भ्रष्टाचाराचा भस्मासूर
सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही.
त्या सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत.
कृपया उत्तरं देऊन माझ्या माहितीत भर घालावी ही नम्र विनंती.
सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते.
असे का बरे ?
सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते.
असे का बरे ?
राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।"
असे का बरे ?
Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही.
असे का बरे ?
माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे.
असे का बरे ?
आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने.
त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये.
असे का बरे ?
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले.
असे का बरे ?
AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले.
असे का बरे ?
निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही.
असे का बरे ?
व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला.
असे का बरे ?
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachiअच्छा अच्छा, अस्सं झालं होय ? फारच लवकर निकाल लागला. बाय द वे, मी ही बातमी वाचली होती. Court imposes Rs 10,000 fine on Nitin Gadkari in defamation case against Arvind Kejriwal http://timesofindia.indiatimes.com/india/Court-imposes-Rs-10000-fine-on-Nitin-Gadkari-in-defamation-case-against-Arvind-Kejriwal/articleshow/45585228.cms
अरे वा ! हे Compromise केजरीवाल मानहानीसाठी जेलमध्ये गेले होते तेव्हा झाले की जेलमध्ये जाण्याच्या अगोदर, की जेलमधून बाहेर आल्यानंतर ? साहेबांच्या भाषेचे जास्त ज्ञान नाहीये मला, पण माझ्या माहितीप्रमाणे Compromise ला मराठीत तडजोड किंवा समेट म्हणतात. आणि (परत) माझ्या माहितीप्रमाणे तडजोड किंवा समेट हा दोन्ही व्यक्तींच्या सहमतीने होतो, फक्त एका व्यक्तीकडून नाही. गडकरींच्या ड्रायव्हर, नौकर इत्यादी लोकांच्या नावावर कंपनीचे शेअर्स वगैरे आहेत. कॅगनेसुद्धा गडकरींवर पूर्ती प्रकरणामध्ये ठपका ठेवलाय. पण तरीही केजरीवालने त्यांचे नाव जिंदल, वाड्रा, अंबानीसारख्या भ्रष्ट नसलेल्या लोकांच्या यादीत टाकले. केजरीवालने इतका मोठा गुन्हा केलाय की गडकरी साहेब त्याला सहजासहजी सोडतील असे वाटत नाही. गडकरींनी या केसमधून असा धडका शिकवावा ना त्या चिरकूट केजरीला, पुढच्या वेळी कुणाचेही नाव घेतांना १०० वेळा विचार केला पाहिजे त्याने.