Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आरक्षणाशिवाय कसे जगावे?

स
संदीप डांगे
Sat, 09/24/2016 - 20:25
🗣 131 प्रतिसाद
मित्रहो, मराठा मोर्च्याच्या निमित्त एका धाग्यावर आपल्या दणदणीत चर्चा झाल्या. त्याचा पुढचा भाग काढावा लागणार आहेच कारण अनेक मुद्दे अजून आलेले नाहीत. तर ते एक असो. हा धागा वेगळ्या विचाराने काढलाय व सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती आहे की यात जमेल तसे, तितके योगदान आपल्या अनुभव, कौशल्य, ज्ञान याद्वारे द्यावे. तर मंडळी, असे आहे की अनेक हुशार, कर्तबगार मुलांना, विद्यार्थ्यांना, होतकरु तरुणांना शिक्षण व रोजगार ह्या जीवनयापनासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी कसल्याही प्रकारचे आरक्षण नसल्याने झगडावे लागते आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अनेक परिहार्य कारणांमुळे संधींची उपलब्धता कमी झाल्याचे, नसल्याचे जाणवत आहे. अशा नागरिकांना, आपल्या भारतीय बांधवांना जातपातीची आडकाठी येणार नाही व आपल्या क्षमतेनुसार योग्य ते शिक्षण व रोजगाराची संधी मिळू शकेल असे मार्गदर्शन करता येईल काय हा विचार मनात आला, म्हटले आपल्या मिपाकरांनाच विचारल्यास एक चांगला मार्गदर्शक धागा तयार होईल. काय अपेक्षित आहे? : १. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिप्पणी, दोषदर्शन नसावे. २. प्रतिसाद थेट मुद्द्याला धरुन असावे. ३. रोजगार वा शिक्षण संधींची माहिती देतांना हात आखडता घेऊ नये. ४. आपल्या माहितीतल्या कंपन्या, संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था ह्यांच्या कामाची माहिती. ५. हा 'खर्‍या गरजूं'साठी मदतीचा धागा आहे हे कायम लक्षात असू द्या. ६. आपले बहूमूल्य मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद!

प्रतिक्रिया द्या
36393 वाचन

💬 प्रतिसाद (131)
S
sagarpdy Wed, 09/28/2016 - 09:37 नवीन
घाबरतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
S
sagarpdy Wed, 09/28/2016 - 09:37 नवीन
ओरडू देत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
स
सचु कुळकर्णी Sun, 09/25/2016 - 13:26 नवीन
बच्चा काबिल बनो काबिल कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी वाक्य जरी सीनेमातल असल तरी ह्यामागे खुप मोठा अर्थ दडलाय. रीलेट करायच झाल्यास ईथेच मिपावर मला माहित असलेल्या कीत्येकांना हे लागु होतय. डांगेबॉ तुमचे होस्टेल किंवा ईतर लेख पाहता तुम्ही सुध्दा फिट बसता की. ** संपादक महोदय हा प्रतिसाद ह्याच धाग्यावर द्यायचा होता, चुकीने तो मराठा मोर्चा धाग्यावर टाकल्या गेलाय विनंति आहे कि तो तेथुन उडवुन टाकण्यात यावा.
  • Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा Sun, 09/25/2016 - 15:27 नवीन
एक अभ्यासू सर्वे करून आर्थिक सुबत्ता असलेल्यांचे आरक्षण बंद करावे. फुकटे सरकारी पैसे खात आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 09/28/2016 - 01:51 नवीन
अगदी बरोबर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
स
सुबोध खरे Sun, 09/25/2016 - 15:40 नवीन
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावायला पाहिजे असा मी मागे सविस्तर प्रतिसाद दिला होता. आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीला( उदा डॉ. देवयानी खोब्रागडे) आरक्षण देणे हे आरक्षणाच्या मूळ हेतूला हरताळ फासल्यासारखे आहे. ज्या माणसाला महिना अडीच लाख रुपये पगार तो मागासलेला कसा ? तेच परत टंकण्याचा कंटाळा आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 09/25/2016 - 15:45 नवीन
http://www.misalpav.com/node/32621
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sun, 09/25/2016 - 16:22 नवीन
मोर्चाला जवळपास 70 लाख लोक आले होते म्हणे या सर्वानी आपल्या गावातील आर्थिक दृष्टीने गरीब पण हुशार मुलांची यादी आणली असती तर मोर्चा मधे सर्वानी 1 रू जरी जमा केला असता तरी 100 मुलांच शिक्षण झाल असत
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 16:54 नवीन
ह्या धाग्याचा उद्देश आधीच नमूद केल्याप्रमाणे मराठामोर्चा, आरक्षण योग्य-अयोग्य, इत्यादी नाही हे लक्षात घ्यावे. त्यानुसारच प्रतिसाद यावेत अशी परत विनंती करत आहे. अन्यथ चांगल्या भावनेने काढलेल्या धाग्याचा आखाडा व्हायला वेळ लागणार नाही. अनेक लोकांना मराठा-मोर्चा, आरक्षण इत्यादीबद्दल अजून बरेच बोलायचे आहे पण त्यासाठी वेगळा धागा काढूयात. ह्या धाग्याला ऑलटाईम रेफरेन्स धागा म्हणून ठेवावा अशी माझी संकल्पना आहे.
  • Log in or register to post comments
श
शलभ Sun, 09/25/2016 - 20:49 नवीन
+१ अयोग्य प्रतिसाद काढून टाकावेत ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 17:28 नवीन
मित्रहो, व्यवस्था एका रात्रीत बदलत नाही, अनेक दिवस, अनेक वर्ष तर कधी कधी अनेक पिढ्याही व्यवस्था बदलण्यात खर्ची पडतात. पण मग एखाद्या अडलेल्याचे, खचलेल्याचे, गरजूचे जे आजचे प्रश्न आत्ताच्या आत्ता ताबडतोब सोडवायचे आहेत त्याचे काय करावे? प्रत्येकाच्या आयुष्यात व्यवस्थेमुळे अनेक अडचणी उभ्या राहत आल्या आहेत, अनेकदा आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. मग आपल्याला काय शक्य आहे ते आपण करायचं. आपलं आयुष्य बदलणं आपल्या हातात आहे. कोणीही बसल्या जाग्यावर आपल्या काहीही आणून देत नाही. आज उघड्या डोळ्यांनी मी जेव्हा भारताकडे बघतो तेव्हा मला हजारो संधी होतकरुंची वाट पाहत उभ्या असलेल्या दिसतात. कित्येक ठिकाणी भरमसाठ गॅप्स आहेत, त्या गॅप्स मेहनत करणार्‍या तरुणांची वाट पाहत आजही उभ्या आहेत. वीस वर्षांपूर्वी ज्या समस्या होत्या त्यावर अजूनही सर्वसमावेशक काम सुरु झालेले नाहीये. काम आणि पैसा दोन्ही हात जोडून उभे आहेत. आणि ह्या प्रकरणात आरक्षण कुणालाच नाही, ज्याच्या मनगटात जोर आहे, ज्याच्याकडे मेरिट आहे त्याच्यासाठी हे सर्व खुलं आहे. ज्याला मेरिटवर आपल्याला जोखलं जावं असं वाटतं त्याच्या मेरिटची अस्सल पातळी दाखवणारी ही स्पर्धा खुली आहे. जगण्यासाठीच्या समस्या अनेक आहेत, त्यावर आपल्या सर्वांना मिळून उत्तरं शोधायची आहेत. मदतीचे हात जमतील तसे द्यायचे आहेत. कुणीही आयुष्याचा रस्ता एका भींतीपुढे येऊन संपलाय असे समजू नये. त्यासाठीच हा धागा आहे. ...तुर्तास एवढेच.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/25/2016 - 17:40 नवीन
विविध कोर्सेसची माहिती आपल्याला नसते. अनेक पर्याय उपलब्ध असतात त्याबद्दल एका सरकारी कार्यालयात पुस्तके मिळतात. त्यात बारीक छपाईमध्ये अनेक अभ्यासक्रम व त्याची सरकारी कॉलेजे याबद्दल माहिती असते. सर्व भारतभरातील माहितीसाठी निळ्या कव्हरचे पुस्तक व महाराष्ट्रातील माहितीसाठी गुलाबी कव्हरचे पुस्तक असे पंचविसेक वर्षांपूर्वी होते. ती पुस्तके कुठे मिलतात हे माहित नाही पण आमच्याकडे आणली गेली होती. माझे वडील त्यांच्या बजेटप्रमाणे एका मुलीला शैक्षणिक मदत करतात. मुलगी असणे, कमी उत्पन्न गट व ब्राह्मणेतर असे साधारण निकष असतात. मुलीचे आईवडील व्यसनी नसून त्यांचा मुलीस सपोर्ट आहे हे बघतात. मुलीचे गणित, शास्त्र हे विषय करून घेणे, बाहेरून मार्गदर्शन मिलवून देणे वगैरे जमेल तसे असते. यात मागे प्रभूमास्तरांचीही हेल्प झाली होती. दुर्दैवाने एका मुलीस गुण कमी मिलाले. आता काय होते की एकतर इंजिनियरींग नाहीतर जाऊ दे! ते जमले नाही तर लग्न करून ताकू नाहीतर अगदीच फुतकळ कोर्स करू देत. अशी मानसिकता आहे. त्यातून मुलीच्या घरच्या लोकांना बाहेर काढणे जमलेले नाही. त्यामुळे एका विद्यार्थ्याची जबाबदारी घेणे तितकेसे फायदेशीर झालेले नाही. आता वडील पुढे हे करत राहतील असे वाटत नाही पण बर्‍याच मुलींना काही ना काही मदत झालेली आहे. माझे दोन्ही भाऊ मात्र आपल्याच नात्यात कोणी गरजू आहे का हे पाहतात व मदत करतात.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 17:49 नवीन
खुप सुंदर उपक्रम, रेवतीताई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
निओ१ Sun, 09/25/2016 - 18:51 नवीन
as per my thinking, you need only willpower. few year ago i lost my established business, lot everything. but not lost my hope. i started my new work, without any knowledge about anything new work. but i used google, youtube for understand works steps. i did 2 short study about my work. after that now... without investment and degree i started my full time working business,now i am working with worldwide clients with very good repo. No need any reservation for do work. need only hard-work and willpower. and i have reservation but i not used any right in my life from this reservation system. if anyone need help he can contact me anytime.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 18:56 नवीन
मस्त हो निओसाहेब, तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर मराठीतून लिहिता आले तर अनेकांना मार्गदर्शन होइल. अर्थात तुम्हाला स्पर्धेची चिंता नसेल तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१
न
निओ१ Sun, 09/25/2016 - 19:08 नवीन
Sure sir, few years ago i was good in Marathi typing but this keyboard typeset is different as per typing knowledge,. but now days I am using only English as per my work need. i am coming back to my root again.. but i planed when i join this team i will need good hand in Marathi typing. i am practicing daily about this need some extra time. i hope your team will understand my issue.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 19:10 नवीन
तुम्ही बिन्दस लिहा... नन्तर मराठीत बदलुन घेउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१
म
मुक्त Sun, 09/25/2016 - 18:56 नवीन
sanDip Dange खूप विद्वान माणूस. akhe जग बदलण्याची takad असणारा. अमी मूर्ख. amhala kahich samjat nahi. aso.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 18:59 नवीन
ओ साहेब, तुम्ही रागावलात काय? काय राव! प्रत्येक घटनेकडे बघण्याचा माझा वेगळा दृष्टीकोन असतो, प्रत्येक गोष्टीला आडवे जाणे म्हणतात, मी शोधतो वेगळं काही. स्वतंत्र. माझ्यापुरतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त
म
मुक्त Sun, 09/25/2016 - 19:05 नवीन
kas आहे. मराठ्यांचे घरातले प्रॉब्लेम मिपावर fakt तुम्हालाच माहित आहेत. आम्हाला काहीच काळात नाही. तुम्ही सगळ्या जगाचे ज्ञान कोळून पाल्येत. इथे बाकी लोक म्हणजेkachara. तुमच्या भाषेत किंवा ithalya so ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुखीमाणूस Wed, 09/28/2016 - 02:01 नवीन
डान्गे साहेबानी कुठे मराठ्यान्च्या घरचे problems चर्चिले? ते तर विषयान्तर होउ नये म्हणून प्रयत्न करत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त
अ
अविनाश लोंढे. Sun, 09/25/2016 - 19:19 नवीन
१ .ज्याने आधी आरक्षण वापरून नोकरी मिळवली आहे त्यांनी आपल्या मुलांना आरक्षण घेऊ देऊ नये . पण आयती 'सवलत' सोडणार कोण ? २. जे लोक आज आरक्षणाविरोधी (निरर्थक) बडबडत आहेत त्यांनी आपली अर्धी संपत्ती (जमीन, गाडी , बागायत इ . ) ज्याला आरक्षणाची गरज आहे त्यांना द्यावी . (आर्थिक समानता ) . हे अवघड आहे पण जस 'आरक्षण घेणाऱ्या' घरात जन्म घेणे 'गुन्हा' नाही तसेच श्रीमंत घरात जन्म घेणे ह्यातही काही 'मोठेपणा नाही' पण आयती 'मिळकत 'सोडणार कोण ? दोन्हीही गोष्टी 'बाऊन्सर' आहेत , पण हे केल्याने नक्कीच आरक्षणाशिवाय जगता येईल .
  • Log in or register to post comments
म
मुक्त Sun, 09/25/2016 - 19:38 नवीन
संदीप डांगे मिपा सोडून जग खूप मोठे आहे. एखादा मुद्दा मिपावर आला नाही म्हणजे तो जगातच आहि. हा ब्रहम सोडा. तुमच्याएवढे किंवा तुमच्यापेक्षा कमी जाणणारे लोक ह्या जगात आहेत हे लक्सात ठेवा.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 09/25/2016 - 20:16 नवीन
मुळात आरक्षणामुळे आपल्यावर अन्याय होतो किंवा आपल्याला आरक्षण मिळाले नाही म्हणून(च) आपली प्रगती होणार(च) नाही ही समजूत जितक्या लहान वयात उपटून काढता येईल तितक्या लवकर बरेच प्रश्न सुटतील. घरातील मुलं १० वी / १२ वी ला गेलं की त्याला घरातून, आजुबाजूकडून आरक्षणामुळे आपल्यावर कसा अन्याय होतोय याची रडगाणी ऐकायला भेटतात. कॉलेजच्या तरुण वयात मग असा ओपनवाला रिझर्वेशनवाल्यांचा जन्मजन्मांतरीचा विरोधक होऊन जातो. मग सरकारी जावई, कमीपैकीचे, खालच्या जातीचे, राजवाड्यात राहतो का रे ? असे शब्द बोलण्यातून बाहेर पडतात. अर्थात विरुद्ध बाजू देखील काही कमी नसते. आमच्यावर पिढ्यानपिढ्या कसा अन्याय झालाय ! रामाने शंबुकावर कसा अन्याय केला, महाभारतात एकलव्यावर द्रोणाचार्यांनी कसा अन्याय करुन अजुर्नाला कसे झुकते माप दिले असल्या अगदी पुराण कालीन कालखंडातील कथांचे डोस पाजले जातात. चैत्यभुमीवर गेले तरी 'शुद्र कोण होते ?' 'राम कोण होता ?' असल्या पुस्तकांचा खप जास्त असतो. मग काय करायचे ? आपण अगदे युगानयुगीचे गुलाम आहोत आणी त्याचा बदला आपण घेतलाच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे ! नाही कुणाच्या बापाचे असल्या घोषणा बाहेर पडतात. दुसर्‍या कोणाबद्द्ल बोलत नाही पण तरुण वयात मी देखील असाच विचार करत होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधक होत गेलो. त्यांना हक्कच हवे होते तर त्यांनी हिंदू धर्मात राहूनच सुधारणा करुन घ्यायच्या होत्या. धर्म बदलण्याची काय गरज होती ? तुमच्यात ताकद होती तर मग याच धर्मात राहून का बदल करुन दाखविला नाही असे विचार वेळप्रसंगी मनात यायचे. एक वेळ अशी आली की बाबासाहेंबाच्या विचारांचा विरोध करायचा तर त्यांचा लेखनाचा अभ्यास केलाच पाहिजे असे मनाने घेतले. सुरुवातीला रामाने शंबुकावर कसा अन्याय केला, महाभारतात एकलव्यावर द्रोणाचार्यांनी कसा अन्याय करुन अजुर्नाला कसे झुकते माप दिले, क्षुद्र मुळचे इथले मालक होते असल्या वाचनाने झाली पण असे वाचन केल्यामुळे एकतर आपण आपल्या दैवतांचा द्वेष करु किंवा त्यांच्या दैवतांचा द्वेष करु यापेक्षा तिसरी गोष्ट होणे नाही हे लक्षात आल्यावर असली वाचने त्वरीत थांबविली. जे घडून गेले आहे ते मी बदलू शकणार नाही, त्यामुळे त्याच त्याच अन्यायाच्या गोष्टी वाचणे, त्यावर फालतू चर्चा करणे यात काही राम नाही असे लक्षात आले. त्यामुळे फक्त गेल्या शे दिडशे वर्षात काय अन्याय झालाय त्यावरच लक्ष केंद्रीत करायचे असे ठरवले. दलित लेखकांची पुस्तके आवर्जुन वाचत होतो. त्यातले प्रश्न मनाला भिडत होते. जसजसे वाचन वाढत गेले तशातशा दोन्ही बाजू कळत गेल्या. आरक्षण अजूनतरी हवे आहे मात्र ते कधीतरी संपायला देखील हवेच आहे या मतापर्यंत प्रवास झाला. अशातच डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आणि थायलंड इथून प्रकाशित झालेले बौद्ध धर्माविषयीचे हिंदी पुस्तक हाती लागले. या पुस्तकाने मला एका आठवड्यात बाबासाहेबांच्या विरोधकापासुन बाबासाहेबांच्या पुजकाच्या भुमीकेत आणून ठेवले. या पुस्तकाचा पगडा इतका जबरदस्त होता की जवळ जवळ २-३ महिने विचार करुन मी बौद्ध धर्म स्वीकारावाच या भुमिकेपर्यंत आलो. दुर्दैवाने ते पुस्तक एका मित्रास वाचावयास दिले ते त्याने परत केले नाही. चांगले मित्र आणि चांगली पुस्तके दुरावली की परत मिळत नाहित हा सुविचार मी प्रत्यक्ष जीवनात अनुभवला. आज जवळ जवळ या गोष्टीला २० तरी वर्ष झाली पण अजुनही मला पुस्तकाची आठवण येते. दुर्दैवाने मला त्या पुस्तकाचे नाव आठवत नाहिये. मात्र बरेच विचारमंथन केले तेव्हा ल्क्षात आले की माझा धर्मही काही म्हणावा तेवढा वाईट नाही. आहे तिथेच राहून स्वतःस बदलणे शक्य आहेच की. त्यामुळे शेवटी धर्मबदलाच्या विचारावर पडदा टाकला. अजूनही मी पुरेसा वैचारिकरित्या परिपक्क्व झालो आहे असे मला वाटत नाही. आणि काही बाबतीत होणे शक्य वाटत नाही. मात्र मी जेवढा बदलण्याचा प्रयत्न केला आहे तेवढा प्रामाणिकपणे केला आहे आणि तो मी प्रामाणिकपणे टिकवून ठेवीन यात मला शंका वाटत नाही. ----------------------------------------------------------------------- एकंदरीतच या प्रवासात काही गोष्ट प्रकर्षाने जाणवल्या त्या म्हणजे १. भुतकाळात जगणे हा आपल्या भारतीयांचा खास गुण आहे. दोन्ही गटांनी भुतकाळात काय घडलेय त्याचे ओझे उरावर बाळगून जो प्रवास चालवला आहे तो त्वरीत थांबविला पाहिजे. आपल्याला एकतर भुतकाळातला दिव्य दैदिप्यमान वारसा आठवतो किंवा पिढ्यानपिढ्या भोगलेले अत्याचार. आजच्या जर्मन जनतेची विचार करण्याची पद्धत आपल्याला अंगीकारता येईल काय ? आपण वर्तमानकाळात जगायला शिकू काय ? आपल्या भावी पिढीने आपल्या पुर्वीच्या पिढयांच्याच पराक्रमाचे पोवाडे गायचे की आपल्या पुर्वीच्या पिढयांच्याच अत्याचारांच्या कथा ऐकायच्या ? आपल्या पिढीच्या काहि चांगल्या आठवणी त्यांना देणार आहोत काय ? २. आपण नेहमीच एका तारणहाराच्या उदयाची वाट पाहत असतो काय ? किंवा आपण नेहमी आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍या कोणावर तरी फोडायला तत्पर असतो काय ? ३. आपण आपल्या संतापाची / इगोची धार बोथट करु शकणार आहोत काय ? सारांश : पुढच्या पिढीची विचार करण्याची पद्धत लहान वयातच योग्य रितीने बदलण्याचे काम केले तरी मला वाटते की निम्मा प्रश्न तिथेच संपेल. बाकी तर केवळ औपचारीकता आहे. अर्थात हे दिवास्वप्न आहे याची देखील मला जाणिव आहे पण आशेवर जगायला काय हरकत आहे ? आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे ? विशेष नोंद : हे माझे केवळ विचारमंथन आहे. त्यात काही जातीवाचक शब्द आले असतील तरी ते कोणालाही दुखावण्याच्या हेतुने नाहीत. ते शब्द केवळ त्यावेळच्या मनस्थितीचे यथार्थ दर्शन करणारे शब्द म्हणूनच वाचावेत. तरीही कोणी दुखावत असेल तर मी अगोदरच माफी मागतो. आरक्षण हवे की नको ? मराठ्यांना आरक्षण द्यावे की नको ? या चर्चेत मला भाग घ्यावासा वाटत नाही. कारण मी वयोमर्यादेने आणि मनाने कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाच्या पलिकडे गेलो आहे. वरील प्रतिसादातील कोणताही परिच्छेद , वाक्य वेगळे काढून केवळ तेवढ्या सिलेक्टीव रिडींगवरुन कोणाला निषेध करायचा असेल, जाब विचारायचा असेल अथवा कौतुक करायचे असेल तर माफ करा मी पुढील प्रतिसादासाठी हजर असेलच याची खात्री नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 09/26/2016 - 13:12 नवीन
आवडला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ख
खटपट्या Mon, 09/26/2016 - 16:25 नवीन
प्रतिसाद आवडला. बाकी ते पुस्तक कोणाला दीलत हे व्यनीत सांगीतलेत तर होता होइल तेव्हढी मदत करेन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
G
gogglya Tue, 09/27/2016 - 13:00 नवीन
आपल्याला जाणवलेले मुद्दे अचूक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विशुमित Tue, 09/27/2016 - 13:25 नवीन
छान प्रतिसाद..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
र
रंगासेठ Wed, 09/28/2016 - 13:31 नवीन
अतिशय उत्तम प्रतिसाद.शाळेत असताना एवढं जाणवलच नव्हतं की आरक्षण हे काय प्रकरण आहे. आणि नंतर मग इतरांकडून ऐकून एक मत बनवलं गेलं. मुळात माध्यमिक शिक्षणापर्यंत परिस्थिती level playing field अशी निर्माण करायला पाहिजे. नोकरी साठीच शिक्षण घ्यायची/पाठांतरे करुन गुण मिळवायचे हे पण बदलायला पाहिजे. बाकी तुम्हाला जाणवलेल्या तीनही गोष्टींना अनुमोदन. आपल्याकडे अजून ही मानसिकता आहे की कुणीतरी एक नेता/तारणहार येऊन आपल्या समस्या सोडवेल, पण तोपर्यंत आपण काहीच करायचे नाही. अवांतरः मला अशावेळी कायम शाळेतील 'महापुरुषांचा पराभव' हा धडा आठवतो, एकदम चपखल वर्णन आहे आणि तशीच परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 20:19 नवीन
मुक्तराव, मिपा सोडून जग खरंच मोठं आहे. आणि ह्या जगात बर्‍याच गमतीजमती आहेत, अनेक मुद्दे मिपावर येत नाहीत ह्याचा अर्थ तेही ह्या जगात नाहीत हा भ्रम तुम्हीही सोडलेला बरा. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणकार्+अनुभवी आहात हे मला पुरेसं लक्षात आहे. तेव्हा तुम्ही आपले मुद्दे मांडा धागे काढून. मी तर केव्हाचं बोंबलतोय. बाकी, खदखद सरल्यावर मला भेटा, सुमारे 'एक लाख' खर्‍या गरजूंची गरज आहे मला. कोणीही असेल, कोणत्याही जातीधर्मांच्या 'खर्‍या गरजूं'मधे तर जरुर कळवा. मेहनत करणार्‍याला संधींची कमतरता नाही. तेवढ्यासाठी धागा काढला आहे. पण स्वतःची लाल करणे हा हेतू तर मुख्य आहे, तो नेहमी असतो. फक्त मीच शहाणा आहे जगात, हे मला पक्के ठावूक आहे म्हणून जीवंत आहे, जगत आहे, रोज नवी नवी आव्हानं स्विकारत जिंकत जात आहे. मी माझी 'लाल' करतो, ज्याला ज्याची करायची असेल त्याने त्याची करावी. हाकानाका? मला जात-जात करणारे सख्खे आईबाप असले तरी आवडत नाहीत हे अंतिम सत्य आहे. शेवटी जसं तुम्ही योग्य समजाल ते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त Sun, 09/25/2016 - 20:26 नवीन
फक्त मीच शहाणा आहे जगात,
असो. आता जास्त charcha करण्यात काही artha नाही. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
शलभ Sun, 09/25/2016 - 21:17 नवीन
माफ करा पण तुम्ही मुद्दा तर समजून घ्या.. उगाच चिडचिड करू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 21:21 नवीन
शलभभौ, असू द्यात, ते आमचे चांगले मित्र आहे. माझ्या काही विचारांमुळे गैरसमज झाल्याने दुखावलेले आहेत. कायम असे राहणार नाहीत ही खात्री आहे. लेट द टाइम पास...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
ल
लीना कनाटा Sun, 09/25/2016 - 20:20 नवीन
समाजातल्या या वंचित वर्गावर शेकडो पिढ्या जो अन्याय झाला आहे त्यासाठी कमीत कमी २५० ते ३०० वर्षे ( दहा पिढ्या ) आरक्षण दिले तर ते अभिजनांच्या बरोबरीने उभे राहण्या इतके सक्षम होतील. मात्र एक गोष्ट करायला हवी. जर मागील पिढीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर पुढील पिढीला आरक्षण नाही फक्त प्राधान्य मिळावे. म्हणजे मागासवर्गीय आणि ओपन कॅटेगरी च्या उमेदवारांना सामान गुण असतील तर मागासवर्गीयाला प्राधान्य मिळावे. आणि हि बाब पदोन्नती किंवा बदली यासाठी देखील लागू करण्यात यावी.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Sun, 09/25/2016 - 20:31 नवीन
असो. आता जास्त charcha करण्यात काही artha नाही. JOKE OF THE DAY :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त Sun, 09/25/2016 - 21:06 नवीन
Namaskar hobasarao =)) काही दुखलं तर सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
म
मुक्त Sun, 09/25/2016 - 21:07 नवीन
Namaskar hobasarao =)) काही दुखलं तर सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सचु कुळकर्णी Sun, 09/25/2016 - 21:22 नवीन
अरे सतरंजि चोर तु ! आता तर विषयच संपला, पुढे बोलण्यात काहिच अर्थ नाहिय.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Sun, 09/25/2016 - 21:22 नवीन
अरे सतरंजि चोर तु ! आता तर विषयच संपला, पुढे बोलण्यात काहिच अर्थ नाहिय.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 21:47 नवीन
१. मी जे शेतकर्‍यांसाठीची हेल्पलाईन सुरु करणार होतो त्याचे कामासाठी दहा जणांची टीम खेड्यापाड्यातून (लाख लाख रुपये फी भरुन बीबीए झालेल्या - परत लाख रुपये भरुन एमबीए करण्याची तयारी करणार्‍या, वडील गरिब शेतकरी असणार्‍या मुलांची) तयार केली होती. ताजी बातमी अशी की अज्ञात कारणाने प्रस्तुत टीमने अर्धवट काम सोडून दिले आहे. असो. नवीन टीमसाठी जुळवाजुळव करत आहे. कोणालाही खर्‍या गरजूंची, हुशार आणि मेहनतीस तयार तरुणांची माहिती असेल तर कृपया कळवावी. कोणतीही गुंतवणूक नाही. फक्त शारिरिक व बौद्धिक मेहनतीची तयारी हवी. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्‍यात असले तरी चालतील. २. सध्या महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना अनेक गंभीर समस्या भेडसावत आहेत. त्यात एक महत्त्वाची म्हणजे कुशल-अकुशल शेतमजूरांची उपलब्धता. सुमारे २५० रुपये ते ३५० रुपये रोज एवढा मेहनताना देऊनही मुबलक व मेहनती शेतमजूर मिळत नाहीयेत. जे मिळतायत ते कामाला बारा वाजता येऊन पाच वाजता घरी जातात. मधले एक तास जेवणात घालवतात. कंत्राटी पद्धतीवर चांगले मेहनती शेतमजूर पुरवणार्‍या कंपनीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. २५ हजार खर्‍या गरजू, मेहनती, कामाचा कंटाळा न करणार्‍या शेतमजूरांची आवश्यकता आहे. ३. माझ्या एका आयटीआय झालेल्या मित्राने स्वतः दोन वर्ष संशोधन करुन एक अफलातून इलेक्ट्रिक पॉवर स्टेबिलायजर बनवला आहे. त्याची किंमत साडेसात हजार, साडेनौ हजार व चौदा हजार अशी आहे. शेतकर्‍यांना वीजेचे संतुलन करण्यासाठी, पाण्याचे पंप चालवण्यासाठी, घरातली उपकरणे चालवण्यासाठी अशा स्टेबिलायजरची गरज असते. प्रथम-वापरा-नंतर-पैसे द्या ह्या स्ट्रेटेजीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात सदर स्टेबिलायजर विकण्यासाठी थेट विक्री करणारे विक्रेते पाहिजेत. प्रत्येक यंत्रामागे पाचशे रुपये मानधन मिळेल. कोणतेही टारगेट नाही, जितकं काम कराल तितका फायदा मिळवा अशी योजना आहे. ह्या कामासाठी इलेक्ट्रिकचे ज्ञान असलेले खरे गरजू, मेहनती, इमानदार तरुण पाहिजेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त मेहनत करा व पैसे मिळवा. ४. शेतकर्‍यांच्या जमिनीचे मातीपरिक्षण शासकिय अधिकारी करतात, बरेचदा त्याला विलंब होतो. किंवा प्रत्येक शेतकर्‍याला ते शक्य होत नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाऊन शेतावर-बांधावर जाऊन मातीपरिक्षण करु शकेल अशी फिरती प्रयोगशाळा/लेबोरटरी ची संकल्पना आहे. बारावी विज्ञान झालेल्या हजारो मुलांना उत्तम संधी मिळेल. प्रत्येक मातीपरिक्षण-पाणीपरिक्षण अहवालामागे कमीशन बेसीसवर कमाई होईल. बारावी विज्ञान नापास झालेले असले तरी खरे गरजू, मेहनती, इमानदार तरुण पाहिजेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त मेहनत करा व पैसे मिळवा. ५. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांना विकू शकणार्‍या अनेक उत्पादक-शेतकरी-कंपन्या निर्माण झाल्या आहेत. अशा किमान एक हजार कंपन्यांची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांकडून सर्व प्रकारची उत्पादने घेऊन, विशेष उत्पादने पिकवायला लावून त्याची विक्री राज्यात, देशात, परदेशात करण्यासाठी खर्‍या गरजू, मेहनती तरूणांची आवश्यकता आहे. संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे. काम करण्याची कळकळ असलेली मुले पाहिजेत. पैसा उत्तम मिळेल ह्याची खात्री आहे. ६. महाराष्ट्रातल्या सुमारे साडेतीनशे तालुक्यांमधे १० जणांची एक टीम अशा प्रकारे सुमारे साडेतीनशे टीम्स संपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शनासाठी हव्या आहेत. टिमला कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, मार्गदर्शन मोफत पुरवले जाईल. टीमकडे स्वतःचा बेसिक लॅप्टॉप, मोबाईल इन्टरनेट कनेक्षन हवे. बारावी कला-समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, अशा कोणत्याही विषयात- शिकलेले होतकरु व खरे गरजू हवे आहेत. आवश्यकता असलेल्या एकूण तरुणांची संख्या: सुमारे ३५०००. हमखास व कायमस्वरुपी चांगले उत्पन्न, तसेच आपल्या देशबांधवांसाठी काहीतरी विधायक केल्याचे समाधान मिळवून देणारा उपक्रम. ७. घनकचरा व्यवस्थापन, रद्दीपेपर कलेक्शन व रिसायकलिंग साठी महाराष्ट्रातल्या सर्व ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी शंभर जणांचे एक युनिट ह्याप्रमाणे ३६०० होतकरु व खरे गरजू लोकांची गरज आहे. एकूण प्रभावित रोजगारक्षमता; १८,०००. हमखास व कायमस्वरुपी चांगले उत्पन्न, तसेच आपल्या देशबांधवांसाठी काहीतरी विधायक केल्याचे समाधान मिळवून देणारा उपक्रम. ८. महाराष्ट्रातल्या सर्व नापिक+पडिक जमीनी घेऊन त्यावर सुधारित पद्धतीने शेती करण्यासाठी असंख्य गरिब तरुण हवे आहेत. मार्गदर्शन मोफत मिळेल. चांगला नफा, कायमस्वरुपी काम, राहायला जागा मिळेल. ९. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन, व्यवस्थापन, विपणन ह्यासाठी चांगले मार्गदर्शन करु शकतील असे किमान दहा हजार तरुण हवे आहेत. कोणत्याही प्रकारच्या शेतीशिक्षणाची अट नाही, योग्य मार्गदर्शन व तेही मोफत केल्या जाईल. दहावी नंतर किमान पाच वर्षे (समांतरपद्धतीने कोणतेही शिक्षण घेत) शेतीचे मूलभूत ज्ञान घेणे आवश्यक. तिसर्‍या वर्षापासून कायमस्वरुपी चांगली कमाई व समाजात मान-सन्मान मिळेल. अशा दहा हजार खर्‍या गरजू, कामाची कळकळ, एखाद्या सैनिकाच्या तोडीसतोड कष्ट करण्याची तयारी, वकिल-डॉक्टरांच्या बौद्धिक पातळीवर मेहनत करण्याची तयारी हे गुण आवश्यक. १०. दहावी करुन आयटीआय झालेले अनेक तरुण भारतातल्या-महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने लागत आहेत. बिनकामाचे इंजिनियर्सला अहंकार मोठा, ज्ञान कमी त्यापेक्षा चांगल्या पैशात आयटीआयन्स मुलांना चांगली मागणी आहे, पाच वर्षात चांगले तरबेज होऊन, इण्जिनियरांचे पगार मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. असे कीती हजार तरुण लागतील आत्ता लगेच माहिती नाही. पण किमान पन्नासेक हजार तरी लागतील. ११. महाराष्ट्रात कमाई करता येऊ शकणार्‍या कोणत्याही क्षेत्रात (मसाला बनवणे, घरगुती मेस, किराणा-माल घरपोच, शेळीपालन, दुग्धौत्पादन, कुक्कूटपालन, मध-उत्पादन, साबण-शाम्पू-पावडर, तयार कपडे, सजावटीचे सामान बनवणे, ब्युटीपार्लर, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रीशियन सहित सुमारे दोनशे प्रकारच्या घरगुती सर्विसेस, घरपोच कारवाशिंग, ऑफिस मेन्टेनन्स, अकाउंटट्स, मार्केटींग एक्झुकेटीव, हाउसकिपिंग, घरकामवाल्या) सुमारे दहा टक्के जागा मेहनत करणार्‍यांसाठी खुल्या आहेत. इथे कोणतेही आरक्षण लागू होत नाही. चांगला पगार, मेहनताना, मोबदला, जीवन सुस्थितीत व आरामात जगण्याची खात्री असलेल्या अनेक संधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू-होतकरु, हुशार तरुणांसाठी वाट पाहत आहेत. (वरिल सर्व अतिशय पोटतिडकिने लिहिले आहे. कोणी ह्याला 'स्वतःची लाल करणे' समजत असेल तर ते तसेच आहे. ओक्के!? आणि हे फक्त दहा आहेत, अजून ९० मुद्दे बाकी आहेत.)
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 09/26/2016 - 05:29 नवीन
पुण्यात आल्यावर किमान तीन तास राखून ठेवाच.....(आग्रहाची मागणी) मुद्दा क्र ५,६,७,८ साठी माझ्याकडून सक्रीय सहभाग राहील. आपल्या माहीतीतेल पण पुण्यात जागेच अडचण असलेल्या ( शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांना विकू शकणार्‍या अनेक उत्पादक-शेतकरी-कंपन्या ) असल्यास मी माझी २०० चौ फुट जागा वापरायला द्यायला तयार आहे अट पुर्वीचीच वप्रून झाल्यावर साफ सूफ करून देणे आणि परिसरात शेतीमाल (बाजारभावापेक्षा) किमान १०% कमी ठेवणे (आजबाजूला किमान १०-१२ तरी भाजीवाले आहेत. (ठाण्यामध्ये व डोंबीवलीत हीच युक्ती/तत्वे वापरून तीन उत्पादक-शेतकरी-कंपन्या संस्था गेल्या ४ महिन्यात शेतकर्यांना त्यांच्या नेहमीच्या दरापेक्षा चौपट फायदा मिळवून देत आहेत०) पुनर्प्रक्रीया बाबत मीच स्वतः घरगुती घन कचर्यापासून स्वयंपाकाचा बायोगॅस साठी पुन्हा सुरुवात करणार आहे. खेड्यातील गरजूंना बसवून द्यायलाही तयार आहे(मिपाकर मोदकानेही यात सहभाग दाखवला आहे)

सामर्थ्य आहे चळवळीचे,जो जो करिल तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे धर्माचे!

धर्माचे इथे धर्म म्हणजे प्रामाणिकता,सचोटी आणि पारदर्शकता हे आणि हेच अभिप्रेत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अप्पा जोगळेकर Mon, 09/26/2016 - 07:47 नवीन
साहेब, तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकाल असे वाटते. पण चर्चेसाठी तुम्ही चुकीचा फोरम निवडला आहे. इथे फालतू टाईमपास आणि जालीय प्रसिद्धी या व्यतिरिक्त काही हाताला लागणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयडीयाज घेऊन सुयोग्य इन्व्हेस्टर शोधावा. हा आमचा एक आगाऊ सल्ला आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभ्या.. Mon, 09/26/2016 - 08:29 नवीन
अगदी अगदी. संदीप माझा मित्रच आहे त्या नात्याने त्याला कळकळीचा सल्ला (अनुभव ह्या आधिकाराने सध्या एवढेच देऊ शकतो) संस्थळावर वेळ न घालवता ह्या आयडीयाज वर प्रत्यक्ष काम सुरु करावे. अगदी लहान स्वरुपात का होईना चालू करावे. पैशाचे सुयोग्य पाठबळ उभे करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. एकाच वेळी ब्लास्ट टाईप ढिगभर आयडीयाज फोडण्याएवजी एकेक गोष्टीवर व्यवस्थित काम करुन ते सयोग्य हाती सूपूर्त करावे. त्यातून समाजहितासोबत काही आर्थिक फायदा असेल तर त्याचे योग्य नियोजन करावे. ह्या गोष्टींची कागदोपत्री नोंद ठेवावी. हे एका माणसाचे अन २४ तासाचे काम नाही. माझा स्वभाव थोडासा निगेटिव्ह आहे. अनुभवाने आलेला कडवटपणा म्हणू शकशील पण एखादा माणूस निस्वार्थीपणे दुसर्‍यासाठी काही करु शकेल हि आशाच लोप पावलीय लोकांची तस्मात आपल्या हेतूविषयी शंकाच जास्त उत्पन्न होतील. वरती उल्लेखलेल्या सर्व प्रोजेक्ट मध्ये तुला आवश्यक तसे मनुष्यबळ मिळणे म्हण्जे आयआयटीयन मिळण्यापेक्षा अवघड आहे. जेवढे कमी शिक्षण तेवढे ध्येयाविषयी प्रश्न जास्त हे लक्षात ठेवून अशा लोकांना / ह्या सर्वांना उत्तर म्हणजे आपले आपण प्रामाणिकपणे काम करत राहणे. त्यातूनच काही चांगले होऊ शकते असा माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी याला खोडा घालणे/उत्साहावर पाणी टाकणे वगैरे वगैरे म्हणू शकतील पण मी तुझी आत्महत्येच्या धाग्यापासून वाटचाल बघितलेली आहे. ती सर्व जितकी प्रामाणिक आहे तेवढीच माझ्या एखाद्या मित्राचे काही वाईट होऊ नये हि माझी इच्छा प्रामाणिक आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 09/26/2016 - 09:04 नवीन
एकाच वेळी ब्लास्ट टाईप ढिगभर आयडीयाज फोडण्याएवजी एकेक गोष्टीवर व्यवस्थित काम करुन ते सयोग्य हाती सूपूर्त करावे. यु सेड इट. एखादा माणूस निस्वार्थीपणे दुसर्‍यासाठी काही करु शकेल हि आशाच लोप पावलीय लोकांची तस्मात आपल्या हेतूविषयी शंकाच जास्त उत्पन्न होतील निस्वार्थीपणे करणे तत्वतः अमान्य आहे. प्रॉफीट शिवाय धंदा होऊ शकत नाही.आणि नफा मिळवण्यात काही गैर नाही. 'आमटे स्टाईल' सेवाभाव हे सार्वकालिक मॉडेल होऊ शकत नाही. माझ्या मते डांगे बिझनेस व्हेंचरबद्दल बोलत आहेत. निदान माझा तरी तसा समज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 09/26/2016 - 09:13 नवीन
अर्थात आप्पासाहेब, समाजहितासोबत काही आर्थिक फायदा असेल तर त्याचे योग्य नियोजन करावे. ह्या गोष्टींची कागदोपत्री नोंद ठेवावी. हे लिहिलंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
प
पोप Fri, 09/30/2016 - 09:25 नवीन
पण मी तुझी आत्महत्येच्या धाग्यापासून वाटचाल बघितलेली आहे.>>> हे वाचल्यानंतर मी डांगेंचे सगळे धागे वाचले आणि लक्षात आले नाही की ज्या माणसाकडे एवढे वर लिहलेले सगळे उपाय असताना हा माणुसाने धागा का काढला?कशासाठी तो आत्महत्येस प्रवृत्त झाला असेल? ते डांगे खरे की ज्याने फक्त हाताने स्पर्श केला तरी त्याच्याकडील सकारात्मकता इतर १० माणसांकडे रुपांतरीत/ संक्रमीत होईल ते डांगे खरे एवढी त्यांनी प्रगती केलेली आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा. तुम्ही इथेच एक मदत धागा काढावा आणि त्यामध्ये प्रत्येक संस्थेचा संपर्क पत्ता द्यावा. ज्याला लाभ घ्यायचा आहे तो मिपाकर, त्याच बरोबर वामा , अमिपाकर लाभ घेईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मारवा Fri, 09/30/2016 - 15:58 नवीन
जीवनातल्या एखाद्या कठीण प्रसंगी मनाच्या एखाद्या कमकुवत क्षणी एखाद्या माणसाला आत्महत्येचा विचार मनात आला त्यात एवढ आश्चर्य वाटण्यासारख काय आहे मला समजत नाही. प्रत्येक जण कधी ना कधी ( अपवाद असतीलही) जीवनात निराश होतो, एखादी टोकाची सिच्युएशन आयुष्य निर्माण करतं. तेव्हा माणुस मनाने कोसळतो तात्पुरता. परत काही काळ जातो परत तो सावरतो सुद्धा. आय मीन हे सर्व नॉर्मल आहे, होत असत. कोसळण सावरण उसळण हे माणसाच्या बाबतीत स्वाभाविकच नाही का ? तर तेव्हाचे विचार आणि फेज वेगळा असतो. म्हणुन त्या अगोदर व त्या फेज नंतर त्या माणसाने केलेल कार्य व त्याच मुल्य जराही कमी होत नाही. वा वाढतही नाही. ती एक फेज म्हणुन पाहावी व सारख सारख त्या माणसाला त्या फेजच्याच पार्श्वभुमी समोर बघणे टाळायला हवे. प्रत्येक नव्या क्षणी माणुस नवा असतो मुख्य म्हणजे अंतर्बाह्य माणुस बदलत असतो. बदलत्या माणसाला जुन्या फिक्स्ड इमेज मध्ये बघण सोयीच असल तरी टाळायला हव. किमान इथे सारखा सारखा त्याचा उल्लेख कोणाला कीती एम्बरॅसींग असु शकतो हे तरी लक्षात घ्यायला हव. हेमिंग्वे तर ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी सारखी तुफान फायटींग स्पीरीटची कादंबरी लिहीणारा होता त्याने आत्महत्या केली. मला हा प्रतिसाद अजिबात लिहायचा नव्हता मला सारख सारख जे डांगे यांना एम्बरॅसींग वाटेल असे प्रतिसाद येत आहेत ते थांबावेत असे वाटले म्हणुन बोललो. छोड दो यारो पुरानी बाते........ बाकी जनता जनार्दन प्रगल्भ आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोप
प
पुंबा Mon, 10/10/2016 - 14:55 नवीन
मारवाजी हा प्रतिसाद फार फार आवडला.. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मुक्त Mon, 09/26/2016 - 12:15 नवीन
Appashi lai veLa sahamat. हे सगळे vachalyavar hech manat आले होते. 1-1 कल्पना yashaswipane ammalbajavni kara. ithe lihinyat kahi artha nahi. Kadhi kahi madat lagli tar man mokale panane sanga.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 09/26/2016 - 08:08 नवीन
मुद्दे खुपच छान! ह्या विषयी क्ळक्ळ पण आहे. अन काही करायची ईच्छा देखील. सोसायट्यंशी भेटुन शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष भेटुन भाजी पिकवणे ह्यावरही अदमास घेउन बघीतला होता, फक्त मार्गदर्शन नसल्याने अन तो पार्ट टाईम असल्याने यशस्वी झालं नव्हत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा