Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"कर" आहे त्यालाच "डर" आहे…

म
माम्लेदारचा पन्खा
Mon, 08/24/2015 - 12:34
🗣 96 प्रतिसाद
एक सतत छळणारा प्रश्न आज तुम्हाला विचारू इच्छितो…. आपल्या ह्या देशात सगळ्या प्रकारचे कर भरून माणूस श्रीमंत होणं राहिलाच पण सुखी तरी राहू शकतो का? उत्पन्नाचा कर ,विक्रीकर,सेवाकर,मूल्यवर्धित कर आणखी इतर हजारो प्रकारचे कर भरून भारतीय माणसाच्या खिशात उरतं तरी काय ? बरं, इतकं करून, कर भरून आणि त्याच्या ओझ्याखाली मरून त्याचे सरकारकडून काही लाभ मिळावेत असं म्हणावं तर तेही नाही…. निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ… रस्त्यावरचे हजारो खड्डे , लोकलची गर्दी , एक न दोन हजार कारणं !! ह्यातच पुढची पिढी आपला एक नवीन अडथळ्यांचा प्रवास सुरु करते आहे …. सशक्त आणि सुजाण नागरिक घडणार कसे आणि कुठून ? ज्यांना शक्य आहे ते सरळ परदेशाचा रस्ता धरतात …. भले त्यांच्या नावाने आणि ब्रेन ड्रेन म्हणून कोणी कितीही कोकलो पण ते एका अर्थाने शहाणेच म्हणायचे !! ज्यांना काहीच जमत नाही ते राहतात असेच कुढत वर्षानुवर्षे…आयुष्यभर नोकरी करून त्या पैशात मुंबई पुण्यात जर एक साधे घर येत नसेल तर माणसाने करायचे तरी काय …. आणि कसली अपेक्षा मनात धरून उमेदीने काम करत राहायचे? ह्या सगळ्याचा सर्वोच्च त्रास मध्यमवर्गीय पांढरपेशांना जे सहज पकडले जाऊ शकतात …. गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक अलाहिदाच राहणार नेहमीच …. जगावं तरी कोणत्या उत्साहाने ह्या ठिकाणी माणसाने ? की मेंढरांच्या कळपासारखं नाशिबात असेपर्यंत जगात राहावं आपल्याच नशिबाला दोष देत ? मानवी आयुष्याला काहीच किंमत नाही का ह्या देशात? पुनर्जन्माचे माहित नाही पण तो असलाच तर पुन्हा हेच रहाट गाडगं नको रे देवा !!

प्रतिक्रिया द्या
20967 वाचन

💬 प्रतिसाद (96)
व
विजुभाऊ Mon, 08/24/2015 - 12:42 नवीन
मत देण्याचा हक्क फक्त कर देणारालाच दिला तर बराच फरक पडेल. कर देणारे आणि न देणारे यांच्या मतांच्या संख्येची तुलना करा मग सममजेल मी काय म्हणतोय ते. अर्थात सेल्स टॅक्स / एक्साईज वगैरे इन्डायरेक्ट करां बद्दल बोलत नाहिय्ये. फक्त इनकम टॅक्स बद्दल बोलतोय.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 08/24/2015 - 13:08 नवीन
मत देण्याचा हक्क फक्त कर देणारालाच दिला तर बराच फरक पडेल.
म्हणजे भारतात फक्त दोनेक कोटीच मतदार राहतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
काळा पहाड Mon, 08/24/2015 - 21:04 नवीन
माझं या बाबतीत मत असं होतं की मताचं कॅल्क्युलेटेड स्वरूप हवं. जसं की पीएच्डी वाल्याला उदाहरणार्थ ७ मतं आणि ग्रॅज्युएट ला ४ मतं. १० वी पास न झालेल्याला एकच मत. जास्त शिकणारा जास्त विचार करतो किंवा त्याला करावा लागतो हे खरं आहेच. दुसरं म्हणजे इन्कम्टॅक्स भरणार्‍याला जास्त मतं द्यायची. न भरणार्‍याला एकच मत. सोशल सर्व्हिस चं रेकॉर्ड असणार्‍याला जास्त मतं. घरकोंबड्यांना एकच. प्रॉपर्टी टॅक्स भरणार्‍याला जास्त मतं. झोपडपट्टी वाल्यांना एकच. अशी कॅटेगिरी तयार करून मग माणसाला असणार्‍या मतांची बेरीज करून ती विचारात घेतली तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
असंका Tue, 08/25/2015 - 05:40 नवीन
कंपन्या पण आयकर भरतात. त्यांना पण मताधिकार द्यायचा का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
आ
आदूबाळ Tue, 08/25/2015 - 10:33 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/City_of_London_Corporation#Voters
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 08/25/2015 - 10:40 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/25/2015 - 09:14 नवीन
पूर्वी मलाही वाटायचे की शिकलेले लोक निवडून आले तर जास्त चांगले होईल. पण गेल्या काही वर्षात शिकलेल्या लोकांनी जे दिवे लावले आहेत ते बघून तो भ्रम गळून पडला. दयानिधी मारन, अरविंद केजरीवाल इत्यादी गणंग चांगले शिकलेलेच आहेत.शिकलेले लोक चारसो-बिसी करायचे अधिक हुषार मार्ग शोधून काढतात तर अशिक्षित नेते त्या बाबतीत इतके पुढारलेले नसतात असे म्हणता येईल. आपले ममोसाहेब काय कमी शिकलेले होते.पण शेवटी रागासारख्याला कधीही पंतप्रधानपद आपण खाली करून देऊ असे म्हणालेच ना ते?पृथ्वीराज चव्हाण तर बर्कलेचे.तरीही राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि जातीयता त्यांनी उघड्या डोळ्याने बघितलीच की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/25/2015 - 09:15 नवीन
त्यामुळे शिकलेल्यांचे जजमेंट चांगले असते का हाच प्रश्न पडायला लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुबोध खरे Wed, 08/26/2015 - 15:02 नवीन
त्यामुळे शिकलेल्यांचे जजमेंट चांगले असते का हाच प्रश्न पडायला लागला आहे. सहमत भारतात लोकसंख्येच्या ५०% लोकांना( टक्केवारी पुढे मागे होईल मुद्दा लक्षात घ्यावा) गरिबी मुळे शिक्षण घेणे परवडत नाही. त्यांना अशिक्षितपणा मुळे मतदानापासून वंचित ठेवणे हे पटत नाही. कारण शिक्षण घेत आले नाही. हा संपूर्णपणे त्यांचा दोष म्हणता येणार नाही. याच वेळेस अनेक नरपुंगव असे आहेत कि जे सुशिक्षित असले तरी त्यांना मताधिकार देणे हा लोकशाहीचा अपमान आहे. उदा. याकुब मेमन हा सी ए होता. परंतु दहशतवादी झाला आणि अख्या यंत्रणेला मरेपर्यंत (आणि मेल्यावरही) वेठीस धरले. तेंव्हा एका माणसाला एक मत हे पटत नसले तरीही शिक्षित माणसाला जास्त मते आणि अशिक्षित माणसाला मताधिकार नाही हेही पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/01/2015 - 08:04 नवीन
केवळ शिकलेले/अशिक्षित असेच नाही तर 'जजमेंट' बर्‍याच स्तरांवर चुकलेले आहे... देशाची घटना तुरुंगात असलेल्या मतदाराला मतदान करू देत नाही पण त्याच तुरुंगात राहून तथाकथित नेता निवडणूकीला उभा राहू शकतो ! अश्याच बर्‍याच 'जजमेंट्स'च्या आधाराने गुन्हेगार पार्श्वभूमीचे नेते कायदे बनवणार्‍या आणि घटनाबदल करू शकणार्‍या सर्वोच्च स्थानासकट (लोकसभा) इतरत्रही घट्ट मांड ठोकून बसलेले असल्याने शासनात व समाजात सकारात्मक बदल घडवणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हुप्प्या Tue, 08/25/2015 - 17:09 नवीन
निवडून आलेले लोक किती शिकलेले आहेत हा मुद्दा गौण आहे. त्यांना निवडून देणारे किती शिकलेले आहेत वा असावेत हा कळीचा मुद्दा आहे. जर जास्त शिकलेल्या लोकांच्या मताची किंमत जास्त असती तर कदाचित केजरीवाल निवडून आलाही नसता. अडाणी लोकांच्या तुलनेत शिकलेले मतदार जास्त प्रगल्भ असतात असे मलाही वाटते पण त्याला पाठबळ देणारी उदाहरणे सुचत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/25/2015 - 19:01 नवीन
अडाणी लोकांच्या तुलनेत शिकलेले मतदार जास्त प्रगल्भ असतात असे मलाही वाटते पण त्याला पाठबळ देणारी उदाहरणे सुचत नाहीत.
असे वाटायचे गृहितक कोणते--मला वाटते की शिकलेले मतदार अधिक प्रगल्भ असतात असे वाटायचे गृहितक हे की शिकलेल्यांचे जजमेन्ट न शिकलेल्यांपेक्षा जास्त चांगले असते.मलाही पूर्वी तसेच वाटायचे. पण मतदारांच्या बाबतीत तशी उदाहरणे दाखवता येणे अर्थातच शक्य नाही.म्हणून ज्या शिकलेल्यांचे जजमेन्ट न शिकलेल्यांपेक्षा जास्त चांगले असतेच असे नाही याचे उदाहरण म्हणून निवडून गेलेल्यांचे उदाहरण दिले.मान्य आहे की मतदारांचे उदाहरण द्यायला हवे पण तसा विदा अर्थातच उपलब्ध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
न
नाखु Wed, 08/26/2015 - 13:44 नवीन
पण साक्षर आणी सुशिक्षीत यातच खरी मेख असावी असे वाटते कारण आपली पूर्वसूरी मते-आदर्श पुन्हा तापासण्याची आवश्यक्ता वाटत नाही,अन्यथा वरील पैकी एकही उमेदवार पात्र नाही या पर्यायाला पाठींबा/जोरदार अनुमोदन असे काहीही दिसत नाही. सुशिक्षीत थोडे ४ हात लांब आणि उदासीनच राहतात मतदान प्रक्रियेपासून. किमान २ वर्षे निवडणूक बूथवरील अनुभवी. नाखुस पांढरपेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 08/26/2015 - 14:08 नवीन
अन्यथा वरील पैकी एकही उमेदवार पात्र नाही या पर्यायाला पाठींबा/जोरदार अनुमोदन असे काहीही दिसत नाही.
याचे कारण वरीलपैकी कोणी नाही या पर्यायाला दात (teeth) नाहीत हे असेल का? समजा पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते नोटाला मिळाली तर निवडणुक रद्द होऊन नव्याने निवडणुक होणार असेल तरच नोटाला दात आहेत असे म्हणता येईल. सध्याच्या परिस्थितीत नोटाला मत देणे म्हणजे मतदानाला न जाण्यापेक्षा वेगळे नाही.या पर्यायाला पाठिंबा मिळत नाही त्याचे हे कारण असू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अस्वस्थामा Wed, 08/26/2015 - 14:49 नवीन
पण क्लिंटन भौ.. ती मते टक्केवारीसाठी का होईना पण विचारात घेतली जातातच की. जे मतदानास जातच नाहीत त्यांची मते तशा अर्थाने ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत. जरी अत्ता दात नसले तरी किमान एका ठिकाणी जरी असे "नोटा"ची टक्केवारी जास्त झाली उमेदवारांच्या मतापे़क्षा तर काय होते ते पहायला आवडेल. नव्हे तो एक प्रकारचा जनमताचा रेटाच असेल ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 08/26/2015 - 14:56 नवीन
ती मते टक्केवारीसाठी का होईना पण विचारात घेतली जातातच की
हो बरोबर. पण त्याचा त्यापेक्षा जास्त उपयोग नसतो.
किमान एका ठिकाणी जरी असे "नोटा"ची टक्केवारी जास्त झाली उमेदवारांच्या मतापे़क्षा तर काय होते ते पहायला आवडेल. नव्हे तो एक प्रकारचा जनमताचा रेटाच असेल ना.
तसे झाले तर तो जनमताचा रेटा असेलच.पण जो उमेदवार विजयी घोषित झाला आहे तो "माझ्यापेक्षा नोटाची मते जास्त आहेत" या कारणामुळे खासदार/आमदार पदाचा राजीनामा द्यायची शक्यता फारच थोडी.तसा राजीनामा दिला गेल्यास मात्र या नोटाला दात मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
प
पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 11:46 नवीन
'शिकलेल्यांना' जास्त मताधिकार दिला तर कदाचित उद्या 'अशिक्षितांना' भडकावून रक्ताचे पाट वाहणारा एखादा पॉल पॉट निपजायचा……. 'पैशेवाल्यांना' जास्त मताधिकार दिला तर कदाचित उद्या गरिबांना भडकावून रक्ताचे पाट वाहणारा एखादा माओ निपजायचा……. 'कुलीन लोकांना' जास्त मताधिकार दिला तर कदाचित उद्या गरिबांना भडकावून फ्रेंच राज्यक्रांतीसारखी परिस्थिती यायची……. 'विशिष्ठ धर्मियांना' जास्त मताधिकार दिला तर कदाचित उद्या बाकीच्यांना भडकावून एखादा हिटलर किंवा एखादी अल कायदा / इसीस यायची……. त्याऐवजी आपण जो कररुपी निधी देतोय त्या सरकारच्या लोकप्रतिनिधीला जाब विचारायला शिकलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अर्धवटराव Wed, 08/26/2015 - 17:20 नवीन
लाख मोलाची बात. +१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ख
खटपट्या Mon, 08/24/2015 - 12:48 नवीन
पंखा साहेब, भेटा कधीतरी. आता बसावेच लागणार.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 08/24/2015 - 12:49 नवीन
सोबत, गायब झालेल्या त्या टक्कूमक्कूशोनुला पण घेउन या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 08/24/2015 - 13:00 नवीन
ते मांत्रिकांनाच विचारावे लागेल ! नजर लावली त्या कोवळ्या निरागस बाळाला इथल्या जळक्या डोमकावळ्यांनी ! एक कच्ची कैरी कॅल्शियम कार्बाईडचे इंजेक्शन देऊन अवेळी पिकवली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अस्वस्थामा Mon, 08/24/2015 - 14:22 नवीन
एक कच्ची कैरी कॅल्शियम कार्बाईडचे इंजेक्शन देऊन अवेळी पिकवली....
अग्गागा .. (परत एकदा) बसवला टेंपोत.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
प्यारे१ Mon, 08/24/2015 - 14:53 नवीन
या प्रतिसादासाठी मामलेदारांना कच्ची कैरी फ्लेवर्ड चॉकलेट पैकेट गिफ्ट गिफ्ट गिफ्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
मांत्रिक Mon, 08/24/2015 - 12:52 नवीन
आता बसावेच लागणार. ब्रॅण्ड कोणता आहे? गमतीत घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मांत्रिक Mon, 08/24/2015 - 12:54 नवीन
मापंजी खूप मोठी व्यथा मांडली आहे मनातली. लोकसंख्या १५० कोटीकडे जात आहे. तेव्हा तर काय होईल विचारही करवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ख
खटपट्या Mon, 08/24/2015 - 12:55 नवीन
नाय वो मी नाय त्यातला. फक्त चखणा दाबून खातो आणि खीलवतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ख
खेडूत Mon, 08/24/2015 - 13:00 नवीन
भावना पोहोचल्या. कांही वर्षांनी तुम्हाला त्याची सवय होईल आणि असे वाटणार नाही. न झाल्यास: १. शक्य असल्यास परदेशांत निघून जा - पण तिथे सगळं आलबेल आहे असं नाही. समस्या वेगळ्या आहेत इतकंच ! २. किंवा नोकरी न करता '' गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक'' यांच्यात सामील व्हा . ३. हल्ली प्रत्येक दहा वर्षांत परिस्थिती फारच बदलते. त्यामुळे फार दूरचा विचार कशाला करता? ४. पुनर्जन्म नसतो , यावर ठाम राहणं चांगलं. जर असता तर आपल्याला मागच्या वेळचं आठवलं असतं कदाचित. ते फीचर नसेल तर असलेला पुनर्जन्म निरर्थक नाही काय?
मुंबई पुण्यात जर एक साधे घर येत नसेल तर माणसाने करायचे तरी काय?
आपल्याला मुंबई पुण्यातच घर का घ्यायचंय? मी पुण्यात घेतलेलं घर भाड्याने दिलंय - घराच्या किमतीच्या ०.०१ % भाडं मिळतं - तेही करपात्र आहे ! मग भाड्याच्या घरातच राहिलेलं काय वाईट? गेल्या दशकात वाढलेली किंमत ही जमेची बाजू- पण विकत नाही तोपर्यंत निरर्थक. विकले तरी पुन्हा दुसरे घर घेणे आले. नाहीतर …
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 08/24/2015 - 13:14 नवीन
'जगायचं' असेल तर मुंबय सोडा. फक्त 'जीवंत' राहून खुश असाल तर नको.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/24/2015 - 15:33 नवीन
+१ अगदी हेच म्हणावेसे वाटते ! दुनियाभरचा टॅक्स भरुन कमालिचे कष्टप्रद जीवन जगावे लागत आहे, आजचा भरवसा उध्याचे काय ? असे विचार मनात यावेत अशी परिस्थीती वाटते, सध्या डाळीचे भाव आणि रडवणारे कांदे चर्चेत आहेत ! दुष्काळ गंभीर आहे आणि बळीराजाच्या बळींची आकडेवारी काही केल्या थांबताना दिसत नाही ! :( आज महाराष्ट्रात भयानक अवस्था असुन, राजकारणी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करताना पातळी सुद्धा सोडुन मोकळे झाले आहेत ! नाना आणि मकरंद यांनी बीडचा दौरा केला तेव्हा खरे बीड दर्शन या "पुरोगामी' महाराष्ट्राला घडले. :( काय बातम्या वाचाव्यात हेच आजच्या काळात कळत नाही ! रोज बलात्कार, आत्महत्या, चोर्‍या, दुष्काळ सगळच भयानक ! :( हल्ली काय करावे आणि पहावे तेच कळेनासे झाले आहे ! :( सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे आणि मरणे महाग ! :(

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 08/24/2015 - 14:00 नवीन
भले त्यांच्या नावाने आणि ब्रेन ड्रेन म्हणून कोणी कितीही कोकलो पण ते एका अर्थाने शहाणेच म्हणायचे
सहमत.
  • Log in or register to post comments
P
palambar Mon, 08/24/2015 - 15:20 नवीन
आगदि मनातल बोल्लात. पण धिर सोडुन कसे चालेल? सकारात्मक विचार करा.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 08/24/2015 - 21:19 नवीन
चांगल्या गोष्टी पण बघा ना राव !
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 08/25/2015 - 02:35 नवीन
या चर्चेत आलेल्या मतदानाच्या हक्कांसदर्भात रोगा पेक्षा इलाज भयंकर...असे म्हणावेसे वाटते. समाजातील फक्त एकाच वर्गास मताचे अधिकार दिले अथवा अगदी त्यांच्या मताला जास्त मुल्य दिले तर एक विचित्र वर्गवाद आपण तयार करू. त्या शिवाय ज्यांच्याकडे पैसे आहेत, संपत्ती आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अधिक सत्ता आहे त्यांच्याकडे कालांतराने सगळीच सत्ता, त्यातील कायदे सगळेच एकवटणार आणि "नाहीरे" वर्गाचे हाल होणार. आधी जाती होत्या आता वर्ग येतील इतकाच फरक. यातून बाकी काही नाही तरी नविन उद्रेकाची तयारी होणार.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/25/2015 - 19:15 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 08/25/2015 - 06:24 नवीन
मत देण्याचा हक्क फक्त कर देणारालाच दिला तर बराच फरक पडेल.
शेतकर्‍याला प्राप्तिकर नसल्यामुळे देशातील सर्वात मोठा वर्ग मतदानापासून वंचित राहील, त्याचे नेतृत्व कोण करणार? प्राप्तिकर न भरणार्‍यांना मतदानाचा अधिकार का नसावा? मी तर म्ह्णतो असं असेल तर मतदानाचा हक्क नसणार्‍याकडून सरकारने कोणतेही कर घेऊ नये.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 08/25/2015 - 10:03 नवीन
तुम्हाला, तुमच्या जवळच्यांना सेफ्टी हवी असेल, तर कुणालातरी त्यासाठी खर्च करावा लागणार आहे. ज्याप्रमाणे नुसती दवंडी पिटून मधल्या चौकातल्या हंड्यात फक्त पाणीच जमा होऊ शकतं, दुध नाही, त्याप्रमाणे कठोर शासन/ डर असल्याशिवाय करही नाही आणि कुणालाच सुरक्षाही नाही. त्यात खंत करण्यासारखं काये?
गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक अलाहिदाच राहणार नेहमीच ….
वाट्टेल ते!! नोकरी कुणाची करतात पांढरपेशे नोकरदार लोक? दुसर्‍यांना नोकरी देणारे व्यापारी, राजकारणी, बुवा/बाबा किती वेळा स्वतःला गहाण ठेवतात याची कल्पना नाही का तुम्हाला? नुसते अलाहिदा नाही रहात ते. किंमत देतात त्या अलाहिदा रहाण्याची. एक व्यापारी, राजकारणी, बुवा, बाबा हे एक व्यवस्था उभी करतात. त्यात स्वतःला पूर्ण गुंतवून घेतात. ही १० ते ६ अशी आठ तासाची गुंतवणूक नाही. पूर्ण चोवीस तासांची गुंतवणुक आहे. आणि त्यामधून हे लोक इतर अनेक लोकांच्या- त्यात पुन्हा नोकरदारही आले, बुवा/बाबा आले, राजकारणीही आले- उपजीविकेची सोय करतात. भ्रष्टाचाराला शिव्या देणं फार सोपं आहे. पण समजा, जर भ्रष्टाचार केला नाही तर ही व्यवस्था बंद पडेल आणि कमीत कमी एक निर्दोष माणसाची उपजीविका धोक्यात येइल अशा परीस्थितीत जर एखाद्याने भ्रष्टाचार केला तर तो दोष कुणाचा? नोकरदाराला माहित असतं सगळं. पटत नसेल, तर सोडून द्या ना ती नोकरी! तरीही तो नोकरी करतो ना तिथेच. तो नाही अलाहिदा राहिला? माझ्या विचारसरणीत काही दोष असतीलही. भ्रष्टाचाराचं समर्थन मी करत नाही. फक्त ज्या पद्धतीने आपण सोडून बाकी सगळे भ्रष्टाचारी ही विचारसरणी बाळगली जाते अनेक नोकरदार पांढरपेशांकडनं ती माझ्या डोक्यावरनं जाते.
निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ… रस्त्यावरचे हजारो खड्डे , लोकलची गर्दी , एक न दोन हजार कारणं !!
रस्त्यावरचे खड्डे? निकृष्ट खाद्य? लोकलची गर्दी? ह्या समस्या आहेत? उद्या खायला मिळेल की नाही? रस्ता जाऊ दे, डोंगरवाटेवरनं किंवा नदी पार करून तरी कामावर जायला मिळेल की नाही? काही काम मिळेल की नाही? मला कुणी ठार तर मारून टाकणार नाही खालची मान वर केली म्हणून? हे काय आहे मग? तुम्ही किंवा मीही, त्यांच्या समस्या सोडवू शकत नाही. पण कुणीतरी तरी सोडवायला हव्यातच ना? तो जो कोण आहे, त्याला तुम्ही कसं पटवून देणार की तुमची समस्या ही त्या समस्यांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे? मुळात तुमचं तुम्हाला तरी म्हणावंसं वाटेल का की तुमची समस्या एवढी मोठी आहे, की तुम्ही या देशावरच वैतागावं? कसल्या प्रश्नांनी स्वतःचा छळ करून घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे... (आपण जुने सदस्य दिसत आहात. लहान तोंडी मोठा घास होत असल्यास क्षमस्व...!)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/25/2015 - 11:31 नवीन
तुम्हाला, तुमच्या जवळच्यांना सेफ्टी हवी असेल, तर कुणालातरी त्यासाठी खर्च करावा लागणार आहे.
मान्य आहे पण आम्हाला सेफ्टी हवी म्हणून आम्ही आमच्या बरोबरच बाकीच्या लोकांनाही मिळतेय की… बाकीचेच काही करत नाहीत पण तरीही त्यांचे हक्क अबाधित आहेत …. त्यांचा भार समाजाच्या एकाच विशिष्ट वर्गावर येतोय हे पटत नाहीये …. हे म्हणजे घरच्या मोठ्या भावाने कमवून आणावे आणि उरलेल्या अख्ख्या परिवाराने हातपाय न हलवता आयतेच बसून खावे असं झालंय …
मुळात तुमचं तुम्हाला तरी म्हणावंसं वाटेल का की तुमची समस्या एवढी मोठी आहे, की तुम्ही या देशावरच वैतागावं? कसल्या प्रश्नांनी स्वतःचा छळ करून घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे...
छळ असा ना तसा होतोच आहे …. ज्याची जळते त्यालाच कळते …. त्रागा तोच करतो जो सगळा भार एकटाच वाहून दबलेला असतो …देशावर वैतागायचं प्रमुख कारण हेच आहे की त्यातल्या समाजधुरिणांना ह्याच बाबतीत सोयीस्करपणे दिग्मूढ का व्हायला होतंय हे कळत नाहीये ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 08/25/2015 - 12:25 नवीन
त्यांचा भार समाजाच्या एकाच विशिष्ट वर्गावर येतोय हे पटत नाहीये …. हे म्हणजे घरच्या मोठ्या भावाने कमवून आणावे आणि उरलेल्या अख्ख्या परिवाराने हातपाय न हलवता आयतेच बसून खावे असं झालंय …
कसं? काहीतरी उदाहरण द्या ना कि कोण हातपाय न हलवता तुमच्या कष्टांवर मजा करतोय?
देशावर वैतागायचं प्रमुख कारण हेच आहे की त्यातल्या समाजधुरिणांना ह्याच बाबतीत सोयीस्करपणे दिग्मूढ का व्हायला होतंय हे कळत नाहीये
समाजधुरीण समाजाबाहेरचे असतात का? तुम्ही व्हा समाजधुरीण? (रच्याकने समाजधुरीण म्हणजे नेते असं समजून लिहितोय..मला ह्या शब्दाचा नक्की अर्थ माहित नाही.). समस्या सांगू नका. समस्या माहित आहेत. त्यांची उत्तरं सांगा. समस्यांपासून दूर जायचं म्हणलं तर या उभ्या विश्वात कुठेतरी जागा मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/25/2015 - 14:25 नवीन
काहीतरी उदाहरण द्या ना कि कोण हातपाय न हलवता तुमच्या कष्टांवर मजा करतोय?
तुम्हाला खरंच आजूबाजूची परिस्थिती दिसत नाहीये की तुम्ही मुद्दामून डोळेझाक करताय? जे चाललाय ते छान चाललाय असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग खुंटलाच संवाद ! राहायला भारतातलेच ना तुम्ही ? मुंबईत घुसलेले यच्चयावत घुसखोर, बांगलादेशी, नायजेरियन दिसत नाहीत का तुम्हाला ? अनधिकृत झोपडपट्टी मधली वीज, पाणी, रेशन कार्ड कुठून येतात? किती उदाहरणं देऊ? का पोसायचं आपण ह्यांना?? प्रश्न खूप आहेत हो, उत्तरंच नाहीयेत कुणाकडे !!
समस्या सांगू नका. समस्या माहित आहेत. त्यांची उत्तरं सांगा.
तुमचे शब्द ऑफिसातल्या बॉससारखे वाटतात …. उत्तरं परिस्थितीसापेक्ष असतात …प्रश्न हा अस्तित्वाचा आहे आणि माणूस हा कळपात राहणार प्राणी असल्याने सगळ्या कळपानेच मिळून शोधायची उत्तरं !! मी कुणी नेता किंवा हुकुमशहा नाही पण जे चाललाय ते चूक आहे इतका कळतंय … तुम्हीही तुमची भर घाला की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 08/25/2015 - 15:56 नवीन
तुम्हाला खरंच आजूबाजूची परिस्थिती दिसत नाहीये की तुम्ही मुद्दामून डोळेझाक करताय? जे चाललाय ते छान चाललाय असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग खुंटलाच संवाद ! राहायला भारतातलेच ना तुम्ही ? मुंबईत घुसलेले यच्चयावत घुसखोर, बांगलादेशी, नायजेरियन दिसत नाहीत का तुम्हाला ? अनधिकृत झोपडपट्टी मधली वीज, पाणी, रेशन कार्ड कुठून येतात? किती उदाहरणं देऊ? का पोसायचं आपण ह्यांना?? प्रश्न खूप आहेत हो, उत्तरंच नाहीयेत कुणाकडे !!
मला मुंबईतली परीस्थिती माहित नाही हे तर खरंच आहे. पण एक कळतं मला, की जसे काही काही मुंबईकर काही काही लोकांना घुसखोर समजतात तसेच तुम्ही गोर्‍या लोकांच्या देशात गेल्यावर काही काही (!) लोक तुम्हाला घुसखोर समजतात. मागे एकदा अमेरीकेत एका शीख धर्मस्थळावर हल्ला झाला होता. त्यावेळी मी एका संघटनेबद्दल ऐकलं होतं- व्हाइट सुप्रीमसी. तुम्ही ऐकलंय का?
सगळ्या कळपानेच मिळून शोधायची उत्तरं
ग्रीस मधल्या सार्वमतासारखी?
तुमचे शब्द ऑफिसातल्या बॉससारखे वाटतात ….
मान्य...! एस बी आय च्या एका शाखेत मी ते वाचलं होतं. मी कधी कधी सोडून देतो ते वाक्य ती माझीच अक्कल असल्यासारखं. पण त्याने काय फरक पडतो? कळप झाला की काय आपोआप उत्तरं सापडतात? कुणीतरी दोघे चौघे काहीतरी उत्तरं देतात आणि त्यातलंच एक निवडलं जातं ना? मुळात समस्या ज्यांना दिसतीये, जे मांडतायत, त्यांनी त्याच्यावर इतरांपेक्षा जास्ती विचार केलेला आहे म्हणूनच ते मांडतायत ना? की त्यांना असं वाटतंय की इतरांना कुणाला ही समस्या आहे हेच माहित नैये? मुळात तुम्ही मांडलेले प्रश्न हे अत्यंत मर्यादीत स्वरूपाचे आहेत. मुंबई सोडली की प्रश्न संपले असे. आणि मुळ मुद्द्यापासून वेगळे आहेत. मी असं म्हणलो होतो - तुम्ही तो मुद्दा आणलात म्हणून - की स्वतः हातपाय न हलवता- "तुमच्या" कष्टांचा फायदा कोण घेत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/25/2015 - 16:08 नवीन
उरलेले सगळे आयतोबा खातायत.....गुंड, राजकारणी,बुवा आणि फुकटे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 08/25/2015 - 16:43 नवीन
उरलेले सगळे आयतोबा खातायत.....गुंड, राजकारणी,बुवा आणि फुकटे !!
यावर वाद घालणं अवघड आहे. आपण माझा मूळ प्रतिसाद वाचलेला नाही का? तरी एक प्रयत्न करतो... किती गुंडांना पोसता तुम्ही? गुंड होणं म्हणजे काहीच न करणं असं वाटतं का तुम्हाला? राजकारणी? राजकारणी आयतोबा? दिवसाचे अठरा अठरा तास जनसंपर्क ठेवणारे राजकारणी आयतोबा? तुमच्या दारासमोर रस्ता बांधायचा कि नाही, जवळ एयरपोर्ट असू दे की नको, शेतीला किती पाणी सोडावे, प्यायला किती सोडावे, अहो आयुष्याचा एक तरी पैलू आहे का असा, जिथे तुमच्या नकळत या राजकारण्यांच्या निर्णयांनी तुमचं अमाप भलं केलेलं नाही? वर जनता चांगलं न म्हणता वाईटच म्हणणार याची गॅरंटी - यापेक्षा नि:स्वार्थ सेवा कुणी केली असेल तर दाखवा! बुवा? - एवढंच म्हणतो की हे संवेदनशील असून मी त्यावर भाष्य न करायचा नियम ठरवून घेतलेला आहे. फक्त मी त्यांना आयतोबा मानत नाही हे खरं. शिवाय देश म्हणजे फक्त गुंड, राजकारणी, बुवा नाही. तुम्ही तुमच्यासारख्या इतर लोकांसाठी पण तर कष्ट करतच आहात ना? आता तुमच्या बागेमुळे संपूर्ण परीसराला शोभा येत असेल, तर तुम्ही ती बाग अजून सुंदर करणार की अर्र, त्या अमुक अमुकलाही माझ्या बागेचा फायदा होतोय म्हणून कुढणार? बाग तर तुमचीच रहाणार ना? रच्याकने, "तुम्ही" कष्ट -(म्हणजे जे काय तुम्ही- तुम्ही स्वतः एक व्यक्ती म्हणून- करता ते) केले नाहीत तर यांचं पोषण होणार नाही असं तुम्हाला कशावरून वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/25/2015 - 18:16 नवीन
असो.....उडदामाजी काळे गोरे.....तुम्ही असल्या लाख फुकट्यांची भलामण करायलाच टपला आहात....चिंताच मिटली मग !....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 08/25/2015 - 18:37 नवीन
मग चर्चाच नको? तुमच्याविरुद्ध मत मांडलं तर आता माझा वादासाठी वाद? स्वतःला थोडाही त्रास झाला की डायरेक्ट देश सोडायच्या तयारीत असलेले लोक वाद तरी कसा नेटाने घालतील म्हणा... असो. तुमची मर्जी. फक्त एक सल्ला. एक तक्ता मांडा. त्यात मुबई आणि देशातील इतर भाग असे दोन भाग करा. त्या दोन्ही भागात आता त्या त्या भागात रहाण्याचे फायदे, तोटे मांडा. मुंबईत समस्या वेगळ्या असतील कदाचित पण मुंबईत सोयीसुविधा पण इतरांपेक्षा जास्त मिळतात असं माझं मत आहे. तुमची मतं शेअर केलीत तर आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/25/2015 - 18:51 नवीन
कनफ्युस्ड होऊ नका.... तुमचं वक्तव्य म्हणजे ना शेंडा ना बुडखा.... चर्चा नको असं कोण म्हणतंय? तुम्हीच इमारत गच्चीपासून बांधायला घेतलीये तर कोण काय करेल? मी देश सोडतोय हे अगाध "ण्याण" तुम्हाला कुठून झालं देव जाणे? उलट मलाच तुम्ही करचुकव्यांचे प्रतिनिधी वाटायला लागला आहात.... मुंबई विषयी आकस बराच दिसतोय.... कशामुळे असावं हो असं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 08/25/2015 - 18:59 नवीन
माझ्या पहिल्या प्रतिसादातलं "क्षमस्व" हे अनाठायी होतं, हे दाखवून दिलंत. धन्यवाद. तुमची मर्जी. मुंबईबद्दल माझ्या मनात आकस नाही. सोयी मिळतात हे मी कौतुकाने लिहिलं आहे. मला मुंबईबद्दल आणि मुंबईकरांबद्दल कमालीच्याबाहेर आदर आहे. आपल्याइतका मागचा पुढचा विचार न करता अनोळखी माणसांबद्दल अपमानास्पद लिहिणारा मुंबईकर मात्र मी पाहिलेला नाही. स्वतःच्या चर्चेचे स्वतःच बारा वाजवून घेतलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/25/2015 - 19:11 नवीन
जरा अंदाज चुकला तुमचा.....क्षमस्व हे तुमचं तुमच्यासाठीच.... तुमची ष्टाईल आवडली बर्का..... आधी क्षमा मागून नंतर पाणी फिरवायचं.. असल्या गोष्टीने चर्चेचे बारा वाजण्या इतकी पोकळ चर्चा नाही चालू इथे ! तुम्ही मात्र उद्या बोला प्रकृतीला आराम पडल्यावर...आज खूपच तसदी घेतलीत... चालू द्या तुमचं निर्रथक आत्मरंजन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 08/25/2015 - 19:14 नवीन
तुम्ही सातत्याने वैयक्तिक का बोलत आहात? मी तर आपल्याला ओळखतही नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/25/2015 - 19:19 नवीन
असो.... आमच्याकडून येथेच पूर्णविराम... चर्चेच्या अनुषंगाने काही सुयोग्य आणि मुद्देसूद मुद्दा असेल तर जरुर बोला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 08/25/2015 - 19:28 नवीन
आणि स्वतःच अपमान करून स्वतःच असो म्हणून काही उपयोग नाही. ज्याचा अपमान केलेला आहेत त्याने असो म्हणायला हवं. आपण शेंडा ना बुडखा म्हणलात म्हणून माझे मुद्दे तसे होत नाहीत. मुद्दे मांडलेले होतेच. त्यांना उत्तर द्या. लक्षात आले नसतील तर सभ्य भाषेत विचारा. मी परत सांगीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा