महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद
प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला अन लगेच वादाला तोंड फुटले. वृत्तवाहिन्या अन वृत्तपत्रांमधून बरीच मत मतांतरे बघावयास अन वाचावयास मिळत आहेत. बराच काळ वाट पाहून इथे शेवटी या विषयावर काथ्याकुट टाकतो आहे.
बाबासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य शिवरायांच्या जीवनपटावर लोकउद्बोधक कार्यक्रम व शाहिरी करण्यात व्यतीत केले. "जाणता राजा " या लोकप्रिय कार्यक्रमामुळे शिवराय लहान मोठ्यांना अधिक सुलभतेने समजण्यास मदत झाली. पण पुरस्कार विरोधकांचा मुख्य आक्षेप हा आहे कि बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास कथन केला. शिवरायांच्या जन्म तिथिबद्दल वाद, त्यांच्या जीवनात रामदास स्वामी यांना गुरु म्हणून चिकटवण्याचा प्रमाद, जीजाउंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात जेम्स लेनला केलेली कथित मदत व इतर अनेक आक्षेप त्यांच्यावर या अनुषंगाने आहेतच.
या आक्षेपांमुळे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला बट्टा तर लागला नाही ना?
पुरस्कार ज्या कार्यासाठी मिळतोय ते कार्य वादविवादरहित असावे या मताचा मी असल्याने बाबासाहेबांनीच हा पुरस्कार नाकारावा असे मला वाटते.
मिपाकरांना याबद्दल काय वाटते, हे जाणण्यास उत्सुक.
💬 प्रतिसाद
(135)
ज
ज्योत्स्ना
Wed, 08/19/2015 - 09:13
नवीन
ह्यांनी काहिही म्हंटले किंवा काहिही अपप्रचार केला तरीही छ्त्रपती आणि शिवशाहीर दोघांबद्दल महाराष्ट्रातील जनतेला असलेला आदर जराही कमी होणार नाही.शिवराय हे सर्व मराठी जनतेचे आदरणीय आहेत. ह्या लबाड कोल्ह्यांना सर्वजण ओळखून आहेत.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 08/19/2015 - 09:27
नवीन
असल्या आक्षेपांमुळे आयुष्याच्या कार्याला बट्टा लागत नसतो. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही.
त्यापेक्षा जे लोक वाद घालतायत त्यांना नाकारा की. कित्ती कित्ती तो सहिष्णुतेचा आव आणायचा तो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 08/19/2015 - 10:22
नवीन
मा उच्च न्यायालयाने श्री ब मो पुरन्दरे यान्च्या विरोधातील याचिका फेटाळली आणि याचीका कर्त्यांवर दहा हजार रुपये दंड हि लावला.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 08/19/2015 - 11:08
नवीन
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4824324917673676974&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150819&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%20%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%80;%20%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE
आणि
ब्राह्मण समाजाच्या सुदैवाने न्यायाधीशांची आडनावे पाटील आणि शुक्रे अशी आहेत ... हेच जर कुळकर्णी किंव्वा देशपांडे असते तर महाराष्ट्रात १९४८ ची पुनरावृत्ती झाली असती ह्यात शंका नाही !
आता "न्यायालय सरकारच्या द्बावाखाली काम करते" असा युक्तीवाद कधी येतोय ह्याची वाट पहात आहे :)
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Wed, 08/19/2015 - 10:26
नवीन
आज कोर्टाने याचिकेत काही अर्थ नाही हे स्पष्ट केलेच आहे.
सरकारने कोर्टाला विनंती करावी,
१. याचिका करणाऱ्यांनी कोर्टाचा वेळ वाया घालवला.
२.यानिमीत्ताने समाजात तेढ निर्माणं करायचा प्रयत्नं केला.
३. एका ऋषीतूल्य माणसाचा अपमान केला
म्हणून त्यांच्याकडुन प्रत्येकी ११लाख तसेच त्यांच्या पक्षा कडुन ११कोटी दंड
वसूल करण्यात यावा. कोर्टाने तसा आदेश द्यावा अशी विनंती सरकारने करावी.
शिवाय पक्षाची मान्यता रद्द करण्याची सिफारस निवडणूक आसिगाला करावी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 08/19/2015 - 10:59
नवीन
प्रश्न पैश्याचा नसून याचिकाकर्त्यांना न्यायालयाने मारलेल्या चपराकेचा आहे. असे असूनही हे निर्लज्ज लोक हा प्रश्न भावनेचा असून न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही असेही म्हणतील. ( हेच जर न्यायालयाने स्थगिती दिली असती तर मात्र तोंड वर करून नाचले असते)
- Log in or register to post comments
श
शिलेदार
Wed, 08/19/2015 - 12:47
नवीन
श्री मोरोपंत पिंगळे हे जातींनी ब्राम्हण आहेत. आणि सरनौबत श्री हंबीरराव मोहिते किंवा सरनौबत श्री प्रतापराव गुजर हे जातींनी मराठा आहेत असा भेदभाव मुळातच महाराजांच्या स्वराज्याला माहित नाही . त्या स्वराज्याला माहित होत माणसाची गुणवत्ता त्याचं कौशल्य, धाडस ,निष्ठा.
आपण जर त्याच स्वराज्याचं आधुनिक रूप आहोत तर आपल्याला याचा विसर पडावा हेच दुर्दैव आहे.
थोड्या वेळासाठी जर आपण देशपातळीवर आपला विचार केला की आपली काय ओळख आहे आपल्या देशात, तर उत्तर आपल्याला सगळी कडे मिळेल (जे बाहेर राज्यात राहतात किंवा जाऊन आलेत ते) ते उत्तर आपल्या राष्ट्रगीतामध्ये ही आहे.
II पंजाब सिंध गुजरात मराठा II
याचा अर्थ सगळ्या देशाच्या दृष्टीनी आपण मराठा आहोत आणि महाराष्ट्र राहणारे सगळे मराठा
थोडा पुढा जावून म्हणावसं वाटत कि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पाईक तो मराठा.
मला वाटत की हाच अर्थ श्री महाराजांना ही अभिप्रेत असावा.
आता राहिला प्रश्न श्री बाबासाहेबांना पुरस्कार देण्याचा तर मला असे वाटते की भावनेचा किंवा ते कोणाचे आहेत हा भाग बाजूला ठेवून विचार केला तर असे समजेल की आपल्यामधल्या बहुतांशी लोकांचं जेवढा वय आहे तेवढा श्री बाबासाहेबांचा अभ्यास आहे. निदान त्याच तरी आदर करून त्यांच्यावर चाललेली चिखल फेक थांबवावी.
उगीच धुडगूस घालाण्यांनी काहीच सिद्ध होत नाही. ज्यांना काहीच माहित नाही आणि ज्यांना एखाद्या गोष्टीचा अर्थ सुद्धा निट लावता येत नाही त्यांनी काहीच बोलू नये.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 08/19/2015 - 17:29
नवीन
मराठा तितुका मेळवावा
महाराष्ट्र धर्म वाढवावा
हे लिहिणारे समर्थ रामदास स्वामी तर ब्राम्हण होते.( इतक्या वर्षात रामदास स्वामींची जात विचारात घ्यायचे "पुण्य" लाभलेले नव्हते ते आता या लोकांमुळे लाभले आता डोळे मिटले तरी चालतील.)
मग त्यांनी "मराठा" मेळवावा कसे लिहिले?
साधे उत्तर आहे
मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा माणूस. हे जातीवाचक विशेषण नाही. पण पिवळ चष्मा लावला कि सगळे जग कावीळ झाल्यासारखे भासते. त्याला कोण काय करणार?
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Wed, 08/19/2015 - 14:22
नवीन
चवथीच्या पुस्तकात पहिल्यांदा शिवाजीमहाराज भेटले. ते इतिहासाचे पुस्तक आजही मनात कोरलेलं आहेच. दलालांची चित्रे असावीत ती. ते अश्वारूढ शिवाजी दैवत म्हणजे नेमकं काय ते समजायच्या आधी त्या पदावर आरूढ झाले त्यात चवथीच्या त्या पुस्तकाचा वाटा होताच मात्र पुढे जाऊन राजाशिवछत्रपती चे त्याकाळी असणारे छोटे छोटे पुस्तकामुळे सुध्दा झाले.
शाळेत असताना शाळेच्या वाचनालयातून पुढे परत एकदा मोठ्या ठोकळावजा पुस्तकातून आणि आता अगदी मागच्याच वर्षी दोन मोठ्या ठळक फॉन्तमधून दोन खंडात हे राजाशिवछत्रपती हे पुस्तक वारंवार भेटतंय. माझा मराठी पींड पोसण्यात ह्या पुस्तकाचा मोठा वाटा. बाबासाहेब पुरंदर्यांनी लिहीलेल्या आणि मी वाचलेल्या प्रत्येक पानापानाने माझ्या मनात शिवाजी महाराजांबाबतचा आदर वाढतच गेलाय. त्यांनी लिहीलेल्या राजाशिवछत्रपती नंतर मी अनेक वेगवेगळ्या मांडणीतील शिवाजी वाचलेत. सेतु माधव पगडी पासून ते नरहर कुरूंदकर आणि पानसरेंपर्यंत वाचलेत. जाणीवेच्या प्रत्येक पातळीवर आपल्याला नवनवीन काहीतरी मिळत जातं. शिवाजी अधीक खोलात समजतात. मात्र तरी सुध्दा माझ्या दैवताचे जे चरीत्र बाबासाहेबांनी मांडलंय त्याला तोड नाही. ते अधीक भावतं. ते अधीक पोहोचतं. कारण ते मनापासून निघालं आहे असं वाटतं. इतिहास आणि संशोधन हे करण्यासाठी त्याच्या शास्त्र शाखा आहेत त्यांना काय करायचे ते त्यांनी करावे. मला माझ्या राज्याचं कौतूक शिवशाहीर बाबासाहेबांच्या तोंडून ऐकायला किंवा वाचायला आवडतं. त्यांनी लिहीलेली पुस्तके आमच्यासाठी राजांची पोवाडेच आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र भूषण आहेतच. आमचे सरकार आज त्याला अधिकृत मान्यता देतेय एवढंच. त्याचेही स्वागत आहेच.
बाबासाहेबांनी काय लिहीलंय आणि त्यातून कार्य अर्थ निघतो याचा अन्वय लावताना किंवा त्याच्या आधीच बाबासाहेबांच्या आयुष्याचा पट उलगडून बघावा. शिवाजीमहाराजांशिवाय त्यांच्या आयुष्यात उरतं तरी काय याचा शोध घ्यावा. उठता बसता... जळी काष्ठी पाषाणी फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच त्यांचं दैवत आहे.
माझे मत असे आहे की माझ्यासारख्या सामान्य मराठी मानसासाठी बाबासाहेब महाराष्ट्र भूषण आहेतच.
- नीलकांत
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 08/19/2015 - 16:55
नवीन
हा लेख आणि प्रतिसाद आत्ता वाचला!
पूर्ण सहमत!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 08/19/2015 - 20:25
नवीन
अगदी मनातले बोललात मालक.
थोड्या वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाबासाहेब महाराष्ट्रभर शिवव्याख्यानासाठी दौरे करायचे. बार्शीसारख्या लहान गावात एका बॅंकेने त्यांचे तीन दिवसांचे व्या़ख्यान आयोजित केले होते. पहिल्यादिवशी 'पन्हाळगडावरुन सुटका' हा विषय होता. त्यावेळी बाबासाहेबांनी असे आवाहन केले होते की शिवचरित्रातला प्रत्येक प्रसंग शाहिरांना, चित्रकारांना आव्हान आहे. एकेका प्रसंगावर चित्र काढले तरी आयुष्य पणाला लागेल. एवढा संपन्न वारसा आपल्याला लाभलाय तर का कुणी चित्रकार त्यासाठी आयुष्य वेचत नाही. त्यासाठी त्यांनी स्व. दिनानाथ दलालांचेच उदाहरण दिले होते. व्याख्यानाला आलेल्या एका शाळकरी मुलाने त्या दिवशीच्या व्याख्यानावर एक चित्र काढले. मुलाच्या वडिलानी ते चित्र बाबासाहेबांना दिले. बाबासाहेबांनी दुसर्या दिवशी त्या मुलाला बोलावून स्वहस्ते त्याचा सत्कार केला. स्वतःची शाल त्याला देऊन वार्ताहरांना व्याख्यानाच्या फोटोएवजी त्या चित्राचे फोटो पेपरमध्ये टाकायला सांगितले. त्यांच्या बार्शीतल्या तात्पुरत्या निवासस्थानी बोलावून दलालांचा वारसा चालवायचा आशिर्वाद दिला.
.
आजही अभिमानाने सांगतो, ती शाल अन वर्तमानपत्र माझ्याकडे आहे. त्यांच्या आशिर्वादावरच माझी लहानशी का असेना पण चित्रकारकिर्द उभी आहे.
म्हणूनच
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 08/19/2015 - 20:29
नवीन
जियो अभ्या. लै भारी!
नशीबवान हैस.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 08/19/2015 - 20:32
नवीन
कसला नशीबवान आहेस तू!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 08/20/2015 - 18:38
नवीन
क्या बात है अभ्या! भारी!
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 08/20/2015 - 20:00
नवीन
क्या बात ! काय नशीबवान आहात.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 08/20/2015 - 20:07
नवीन
मनःपूर्वक अभिनंदन, अभ्या.
त्या चित्राचा फोटो पाहण्यास उत्सुक आहे.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Fri, 08/21/2015 - 12:59
नवीन
+१ तो फोटो इकडे टाकावा.
आणि तुमचे अभिनंदन अभ्यासाहेब.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 08/20/2015 - 20:43
नवीन
अरे क्या बात है अभ्या, लेका भाग्यवान हायेस लैच. प्रत्यक्ष शिवशाहीरांनी गौरवलेले टॅलेंट खासमखास असणार हे तर नक्कीच!!!! निव्वळ थोर _/\_
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/20/2015 - 20:49
नवीन
भाग्यवंत आहेस अभ्या.. !!!
अशी प्रेरणा मिळणे विरळा असते !
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 08/22/2015 - 20:47
नवीन
पशा, पैकाताय, सृजा, ब्याटया, श्रीरंगा, श्री. एक्काकाका, पम्या आणि कोमल याना धन्यवाद.
मिपामुळे अशा क्षणाना उजाळा मिळाला. जिन्दगीत काहीतरी केल्यासारखे वाटते. धन्यवाद
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 08/23/2015 - 10:59
नवीन
अभ्या, या निमित्ताने त्या चित्राचा व शालीचा फटू टाक की मर्दा. पायजे तर येक छोटासा लेखच टाक त्यावर. तेवढेच बघून बरे वाटेल.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 08/23/2015 - 11:27
नवीन
होय ब्याट्या.
ते आपल्या बार्शीच्या घरी अल्बम मध्ये हाय. नेक्स्ट ट्रिपला फोटो घेऊनच येतो. डीट्टेल स्टोरीसहीत टाकतो. :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 08/23/2015 - 13:06
नवीन
येस्सार!!!!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Sun, 08/23/2015 - 18:36
नवीन
आजही अभिमानाने सांगतो, ती शाल अन वर्तमानपत्र माझ्याकडे आहे. त्यांच्या आशिर्वादावरच माझी लहानशी का असेना पण चित्रकारकिर्द उभी आहे.
हया वाक्याने मात्र अंगावर सरसरीत काटा आला.
वरती जस मालकांनी म्हंटलय "माझ्यासारख्या सामान्य मराठी मानसासाठी बाबासाहेब महाराष्ट्र भूषण आहेतच"
हे एकदम खर आहे, आमच्या सारख्या वाचकांसाठी बाबासाहेब आम्हि जेव्हा पासुन इतिहास वाचायला शिकलो तेव्हापासुनच महाराष्ट्र भुषण आहेत.
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Wed, 08/19/2015 - 14:40
नवीन
आज बाबासाहेबांचा ९४ वा वाढदिवस आहे , त्यांना दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Wed, 08/19/2015 - 14:42
नवीन
नीलकांत,
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील बोललात. त्यासाठी तुम्हाला मिपाभुषण द्यावे काय असा प्रस्ताव समितीकडे पाठवत आहे....
:-)
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 08/19/2015 - 17:14
नवीन
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 08/19/2015 - 17:46
नवीन
जातीच्या आणि पैशाच्या भ्रष्टाचारात रुतलेल्या किड्यांनो, बाबासाहेबांनी त्यांना पुरस्कार मिळालेली रक्कम, त्यांत स्वतःची भर घालून कर्कग्रस्त लोकांसाठी देणगी दिली आहे. यावरुन तरी तुम्हाला खरे सुसंस्कृत म्हणजे काय, ते कळावे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 08/19/2015 - 20:20
नवीन
"पुरस्काराच्या स्वरुपात आपण मला १० लक्ष रुपये दिले. हे पैसे महाराष्ट्राचे आहेत, शाहीरांचे आहेत, कवींचे आहेत, लेखकांचे आहेत, इतिहासकारांचे आहेत, कलाकारांचे आहेत! ह्या पैश्यांवर माझा जरादेखील अधिकार नाही. मा. मुख्यमंत्री, मा. राज्यपाल यांचा आणि समस्त महाराष्ट्राचा मान राखायचा म्हणून, मी यांतले १० पैसे तेवढे घेतो. आणि त्या १० लक्ष रुपयांत माझ्याकडचे १५ लक्ष रुपये घालून, पैश्यांअभावी कॅन्सरवर उपचार करवू न शकणाऱ्या गरीब रुग्णांसाठी एकूण २५ लक्ष रुपये देऊन टाकतो!"
— 'महाराष्ट्रभूषण' शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे.
- Log in or register to post comments
क
कहर
गुरुवार, 08/20/2015 - 11:34
नवीन
मी आता बिग्रेड आणि मंडळींच्या खालील वक्तव्याची वाट पहातोय
" आरक्षणामुळे काही जातींच्या लोकांची प्रगती झाली. परंतु ब्राम्हणांना आरक्षण नाही म्हणून ते हल्ली गरीब होत आहेत. आणि याच गरिबांना मदत म्हणून बाबासाहेबांनी २५ लक्ष दान केले. १५ लक्ष सोडा पण नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि नव्वद पैसे या पुरस्कारातून मिळालेले होते. शिवाय वरचे १० पैसे स्वतःसाठी ठेऊन घेतले म्हणजे पुरस्काराची १००% रक्कम स्वजातीच्या कल्याणासाठी वापरायचा कुटील डाव बाबासाहेब आणि फडणविसांनी खेळला आहे"
(बोलायला काय जाते म्हणून बिन्डोकांकडून अशी अनेक विधाने आलेली आहेत येत रहातील)
बिग्रेडी अकलेचे तारे तोडणारा
कहर
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 12:04
नवीन
मंगेशकरांच्या हॉस्पिटललाच दिले ना पैसे???? असं म्हणून झालंय ऑलरेडी.
(मेसेज फिरतोय)
बाकी फर्स्ट हॅण्ड अनुभव म्हणून सांगतो, मंगेशकर हॉस्पिटलला 'शून्य रुपये खर्चात सुद्धा' उपचार होतात हे पाहिलं आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/20/2015 - 12:37
नवीन
अवघड आहे !
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 08/20/2015 - 11:53
नवीन
मोठ्या माणसाने मोठेपणा दाखवला...
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 08/23/2015 - 12:07
नवीन
काही गोष्टी अशा आहेत की जिथे साक्षात शब्द आणि भाव नतमस्तक होतात.
..शिवछत्रपती आणि बाबासाहेब ही अशीच कवतिके आहेत महाराष्ट्राची !!
..अन मिपाकरांची !!!
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Sun, 08/23/2015 - 13:00
नवीन
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून मी थोडा वेळ स्वस्थ बसलो व एक दीर्घ श्वास घेतला. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभुषण हा पुरस्कार म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कार्याची पोहचपावती, ती त्यांना मिळालीच पाहिजे. ती मिळाली त्याबद्दल फडणवीसांचे अभिनंदन. राष्ट्रवादीवाले दिल्लीच्या सरदाराची थप्पड लवकर विसरले.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3