Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, १७ जवान शहीद

ध
धर्मराजमुटके
Sun, 09/18/2016 - 08:50
🗣 142 प्रतिसाद
ही बातमी. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत. चीड आणी हतबलता याशिवाय दुसरे काहिच सुचत नाहिये. पहिले पोलीस आणि आता लष्करी जवान. जे आपल्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यावरच जीव गमवायची पाळी वारंवार येतेय. तरीही डोके शांत ठेऊनच विचार करायचा, भ्याड हल्ल्यांचा जास्तीत जास्त कडक निंदा करायची आणि मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहायची याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स हाताशी नसणे यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते ? आजचा दिवसाची खराब सुरुवात. जास्त काही सुचत नाहिये त्यामुळे पुढे लिहित नाही. --------------- श्रद्धांजली वाहण्यापुरता उरलेला एक सामान्य नागरिक
वर्गीकरण
बातम्या

प्रतिक्रिया द्या
31104 वाचन

💬 प्रतिसाद (142)
J
John McClain गुरुवार, 09/22/2016 - 13:02 नवीन
मी 2 दिवसां पूर्वी दिला होते ना हेच आर्टिकल वर ☺... असो, चांगलं लिहिलंय त्याने,पण कोणीतरी त्याची authenticity कन्फर्म करायला हवी... बलुचिस्तान चे photos आणि चीन ची इन्व्हेस्टमेंट.. रशिया बद्दल काही विशेष टिप्पणी नाही आहे. तो पण मोठा प्लेअर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 09/22/2016 - 15:23 नवीन
भारत-पाक युद्ध झाले तर चीन अमेरिकेला त्यांच्या उद्योगधंद्यांच्या राष्ट्रियकरणाची धमकी देऊ शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/22/2016 - 12:15 नवीन
सर्व चर्चेला आणखी एक अ‍ॅन्करींग पॉईंट देत आहे. हा लेख मी मनोगतवर ११ जुलै २००६ चे मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट झाल्यानंतर लिहिला होता.त्यावेळी मनोगतवर बरीच चर्चाही झाली होती (आपल्यासारखे लोक चर्चा सोडून इतर काय करू शकणार आहेत म्हणा :( ). त्यावेळी मी असे मत मांडले होते की पाकिस्तानशी युध्द हा पर्याय असू शकत नाही. त्यानंतर पुढे १० वर्षे उलटली आहेत.तरीही परिस्थिती फार बदललेली आहे असे वाटत नाही. तेव्हाचा लेख इथे जसाच्या तसा चिकटवत आहे. आजच वर्तमानपत्रात वाचले की मुंबईत अँटॉप हिल मध्ये एका पाकिस्तानी अतिरेक्याला पोलिसांनी चकमकीत ठार मारले‌. शक्यता आहे की तो अतिरेकी गणेशोत्सवादरम्यान मुंबईत घातपात घडविण्यासाठी आला होता आणि तसे जर का असेल तर तो मेला याचे आपल्या देशातील ढोंगी मानवतावादाची झूल पांघरलेले लोक आणि त्यांचे तथाकथित धर्मनिरपेक्ष साथिदार यांना सोडून इतर कोणालाच दुःख वाटू नये. पाकिस्तानकडून भारताला असलेल्या धोक्याचे कटू सत्य मुंबई रेल्वे बाँबस्फोटापासून अधिक तीव्रतेने अधोरेखित झाले आहे.त्याचाच हा एक भाग आहे. या पार्श्वभूमीवर भारतापुढील पर्याय काय असे राहून राहून वाटते. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी अशी मागणी केली की भारताने पाकिस्तानवर हल्ला करून एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. इतरही अनेकांचे तेच म्हणणे आहे.पण पाकिस्तानवर हल्ला करून प्रश्न सुटणार आहे का? पाकिस्तान हा एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे.प्रस्तावित युध्दात पाकिस्तानने जर दिल्ली,मुंबई किंवा इतर कुठेही अणुबाँब टाकला तर आपले लाखो नागरीक मृत्युमुखी पडतील.त्याला प्रत्युत्तर म्हणून आपणही अणुबाँब पाकिस्तानवर टाकू आणि पाकिस्तानमधील कराची,लाहोर सारख्या महत्वाच्या शहरांचे नामोनिशाण मिटवू. पण आपले नुकसान झालेले असेल ते फारच भयानक असेल.अणुयुध्दात कोणीही जिंकणार नाही.आपल्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजतील.कदाचित एका अणुबाँब हल्ल्यामुळे झालेले नुकसान भरून काढायला आपल्याला अनेक दशके लागतील.आणि युध्द सुरू झाले तर पाकिस्तान अणुबाँब हल्ला करणार ही गोष्ट तर निश्चित आहे.तेव्हा ती किंमत चुकवणे योग्य आहे का?कारण कोणत्याही युध्दात शत्रूचे जास्तीतजास्त नुकसान करण्याबरोबरच आपले नुकसान कमितकमी होईल याची काळजी धुरंधर सेनानी घेत असतात. क्षणभर असे समजून चालू की भारत-पाकिस्तान युध्द हे अणुयुध्द होणार नाही तर ते पारंपारीक शस्त्रांनीच लढले जाईल.२००४ मध्ये अमेरीकेने पाकिस्तानला 'Major non-NATO ally' हा दर्जा दिला आहे.तेव्हा अमेरीका पाकिस्तानला मदत करणार हे उघड आहे.त्याचप्रमाणे चीननेही पाकिस्तानला आजपर्य़ंत भरपूर मदत केली आहे.चीनला महासत्ता बनायचे होते आणि चीनी राज्यकर्त्यांना माहित होते की भारत आपल्याला त्या मार्गात प्रतिस्पर्धी बनायची क्षमता बाळगून असलेला देश आहे.म्हणून चीनने जाणिवपूर्वक पाकिस्तानला बलिष्ठ केले कारण बलिष्ठ पाकिस्तान भारताला कायमच्या कटकटी निर्माण करेल आणि भारताची शक्ती त्याला उत्तर देण्यात खर्ची पडेल, याची चीनला खात्री होती.आणि झालेही तसेच.तेव्हा प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्दात चीन पाकिस्तानला मदत करणार नाही याची खात्री देता येत नाही. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया सारखे श्रीमंत मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीला धावतील ते वेगळेच.भारताने बांगलादेशाला जगातील जवळपास २/३ पेक्षा जास्त देशांचे वैर पत्करून स्वतंत्र केले.इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यातही महत्वाची भूमिका बजावली. पण आजपर्यंत किती वेळा काश्मिर प्रश्नावर त्या दोन देशांनी भारताचे समर्थन केले? शून्य.आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी इस्लामच्या नावावर सर्व मुस्लिम देश पाकिस्तानच्या समर्थनासाठी येतील किंवा उघडउघड पाकिस्तानचे समर्थन जरी केले नाही तरी तेलाने समृध्द मुस्लिम देश भारताला तेलपुरवठा बंद करून कोंडित पकडतील याचीच शक्यता जास्त. आता क्षणभर असे समजुया की प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे पूर्णपणे इतर शक्तींच्या हस्तक्षेपाविना लढले जाईल.डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यावर एन.डी.टी.व्ही. वर एक चर्चा झाली होती.त्यात दिलेली माहिती खरी असेल तर भारत आणि पाकिस्तान यामधला 'Strategic superiority ratio' सुमारे १.३ ते १.४ आहे. याचा अर्थ भारताची लष्करी ताकद पाकिस्तानच्या लष्करी ताकदीपेक्षा १.३ ते १.४ पटीने अधिक आहे.ही ताकद पाकिस्तानविरूध्दचे युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी आहे का?वाटत नाही.ती कमितकमी २.५ ते ३ पटींनी अधिक असती तर कदाचित युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी झाली असती.त्यातून भारताचे सैन्य केवळ पाकिस्तान सीमेवर नाही तर चीनबरोबरच्या सीमेवरदेखील आहे.तेव्हा आपल्याला सर्व सैन्यक्षमता पाकिस्तानविरूध्द एकवटता येणार नाही.त्यातून पाकिस्तानच्या सैन्याला युध्दात जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा सारख्या अतिरेकी संघटनांकडून जी मदत होईल ती वेगळीच.त्या मदतीचा अंतर्भाव 'Strategic superiority ratio' मध्ये केला असेल असे वाटत नाही.तेव्हा शक्यता आहे की पाकिस्तानविरूध्दचे युध्द आपल्याला वाटते तितके सोपे जाणार नाही. आता आपण क्षणभर तिसरी कल्पना करू की आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू!तरीही पुढे काय हा प्रश्न राहतोच.इतिहासाचा धडा आहे की परकिय देशातील (अथवा आपल्याच देशातील एखाद्या भागातील) जनतेला त्यांच्या इच्छेविरूध्द केवळ लष्करी सामर्थ्याच्या जोरावर दावणीला धरता येत नाही.युध्द जिंकल्यावर काही काळ तरी आपल्या सैन्याला पाकिस्तानमध्ये राहावे लागेलच.आणि पाकिस्तानातील लोक ते कदापि मान्य करणार नाहीत हे तर उघडच आहे. लक्षात घ्या की दुसऱ्या महायुध्दात अजोड धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर रशियन सैन्याने पराभवाच्या खाईतून वर येत जर्मन सैन्यावर विजय मिळवला. रशियन सैन्याचे धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती याविषयी कोणालाही शंका नाही. तरीही त्याच रशियन सैन्याचे अफगाणिस्तानात काय झाले?कारण अफगाण जनतेला रशियन सैन्याचे त्यांच्या देशातील अस्तित्व मान्य नव्हते.१९९१ मध्ये विघटन झाल्यावरही रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या ५ पट मोठा आहे.तर चेचेन्या हा भारतातील दिल्ली शहराइतका क्षेत्रफळाने आहे.चेचेन्याची लोकसंख्या सुमारे ८ लाख म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कमी आहे.तरी रशियन सैन्याला एवढया लहानशा प्रदेशातूनही माघार घ्यावीच लागली ना?कारण चेचेन लोकांना रशियाबरोबर राहायचे नव्हते.जगातील सर्वात शक्तीशाली अशा अमेरीकन सैन्याची इराकमध्ये कशी ससेहोलपट होत आहे ते तर अगदी स्पष्ट आहे.कारण इराकी जनतेला अमेरीकन सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य नाही.आपल्या सैन्याचीही तीच गत पाकिस्तानात होणार याविषयी अजिबात शंका नाही कारण पाकिस्तानी जनतेला आपल्या सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य होणार नाही. आणि आपले सैन्य माघारी आल्यावर तरी काय?सध्याच्या जागतिक परिस्थितीत प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे एक महिन्याहून जास्त काळ चालणे शक्य नाही.पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १५ कोटी आहे. दुसरे महायुध्द ६ वर्षे चालूनही त्यात सुमारे ६ कोटी लोक मृत्युमुखी पडले होते.तेव्हा एका महिन्याच्या युध्दात आपण पाकिस्तानातील सर्व १५ कोटी लोकांना नक्कीच ठार मारू शकत नाही.अर्थात पाकिस्तानातले सर्व लोक काही दहशतवादी विचारसरणीचे नक्कीच नाहीत. पण युध्द झाले तर पूर्वी शांतताप्रिय असलेल्या पाकिस्तानी लोकांना आपल्या गोटात सामील करणे जिहादी विचारसरणीचे लोकांना अधिक सोपे जाईल. आपले सैन्य माघारी येताच कटकटी मोठया प्रमाणावर वाढतील.एका महिन्याच्या युध्दामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नायनाट होईल असे म्हणणे मुर्खपणाचे आहे.आणि त्यातून पाकिस्तान आपला शेजारीच आहे.अमेरीकन सैन्य इराकमधून परत गेल्यावर अमेरीकन लोकांना इराकमधील दहशतवाद्यांचा अंतरामुळे त्रास होणार नाही. आपली परिस्थिती तशी नक्कीच नाही. आणि या सर्व कल्पनाविलासामागे किती गृहितके आहेत हे लक्षात घ्या.पहिले म्हणजे युध्द अणुयुध्द न होता पारंपारीक युध्द होईल.दुसरे म्हणजे अमेरीका,चीन आणि मुस्लिम देश त्या युध्दात हस्तक्षेप करणार नाहीत आणि तिसरे म्हणजे आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू.या सर्व गोष्टी होऊनही पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बिमोड करणे आपल्याला शक्य होणार नाही हे उघडच आहे. तेव्हा मला तरी वाटते की पाकिस्तानविरूध्द आपल्याला एकच गोष्ट करता येईल.आणि ती म्हणजे जशास तसे आणि दुसरे म्हणजे भारतात दहशतवाद्यांचे पाठिराखे आहेत त्यांना दयामाया न दाखवता यमसदनी धाडणे.त्यात शस्त्रास्त्रे पोचवणारे, कटाची आखणी आणि अंमलबजावणी करणारे यासारखे प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेले लोक यांचा प्रामुख्याने समावेश होईल. आपले काय मत आहे?
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे गुरुवार, 09/22/2016 - 16:37 नवीन
पाकीस्तानच्या आमच्यावर हला कराल तर अणुबॉम्ब टाकू या धमकीला भारताने कीती वर्षे घाबरायचे ? त्याचाच गैरफायदा पाकडे घेताहेत असे नाही का वाटत? मुंबई बॉम्बस्फोट, दाउदला आश्रय, संसदेवरचा हल्ला, २६/११ चा मुम्बैवरचा हल्ला, लोकलमधले बॉम्बस्फोट , उघडउघड काश्मीरींना चिथावले, काही भारतीय सैनिकांना विद्रुप करून मारले, पठाणकोट हल्ला आणि आता उरी हल्ला. कीती घटना ? पाकडयांचे धारीष्टय आपलया अशा पडखाऊ धोरणांमुळे वाढलेय असे नाही का दिसत ? (हे होइल, ते होइल, आंतरराष्ट्रिय दबाव, मग नको असे करायला वगैरे ...) . कीती दिवस हे छुपे युद्ध आहे म्हणून आपण हात चोळत बसणार ? मला अर्थव्यवस्थेचा मुद्दा इतका पटत नाही. नरसिंहरावांचे सरकार येण्याआधीची परिस्थिती आठवा. भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आली होती. त्यातूनही भारत बाहेर आला. त्यानंतर बाबरी मस्जीद पडल्यानंतरचे दंगे वगैरेनीही प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर दोन वेळा मध्यावधी निवडणूका झाल्या. त्याचा प्रचंड आर्थिक भार भारताने सोसला. तरीही भारत त्यातुन तावून सुलाखून बाहेर पडला. आज आर्थिक महासत्तेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. मग शिकवला पाकिस्तानला धडा आणि झाले आपले आर्थिक नुकसान - आपण परत एकदा आपली आर्थिक परिस्थीती सुधरवायला सक्षम आहोत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 09/23/2016 - 06:47 नवीन
मला अर्थव्यवस्थेचा मुद्दा इतका पटत नाही. नरसिंहरावांचे सरकार येण्याआधीची परिस्थिती आठवा. भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आली होती.
जर अणुयुध्द झाले तर भारताचे होणारे नुकसान आणि १९९१ साली भारताची असलेली परिस्थिती यात जमिन-अस्मानाचा नाही तर पाताळ-स्वर्गाचा फरक असेल.
पाकीस्तानच्या आमच्यावर हला कराल तर अणुबॉम्ब टाकू या धमकीला भारताने कीती वर्षे घाबरायचे ?
मला वाटते की आपण पाकिस्तानला इतके बलिष्ठ होऊ दिले तिथेच चूक झाली आणि यापुढे कुठलीही पावले अतिशय जपून आणि काळजीपूर्वकच उचलावी लागणार आहेत. इस्राएलने इराकच्या अणुभट्ट्या जाऊन उडविल्या तसे करणे आपल्याला शक्य नव्हते आणि त्यामुळे आपण ते केले नाही.मधल्या काळात पाकड्यांकडे अणुबॉम्ब आल्यावर आपण पारंपारिक युध्दात कितीही वरचढ असलो (असलोच तर) तरी त्या फरकाचा रेलेव्हन्स राहिला नाही. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या "मॅटर्स ऑफ डिस्क्रिशन" या आत्मचरित्रात उल्लेख आहे की जे.एन.दिक्षित भारताचे पाकिस्तानातील हायकमिशनर असताना रॉबर्ट ओकली हे अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत होते.दिक्षित आणि ओकली यांच्या बोलण्यातून युध्द झाल्यास पाकिस्तान अणुबॉम्ब हा "लास्ट रिजॉर्ट" म्हणून नाही तर "फर्स्ट वेपन" म्हणून वापरेल असा उल्लेख होता. ही गोष्ट जवळपास २६-२८ वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर पाकड्यांनी नक्कीच अजून प्रगती केली आहे. जर का युध्द झाले तर आपणच पाकड्यांवर पहिल्यांदा दोन-तीन किंवा जितके लागतील तितके अणुबॉम्ब टाकावेत. पाकडे पहिल्यांदा आपल्यावर अणुबॉम्ब टाकणार आणि मग आपण त्यांच्यावर हल्ला करणार याची वाट न बघता पाकड्यांचे कंबरडे आधीच मोडावे आणि त्यांना उठायची संधीच देऊ नये.पाकिस्तान शेजारीच असल्यामुळे किरणोत्सर्जनाचा आपल्याला त्रास होईलच. पण प्रायमरी नुकसान होण्यापेक्षा सेकंडरी नुकसान झालेले कधीही परवडले. अर्थात तसे काही करायचे असेल तर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया जी काही होईल त्याला तोंड द्यायच्या स्थितीत आपण सध्या नाही-- आपली ताकद तेवढी नाही हे अगदी समोरच दिसत आहे.तेव्हा सद्य परिस्थितीत आपण फार काही करू शकू असे वाटत नाही. आणि तसेही कन्हैय्या कुमार सारख्या हरामखोराचे समर्थन करणारे लोक इथे अगदी मिपावरही आहेत.कन्हैय्या कुमार तर सोडूनच द्या या असल्या अस्तनीतल्या निखार्‍यांनाही आपण काही करू शकत नाही.समजा भारताने पाकड्यांचे पाणी बंद केले (असे केल्यास त्याचे नक्की काय परिणाम होतील याविषयी मला स्वतःला काहीही माहिती नाही तेव्हा याविषयी मतप्रदर्शन करत नाही) तर आपल्याच इथल्या अनेकांना मानवतावादाचे भरते येईल आणि "पाकिस्तानातल्या निरपराध लोकांचे पाणी तोडणे अयोग्य आहे" वगैरे कोल्हेकुई इथलेच बुबुडाविपुमाधवि सुरू करतील. अशांविरूध्दही आपण काहीही करत नाही. तेव्हा युध्द झाल्यास वाटेल त्या त्यागाला तयार आहोत वगैरे भारतीय जनतेने बोलणे ही नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे.त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. खरोखरच त्याग करायची वेळ आली तर बोलणारे बहुसंख्य लोक गलपाटतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Fri, 09/23/2016 - 07:27 नवीन
मधल्या काळात पाकड्यांकडे अणुबॉम्ब आल्यावर आपण पारंपारिक युध्दात कितीही वरचढ असलो (असलोच तर) तरी त्या फरकाचा रेलेव्हन्स राहिला नाही.
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते. आपण अणुबॉम्ब बनवला म्हणून पाकीस्तानने पण बनवला. आणि आता भारतासाठी अण्वस्त्रधारी पाक हा पाचर रुतल्यासारखा झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 09/23/2016 - 08:20 नवीन
आपण अणुबॉम्ब बनवला म्हणून पाकीस्तानने पण बनवला.
नाही १९९८ मध्ये आपण अणुचाचण्या पहिल्यांदा केल्या म्हणून पाकड्यांनी पण केल्या असे म्हणता येईल.पाकड्यांचे अणुबॉम्ब बनवायचे प्लॅन १९७१ मध्ये झालेल्या पराभवानंतर लगेचच चालू झाले. १९८७ पर्यंत त्यांच्याकडे अणुबॉम्ब बनवायची क्षमता आलीही होती असे वाचल्याचे आठवते. काळेकाकांनी मिपावरच याविषयी एक लेखमाला लिहिली होती. तसेही भारताच्या अणुचाचण्या ११ आणि १३ मे १९९८ रोजी झाल्यानंतर १५ दिवसातच पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. याचा अर्थ त्यांची तयारी आधीच पूर्ण झाली होती. तेव्हा जर आपल्याकडे काही करण्यासारखे होते तर तो कालावधी १९८७ पूर्वीचा होता.त्यातून वाजपेयींनी "नो फर्स्ट युज" चे आश्वासन देऊन आपण अणुबॉम्ब पहिल्यांदा वापरू शकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.पाकड्यांनी असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही.जर आपण पहिल्यांदा वापरणार नसू तर त्या गुळाच्या गणपतींचा उपयोग काय? कारण समजा शत्रूने आपल्यावर पहिला हल्ला केला तर त्याला तोंड देऊन उठायची ताकद राहिली तरच आपण त्याला प्रत्युत्तर देणार ना.ती असेल का हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Fri, 09/23/2016 - 09:07 नवीन
स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला आमची इमेज जपायची आहे..... भारत एक जबाबदार राष्ट्र आहे म्हणून. मग काय, आम्ही पहीला अणुबॉम्ब कसा टाकणार. अणुबॉम्ब जाऊ द्या, आम्ही पहील्यांदा आक्रमण देखील करणार नाही. जग काय म्हणेल. आमची माणसे मेली तरी चालतील. पाकडयांनी भारतीयांचा हाच गाढवपणा पुरेपूर ओळखला आहे. ते काही इमेज जपायच्या भानगडीत पडत नाहीत. वर परत अमेरीकेकडून दहशतवाद विरोधी साथीदार असल्याचे सोंग आणून अब्जावधी डॉलरची मदत ओढून आणतात. निवडणूक प्रचारातील वक्तव्ये सोडून देवू या. पण इमेज अशी केली होती की "तीव्र निषेध, आमचा संयम म्हणजे दुबळेपणा समजू नये" या ठरावीक भारतीय प्रतिक्रीयांपलीकडे जाऊन काही तरी ठोस करतील. पण तसे काही दिसत नाही. कालच पेपर मधे वाचले की सरकारने आता पाकीस्तानला असा इशारा दिला आहे की परत असा हल्ला करा, मग बघू आम्ही तुमच्याकडे. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 09/22/2016 - 18:40 नवीन
इथे अनेकांना अपेक्षित असलेला निर्णय बहुतेक भारत सरकार लवकरच घेईल असे वाटतेय. भारत पाकीस्तानदरम्यान झालेला सिंधू नदीच्या पाण्याचा वापराचा करार बहुतेक भारताकडून मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. ही बातमी
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 09/23/2016 - 08:12 नवीन
भारताने सिन्धु करार मोडल्यास चीनबरोबर ब्रम्हपुत्रा करार केला आहे त्यावर परिणाम होणार नाही का? सिन्धु नदीवरची एक झडप बंद केली व केला पाण्याच प्रवाह बंद इतके सोपे आहे का? त्यासाठी पुर्वनियोजन लागते, जसे प्रवाहात धरण बांधणे, कालवे काढणे. ही सगळी तयारी एका दिवसात करणार का? करार केल्यामुळे असे करता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/23/2016 - 08:56 नवीन
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ झे डाँग यांच्या म्हणण्या प्रमाणे अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे. भारताने अणुबॉम्बचा प्रथम वापर करणार नाही असे स्वतःच जाहीरकेले आहे याचा अर्थ काहीच नाही पाकिस्तान आमच्यावर अणुहल्ला करणार हि आमच्याकडे पक्की माहिती होती म्हणून आम्ही त्यांच्या अणुभट्ट्या आणि अणुआस्थापनांवर हल्ला चढवला असे सांगून तुम्ही पाकिस्तानवर अणुहल्ला केलात तर जग तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. तुमच्या कडे असणारी शास्त्रे आणि अस्त्रे पाकिस्तानचे कंबरडे पहिल्या झट्क्यातच मोडू शकतील अशी स्थिती आहे आणि तसे झाले नाही तरीही दुसऱ्या हल्ल्यात( प्रथम पाकिस्तानने हल्ला केला तरी) तुमची बरीच अणु शस्त्रे सुरक्षित राहून तुम्ही केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तान नष्ट होईल इतकी शस्त्रास्त्रे आपल्याकडे आहेत. आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवलेली आणि दक्षिण भारतातून डागू शकणाऱ्या अग्नी ५ आणि अग्नी ६ क्षेपणास्त्रांमुळे तुमचा सज्जड असा दुसऱ्या हल्ल्याचा पर्याय नेहमीच खुला राहतो. फरक एवढाच आहे कि पाकिस्तान हे फ़िदायिन राष्ट्र आहे आणि ते स्वतः समूळ नष्ट झालो तरी चालेल पण भारताची मोठ्या प्रमाणावर हानी करू अशा केवळ सूडाच्या राजकारणाने पेटलेले आहे. पण उद्या जर सर्वकष युद्ध झाले तर आपण पहिला अणुबॉम्ब टाकणारच नाही असे नाही. रशियाशी अनाक्रमणाचा करार करूनही हिटलरने त्यावर हल्ला चढवला होताच. इथे तर भारताने कुणाशीच करार केलेला नाही तर स्वतःच स्वतःवर संयम ठेवला आहे. राहिली गोष्ट सिंधू नदीच्या पाण्याची. ते पाणी आपल्याकडे आपण वळवायला सुरुवात केली आहेच. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पडले आणि तो सिमला कराराचा भंग करीत आहे हे सिद्ध केले की तम्ही सिंधू पाणी करार मोडायला नैतिकदृष्ट्या मोकळे झालातच. मुळात आपण इतकी धरणे बांधून बसलो आहोत कि सर्व पाणी अडवले तर पाकिस्तनच्या तोंडचे "पाणी" पळेल. शेंडी आपल्या हातात आहे. फक्त ती ओढायची बाकी आहे. एका काश्मीरी पत्रकाराच्या नजरेतून वस्तुस्थिती वाचून पहा. http://thediplomat.com/2016/06/kashmir-a-water-war-in-the-making/ https://en.wikipedia.org/wiki/Kishanganga_Hydroelectric_Plant
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 09/23/2016 - 09:43 नवीन
तीव्र सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Fri, 09/23/2016 - 13:53 नवीन
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पडले आणि तो सिमला कराराचा भंग करीत आहे हे सिद्ध केले की तम्ही सिंधू पाणी करार मोडायला नैतिकदृष्ट्या मोकळे झालातच.
तो पर्यत नाही ना करार मोडता येणार. करारातील अटींप्रमाणे विजनिर्मितीसाठी भारताने धरणे बांधली आहेत. त्याव्यतिरीक्त पाण्याचा वापर कृषी अथवा अन्य कारणासाठी वापरता येणार नाही, पाकिस्तानप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात कालव्यांचे जाळे विणलेले नाही. उद्या जरी आपण करार मोडायचा ठरवले तर ह्या अतिरिक्त पाण्याने पंजाबात पूर येईल व निसर्गाचीही हानी होईल. हेच चीनही ब्रम्हपुत्रेच्या बाबतीत करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अमितदादा Fri, 09/23/2016 - 19:02 नवीन
करारातील अटींप्रमाणे विजनिर्मितीसाठी भारताने धरणे बांधली आहेत. त्याव्यतिरीक्त पाण्याचा वापर कृषी अथवा अन्य कारणासाठी वापरता येणार नाही
भारत ह्या पाण्याचा वापर कृषी, विद्युतनिर्मिती तसेच पाणी साठवण्यासाठी एका मर्यादेमध्ये करू शकतो. खालील दुव्यात तज्ञांची मते वाचा दुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अमितदादा Fri, 09/23/2016 - 18:59 नवीन
मुळात आपण इतकी धरणे बांधून बसलो आहोत कि सर्व पाणी अडवले तर पाकिस्तनच्या तोंडचे "पाणी" पळेल. शेंडी आपल्या हातात आहे. फक्त ती ओढायची बाकी आहे.
हे खर नाही, भारत पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करू शकतो पण सर्व पाणी अडवणे निव्वळ अश्यक्य आहे. असा कोणता दुवा असेल तर वाचाय आवडेल. हि बातमी पहा, यात तज्ञांनी लिहिलंय कि भारत पाकिस्तान च पूर्ण पाणी आडवू शकत नाही कारण आपल्या काही शहरे पुरमय होतील. उरलेल्या प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/23/2016 - 09:43 नवीन
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते. दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच. फक्त पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या धूर्त चालीने त्याच्या अणूस्फोटाचे खापर भारतावर फोडले. त्यातही सर्वात दु:खद गोष्ट अशी की पाकिस्तानच्या अश्या धूर्त खेळींना 'सिंप्लिस्टिक विचारसरणीचे" अनेक भारतीय कळत नकळत बळी पडतात, पडणे जास्त सोईचे समजतात. मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या या कारवाया केवळ चीन नव्हे तर अमेरिका व युरोपिय देशांच्या उघड/गुप्त मदतीने व अनेक महत्वाचे आंतरराष्ट्रिय कायदे धुडकावून झालेल्या आहेत. पाकिस्तानने त्याला मिळालेले तंत्रज्ञान चोरीच्या मार्गाने उत्तर कोरिया, इराण आणि लिबियाला विकले हे पण गुपित नाही. मुख्य या सगळ्या गुन्हेगारी कारवायांसाठी पाकिस्तानला काही शिक्षा झालेली नाही. पाकिस्तानचा आणि विषेशतः त्याच्या सैन्य सत्ताधार्‍यांचा (केवळ ज्यांचेच म्हणणे महत्वाचे आहे, तेथिल मुलकी सरकार नेहमीच दिखाव्यासाठी मधून मधून पुढे केलेली कठपुतळी होऊन राहिलेले आहे) पूर्वेतहास पाहता, त्यांना भारताशी सलोख्याचे किंवा समानतेचे संबध नको आहेत तर त्यांचे एकमेव ध्येय भारताला कमकुवत करून आपल्या कह्यात ठेवायचे आहे. ते सरळ सरळ युद्धाने जमत नाही हे तश्या युद्धांत पराभव चाखून पाकिस्तान शिकला आहे. पण त्याचा मूळ उद्द्येश बदललेला नाही. फक्त तो उद्येश साधण्यासाठी (अ) अतिरेकी कारवाया करून "ब्लिडिंग बाय अ थाऊंजड कट्स" करणे; (आ) अणूयुद्धाच्या धमकीने ब्लॅकमेल करणे; (इ) शांततेच्या आणि मानवतेच्या नावाखाली अंतर्गत फूट पाडणारी व भारत "सॉफ्ट स्टेट" बनवण्यासाठी मानसिकता निर्माण करणारी "विचारवंत/डोव्हज" ची फळी निर्माण करणे, इत्यादी कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त फायदा देणारे उपाय चालू आहेत. हे सर्व अजिबात गुपित नाही. अनेक पाकिस्तानी रिटायर्ड जनरल्स यांच्या लेखनात आणि मुलाखतींत हे अनेकदा व्यक्त झाले आहे. अनेक राजकिय विश्लेषकांनीही या अर्थाचे भाष्य केले आहे. त्यामुळे आपण अणूस्फोट केला नसता तर पाकिस्ताननेही केला नसता असा विचार करणे फार नाईव्ह होईल. किंबहुना पाकिस्तानने अगोदर स्फोट केला असता तर भारतावर स्फोट करू नये यासाठी प्रचंड दडपण आले असते आणि भारताची अजूनच पंचाईत झाली असती. भारत हा सामरिक दृष्ट्या सबळ पण राजकिय विचारशक्ती नसलेला देश आहे असा आजपर्यंतचा जागतिक समज आहे. पाकिस्तानबरोबर तीन युद्धे जिंकूनही पाकिस्तानला सतत वरचढ होऊ देण्याच्या सत्य वस्तूस्थितीवर हा समज आधारलेला आहे. आता त्यात बदल घडत आहे असे दिसते आहे... तो घडावा असे वाटते. शेवटी पाकिस्तान, "वाघ म्हटले तर खातो, वाघोबा म्हटले तरी खातो" या म्हणीचे उत्तम उदाहरण आहे. राहता राहिला अणूयुद्धाचा बागुलबुवा... तो बागुलबुवाच (ब्लफ) आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानचे सर्व वरिष्ठ जनरल्स सैनिक कमी आणि बिझिनेसमन जास्त आहेत. पाकिस्तानी मिलिटरीच्या मालकीचे अनेक "नॉन-मिलिटरी" गोष्टी तयार करणारे कारखाने/व्यवसाय आहेत. तसेच डोंगराळ प्रदेशात चालणारे अंमली पदार्थांचे उत्पादन आणि त्याची भारत (पंजाबची आठवण करा) व पाश्च्यात्य देशांत विक्री हा सैन्यातल्या अधिकार्‍यांचा मोठा व्यवसाय आहे. माणूस एकदा व्यापारी होऊन सधन झाला की त्याची युद्ध करण्याची इच्छा (रिस्कटॉलरन्स) कमी होते आणि कपटाने दुसर्‍यांना झुंझवून आपण मलिदा खात राहणे हे जास्त सोईचे होते. हे पण फार मोठे गुपित नाही. बहुतेक सर्व पाकिस्तानी जनरल्सच्या अमेरिका व ब्रिटनमध्ये मोठमोठ्या गुंतवणूका आहेत, त्यांची मुलेबाळे तेथे स्थायिक झालेली आहेत. अश्या जनरल्सना अणूयुद्धाचाच नव्हे तर मोठ्या पारंपारिक (कन्व्हेनशनल) युद्धाचाही धोका नको असणारच. मात्र जोपर्यंत भारत आणि जग अणूयुद्धाच्या धमक्यांना घाबरून पाकिस्तानी जनरल्सना हवे तसे वागू देत आहे, तोपर्यंत त्या चालीची मजा लुटणे त्यांनी चालू ठेवावी, हे केवळ तार्कीक सत्य आहे ! मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल. त्याऐवजी, (अ) प्रथम जागतिक राजकिय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पाडणे (ज्यामुळे चीनलाही त्याला पाठिंबा देणे कठीण व्हावे); (आ) त्याचबरोबर भारतीय डोव्हची अनेक दशके चाललेली दुकाने ताब्यात आणणे; (इ) आर्मी-नेव्ही-एअर फोर्स यांनी एकत्रितपणे कारवाईची योजना आखणे; आणि (ई) फार वेळ न घालवता पण योग्य संधी पाहून असा हल्ला करणे की रोग मुळापासून नष्ट व्हावा. कारण, सद्याचे जागतिक वारे पाहता, सद्या चालून आलेली संधी वारंवार येत नाही. केवळ येणारा काळच सत्यात असे काही उतरेल की नाही हे सांगू शकेल... पण सद्या वाहणारे वारे असे होईल असे संकेत देत आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Fri, 09/23/2016 - 19:12 नवीन
उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बबन ताम्बे Mon, 09/26/2016 - 09:26 नवीन
दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच.
तुमच्या मताशी सहमत. अणूबॉम्ब काही आठवडयात्/महीन्यांत तयार होत नाही .आपण देखील ७४ साली पोखरणपासून सुरवात केली. मला एव्ह्ढेच म्हणायचे होते की १९९९८ नंतर घडलेल्या घटना पहाता पाकीस्तानचे धारीष्टय खूपच वाढले आहे. भारताला जेरीस आणायचे आणि भारताने प्रत्त्युत्तर द्यायची भाषा केली की अणुबॉम्ब टाकायची धमकी दयायची की अमेरिकेसकट सगळे भारताला सबुरीचा सल्ला देतात हे त्यांनी ओळखले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ध
धर्मराजमुटके Fri, 09/23/2016 - 12:40 नवीन
भारत फ्रान्समधील बहुप्रतिक्षित राफेल करार अखेर मार्गी लागला आहे. शुक्रवारी भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्लीत राफेल करारावर स्वाक्षरी केली आहे. राफेल करारानुसार पुढील पाच वर्षात भारताला फ्रान्सकडून ३६ लढाऊ विमान मिळणार असून या विमानांमुळे पाकिस्तान आणि चीनवर वचक ठेवण्यास मदत होऊ शकेल.
या विमानांमुळे पाकिस्तान आणि चीनवर वचक ठेवण्यास मदत होऊ शकेल.
जोक ऑफ द डे ! आता ही विमाने दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला फक्त संचलनात उडवायची ना ? एक हतबल नागरिक
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/23/2016 - 21:05 नवीन
मुटके साहेब तुम्ही बंगल्यात डॉबरमन कुत्रा का ठेवता? त्याने एकही चोर पकडला नाही तर त्याचा उपयोग झाला नाही असे म्हणाल काय ? लष्करी सामग्रीचे असेच असते. ती वापरावी लागू नये अशीच इच्छा असते. त्याचे प्रतिबंधक मूल्य हे महत्त्वाचे असते. 15 अॉगस्ट 26 जानेवारी ला काही जनतेसाठी उडवत नाहीत. ते शत्रूला तुमची सामरिक तयारी दाखविणे आणि गर्भित धमकी देणे हा हेतू असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Sat, 09/24/2016 - 07:18 नवीन
वर बातमीत म्हटल्याप्रमाणे ह्या खरेदीमुळे चीन आणि पाकिस्तान वर वचक बसेल असे म्हटले आहे पण अजुनतरी वचक बसताना दिसत नाहिये. तुमचं म्हणणं सगळं खरयं साहेब, पण अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे मनात हतबलता निर्माण होते व त्याचे रुपांतर चिडीत होते आणि मग असा उपहास बाहेर पडतो. खरे तर राग ना लष्करावर आहे ना सरकारवर ( ना यापुर्वीच्या सरकारांवर होता). कधी कधी वाटते की सरकारचे हात आंतरराष्ट्रीय नियमांमुळे बांधलेले आहेत, लष्कराचे हात सरकारने बांधले आहेत. म्हणजे तुर्तास चरफडण्याव्यतीरीक्त उघडपणे काहीच करता येऊ शकत नाही. मग शिवसेना आणि मनसे ला नावे ठेवण्यात काय हशील आहे ? कमीत कमी त्यांना जे करणे शक्य आहे ते म्हणजे पाकीस्तानी कलाकारांना लक्ष्य करणे जे ते नेहमीच करतात. इझी टार्गेट तर इझी टार्गेट. जर हार्ड टार्गेट अचीव्ह नाही होत तर इझी ही सही. असो. प्रतिसाद फारच विस्कळीत आहे पण तो मनातील विमनस्कपणामुळे आहे असे समजुन माफ करा. अवांतर : माझ्याकडे बंगला नाही, डॉबरमन कुत्राही नाही. :) टीप : तुमचा मुद्दा कळलेला आहे पण या मनस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी केलेला क्षीण विनोद समजुन प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 09/24/2016 - 08:08 नवीन
विस्तृत प्रतिसाद सावकाशीने देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मदनबाण Fri, 09/23/2016 - 18:54 नवीन
मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल. हवा तेव्हढा वेळ घ्या... पण या पिसाळलेल्या कुत्र्याला कायमचा ठार करा ! आता संयम ठेवणे कठीण झाले आहे. अजुन किती स्त्रिया विधवा होतील ? अजुन किती मुलं आपले वडिल गमावतील ? अजुन किती आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना गमवावे ? बस्स झाले आता, सहन करण्यापलिकडे झाले आहे... आपल्या देशाचे रक्त पिणारा हा देश जगाच्या नकाशावरुनच नष्ट व्हावा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “If death strikes, before I prove my blood, I swear I'll kill death.” – Gorkha Capt. Manoj Kumar Pandey PVC 1/11 Rifles
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 09/23/2016 - 19:29 नवीन
च्यामारी, युद्ध करायचे तर भारताचेच नुकसान होणार, जागतिक स्तरावर नालस्ती होणार, इतर देश भारताशी संबंध तोडणार, सिंधू नदीचा करार तोडायचे तरी भारतातच पुर येणार, शहरे बुडणार , चीन नाराज होणार, पाकीस्तानचे पाणी तोडले तर पाकीस्तान अजुनच आक्रमक हल्ले करणार, पाकीस्तानचे पाणी तोडले तर चीन भारताला मिळणारे सतलज आणि ब्रह्मपुत्रा चे पाणी तोडू शकतो. काय चाललेय हे ? एकही शक्यता भारताच्या आवाक्यातली नाहीये ? म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय आयुष्यभर पर्याय नाही तर ??
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Fri, 09/23/2016 - 20:03 नवीन
अस नहिये. भारत सुधा बर्याच प्रमाणात गुप्त कारवाया पाकिस्तान मध्ये करत असतो. बलुचिस्तान आणि कराची मधील असंतोषास भारतास जबाबदार मानल जात. RAW आणि NDS यांची युती आहे असे बोलल जात, अफगानिस्तान मध्ये भारताची १ embassy आणि ४ consulate आहेत, हे कशासाठी असावेत याचा अंदाज आपण बाळगू शकता. मध्यंतरी UPA सरकारच्या काळात भारतीय सैनिकाच मुंडक कापून विटंबना करण्यात आलेली त्याची मोठी चर्चा झालेली, परंतु नंतर भारतीय लष्कराने त्याचा बदला घेतला होता ज्याची चर्चा झाली नवती. (त्यावेळचे लष्कर प्रमुख बिक्रम सिंघ याचं statement गूगल करावे). तसेच काश्मीर मध्ये खूप वर्षापूर्वी शिखांच हत्याकांड केल होत त्याचाही भारताने बदला घेतला होता (याची लिंक आता सापडत नाही). अश्या अनेक घटनांचे बदले घेतले गेलेत तरीही पाकिस्तानची शेपटी वाकडी आहे. तसेच पाकिस्तानच्या ISI ने नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात मोठ network उभारलं होत ते भारतान मोढून काडलं. (नेपाल राजकारणी आणि ISI agent मिर्झा बेग बद्दल वाचा). भारताने पाकिस्तान ला अंतराष्ट्रीय पातळीवर बर्यापैकी isolate केल आहे, याचा direct नसला तरी indirect भरपूर परिणाम होतो. काश्मीर प्रश्नावरून भारत मध्यंतरी backfoot गेलेला मात्र आता पाकिस्तान कोंडीत सापडलेला दिसतो. सिंधू नदीचे पाणी पिकांच्या season कमी जास्त करून भारत पाकिस्तान च्या अर्थव्यवस्थेच मोठ नुकसान करू शकतो. एवड करून सुद्धा पाकिस्तान ला अक्कल येत नाही कारण आपल कितीही नुकसान झाल तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे अशी त्यांची strategy आहे\ आपली तशी धोरणे नाहीत कारण आपल्याला आपले उज्ज्वल भविष्य महत्वाचे आहे. आणि काश्मीर हि भारताची दुखरी नस असल्याने भारतास खूप काही direct करता येत नाही. असो भविष्यात परस्थिती बदलेल, येणारी तसेच सध्याचे सरकार योग्य धोरण राबवतील अशी आशा करू कारण भारतीय आता अश्या हल्याना कंटाळलेत हे सरकार ला कळले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अमितदादा Fri, 09/23/2016 - 20:46 नवीन
वरील प्रतिक्रियेस support करणारे काही दुवे १. Both active and effective: A short history of Indian Special Ops हि बातमी मस्त आहे. कप्तान सौरभ कालिया यांच्या मृत्यूचा सुधा बदला घेतला होता. २.Army takes revenge, kills top Pakistani ultra on LoC ३. Dawood's Man In Nepal हि बातमी जुनी आहे नंतर तो मारला गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
स
सुबोध खरे गुरुवार, 09/29/2016 - 10:47 नवीन
आजच्या हल्ल्याबद्दल काय म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
थ
थॉर माणूस Fri, 09/23/2016 - 20:23 नवीन
यात सगळ्यात जास्त वात आणलाय न्यूज चॅनल्सनी. उन्मादी वातावरण तयार करायची सुपारी घेतल्यासारखे वागतायत हे लोक. गेल्या 3-4 दिवसातल्या काही बातम्या तर खोट्या आहेत की काय अशी शंका येण्यासारख्या होत्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 09/23/2016 - 20:51 नवीन
न्यूज चॅनल पाहू नका, सुखी राहाल! अन्यथा आपल्याच घरावर आता दुसऱ्या मिनिटाला बॉम्ब पडणार असे वाटत राहील;)
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Fri, 09/23/2016 - 21:31 नवीन
अगदी खरं आहे... ते times now वगैरे पाहिल्यावर तर आत्ता पंतप्रधान इस्लामाबाद वर तिरंगा फडकवणार किंवा पाकिस्तान आपल्यावरच अणूबाॅब टाकणार असं वाटतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विशुमित Sat, 09/24/2016 - 11:16 नवीन
अगदी अगदी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
स
सचु कुळकर्णी Sat, 09/24/2016 - 16:46 नवीन
aadatan tum ne kar diye waade aadatan ham ne aitbaar kiyaa बुंद से गयी वो हौद से नहि आती....जोशपूर्ण भाषण निवडणुकीपर्यंत ठीक असतात. एक सामान्य भारतीय नागरीक म्हणुन मला पहिले बदला हवाय..बकर करने के लीये ३ साल और है.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Sat, 09/24/2016 - 16:53 नवीन
जोशपूर्ण भाषणाबरोबर जर क्रुती नसेल तर मग ममोंच मौन बर होत :(
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/24/2016 - 19:54 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Two men from PoK working for JeM arrested in Uri: Army
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/27/2016 - 08:18 नवीन
IAF airbases along western front on high alert, hold major air defence exercise From Srinagar to Bikaner – Indian Air Force flexes its muscles along the western front मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/29/2016 - 09:25 नवीन
काही वेळापूर्वी आपल्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाईदलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक्स' केले आहेत असे जाहिर केले आहे.http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/ या हरामखोर पाकड्यांविरूध्द अशी कडक कारवाई करून ते शेवटपर्यंत निभावायची तयारी आपण दाखवलीच पाहिजे. मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे त्यामागे ही तयारी नक्कीच असेल असा विश्वास मोदी आणि अजित डोवालविषयी नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/29/2016 - 10:18 नवीन
आपल्या सैन्य दलाचे आणि सरकारचे अभिनंदन ! पाकिस्तानचा बिमोड हीच खरी श्रद्धांजली ठरेल आपल्या ठार केलेल्या सर्व सैनिकांसाठी आणि नागरिकांसाठी ! भारत माता की जय ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक गुरुवार, 09/29/2016 - 11:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नाखु गुरुवार, 09/29/2016 - 12:59 नवीन
अर्थात पण ही गेम सुमडीतच करावी असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 11:45 नवीन
सैन्यदलाचे अन सरकारचे हार्दीक अभिनंदन.
पाकिस्तानचा बिमोड हीच खरी श्रद्धांजली ठरेल आपल्या ठार केलेल्या सर्व सैनिकांसाठी आणि नागरिकांसाठी !
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ज
ज्योत्स्ना गुरुवार, 09/29/2016 - 10:41 नवीन
हे होणारच होते, पाकिस्थानच्या सततच्या खोडसाळपणाला हे उत्तर मिळणारच होते.आपल्या सैन्य दल व सरकारचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/14/2016 - 19:17 नवीन
मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Boycotting our goods will damage ties, China’s state media warns India
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा