Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अहंकार कमी कसा करावा?

न
नीलमोहर
Wed, 04/27/2016 - 08:24
🗣 74 प्रतिसाद
माणूस मोठा की त्याचा अहंकार, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर असेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही, आपण स्वतःपेक्षा या 'अहं' ला जीवापाड जास्त जपतो. या अहंकाररूपी शत्रूला आपल्या मनातून, जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोडकौतुक करतो, त्याला डोक्यावर बसवून मिरवतो, खतपाणी घालून वाढवतो, जोपासतो. मात्र त्यानंतर हा अहं आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो कळतही नाही, त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करत राहतोच, अणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो. आपण स्वतःपुरता विचार केला तरी आपल्याला जाणवेल, आपल्यात अहंकार आहे की नाही.. असेल तर का आहे.. कशाबद्दल आहे.. नसेल तर अतिउत्तम. अशी निर्विकार, नि:स्वार्थी भावावस्था फार थोड्या लोकांना प्राप्त करता येते. सहसा सामान्यात सामान्य माणूस म्हटला तरी त्याच्यात कसला न कसला अहंकार असतो. आपल्यात काही चांगले गुण असतील तर त्याचा थोडाफार अभिमान असणे वाईट नाही, एखाद्याकडे तसेच कर्तृत्व असेल तर तो अहंकार त्याला शोभतोही, मात्र अती अहंकारी व्यक्ति इतर लोकांपासून, समाजापासून वेगळी पडत जाण्याची शक्यता जास्त असते. फक्त उदाहरण म्हणून इथलाच अलीकडील एक अनुभव सांगेन, येथील एका विभागाकडून लेखमालेसाठी लेख लिहीण्याबद्दल विचारणा झाली होती, विषय जिव्हाळ्याचा असल्याने मीही आनंदाने होकार दिला. नंतर त्या विभागातील काही सदस्यांबरोबर माझे किरकोळ मतभेद झाले, अशावेळेस आपल्यातील 'इगो' नामक प्रकार येता जाता दुखावून घ्यायला बसलेलाच असतो त्याप्रमाणे तो दुखावला गेला आणि मी तो लेख लिहू शकणार नाही असे त्यांना कळवून टाकले. इथे माझ्याकडून काही वेगळ्याच व्यक्तिंचा राग तिसर्‍याच गोष्टीवर, गरज नसतांना, संदर्भ नसतांना काढला गेला, फक्त 'अहं' मुळे. यात चूक पूर्णपणे माझी होती, नुकसानही माझेच होणार होते, तसे ते झालेच. अर्थात तो लेख मी काही झाले तरी लिहीणार होते, त्याप्रमाणे तो लिहीला, प्रकाशितही केला, त्याचे समाधान आहेच, मात्र केवळ इगोला महत्व देऊन एक अतिशय उत्तम संधी हातातून घालवली याचे दु:ख त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. (वरील उदाहरण हे फक्त प्रातिनिधीक म्हणून दिले आहे, तो लेखाचा आणि चर्चेचा विषय नाही.) माणसाचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त त्याचे वागणे बोलणे दिसणे इतकेच नसून, त्याचे 'असणे' ही महत्वाचे. हे असणे सुधारण्यासाठी, आपल्यातील सर्व दुर्गुण मिटवून सर्वार्थाने निर्विकार होण्यासाठी काय करावे..? हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो, तो अहं हळूहळू, थोडाथोडा करत एक दिवस पूर्णपणे मिटवण्यासाठी, 'स्व' खर्‍या अर्थाने गवसण्यासाठी काय करावे ? आपल्याला माहित आहे की आपण या विशाल अवकाशातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या-नसण्याने या चराचर सृष्टीला, अखिल ब्रम्हांडाला काहीएक फरक पडणार नाही, तर मग हा वृथा अहंकार कशासाठी... आपण सर्वज्ञानी नाही हे व्यवस्थित कळत असतांनाही आपण तसे आहोत हे कायम स्वतःला आणि इतरांनाही पटवून देण्याचा अट्टाहास कशासाठी... अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?
वर्गीकरण
अहंकार
चर्चा

प्रतिक्रिया द्या
26562 वाचन

💬 प्रतिसाद (74)
अ
असंका गुरुवार, 04/28/2016 - 13:35 नवीन
अहंकार आणि गर्व या एकच कल्पना आहेत की वेगवेगळ्या?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/28/2016 - 14:42 नवीन
नीलमोहोर, निरपेक्ष सेवा केल्याने अहंकाराचा ऱ्हास होतो. सर्वात चांगली सेवा भगवंतांची आहे. थेट ती करायला जमत नसेल तर घरातल्या वडीलधाऱ्यांना देव मानून त्यांची सेवा करावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/28/2016 - 17:00 नवीन
अहंकार की लडाई ... { सगळ्यांनी विश्वामित्र यांनी ब्रह्मर्षि म्हणावे परंतु वशिष्ठ मात्र त्यांना राजर्षी म्हणत असे माझ्या वाचनात कुठेतरी आले होते. } खालची इष्टोरी जालावरुन... ऋषि वशिष्ठ और विश्वामित्र का बैर भी भागवत कथा का विषय रहा है । वशिष्ठ , विश्वामित्र को ब्रह्मर्षि नहीं मानते थे । क्रोधित होकर विश्वामित्र ने उनके सौ पुत्रों का वध कर दिया फिर भी उनका क्रोध शांत नहीं हुआ । एक बार वे वशिष्ठ को मारने का प्रयत्न करने रात्रि में उनकी कुटिया में पहुँच गए । कुटिया में वशिष्ठ अपनी पत्नी से बात कर रहे थे .." देखों अरुंधती ! आज पूर्णिमा का चाँद ऐसे चमक रहा है जैसे विश्वामित्र का यश । अरुंधती को पुत्रों के हत्यारे की मां के सामने प्रशंसा करना अच्छा नही लगा । अरुंधती ने कहा " फिर आप उन्हें ब्रह्मर्षि क्यूँ नहीं मान लेते हैं , जिससे यह वैर ही समाप्त हो जाए , मेरे सामने उन्हें ब्रह्मर्षि मानते हो , मगर उनके सामने क्यों नहीं " विश्वामित्र यह वार्तालाप छिप कर सुन रहे थे । ऋषि वशिष्ठ ने उत्तर दिया , " विश्वामित्र ज्ञानी व तपस्वी हैं अतः मैं उन्हें ब्रह्मर्षि मानता हूँ परन्तु उनमे अहंकार है , अतः उनके सम्मुख यह स्वीकार नहीं करता । इतना सुनते ही विश्वामित्र ने कुटिया में आकार वशिष्ठ के पैर पकड़ लिए । वशिष्ठ ने कहा " यह क्या कर रहे हो , ब्रह्मर्षि...? नम्रता से विश्वामित्र ने जवाब दिया..." अपना अहंकार गला रहा हूँ "

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बारिश... :- Yaariyan
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित गुरुवार, 04/28/2016 - 17:04 नवीन
मदनराव मस्तच प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
पथिक Fri, 04/29/2016 - 12:25 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विवेकपटाईत गुरुवार, 04/28/2016 - 17:11 नवीन
स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी अहं हा येणारच ना. किती हि प्रयत्न केला तरी सोडणे अशक्य
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Fri, 04/29/2016 - 18:07 नवीन
अहं सोडायच्या पायऱ्या ... १) मिपावरचा आयडी सोडा. २) फेबु , ट्विटर , ब्लॉग, coc यावरचे आयडी सोडा. ३) gmail , yahoo, इत्यादी इत्यादी सगळे मेल आयडी सोडा. ४) मोबाईल सोडा. ५) नोकरी/व्यवसाय सोडा. ६) नातेवाईक, शेजारी, मित्र यांचा संपर्क सोडा. ७) मुलांशी संपर्क सोडा. ८) नवरा/बायकोशी संपर्क सोडा. ९) सगळी सेव्हिंग , बॕंक खाते रिकामे करा , सर्व रक्कम दान करा १०) घर सोडा, कुणाला फुकट द्या किंवा विकून आलेली रक्कम दान करा. ११) गंगेपर्यंत चालत जा एक डुबकी मारा. And you can feel तुमचा अहं सुटला आहे. . . . . आणि हे करण्यासाठी (म्हणजे पैसे कुणाला दान करावेत वगैरे )समस्या सोडवायची असेल तर व्यनि करा १००% मदत केली जाईल. ;-) विशेष सुचना:- हा प्रतिसाद फक्त धागाकर्त्यासाठी नसून सर्वांसाठीच आहे. ;-)
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 04/30/2016 - 08:56 नवीन
समजा १-११ पर्यंत सर्व पायऱ्या पार केल्या, अगदी गंगेत डुबकीही मारली, अन बाहेर आल्यावर, what the.... !!!! झालं तर.. ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
स
सुबोध खरे Sat, 04/30/2016 - 08:59 नवीन
परत १-११ अहंकार सुटेपर्यंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Sat, 04/30/2016 - 09:14 नवीन
१-११ करायला जवळ काही शिल्लक तर पाहिजे, सगळं आधीच सोडून दिलेलं होतं ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
उ
उगा काहितरीच Sat, 04/30/2016 - 09:12 नवीन
नाही होणार. जस्ट ट्राय इट ! आणि झालंच what the... तर मग अपडेटवा इकडे ! संमंला सांगून प्रतिसाद काढून टाकायला सांगतो. हाकानाका. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ए
एस Fri, 04/29/2016 - 20:25 नवीन
एक लांबलचक प्रतिसाद लिहिला होता, पण प्रकाशित करण्यापूर्वी बॅकस्पेस मारून खोडून टाकला. न जाणो कुणाचा अहंकार दुखावला गेला तर काय घ्या? :-)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 05/01/2016 - 00:47 नवीन
अरेच्च्या! हा धागा वाचायचा 'मी' कशी बरे विसरले? ;) गंमत बाजूला ठेवता हे सांगावेसे वाटते की अहं बाजूला ठेवणे जमणार नाही. कमी करू शकेन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/01/2016 - 04:00 नवीन
अभिमानाचा अहंभाव सुरु झाला की अहंकार वाढीस लागतो. उदा. भीमाची आणि हनुमानाची कथा.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 05/01/2016 - 06:25 नवीन
पन्नास झाले ..अंहकार कमी झाला का वाढला याचा विदा द्यावा.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 10/27/2016 - 17:26 नवीन
वाचायचा राह्यलाच की हा धागा..! मला स्वतःला अहंकार कमी होण्याचा अनुभव नाही. कदाचित वाढल्याचाच आहे म्हटले तर.. पण जे काही वाचले / ऐकले आहे त्यानुसार - संपूर्ण शरणागतीशिवाय अहंकार पूर्णपणे सुटणे अशक्य आहे. शरणागती कुणाकडे? भगवंताकडे/गुरुकडे. ही संपूर्ण शरणागतीची अवस्था म्हणजे अकर्ता होणे. म्हणजे जे काही कर्म तुमच्याकडून घडतंय त्याचं कर्तापण ज्याच्याकडे शरणागती दिली त्याच्याकडे लागणे. हे काया-वाचा-मने उमजणे म्हणजेच निष्काम अवस्था. ही अवस्था खूप पुढची असून सर्व प्रकारच्या अध्यात्मिक साधनेत ही अवस्था येते. याच्या पुढची अवस्था म्हणजे सहजसमाधी. पण त्याविषयी माझे विशेष वाचन नाही अजून.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/28/2016 - 07:11 नवीन
असा कमी करावा : १. अ हं का र. २. अहं ... का? ३. अ हं. ४. अ. झाला अहंकार कमी. विचार करून पाहा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/28/2016 - 07:47 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रसाद गोडबोले Fri, 10/28/2016 - 10:34 नवीन
आज बरेच दिवसांनी मिपावर आलो अन नेमका हा धागा वर आला : नीमो ताईनी मागे ह्या धाग्यावर गांभीर्याने उत्तर द्याव असे सुचवले होते म्हणुन प्रतिसाद टंकुन पळतो : " मिपावर आपल्याला ज्या विषयातले कळते त्या विषयातील (आणि कळत नाही त्या विषयांवरीलही) धाग्यांवर प्रतिसाद देण्याचा मोह आवरला की (स्वतःचा) अहंकार कमी व्ह्यायला बर्‍यापैकी मदत होते असे निदर्शनास आले आहे ! आणि विशेषकरुन प्रतिसादावर उपप्रतिसाद देण्याचा मोह आवरला की तुम्ही जिंकलात म्हणुनच समजा !! " ख्यॅ ख्यॅ ख्यॅ टाटा
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 10/28/2016 - 10:37 नवीन
सहमत! उपप्रतिसाद द्यायचा मोह आवरला नाही, मी हरलो! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पाटीलभाऊ Fri, 10/28/2016 - 12:59 नवीन
अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?
अहंकार नष्ट कसा करावा...हे ठीक आहे... पण...त्यावर विजय कसा मिळवावा ? कशाला..??? विजय मिळाला कि डोक्यात हवा जाणार..म्हणजे परत अहंभाव आलाच कि..! त्यापेक्षा तो नियंत्रणात कसा आणावा..हे महत्वाचे. आणि शेवटी ज्याला याची जाणीव असते कि त्याच्यात अहंभाव आहे...ती व्यक्ती नक्कीच त्यावर नियंत्रण मिळवू शकते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 10/28/2016 - 13:36 नवीन
शेवटी ज्याला याची जाणीव असते कि त्याच्यात अहंभाव आहे...ती व्यक्ती नक्कीच त्यावर नियंत्रण मिळवू शकते.
अगदी अगदी त्याची जाणीव असणे हेच तर महत्वाच. तरच पुढचा प्रवास सुरू होण्याची शक्यता. थेट मुद्याच बोलतात बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ
स
सप्तरंगी Fri, 10/28/2016 - 15:36 नवीन
तुमच्या लिखाणातच तुमचे उत्तर आहे असे नाही वाटत का ?
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 11/12/2016 - 14:38 नवीन
अहम च्या भावनेवर प्रचलित आध्यात्मिक वा प्रचलित विचारसरणी संदर्भात काही मांडता येणार नाही. मात्र व्यक्तीगत अनुभव व जेव्हा जेव्हा अहमचा विचार करतो तेव्हा खालील बाबी जाणवतात अहम सहसा नातेसंबंधात अधिक जिवंत सक्रीय होतो फुलतो. म्हणजे जर नातेसंबंधापासुन जेव्हा जेव्हा मी दुर गेलोय एकांतात तेव्हा अहम निष्क्रीय झालेला जाणवतो अर्थात सुप्तावस्थेत असेलही पण त्याची हालचाल मंदावलीय असे जरुर जाणवते. म्हणजे कसे की अहम जेव्हा असतो तेव्हा त्याचे एक "ओझे" मनावर असते. कारण आपण एक "भुमिका" घेत असतो एक "अविर्भाव" घेऊन वावरत असतो. जेव्हा आपण एकांतात जातो ( अर्थात हे सर्वांच्या बाबतीत वेगवेगळा अनुभव असेल मी माझ्या मर्यादीत अनुभवात मांडतोय) जेव्हा नातेसंबंध तात्पुरते का होइना ( नातेसंबंध एक विस्तृत पट गृहीत आहे) जेव्हा दुर होतात वा प्रभावहीन होतात. तेव्हा अहम ची भावना मंदावते. हा एक सुखद अनुभव असतो यात मन निर्भार होऊन जाते. यात मन सर्व प्रकारच्या भुमिका अविर्भाव इ. तुन मुक्त झाल्याने हलके होते. असे निर्भार मन फार सुंदर्र असते त्याची संवेदनशीलता कनेक्ट होण्याची विशेषतः निस्रर्गाशी फार वाढते. असे निर्भार मन जेव्हा नव्याने संवाद साधते तो ही अधिक प्रांमाणिक होत जातो. अहम स्वतःचा अहम लक्षात येणे ही देखील मोठी बाब आहे. म्हणजे केवळ तटस्थ निरीक्षणाने सहसा स्वतःचा अहम व त्याचे आवर्त्ने कंपने जाणवतात पण यात एक गंमत आहे. समजा "स्व" ची सात वर्तुळे आहेत. सर्वात बाहेरच्या सातव्या वर्तुळातील "स्व" ला जर आपण तटस्थतेने न्याहाळु लागलो त्याच्या क्रिया प्रतिक्रीयांना "बघु" लागलो तर अहम ची आवर्तने कंपने त्यामागे फरफटत जाणारं मनं हे जाणवु लागतं चुका ही दिसतात त्यातील व्यर्थताही जाणवते. पण होत काय की अहम संपत असा नाहीच. आता काय होतं तो आता केवळ अधिक सुक्ष्म होऊन नविन रुपात आपल्या आतल्या समजा क्रं ६ च्या "स्व" ला चिकटुन बसतो. उदाहरण वेडसर वाटेल पण अजुन दुसरा मार्ग मला हे माझ म्हणण मांडायला सापडत नाही. म्हणजे कसे की आता जो अहंकार मी बघितला तो अधिक सुक्ष्म पातळीवर जाऊन "स्व" म्हणतो " बघ कीती परखड आत्मपरीक्षण चालु आहे माझे, किती पारदर्शक आहे मी, किती ब्रुटली ऑनेस्ट माणुस मी" आता जो एखाद्या व्यक्तीशी बोलतांना दाखवलेला अहंकार होता बाहेरच्या पातळीवरचा जो लक्षात आला जाणवला तो न संपता आता तो अधिक सुक्ष्म होउन बघ मी किती परखड आत्मपरीक्षण करणारा माणुस असा होऊन बसला. आता हा ही पकडीत यावा तर अधिक अधिक तटस्थता असायला हवी अधिक आतुन "स्व" चा धांडोळा घ्यायला हवा. अर्थात हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे स्तर. संभवतात. अजुन एक अहम विषयी जाणवते की अहम एका अ‍ॅक्सल सारख सायकलच्या अ‍ॅक्सल सारख काम करतं म्हणजे जर मनाचे विविध विचार भावना उर्मी या सर्व मिळुन जर विविध स्पोक्स समजले तर इगो चा अहम चा अ‍ॅक्सल त्या सर्वांना धरुन ठेवणारा सिंग्ल सेंट्रल फोर्स सारख काम करतो. आता तो पुर्ण संपवायचा तर विविध उर्मी भावना विचार आयडेंटीटी हे कसं मेंटेन होणार हा ही एक प्रश्न वाटतो. अर्थात हे अनाध्यात्मिक अर्थाने विचार करतोय. अध्यात्माच्या सेट थेअरीजचा तिटकारा आहे. अजुन अनेक विचार येतात पण लांबतय फार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा