ज्ञानेश्वरी- भाग-१ - प्राणेश्वरासाठी
भुमिका
ज्ञानेश्वरी तील स्त्री संदर्भातील या ओव्यांवीषयी वाचकांचे मत काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.आणि ज्ञानेश्वरीतील आणि एकुणच धर्मग्रंथांतुन व्यक्त/ ध्वनित (प्रतिके आदिंतुन ) होणारया मानवी मुल्यां चे समकालीन स्थान, धर्मग्रथांची कालबाह्यता वा कालातीतता, चिकीत्सेतुन निवड करण्याची निकड, या मुल्यांचा आजच्या जगण्याशी संबंध आदि. संदर्भातील मांडणी या अंगाने चिकीत्सा विचारमंथन व्हावे अशी इच्छा. यासाठी माझी निवड ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. तर स्त्री संदर्भातील या निवडक प्रातिनीधीक अशा ओव्या एकत्र करण्याचा मी एक छोटा प्रयत्न केलेला आहे. या शिवाय अजुन ही आहेत ती त्रुटी एकंदर चर्चेतुन मंथनातुन पुर्ण व्हावी अशी अपेक्षा. जाणकारांनी चुका दाखवल्यास स्वागत आहे. खालील प्रातिनीधीक ओवीत न आलेला स्त्री संदर्भातील एखादा वेगळा विचार असलेली ओवी आल्यास त्याचेही अर्थातच स्वागत त्याने चर्चा व्यापक व अर्थपुर्ण होईल.
ओवी चा संदर्भ लवकर लागावा म्हणुन काहि ठीकाणी पुढची मागची ओवी जोडुन घेतलेली आहे व काही ठीकाणी पुनुरुक्ती टाळण्यासाठी निवडक ओव्या घेतल्या आहेत. शक्यतो संदर्भ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकला असल्यास जाणकारांनी दाखवुन द्यावा.
१- दुर्योधना च्या तोंडी आपल्या बाजुच्या वीरांची स्तुती करतांना आलेले खालील उद्बार संदर्भातील ओवी
हे अप्रतिमल्ल जगीं , पुरता प्रतापु अंगीं परी सर्व प्राणे मजचिलागीं, आराइले असती.
पतिव्रतेचे ह्र्दय जैसे, पतीवांचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे, सुभटांसी
अर्थ- अंगी पुर्ण प्रतापी असलेले, जगात अजिंक्य वीर म्हणुन प्रसिद्ध असलेले, प्राणपणाने लढण्यासाठी माझ्या बाजुला आलेले आहेत. पतिव्रतेचे चित्त पतीशिवाय इतरांना स्पर्श सुद्धा करीत नाही. त्याचप्रमाणे या सर्व योद्ध्यांचे मीच श्रद्धासर्वस्व झालो आहे. (अ-१ ओ-११०-१११)
२- अर्जुन मोहित झाल्या संदर्भातील त्याच्या अवस्थेचे वर्णन करणारी ओवी
नविये आवडीचेनि भरें, कामुक निज वनिता विसरे, मग पाडेवीण अनुसरे, भ्रमला जैसा.
अर्थ- नवयौवनाचा बहर असलेल्या नव्या स्त्रीच्या प्रेमभरात लंपट पुरुष स्वत:च्या पत्नीला विसरतो. आणि त्यास्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन बेतालपणे तिच्या म्हणण्या प्रमाणे वागतो.
पाडेवीण- योग्यतेविना, निज वनिता- स्वत:ची पत्नी ( अ-१ ओ-१८७)
३- अर्जुनाने क्षत्रियाचा स्वधर्म आचरला नाही तर त्याची स्थिती कशी होइल या संदर्भातील ओवी.
जैसी भ्रतारेहीन वनिता, उपहति पावे सर्वथा, तैसी दशा जीवीता, स्वधर्मेवीण.
अर्थ- ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्री सर्वांकडुन अपमानित होते, त्याप्रमाणे ( हे अर्जुना ) स्वधर्माचा त्याग केल्यावर त्या जीवाची ( अशी ) दशा होते.(अ-२ ओ-१९९)
४- अविवेकी लोक धर्म कसा घालवितात त्या संदर्भातील उदाहरण देणारी ओवी.
जैसी रांधवणी रससोय निकी, करुनियां मोलें विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मु.
अर्थ- ज्या प्रमाणे गृहीणी स्वयंपाकीणीने ( रांधणारीने ) उत्तम रसपुर्ण स्वयंपाक करावा आणि तो द्र्व्याच्या लालसेने विकुन टाकावा ( कुटुंबीयांना वाढण्याचा धर्म न पाळता ) त्या प्रमाणेच हे अविवेकी लोक सुखोपभोगाच्या लालसेने हाती आलेला धर्म व्यर्थ घालवितात.(अ-२ ओ-२५४)
५- स्वधर्माचे पालन नाना देवदेवतांच्या पुजनापेक्षाही कसे अधिक महत्वाचे आहे या संदर्भातील ओव्या.
देवतांतरा न भजावे, हे सर्वथा कांही न करावे, तुम्ही स्वधर्मयज्ञी यजावे, अनायासे.
अहेतुके चित्तें, अनुष्ठा पां ययाते, पतिव्रता पतीतें, जियापरी
तैसा स्वधर्मरुप मखु, हाचि सेव्यु तुम्हां एकु, एसे सत्यलोकनायकु, म्हणता जहाला.
अर्थ- नाना प्रकारच्या देवतांचे पुजन करु नका , विनासायास ( सहज ) घडणारा स्वधर्माचरणाचा यज्ञ करीत जा. पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे पतीची एकनिष्ठपणे सेवा करते (स्वधर्म आचरते) त्याप्रमाणे निष्काम बुध्द्नीने स्वधर्माचे आचरण करा. कारण तुम्हाला हाच एकमेव स्वधर्मरुपी यज्ञ अनुष्ठान करण्यास उचित आहे. असे सत्यलोकांचा स्वामी ब्रह्मदेव म्हणाला. (अ-३ ओ-९१-९२-९३)
६-
स्वधर्म आचरण्यास कीतीही कठीण वाटला तरी परधर्मापेक्षा तो आचरणेच कसे योग्य श्रेयस्कर आहे ( परधर्मो भयावह:) चे उदाहरण पटवुन देतांना दिलेल्या ओव्या.
सांगे शुद्रघरीं आघवीं, पक्वान्ने आहाती बरवीं, तीं द्विजें केंवी सेवावीं, दुर्बळु जरी जाहला.
हे अनुचित कैसेनी कीजे, अप्राप्य केवीं, इच्छिजे, अथवा इच्छिलेंही पाविजे, विचारीं पां
हें असो वनिता आपुली, कुरुप जरी जाहली, तरी भोगितां तेचि भली, जियापरी.
अर्थ- मला असे सांग, शुद्राच्या घरी मधुर चवीची पक्वान्ने आहेत, आणि एखादा दरिद्री ब्राह्मण आहे म्हणुन त्याने ती सेवन करावी का ? असे अनुचित कृत्य दरिद्री ब्राह्मणाने कसे बरे करावे? जे घेण्यास योग्य नाही अशा गोष्टीची का इच्छा करावी ? इच्छा करुन अशा पक्वान्नांची प्राप्ती जरी झाली तरी त्याचे सेवन करावे का ?
हे असु दे आपली धर्मपत्नी कुरुप असली तरी तिलाच भोगणे हेच योग्य असते याप्रमाणे.(अ-३-ओ-२२१-२२२-२२४)
७- स्वत:च्या साहित्याची बोलण्या ची गुणवैशिष्ट्ये सांगतांना माझे बोलणे कसे आहे ? तर ते
जेथ साहित्य आणि शांति, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्यगुणकुळवती आणि पतिव्रता
आधींच साखर आवडे, तेचि जरी ओखदीं जोडे, तरी सेवावी ना का कोडे नावानावा.
अर्थ- ज्याप्रमाणे एखादि स्त्री लावण्य रुप , गुणसंपन्न आणि कुळ (उच्चकुलीन आहे ) इतकच नव्हे तर शिवाय पतिव्रता देखील आहे ( दुग्ध शर्करा योग जणु ) त्याप्रमाणे माझ्या बोलण्यात साहित्य आणि शांती यांच्यातील बोलक्या सीमारेखा दिसतील.
मुळातच साखर आवडते आणि तीच जर औषध म्हणुन मिळाली तर आवडीने पुन्हापुन्हा (नावानावा) का खाऊ नये ?
(अ-४ ओ-२१८ )
८- भगवंत भक्तीची महती सांगतांना च्या संदर्भातील ओवी ज्यात लक्ष्मी चे वर्णन येते जीच्या घरी श्री सारख्या दासी आहेत, जिच्या संपत्तीची कोणी बरोबरी करु शकत नाही, जिच्या दासींनी एखाद्या झाडाकडे जरी पाहीले तरी तो कल्पवृक्ष होतो आदि वर्णन आलेल्या ३ सलग ओव्यानंतर लक्ष्मी संदर्भात खालील ओवी येतेय
एसे जियेचियां जवळिकां, सामर्थ्य घरिचियां पाइकां, ते लक्ष्मी मुख्यनायका न मनेचि एथ.
मग सर्वस्वे करुनि सेवा, अभिमान सांडुनि पांडवा, ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली.
अर्थ – अशा जिच्या सहवासांतील दासींची शक्ती आहे, अशी जी ऎश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही.
हे पांडुपुत्रा ती अभिमान सांडुन सर्वार्पण (संपुर्ण समर्पण ) भावनेने जेव्हा सेवा करु लागते तेव्हा ती कुठे माझे चरण चुरायला लायक होते पात्र होते.(अ-९-ओ-३७६-३७७)
९- बाहेरी धीट जैसी, दाटुगा पति कळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी
जसे घराबाहेर व्याभिचाराचे साहस करणार्याु स्त्रीला जसा खोलीत कोंडुन ठेवतो त्याप्रमाणे अंत:करणाच्या एकुण एक हालचालींवर जो निरंतर नजर ठेवतो. (अ-१३ ओ-५०५)
१०-अज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगतांना अज्ञानी पुरुष कोण असे सांगतांना आलेल्या ओवींपैकी या ओवी
म्हातारपणी जालें, माणिक एक विपायिलें, तयाचे का जेतुलें, माता पितरा.
तेतुलेनि पाडे पार्था, घरीं जया प्रेम आस्था आणि स्त्री वांचुनि सर्वथा जाणेना जो
तैसा स्त्री देही जो जीवे. पडोनियां सर्वभावे कोण मी काय करावे काही नेणें
चित्त आराधी स्त्रीयेचे आणि स्त्रीयेचेनि छंदे नाचे माकड गारुडीयाचे जैसे होय.
स्त्रीयेचां तरी विखीं भोगुसंपत्ती अनेकी आणी वस्तु निकी जे जे देखे.
प्रेमाथिलेनि भक्ते , जैसेनि भजिजे कूळदैवते, तैसा एकाग्रचित्ते स्त्री जो उपासी.
नायटेयां भेण न मोडिजे नागांची आण तैसी पाळी उणखुण स्त्रीयेची जो
किंबुहना धनंजया स्रीचि सर्वस्व जया आणि तियेचिया जालिया लागी प्रेम
आणिकही जे समस्त तेथिचे संपत्तिजात ते जीवाहुनि आप्त मानी जो का
तो अज्ञानासी मुळ अज्ञाना तेणे बळ, हे असो केवळ तो तेंचि रुप
अर्थ – वृद्धपणी झालेल्या एकमेव पुत्र रत्नाचे आईवडिलास जेवढे प्रेम असते
अरे अर्जुना त्याच प्रमाणे ज्याला घराची आपुलकी आणि प्रेम असते आणि जो स्त्रीवाचुन दुसरे काही मुळी जाणतच नाही.
स्त्री देहाला जो जीव भजुन राहतो आणि मी कोण? काय करावे ? या गोष्टीची ज्याला काहीच जाण नसते.
जसे गारुड्याचे माकड गारुड्याच्या इच्छेप्रमाणे छंदाप्रमाणे वागणारे असते तसा तो स्त्री च्या मनाची पुजा करतो. जो स्त्रीच्या शब्दावर इशार्या वर नाचतो.
तथापि स्त्री साठी ज्या ज्या चांगल्या भेटवस्तु दिसतील त्या आणतो तसेच भोगांची ऎश्वर्य साधने आणतो.
प्रेमळ साधकाने जसे कुलदेवतेला एकनिष्ठेने पुजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो.
ज्याप्रमाणे खरुज-नायट्याच्या भयाने घेतलेली देवीची शपथ मोडवत नाही त्याप्रमाणे असा पुरुष स्त्रीची मर्जी सांभाळत असतो.
अरे अर्जुना फ़ार काय वर्णावे, त्याचे सर्व काय ते एकमेव स्त्रीच असते आणि तिच्यापासुन झालेल्या मुलांवर ज्याचा जीव असतो.
त्या स्त्रीचे सर्व वैभव वस्तु त्याला स्वत:च्या जीवापेक्षा अधिक प्रिय असते.
असा हा पुरुष अज्ञानाचे मुळ आहे. आणि अज्ञानाला च त्यायोगे बळ येते.
(अ-१३ ओ-७८७-७८८-७९०-७९२-७९६-७९७-८००-८०१-८०२)
११- गांवा गेलीया वल्लभु, पतिव्रतेचा विरहक्षोभु, भलतेसणी हानिलाभु, न मनीं जेवी.
अर्थ- प्रिय पती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला जे विरहाचे दु:ख होते त्या दु:खाने पोळलेली ती कोणत्याच फ़ायद्या तोट्याकडे लक्ष देत नाही तिची वृत्ती पतीकडे लागलेली असते.
(अ-१६ ओ-७९)
१२- क्षत्रिया रणी पळोनि जाणें, तें कोंण साहे लाजिरवाणे, कां वैधव्ये पाचारणें, महासतियेतें.
अर्थ- क्षत्रियाला युद्धातुन पळुन जाणे जसे लाजिरवाणे वाटते, कोण मानी क्षत्रिय ही पळुन जाण्याचे कृती लाजिरवाणी कृती सहन करील ? जसे सौभाग्यवती महापतिव्रतेला वैधव्यवाचक नावाने हाक मारणे जसे तिला लाजिरवाणे वाटते. ( विधवा संबोधन जिला लाजिरवाणे वाटते.) (अ-१६-ओ-१७७)
13- तेज-क्षमा- धैर्य, शौच, अद्रोह, अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या माणसांमध्ये असतात. ( हा अर्थ असलेल्या मुळ गीतेचा श्लोक समजावुन सांगतांना ज्ञानेश्वर खालील उदाहरणाने या ओवीची सुरुवात करतात.)
वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती.
अर्थ –अगोदरच मरणाऎवढा वाईट प्रसंग कोसळलाय, आणि तोही कसा तर अग्निप्रवेश करावा लागेल असा, परंतु पतिव्रता स्त्री सती स्त्री प्राणेश्वरा साठी ( प्राणेश्वरोद्देशे) या मरणाची देखील पर्वा करत नाही.
वोखटे- वाईट, न गणीची – पर्वा करत नाही, गणत नाही.
(अ-१६- ओ-८६)’
कारण त्यातले तुम्हाला वाटते ते नीरक्षीर वेगळे करणे हे मर्त्य माणसाला शक्य नाही.जगातल्या कुठल्या विषयातील संशोधन आजच्या घडिला पुर्णपणे थांबलेल आहे. न्युटन आइनस्टाइन गेले म्हणुन त्यांच्या नंतर त्यांच्या विचारांना पुढे नेण चिकीत्सा करण थांबल का ? कुठला असा विषय आहे ज्यात नित्यनुतन दररोज संशोधन होत नाही जुन जे आहे त्यागल जात नाही. स्टॅनफोर्ड चा एनसाय्क्लोपीडीआ ऑफ फिलॉसॉफी बघा सातत्याने नविन संकल्पना येतात तत्वाच्या क्षेत्रात रोज एक जुने तत्व नष्ट होते एक निर्माण होते. ही एक चिरंतन विकासाची उत्क्रांतीची प्रक्रिया आहे जी होतच राहणार. त्यात तुम्हाला इतक असहाय अशक्य का वाटत ही मल्टीलेव्हल वर चालणारी चिरंतन प्रक्रीया आहे. कुठला असा धर्मग्रंथ नाही की ज्याची चिकीत्सा करण्याचा प्रयत्न झालाच नाही व झालातर त्यातुन काहीही अर्थपुर्ण निष्पत्ती झाली नाही. तुमचा काठिण्याला विरोध आहे की करुच नये असे तुमचे मत आहे ? असा न्युनगंड का ज्ञानेश्वर माणुसच होते त्यांच्या काळाचे अपत्य होते आपल्या पेक्षा उत्क्रांती च्या मागल्या टप्प्यावर उभे होते. अनेक गोष्टी ज्यांची त्यांनी कल्पनाही केली नसती आज आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्या क्षमता विषयी नाही मला वाटत काही अडचण आहे. आणि अस एकही क्षेत्र नाही जिथे आज कालच्या निर्मात्याला आज आव्हान दिल जात नाही. यात नकारात्मक काहीच नाहीनक्की काय सांगायचे आहे? आता जे भाग चुकीचे वाटतात ते वेगळे काढून डिलिटायचे का? अजून ५००/८०० वर्षांनी अजून काही डिलिटले जाईल. शेवट असे काही पुस्तक होते हेच नाकारायचे का?डिलीटायचे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. त्यातील त्याज्य भाग चर्चा मंथन होऊन हायलाइट व्हावा. आणि त्याचे समर्थन आचरण पुरस्कार न होता त्याचा निसंदिग्ध निषेध वैचारीक पातळीवर व्हावा. फिजीकली पुस्तक जाळणे वा त्यातील भाग यापुढे त्या ओव्या गाळुन छापावा असे कुठेही कधीही मी म्हणालो नाही. तो चुकीचा भाग हि एक महत्वाचा एतिहासिक दस्तएवजच आहे जो पुढील पिढीला विचारांची उत्क्रांती कशी झाली याचे उदाहरण म्हणुन अभ्यासायला उपलब्ध असणे आवश्यकच आहे. दुसरे असे दडपल्याने जाळल्याने विचार नष्ट तर नाहीच होत उलट अमर होतात असे मी मानतो. शिवाय जे काही आपले बरे वाईट सहित सांस्कृतिक एवज आहेत ते जतन करणे हि अर्थातच आपली सांस्कृतिक जबाबदारीच आहे. पुस्तकातील त्याज्य भाग वैचारीक पातळीवर नकारला जावा हि सरळ स्पष्ट अपेक्षा पुस्तक जाळणे वा संपादित करणे नाही.तेव्हाच्या लिखाणाची आताच्या कसोट्या लावून चिकित्सा केलीच पाहिजे का ?चिकीत्सा तर केलीच पाहिजे मात्र फक्त आताच्या कसोट्याच लावुन करा तेव्हाचा तात्कालिक संदर्भ लक्षात घेउच नका असे मी म्हणालो नाही तुम्ही माझा प्रचेतस ना दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचावा हि विनंती. तेव्हाचे तात्कालिक संदर्भ लक्षात घेण देखील आवश्यक आहे. पण यात ही एक बाब लक्षात घ्या तात्कालिन संदर्भापेक्षा आजच्या काळाचा रेलेव्हन्स हा अधिक महत्वाचा आहे यात तर दुमत नसावे. त्यातील ध्वनित व्यक्त कळत नकळत प्रोत्साहीत प्रतिपादीत मुल्ये आजच्या काळात कालबाह्य त्याज्य झालेली आहेत की आजही कालोचित ग्राह्य आहे हे तपासणे अधिक महत्वाचे आहे. कारण आपण आजच्या काळात जगत आहोत आजचे आपले जीवन अधिक महत्वपुर्ण व आपल्या वर्तमानाला आपण देत असलेला प्रतिसाद व भुमिका अधिक महत्वाची आहे. त्यामुळे मुल्यांची चिकीत्सा होतांना तत्कालिन जितके शक्य होइल तितके जास्तीत जास्त आकलन करणे गरजेचेच मात्र निर्णयाप्रत येण्यासाठी त्याहुन महत्वाचे मुल्यांचा समकालीन संदर्भ तपासणे हेच होय. हे अगदि स्वाभाविक निकडीचे आहे ना. आज उदा. अंधश्रद्धा निर्मुलन समिती जादुटोणा विरोधी कायद्याविषयी प्रचार करत आहे. आज अंधश्रध्दे चा विरोध करण अगत्याच आहे तर आज जर संताचा संदर्भ ते अंधश्रध्देविरोधात होते असा करायचा तर आजच ज्ञानेश्वरांचे मांत्रिक भुत खेत या संदर्भाचे विचार तपासण अगत्याच ठरत नाही का ? त्यातुन त्यांचा या सर्वांवर विश्वास प्रोत्साहन असे दिसत असेल तर तुम्ही त्यांच्या साहित्याच्या आधारवर आजच्या अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या उपक्रमाला नैतिक पाठींबा घेउ शकता का ? तसा तो घेतला जातोय पण चिकीत्सेविनाच मग आता नाहीतर कधी तपासणार हे विचार ?ते त्या काळाचे चित्र आहे म्हणून त्यातील निव्वळ साहित्यमूल्ये, किंवा गीतेत काय सांगितले आहे ते प्राकृतात आणणे हे केवढे मोठे काम होते म्हणून त्याचे निर्भेळ कौतुक करणे तुम्हाला अशक्य वाटते का?अहो तुम्ही माझा प्रतिसाद वाचाहो एकदा तरी व्यवस्थित माझा संपुर्ण ज्ञानेश्वर या व्यक्तीला वा संपुर्ण ज्ञानेश्वरीला विरोध नाही. तुम्ही काव्याच म्हणताय मी जर काव्य या एकाच विषयावर फोकस करुन लेख माला लिहीली तर दहा लेख तरी नक्केच अपुरे पडतील तरी अर्थातच त्यातील द ग्रेट ब्युटी कव्हर होणार नाही. पण तुम्हाला असे का वाटते मला हाच प्रश्न अगोदरही विचारला गेला. आपला ठावो ना सांडीता अनुराग भोगणारी कुमुदिनी, जैसे पवन तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, किंवा भ्यासुर आणि सुरेख हे रुपाचे स्वरुप देख, जैसी दिपकळीका धाकुटी परी बहु तेजाते प्रकटी, जैसी वरिवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालिजे, जैसा अमृताचा निर्झरु, प्रसवे जयाचा जठरु, तया क्षुधेतृषेचा अडदरु कहिची नाही.,जैसी अक्षोभिता सागरी, किंवा जे चिदरुपी मिळता , देहांतीची व्याकुळता, यातील व्याकुळता मलाही कळते, ज्ञानेश्वरांची मायानदी वर्णनात हर्मन हेसे च्या नदी ला टक्कर देते. प्रलयकाळाचा वडनावळु नरकाची वर्णने डान्टे ला पुरुन उरतात असंख्य रोमांचीत करणार्या ओव्या आहेत ज्ञानेश्वर महान कवी आहेतच पण त्या पेक्षा मला अधिक निकडीचे विषय दुसरे वाटतात म्हणुन एक धागा लेखक म्हणुन कुठला विषय फोकस करावा याचे स्वातंत्र्य मला असु नये का ? आणि तुम्हाला ही तो आजचा काळ पाहता निकडीचा वाटत नाही का ?आम्ही लोक पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे बघून खुश होतो. तुम्ही मात्र त्यावर काळे डाग पाहून चिंताग्रस्त होता असे वाटते. कधीतरी डागांकडे न बघता निव्वळ चांदणे अनुभवून बघा!तुम्ही मला व्यक्तीगत ओळखत असतात तर कदाचित असा सल्ला दिला नसता. म्हणजे तुम्हालाच हसु आल असत या विचाराने खुदक्क्न. आणि हो चमचाभर साबणाचा बादलीभर फेस माझ्यावरील टिकेव्यतीरीक्त रीन च्या मराठी जाहीराती साठी एक चांगली पंचलाइन होऊ शकते. तुम्ही लेखनसीमा म्हणालात तर ठीक आहे. असो तुम्ही तुमचे विचार तरी स्पष्टपणे मांडले त्यासाठी मन:पुर्वक धन्यवाद !धर्म किंवा धर्मनियम हे कधिच कालबाह्य होत नाहीत.तेच तर म्हणतोय धर्मनियम हे कालबाह्य होऊ शकतात असु शकतात म्हणुन च सती चा धर्मनियम आज कालबाह्य झालेला आहे. तो चुकीचा आहे तो मुळातच अन्यायकारक आहे. त्याचे कुठल्याही धर्मनियमाच्या आधारे धर्मग्रंथाच्या आधारे केले गेलेले उद्दात्तीकरण घातक आहे. चुकीचे आहे त्याज्य आहे. माणुस मारण्याच्या या अमानवी क्रुर मुल्याच्या उद्दात्तीकरणाचा निषेध व्हावा त्याची हवी तेवढी चिकीत्सा करा त्यात काय ग्राह्य आहे तुमच्या मते ते सांगा ?या मध्ये सती जात असलेल्या स्त्रीचे काय कल्याण साध्य होते बरे ? मला समजुन घ्यायचे आहे कृपया विस्तारपुर्वक उलगडा करावा. यात माझ्या मते अत्यंत चुकीचे असे स्पष्ट समर्थन व भीषण असे उद्दात्तीकरण एका क्रुर अमानवी परंपरेचे करण्यात आलेले आहे असे माझे मत आहे. तुम्ही जे मला माहीत नसेल असे काही यात असेल तर अवश्य दाखवुन द्यावे. गीतेचा नविन श्लोक ज्ञानेश्वरीत येतो. १६ व्या अध्यायातला क्रमांक ३ चा. तो असा आहे. तेज: क्षमा: धृति: शौचमद्रोहो नातिमानिता. भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत अर्थ- तेज क्षमा धैर्य, शौच, अद्रोह अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या माणसामध्ये असतात. या वरील श्लोकाचे अर्थ वर्णन करतांना ज्ञानेश्वर पहिलीच ओवी घेतात ती अशी वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती. लक्षात घ्या मी उदात्तीकरण का म्हणतोय वरील महान उद्दात्त मानवी मुल्यांचे उदा. क्षमा धैर्य इ. चे उदाहरण देतांना ते सर्व कसे सती जाणारया स्त्री च्या ठायी असतात हे ज्ञानेश्वर सांगतात वरील उत्तम गुण सती जाणारी स्त्री आपल्या कृत्यातुन दर्शविते. अगोदर पहिल्या ओवीत निसंदिग्ध समर्थन केल्यानंतर दुसरी ओवी ज्ञानेश्वर पुढील तत्वार्थ विवेचनासाठी रुपक म्हणुन वापरतात. ते म्हणतात तैसे आत्मनाथचिया आधी तैसे तशाप्रकारे त्याप्रमाणे ( सतीप्रमाणे ) आत्मरुपी पतीच्या प्राप्तीच्या चिंतेने..... यात कुठेही पहील्या ओवीचा साधा प्रतिकात्मक सिम्बॉलिक वापर तर नाहीच नाही अगदि उघड असा मुल्यभाव ज्ञानेश्वर सती जात असलेल्या स्त्री साठी वापरतात पैजार महोदय मी जेव्हा पहिल्यांदा ही ओवी वाचली होती मी काही काळासाठी सुन्न होउन बसलो होतो. इतका संवेदनशील कवी कोमल ह्रुदयाचा माणुस इतक क्रुर समर्थन ? तुम्हाला काहिच वाटत नाही का हजारो स्त्रीया ज्या अशा धर्मनियमांनी उद्दात्तीकरणाने सती गेल्या शिर्षक म्हणुन ते आहे. संपादक मंडळाला एक विनंती- शेवटच्या ओवीचा संदर्भ क्रमांक ओ-१८६ असा आहे तो चुकुन फक्त ८६ टंकला गेलेला आहे. जेणेकरुन संदर्भ शोधत असलेल्या ( कुणी असल्यास ) वाचकांस त्रास होणार नाही.भगवतगीता काय किंवा ज्ञानेश्वरी काय हे ग्रंथ समग्र विश्र्वाचे कल्याण व्हावे ह्याच उद्देशाने ते लिहिले गेले आहेत हे सर्वश्रुत आहे.