Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

ह
हेमंत लाटकर
Mon, 01/11/2016 - 08:11
🗣 217 प्रतिसाद
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे.... बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते. बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात. पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात. अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो. इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात. उपाययोजना: कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात. मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे. स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही. स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा. बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी. जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत. तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत. थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
106107 वाचन

💬 प्रतिसाद (217)
ज
जिन्क्स Tue, 01/12/2016 - 12:06 नवीन
खिक +++++++++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
क
कपिलमुनी Tue, 01/12/2016 - 12:22 नवीन
लाटकरांच्या लाट्या ! मिपाकर बसतायत पापड लाटत!
  • Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या Tue, 01/12/2016 - 12:41 नवीन
काही म्हणा. त्यांना बरोबर नस सापडली आहे लोकांचे प्रतिसाद घेण्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
नाखु Tue, 01/12/2016 - 13:37 नवीन
कुठं जरा पीठ जमू लागलं तर आले हे पापड मोडायला जरा वाळू भाजू तरी द्या !!!!!! आमच्या इथे लाट्यांचे पापड तसेच पापडाच्याही लाट्या मिळतील. हेला-गेला आणि कंपनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
ह
होबासराव Tue, 01/12/2016 - 13:49 नवीन
काका स्वारी बर का पण हे हेला-गेला यमक मत जोडो पलीज हेला काका कस एकदम भारदस्त वाटत बघा !! आस्कींग सोन्याबापु "बापु म्या एकदम बराबर बोल्लो का नाही"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चैतन्य ईन्या Tue, 01/12/2016 - 14:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 01/12/2016 - 14:43 नवीन
एकदम बरोबर गाववाले!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
न
नाखु Wed, 01/13/2016 - 04:06 नवीन
होबासरावांचे आणि बाप्पुंचे शब्दाबाहेर नाही. कंपनीचे नव बदलत नाही. अंमल्बजावणी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पैसा Tue, 01/12/2016 - 13:41 नवीन
निष्कर्ष सांगा.
  • Log in or register to post comments
ज
जिन्क्स Tue, 01/12/2016 - 13:59 नवीन
तुम्ही तुमच्या लग्नावर खूश आहात का? - असा एक नवा पोल काढा रे
  • Log in or register to post comments
_
_मनश्री_ Tue, 01/12/2016 - 14:16 नवीन
ज्यांना लग्न करायची इच्छा नसेल त्यांनी लग्न करूच नये . लग्न केल्यावर थोड्या फार तडजोडी कराव्याच लागतात दोघांनाही त्यामुळे ज्यांची अजिबात तडजोड करण्याची तयारी नसेल त्यांनी लग्नाच्या फंदात पडूच नये आणि एकदा लग्न केलं की जोपर्यंत आपल जन्मभर पटेल अशी खात्री होत नाही तोपर्यंत मुल जन्माला घालू नये , पण एकदा का मुल जन्माला आल कि मात्र शक्यतो घटस्फोट घेऊ नये , लग्नात काही समस्या उदभवली तरी त्यावर सामंजस्याने मार्ग काढून लग्न टिकवण्याचाच प्रयत्न करावा (कारण अगदीच गंभीर असेल तरच घटस्फोट घ्यावा ) कारण मुल झाल्यानंतर जर घटस्फोट झाला तर त्या मुलाची फार फरफट होते , कारण मुलांना आई आणि वडील दोघही हवे असतात
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/12/2016 - 14:18 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
च
चतुरंग Tue, 01/12/2016 - 14:18 नवीन
रस्त्यावरुन न घसरता सुरळीत चालायला हवी असेल तर तिची चाके आणि रस्ता यात काही किमान घर्षण आवश्यक असते, लग्नसंबंधातल्या दोन व्यक्तींबाबतही हे खरे आहे, तिथे जी काही योग्य तडजोड असते ती लग्नाची गाडी संसाराच्या रस्त्यावर व्यवस्थित चालवायला मदतच करते. घर्षण जास्त झाले तर टायर्स जळून धूर निघतो, कमी झाले तर गाडी घसरु शकते! शिवाय काही वर्षांनी नवीन टायर्स टाकावी लागतातच!! :) (गाडी सलामत तो टायर्स पचास)रंगा
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Tue, 01/12/2016 - 14:22 नवीन
पहिली गोष्ट, निसर्गानं स्त्री देहाची निर्मिती स्वतःच्या पुनरावृत्तीसाठी केली आहे त्यामुळे जोपर्यंत अपत्य जन्म होत नाही तोपर्यंत स्त्रीला पूर्णत्त्वाचं समाधान मिळत नाही. निपुत्रिक स्त्री दु:खी दिसते याचं कारण ती देहाची सार्थकता निभावू शकत नाही. पुरुषाला अपत्य जन्म हवाच असं काही नाही, तो निमित्तमात्र असतो. तस्मात, अपत्य जन्म ही निसर्गतःच स्त्रीची अभिलाषा आहे. दुसरी गोष्ट, मानवी मूल स्वावलंबी होण्यासाठी सर्व सजीवात सर्वाधिक वेळ लागतो. आणि मानवानं निर्माण केलेल्या अर्थप्रधान व्यवस्थेत तर तो साधारण पंचवीस वर्षापर्यंत असू शकतो. तस्मात, मानवी मुलाला संगोपनाची आणि पर्यायानं त्याची काळजी वाहू शकणार्‍या व्यवस्थेची नितांत गरज असते. या प्राथमिक विचारातून कुटुंबसंस्था अस्तित्त्वात आली. कारण एकटी स्त्री अर्थार्जन, आपत्य संगोपन आणि सांसारिक जवाबदारी अपवादानंच निभावू शकेल. तिसरी गोष्ट, विवाहामागे भारतीय विचारसरणीत संपूर्ण आयुष्याचा समग्र विचार केला आहे. म्हणजे तारुण्य सरल्यावर आणि शारीरिक क्षमता क्षीण होऊ लागल्यावर, मानवाला सुखाच्या मृत्यूसाठी पुन्हा कुटुंबाची गरज निर्माण होते. अशाप्रकारे मानवी जन्म, संगोपन, तरुणाईतील उपभोग, वार्धक्य आणि मृत्यू या सर्व पैलूंचा विचार करून विवाह ही संकल्पना निर्माण झाली आणि त्यावर भारतीय समाज व्यवस्था उभी राहिली. तस्मात, विवाह हा अत्यंत थोर विचार आहे. मानवाचं कौशल्य तो विवाह आणि संसार कसा सुखाचा करतो यावर आहे. ________________________ सर्व मानवी नाती मान्यता आहेत कारण विवाह या मूळ मान्यतेतून ती निर्माण होतात. तस्मात, पती-पत्नी ही जशी केवळ मान्यता आहे तशीच, ज्यानं मानवी भावविश्वाचा फार मोठा भाग व्यापलेला आहे, ती आई सुद्धा वास्तविकात मानवी कल्पनाच आहे. थोडक्यात, विवाहच काय कोणतंही नातं ही मानवी कल्पना आहे. पाश्चात्य विचारसरणीत व्यक्तीस्वातंत्र्य केंद्रस्थानी ठेवून मर्यादित विचार केला गेला आहे. लिव्ह-इन हा विवाहाला शह देणारा विचार मांडला गेला पण त्यात संगोपनाचं नियोजन शून्य आहे, फक्त संभोगावर फोकस आहे. वार्धक्याचा विचार करण्याची गरज त्यांना नाही कारण तिथे सरकार काळजी घेईल. मृत्यू ही जीवनातली महत्तम घटना आहे पण पाश्चात्य विचारसरणीला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही. थोडक्यात, पाश्चात्य विचारसरणी हा फार मर्यादित विचार आहे आणि विवाह ही भारतीय संकल्पना मानवी जीवनाचा, जन्म ते मृत्यू असा समग्र विचार आहे.
  • Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या Tue, 01/12/2016 - 14:33 नवीन
बाप रे तुमचे ते क्षमताच नाही, मर्यादित विचार वगैरे पाहून प्रतिवाद करण्याची इछाच गेली. इतके ठाम विचार आहे. एकाच प्रश्न आपण बाहेर राहिला आहात काय? म्हणजे फिरून वगैरे नाही. चांगले ४-५ वर्ष? कुठल्याही प्रदेशाचे आकलन एक वर्षात किंवा १५ दिवसांच्या ट्रीप मध्ये होत नाही. खूप बारीक सारीक गोष्टी कळायला बराच वेळ जातो. म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
च
चतुरंग Tue, 01/12/2016 - 14:37 नवीन
क्षमताच नाही .... वगैरे फारच टोकाचे आणि चुकीचे आहे. बाहेरचे जग पुरेसे न बघितलेलेच लोक अशी टोकाची मते मांडतात असा अनुभव आहे... (दर भारतवारीला "काय मग, तिकडे वीकेंडला मस्त पार्ट्याच असतात ना?" या प्रश्नाचा एकदा तरी सामना करावा लागलेला) - रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
व
विवेक ठाकूर Tue, 01/12/2016 - 14:39 नवीन
मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही. तुम्हाला मृत्यूबद्दल भारतीय आध्यात्मात काय विचार केला आहे याची कल्पना आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
म
मोदक Tue, 01/12/2016 - 15:15 नवीन
निसर्गानं स्त्री देहाची निर्मिती स्वतःच्या पुनरावृत्तीसाठी केली आहे त्यामुळे जोपर्यंत अपत्य जन्म होत नाही तोपर्यंत स्त्रीला पूर्णत्त्वाचं समाधान मिळत नाही हे तुम्ही कुठे वाचले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Tue, 01/12/2016 - 15:45 नवीन
निसर्गानं स्त्री देहाची निर्मिती स्वतःच्या पुनरावृत्तीसाठी केली आहे इतपत माहिती तुम्हाला असायला हरकत नाही. त्यामुळे जोपर्यंत अपत्य जन्म होत नाही तोपर्यंत स्त्रीला पूर्णत्त्वाचं समाधान मिळत नाही याच्या पुढे त्या मागची कारण मिमांसा दिली आहे : निपुत्रिक स्त्री दु:खी दिसते याचं कारण ती देहाची सार्थकता निभावू शकत नाही. पुरुषाला अपत्य जन्म हवाच असं काही नाही, तो निमित्तमात्र असतो. तस्मात, अपत्य जन्म ही निसर्गतःच स्त्रीची अभिलाषा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सूड Tue, 01/12/2016 - 16:02 नवीन
दवणे आणि वपु यांचा आशीर्वाद आहे तुमच्या लिखाणाला!! किती धीरगंभीर लिहीता, कसं जमतं हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मोदक Tue, 01/12/2016 - 16:07 नवीन
निपुत्रिक स्त्री दु:खी दिसते याचं कारण ती देहाची सार्थकता निभावू शकत नाही. पुरुषाला अपत्य जन्म हवाच असं काही नाही, तो निमित्तमात्र असतो. तस्मात, अपत्य जन्म ही निसर्गतःच स्त्रीची अभिलाषा आहे. इतके ठाम सरसकटीकरण आणि प्रतिसादाची ष्टाईल वाचून डोळे पाणावले. बाकी.. तुमचे प्रतिसाद वाचताना सारखी आमच्या सरांची आठवण येते. चालूद्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
प
पैसा Tue, 01/12/2016 - 16:09 नवीन
तुला अजून शंका आहे का काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 01/12/2016 - 16:19 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ह
होबासराव Tue, 01/12/2016 - 14:45 नवीन
तुम्हाला मृत्यूबद्दल भारतीय आध्यात्मात काय विचार केला आहे याची कल्पना आहे का? अहाहा आता खरे नीरुपण सुरु होतय्.. हेला काका कमवलत बघा तुम्हि हा धागा काढुन नशिब कमवलत. सात्विक आणि निराकार चेहरा करुन रसग्रहणाला तय्यार असलेला होबासराव
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Tue, 01/12/2016 - 14:51 नवीन
हे हल्लीचं प्रेम म्हणजे फक्त लैंगिक आकर्षण+पैश्याची हाव+मुलांना लुबाडणे असं सगळं हाय बघा, आणि,च्यामारी वर्जिन पोरी कश्या शोधायच्या आमच्यासारख्या वर्जिनांनी. . . .मला एका मुलीनं प्रपोज केलं,मी तिला म्हणालो माझ्याजवळ एक कवडी सुद्धा नाही तुझ्यावर उधळायला, तर चक्क ती तोंड विचित्र करून निघून गेली. गेली तर गेली, कोणी तरी मॅरेज मटेरियल असणार कि माझ्या नशीबात. . . . ||श्री कामदेव प्रसन्न||
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Tue, 01/12/2016 - 15:39 नवीन
त्यापूर्वी काय लिहीलंय ते समजायला हवं आणि त्याही आधी लिहीलेलं नीट वाचता यायला हवं. मी लिहीलंय : पाश्चात्य विचारसरणी हा फार मर्यादित विचार आहे आणि विवाह ही भारतीय संकल्पना मानवी जीवनाचा, जन्म ते मृत्यू असा समग्र विचार आहे. लिव-इन मधे संपूर्ण जीवनाचा आणि त्यातही मृत्यूचा काय विचार केला आहे हे दोन्ही प्रतिसादकांपैकी कुणी सांगू शकेल काय? आणि त्या आधी लिहीलंय : मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही. याचा `आपण बाहेर राहिला आहात काय?' याच्याशी काय संबंध आहे. बाहेर फिरून मृत्यूविषयी काय माहिती मिळते याचा उलगडा करु शकाल काय?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 01/12/2016 - 16:07 नवीन
"मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही" या विधानाला होता. केवळ भारतीय तत्त्वज्ञानात्/अध्यात्मात असा विचार आहे हे आपल्याला वाटत असतं कारण आपण त्या मुशीत घडलेलो असतो. बाहेरच्या जगातही असेच विचार वेगळ्या पद्धतीने सांगितलेले असतात. लोकांच्या उपयोगी पडा, सर्विस ओरिएंटेड लाइफ, आयुष्याचा पूर्ण उपयोग करा हे विचार किंवा तत्त्वज्ञान काय आहेत? बाबा आमटेंसारख्या महायोग्यानं काय केलं? केवळ लोकांची सेवा करुन, त्यांची आयुष्य उभारुन ते चिरंजीव झाले इतकेच नव्हे तर पुढल्या तीन पिढ्यांना मार्गदर्शन करुन गेले, केवळ आणि केवळ सेवाभावाने.. पहिल्या हिवाळ्यात बर्फ साफ करत असताना माझ्याकडे योग्य उपकरणे नव्हती तेव्हा शेजारी येऊन दोन मिंटात बर्फ साफ करुन "हॅव अ गुड डे" म्हणून गेला देखील! हे काय आहे? कर्करोगाने आजारी असलेल्या धाकट्या भावाची सहा वर्षे सेवा करुन तो शेवटी गेला तेव्हा सुटला म्हणून पाणावल्या डोळ्यांनी माझ्याजवळ बोलणारी साठीतली स्त्री मी इथेच बघतो. मी तिच्या भावाची आपुलकीने चौकशी केल्यापासून ती एकही दिवस मला गुडमॉर्निंग म्हटल्याखेरीज जात नाही, हे का? आपल्या मुलीचा बॉयफ्रेंड, एक अतिशय चांगला मुलगा, ज्याला त्याच्या घरातून जवळपास हाकलून दिले आहे त्याचा सांभाळ आपलंच तिसरं मूल म्हणून स्वतःच्या घरात आपुलकीने करणे किती जण करू शकतील? हा माणूस माझ्या रोजच्या बघण्यात आहे! यासाठी जीवनाकडे बघण्याची विशाल दृष्टी हवी, हृदय मोठं हवं. आणि हे सगळं तिथं अनेक वर्षे राहून समाजात मिसळून, जवळून त्यांचं जगणं जाणून घेऊनच समजू शकतं. अन्यथा "त्यांची क्षमताच नाही...." वगैरे ताशेरे सहज ओढतो आपण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
सूड Tue, 01/12/2016 - 16:11 नवीन
बिंगो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चैतन्य ईन्या Tue, 01/12/2016 - 16:38 नवीन
हे असले मी ह्यांना अजिबात सांगायला गेलो नसतो कारण ह्यांच्या दृष्टीने भारत आणि अध्यात्म हे एकच आणि एकमेव दिसतंय. तर त्यांना त्यांच्या आनंदात राहू द्या. म्हणून विचारले होते आपण स्वतः बाहेर ४-५ वर्ष राहिला आहात काय? १५ दिवसात किंवा १ वर्षात फारच त्रोटक अनुभव असतात आणि विशेतः लोकांना एकाच दिसते तेच सांगत सुटतात. त्यावरून बाकीच्यांनी विचारच केला नाहीये वगैरे बाहेर येते. ह्या अध्य्त्मापेक्षा daniel kahneman मला जास्त भावतो. एका मर्यादेनंतर पैसा कामाला येत नाही आणि आपण आनंदी असतो जेंव्हा आपल्याला आवडणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. इतके सरळ स्वच्छ न सानागता उगाचच देव आणि दानव आणि काय काय आणि काय मध्ये येते. फुकटची फिलोसोफी काहीही कामाची नाही. त्याने काहीही होत नाही. लग्न पण तसेच आहे. आवडत असेल समोरचा वा समोरची तर ते सहज कटकट सहन करून सहजीवनाचा आनंद घेवू शकतात तेच होत नसेल तर मग उगाचच संस्कृति आणि आई/बाप झालो म्हणून मुलांकरता एकत्र झक मारत राहणे ह्याला काहीही अर्थ नाही. असो. मुळातच आपले विश्व सीमित असते आणि तेच आणि तेवढेच ग्रेट आहे असे मनात असलेल्यांना बाहेर काढू नाहीये. आपण बरे आणि ते बरे. कारण चर्चा करून फक्त वाद होतात आणि आपल्या आधीच असलेल्या समजुती अजून जास्त पक्क्या होतात कारण इगो दुखावतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 01/12/2016 - 16:45 नवीन
परंतु ही उदाहरणे एवढ्याकरताच दिली की सीमित विश्व असल्याने गैरसमज होतात ते वेळीच दूर व्हावेत अन्यथा काळ सोकावतो! माझे स्वतःचेही असे बदल झालेत - लहान गावातून मोठ्या गावात, मग परराज्यात, मग परदेशात मग अनेक देशात, क्षितिज विस्तारत जाते, विचार बदलत जातात, आधीच्या गोष्टीतल्या चुका/त्रुटी दिसत जातात, माणसं नव्याने उमगत जातात.. अर्थात तुम्हाला तसे हवे असले तर अन्यथा इथेही फक्त आपल्याच अस्मिता घट्ट कवटाळून (श्लेष अभिप्रेत नाही! ;) ) बसणारे बघतोच! असो, न संपणारा विषय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
च
चैतन्य ईन्या Tue, 01/12/2016 - 16:50 नवीन
अगदी अगदी. when facts change i change my mind असा कियीन्स म्हणून गेलाय पण अनुभव असल्याशिवाय ते होत नाही आणि मुळातच बदलायची तयारी असेल तरच होते. उलट आपल्याच पुराण म्हणून येण्यार्या कथातला विरोधाभास जाणवतो आणि तसाच पश्त्यांच्या पण कथातला जाणवतो. कधी कधी प्रचंड साम्य असते. असो खरे आहे विषय न संपणारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चैतन्य ईन्या Tue, 01/12/2016 - 16:53 नवीन
लिव-इन मधे संपूर्ण जीवनाचा आणि त्यातही मृत्यूचा विचार. मला वाटते तुम्ही खूप विचार करताय. इथे रोजचे जिणे जर का अवघड झाले असेल तर कसला मृत्यू आणि सगळे जीवन? आपल्याच आजूबाजूला बघा, विशेतः आपल्या समाजातल्या स्त्रियांची अवस्था. जर का एक संस्कृतीचा पगडा सोडला तर त्या पण म्हणतील असला दादला नको. फक्त निभवायचे आहे म्हणून व्रत घेतल्या सारखे जगणारेच जास्त आहेत. त्यामुळे मुळात उद्धेश जर का म्हातारपणी काय होणार असा असेल तर कठीण काम आहे. त्यापेक्षा चांगले मित्र जमावाने हे खूप सोयीस्कर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Tue, 01/12/2016 - 19:04 नवीन
याचा ताळमेळ बसवता येत नाही. मुद्दा असा आहे की लिव-इन रिलेशनशीप हा कुटुंबसंस्थेविरुद्ध पर्याय आहे. आपले आप्त जवळ असतांना मृत्यूसमयी निर्माण होऊ शकणारी परिस्थिती आणि कुटुंबच अस्तित्त्वात नसतांना मृत्यूसमयी होऊ शकणारी (बहुदा शोचनीय) परिस्थिती यात कमालीची तफावत आहे. `मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही' हे वाक्य वरच्या काँटेक्स्टमधे वाचलं तर पुढे असं लिहीलंय : थोडक्यात, पाश्चात्य विचारसरणी हा फार मर्यादित विचार आहे आणि विवाह ही भारतीय संकल्पना मानवी जीवनाचा, जन्म ते मृत्यू असा समग्र विचार आहे. सरळ मुद्दा आहे आपल्या घरात, आपले आप्त आजूबाजूला असतांना येणारा मृत्यू आणि कुटुंब अस्तित्त्वातच नसतांना आलेला एकाकी मृत्यू यात उघड फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
प
प्रसाद१९७१ Wed, 01/13/2016 - 12:30 नवीन
विठाकाका - तुमचा मिपावरचा हा पुनर्जन्म आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ह
होबासराव Tue, 01/12/2016 - 15:49 नवीन
मृत्यू ही जीवनातली महत्तम घटना आहे पण पाश्चात्य विचारसरणीला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. थोडक्यात, पाश्चात्य विचारसरणी हा फार मर्यादित विचार आहे आणि विवाह ही भारतीय संकल्पना मानवी जीवनाचा, जन्म ते मृत्यू असा समग्र विचार आहे. सर्व मानवी नाती मान्यता आहेत कारण विवाह या मूळ मान्यतेतून ती निर्माण होतात. तस्मात, पती-पत्नी ही जशी केवळ मान्यता आहे तशीच, ज्यानं मानवी भावविश्वाचा फार मोठा भाग व्यापलेला आहे, ती आई सुद्धा वास्तविकात मानवी कल्पनाच आहे. थोडक्यात, विवाहच काय कोणतंही नातं ही मानवी कल्पना आहे. फुकट फुकट आयुष्य वाया घालवलस होबासराव तु होबासक्या करुन करुन, वाच वरते व्यक्त केलेले विचार वाच जरा.. भारतात जन्म ते मृत्यू असा समग्र विचार करतात कि नाहि हे माहित नसलेला आणि इथे सामान्य जीवंत माणसाला किड्या मुंगि इतकी हि किंमत नाहि असे ठाम मत असलेला निराकार होबासराव
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Tue, 01/12/2016 - 15:53 नवीन
सामान्य जीवंत माणुस = Forget how much he earns पण जेव्ह्ढे कमावतो ते स्वष्टार्जित असतात, आणि ज्याच्या पाठिमागे कुठेलिहि राजकिय शक्ति नसते तरिपण कर्तव्य म्हणुन दर पाच वर्षाने मतदान करुन भविष्या साठि आशावादि राहणारा.
  • Log in or register to post comments
स
सटक Tue, 01/12/2016 - 17:25 नवीन
समजा लग्नपद्धती बंद झाली तर जनता काही वर्षांनी(तपांनी/पिढ्यांनी/शतकांनी) 'वेगळे काहीतरी" म्हणून परत सुरु करेलच!
  • Log in or register to post comments
_
_मनश्री_ Tue, 01/12/2016 - 18:19 नवीन
लग्न पण तसेच आहे. आवडत असेल समोरचा वा समोरची तर ते सहज कटकट सहन करून सहजीवनाचा आनंद घेवू शकतात तेच होत नसेल तर मग उगाचच संस्कृति आणि
आई/बाप झालो म्हणून मुलांकरता एकत्र झक मारत राहणे ह्याला काहीही अर्थ नाही.
असो. मुळातच आपले विश्व सीमित असते आणि तेच आणि तेवढेच ग्रेट आहे असे मनात असलेल्यांना बाहेर काढू नाहीये. आपण बरे आणि ते बरे. कारण चर्चा करून फक्त वाद होतात आणि आपल्या आधीच असलेल्या समजुती अजून जास्त पक्क्या होतात कारण इगो दुखावतो.

एकदा तुम्ही आई - बाप झालात की मुलांना सुरक्षित वातावरण देणे हे तुमच कर्तव्यच असतं त्यामुळे एकदा मुल जन्माला घातलं कि सगळ्यात आधी तुम्ही आई बाप असता स्वतःचा विचार नंतर आधी मुलाचं भविष्य मुलाला जन्म देण्याचा निर्णय तुमचा असतो ,मुलाने सांगितलेलं नसत तुम्हाला कि मला जन्माला घाला ,त्यामुळे त्याला कुटुंबाची ऊब देण हे तुमच प्रथम कर्तव्य असलं पाहिजे त्यामुळे मुल झाल्यानंतर आपापसात पटत नाही ,इगो प्रॉब्लेम्स या किंवा इतर काही कारण कधीच घटस्फोट घेऊ नये , काही समस्या उदभवली तरी त्यावर सामंजस्याने मार्ग काढून लग्न टिकवण्याचाच प्रयत्न करावा (कारण अगदीच गंभीर असेल तरच घटस्फोट घ्यावा )

तुमच्या चुकांची शिक्षा मुलांनी का भोगायची ? का त्यांनी स्वतःची फरफट करून घ्यायची ,आई बापांना तडजोड करायला जमल नाही म्हणून मुलांनी आयुष्यभर तडजोड करायची ,कुठलीही चुक नसताना शिक्षा भोगत रहायची त्यापेक्षा मुल जन्माला घालू नका आणि आई वडील व्हायची हौस असेलच तर त्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःचे इगो प्रॉब्लेम्स बाजूला ठेवा ,आणि प्रपंच टिकवा , घटस्फोटानंतर मुलाच्या आर्थिक भविष्याची तरतूद शकते कायद्याच्या मदतीने , पण मानसिक घुसमट होते त्याच काय ? (संपादित)

खरच अगदी गंभीर कारण नसेल तर घटस्फोट घेण्याचा विचारही करू नये

  • Log in or register to post comments
_
_मनश्री_ Tue, 01/12/2016 - 18:25 नवीन
वरील प्रतिसादात कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही तरीही कुणी दुखावल गेल असल्यास क्षमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/12/2016 - 18:41 नवीन
बाय द वे, लग्न न टीकण्याचं कारण एक वाट्सअ‍ॅप आहे का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Wed, 01/13/2016 - 05:25 नवीन
बाय द वे, लग्न न टीकण्याचं कारण एक वाट्सअॅप आहे का ?
असू शकते. समजा नवरा-बायको नौकरीहून घरी आल्यावर जर फेसबुक व्हाॅटस्अॅप स्टॅटस, चॅटींग करत बसले तर वाद होईलच ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ख
खेडूत Wed, 01/13/2016 - 06:49 नवीन
तसं नै म्हणायचं ओ त्यांना.... जाउदे- तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
त
तुषार काळभोर Wed, 01/13/2016 - 07:53 नवीन
किंवा इथं जिलब्या पाडत असतील तर सुसंवाद होईल की विसंवाद होईल की नुसताच वाद होईल? उद्या जर कोणी घटस्फोटाच्या अर्जात 'माझा जोडीदारा हापिसातनं घरी आल्यावर मिपावर जिलब्या पाडत बसतो' असं कारण दिलं तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
क
कविता१९७८ Fri, 01/15/2016 - 09:48 नवीन
असू शकते. समजा नवरा-बायको नौकरीहून घरी आल्यावर जर फेसबुक व्हाॅटस्अॅप स्टॅटस, चॅटींग करत बसले तर वाद होईलच ना. दोघंही व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक आणि चॅटींग करत बसले तर कसे वाद होतील, दोघे बिझीच असतील ना? दोघांपैकी एखादा फेसबुक , व्हॉटसअ‍ॅप आणि चॅटींग करत बसला आणि दुसर्‍याला वेळ देत नसेल किंवा घरकामात मदत करत नसेल तरच वाद होउ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
अ
अर्धवटराव Tue, 01/12/2016 - 20:36 नवीन
म्हणुनच समर्थ पळुन गेले बोहल्यावरुन ;) मागे काय झालं ते राहु दे. सध्याच्या वैवाहीक समस्या इतर महत्वाच्या समस्यांसारख्याच आहेत. साधारण आयुष्य कसं असतं माणसाचं?? घोकंपट्टी करत शिक्षण घेणं, इतरांनी सांगीतलं म्हणुन आर्थीक स्थैर्याकरता मिळेल तो जॉब करणं, मग त्याच रॅट रेसमधे आयुष्यभर दौडत राहाणं, कौटुंबीक जबाबदार्‍या पार पाडता पाडता राजकारण ते क्रिकेट अशा सर्व विषयांवर चर्चा करणं, थोडंफार पर्यटन वगैरे करुन जीवाला विरंगुळा देणं, आणि शेवटी कुठल्याश्या थेअरीने भारावुन जावुन (किंवा टाईमपास म्हणुन) आध्यात्म/छंद वगैरे बाबतीत जीवनाची इतीश्री करणं. याच रुटीनने वैवाहीक आयुष्य गेलं तर त्यात साचलेपणाची जाणिव येऊन ते निरर्थक वाटायला लागलं तर आश्चर्य नाहि. पण जर शिक्षण आपल्या मनाला/बुद्धीला तृप्त आणि सुदृढ करणारं अन्न असेल तर ? आपला जॉब कर्तुत्व गाजवण्याची संधी असेल तर? जीवनाचा अर्थ समजुन सांगणारं अध्यात्म असेल तर? तसच एकुणच आयुष्याचा/मनाचा विकास साधणारं वैवाहीक आयुष्य असेल तर? काहि प्रश्नच उरत नाहि मग. पण त्या करता सर्वप्रथम आपण इतरांचं वैचारीक ओझं वाहणारं मन न होता आपण आपलं स्वतः जगता येण्याची गरज असते. शिक्षण घेताना, करिअर निवडताना, आपलं बस्तान नीट बसवताना जर आपल्याला आपले ओळख नीट पटली तर वैवाहीक आयुष्यदेखील येकदम टकाटक बनतं. स्वतःचे/सासुरवडीचे नातेवाईक वगैरे मंडळींना कुठे/किती महत्व द्यायचं, किती फाट्यावर मारायचं याचा फॉर्मुला सेट झाला कि त्यांचाहि गेम घेण्याची मजा घेता येते, कुणी परेशान करु शकत नाहि. बाकी मृत्यु वगैरे बाबतीत आपण विचार केलेला नाहि अजुन... पण मृत्यु शांतपणे एकांतात व्हावा अशी सध्यातरी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Wed, 01/13/2016 - 05:42 नवीन
म्हणुनच समर्थ पळुन गेले बोहल्यावरुन ;)
यात हसण्यासारखे काय आहे. समर्थांना संसारात पडायचे नव्हते त्यांना समाज उद्धार करायचा होता. बालसुलभ बुद्धीनुसार आईने सांगितल्याप्रमाणे केले. सावधान हा शब्द ऐकल्यावर मंडपातून पलायन केले. हे तुमच्यासारख्या अर्धवटांना काय कळणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 01/13/2016 - 07:31 नवीन
असले दिडशहाणे धागे भविष्यात निघणार आहेत हे समर्थांनी ओळखलं होतं अगोदरच... म्हणुन असल्या मुर्खलक्षणांपासुन दूर गेले समर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर Wed, 01/13/2016 - 05:43 नवीन
म्हणुनच समर्थ पळुन गेले बोहल्यावरुन ;)
यात हसण्यासारखे काय आहे. समर्थांना संसारात पडायचे नव्हते त्यांना समाज उद्धार करायचा होता. बालसुलभ बुद्धीनुसार आईने सांगितल्याप्रमाणे केले. सावधान हा शब्द ऐकल्यावर मंडपातून पलायन केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/13/2016 - 02:50 नवीन
मटा ला सदरकारांसाठी ओपनिंग्स आहेत. अमुक तमुकांचा सल्ला छाप. लग्नं, संसार वगैरे सब मोह माया है प्यारे (आयडी नव्हे). जिसने जान लिया उसने सुख पा लिया.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 01/13/2016 - 03:31 नवीन
ओवरडोज़ झाला !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा