भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत.
ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते.
प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
खर तर आपणही अमेरिकनांसारखे वागले पाहिजे, जसे तिथे लहानपणापासून मुलांना स्वावलंबी बनवले जाते. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट मध्ये कामे करून स्वत:चे शिक्षण करतात. तसे भारतीय मुलांना आई-वडिलांनी करायला लावायला पाहिजे.हे सरसकटीकरण झाले ! अमेरिकन जीवन पद्धतीत जसे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. १. अमेरिकेतही ज्या आईवडिलांना परवडते ते मुलाची पोस्ट्ग्रॅजुएट (ज्याला ते कॉलेज/ग्रॅज्युएशन म्हणतात) शिक्षणाच्या खर्चाची एजुकेशन फंड, बचत, इ तून तरतूद करतात. अमेरिकेत शैक्षणिक कर्ज जास्त सुलभपणे मिळते आणि ते निवडणूकीतला महत्वाचा मुद्दाही असते. पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट, इ त काम करून मिळणारे उत्पन्न शिक्षणाच्या खर्चाला पुरेसे नसते... त्याच्याकडे एक अतिरिक्त (सप्लिमेंटरी) आवक इतकेच पहाता येईल. २. ज्यांच्या पालकांना उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही असे अनेकजण ग्रॅज्युएट (ज्याला ते हायस्कूल म्हाणतात) शिक्षणानंतर नोकरी करून पैसे साठवून अथवा स्वतःच्या नोकरीच्या बळावर शिक्षणकर्ज काढून पोस्टग्रॅजुएशन करतात. ३. शिक्षण चालू असतानाही स्वावलंनाची सवय असली तर ते नक्कीच चांगले आहे. पण, ज्या पाल्याच्या पालकांमध्ये शिक्षणाचा खर्च उचलण्याची ताकद आहे त्या पाल्यांना शिक्षणात अधिक वेळ खर्च करता आला तर ते पाल्याच्या भवितव्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. ३. एखादी परदेशी पद्धत अंगिकृत करताना तिच्यातले सर्वच आपल्या देशातल्या वस्तूस्थितीत आणि तेही सर्वच माणसांना लागू पडेलच असे नाही... त्यामुळे त्यातले फक्त आपल्यासाठी चांगले तेवढेच उचलावे, अंधानुकरण टाळावे. मुख्य म्हणजे चांगल्या गोष्टी केवळ पश्चिमेकडूनच येतात असे नाही... पूर्व, उत्तर, दक्षिणेकडूनही येऊ शकतात किंबहुना आपण डोके लढवले तर आपल्या इथेही त्या जन्मू शकतात... आपण डोळे उघडे ठेवून निष्पक्षपातीपणे त्यांचे विष्लेशण करून योग त्याचा आणि योग्य तेवढ्याचा स्विकार करणे जास्त फायद्याचे ठरेल.