IIT आणि USA
आजकाल आयआयटी मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच 100 ते 250 कोटी प्रतिवर्ष पगार देणार्या अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 10 ते 20 कोटी प्रतिवर्ष पगाराचे जॉब अमेरिकेत ऑफर होतात . किंबहुना आयआयटी करनारांचे उद्दीष्ट अमेरिकेत सेटल होणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला?
मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच अमेरिकेत जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 कोटी रुपये आयआयटी ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\
आपले काय म्हणणे ? मंडळी ?
💬 प्रतिसाद
(104)
उ
उगा काहितरीच
Tue, 07/14/2015 - 12:48
नवीन
आकडे पाहून आकडी आली!
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Tue, 07/14/2015 - 12:53
नवीन
माफ करा मंडळी 1 te दीड करोड असे वाचावे / गळती से मिसटेक हो गयी
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 07/14/2015 - 12:59
नवीन
अगदी बरोबर, विचारांच्या गळतीमुळेच मिष्टेक झाली. =))
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 07/14/2015 - 15:27
नवीन
१०० ते २५० कोटी प्रतिवर्ष हे वाचून लगेच जेईईची पुस्तकं मागवायला धावणार होतो.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/14/2015 - 15:32
नवीन
अगदी १ ते १.५ कोटी 'प्रति वर्ष' तेही फ्रेशरसाठी असलं तर पुन्हा अभ्यासाचा विचार करायला काय हरकत आहे? ;)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 07/14/2015 - 16:53
नवीन
असल्या छोट्यामोठ्या अमौंटसाठी परत अभ्यास कोण करणार? ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/14/2015 - 17:51
नवीन
बाळ लैच मोठ्या पावलाचं हाय ब्वा! ;)
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 07/14/2015 - 18:07
नवीन
डालरा डालरा.. !! ;)
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Tue, 07/14/2015 - 12:59
नवीन
ITI आणि UAE
आजकाल आयटीआय मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच 20 ते 25 लाख प्रतिवर्ष पगार देणार्या आखातातील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 8 ते 10 लाख प्रतिवर्ष पगाराचे जॉब आखातात ऑफर होतात . किंबहुना आयटीआय करनारांचे उद्दीष्ट आखातात जाणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला?
मला वाटते आयटीआय मध्ये प्रवेश देतानाच आखातात जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 लाख रुपये आयटीआय ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\
आपले काय म्हणणे ? मंडळी ?
ह. घ्या हो धागाकर्ते! :)
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 07/14/2015 - 13:01
नवीन
योग्य मुद्दा आहे रे मंदारा. जोडीला एफ.टी.टी.आयला ही घे.ह्यांच्यावरही खूप खर्च होतो असे नुकतेच वाचले.त्या मुन्नाभाईवाल्या राजकुमार हिरानीकडून(तो एफ टी टी आय वाला आहे) ३/४ कोटी वसूल करावेत असे ह्यांचे म्हणणे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 07/14/2015 - 13:18
नवीन
मै इज ब्याक :) आता जेपी पण येईल ;)
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 07/14/2015 - 13:01
नवीन
योग्य मुद्दा आहे रे मंदारा. जोडीला एफ.टी.आय.आयला ही घे.ह्यांच्यावरही खूप खर्च होतो असे नुकतेच वाचले.त्या मुन्नाभाईवाल्या राजकुमार हिरानीकडून(तो एफ टी टी आय वाला आहे) ३/४ कोटी वसूल करावेत असे ह्यांचे म्हणणे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/14/2015 - 13:06
नवीन
लौ यु माईआज्जी आणि नानाजोबा!
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Tue, 07/14/2015 - 14:00
नवीन
सगळ्या सदस्यांना एक प्रश्न आहे -
मिसळपावचे किती सदस्य आहेत?
जर तुमचं उत्तर - "मिसळपाव च्या डेटाबेस मधे आहेत तितके" असे असेल तर ते चूक आहे.
.
.
.
एक सदस्य तुम्ही कमी मोजताय ...
.
.
.
'हे' :)
माईंनी आयडी बदलून "माईसाहेब हे कुरसूंदीकर" केला तर नव्या सदस्यांना "हे" म्हणजे कोण अशी शंका येणार नाही.
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 07/14/2015 - 14:05
नवीन
हे हे हे... xD xD xD
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 07/17/2015 - 19:57
नवीन
रोफ्ल
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 07/14/2015 - 13:07
नवीन
सध्या जे परदेशी आहेत त्यांचा काय म्हणणे आहे ते वाचू या .
कारण माध्यमिक शाळा या अनुदानित असतात आणि त्यावर सरकारने पैसे खर्च केले आहेत .
आय आय टी प्रमाणेच परदेशस्थांकडून खर्च वसूल करवा काय ?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 07/14/2015 - 13:08
नवीन
हं...
मुद्दा बरोबर आहे..
म्हणजे नक्की सरकारने का गुणवंत विद्यार्थ्यांवर पैसा खर्च करावा जर पुढे जाउन ते इथे काम करणारच नसतील?
ह्यात सरकारचा काय फायदा?
ह्यापेक्षा सरकारी शाळांसाठी हा पैसा वापरता येईल ना?
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 07/14/2015 - 13:11
नवीन
करदात्यांचा जेवढा पैसा एक विद्यार्थी वापरतो त्याच्या कितीतरी पट पैसा तोच विद्यार्थी जर बाहेर स्थिरस्थावर झाला तर भारतात (प्रत्यक्षपक्ष) पाठवतो..
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 07/14/2015 - 13:20
नवीन
करदात्याचा जेवढा पैसा एक विद्यार्थी वापरतो त्याच्या शंभर, हजार पटीने करदात्याचा पैसा एक राजकारणी वापरतो, त्याच्याकडून वसूल करण्याची हिंमत आहे का तुमची ?
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Tue, 07/14/2015 - 13:23
नवीन
परदेशात नोकरी करणारे लोक आपला पैसा भारतातच परत आणत असतील तर त्यावर नाममात्र कर आकारला जातो कारण हे पैसे परकीय चलणच्य स्वरूपात आपल्याच गंगाजळी मधे जमा होत असतात. त्यामुळे सरकारने त्यांना ही सवलत दीली आहे.
- Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न
Tue, 07/14/2015 - 13:27
नवीन
आय आय टी चे सगळेच विद्यार्थी अमेरिकेत अथवा परदेशात गलेलठ्ठ पगारावर जातात काय?
हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या डिस्टींशन वाल्यांना अशी संधी मिळते.
फी मधुन पैसे वसुल करणे हे अन्यायकारक होईल.
पण सरकारचा पहीली ते अगदी पदवी पर्यंत एका विद्यार्थ्यावरचा खर्च लक्षात घेता माझ्या मते पदवी मिळवल्यानंतर पहिली काही, निदान कमितकमी दोन वर्षे तरी भारतातच काम करणे बंधनकारक करावे. म्हणजे त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा थोडा तरी उपयोग देशाला होईल.
जसे मेडीकलच्या विद्यार्थ्यांना काही काळ ग्रामीण भागात अॅपरंट्सशीप करणे बंधनकारक असते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 07/14/2015 - 13:35
नवीन
अतिशय बिनडोक धागा आहे. इन्सेण्टिव्ह आणि अॅसेट क्रिएशन कशाशी खातात हे माहिती नसलेला.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 07/14/2015 - 14:03
नवीन
:)))
संबंध आहे हे मान्य, पण हे कशाशी खातात याचा धागा काढण्यासंदर्भात इथे तितकासा संबंध वाटत नै..
धागाकर्त्याच्या बाजूने डेविल्स अॅडवोकसी करायची झाली तर हेच म्हणणे असेही मांडता येईल की,
भारतीय अनुदानित संस्थांमधून पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणार्या भारतीय नागरिकास शिक्षण पूर्ण झाल्यावर "भारतात किमान २ वर्षे योगदान अथवा २ वर्षात अनुदानित शिक्षणाची फी परत करावी" असा पर्याय असावा. .
(पदवी-पूर्व शिक्षण सरकारची जबाबदारी म्हणून इथे गृहित आहे. त्यास तूर्तास बाजूस ठेवू हवेतर)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 07/14/2015 - 14:54
नवीन
हा मुद्दा "नॉट ईव्हन राँग" अशा क्याटेगरीत असल्याने तूर्त तरी दुर्लक्ष करण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 07/14/2015 - 15:38
नवीन
हे का हो ? म्हणजे कळले नाही. "नॉट ईव्हन राँग" म्हणून दुर्लक्ष म्हणजे मुद्दा गृहित धरण्यालायक नाही असा अर्थ आहे काय?
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 07/14/2015 - 19:20
नवीन
!!
- Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या
Tue, 07/14/2015 - 15:05
नवीन
निम्मे सोफ्टवेयर वाले आयआयटी मध्ये होते का हो? त्यातले कुठून कुठून शिकून बाहेर जाता आहेत मग तुमचा आयआयटी वाल्यांवर का हो राग?माझ्या माहितीत २ मायक्रोबायलोजी आणि १ फार्मसीवाला पण बाहेर गेलाय. आता लोकांना इथे चांगले कॉलेज मिळत नाही म्हणून लोक १२वि नंतर बाहेर जायला लागले आहे. ह्यावर काय एक धागा काढा बघू
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Tue, 07/14/2015 - 17:10
नवीन
१२ पास बाहेर गेलेले घरी पैसा पाठवितात. परीकीय चलनात यांचा वाट सर्वात मोठा आहे.
उच्च शिक्षित त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे ते पैसा पाठवीत नाही.
बाहेर जाणार्या उच्च शिक्षित लोकांकडून १२% व्याजसकट पैसा वसूल करण्यात काही ही वागवे नाही.
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Tue, 07/14/2015 - 18:34
नवीन
शासकीय अभियांत्रिकी किंवा फ्रिसिटवर पास झालेले पण अमेरीका किवा इतर देशात जातात तेंव्हा नियम त्यांनाही लागू करायला हवा. बरेच आयआयटीवाले नंतर भारतात परत येतात. काही आयआयटीच्या लोकांनी अमेरीकेत जाउन स्वतःचे उद्योग काढले मग त्याची शाखा भारतात काढली. कन्वल रेखी, विनोद खोसला या लोकांनी भारतात बरीच गुंतवुणुक केली. कदाचित सरसकटीकरण होइल पण आयआयटीचे जी मुले बाहेर जातात ती काही दिवसात बऱ्याचदा उच्च पदावर पोहचतात त्यामुळे ते मोठ्या निर्णायांवर प्रभाव पाडू शकतात. ही गोष्ट इतर कॉलेजातल्या विद्यार्थांबाबत घडत नाही.
अवांतर
आयआयटीवाले भारतात राहीले तर मिडीयाला रोज एक बातमी देउ शकतात हे दिल्लीत दिसले.
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Tue, 07/14/2015 - 22:31
नवीन
हा लेख तुम्ही विचारांशी जुळणारा आहे
नेमका योगायोग कि दोन्ही लेख एकाच वेळी समोर आले
http://scroll.in/article/715918/Dear-Smriti-Irani-stop-giving-my-money-to-IITians
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Tue, 07/14/2015 - 23:54
नवीन
लष्करात वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यावर त्यात सेवा करणे सक्तीचे असते अधिकार माहिती डॉ खरे सांगतील
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ग्रामीण भारत सेवा देणे सक्तीचे आहे
तर आय आय टी वाल्यांचे लाड का
नेहरूंनी ज्या उद्देशाने आय आय टी स्थापन केली त्या उद्देशाला हरताळ फासला जातो , लोकशाहीत विद्यार्थ्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे पण आय आय टी च्य प्रवेश परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात त्यात काही मोजके मर्यादित जाग असल्याने आय आय टी मध्ये प्रवेश घेतात
उरलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक गुणी हुशार मुले असतात
त्यांना जागेअभावी प्रवेश मिळत नाही.
तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना भारतात राहून देशासाठी आहे त्या परिस्थितीत काही करण्याची इच्छा आहे अश्या उमेदवारांना प्राधान्य देण्यास काय हरकत आहे
म्हणजे यु पी एस सी सारखी तोंडी परीक्षा घेऊन उमेदवाराच्या हुशारी सोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुद्धा कस लागेल
अनेक गुणी मुलांना डावलून एक गुणी मुलगा आय आय टी मध्ये प्रवेश घेतो व परदेशी उडून जातो तेव्हा उरलेल्या गुणी मुलांच्या मधून एखादा देशात राहून देशासाठी काहीतरी करण्यासाठी प्रेरित मुलांना आय आय टी मध्ये प्राधान्य का मिळू नये
त्याने गुणवत्तेत तडजोड होणार नाही किंवा आय आय टी अ सरकारी अनुदाने बंद करा
हा ही एक उपाय आहे
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Wed, 07/15/2015 - 14:39
नवीन
फक्त IIT का ? मग असा नियम करूया ना कि कोणताही विद्यार्थी जो सरकारी संस्थेत शिकला तो बाहेर कधीच नोकरी करायला जाऊ शकणार नाही. होईल तुमचे समाधान ?
आणि IIT मध्ये तोंडी परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी घेण्याची कल्पना तर अफलातून . हे पोचतील का हो तिकडे मग ? रोजगार मजुराची मुले ?
ज्ञानी लोकांनी एकदम MBA style चकचकीत असलेच पाहिजे IIT मध्ये जायचे असेल तर असा नियमच करून टाकू. नाहीतर तुमच्या ज्ञाना ला इकडे काही किंमत मिळणार नाही हे ठाम पाने आपण सांगून टाकू.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 07/15/2015 - 21:33
नवीन
हे पोचतील का हो तिकडे मग ? रोजगार मजुराची मुले ?
धोनीच्या एका मुलाखतीची आठवण झाली त्यात तो म्हणाला
की छोट्या शहरातील लोकांना आपले लक्ष्य गाठण्यासाठी बालपणापासून संघर्ष करतात म्हणूनच ते शहरी मुलांच्या पेक्ष्या मानसिक दृष्ट्या सक्षम असतात..
श्रीरंग ची कल्पना आवडली
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
गुरुवार, 07/16/2015 - 13:48
नवीन
तुमचे ज्ञान अफलातून आहे. UPSC मधल्या interview बद्दल.
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
Wed, 07/15/2015 - 07:32
नवीन
अवांतरः IITs lower cut-offs for admissions, to admit students getting even 6% in entrance
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Wed, 07/15/2015 - 14:23
नवीन
अंदाजे १०,००० सीट्स IIT मध्ये असतात. त्यातले किती मुले नोकरी करता बाहेर जातात ? २० टक्के / २५ टक्के ? किती ? चला २० टक्के पकडू. म्हणजे २००० लोकांनी भारत मातेला आपली सेवा देण्या पेक्षा Sam Uncle आपला मानला. अरे काय वाईट आहे याच्यात ? असे समजा ना कि इथल्या मुलांना ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांच्या करता २००० जास्त नोकर्या निर्माण झाल्या.
मी असे म्हणत नाहीये कि IIT च्या मुलाच्या जागी स है जोंधळे, तासगावकर कोलेज चा मुलगा लागेल. IIT च्या त्या जागेवर VJTI COEP ची मुले. या VJTI वाल्यांच्या जागेवर , भारती , DY पाटील ची मुले. थोडक्यात नोकर्या झिरपत खालच्या स्तर पर्यंत पोचतील ना. आत्ताच किती मुले नोकरी नाही म्हणून रडतात. त्यांचे भले होईल.
मी असे म्हणतच नाही कि कंपनी ला नालायक ( शैक्षणिक दृष्ट्या ) मुले नोकरीवर ठेवावी लागतील. आपण बघतो कितीतरी हुशार मुले पण नशीब खराब म्हणून नोकरी नाही. त्यांचे भले होईल. he vacha
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Wed, 07/15/2015 - 14:42
नवीन
त्यातले किती मुले नोकरी करता बाहेर जातात ? >> त्यातले किती मुले नोकरी लगेच बाहेर जातात ?
असे वाचावे. ३/४ वर्षात तर भारती वाला पण जातोच. त्यात काय नवल नाही.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 07/17/2015 - 01:27
नवीन
हे वाचा
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 07/17/2015 - 09:33
नवीन
याच्यात IIT च्या विद्यर्थी चा काय दोष आहे ? अमेरिका - जिथे सगळे ( शब्दात पकडू नका ) मोट्ठे शोध लागले, लागत आहेत. तिथे उद्योग जगत आणि त्यांचे मालक मोठ्या प्रमाणावर शिक्षणात गुंतवणूक करतात. फायद्या करता नाही. आणि आयुष्याच्या शेवटी समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रचंड दान हि करतात. जे पी मोर्गन , रॉकफेलर , कार्नेजी . शोधा , वाचा .
इथे बिर्ला , गोएंका , अंबानी , अदानी , मारवाडी पंजाबी उद्योगपती . कोणी असे काही केले आहे का ?
इथले उद्योगपती एक नवीन धंदा म्हणून काही कॉलेज काढतात. अमेरिकेत तसे नसते. खूप मोठा फरक आहे.
आणि नवीन शोध - INFOSYS ने काय लावले हो नवीन शोध ? काय product , OS ? वेब server , गेला बाजार एखादा browser ? काय शोध लावले ? आपले IT मजूर US मध्ये ठराविक बिलिंग रेट वर लावले. त्यांच्या डोक्यावर MBA supervisor बसवला. ( जो स्वत काही करू शकत नाही. पण मजूर लोकांना दम भरण्याचे काम जोरात करतो ) थोडक्यात रो ह यो ( रोजगार हमी योजना ) ची एकदम चकचकित आवृत्ती !!
थोडक्यात मूर्ती म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडे पाषाण .
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/17/2015 - 10:43
नवीन
सहमत...
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 07/17/2015 - 11:21
नवीन
इंफोसिसने नवे शोध लावले नाहीत कारण त्यांचे ते बिझनेस मॉडेल नाहीच्चे. पण इंफोसिस आणि तत्सम भारतीय आय्टी कंपन्या या जगातल्या अवाढव्य कंपन्यांना त्यांचं काम स्वस्तात करून देतात आणि त्यांना अधिक एफिशिअंट बनवतात. दुसर्याला एफिशिअंट बनवून त्याची हजारो कोटींची कंपनी बनवणं ही नक्कीच अचिवमेंट आहे.
दुसरीकडे आयाआयटी \आयायेस्सी यांच्या कडून कटिंग नव्या तंत्रज्ञानाची अपेक्षा ठेवली जाते कारण त्यांची स्थापना त्यासाठी झालेली आहे. सरकार त्यावर अमाप पैसे खर्च करत असते.
आणि मूर्ती यांच विधान चूक आहे हे सिद्ध करा की. सांगा आयाय्टी/आयायेस्सी ने लावलेले शोध/तंत्रज्ञान जे आज घराघरात वापरलं जातय. लोकांना आनंदच वाटेल असं काही असेल तर.
बाकी आयाय्टीमधून शोध लागले नाहीत अस म्हणल्यावर इन्फीने कुठे लावलेत शोध अस विचारणं म्हणजे दोघे समान पातळीवरचे आहेत हे म्हणणं नव्हे काय?
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 07/17/2015 - 12:34
नवीन
अर्धे वाचून उत्तर देऊ नका हो ढेरे.
US आणि इंडिया, उद्योगपती लोकांची विचारसरणी वेगळी आहे. इकडे मारवाडी बनियागिरी आहे. तिथे उद्योग आणि विद्यापीठ हातात हात घालून काम करतात. इथे काय होतेय ?
खरे सांगायचे नसेल, कबूल करायचे नसेल तर फेका. Efficiency च्या गोष्टी काय सांगता ? उद्या आमच्या घरची भांडीवाली पण अगदी हाच दावा करू शकतेच ना. वेगळा स्तर पण तीच गोष्ट .
पिंडी ते ब्रह्मांडी. ऐकलीय का हि म्हण कधी ? इथे भारतात INFY कशाला , सगळ्यांचे तेच business मोडेल असते. मग धंदा काय पण असो. नवीन काही शोध लावायचा नाही. सगळे बाहेरून आणायचे . जास्त रिस्क न घेता , कायम उत्पन्न कसे चालू राहील हे business मोडेल. ठीक आहे . करा तसे. पण मग लोकांना अक्कल शिकवू नका.
अशा ठिकाणी IIT वाले काही नवीन करायला बाहेर जाऊ लागले कि त्यांना अडव काहीतरी तात्विक मुद्दा काढून. खेकडा / jealous मनोवृत्ती आहे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 07/17/2015 - 12:41
नवीन
या प्रश्नाचं उत्तर द्याल असं वाटलं होतं.
शेपूट घालायची तर सरळ घाला. गाठी का मारता?
- Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या
Fri, 07/17/2015 - 13:01
नवीन
सिद्ध काय करायचे आहे, खरच आहे ते. दुर्दैवाने आपल्याकडे सध्या बेसिक गोष्टी सुधाराव्यात किंवा सुरळीत कराव्यात अशी मानसिकताच नैह्ये. मग कसले शोध लागतायत. काय होतंय कि आहे त्या परिस्थिती कसे पुढे जाता येईल इतकेच बघायची सवय म्हणा किंवा अजून काहीही म्हणा अशी विचित्र गोष्टी होवून बसली आहे. सगळीकडे फक्त जुगाड आणि त्यालाच आपण मान्यता देतो. चलता है कारभार सगळा.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 07/21/2015 - 02:34
नवीन
ह्यावरून कोंबडीप्रेमी ह्यांचा हा लेख आठवतो
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 07/17/2015 - 13:06
नवीन
IIT ला industry ची साथ नाही . जशी US मध्ये कार्नेजी , MIT , princeton ला मिळते तशी. साधे उत्तर आहे. समजायची अक्कल नसेल तर माफ करा, मी याच्या हून जास्त समजावून देऊ शकत नाही.
आणि म्हणून काही IIT वाले बाहेर जातात तर त्यांचे पैसे बघून लोक जळतात.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 07/17/2015 - 13:32
नवीन
हा मुद्दा बाहेर जाण्याबद्दल नाही. नारायण मूर्तींच्या विधानाबद्द्ल आहे. मूर्तींचं विधान बरोबर आहे हे तुम्हाला मान्य आहे तर.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Fri, 07/17/2015 - 13:54
नवीन
आययटीला सरकार प्रचण्ड पैसा देतं आहे. तिकडे कंपन्या देत आहेत.
मग अडचण कुठे आहे? कंपनीची साथ म्हणजे नक्की काय हवं आहे तुम्हाला?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/17/2015 - 13:34
नवीन
ते विधान बरोबरच आहे, चूक काहीच नाही त्यात. पण कोण म्हणतंय त्यालाही काही महत्त्व आहे की नाही? पैसा, तंत्रज्ञान, वेळ, क्षमता, परिस्थिती हाताशी असतांना मूर्थींनी काय केले हे महत्त्वाचे आहे की नाही?
आधी केले मग सांगितले असा थोरामोठ्यांचा शिरस्ता असतो असं लहानपणापासून ऐकत आलोय. त्याप्रमाणे मूर्तींनी काय उत्पादने काढली जी जगाला बदलवून टाकणारी ठरली हाही प्रश्न विचारणे आलंच की. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून मूर्तींनी जे विधान केलंय त्याचं अर्थाची विधानं ऐकत आलोय आपण. ते लहान असतांना मूर्तींनीही ऐकले असेल. मग स्वतः त्याप्रमाणे संधी असतांना जे करू शकले नाहीत त्यांना इतरांना डोस पाजायचा अधिकार काय?
उलट त्यांनी असे म्हटले असते की 'ठिकाय, नाही झालं ना ६० वर्षात, आपण सगळे मिळून आता करुया. आता काळ/परिस्थिती योग्य आहे. मी माझ्यातर्फे संशोधनासाठी अमूक इतके करोड देतो दरवर्षी. चांगली संशोधनं/आयडीयाज आणा आणि ग्रँट मिळवा. इन्फोसिस तुमच्यासोबत पार्टनर्शीप करून तुमचे उत्पादन जगात आणेल.' तर कुणीही विरोधी स्वर काढला नसता. किंवा गेले दहा-पंधरा वर्ष ते हेच करतायत पण ग्राउंडब्रेकिंग काही तयार झालं नाही म्हणून वरिल विधान केलं तर उद्विग्नता म्हणून समजून घेऊ शकतो. इन्फोसिस तर्फे स्टार्ट-अप फंड यावर्षी सुरु झाला.
परदेशात वाय काँबीनेटर ही सीडफंड कंपनी २००५ मधे सुरु झाली. आजवर त्यांनी ८४० कंपन्या जन्माला घातल्यात. त्यांची एकूण मार्केट वॅल्यू तीस बीलियन डॉलर आहे. हेच भारतात सुरू करायला इन्फोसिसकडे सर्वप्रकारची सुविधा असतांना २०१५ उजाडले तेही मॉडेल परिपूर्ण नाही.
एक व्यावसायिक म्हणून त्यांनी प्रचंड संपत्ती/नाव कमावले म्हणून महत्त्वाच्या विषयांवर फक्त पिंकटाकू पवित्रा घेणे त्यांच्यासारख्या कॅलिबरच्या माणसाला शोभत नाही.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »