बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके
मॅनेजमेन्टच्या क्षेत्रात "SWOT analysis" ही एक संकल्पना आहे. SWOT म्हणजे Strengths (सामर्थ्यक्षेत्रे), Weaknesses (कमकुवत क्षेत्रे), Opportunities (संधी) आणि Threats (धोके) यांचे विश्लेषण. यातील सामर्थ्यक्षेत्रे आणि कमकुवत क्षेत्रे या दोन गोष्टी अंतर्गत असतात तर संधी आणि धोके या दोन गोष्टी बाह्य असतात. पहिल्या लेखामध्ये नितीश कुमारांच्या आघाडीचा परामर्श घेतला त्यावेळी सर्व मुद्दे त्या आघाडीशी अंतर्गत होते.याचे कारण या आघाडीला बाह्य कोणते मुद्दे हे संधी असतील आणि कोणते मुद्दे धोकादायक ठरतील याचा विचार केला तर खरोखरच तसे मुद्दे मिळाले नाहीत. कदाचित माझ्याकडून काही मुद्दे निसटले असतील. पण भाजप आघाडीबाबत मात्र संधी आणि धोके हे बाह्य मुद्देही तितक्याच प्रमाणावर मला सापडले. म्हणून या लेखाचे शीर्षकही तसेच दिले आहे.तेव्हा सुरवात करू SWOT याच क्रमाने.
भाजप आघाडीची Strengths (सामर्थ्यक्षेत्रे)
१. ही आघाडी नितीश कुमारांच्या आघाडीच्या मानाने अधिक सुसंगत आहे.बिहारमधील निवडणुक म्हटली की जातीपातींचा विचार अनिच्छेने का होईना पण करावाच लागतो. त्यामुळे हा मुद्दा जातीच्या आधारेच स्पष्ट करतो.
या आघाडीचे मतदार नक्की कोणते गट आहेत? उच्चवर्णीय, बनिया आणि सुशीलकुमार मोदींच्या ओ.बी.सी मधील जातींचे मतदार हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत.त्यापैकी कोणीही भाजपला सोडून जायची शक्यता नाही. महादलितांमधील पासवान, मल्या (नावाडी) या समाजातले मतदार रामविलास पासवानांच्या लोकजनशक्तीचे पारंपारिक मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ही व्होटबॅंक पासवानांनी आपल्याबरोबर ठेवली आहे. ओ.बी.सींमधील कुशवाह समाज उपेन्द्र कुशवाहांबरोबर तर महादलितांपैकी मुसहार आणि इतर जातींचे मतदार जीतनराम मांझींबरोबर असतील असे म्हणायला हरकत नसावी. जीतनराम मांझींचे निवडणुकीतील सामर्थ्य अजून स्पष्ट झालेले नाही.यापूर्वी ते तितके महत्वाचे आणि मोठे नेते नव्हतेच.पण नितीशकुमारांनी त्यांना मुख्यमंत्रीपद खाली करायला सांगितल्यावर मात्र त्यांनी आपले पत्ते योग्य प्रकारे खेळले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाले.तेव्हा त्या समाजातील मते त्यांच्यामागे जातील असे म्हणायला हरकत नसावी.
हे मतदार परस्परविरोधी नाहीत.म्हणजे नितीशकुमारांच्या आघाडीत यादव विरूध्द कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार आहेत. कुर्मी-कोयरींना लालूंच्या राज्यात डावलले जाते आणि सगळा फायदा यादवांनाच होतो या मुख्य कारणामुळे नितीशकुमार १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडले होते.त्या कारणाने यादव आणि कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार झाले. तशा प्रकारे परस्परविरोध भाजप आघाडीत नाही.जीतनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे आणि नितीश-लालू युती असल्यामुळे लालूंच्या काळातील यादवीचा त्रास झालेले महादलित मतदार मोठ्या अक्कलहुशारीने भाजप आघाडीने आपल्याकडे वळवले आहेत. भाजप आघाडीचे सर्वात मोठे सामर्थ्यस्थान हेच आहे.
२. भाजप आघाडीमध्ये भाजप १६०, लोकजनशक्ती ४०, उपेन्द्र कुशवाहांचा पक्ष २३ तर जीतनराम मांझींचा पक्ष २० जागा लढवत आहे. त्यामुळे अर्थातच स्थैर्याच्या दृष्टीने ही आघाडी अधिक विश्वसनीय आहे.आघाडीचा विजय झाल्यास भाजप स्वबळावर बहुमताच्या बऱ्याच जास्त जवळ असेल आणि इतर पक्षांवर अवलंबून रहावे लागले तरी त्याप्रमाणात कमी असेल.मतदारांनी सरकारचे स्थैर्य हा मुद्दा लक्षात घेतल्यास नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी ही मतदारांना अधिक आकर्षक असेल.
३. भाजप आघाडीचा प्रचार हा एकत्रितपणे चालला आहे असे अजूनपर्यंतचे तरी चित्र आहे. नरेन्द्र मोदींच्या दोन सभांना सर्व पक्षांचे नेते हजर होते.कदाचित भविष्यातल्या काही सभांनाही असतील. यातून मतदारांपुढे ऐक्याचा संदेश नक्कीच जात आहे.
भाजप आघाडीचा Weaknesses (कमकुवत क्षेत्रे)
१. भाजप आघाडीचा सर्वात मोठा वीकनेस म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा अभाव. नितीशकुमारांना तोड देईल असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप आघाडीकडे नाही. आजही सर्व सर्वेक्षणांमध्ये नितीश कुमार हे भाजपच्या कोणाही संभाव्य उमेदवारापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत.
भाजप आघाडीच्या Opportunities (संधी)
१. या निवडणुकांमध्ये एका बाजूला भाजप आघाडी आहे तर दुसऱ्या बाजूला नितीशकुमार-लालू आणि कॉंग्रेस आहेत. दुसऱ्या बाजूच्या पक्षांनी स्वातंत्र्यापासून बिहारमध्ये सरकार चालवले होते-- सर्वाधिक काळ कॉंग्रेसने, त्याखालोखाल लालूंनी १५ वर्षे आणि त्याखालोखाल नितीशकुमारांनी १० वर्षे!! त्यामुळे अन्य कोणाला एक संधी द्यायला हवी असे वाटणारे मतदारांना नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी अधिक आकर्षक आहे हे नक्कीच. ही भाजप आघाडीसाठी मोठी संधी आहे.
२. २०१४ च्या निवडणुकांप्रमाणेच यावेळीही ३५ पेक्षा कमी वय असलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. या तरूण मतदारांनी २०१४ मध्ये नरेन्द्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मते दिली होती. लालू बरोबर नसते तर त्याच मुद्द्यावर यातील बहुसंख्य मते नितीश कुमारांकडे जायची शक्यता होती.पण नितीशकुमारांनी लालूंचे जोखड गळ्यात अडकवून घेतल्यामुळे ही मते परत एकदा आपल्याकडे आकर्षित करणे भाजपला सोपे जाईल.
भाजप आघाडीसाठीचे Threats (धोके)
१. अजूनही भाजप आघाडी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर अधिक प्रमाणावर अवलंबून आहे. नरेंद्र मोदी बिहारमध्ये लोकप्रिय असतीलही पण ते राज्याचे मुख्यमंत्री बनणार नाहीत.तसेच नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर मतदारांनी २०१४ मध्ये मते दिली.आता परत त्याच नावावर मते मागण्यावर नक्कीच मर्यादा आहेत. शेवटी अर्थशास्त्रातला Law of diminishing marginal returns हा प्रकार सर्वत्र असतोच. एका कारणावरून मागच्या वेळी जितकी मते मोदी फिरवू शकले तितक्या प्रमाणावर यावेळी आणि त्यातही विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी फिरवू शकतील का? एकाच मुद्द्यावर किती काळ अवलंबून राहायचे याचा विचार भाजपने करायलाच हवा.
२. बिहारमधील जातीपातींचे वर्चस्व असलेल्या परिस्थितीत एकाच आघाडीत रामविलास पासवान आणि जीतनराम मांझी हे दोन एकाच समाजातील नेते असणे हे धोकादायक ठरू शकते. शेवटी रामविलास पासवान हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वप्रथम १९६९ मध्ये राज्य विधानसभेवर निवडून गेले होते.आणि १९७७ पासून १९८४ आणि २००९ चा अपवाद वगळता ते सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्या तुलनेत जीतनराम मांझी हे बऱ्यापैकी उपऱ्यासारखे आले आणि आपल्याला मिळाल्या त्याच्या अर्ध्या जागा मिळवून गेले असे पासवानांना वाटणारच.त्यातून पासवानांचे आपल्याच समाजातील नेत्यांबरोबर कसे वाकडे असते याविषयी माझ्या मिसळपाववरील पूर्वजन्मात या प्रतिसादात लिहिले होते.
याला मिटिगेटींग फॅक्टर म्हणजे मायावतींचा जसा पासवानांना एकदा नाही तर दोनदा स्वत:ला फटका बसला तसे मांझी करू शकतील असे वाटत नाही.तसेच एकदा निवडणुका झाल्या की नंतर मांझींना फारसे कोणी विचारेल असे वाटतही नाही.मायावतींमुळे पासवानांच्या मतांवर जसे गंडांतर आले तसे मांझी करतील याची शक्यता कमी.आणि दुसरे म्हणजे मांझी हे पासवानांचे मतदार-- पासवान आणि मल्या या जातींचे मतदार पळवतील याची शक्यता त्या मानाने कमी. म्हणून बहुदा पासवान गप्प बसले असावेत. पण समजा भविष्यात या दोघांमध्ये मतभेद उफाळून आले तर मात्र तो भाजप आघाडीसाठी मोठा धोका असेल.
आता यापुढच्या लेखामध्ये या निवडणुकांसाठीच्या "x-factors" चा परामर्श घेईन.
Book traversal links for बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके
💬 प्रतिसाद
(116)
स
सौंदाळा
Mon, 10/26/2015 - 06:49
नवीन
भाषण ऐकले आहे दादा कोंडकेंचे. एकेकाला काय फोडुन काढलं आहे. हसुन हसुन बेजार झालो होतो.
दादांचा पहिला निर्मिती केलेला चित्रपट - 'सोंगाड्या' मुंबईतल्या कोहीनुर चित्रपट्गृहात लावायचे ठरले होते. तेव्हा चित्रपट्गृहे निर्मात्याला ठराविक रक्कम देऊन बुक करावी लागत त्याप्रमाणे दादांनी बुकींग केले होते. पण अचानक एक तिकडे दादांचा चित्रपट डावलुन हिंदी चित्रपट (देव आनंदचा - जॉनी मेरा नाम) लावायचे ठरले. दादा चित्रपट्गृहाच्या मालकाकडे गेले पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच वेळी कोणीतरी दादांना बाळासाहेबांना भेटायचा सल्ला दिला. शिवसेना त्यावेळी नुकतेच बाळसे धरत होती. दादा बाळासाहेबांना भेटल्यावर ताबडतोब बाळासाहेब स्वतः काही शिवसैनिकांना बरोबर घेऊन गेले आणि त्यांच्या खास शैलीत त्या चित्रपट्गृहाच्या मालकाला 'समजावले'. शेवटी तिकडे दादांचा सोंगाड्याच प्रदर्शित झाला आणि रौप्यमहोत्सवी ठरला. त्यावेळेपासुन दादा आणि बाळासाहेबांचा स्नेह जुळला आणि पुढे कित्येक वर्षे टिकला.
(दादांचे चरित्र 'एकटा जीव' मधे हे वाचले होते)
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 10/30/2015 - 19:43
नवीन
भाजप हरली तर पाकिस्तानात फटाके वाजतील- इति जुमला सम्राट अमित शहा. आले हे फेकू आपल्या लाइनिवर.
लालू यादव आपल्या करणीने बदनाम आहे आणि ते बरेच आहे पण हे शहा आणि मोदी जे काही बरळतात त्यावर भक्तलोक आणि काही शहाणेपण मुग (किंवा अन्य काही) गिळून गप्प बसलेले असतात.मागे पण हरियानामध्ये अमित शहाच्या मंचावर डीपी यादव उपस्थित होता तेव्हा भाजपेयिन साधनशुचिता आठवत नव्हती. एका तडीपार गुंडाला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवणार्यांना काश्याची आलीय म्हणा साधनशुचिता. भाजपला निवडून द्या नाहीतर लालू यादव येईल हे विधान किंवा भाजपला निवडून द्या नाहीतर पाकिस्तानात फटाके वाजतील हे विधान यात जास्त फरक नाही.असो. पब्लिक याला जास्त महत्व देत नसते.
- Log in or register to post comments
ज
जॅक द रिपर
Fri, 10/30/2015 - 21:14
नवीन
क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकला तर भारतात फटाके वाजवणार्यांच्या अवलादींना यातला अर्थ कळणार नाहीच.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/31/2015 - 12:41
नवीन
+ १
असल्या लोकांना फक्त मोदींना अपशकुन करायचा आहे. मग त्यासाठी लालूसारख्या गुन्हेगाराला पाठिंबा द्यावा लागला तरी हरकत नाही, पण मोदींना अपशकुन व्हायला पाहिजे अशी यांची मानसिकता आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/31/2015 - 12:39
नवीन
इथे हे वाक्य टाकून थयथयाट करावासा वाटला यातच या वाक्याचं महत्त्व दिसून येत आहे!
- Log in or register to post comments
ज
जॅक द रिपर
Sat, 10/31/2015 - 17:55
नवीन
पब्लिकने कशाला महत्व दिले हे २०१४ च्या मे महिन्यात स्पष्टपणे दिसून आले आहे.
अद्यापही त्या मानसिक आघातातून बाहेर न आलेल्यांचा या वैचारीक डान्सबार सुरु आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/31/2015 - 18:08
नवीन
+१
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 10/31/2015 - 18:50
नवीन
सट्टेबाजांचा अंदाज -
संजद+ : १२९
भाजप+ : ११०
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bihar-polls-grand-alliance-displaces-nda-in-satta-race-punters-give-nitish-lalu-127-129-seats-nda-110/articleshow/49608038.cms
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/01/2015 - 04:45
नवीन
हे सट्टेबाज नक्की किती विश्वासार्ह असतात?
फेब्रुवारी २०१५ च्या दिल्ली निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसबरोबरच या सट्टेबाजांचाही प्रचंड पराभव झाला होता .
डिसेंबर २०१३ च्या निवडणुकांमध्ये सट्टेबाजांनी दिल्लीमध्ये केजरीवाल ८ ते १० जागा घेऊन तिसर्या क्रमांकावर येतील असे म्हटले होते. प्रत्यक्षात जागा मिळाल्या २८ आणि क्रमा़ंक होता दुसरा. याच सट्टेबाजांनी भाजपला मध्य प्रदेशात १२२ ते १२४ तर काँग्रेसला ७८-८० जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपला १६३ तर काँग्रेसला ६५ जागा मिळाल्या. राजस्थानात सट्टेबाजांनी भाजपला ११४ ते ११६ तर काँग्रेसला ६२ ते ६४ जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपला १६२ तर काँग्रेसला २३ जागा मिळाल्या. दुवा
मला वाटते की बिहारमध्ये चुरस मतांच्या टक्केवारीमध्ये असेल. ज्या आघाडीला एखादा टक्का मते जास्त मिळतील ती आघाडी १४०-१५० जागा मिळवून अगदी आरामात विजय मिळवेल आणि दुसर्या आघाडीला ७०-८० जागांवर समाधान मानावे लागेल. माझ्या मते नितीश कुमार आघाडीला विजयाची शक्यता जास्त आहे. प्रत्यक्षात काय होते ते पुढच्या रविवारी कळेलच.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/01/2015 - 10:02
नवीन
गुदस्ता साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सट्टेबाजांचा खालील अंदाज होता.
भाजप - ११०+, शिवसेना - ५०, काँग्रेस - ४०-४५, राकॉं - ४५-५०, मनसे - १५-२०, अपक्ष व इतर - १२-१५
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bookies-predict-modis-late-entry-will-damage-bjp-maharashtra/articleshow/44692788.cms
यापैकी भाजप व दोन्ही काँग्रेसच्या बाबतीत सट्टेबाजांचे अंदाज बरेचसे खरे ठरले. मनसेच्या बाबतीत अंदाज पूर्ण चुकला. शिवसेनेच्या बाबतीत काही फरकाने चुकला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/01/2015 - 10:50
नवीन
सट्टेबाजांचे अंदाज बरोबरसुद्धा येतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सट्टेबाजांनी रालोआला ३१७ जागांचा अंदाज दिला होता. रालोआला त्याच्या जवळपास म्हणजे ३३६ जागा मिळाल्या होत्या.
http://zeenews.india.com/news/general-elections-2014/lok-sabha-polls-bookies-excited-about-narendra-modi-wave-give-nda-317-seats_929063.html
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/01/2015 - 15:08
नवीन
बिहारमध्ये मतदानाचे ३ टप्पे पार पडले आहेत. अजून २ टप्प्यातील १०७ जागांचे मतदान व्हायचे आहे.
वरील बातमीनुसार पहिल्या २ टप्प्यात भाजप मागे पडल्याने सट्टेबाजांनी संजद+ ला १४५ जागांचा अंदाज दिला होता. परंतु ३ र्या टप्प्यात भाजपची परिस्थिती सुधारल्याने सट्टेबाजांनी तो अंदाज १२९ पर्यंत खाली आणला. जर उर्वरीत २ फेरीत भाजपची स्थिती अशीच सुधारली,तर हा आकडा अजून कमी येईल.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sun, 11/01/2015 - 18:17
नवीन
हे सट्टेबाजांचे अंदाज कशावर अवलंबून असतात या सम्बन्धी माहिती कोणी देऊ शकेल का ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/01/2015 - 14:46
नवीन
या निवडणुकांमध्ये एक गोष्ट समजत नाही. भाजप जर बॅकफूटवर असेल तर नरेंद्र मोदींना संभाव्य पराभवाच्या दोषापासून वाचविण्यासाठी एक तर त्यांच्या सभा न आयोजित करणे आणि पराभवाचे खापर फोडायला स्थानिक पातळीवरील एखादा बकरा शोधणे हे प्रकार झाले असते (जसे दिल्लीमध्ये झाले). तसे यावेळी झालेले दिसत नाही. दिल्ली निवडणुकांच्या वेळी आपण जिंकणार हा दावा भाजपने केला होता (तसा तो करायलाच हवा) पण तो दावा फार वेळा केलेला नव्हता. पण यावेळी मात्र आपण दोन-तृतीयांश बहुमत घेऊन येणार असा दावा अमित शहा जवळपास दररोज करत आहेत.भाजपने मतदानाच्या चौथ्या फेरीनंतरच निवडणुका जिंकलेल्या असतील असे अमित शहांनी कालच म्हटले आहे. प्रत्यक्ष भाजप बॅकफूटवर आहे की नाही हे कळत नाही पण निदान भाजपची देहबोली तरी तसे दर्शवत नाही. दिल्ली निवडणुकांच्या वेळी पोस्चरींग इतके नव्हते हे तर नक्कीच.
इंडिया टुडेमध्ये या चौकटीत एन.डी.ए चे नेते दावा करत आहेत की महादलित मते दूर गेलेली नाहीत.पण ही मते नेहमी "मूक मते" असतात त्याप्रमाणे यावेळीही तशीच मूक आहेत. हे मतदार राजदच्या गुंडांना घाबरून आपण मत कंदिलालाच (राजदचे चिन्ह) असे म्हणत आहेत पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी मते आम्हालाच दिलेली आहेत असा त्यांचा दावा आहे. बसपची मते मुख्यत्वे अशी मूकमते असतात.त्यामुळे प्रत्येक मतकल चाचणीमध्ये बसपला दिलेल्या असतात त्यापेक्षा प्रत्यक्षात जास्त जागा मिळतात. तसे एन.डी.ए विषयी होणार असा त्यांचा दावा दिसत आहे. प्रत्यक्षात काय होते हे पुढच्या रविवारीच कळेल.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/01/2015 - 14:47
नवीन
एन.डी.टि.व्ही. वर दाखविलेल्या कार्यक्रमात कोसी नदीच्या भागात पप्पू यादवलाही बराच पाठिंबा आहे असे दिसते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पप्पू यादवने खुद्द शरद यादव यांचा त्यांच्याच मधेपुरा मतदारसंघात पराभव केला होता.त्यानंतर ते राजदमधून बाहेर पडले. कोसी नदीच्या भागात त्यांचा पक्ष काही प्रमाणात राजदची यादव मते खाईल ही भाजपची अपेक्षा नक्कीच असेल. पण मधेपुरा भागात भाजपला फारसे स्थान नाही त्यामुळे पप्पू यादवने मते फोडून भाजपला फार फायदा होईल असे नाही. तसेच झंझारपूर भागात राजदचे माजी नेते देवेन्द्रप्रसाद यादव यांचा पक्ष मुलायमसिंग यादव यांच्या तिसऱ्या आघाडीचा सदस्य आहे. २०१४ मध्ये देवेन्द्रप्रसाद यादव यांनी राजद सोडून संजदमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुक लढवली.ही जागा भाजपने जिंकली.पण देवेन्द्रप्रसाद यादव झंझारपूरमधून पूर्वी पाचवेळा निवडून गेले आहेत त्यामुळे त्यांची स्वत:ची काही मते त्या भागात असतील ती राजद-संजदपासून फोडली जातील अशी भाजपची नक्कीच अपेक्षा असेल. प्रत्यक्षात काय होते हे पुढच्या रविवारीच कळेल. मी बिहार निवडणुकांविषयी एक्स-फॅक्टर हा तिसरा लेख लिहिणार होतो त्यातील इतर सगळे मुद्दे पहिल्या दोन लेखांमध्ये चर्चेत किंवा प्रतिसादात आले आहेत.म्हणून तिसरा लेख स्वतंत्र लिहित नाही.पण त्या लेखात लिहायचे पण अन्य कुठल्याच प्रतिसादात किंवा चर्चेत न आलेले हे दोन मुद्दे इथे लिहित आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/02/2015 - 15:29
नवीन
जयपूर, इंदूर, दिल्ली आणि मुंबई येथील सट्टेबाजांचे नवीन अंदाज -
भाजप+ : १२७-१५०, संजद+ : ७०-१०९
रविवारीच समजेल हे अंदाज किती बरोबर येतात आणि कोणत्या शहरातल्या सट्टेबाजांचे अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जातात ते..

- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3