इसीस मध्ये भारतीयांचा सहभाग
गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली होती . इसीस मधील भारतीयांच्या सहभागाबाबत .अर्थात आधीही अश्या बातम्या आल्या आहेत .काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून ४ जन इसीस मध्ये सामील होण्यासाठी गेले असण्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहित आहेच . त्याआधी पिंपरी-चिंचवड मधून काही तरुण गेल्याची बातमीही आपल्या वाचनात आली असेल . परंतु आता हा वाढता सहभाग भारतासाठी धोकादायक ठरत चालला असल्याची चाहूल काही गोष्टींतून स्पष्ट जाणवते . अफशा जबीन नावाची ३७ वर्षीय हैद्राबादी तरुणी UAE मध्ये नोकरीनिमित्त गेली होती . 'निकी जोसेफ' हे टोपण नाव घेवून ब्रिटीश नागरिक असल्याचं भासवून हि इसीस चं काम करत होती . online जगतात तरुणांना भुरळ घालून त्यांना इसीसकडे आकर्षित करण्याचं हिचं मुख्य काम होतं .तिला अबुधाबीत कुटुंबासह अटक करून भारताकडे सोपवण्यात आलंय .भारतातील ३० पेक्षा अधिक तरुण इसीस मध्ये सामील होण्यासाठी आपल्या संपर्कात होते असं तिने चौकशीत दिलेल्या कबुलीत म्हणलं आहे .तिने 'इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनीटी फ्रेंडली डीस्कशन ' नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला होता आणि त्याला फोलो करणाऱ्यांची एकूण संख्या ५० हजार होती . हे account बंद करण्यात आलंय . ज्या दिवशी तिने हि कबुली दिली त्याच दिवशी अजून चार तरुणांना दुबीतून परत पाठवण्यात आलं होतं . तिच्या रूपाने इसीसमधील एका भारतीय महिलेचा सहभाग उघड झाला . अश्या अजूनही भारतीय मुली असण्याची शक्यता नाकारता येत नाही .
संपूर्ण जग 'इस्लामिक स्टेट 'बनवून आपल्या कायद्यानुसार जगणारा समाज निर्माण करण्यासाठी ,मुस्लिम तरुणींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे . त्यांच्यात सामील होण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींची उत्तम बडदास्त ठेवली जाते . सर्व सोयी सुविधा फुकटात पुरवल्या जातात .त्यांना कोणतीही कमी करण्यास सांगितलं जात नाही. तरुणांना भुरळ घालून इसीस मध्ये आणण्यासाठी आणि दहशतवादी वृत्ती असलेली नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी त्या वापरल्या जात आहेत .
असंच काम करणाऱ्या दुसऱ्या इसमाचं नाव आहे सलमान मोइउद्दिन . ३२ वर्षांचा इंजिनिअर असलेला हा तरुण काही वर्षे नोकरी करत होता . US return होता . हैद्राबादी असलेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा US मध्ये नोकरी करण्यासाठी निघाला होता . खरं तर तो दुबईला जाणार होता . घरच्यांशी खोटं बोलून . तिथे जावून तो इसीस चं काम करणार होता . त्याचे अनेक महिन्यांपासून इसीस मध्ये सामील होण्याचे प्रयत्न चालू होते . त्यामुळे तो दुबईला जाणार होता . पण त्याला विमानतळावारच अटक करण्यात आली . चौकशी मध्ये त्याच्याकडून इतर अनेक लोकांची माहिती आणि पत्ते उघड झाले आहेत .
'अल्लाहसाठी काम करायला या . जन्नतमध्ये जायला हवं असेल तर इसीस मध्ये या ' अश्या भावनिक आवाहन करणाऱ्या भूलथापांना बळी पडून तरुण तरुणी संघटनेत सामील होत आहेत . भारतीय मुस्लिमांचा त्यात सहभाग योग्य आहे का ?भारतीय सुरक्षा यंत्रणांना सोशल मिडीयावर वॉच ठेवणं , अंतर्गत सुरक्षा सांभाळणं हि महत्वाची कामे करावी लागणार आहेत . त्यांची जबाबदारी वाढली आहे . पण सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का ? जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील .
ईडीस
डास आहे आणि त्याने डेंग्यू होऊ शकतो तेव्हा अखिल मिपा हिरवा ताप प्रतीबंध आणि ईडीस डास निर्मूलन समीतीचा संयुक्त, मिपा वाचक जागर.