मिपाकरांनो तुमचे वय काय?
'मिसळपाव डॉट कॉम' नावाच्या सोशल साइटचा दिवाळी अंक गेली अनेक वर्षं निघतो आहे. तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू. धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष. त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.
--------------------------
आजच्या मटामध्ये मेघनाताईंचा 'दिवाळी अंकांची ऑनलाईन आतषबाजी' हा लेख आलाय, त्यातील ही मिपा दिवाळी अंकाची दखल. हा पॅरा वाचून काही प्रश्न पडले म्हणून हा लेखन प्रपंच.
ढिस्क्लेमर :-
१) मेघनातै आणि आमचे काय वैर नाय. (गतसाली त्यांच्याकडून वट्ट रकमेचा लेखनाबद्दलचा चेक आपल्याला मिळालेला आहे.)
२) प्रा. डॉ. मिपा दिवाळी अंकाचे मुख्य संपादक असताना देखील 'तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन' असा उल्लेख केल्याने मला जळजळ झालेली नाहीये.
तर आता सुरुवात करतो.
तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू.ह्या अंकाचे संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने नक्की जमेची बाजू काय घडली हे कुठेही सांगण्यात आलेले नाही.
धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष.संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने हे असे घडले आहे असे म्हणायचे असावे काय? धीरगंभीर विषय अंकात आले तर त्याला दखलपात्र म्हणता येईल काय? किंवा 'उत्तम' दिवाळी अंकाची व्याख्या नक्की काय असते? ६०+ वर्षाचे संपादक आणि उगाच जागतिक चर्चा, संस्कृतीचा उपापोह इ. विषय अंकात आले की त्याला दर्जा मिळतो? ताईंनी म्हणल्याप्रमाणेच 'उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण' हे पुरेसे नाही काय? 'धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वारा' जिथे वाहतो त्या संस्थळांची गेली काही वर्षे जी अवस्था आहे, ती योग्य संदेश देणारी नाही काय?
त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारे अनेक छापील दिवाळी अंक काही कालावधीत 'राम' म्हणायला लागले. अनेक उदाहरणे तर आपण जाणतोच. मुळात ई-दिवाळी अंकांना निकष कशाला हवेत? उत्स्फूर्त लेखन आणि मायमराठीची सेवा ही निकषांमध्ये बसवायचीच कशाला? मनमोकळे लेखन आणि नवलेखकांचा हुरूप हीच खरेतर अशा अंकांची देणगी असते. नावाजलेल्या लेखकांना आणि त्यांच्या 'दवणीय किंवा मला पहा फुले वाहा' प्रकारच्या लेखनाला कंटाळूनच गेली काही वर्षे वाचक सातत्याने नवलेखकांना आवर्जून वाचत आहेत. एखाद्या अंकात असे नावाजलेले लेखक नसतील तर त्याची पात्रता खालावते का? आणि सगळ्यात खटकला तो वाचकांच्या वयाचा उल्लेख. फक्त प्रतिक्रिया देतात तेवढेच त्या अंकाचे वाचक असतात का? किती तरी लोक निव्वळ वाचनमात्र असतात. त्यात सर्व वयोगट आणि प्रोफेशनमधील वाचक असतात. त्यांना फक्त प्रतिक्रिया दिली नाही म्हणून गणतीत घ्यायचेच नाही का? मुख्य म्हणजे वाचकांचे वय आणि प्रतिक्रिया ह्यांचा संबंधच काय येतो? आणि वाचकांच्या वयाचा आणि अंकाच्या दर्जाचा संबंध काय? 'चांदोबा' आज सर्व वयोगटातील लोकं वाचतातच ना? का तिथे इयत्ता ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याने तुम्ही त्याला 'फक्त बालगोपाळांचे' असे मानणार आहात? तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की मिपाकरांनो तुमचे वय काय? लेखात बौद्धिक का शारीरिक ते स्पष्ट केलेले नसल्याने, कृपया दोन्ही वयं सांगा.
हा प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे कासोत्रिंच्या आगामी पुस्तकाला (चावडीवरचे कॉकटेल) मिळू घातलेला पुरस्कार परत करण्याच्या निर्णय सोत्रिनी घेतलेला आहे. त्यामुळे त्याना कुठल्याही मुद्द्यावर काहीही प्रश्न विचारण्याचा हक्क आपोआपच प्राप्त झालेला आहे परागुर्जी , उगाच शंका घेवू नये.दिलखुलासपणा ही मनाने तरुण असणाऱ्यांची लक्षणं असतात.एक सांगाल का वरचे वाक्य लिहीता आणि " बुढ्ढे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास असत नाहीत." असे सुद्धा म्हणता. म्हणजे "जे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास नसतात ते बुढढे असतात" असा निष्कर्श काढायला हरकत नसावी. बरोबर?