामकाज बघून नंतरच आपलं मतं द्यावं असं ठरवलं आहे.१००% सहमत.सध्याच्या घडामोडी दुर्दैवी आहेत पण प्रत्येक पक्षाला यातून जावेच लागते. त्यामुळे आप वर टीका करणे योग्य नाही असं वाटतं.असहमत. केवळ आपवरच नव्हे तर आपमध्ये सध्या जे चालले आहे ते इतर कोणत्याही पक्षात चालले असले तर त्यावर टीका करायलाच पाहिजे. "नागरीक सजग आहेत, आपल्यावर नजर ठेवून आहेत आणि आपल्या कर्माची फळे ते आपल्याला (पुढच्या निवडणूकीत तरी नक्की) देतील" अशी खात्री सर्व राजकीय पक्षांना वाटल्याशिवाय खरी लोकशाही येत नाही.प्रदेशाध्याक्षाच्या निवडीवरून सध्या काँग्रेस मध्ये सुद्धा वादंग माजले आहे. पण हे आपण गृहीतच धरले असल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही.+१. एखाद्या पक्षाकडून सर्व आशा खुंटल्यावर आणि बोलून तरी काय फायदा अशी खात्री झाल्यावरच असे दुर्लक्ष होऊ शकते.हा अश्या स्वस्तातल्या गोष्टी देउन दिल्लीच्या अर्थकारणाची वाट लावेल.अगदी अगदी , सगळ्यात महत्वाची आणि मोठी भीती तीच आहे.