Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अरेंज्ड मॅरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!!

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Fri, 12/09/2016 - 12:48
🗣 58 प्रतिसाद
अरेंज मॅरेज हा आपल्याकडील एक व्यवस्थीत स्थापीत झालेला प्रकार आहे.इतका की लग्नाचा जोडीदार शोधायचा हाच सर्वोत्तम प्रकार आहे हे आपल्या मानसिकतेत घट्ट रुजले आहे.मी नुकताच जेव्हा वयात येत होतो तेव्हा मला हे अरेंज मॅरेज प्रकरण फार रोमॅण्टीक वाटायचे.मुलगा मुलगी एकमेकांना बघतात,एकमेकांशी बोलतात ,एकमेकांना समजुन घेतात हे भारी वाटायचे . पण हा भ्रमाचा भोपळा फुटला ,जेव्हा मी माझ्या मावसभावाच्यावेळी " बैठकीला " गेलो होतो.बैठक होती संगमेश्वरला.आम्ही मुलीच्या घरी गेलो होतो.इकडतिकडच्या गप्पाटप्पा झाल्यावर उपवर मुलगी पोहे आणि चहा घेऊन आली.ती आल्यावर् आमच्या बाजूचे सगळे बायाबाप्ये तिच्याकडे बघायला लागले.तिचे नजर खाली झुकली.मावसभावाचे वडील तिला बस म्हणाले,तेही तिला ऐकायला गेले नाही इतकी ती कावरीबावरी झाली होती.आमच्या बरोबर जे पुरुष मंडळी होती ते तिला अगदी नखशिकांत स्कॅन केल्यासारखी बघत होती.मावसभाऊ तर हे ' मटेरीयल' आपल्याला सुट होईल का या नजरेतून बघत होता.तिने नंतर चेहरा वर करुन नुसतेच हसल्यासारखे केले.काय न्हवतं तिच्या नजरेत? आपण बाजारात ठेवलेली वस्तु आहोत इथपासुन ते आपले झालेले / होत असलेले "वस्तुकरण या सर्व भावना तिच्या डोळ्यात दिसत होत्या.मलाच ते बघुन कसे तरी वाटायला लागले.काहीतरी निमित्त करुन मी बाहेर गेलो. पण विचारात पडलो . ही कसली पद्धत लग्न ठरवायची? अरेंज मॅरेज या प्रकारात लगेच लग्न ठरत नाही.असे अनेक " दाखवायचे "कार्यक्रम उपवर मुलिंना पार पाडायला लागतात.काय वाटत असेल त्यांच्या मनाला? कुणीतरी तरी अनोळखी लोक बघायला येणार आहेत,त्यांच्यासाठि नैसर्गीक लाज,विनय,स्वत्व बाजुला ठेऊन त्यांच्यासमोर परफेक्ट वाईफ मटेरीयल आहोत हे दाखवण्यासाठी आटापीटा करायचा.की स्त्री जन्मा तुझी ही कहाणी ' म्हणत गप्प वडीलधार्यांच्या ईशार्यावर स्वतःचे वस्तुकरण करुन घ्यायचे? हे कुठे तरी थांबायला पाहीजे असे वाटते.यात प्रमुख अडसर जातीव्यवस्थेचा आहे हे मान्य.तरुण तरुणींनी ही असली रानटी पद्धत फाट्यावर मारुन सर्रास लव मॅरेज करावे.ज्यांच्यात गट्स नाहीत व जातीतच लग्न करायचे आहे अश्यांनी फक्त एक्सक्लुजीव तरुण तरुणीचे मेळावे भरवावेत ,तिथे कटाक्षाने म्हातारी खोंड असु नयेत.अश्या मेळाव्यांद्वारे मैत्री व्हावी ,पुढे आपआपल्या पसंतीच्या मुला मुलीशी आपणच जमवावे व मग लग्न करावे.हे मला जास्त संयुक्तीक वाटते. आपल्याला काय वाटते??

प्रतिक्रिया द्या
13888 वाचन

💬 प्रतिसाद (58)
ब
बोका-ए-आझम Mon, 12/12/2016 - 04:47 नवीन
टफीभौंचा भडास टच आहे. गेल्या काही दिवसांपासून फक्त भडास काढताहेत. मिडास टचने कुठलीही गोष्ट सोन्याची व्हायची. इथे या भडास टचने गंभीर मुद्देही हास्यास्पद होताहेत.
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Mon, 12/12/2016 - 09:06 नवीन
माझ्या चुलत भावासाठी मुलगी बघायला गेलो होतो तेव्हाहि थोडेफार असे जाणवत होते. वधू-वर मेळाव्यात गेलो होतो पण तोही प्रकार काही पचला नाही. आमच्यावरही सध्या तीच वेळ येणार आहे. सध्या परदेशात असल्याने ठीक आहे...पण परत आल्यावर हि फालतुगिरी करायची अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे काही झाले तरी ह्या बघण्याच्या कार्यक्रम फाटा देण्याचे ठरवले आहे. बघूया किती यशस्वी होतो त्यात ते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 09:37 नवीन
वधुवर मेळाव्याचा अनुभव सांगा की राव. अरेंज मॅरेज करत असाल तर कितपत फाटा देउ शकाल याबद्दल साशंकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ
प
पाटीलभाऊ Mon, 12/12/2016 - 09:53 नवीन
वधुवर मेळावा मला एकप्रकारचा बाजारच वाटला... :( म्हणजे जे कोणी उपवर मुले-मुली असतील त्यांनी स्टेजवर जाऊन आपली माहिती द्यायची...एकंदरीत स्वतःची जाहिरात करायची. त्यानंतर जर त्यातून कोणी आवडलं तर तिथे आजूबाजूला बसलेले मुलं-मुली आणि त्यांचे पालक वधुवर सूचीमध्ये त्यांची माहिती बघतात आणि मग पुढची प्रक्रिया सुरु होते.(सूची हि अशी पुस्तिका ज्यात सगळ्या उपवर मुला-मुलींची माहिती असते.) मी मेळाव्यात गेलो होतो...पण तो प्रकार न पचल्याने स्टेजवर गेलो नाही.
अरेंज मॅरेज करत असाल तर कितपत फाटा देउ शकाल याबद्दल साशंकता आहे.
हो तेही आहेच. पण एक ठरवलं आहि कि...बघण्याचा कार्यक्रम करण्याआधी जी कोणी मुलगी असेल तिला १-२ वेळा बाहेर भेटून सविस्तर चर्चा करायची आणि जर दोघांना एकमेकांसोबत कम्फर्टेबल (मराठीत योग्य शब्द सुचला नाही) वाटलं तरच मग पुढची बोलणी करायची. जेणेकरून जेव्हा बघायला जाणार तेव्हा आधीच भेटलेले असल्याने टफीभाऊंनी सांगितल्याप्रमाणे तरी मुलीची अवस्था होणार नाही. सध्या तरी हाच विचार आहे. अजून कोणाकडे काही चांगले पर्याय असतील तर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 10:52 नवीन
आपला विचार उत्तम आहे. पण वर अफगाण जिलेबी म्हणतात तसे हे बाहेर भेटतांना अमुक-तमुकने पाहून मुलीच्या चारित्र्याबद्दल गहजब केला तर? लग्न व इतर कौटुंबिक कार्यांमधे लग्नोत्सुक मुला-मुलींची उपस्थिती असली तर जरा अनौपचारिक वातावरणात ओळखी-पाळखी होऊन गोष्टी पुढे सरकतात-सरकू शकतात. सामान्यपणे असे होत असावे. तरी घरी दाखवण्याचे कार्यक्रम होतात, एकमेकांना भेटणे, समजून घेणे, आवडनिवड, प्रेफरेन्सेस जाणून घेणे हे घरी पूर्वग्रहरहित वातावरणातसुद्धा होऊ शकतं. पण वर लेखात जे वातावरण सांगितलंय ते असू नये असे वाटते. जाऊ दे, आपण खूप आदर्शवादी बोलतो. प्रत्यक्षात असे काही घडेलच असे नसते. वस्तुकरण फक्त मुलींचेच होते असे नाही. मुलांनाही भोगावं लागतंच. साहना यांनी सांगितल्याप्रमाणे ही बाजारव्यवस्था आहेच, आयदर ब्रेक इट ऑर गेट अलॉन्ग विद इट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ
प
पाटीलभाऊ Mon, 12/12/2016 - 11:10 नवीन
पण वर अफगाण जिलेबी म्हणतात तसे हे बाहेर भेटतांना अमुक-तमुकने पाहून मुलीच्या चारित्र्याबद्दल गहजब केला तर?
अण्णा आपण दुसऱ्यांची मानसिकता बदलू शकत नाही... :(
जाऊ दे, आपण खूप आदर्शवादी बोलतो. प्रत्यक्षात असे काही घडेलच असे नसते.
हो हीच तर आपली अडचण असते...आपण समोरच्या व्यक्तीकडूनसुद्धा तसेच आदर्शवादी विचारांची अपेक्षा ठेवतो :D वैतागवाणं काम आहे हे सगळं...बऱ्याच वेळा तर विचार येतो...ह्या लग्ना-बिग्नाच्या फंद्यात न पडलेलंच बरं...एकटा जीव सदाशिव...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सप्तरंगी Mon, 12/12/2016 - 16:18 नवीन
वस्तूकरण / बाजारीकरण , लग्नाचा बाजार हे शब्दच लग्नाचे बाजारीकरण करतात. काय वाईट आहे arrange marriage मध्ये, तुम्ही एकाच दृष्टिकोनातून बघताय म्हणुन तुम्हाला तसे वाटत असेल. मुलगाच मुलगी पाहायला जातो असे काही नाही मुली पण मुलांच्या घरी मुलगा पाहायला ( खर तर घर, घरातील लोक , मुलगा यांना भेटायला ) जातात. मग तेंव्हा काय मुलगा बाजारात ठेवलेली वस्तू आहे असे म्हणाल का? नाही कारण असे 'शब्द पाडणे' अजूनही फक्त मुलींच्या बाबतीतच केले जातात. practically काय सोईचे असेल याचा विचार नाही केला जात. २० वर्षांपूर्वी मी ५-६ मुलांना पाहायला गेले , खर तर भेटले (हो हाच शब्दप्रयोग चपखल बसतो कारण आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो) तेंव्हाही वस्तूकरण / बाजारीकरण अशी भावना नव्हती. मनात होते ते एवढेच कि जर प्रेमविवाह शक्य नाही तर हाच मार्ग योग्य आहे, आणि ओळख नसलेल्या व्यक्तीला कुठे बाहेर भेटण्यापेक्षा secured वातावरणात आई-वडिलांसोबत भेटणे , तिथेच थोडे वेगळे भेटणे योग्य. तेंव्हाही कधी चहा-पोहे घेऊन गेले नाही, आजकालहि कुणी अशा चहा-पोहे घेऊन जायच्या प्रथा पळू नयेत. आणि बिनधास्त मुलगा- मुलगी भेटण्याच्या (बघण्याच्या नव्हे ) प्रथा प्रथमतः घरापासूनच सुरु ठेवाव्यात असे वाटते, अर्थात स्वतःचा स्वतः ठरवू शकत नसाल तर !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 12/13/2016 - 18:45 नवीन
एवढे लेख, प्रतिसाद लिहिले, वाचले तर हा ही एक वाचून घ्या.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा