बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके
मॅनेजमेन्टच्या क्षेत्रात "SWOT analysis" ही एक संकल्पना आहे. SWOT म्हणजे Strengths (सामर्थ्यक्षेत्रे), Weaknesses (कमकुवत क्षेत्रे), Opportunities (संधी) आणि Threats (धोके) यांचे विश्लेषण. यातील सामर्थ्यक्षेत्रे आणि कमकुवत क्षेत्रे या दोन गोष्टी अंतर्गत असतात तर संधी आणि धोके या दोन गोष्टी बाह्य असतात. पहिल्या लेखामध्ये नितीश कुमारांच्या आघाडीचा परामर्श घेतला त्यावेळी सर्व मुद्दे त्या आघाडीशी अंतर्गत होते.याचे कारण या आघाडीला बाह्य कोणते मुद्दे हे संधी असतील आणि कोणते मुद्दे धोकादायक ठरतील याचा विचार केला तर खरोखरच तसे मुद्दे मिळाले नाहीत. कदाचित माझ्याकडून काही मुद्दे निसटले असतील. पण भाजप आघाडीबाबत मात्र संधी आणि धोके हे बाह्य मुद्देही तितक्याच प्रमाणावर मला सापडले. म्हणून या लेखाचे शीर्षकही तसेच दिले आहे.तेव्हा सुरवात करू SWOT याच क्रमाने.
भाजप आघाडीची Strengths (सामर्थ्यक्षेत्रे)
१. ही आघाडी नितीश कुमारांच्या आघाडीच्या मानाने अधिक सुसंगत आहे.बिहारमधील निवडणुक म्हटली की जातीपातींचा विचार अनिच्छेने का होईना पण करावाच लागतो. त्यामुळे हा मुद्दा जातीच्या आधारेच स्पष्ट करतो.
या आघाडीचे मतदार नक्की कोणते गट आहेत? उच्चवर्णीय, बनिया आणि सुशीलकुमार मोदींच्या ओ.बी.सी मधील जातींचे मतदार हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत.त्यापैकी कोणीही भाजपला सोडून जायची शक्यता नाही. महादलितांमधील पासवान, मल्या (नावाडी) या समाजातले मतदार रामविलास पासवानांच्या लोकजनशक्तीचे पारंपारिक मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ही व्होटबॅंक पासवानांनी आपल्याबरोबर ठेवली आहे. ओ.बी.सींमधील कुशवाह समाज उपेन्द्र कुशवाहांबरोबर तर महादलितांपैकी मुसहार आणि इतर जातींचे मतदार जीतनराम मांझींबरोबर असतील असे म्हणायला हरकत नसावी. जीतनराम मांझींचे निवडणुकीतील सामर्थ्य अजून स्पष्ट झालेले नाही.यापूर्वी ते तितके महत्वाचे आणि मोठे नेते नव्हतेच.पण नितीशकुमारांनी त्यांना मुख्यमंत्रीपद खाली करायला सांगितल्यावर मात्र त्यांनी आपले पत्ते योग्य प्रकारे खेळले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाले.तेव्हा त्या समाजातील मते त्यांच्यामागे जातील असे म्हणायला हरकत नसावी.
हे मतदार परस्परविरोधी नाहीत.म्हणजे नितीशकुमारांच्या आघाडीत यादव विरूध्द कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार आहेत. कुर्मी-कोयरींना लालूंच्या राज्यात डावलले जाते आणि सगळा फायदा यादवांनाच होतो या मुख्य कारणामुळे नितीशकुमार १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडले होते.त्या कारणाने यादव आणि कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार झाले. तशा प्रकारे परस्परविरोध भाजप आघाडीत नाही.जीतनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे आणि नितीश-लालू युती असल्यामुळे लालूंच्या काळातील यादवीचा त्रास झालेले महादलित मतदार मोठ्या अक्कलहुशारीने भाजप आघाडीने आपल्याकडे वळवले आहेत. भाजप आघाडीचे सर्वात मोठे सामर्थ्यस्थान हेच आहे.
२. भाजप आघाडीमध्ये भाजप १६०, लोकजनशक्ती ४०, उपेन्द्र कुशवाहांचा पक्ष २३ तर जीतनराम मांझींचा पक्ष २० जागा लढवत आहे. त्यामुळे अर्थातच स्थैर्याच्या दृष्टीने ही आघाडी अधिक विश्वसनीय आहे.आघाडीचा विजय झाल्यास भाजप स्वबळावर बहुमताच्या बऱ्याच जास्त जवळ असेल आणि इतर पक्षांवर अवलंबून रहावे लागले तरी त्याप्रमाणात कमी असेल.मतदारांनी सरकारचे स्थैर्य हा मुद्दा लक्षात घेतल्यास नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी ही मतदारांना अधिक आकर्षक असेल.
३. भाजप आघाडीचा प्रचार हा एकत्रितपणे चालला आहे असे अजूनपर्यंतचे तरी चित्र आहे. नरेन्द्र मोदींच्या दोन सभांना सर्व पक्षांचे नेते हजर होते.कदाचित भविष्यातल्या काही सभांनाही असतील. यातून मतदारांपुढे ऐक्याचा संदेश नक्कीच जात आहे.
भाजप आघाडीचा Weaknesses (कमकुवत क्षेत्रे)
१. भाजप आघाडीचा सर्वात मोठा वीकनेस म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा अभाव. नितीशकुमारांना तोड देईल असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप आघाडीकडे नाही. आजही सर्व सर्वेक्षणांमध्ये नितीश कुमार हे भाजपच्या कोणाही संभाव्य उमेदवारापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत.
भाजप आघाडीच्या Opportunities (संधी)
१. या निवडणुकांमध्ये एका बाजूला भाजप आघाडी आहे तर दुसऱ्या बाजूला नितीशकुमार-लालू आणि कॉंग्रेस आहेत. दुसऱ्या बाजूच्या पक्षांनी स्वातंत्र्यापासून बिहारमध्ये सरकार चालवले होते-- सर्वाधिक काळ कॉंग्रेसने, त्याखालोखाल लालूंनी १५ वर्षे आणि त्याखालोखाल नितीशकुमारांनी १० वर्षे!! त्यामुळे अन्य कोणाला एक संधी द्यायला हवी असे वाटणारे मतदारांना नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी अधिक आकर्षक आहे हे नक्कीच. ही भाजप आघाडीसाठी मोठी संधी आहे.
२. २०१४ च्या निवडणुकांप्रमाणेच यावेळीही ३५ पेक्षा कमी वय असलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. या तरूण मतदारांनी २०१४ मध्ये नरेन्द्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मते दिली होती. लालू बरोबर नसते तर त्याच मुद्द्यावर यातील बहुसंख्य मते नितीश कुमारांकडे जायची शक्यता होती.पण नितीशकुमारांनी लालूंचे जोखड गळ्यात अडकवून घेतल्यामुळे ही मते परत एकदा आपल्याकडे आकर्षित करणे भाजपला सोपे जाईल.
भाजप आघाडीसाठीचे Threats (धोके)
१. अजूनही भाजप आघाडी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर अधिक प्रमाणावर अवलंबून आहे. नरेंद्र मोदी बिहारमध्ये लोकप्रिय असतीलही पण ते राज्याचे मुख्यमंत्री बनणार नाहीत.तसेच नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर मतदारांनी २०१४ मध्ये मते दिली.आता परत त्याच नावावर मते मागण्यावर नक्कीच मर्यादा आहेत. शेवटी अर्थशास्त्रातला Law of diminishing marginal returns हा प्रकार सर्वत्र असतोच. एका कारणावरून मागच्या वेळी जितकी मते मोदी फिरवू शकले तितक्या प्रमाणावर यावेळी आणि त्यातही विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी फिरवू शकतील का? एकाच मुद्द्यावर किती काळ अवलंबून राहायचे याचा विचार भाजपने करायलाच हवा.
२. बिहारमधील जातीपातींचे वर्चस्व असलेल्या परिस्थितीत एकाच आघाडीत रामविलास पासवान आणि जीतनराम मांझी हे दोन एकाच समाजातील नेते असणे हे धोकादायक ठरू शकते. शेवटी रामविलास पासवान हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वप्रथम १९६९ मध्ये राज्य विधानसभेवर निवडून गेले होते.आणि १९७७ पासून १९८४ आणि २००९ चा अपवाद वगळता ते सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्या तुलनेत जीतनराम मांझी हे बऱ्यापैकी उपऱ्यासारखे आले आणि आपल्याला मिळाल्या त्याच्या अर्ध्या जागा मिळवून गेले असे पासवानांना वाटणारच.त्यातून पासवानांचे आपल्याच समाजातील नेत्यांबरोबर कसे वाकडे असते याविषयी माझ्या मिसळपाववरील पूर्वजन्मात या प्रतिसादात लिहिले होते.
याला मिटिगेटींग फॅक्टर म्हणजे मायावतींचा जसा पासवानांना एकदा नाही तर दोनदा स्वत:ला फटका बसला तसे मांझी करू शकतील असे वाटत नाही.तसेच एकदा निवडणुका झाल्या की नंतर मांझींना फारसे कोणी विचारेल असे वाटतही नाही.मायावतींमुळे पासवानांच्या मतांवर जसे गंडांतर आले तसे मांझी करतील याची शक्यता कमी.आणि दुसरे म्हणजे मांझी हे पासवानांचे मतदार-- पासवान आणि मल्या या जातींचे मतदार पळवतील याची शक्यता त्या मानाने कमी. म्हणून बहुदा पासवान गप्प बसले असावेत. पण समजा भविष्यात या दोघांमध्ये मतभेद उफाळून आले तर मात्र तो भाजप आघाडीसाठी मोठा धोका असेल.
आता यापुढच्या लेखामध्ये या निवडणुकांसाठीच्या "x-factors" चा परामर्श घेईन.
Book traversal links for बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके
💬 प्रतिसाद
(116)
द
दुश्यन्त
Fri, 10/23/2015 - 20:27
नवीन
<राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने पाठिंबा स्वीकारला नव्हता किंवा नाकारलाही नव्हता. >
यांनी सांगाव आणि लोकांनी विश्वास ठेवावा. डोळे मिटून दुध प्या आणि वर अस अंग झटकण भाजपेयीच करु शकतात. भाजप एनसीपीचे सेटिंग लपून राहिले नाही. प्रधानसेवक बारामतीत येवून मी पवारांचा सल्ला /मार्गदर्शन घेत असतो वगैरे म्हणतात आणि लगेच भक्त लोक यात राजकारण पाहू नका म्हणतात. दिल्लीत मुलायम आणि पवार अधूनमधून सरकारला अनुकूल भूमिका घेतात, पवार बाहेरून महाराष्ट्र सरकारला आतून पाठींबा देवू करतात, मुलायम महा आघाडीतून बाहेर पडून भाजपची अडचण थोडी कमी करू पाहतात या सगळ्याला संगत /मिलीभगत नाही म्हणायची तर काय म्हणायचे?
< देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार येवून काय दिवे लावले आहेत ते लोकांनी १- १.५ वर्षे पाहिलेच आहे.>
नीट वाचा गुरुजी. मी विचारतोय काय दिवे लावले आहेत तर तुम्हीच मला परत प्रश्न विचारा. अलंकारिक प्रश्न आहे याचा अर्थ अजून तरी काही ओठे काम केले नाही नुसती भाषणबाजी झाली आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/24/2015 - 09:51
नवीन
मुलायम मंडळींना बिहारमध्ये नगण्य स्थान आहे. त्यामुळे नितीशकुमार गटाने त्यांना २४३ पैकी फक्त ३ जागा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांचा तिळपापड होऊन ते महाआघाडीतून बाहेर पडले. त्यांच्या बाहेर पडण्याशी भाजपशी संबंध जोडणे हे वैचारिक काविळीचे लक्षण आहे. मुलायम आघाडीत असले किंवा नसले तरी महाआघाडी किंवा भाजप यांना शष्प फरक पडत नव्हता.
पवारांनी महाराष्ट्रात भाजपने न मागता एकतर्फी जाहीर केलेल्या आणि भाजपने न स्वीकारलेल्या पाठिंब्याविषयी पूर्वीच लिहून झाले आहे. त्याची पुनरावृत्ती करीत नाही. परंतु वैचारि़क काविळीमुळे हा विषय पुन्हा पुन्हा काढला जात आहे.
दिल्लीत मुलायम किंवा पवार यांनी अजिबात सरकारला अनुकूल भूमिका घेतलेली नाही. भूमी अधिग्रहण कायदा, जीएसटी इ. महत्त्वाच्या विषयात त्यांनी सातत्याने सरकारविरोधात भूमिका घेतलेली आहे.
मोदी पवार तर सोडाच, पक्षातील जेष्ठांचेही मार्गदर्शन घेत असतील असे दिसत नाही.
महाराष्ट्रात सातत्याने एनसीपीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असून कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. हे त्यांच्यातील सेटिंग आहे असे म्हणणे वैचारिक काविळीचे लक्षण आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 10:17
नवीन
तुम्हाला अंधपणामुळे बाकीच्यांना काहीपण दुषणे देवू वाटतात हा तुमचा प्रोब्लेम आहे. मोदी स्वतः बारामतीत येवून तसे बोलले आहेत तेव्हा तुम्हाला ऐकू आले नाही .कदाचित कानाचा पण प्रोब्लेम असावा . परवा जेटली पण बारामतीकराचे गुणगान गावून गेले आहेत फक्त अंध भक्तांना यात राजकारण / मिलीभगत नाही असे वाटते पब्लिकला सगळे कळत असते.शरद पवार न मागता पाठींबा देतात यावर विश्वास ठेवणारा तुमच्यासारखा विरळाच असू शकतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/24/2015 - 11:10
नवीन
मोदी तसे म्हणाले म्हणून काय फरक पडला? जेटली तसे म्हणाले तर काय फरक पडला? एखाद्याच्या निमंत्रणावरून त्याच्या घरी गेल्यावर त्या माणसाबद्दल वाईट न बोलता चार शब्द बरे बोलायचे असतात हा सर्वमान्य शिष्टाचार आहे. तसे मोदी बिहारमध्ये नितीशकुमारांबरोबर एका व्यासपीठावर होते. म्हणजे त्यांचे साटेलोटे झाले काय?
मोदींच्या बारामती भेटीनंतर पवारांना किंवा भाजपला नक्की काय फायदा झाला?
पवारांना मंत्रीपद मिळाले?
गेलाबाजार एखाद्या राज्याचे राज्यपालपद तरी मिळाले?
त्यांचा पक्षाला केंद्रात/राज्यात सत्तेत वाटा मिळाला?
पवार केंद्रात व राज्यात सरकारला पाठिंबा देत आहेत?
भाजप केंद्रात व राज्यात त्यांचा पाठिंबा घेत आहेत?
मह्त्त्वाच्या विधेयकांना, निर्णयांना पवारांच्या पक्षाचा पाठिंबा मिळाला?
पवारांनी व त्यांच्या पक्षाने भाजपवरील टीका थांबविली?
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळाले?
मोदी किंवा जेटलींनी बारामतीला भेट देऊन पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला नक्की मिळाले काय? किंवा भाजपने त्यांना नक्की दिले काय?
बारामतीत पवारांच्या विद्या प्रतिष्ठानने बळकावलेली ७० एकर जमीन नुकतीच मुक्त झाली. लव्हासाने बळकावलेली आदिवासींची १९० एकर जमीन मुक्त करण्याचा आदेश आला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भ्रष्टाचाराबद्दल चौकशीला सामोरे जावे लागत असून काही जणांवर एफआयआर दाखल झाला आहे तर काही जण अटकेत आहेत.
पवार व मोदी यांचे साटेलोटे आहे हे फक्त वैचारिक कावीळ झालेल्यांनाच वाटते. त्यांच्यात जर काही मिलीभगत असेल तर त्याची उदाहरणे देता का जरा.
मिलीभगत/साटेलोटे कसे असते याचे एक उदाहरण देतो.
दिल्ली विधानसभेच्या डिसेंबर २०१२ मधील निवडणुकीत प्रचार करताना केजरीवाल जाहीर सभेत शीला दिक्षितांनी राष्ट्रकुल स्पर्धेत केलेल्या भ्रष्टाचाराची यादी वाचून दाखवायचे. आपल्याकडे त्या भ्रष्टाचाराचे ३७० पानी पुरावे आहेत असेही त्यांनी सांगितले होते. निवडणुकीनंतर भ्रष्ट काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद मिळविल्यावर लगेच त्यांची भाषा बदलली. "पुरावे द्या, म्हणजे लगेच शीला दिक्षितांवर कारवाई करतो" अस ते सांगायला लागले. पण तुमच्याकडे तर ३७० पानी पुरावे आहेत असे एका पत्रकाराने विचारल्यावर, ते पुरावे नसून वृत्तपत्रातील कात्रणे कापून त्याची ३७० पानांची फाईल मी केली आहे अशी टोपी त्यांनी फिरविली.
नंतर फेब्रु २०१५ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन आता ८ महिने होऊन गेले. अजून कारवाईचा पत्ता नाही. ऑगस्टमध्ये त्यांचेच कायदा मंत्री असलेल्या कपिल शर्मांनी शीला दिक्षितांच्या काळातील वॉटर टॅकर घोटाळ्याचे कागदपत्र अभ्यासून त्यातील भ्रष्टाचारात शीला दिक्षितांचा हात स्पष्टपणे दिसत आहे असे पत्र लिहून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई सुरू करण्याची मागणी केली. ही मागणी केल्यावर ३ दिवसात केजरीवालांनी त्यांना कायदामंत्री पदावरून हटविले. या प्रकरणातील कारवाईचा सुद्धा अजून पत्ता नाही.
काँग्रेस व आआप आणि केजरीवाल व शीला दिक्षित यांच्यात जे आहे त्याला साटेलोटे म्हणतात.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 10/23/2015 - 10:30
नवीन
आणखी एक मुद्दा म्हणजे मुस्लिम मतदारांविषयीचा.
बीफवर विनाकारण रान उठविल्यामुळे आणि मुख्य म्हणजे दादरी कांड होणे आणि वेदात बीफ खाणार्यांना ठार मारा असे पांचजन्यने म्हणणे, मुस्लिम देशात राहू शकतात पण बीफ सोडायला हवे असे खट्टर यांनी म्हणणे याचा एक परिणाम होणार आहे. या घटना झाल्या नसत्या तर काही प्रमाणावर मुस्लिम मते ओवेसी आणि मुलायमसिंग यादव यांच्या तिसर्या आघाडीला गेली असती आणि ते भाजप आघाडीच्या पथ्यावर पडले असते.पण आता ती सगळी मते लालू-नितीश आघाडीमागे एकवटतील.
ही मते तशीही भाजपला मिळणार नव्हती.पण तसे असेल तर ती मते जितकी विखुरतील तितके भाजप आघाडीला चांगले झाले असते. पण या अतिउत्साही वाचाळवीरांनी ही सगळी मते लालू-नितीशला जातील याची बेगमी करून ठेवली आहे. शुध्द शब्दात सांगायचे झाले तर हा अडाणीपणा भाजप-संघातील अतिउत्साही लोकांनी केला आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 10/23/2015 - 11:22
नवीन
भाजपला सत्ता कशी राबवायची ते कळले नाही. कधी नव्हे ते बहुमत आले आहे मात्र मोदी -शहा यांची एकाधिकारशाही भाजपला नडत आहे.उठसुठ सेल्फी आणि नुसत्या घोषणा आणि फ़ेकम्फ़ाक यातून स्वताचे तात्पुरते मार्केटिंग होते लोक जास्त काल भुलत नाहीत. स्वताच्या इमेजच्या प्रेमातून मोडी बाहेर पडतील तो सुदिन. जनतेने इंदिरा गांधींना यापाई धडा शिकवला त्यांच्या पुढे मोदी तर खूप लहान आहेत. मंत्रिमंडळात विदुषक बसवून ठेवले आहेत. गुजरातेत केले तशी एकाधीकाराची पकड आपण केंद्रात पण चालवू हा भ्रम मोदींना झाला असावा. मोदींना विरोधात आणायला त्यांचेच लोक तयार आहेत किंवा अति उत्साहात काहीजण बरळत आहेत असेच कश्यावरून ? मोदी- शहांची त्याला फूस नसेल कश्यावरून ? कट्टर लोकांनी अशी विधाने करायची आणि मोदींनी विकासाचा जप करायचा अशी दुहेरी नीतीहि असू शकते . जातीय / धार्मिक ध्रुवीकरण करूनच भाजपने युपीत ७२ खासदार निवडून आणले आहेत दर वेळेस तो फंडा चालत नसतो कधीकधी उलटा पण पडतो.पण ते सोडले तरी जनतादेखील त्यांच्या कारभारावर खुश आहे अश्यातला भाग नाही. महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न अजून तसेच आहेत. बिहार निवडणुकीच्या तोंडावर बाता करत लिलाव पद्धतीने प्याकेज जाहीर केले आता त्याची चर्चा पण होत नाही. भाजपने आधी विकासाच्या गप्पा मारल्या नंतर जातीय / धार्मिक ध्रुवीकरण करायला गेले आता अजून निवडणुका पूर्ण व्हायच्या तरी यांचेच लोक खांदे पाडून बसले आहेत, मोदींच्या सभा रद्द होत आहेत. नाण्यातच खोट आहे हे मान्य करायला हवे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 10/23/2015 - 12:19
नवीन
अगदी असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 10/23/2015 - 12:38
नवीन
अगदी असेच आणी असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 10/23/2015 - 18:43
नवीन
शरीरात असलेल्या काविळीवर उपाय असतो पण अशा वैचारिक काविळीवर काय उपाय असणार आहे? आणि पुरावा नसताना भाजपने ध्रुवीकरण करून ७२ खासदार निवडून आणले, जनता कारभारावर खुश नाही, यांचेच लोक खांदे पाडून बसले आहेत, मोदींच्या सभा रद्द होत आहेत वगैरे असली निराशाजनक विधाने करून नक्की काय मिळवायचं आहे? आहे का तुमच्याकडे दुसरा समर्थ पर्याय? असं बॅकसीट ड्रायव्हिंग काय, कोणीही करू शकतो. त्याला काही लागत नाही. आणि जे काही काम होतंय त्याच्याकडे एकदा नकारात्मक दृष्टीनेच बघायचं असं एकदा ठरवलं की मग कोणतीही चांगली गोष्ट ही वाईटच वाटणार. त्यामुळे अशा मतांच्या पिंका टाका. त्याने रस्ता लाल होईल, काम मात्र काहीही होणार नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/23/2015 - 19:36
नवीन
यांचे प्रतिसाद पूर्वीपासून अत्यंत नकारात्मकच आहेत. यांच्या दुर्दैवाने त्यांनी केलेल्या भाकितांपैकी एकही खरे झाले नाही. खालील काही उदाहरणे पहा.
http://www.misalpav.com/comment/632013#comment-632013
पवार सरकारमध्ये येतील ही भविष्यवाणी खोटी ठरली आहे.
http://www.misalpav.com/comment/631001#comment-631001
सेनेने विरोधात बसायचे सोडून सत्तेच्या मोहाने १० मंत्रीपदाच्या बदल्यात (५ कॅबिनेट + ५ राज्यमंत्री) भाजपपुढे कशी नांगी टाकली ते दिसलेच आहे. त्यामुळे सेना भाजपच्या मागे फरफटत जाणार नाही ही भविष्यवाणी सुद्धा खोटी ठरली.
http://www.misalpav.com/comment/632500#comment-632500
हे भाकितही खोटे ठरले.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 10/23/2015 - 20:17
नवीन
श्रीगुरुजी - मी कुठली भविष्यवाणी केली नव्हती. एवढे जुने पोस्त शोधण्याचे कष्ट करता तेवढेच कष्ट नीट वाचन करण्यात पण करा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/24/2015 - 09:36
नवीन
वरील ३ प्रतिसादात अनेक भाकिते आहेत. पुन्हा एकदा नीट वाचा. त्यातील एकही खरे झालेले नाही.
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 10/24/2015 - 11:12
नवीन
शक्य आहे.
(स्त्रोत - http://misalpav.com/comment/741093#comment-741093)
या अंदाजाचे काय झाले म्हणे?
असो.
हाती प्रचंड विदा आणि रिसोर्सेस असतानाही बड्या-बड्या संस्थांची निकाल भाकिते साफ गंडतात, तिथे तुम्हा-आम्हा गुगलानुयायींच्या भाकितांचे काय घेऊन बसलात?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/24/2015 - 11:15
नवीन
बंडखोरी झाली पण युती तुटली नाही. आपल्याला एकमेकांची गरज आहे हे दोन्ही पक्षांना पूर्णपणे लक्षात आलेले दिसतेय. त्यामुळे माझा अंदाज चुकला.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 11:41
नवीन
हाहा.. असे खूप आहेत भाकित. आपल ठेवायचं झाकून… असो आपल्याकडे थोडीच यांच्याएवढा वेळ आहे, चिकटपणे एकच मुद्दा सतत मांडत , ज्ञानाच्या गमजा मारत बसायला, आपलीच लाल करायला!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/24/2015 - 19:51
नवीन
भाकित एखाद्यावेळी चुकलं म्हणून मला कधीच वाईट वाटत नाही. प्रत्येक भाकितातून काहीतरी नवीन शिकता येतं. जून २०१३ मध्ये नितीशकुमारांनी भाजपबरोबरची युती तोडल्यावर याचा त्यांना जबर फटका बसणार हे भाकित मी तेव्हाच केलं होतं आणि ते मे २०१४ मध्ये तंतोतंत खरं झालं. शिवसेनेने कितीही लुटुपुटीचा विरोध केला तरी ते शेवटी भाजपला शरण जाऊन सत्तेत भागीदार होणार हेही भाकीत पूर्ण बरोबर आले. कधी भाकिते बरोबर येतात तर कधी येत नाहीत.
पण तुम्ही सिनिकल आणि नकारात्मक भावनेतून केलेली सर्वच्या सर्व भाकिते चुकली हे मान्यच करायची तुमची तयारी नाही. हाच मुख्य फरक असतो वैचारिक कावीळ झालेल्यात आणि न झालेल्यात.
नितीश-लालूची युती अजून तरी तुटलेली नाही. नितीशकुमारांनी आपल्या पक्षहिताचा बळी देऊन केवळ स्वतःचा अहंकार कुरवाळण्यासाठी ही युती केली आहे. आता माझे नवीन भाकित ऐका. ही युती फार काळ टिकणार नाही. त्यांना बहुमत मिळाले किंवा नाही मिळाले तरी ही युती फार काळ टिकणार नाही. लालू जीवापाड प्रयत्न करून संजद फोडायचा प्रयत्न करेल किंवा नितीशकुमारांना अडचणीत आणण्याचा अथक प्रयत्न करेल व त्यातून ही युती तुटेल. लालूसारख्या अत्यंत जातीयवादी आणि कमालीच्या भ्रष्ट व्यक्तीबरोबर युती केल्याची जबर किंमत नितीशकुमारांना द्यावी लागणार आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 20:17
नवीन
तुमचा गोंदीसारखा चिकटपणा आणि स्वताची लाल करायची वृत्ती अतुलनीय आहे हे मी जाणतोच! लगे रहो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 10/25/2015 - 08:57
नवीन
वा! छान!! असेच लिहीत चला. अशा उच्च पातळीचे दर्जेदार प्रतिसाद तुमच्याकडून येतील हा अंदाज होताच (हा अंदाज सुद्धा खरा ठरला).
माझ्याबद्दल दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद! अजून येऊ द्या.
भविष्यातही तुमच्याकडून यापेक्षाही उच्च पातळीचे प्रतिसाद येणारच येणार हे भाकित आधीच वर्तवून ठेवतो.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 10/25/2015 - 03:35
नवीन
अंदाज असा शब्द वापरलाय. ज्याच्यात शक्यता अध्याहृत आहे. त्यामुळे तो चुकण्याची शक्यता गृहीत धरलेली आहे. बरं, त्यांनी इथे मान्यही केलेलं आहे की त्यांचा अंदाज चुकला. पण पुरावे नसताना बेछूट विधानं करणाऱ्या पिवळ्या वाचाळवीरांनी अजून काहीही पुरावा दिलेला नाही. फक्त नकारात्मक भावना पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 10/23/2015 - 20:32
नवीन
माझे प्रतिसाद नकारात्मक. हाहा.. चिकटपणे माझच म्हणण खर म्हणत एका पक्षाला/नेत्याला निष्ठा वाहून गोंधळी प्रतिसाद टाकण्यापेक्षा ते बरच ना.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 10/23/2015 - 20:38
नवीन
युपी मध्ये लोकसभेआधी दंगे पेटवून, भडकावू विधाने करून धार्मिक ध्रुवीकरण होवून फायदा कुणाचा झाला?लोकांनी लोकसभेत एकदा बहुमत दिले म्हणजे त्या पक्षाच्या हो मध्ये हो मिसळला पाहिजे असे तुमचे मत दिसते आहे. यालाच अंधभक्त म्हणतात आम्ही नागरिक आहोत आम्हाला जे दिसेल ते बोलतो तुम्हाला त्यात नकारात्मकता दिसते. विरोधाला वैचारिक कावीळ असे बरळून आपला आंधळेपणा सिद्ध होतो बाकी काही नाही.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/24/2015 - 05:14
नवीन
जसा तुम्हाला मतं मांडायचा अधिकार आहे, तसा आम्हालाही तुमच्या मतांवर टीका करायचा अधिकार आहे. म्हणूनच वैचारिक कावीळ असं म्हटलंय. एकदा वृत्ती सिनिकल झाली की मग माणसाला वैचारिक कावीळ, वैचारिक सर्दी आणि वैचारिक अतिसारपण होतो. तुमचा दोष नाही. तुमच्या सिनिकल आणि प्रत्येक गोष्टीत नकारात्मक बाजू शोधण्याच्या वृत्तीचा दोष आहे. Cynic is the one who questions the price of everything but doesn't realize value of anything असं म्हटलं जातं, तेच तुम्ही सिद्ध करत आहात, बाकी काही नाही. पुरावे नसताना बोलण्याला काय म्हणावं? तरी बरं, तुम्ही मिपावर आहात. दिल्लीत असतात तर नक्कीच आम्ही तुम्हाला अरविंद केजरीवाल म्हटलं असतं!
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 10:14
नवीन
बोका- तुम्ही काहीही बरळाल हो तुमच्या अश्या प्रमाणपत्रांना कोण महत्व देत. बाकी वर सांगितलेली लक्षणे कधीपासून आहेत तुम्हाला. विरोधी मत दिसले कि त्याला कपोकल्पित आजार वगैरे म्हणणे म्हणजे तुमच्यातच काही केमिकल लोच्या असल्याचे निदर्शन आहे. लवकर चांगला डॉक्टर गाठा. शुभेच्छा!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/24/2015 - 11:41
नवीन
पहिले स्वतःचा आयडी नीट लिहायला शिका आणि मग इतरांवर टीका करा. मी तुमच्या नकारात्मक विचारांवर टीका केली होती, तुमच्यावर नाही पण तुम्हीच माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहात. आणि माझ्या प्रमाणपत्रांना तुम्ही जर महत्व देत नाही तर नाव घेऊन प्रतिसाद द्यायची काय गरज होती? विरोधी मतावर आम्ही तुटून पडणारच. ते शेवटी विरोधी मत आहे. आणि बरळायची सवय ही तुम्हाला आहे. पुरावे नसताना वाटेल ती विधानं करणं याला बरळणं हाच शब्द आहे. हे असे नकारात्मक विचार आहेत तुमचे त्यामुळेच जरा कोणी विरूद्ध मत मांडलं की तो बरळतोय असं म्हणून त्याच्यावर हल्ला चढवता. मुद्दे नसले की माणूस वैयक्तिक टीकेवर उतरतो आणि अशांना आम्ही इतके दिवस आपटार्ड म्हणायचो. आता दुश्यंत म्हणायला लागू. हाकानाका!
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 11:47
नवीन
झोंबला दिसतोय सल्ला!आमचा आयडी आम्ही कसाही लिहू तुम्हाला काय पंचाईत.आम्ही विचारतो का तुमच्या आयडीबद्दल कारण माहित आहे काय लोच्या आहे ते. आणि तुमच नाव लिहिल कारण तुम्हाला कळावं म्हणून. आधीच गैरसमज/ भ्रम कमी नाहीत तुमचे त्यात अजून भर नको. पुरावे काय हे तुम्ही संगांर होय. सगळ्या अकलीचा मक्ता तुमच्याकडेच ना. वर सांगितल आहेच इलाज करा!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/24/2015 - 14:16
नवीन
तुम्हाला मेंदू नसावा अशी शंका होतीच, पण आता खात्री पटली. कसं आहे, तुमचा दोष नाहीच आहे पण. एकदा मनाला वैचारिक काविळीचा संसर्ग झाला की आपलं चुकीचं, पुराव्याशिवाय दिलेलं मतही बरोबर असल्याचे साक्षात्कार भल्याभल्यंना होतात. मग तुम्ही तर एक क्षुद्र मानव (नक्की ना?) आहात. अशा लोकांची आम्ही नेहमीच कीव करतो. यापुढेही करु. काळजी करु नये. किंवा मिपाच्या स्टाईलमध्ये
- कल्जी क्रू नये.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/24/2015 - 09:43
नवीन
युपीतील दंगे जाट-मुस्लिम यांच्यात पेटले होते. जाट मुलीच्या छेडछाडीवरून तिच्या भावांनी छेडछाड करणार्या मुस्लिम तरूणांना जाब विचारल्यावर त्या दोन भावांचा खून झाला व त्यातून दंगल पेटली. दंगलीत मृत झालेल्या हिंदूंना २ लाख रू. नुकसानभरपाई व मृत झालेल्या मुस्लिमांना ५ लाख रू. नुकसानभरपाई असा पक्षपात अखिलेश यादव सरकारने केला. त्यामुळे दंगलीत तेल ओतण्याचे काम झाले. दुर्दैवाने बोकोबांनी लिहिल्याप्रमाणे वैचारिक कावीळ आणि सिनिकल वृत्ती यामुळे प्रत्येक गोष्टीत, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तुम्हाला भाजपच दिसतो. जसे मोगलांना संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे किंवा इंदिरा गांधींना प्रत्येक घटनेत सीआयए चा हात दिसायचा किंवा काँग्रेसला सर्वत्र संघ दिसतो, तसेच इथेही झाले आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/23/2015 - 19:06
नवीन
बरं, तसं समजा.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 10/24/2015 - 10:30
नवीन
निवडणुकांच्या संदर्भात माझा एक हायपोथिसिस आहे. मला नेहमी वाटते की सत्ताधारी पक्षाच्या बाजूने/विरोधात मते देताना मतदार दोन गोष्टींचा विचार करतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या सत्ताधारी पक्षाकडून असलेल्या अपेक्षा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सत्ताधारी पक्षाने नक्की किती अपेक्षांची पूर्तता केली. समजा सत्ताधारी पक्षाने १०० गोष्टी कराव्या अशी अपेक्षा असेल पण प्रत्यक्षात केल्या केवळ २० तर त्या सत्ताधारी पक्षाविरूध्द लोकांचा असलेला क्षोभ हा १० गोष्टी कराव्या अशी अपेक्षा असलेल्या पण प्रत्यक्षात ८ गोष्टी केलेल्या सत्ताधारी पक्षाविरूध्दच्या क्षोभापेक्षा जास्त असतो. मतदार मत देताना पर्याय ८ पेक्षा जास्त गोष्टी करूच शकत नाही त्यापेक्षा सध्याच्या सत्ताधारी पक्षाने २० गोष्टी केलेल्या आहेत-- भले त्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्या तरी विरोधी पक्ष देऊ शकेल त्यापेक्षा जास्त आहेत हा विचार करत नाहीत. म्हणजेच माझ्या हायपोथिसिसप्रमाणे सत्ताधारी पक्षाविरूध्द मते बनविताना पर्यायी पक्ष किती चांगला आहे/वाईट आहे हा विचार मतदार करत नसतात.
इतके दिवस या हायपोथिसिसच्या पुष्ट्यर्थ मतदार खरोखरच असा विचार करतात याचा समाधानकारक पुरावा मला मिळालेला नव्हता. तो काही प्रमाणात मिळताना दिसत आहे.
नाण्यात खोट आहे की नाही हे ज्याचेत्याचे मत झाले. त्याविषयी इतरांनी भाष्य करून काही अर्थ नाही. पण या नाण्यात खोट आहे म्हणून पर्यायी नाण्याच्या बाजूने मत बनविण्यापूर्वी पर्यायी नाणे किती रद्दड आहे याचा विचार कोणी करताना दिसत नाही. एन.डी.ए हरेल तर बरेच होईल (पक्षी लालू-नितीश आघाडी जिंकेल तर बरेच होईल) असे मिसळपाववरच एका सदस्याने म्हटलेले आहे. कुठलाही सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस लालू जिंकावा अशी इच्छा करणार नाही अशी माझी भाबडी समजूत होती.पण ती पार चुकीची होती हे मिसळपाववरच बघायला मिळाले. उच्चशिक्षित मतदार असा विचार करत असतील तर सामान्य मतदार त्यापेक्षा वेगळा विचार कसा करणार?
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 10:56
नवीन
<नाण्यात खोट आहे की नाही हे ज्याचेत्याचे मत झाले. त्याविषयी इतरांनी भाष्य करून काही अर्थ नाही.>
सहमत. पण यालाच काही लोक कावीळ वगैरे बरळू लागतात. आपल्या विरोधी मत मांडले कि कावीळ असा यांचा सोपा फंडा असतो.
आता तुम्ही लालू आणि सुशिक्षित मतदार याबद्दल बोलत आहात त्यावर माझे मत असे आहे कि काँग्रेस जसे मुस्लिमांना भाजपची भीती दाखवून मते मिळवायची तसे भाजपवाल्यांचे लालू वगैरे बद्दल मत आहे काय? म्हणजे आम्हाला निवडून द्या नाहीतर लालू येईल हेच लोकांना गृहीत धरणे झाले. आपण काहीही करू लोक आपल्यालाच निवडून देतील यातच काँग्रेस गेली भाजपही तसेच करत आहे. आपल्याला (मराठी लोक) लालूची जेवढी घृणा/ तिटकारा असतो तेवढा बिहारी लोकांना नसतो. आपले पवार, ठाकरे वगैरेंना तिकडे असे पाण्यात पाहणारे खूप आहेत. सुशिक्षित किंवा इतरही लोकांत साधारणपणे सगळेच राजकारणी चोर /भ्रष्ट असा समज असतो, त्यात लालू सापडले बाकी सापडले नाहीत एवढाच फरक अशी धारणा असते. लालू सोबत आले म्हणून काही सुशिक्षित नाराज असू शकतात पण तरीही नितीश मुख्यमंत्री आणि लालूंचा पक्ष त्यात सामील हे समीकरण भाजप+ मांझी + पासवान यांच्या पेक्षा बरेच असे समजू शकतात. दुसरे म्हणजे महाआघाडीचा चेहरा नितीश आहे. आज बिहारमध्ये त्यांचा तोडीचा स्वच्छ चेहरा कुणाकडेच नाही , भाजपकडे तर चेहराच नाही. मोदींच्या नावावर मते मागून दिल्लीत झाले तेच होईल हे भाजपच्या उशिरा लक्षात आले असावे म्हणून आता सभा रद्द होणे , पोस्टरवर लोकल चेहऱ्यांना स्थान देणे वगैरे होत आहे. लोकसभेत बिहारमध्ये कधी नव्हे जातीय समीकरणे मागे पडून लोकांनी भाजप/ मोदींना कौल दिला १.५ वर्षात अच्छे दिन , महागाई , काला धन १५ लाख यांच काय झाल हा लोकांना पटकन पडणारा प्रश्न आहे शेवटी हे पब्लिक परसेप्शन असते. लालूच्या भीतीपेक्षा लोकांना ते महत्वाचे वाटले तर तो त्यांचा प्रश्न आहे. लोकसभेत मोदींना मत देणाऱ्या लोकांनी आपले परसेप्शन बदलून विधानसभेत वेगळा विचार केला कि भक्त लोकांना आता देशाचे नुकसान होणार, घात वगैरे प्रश्न पडू लागतात आपल्या लाडक्या पक्षाने खरच विकास केला असता तर हे घडलेच नसते हे ते मान्य करत नाहीत.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/24/2015 - 11:48
नवीन
आणि तुमचा आधीचा प्रतिसाद आणि तुमची भाषा यात केवढा फरक आहे! तुम्ही जर कालचा प्रतिसाद अशा भाषेत दिला असतात, तर तुम्हाला एवढा मनस्ताप झाला नसता. पण आधी कांगावा केल्यावर घसा दुखतोय म्हणून ओरडणे आणि समोरच्याने ते दाखवून दिल्यावर त्याच्यावरच डाफरणे हा काही जणांचा स्वभाव असतो. काय करणार?
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 12:05
नवीन
नीट वाचा. कावीळ वगैरे मुक्ताफळे कोण उधळत होत आधी ते. दुसर्याचे दोष दाखवायच्या गप्पा मारायच्या आधी स्वताची भाषा आणि नजर सुधारा. मनस्ताप ? मनोरंजन झाल मस्त पैकी, अंधभक्तांच्या एकेक करामती पाहून. भाजपवर कुणी टीका केली कि चवताळून स्वतःच अंगावर ओढवून घ्यायचं आणि नंतर दुखल म्हणून विव्हळत बसायचं. भाजपला विरोध केला कि केजरीवाल , कधी शिवसेनेचा ठरवायचे.असल्या नमुन्यांची घरे भाजप चालवतो कि काय असा प्रश्न पडतो. आपण एवढे इमानदार आणि सोज्ज्वळ हे भाजपचे नेते एकवेळ खाजगीत स्वतः मान्य करतील पण हे राजाहून जास्त राजनिष्ठ ते मान्य करणार नाहीत.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 12:06
नवीन
आपण एवढे इमानदार आणि सोज्ज्वळ नाही हे भाजपचे नेते एकवेळ खाजगीत स्वतः मान्य करतील पण हे राजाहून जास्त राजनिष्ठ ते मान्य करणार नाहीत.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/24/2015 - 14:35
नवीन
कांगावा करायची सवय नाहीये हो दुश्यंतराव. आणि तुम्हाला वैचारिक कावीळ झालेलीे आहेच पण आता तर वैचारिक अतिसारही झालेला दिसतोय. त्याचा दुर्गंध सगळीकडे पसरवण्याचं तुमचं निसर्गदत्त कार्य संपणार कधी? बरं, भाजपचा पाठीराखा असणं यात चुकीचं काय आहे? आणि जखमा तर तुम्हाला झाल्या आहेत. तुमच्या विव्हळण्यावरनं कळतं आहेच की ते. आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघा जरा. आम्हाला नडाल तर याहून जास्त जखमा होऊ शकतात.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 16:13
नवीन
जबरी भ्रम आहेत तर स्वतःबद्दलचे. असले म्यावू म्यावू करणारे खूप पाहिले आहेत. आणि पाठीराखे कि पेड शिपाई ? असो लवकर बरे व्हा!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/24/2015 - 16:31
नवीन
अच्छा! म्हणजे आता लक्षात आलं. भाजपच्या पाठीराख्यांना पैसे मिळतात असा समज आहे तर. आता तर कावीळ हेपॅटायटीस बी च्या लेव्हलला गेली हो. काहीतरी करा. प्राणघातक आजार असतो हा. फुल डोक्यात गेलेला आहेच, पण रिकव्हरीचा चान्स आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sun, 10/25/2015 - 05:10
नवीन
कुठवर आलाय इलाज ?आम्हाला तुमच्यासारखा वेळच वेळ नाही ना इथे यायला. आपली रोगाची लक्षणे दुसर्यावर ढकलण अजून सुरूच आहे.अरेरे झटके वाढले दिसतेय.आजार जुना दिसतोय कि अच्छे दिनाची वाट पाहून अस अस झालंय ?असो. लवकर आपल्या प्रकृतीला आराम मिळो.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sat, 10/24/2015 - 17:37
नवीन
बिहार मध्ये दुसऱ्या चरणाचे मतदान १२ ऑक्टोबर ला झाले व तिसऱ्या चरणाचे मतदान २८ ऑक्टोबर ला आहे. मधल्या काळात मोदींच्या सभा झल्या नाहीत.याचा खोडसाळ अर्थ मतदार त्यांच्या सभाना फारसा प्रतिसाद देत नाहीत आणि म्हणून त्या रद्द कराव्या लागत आहेत असा नितीश आणि त्यांच्या समर्थकांनी लावला. क़ेन्द्र सरकार व भाजपा पक्ष यांच्यात महत्वाचे स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनीही तत्सम विधान केले आहे.
त्यावर केंद्रीय मंत्री आणि बिहार मधील भाजपा चे वरिष्ठ नेते रवि शंकर प्रसाद यांनी खुलासा केला आहे.ते म्हणतात की मधल्या काळात मोदींच्या कुठल्याही सभेचे आयोजनच केले नाही. तर मग त्या रद्द कशा करणार ? सभा का आयोजित केल्या नाही याचे स्पष्टीकरण त्यानी दिले आहे.
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bihar-polls-no-rallies-of-pm-modi-have-been-cancelled-figment-of-nitish-kumars-imagination-says-ravi-shankar-prasad/articleshow/49436662.cms
- Log in or register to post comments
स
सव्यसाची
Sun, 10/25/2015 - 10:25
नवीन
दुष्यंत साहेब,
बाकी गोष्टींवर सध्या तरी प्रतिसाद देत नाही. पण
याच्याशी सहमत नाही.
ज्या सभेच्या रद्द होण्याबद्दल बातम्या पसरल्या ती सभा १६ ऑक्टोबर ची होती असेही सांगण्यात आले. त्याबद्दल बीजेपी कडून सांगण्यात आले कि १६ ते २४ च्या दरम्यान कोणतीही सभा आयोजित करण्यात आली नव्हती. २५ तारखेपासून परत पंतप्रधान प्रचाराला सुरुवात करतील. (जे कि आज आपल्याला दिसले आहे. )
थोड्या वेळासाठी असे समजून चालू अशी काही सभा होती. ती रद्द होण्याचे कारण बिहार मध्ये होते असे मला वाटत नाही. १३ तारखेपर्यंत पंतप्रधान माहिती कायद्याला १० वर्षे पूर्ण होण्याप्रीत्यार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाणार नव्हते. परंतु, शेवटी त्यांनी या कार्यक्रमास होकार कळवला. तो कार्यक्रम १६ तारखेला दिल्ली येथे होता.
त्यामुळे सभा रद्द झालीय हेच तितकेसे खरे वाटत नाही आणि सभा रद्द जरी झाली असली तरी तिचे कारण बिहार मध्ये आहे असे तर वाटत नाही.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sun, 10/25/2015 - 18:03
नवीन
ओके ठीक आहे. आपण म्हणता तसेही असू शकेल. धन्यवाद!
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sun, 10/25/2015 - 19:38
नवीन
मी याच्या वरच दिलेल्या प्रतिसादात रवि शंकर प्रसाद यांची लींक दिली आहे. ते म्हणतात कि त्यांनी १६ तारखेला सभा घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्या कडून परवानगीही मागितली नव्हती .
- Log in or register to post comments
म
म्हसोबा
Fri, 10/23/2015 - 19:46
नवीन
कसले डोंबलाचे SWOT Analysis घेऊन बसला आहात, यांची एकेक मुक्ताफळे ऐकली की असे वाटते
.
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Sat, 10/24/2015 - 06:21
नवीन
कि आपण इथे निपक्षपाती चर्चा करायला हवी.
काहीजण भाजपप्रति फारच सहानभूती दाखवतात,आणि काहीजण भाजपला फारच पाण्यात बघतात.आपण इथे कोण्या एका पक्षाचे समर्थक म्हणून चर्चा करणे उचित ठरणार नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 10/24/2015 - 15:07
नवीन
कोण्या एका पक्षाचे समर्थक म्हणून चर्चा करणे उचित ठरणार नाही.
करु द्या कि
समर्थक लोक पक्षाच्या चांगल्या बाजू समोर मांडतात आणि विरोधक वाईट बाजू. दोन्ही कडच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समोर आल्या तर वाईट काय?
टीका किंवा स्तुती विधायक असली आणि सभ्य शब्दात असली म्हणजे झालं.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/24/2015 - 11:37
नवीन
नितीशबरोबर लालू असल्याने बिहारमधील काही घटकात आतापासूनच भीति पसरायला सुरूवात झाली आहे. त्याबद्दल हा एक वृत्तांत - http://indianexpress.com/article/india/india-news-india/why-bjp-is-going-to-town-in-bihar-literally/
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 10/24/2015 - 16:30
नवीन
पुरूषांपेक्षा ५ ते ७ टक्के इतका जास्त सहभाग स्त्रियांचा आहे. त्याचा अर्थ काय असावा? कारण हा जास्तीचा सहभाग काही हजार मतांचा होतो व तो निवडणूक निकालावर नक्कीच परिणाम करतो. इतकेच नव्हे तर जातीच्या समीकरणावर हे मतदान मातही करू शकेल असे वाटते.
जिथे राजद असेल तिथे राजदाच्या विरोधात आणि इतरठिकाणी नितिशकुमारांना पाठिंबा असा त्याचा अर्थ असेल काय? नितिशकुमारांच्या मंत्रीमंडळातील भाजपाच्या मंत्र्यांची कामगीरी चांगली असेल तर असे होऊ शकेल असे वाटते.
जरी नितीशकुमार व भाजप यांना एकत्र यायचे नसेल पण मतदारांना ते एकत्र यावेत असे वाटत असेल तर मात्र मतदार ते मतपेटीतून नक्कीच दाखवतील का?
मला राजकारणातले फारसे कळत नाही म्हणून फक्त माझी शंका विचारतोय.
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 10/24/2015 - 18:26
नवीन
वॉट्स अॅप वर सध्या एक प्रचंड विनोदी मेसेज फिरतोय. खोडसाळ आहे की उपरोधात्मक आहे की प्रामाणिक अंदाज आहे काही कळत नाही. प्रणव मुकर्जींची राष्ट्रपतिपदाची मुदत पुढल्या वर्षी संपते आहे. त्या वेळी शरद पवारांना ते पद देऊ केले जाईल अशी बातमी त्यात आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 10/24/2015 - 18:58
नवीन
व्हॉट्सअॅपवर फिरणारे मेसेजेस बाय डिफॉल्ट प्रचंड विनोदीच असतात. डिसेंबर २०१४ मध्ये असाही एक मेसेज फिरत होता की मोदींनी व्लादिमिर पुतिनबरोबर तेल विकत घ्यायचा करार केला म्हणून तेलाचे दर कोसळले. केवळ भारतीयांनी स्वीस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाचे व्हॉट्सअॅपवर फिरणारे आकडे म्हणाल तर हे ५००-१००० लोक जगातील ६५० कोटी लोकांकडे असतील त्यापेक्षा कैक पटीने जास्त पैसे कॅशमध्ये राखून आहेत असे कोणाला वाटायचे.
कोणाची इतकी कल्पनाशक्ती अफाट दौडते आणि मुख्य म्हणजे इतका वेळ कोणाला असतो असले काहीतरी कल्पना करून लिहायला कुणास ठाऊक. इतरांचे ठिक आहे. फॉरवर्ड करायला फार कष्ट पडत नाहीत. पण मुळात कोणीतरी असे मेसेज तयार करत असलेच पाहिजे ना. त्यांना अशा कल्पना सुचतातच कशा आणि इतका वेळ त्यांच्याकडे कसा असतो कुणास ठाऊक. व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज हे एवढे क्वालिफिकेशन एखाद्या मेसेजला फाट्यावर मारायला पुरेसे आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sat, 10/24/2015 - 19:29
नवीन
प्रणव मुकर्जींची राष्ट्रपतिपदाची मुदत पुढल्या वर्षी संपते आहे
प्रणव मुखर्जींची मुदत जुलै २०१७ पर्यंत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/24/2015 - 20:10
नवीन
या निवडणुकीमुळे मला १९९० मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आठवण होत आहे. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने फक्त १९५ जागा जिंकून सत्ता गमाविली होती. बोफोर्स प्रकरण, शहाबानो प्रकरण, श्रीराम जन्मभूमी इ. चा फटका काँग्रेसला बसला होता. महाराष्ट्रात १९८५ मध्ये ४८ पैकी ४३ जागा जिंकणार्या काँग्रेसला १९८९ मध्ये २८ जागा मिळाल्या होत्या.
नंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीने मोठे आव्हान उभे केले होते. परंतु पवारांनी अतिशय चतुराईने आपले पत्ते खेळले. प्रथम त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले व गवई गटाबरोबर युती करून काही दलित मतांची बेगमी केली. त्यावेळी प्रचारात बाळासाहेब ठाकरे अत्यंत आक्रमक भाषेत प्रचार करीत होते. पवारांनी अनेक वृत्तपत्रांना हाताशी धरून बाळासाहेबांवर टीकेची झोड उठविली. बाळासाहेब आपल्या भाषणातून महिलांचा अपमान करीत आहेत, आदरणीय पत्रकारांचा अपमान करीत आहेत असे वारंवार लिहून येऊ लागले. सध्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या प्रत्येक वाक्याचा वेगळा अर्थ काढून त्यांना झोडपले जात आहे. अगदी तसेच त्यावेळी बाळासाहेबांच्या भाषणातील प्रत्येक वाक्याचा कीस काढला जाऊ लागला. ते अगदी ऑफ द रेकॉर्ड बोललेले सुद्धा माध्यमांना लीक केले गेले. त्याचवेळी दादा कोंडके सेनेच्या बाजूने प्रचार करताना काही वेळा बिलो द बेल्ट बोलत होते. त्यावरही प्रचंड टीका झाली. असे चित्र निर्माण केले गेले की या मंडळींनी महाराष्ट्राची संस्कृती, महिलांची सभ्यता धोक्यात आणली आहे. पुष्पा भावे यांच्या सारख्या साहित्यिकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. आपल्या आयाबहिणींची निंदानालस्ती करणार्यांचा, असभ्य वक्तव्ये करणार्यांचा पराभव करा असा जोरदार प्रचार काँग्रेसने सुरू केला.
त्याबरोबरीने पवारांनी जातीय प्रचार सुरू केला. आज लालू जे करीत आहे त्याचेच जरा सभ्य स्वरूप म्हणजे तो प्रचार होता. सेना-भाजप सत्तेवर आले तर पुन्हा एकदा पेशवाई येईल, यांना पेशवाई आणायची आहे अशा तर्हेच्या सूचक जातीयवादी जाहिराती रोज वृतपत्रात येऊ लागल्या.
शेवटी निकाल लागल्यावर काँग्रेसला २८८ पैकी १४१, भाजप ४२ + सेना ५२ अशा ९४ जागा व जनता दल २५ अशा जागा मिळाल्या. भाजप-सेनेचा प्रचार बघता व काँग्रेसविरोधी वातावरण बघता सेना-भाजपला अजून किमान २०-२५ जागा मिळायला हव्या होत्या.
बिहार निवडणुकीत साधारणपणे असेच चित्र आहे. लालू जोरदार जातीयवादी प्रचार करीत आहे, ढोंगी साहित्यिक पुरस्कार परत करून निषेधाची नाटके करीत आहेत, नितीशकुमारांनी बिहारची अस्मिता हा मुद्दा केला आहे. आणि त्याचवेळी भाजपमधील वाचाळवीर प्रक्षोभक वक्तव्ये करून आगीत तेल ओतत आहेत. एकंदरीत चारही बाजूने भाजप घेरला गेला आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »