ज्ञानेश्वरी- भाग-१ - प्राणेश्वरासाठी
भुमिका
ज्ञानेश्वरी तील स्त्री संदर्भातील या ओव्यांवीषयी वाचकांचे मत काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.आणि ज्ञानेश्वरीतील आणि एकुणच धर्मग्रंथांतुन व्यक्त/ ध्वनित (प्रतिके आदिंतुन ) होणारया मानवी मुल्यां चे समकालीन स्थान, धर्मग्रथांची कालबाह्यता वा कालातीतता, चिकीत्सेतुन निवड करण्याची निकड, या मुल्यांचा आजच्या जगण्याशी संबंध आदि. संदर्भातील मांडणी या अंगाने चिकीत्सा विचारमंथन व्हावे अशी इच्छा. यासाठी माझी निवड ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. तर स्त्री संदर्भातील या निवडक प्रातिनीधीक अशा ओव्या एकत्र करण्याचा मी एक छोटा प्रयत्न केलेला आहे. या शिवाय अजुन ही आहेत ती त्रुटी एकंदर चर्चेतुन मंथनातुन पुर्ण व्हावी अशी अपेक्षा. जाणकारांनी चुका दाखवल्यास स्वागत आहे. खालील प्रातिनीधीक ओवीत न आलेला स्त्री संदर्भातील एखादा वेगळा विचार असलेली ओवी आल्यास त्याचेही अर्थातच स्वागत त्याने चर्चा व्यापक व अर्थपुर्ण होईल.
ओवी चा संदर्भ लवकर लागावा म्हणुन काहि ठीकाणी पुढची मागची ओवी जोडुन घेतलेली आहे व काही ठीकाणी पुनुरुक्ती टाळण्यासाठी निवडक ओव्या घेतल्या आहेत. शक्यतो संदर्भ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकला असल्यास जाणकारांनी दाखवुन द्यावा.
१- दुर्योधना च्या तोंडी आपल्या बाजुच्या वीरांची स्तुती करतांना आलेले खालील उद्बार संदर्भातील ओवी
हे अप्रतिमल्ल जगीं , पुरता प्रतापु अंगीं परी सर्व प्राणे मजचिलागीं, आराइले असती.
पतिव्रतेचे ह्र्दय जैसे, पतीवांचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे, सुभटांसी
अर्थ- अंगी पुर्ण प्रतापी असलेले, जगात अजिंक्य वीर म्हणुन प्रसिद्ध असलेले, प्राणपणाने लढण्यासाठी माझ्या बाजुला आलेले आहेत. पतिव्रतेचे चित्त पतीशिवाय इतरांना स्पर्श सुद्धा करीत नाही. त्याचप्रमाणे या सर्व योद्ध्यांचे मीच श्रद्धासर्वस्व झालो आहे. (अ-१ ओ-११०-१११)
२- अर्जुन मोहित झाल्या संदर्भातील त्याच्या अवस्थेचे वर्णन करणारी ओवी
नविये आवडीचेनि भरें, कामुक निज वनिता विसरे, मग पाडेवीण अनुसरे, भ्रमला जैसा.
अर्थ- नवयौवनाचा बहर असलेल्या नव्या स्त्रीच्या प्रेमभरात लंपट पुरुष स्वत:च्या पत्नीला विसरतो. आणि त्यास्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन बेतालपणे तिच्या म्हणण्या प्रमाणे वागतो.
पाडेवीण- योग्यतेविना, निज वनिता- स्वत:ची पत्नी ( अ-१ ओ-१८७)
३- अर्जुनाने क्षत्रियाचा स्वधर्म आचरला नाही तर त्याची स्थिती कशी होइल या संदर्भातील ओवी.
जैसी भ्रतारेहीन वनिता, उपहति पावे सर्वथा, तैसी दशा जीवीता, स्वधर्मेवीण.
अर्थ- ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्री सर्वांकडुन अपमानित होते, त्याप्रमाणे ( हे अर्जुना ) स्वधर्माचा त्याग केल्यावर त्या जीवाची ( अशी ) दशा होते.(अ-२ ओ-१९९)
४- अविवेकी लोक धर्म कसा घालवितात त्या संदर्भातील उदाहरण देणारी ओवी.
जैसी रांधवणी रससोय निकी, करुनियां मोलें विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मु.
अर्थ- ज्या प्रमाणे गृहीणी स्वयंपाकीणीने ( रांधणारीने ) उत्तम रसपुर्ण स्वयंपाक करावा आणि तो द्र्व्याच्या लालसेने विकुन टाकावा ( कुटुंबीयांना वाढण्याचा धर्म न पाळता ) त्या प्रमाणेच हे अविवेकी लोक सुखोपभोगाच्या लालसेने हाती आलेला धर्म व्यर्थ घालवितात.(अ-२ ओ-२५४)
५- स्वधर्माचे पालन नाना देवदेवतांच्या पुजनापेक्षाही कसे अधिक महत्वाचे आहे या संदर्भातील ओव्या.
देवतांतरा न भजावे, हे सर्वथा कांही न करावे, तुम्ही स्वधर्मयज्ञी यजावे, अनायासे.
अहेतुके चित्तें, अनुष्ठा पां ययाते, पतिव्रता पतीतें, जियापरी
तैसा स्वधर्मरुप मखु, हाचि सेव्यु तुम्हां एकु, एसे सत्यलोकनायकु, म्हणता जहाला.
अर्थ- नाना प्रकारच्या देवतांचे पुजन करु नका , विनासायास ( सहज ) घडणारा स्वधर्माचरणाचा यज्ञ करीत जा. पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे पतीची एकनिष्ठपणे सेवा करते (स्वधर्म आचरते) त्याप्रमाणे निष्काम बुध्द्नीने स्वधर्माचे आचरण करा. कारण तुम्हाला हाच एकमेव स्वधर्मरुपी यज्ञ अनुष्ठान करण्यास उचित आहे. असे सत्यलोकांचा स्वामी ब्रह्मदेव म्हणाला. (अ-३ ओ-९१-९२-९३)
६-
स्वधर्म आचरण्यास कीतीही कठीण वाटला तरी परधर्मापेक्षा तो आचरणेच कसे योग्य श्रेयस्कर आहे ( परधर्मो भयावह:) चे उदाहरण पटवुन देतांना दिलेल्या ओव्या.
सांगे शुद्रघरीं आघवीं, पक्वान्ने आहाती बरवीं, तीं द्विजें केंवी सेवावीं, दुर्बळु जरी जाहला.
हे अनुचित कैसेनी कीजे, अप्राप्य केवीं, इच्छिजे, अथवा इच्छिलेंही पाविजे, विचारीं पां
हें असो वनिता आपुली, कुरुप जरी जाहली, तरी भोगितां तेचि भली, जियापरी.
अर्थ- मला असे सांग, शुद्राच्या घरी मधुर चवीची पक्वान्ने आहेत, आणि एखादा दरिद्री ब्राह्मण आहे म्हणुन त्याने ती सेवन करावी का ? असे अनुचित कृत्य दरिद्री ब्राह्मणाने कसे बरे करावे? जे घेण्यास योग्य नाही अशा गोष्टीची का इच्छा करावी ? इच्छा करुन अशा पक्वान्नांची प्राप्ती जरी झाली तरी त्याचे सेवन करावे का ?
हे असु दे आपली धर्मपत्नी कुरुप असली तरी तिलाच भोगणे हेच योग्य असते याप्रमाणे.(अ-३-ओ-२२१-२२२-२२४)
७- स्वत:च्या साहित्याची बोलण्या ची गुणवैशिष्ट्ये सांगतांना माझे बोलणे कसे आहे ? तर ते
जेथ साहित्य आणि शांति, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्यगुणकुळवती आणि पतिव्रता
आधींच साखर आवडे, तेचि जरी ओखदीं जोडे, तरी सेवावी ना का कोडे नावानावा.
अर्थ- ज्याप्रमाणे एखादि स्त्री लावण्य रुप , गुणसंपन्न आणि कुळ (उच्चकुलीन आहे ) इतकच नव्हे तर शिवाय पतिव्रता देखील आहे ( दुग्ध शर्करा योग जणु ) त्याप्रमाणे माझ्या बोलण्यात साहित्य आणि शांती यांच्यातील बोलक्या सीमारेखा दिसतील.
मुळातच साखर आवडते आणि तीच जर औषध म्हणुन मिळाली तर आवडीने पुन्हापुन्हा (नावानावा) का खाऊ नये ?
(अ-४ ओ-२१८ )
८- भगवंत भक्तीची महती सांगतांना च्या संदर्भातील ओवी ज्यात लक्ष्मी चे वर्णन येते जीच्या घरी श्री सारख्या दासी आहेत, जिच्या संपत्तीची कोणी बरोबरी करु शकत नाही, जिच्या दासींनी एखाद्या झाडाकडे जरी पाहीले तरी तो कल्पवृक्ष होतो आदि वर्णन आलेल्या ३ सलग ओव्यानंतर लक्ष्मी संदर्भात खालील ओवी येतेय
एसे जियेचियां जवळिकां, सामर्थ्य घरिचियां पाइकां, ते लक्ष्मी मुख्यनायका न मनेचि एथ.
मग सर्वस्वे करुनि सेवा, अभिमान सांडुनि पांडवा, ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली.
अर्थ – अशा जिच्या सहवासांतील दासींची शक्ती आहे, अशी जी ऎश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही.
हे पांडुपुत्रा ती अभिमान सांडुन सर्वार्पण (संपुर्ण समर्पण ) भावनेने जेव्हा सेवा करु लागते तेव्हा ती कुठे माझे चरण चुरायला लायक होते पात्र होते.(अ-९-ओ-३७६-३७७)
९- बाहेरी धीट जैसी, दाटुगा पति कळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी
जसे घराबाहेर व्याभिचाराचे साहस करणार्याु स्त्रीला जसा खोलीत कोंडुन ठेवतो त्याप्रमाणे अंत:करणाच्या एकुण एक हालचालींवर जो निरंतर नजर ठेवतो. (अ-१३ ओ-५०५)
१०-अज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगतांना अज्ञानी पुरुष कोण असे सांगतांना आलेल्या ओवींपैकी या ओवी
म्हातारपणी जालें, माणिक एक विपायिलें, तयाचे का जेतुलें, माता पितरा.
तेतुलेनि पाडे पार्था, घरीं जया प्रेम आस्था आणि स्त्री वांचुनि सर्वथा जाणेना जो
तैसा स्त्री देही जो जीवे. पडोनियां सर्वभावे कोण मी काय करावे काही नेणें
चित्त आराधी स्त्रीयेचे आणि स्त्रीयेचेनि छंदे नाचे माकड गारुडीयाचे जैसे होय.
स्त्रीयेचां तरी विखीं भोगुसंपत्ती अनेकी आणी वस्तु निकी जे जे देखे.
प्रेमाथिलेनि भक्ते , जैसेनि भजिजे कूळदैवते, तैसा एकाग्रचित्ते स्त्री जो उपासी.
नायटेयां भेण न मोडिजे नागांची आण तैसी पाळी उणखुण स्त्रीयेची जो
किंबुहना धनंजया स्रीचि सर्वस्व जया आणि तियेचिया जालिया लागी प्रेम
आणिकही जे समस्त तेथिचे संपत्तिजात ते जीवाहुनि आप्त मानी जो का
तो अज्ञानासी मुळ अज्ञाना तेणे बळ, हे असो केवळ तो तेंचि रुप
अर्थ – वृद्धपणी झालेल्या एकमेव पुत्र रत्नाचे आईवडिलास जेवढे प्रेम असते
अरे अर्जुना त्याच प्रमाणे ज्याला घराची आपुलकी आणि प्रेम असते आणि जो स्त्रीवाचुन दुसरे काही मुळी जाणतच नाही.
स्त्री देहाला जो जीव भजुन राहतो आणि मी कोण? काय करावे ? या गोष्टीची ज्याला काहीच जाण नसते.
जसे गारुड्याचे माकड गारुड्याच्या इच्छेप्रमाणे छंदाप्रमाणे वागणारे असते तसा तो स्त्री च्या मनाची पुजा करतो. जो स्त्रीच्या शब्दावर इशार्या वर नाचतो.
तथापि स्त्री साठी ज्या ज्या चांगल्या भेटवस्तु दिसतील त्या आणतो तसेच भोगांची ऎश्वर्य साधने आणतो.
प्रेमळ साधकाने जसे कुलदेवतेला एकनिष्ठेने पुजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो.
ज्याप्रमाणे खरुज-नायट्याच्या भयाने घेतलेली देवीची शपथ मोडवत नाही त्याप्रमाणे असा पुरुष स्त्रीची मर्जी सांभाळत असतो.
अरे अर्जुना फ़ार काय वर्णावे, त्याचे सर्व काय ते एकमेव स्त्रीच असते आणि तिच्यापासुन झालेल्या मुलांवर ज्याचा जीव असतो.
त्या स्त्रीचे सर्व वैभव वस्तु त्याला स्वत:च्या जीवापेक्षा अधिक प्रिय असते.
असा हा पुरुष अज्ञानाचे मुळ आहे. आणि अज्ञानाला च त्यायोगे बळ येते.
(अ-१३ ओ-७८७-७८८-७९०-७९२-७९६-७९७-८००-८०१-८०२)
११- गांवा गेलीया वल्लभु, पतिव्रतेचा विरहक्षोभु, भलतेसणी हानिलाभु, न मनीं जेवी.
अर्थ- प्रिय पती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला जे विरहाचे दु:ख होते त्या दु:खाने पोळलेली ती कोणत्याच फ़ायद्या तोट्याकडे लक्ष देत नाही तिची वृत्ती पतीकडे लागलेली असते.
(अ-१६ ओ-७९)
१२- क्षत्रिया रणी पळोनि जाणें, तें कोंण साहे लाजिरवाणे, कां वैधव्ये पाचारणें, महासतियेतें.
अर्थ- क्षत्रियाला युद्धातुन पळुन जाणे जसे लाजिरवाणे वाटते, कोण मानी क्षत्रिय ही पळुन जाण्याचे कृती लाजिरवाणी कृती सहन करील ? जसे सौभाग्यवती महापतिव्रतेला वैधव्यवाचक नावाने हाक मारणे जसे तिला लाजिरवाणे वाटते. ( विधवा संबोधन जिला लाजिरवाणे वाटते.) (अ-१६-ओ-१७७)
13- तेज-क्षमा- धैर्य, शौच, अद्रोह, अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या माणसांमध्ये असतात. ( हा अर्थ असलेल्या मुळ गीतेचा श्लोक समजावुन सांगतांना ज्ञानेश्वर खालील उदाहरणाने या ओवीची सुरुवात करतात.)
वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती.
अर्थ –अगोदरच मरणाऎवढा वाईट प्रसंग कोसळलाय, आणि तोही कसा तर अग्निप्रवेश करावा लागेल असा, परंतु पतिव्रता स्त्री सती स्त्री प्राणेश्वरा साठी ( प्राणेश्वरोद्देशे) या मरणाची देखील पर्वा करत नाही.
वोखटे- वाईट, न गणीची – पर्वा करत नाही, गणत नाही.
(अ-१६- ओ-८६)’
💬 प्रतिसाद
(73)
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/28/2015 - 20:23
नवीन
बरोबर आहे पैतै.असा अर्थ होऊ शकतो. सहमत.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 09/29/2015 - 06:58
नवीन
अग्निप्रवेश करून मरण "वोखटे" म्हणजे वाईट असेच ज्ञानेश्वर म्हणत आहेत. म्हणजे लेखकाने जो अर्थ लावला त्याच्या बरोबर उलट!!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Mon, 09/28/2015 - 20:01
नवीन
वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती.
सती = कुंडलिनी शक्ती
प्राणेश्वर = सहस्रार चक्रातील परमात्मा शिव
अग्निप्रवेश = त्या शिवाशी एकरुप पावून स्वतंत्र जीव म्हणून अस्तित्व नष्ट करणे, कारण कुंडलिनी जेव्हा सहस्रार चक्रात विलीन पावते तेव्हा जीवाचे स्वतंतूर अस्तित्व नष्ट पावून तो केवळ आत्मरुप शिल्लक राहतो...
हाच खरा अर्थ...
मानवी देहातील कुंडलिनीचा हाच उद्देश असतो की सहस्रार स्थित परमात्म्याशी एकरुप व्हावे हा गोपनीय अर्थ आहे सतीचा बोकोबा....
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/28/2015 - 20:22
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 09/28/2015 - 19:33
नवीन
मारवाजी,
अभ्यासासाठी पुढचा विषयः
भगवान श्री शंकराचार्यांचं 'भज गोविन्दम'.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Mon, 09/28/2015 - 19:51
नवीन
हान्तिच्या मायला प्यारे!!!!!!!!!!!!!!!
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Tue, 09/29/2015 - 06:32
नवीन
"इथे सती म्हणजे नवर्याच्या चितेवर जाळून घेणारी स्त्री हा अर्थ आहे, पण ज्ञानोबा माऊली त्या जाळून घेण्याचे उदात्तीकरण करत नाहीयेत. "मरणासारखी वाईट गोष्ट, तीही अग्निप्रवेश करून येणारी, पण ज्या स्त्रीला प्राणेश्वराचा ध्यास आहे ती ती वाईट गोष्ट मोजतच नाही" असा अर्थ आहे. ते त्या ध्यासाबद्दल, निर्धाराबद्दल बोलत आहेत. "सती जाणे कसे चांगले" असे कुठे म्हटलेच नाहीये."
असंच आहे. तात्काली अभिप्रेत असणारी पतिव्रता आणि सती केव्हाच नामशेष झाली आहे. माउलींनी कोणत्याही प्रथेची भलामण केलेली नाहीयेच मुळी. सती जाणे हि मुळात त्याकाळी आणि त्य्यापुर्वी ऐछिक गोष्ट होती. पती च्या वियोगाने दुखी होवून पतीबरोबर आयुष्यमान संपवणे हा कंपल्सरी भाग नव्हता.अश्या मृत्यूला सामोरे जाणे हि अत्यंत धैर्य नि संयामाचीच परिसीमा होती. माउली आपल्या दृष्टांतात हेच सांगत आहेत. ज्याप्रमाणे एकादी सती जाणारी स्त्री आपल्या साध्यासाठी/ अंतिम ध्येयासाठी अत्यंत धीराने अशा भयंकर मृत्यूचे भय देखील मनात नाही त्या प्रमाणे, एक मुमुक्षु.........
नंतरच्या काळात काही भागात आणि काही समाजात ती एक दुष्ट " प्रथा " बनली. हे चुकीचे चुकीचे आणि चुकीचेच.
माउलींनी हे उदाहरण देतांना त्याचे समर्थन केले असे मुळीच म्हणता येत नाही. तसेच आज किवा पूर्वीहि कोणत्याही ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी अभ्यासक/ उपासक, वारकरी मंडळींनी ज्ञानेश्वरी चा दाखला देवून सती प्रथेची भलामण किंवा समर्थन केलेले नाही प्रथा पाळणे / आपल्या पत्नीने सती जावे अशी अपेक्षा/ कल्पना करणे तर सोडूनच द्या.
हे अगदी उघड आणि सोपे आहे. ज्ञानेश्वरी वाचणार्यांना हे समजते आणि अशा दृष्टान्तामधून काय घ्यायचे तेच ते घेतात. काळजी नसावी. त्याचा इतका मॊओओठ्ठठ्ठा बाऊ करण्याचे कारण काय तेच मला कळलेले नाही.
माफ करा पण, आपल्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास कितपत आहे या विषयी मला खरच कुतूहल आहे! ( ज्ञानेश्वर महाराज वारकरी पंथातून बाहेर करण्याची महत्वाकांक्षा असलेले अनेक आधुनिक राजकीय वरदहस्त असलेले "समाजसुधारक" गेली अनेक वर्षे हे असले प्रयत्न करत आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ..श्री ज्ञानदेव, तुकाराम ..पंढरीनाथ महाराज कि जय ...असे म्हणण्या ऐवजी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ..श्री नामदेव , तुकाराम ..पंढरीनाथ महाराज कि जय .. असा जयजय कर करीत वारकरी संप्रदायात जातीभेदाची विषे पेरून संप्रदाय जाती पाती मध्ये विभागणारा एक भोंदू वारकर्यांचा पंथ तयार झाला आहे. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण असलेने कसे जातीयवादी होते आणि स्त्री कडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा संकुचित बुर्सात्लेला आणि अन्याय्य होता याचे संशोधन करणे आणि हाय लाईट करणे हेच त्यांच्या "पेड" अभ्यासक आणि इतिहासकारांचे हेच काम आहे.
बारा आता हि प्रथा होती आणि ती चुकीची होती म्हणून दृष्टाम्न्ताचा योग्य अर्थ न लावता ज्ञानेश्वरी मधून काढून टाकणे हे कोणते सोल्युशन आहे?. पण यावरही कदाचित आंदोलने होतील, त्याला बर्याच संघटनांचे अनुमोदनही मिळेल. हीच भारतातल्या लोकशाहीची कथा आणि व्यथा आहे.
आज काही लोकांना फाशीची शिक्षा पण अन्याय्य वाटते, उद्या ती बंद झाली तर यांर्या पिढ्यांनी फाशीचे सगळे संदर्भ पुसून टाकावेत काय?
अवांतर : प्रयाशित्त म्हणून अग्निप्रवेशाचे दाखले प्राचीन समाजात मिळून येतात. काही शे वर्षापूर्वी जन माणसावर नीती-अनीती ( नैतिक - अनैतिक) / वैध अवैध / सत्य-असत्य, योग्य- अयोग्य, धर्म- अधर्म इ गोष्टींचा विशेष प्रभाव होता आणि या गोष्टींची त्यांना चढ होती. जे काही चुकीचे कर्म आहे त्याचे प्रयाशित्त याच जन्मात घेवून त्या दोषापासून मुक्ती मिळवणे हा या मागील उद्देश. आजच्या आधुनिक तत्वज्ञान आणि विचारसरणीच्या आकलनापलीकडे आहे. ८ व्या कुमारील भट्ट यांनी बौध तत्वज्ञान समजून घेण्यासाठी बौध गुरु केला पण त्यांचे प्रेम वेदांवर होते. नंतर गुरु प्रातारणेचे प्रायश्चित्त म्हणून धुमसत्या फोलाफाटाच्या ढिगात गळ्यापर्यंत बुडवून घेवून घून मृत्यू पत्करला. आद्य शंकराचार्यांनी त्यांना या पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला होता आणि त्यात त्यांना यश आले नाही. काही वर्षापूर्वी तिबेटमध्ये काही बौध भिक्षूंनी चीनच्या अत्याचाराविरुद्ध स्वतःला जाळून घेवून निषेध व्यक्त केला होता. स्वतःचे शरीर जाळून घेत असतांना त्यांनी पद्मासन घालून अशा भयानक मृत्यूला हुं कि चू न करता शांतपणे सामोरे गेले तेव्हा त्याची काही काळ चर्चा झाली होती. जयद्रथाच्या वधाच्या वेळेला जयद्रथाला सूर्यास्ता पर्यंत वाढ करू न शकल्याने अर्जुन अग्निप्रवेशाला तयार झाला होता. स्वखुशीने सती जाणे हा यातलाच एक भाग असावा असे मला वाटते.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 09/29/2015 - 06:47
नवीन
अरेरे काय टुकार प्रकार आहे हा? ही माणसे कुठल्या थराला जाणार आहेत? ज्ञानेश्वरांचं कार्य अशा पद्ध्तीने पुसून टाकता येईल या महाभागांना? इथं देखील त्याच हेतूने लेख लिहिलेला असण्याची शक्यता आहे. आता लक्षात आलं!!!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/29/2015 - 06:46
नवीन
ज्ञानेश्वरीत एवढा खजिना दडलय हे माहिती नव्हतं !
मन:पूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Tue, 09/29/2015 - 08:41
नवीन
"ज्ञानेश्वरांचं कार्य अशा पद्ध्तीने पुसून टाकता येईल या महाभागांना?" अशक्य. ज्ञानदेवे रचिला पाया , तुका झालासे कळस ...भागवत धर्म, आणि वांग्मय या सगळ्या पलीकडचे आहे. वारकरी खूप सुज्ञ आहे. विजार/ धोतर टोपी, कपाळाला गंध आणि भागवत पताका घेवून वारी करणाऱ्या, वरकरणी अतिशय दुबळा आणि अडाणी दिसणाऱ्या वारकर्यांच्या सामर्थ्याला under estimate करण्याची चूक कोणी करू नये.
aso पण हे प्रत्येक हिंदू धर्म ग्रंथ, महापुरुष, संत (विशेषतः जन्माने ब्राह्मण) यांच्या बाबतीत केले जात आहे हे लक्षात येत नाही का तुमच्या? अहो कोणतेच संत, वेद, गीता इ ग्रंथ अगदी शिवाजी महाराज पण नाही सुटले. जगद्गुरु तुकाराम बुवांना पण विद्रोही म्हणून रंगवण्याचा प्रयत्न झालाच कि. तुकाराम बुवांचे तत्वज्ञान ज्यांना भावले आणि समजले ते असल्याच्या नादी नाही लागत.
- Log in or register to post comments
म
मारवा
Tue, 09/29/2015 - 10:40
नवीन
चर्चेत सहभागी झालेल्या सर्व प्रतिसादकांचे आभार !
एक स्पष्टीकरण आवश्यक वाटते
१- मी कुठल्याही संघटनेचा सभासद नाही.
२- मी कुठल्याही कटाचा सुत्रधार नाही.
३- मी कुठल्याही प्रकारचा समाजसुधारक नाही.
४- माझा कोणताही छुपा अजेंडा नाही.
मला जो विचार महत्वाचा वाटला तो मी शक्य तितक्या सुस्पष्टतेने प्रामाणिकतेने मांडण्याचा प्रयत्न करत होतो.
आता त्याच्याशी कस डिल करायच ते मी तुमच्या विवेकावर सोपवतो.
लेखातील विचारांमुळे जर कोणी कळत नकळत दुखावले असल्यास
मी त्यांची क्षमा मागतो.
माझी लेखात प्रतिसादात व्यक्त केलेल्या भुमिके व्यतिरीक्त माझी इतर कोणतीही भुमिका नव्हती.
यापुढे या संस्थळावर मी कुठल्याही प्रकारच्या धार्मिकतेशी वा धार्मिक व्यक्तीशी संबंधित धागा प्रकाशित करणार नाही.
असे जाहीर करुन
थांबतो.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/29/2015 - 10:51
नवीन
>>>मला जो विचार महत्वाचा वाटला तो मी शक्य तितक्या सुस्पष्टतेने प्रामाणिकतेने मांडण्याचा प्रयत्न करत होतो.
आपल्या विचारांची दिशा स्पष्ट केल्याबद्दल आभार. नऊहजार ओव्यांच्या ज्ञानेश्वरीमधून नेमकं काय(च्या काय) सापडतं यावरून आपला सर्वसाधारण काय कल आहे ते समजून यायला हरकत नाही.
>>>आता त्याच्याशी कस डिल करायच ते मी तुमच्या विवेकावर सोपवतो.
दुर्लक्ष करायचं ठरवत आहे. (हाही प्रतिसाद देणार नव्हतो पण साळसूद किंवा संभावित पणा दाखवत वाचकांवर दोष ठेवला जात असल्यानं कळवत आहे.)
निर्णयाबाबत जाहीर आभार मानून सत्कार समिति तर्फे गोबरगॅस प्लान्ट च्या अनुदानासाठी अर्ज करण्यात येईल असे निचीतपणे सांगतो.
- Log in or register to post comments
भ
भृशुंडी
Tue, 09/29/2015 - 21:33
नवीन
प्यारे१,
अशा भुक्कड प्रतिक्रिया देऊन आपण काय साधता आहात?
मूळ प्रतिसादात लेखकाने आपल्या हेतूबद्दल स्पष्टीकरण केलं आहेच. त्यांच्या लेखात आणि बाकी प्रतिक्रियांमधेही कुठेही malice (आकस) दिसत नाही, तरीही पुन्हा पुन्हा एखाद्या लेखकाला हे का स्पष्ट करायला लागावं?
ह्या उप्पर असल्या थिल्लर प्रतिक्रियांतून आपण पुन्हा तेच हेत्वारोप करत आहात- जे तटस्थपणे वाचणार्याला अकारण आणि अस्थानी वाटतंय.
-------
हा एक वेगळा आणि चांगला धागा म्हणून नोंद करून ठेवली आहे. मी ह्या संस्थळाचा एक सामान्य वाचक ह्या नात्याने जे दिसतंय ते मांडतोय. बाकी इथल्या रेग्युलर वाचक/कंपूंबद्दल अजिबात माहिती नसल्याने प्यारे१ ह्यांचा प्रतिसाद जर "नेहेमीचेच यशस्वी..." ह्या सदरात मोडत असेल, तर माझा प्रतिसाद आपसूकच बाद ठरतो.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/29/2015 - 22:57
नवीन
सॉरी शक्तिमान,
भारतामध्येच काय तर अखिल विश्वातल्या प्रत्येकाच्या मत व्यक्त करण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मजकडून नकळत गदा आणली जात होती. आपण माझ्यासार्ख्या यःकस्चित जीवाकडे लक्ष देऊन मजला पुनित केलेलं आहे.तो.
आम्ही तटस्थ राहू शकत नसल्याचे आपणाकडून वदीत झालेले आहे. कृपया आमचा रोख कसा चुकला आहे ते आपणाकडून कळेल काय?
भावार्थ दीपिका अथवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ का म्हणून रचिला गेला आहे? त्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे? जेम्स बॉण्ड च्या चित्रपटाचं उदाहरण मी बर्याचदा दिलेलं आहे. त्यातल्या एकेका कलाकाराच्या अदाकारीबाबत एक एक वेगळा चित्रपट निघू शकत असला तरी बॉण्ड्पट हा बॉण्ड ला जेता आणि नायक म्हणून दाखवतो. त्यातल्या एखाद्या नायिकेनं मला बॉण्डने लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर बळजबरी (सहा महिने ते सहा युगं कितीही काळ) केली असा आक्षेप बॉण्डवर केल्यास त्याला आपण किति किंमत देऊ तेवढीच किं मत किंवा त्याहून कमी किंबहुना शून्य किंमत अशा प्रकारच्या लेखांना आम्ही देतो.
आमच्या भुक्कड प्रतिक्रिया आपण वाचता (भृशुंडी म्हणजे गणपतीच ना? सादर प्रणाम) हे वाचून भरुन आलं.
नेहमीच मोराचं ढुंगण बघण्याचा सोस आणि हौस माणसानं सोडून त्याचा फुललेला पिसारा बघण्यात जास्त सौंदर्य आहे आ़णि मुख्य म्हणजे तेच तर्कसंगत आहे. तसं काही केलं तर तोंड भरुन केलेलं कौतुक मारवा यांच्याच इतर लेखाबाबत देखील आहे. (अशी संधी ते क्वचित देतात याची आम्हास खंत देखील आहे. )
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 09/30/2015 - 10:12
नवीन
सहमत!
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 09/30/2015 - 13:57
नवीन
"मूळ प्रतिसादात लेखकाने आपल्या हेतूबद्दल स्पष्टीकरण केलं आहेच."
परत परत असं स्पष्टीकरण का द्यावं लागावं? ते हि अगदी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या धाग्यांवर ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 10/01/2015 - 11:18
नवीन
सहमत!
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Tue, 09/29/2015 - 14:57
नवीन
आपण "त्या" लोकांपैकी एक आहात असा माझा दावा नाहीये. तसा नसेलही. पण मी जी नमूद केली ती वस्तुस्थिती आहे. आणि माझ्यासारख्या अनेकांच्या दृष्टीने ती दुःखद आहे. कधी कधी तर ती संतापजनक सुधा होते. कळत न कळत मी ( माझ्या लिखाणातून अथवा मत प्रदर्शनातून) तुम्हाला अथवा अजून कोणाला दुखावले असल्यास मी ही मनापासून माफी मागतो.
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 09/30/2015 - 10:11
नवीन
एका अतिशय सुंदर धाग्याचा असा चुथडा केलेला पाहून वाईट वाटले.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Wed, 09/30/2015 - 12:39
नवीन
मारवा . नको तो विचार करण्यापेक्षा अश्या ग्रंथांचा जरा अभ्यास करा . समजून घ्या . उगीच गैरसमज पसरवण्याच काम करू नका .
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 09/30/2015 - 13:50
नवीन
"एका अतिशय सुंदर धाग्याचा असा चुथडा केलेला पाहून वाईट वाटले."
असेल तुमच्या दृष्टीनं सुंदर धागा. असतो प्रत्येकाचा पेर्स्पेक्टिव्ह आणि मोटिव्ह. पण म्हणून म्हणजे खरं ते बोललं आणि बोलती बंद झाली तर चुथडा का?
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 10/01/2015 - 07:14
नवीन
मित्रांनो
ज्या कोणाला वरील धागा विषयात जेन्युइन रस आहे.
गंभीरतेने चर्चा करण्याची इच्छा आहे.
त्यांनी कृपया व्यनि करावा आपण व्यनि च्या माध्यमातुन वरील विषयावर चर्चा करु शकतो. व्यनि हे चांगले माध्यम आहे.
व्यनि मध्ये वन टु वन बेसीस वर चांगली चर्चा व्हायला वाव असतो.
मतभेद कदाचित कायम जरी राहीले तरी किमान गैरसमज सहसा होत नाहीत.
व्यक्तीगत चर्चेत अडथळा नसल्याने सरळ व चांगला सुसंवाद होतो.
माझा तरी आजपर्यंतचा व्यनि च्या माध्यमातुन केलेल्या चर्चेचा अनुभव चांगला आहे.
एकाच वेळी अनेकांशी संवाद साधण्यापेक्षा एकावेळी एकाशी अधिक चांगला संवाद साध्य होतो.
आणि सर्वात महत्वाच म्हणजे व्यक्तीगत संवाद असल्याने कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न च निर्माण होत नाही.
तसेच याच विषयावर एसी अक्षरे येथे संवाद सुरु आहे तिथेही आपण संवाद साधु शकता.
धन्यवाद !
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 10/01/2015 - 12:12
नवीन
विवेकानंदांनंतर आता ज्ञानेश्वर !
पुढे संत रामदास , संत एकनाथ पासून ते डायरेक्ट कृष्णाच्या गीतेपर्यंत लिस्ट आहे .
चालू द्या !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2