लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....
बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.
सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.
बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.
संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.
पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.
अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.
इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.
उपाययोजना:
कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.
मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.
स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.
स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.
तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
ज्यांना लग्न करायची इच्छा नसेल त्यांनी लग्न करूच नये . लग्न केल्यावर थोड्या फार तडजोडी कराव्याच लागतात दोघांनाही त्यामुळे ज्यांची अजिबात तडजोड करण्याची तयारी नसेल त्यांनी लग्नाच्या फंदात पडूच नये आणि एकदा लग्न केलं की जोपर्यंत आपल जन्मभर पटेल अशी खात्री होत नाही तोपर्यंत मुल जन्माला घालू नये , पण एकदा का मुल जन्माला आल कि मात्र शक्यतो घटस्फोट घेऊ नये , लग्नात काही समस्या उदभवली तरी त्यावर सामंजस्याने मार्ग काढून लग्न टिकवण्याचाच प्रयत्न करावा (कारण अगदीच गंभीर असेल तरच घटस्फोट घ्यावा ) कारण मुल झाल्यानंतर जर घटस्फोट झाला तर त्या मुलाची फार फरफट होते , कारण मुलांना आई आणि वडील दोघही हवे असतात
निसर्गानं स्त्री देहाची निर्मिती स्वतःच्या पुनरावृत्तीसाठी केली आहे त्यामुळे जोपर्यंत अपत्य जन्म होत नाही तोपर्यंत स्त्रीला पूर्णत्त्वाचं समाधान मिळत नाहीहे तुम्ही कुठे वाचले आहे?निपुत्रिक स्त्री दु:खी दिसते याचं कारण ती देहाची सार्थकता निभावू शकत नाही. पुरुषाला अपत्य जन्म हवाच असं काही नाही, तो निमित्तमात्र असतो. तस्मात, अपत्य जन्म ही निसर्गतःच स्त्रीची अभिलाषा आहे.इतके ठाम सरसकटीकरण आणि प्रतिसादाची ष्टाईल वाचून डोळे पाणावले. बाकी.. तुमचे प्रतिसाद वाचताना सारखी आमच्या सरांची आठवण येते. चालूद्या...एकदा तुम्ही आई - बाप झालात की मुलांना सुरक्षित वातावरण देणे हे तुमच कर्तव्यच असतं त्यामुळे एकदा मुल जन्माला घातलं कि सगळ्यात आधी तुम्ही आई बाप असता स्वतःचा विचार नंतर आधी मुलाचं भविष्य मुलाला जन्म देण्याचा निर्णय तुमचा असतो ,मुलाने सांगितलेलं नसत तुम्हाला कि मला जन्माला घाला ,त्यामुळे त्याला कुटुंबाची ऊब देण हे तुमच प्रथम कर्तव्य असलं पाहिजे त्यामुळे मुल झाल्यानंतर आपापसात पटत नाही ,इगो प्रॉब्लेम्स या किंवा इतर काही कारण कधीच घटस्फोट घेऊ नये , काही समस्या उदभवली तरी त्यावर सामंजस्याने मार्ग काढून लग्न टिकवण्याचाच प्रयत्न करावा (कारण अगदीच गंभीर असेल तरच घटस्फोट घ्यावा )
तुमच्या चुकांची शिक्षा मुलांनी का भोगायची ? का त्यांनी स्वतःची फरफट करून घ्यायची ,आई बापांना तडजोड करायला जमल नाही म्हणून मुलांनी आयुष्यभर तडजोड करायची ,कुठलीही चुक नसताना शिक्षा भोगत रहायची त्यापेक्षा मुल जन्माला घालू नका आणि आई वडील व्हायची हौस असेलच तर त्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःचे इगो प्रॉब्लेम्स बाजूला ठेवा ,आणि प्रपंच टिकवा , घटस्फोटानंतर मुलाच्या आर्थिक भविष्याची तरतूद शकते कायद्याच्या मदतीने , पण मानसिक घुसमट होते त्याच काय ? (संपादित)
खरच अगदी गंभीर कारण नसेल तर घटस्फोट घेण्याचा विचारही करू नये
वरील प्रतिसादात कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही तरीही कुणी दुखावल गेल असल्यास क्षमा
असू शकते. समजा नवरा-बायको नौकरीहून घरी आल्यावर जर फेसबुक व्हाॅटस्अॅप स्टॅटस, चॅटींग करत बसले तर वाद होईलच ना.दोघंही व्हॉटस अॅप, फेसबुक आणि चॅटींग करत बसले तर कसे वाद होतील, दोघे बिझीच असतील ना? दोघांपैकी एखादा फेसबुक , व्हॉटसअॅप आणि चॅटींग करत बसला आणि दुसर्याला वेळ देत नसेल किंवा घरकामात मदत करत नसेल तरच वाद होउ शकतात.