स्मरण शक्ति लयाला जात चालली आहे काय
शाळेत ३० पर्यंत पाढे असत.ई.६वी७वी,तच १२/१५चे पाढे विसरले,
ते पूना:पाठ करण्याचा प्रयत्न झाला नाही, आवश्यकताहि पडली
नाही. १९, २९ चे पाढे शिक्षकांनाही येत नसत . पावकी , सवायकि, औटकी
हा प्रकारहि पूर्वीच्या प्राथमिक शिक्षणात होता, तेहि सोइस्कररित्या विसरलं
गेलं.अर्थात त्याची फारशी गरजहि पुढच्या आयुष्यात कधी लागली नाही. पण
मनातल्या मनात ते करता यायचं,४७ निम्मं,६८ पाव ,किंवा ९२ सव्वा ६० दीडं,
जेव्हां एकदम सांगायचो तेव्हां समोरच्याला आश्रर्य वाटायचं.
माहीत नाही ,इंग्रजी माध्यमाच्या शाळातून पूर्वी किती पर्यंत टेबल शिकवली ,
जायची म्हणजे पाठांतर करून घ्यायचे आज किती ,व काय असते ,कसे असते,
अभ्यास क्रमात .थोडे तरी पाठांतर शिल्लक आहे कि नाही.
तरूण पिढीला,साध्या सोप्या हिशोबाला कालक्युलेटर लागतो ,ऊद्या काँम्युटर
लागल्यास नवल वाटायला नको .
या नवीन गाजेट्सनी स्मरण शक्ती लयाला चालली आहे.
कोणत्याहि मोठ्या बेरजा मी हातीच करतो ,माझ्या पत्नीला ,आजहि २९ पर्यंतचे पाढे
तोंड पाठ आहेत .
या विषयावर चर्चा व्हावी असे मला वाटते .
घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती नक्कीच नव्हे.+१०० आणि घोकंपट्टी अथवा स्मरणशक्ती म्हणजे आकलन असेही नक्कीच नाही. परंतू तरीही या तिघांची सरमिसळ करून गोंधळ होण्याचे / करण्याचे प्रमाण लक्षणिय आहे :)