वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?
वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?
मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तसेच काही दोषसुद्धा आहेत
आपल्याला जर एखादी वस्तू विकायची असली तर आपण काय करतो? त्या वस्तूला सजवून मांडतो, त्यातले दोष झाकून असलेले अन नसलेले गुण वर्णन करून सांगतो. वधू वर परीक्षणाचही असंच आहे. ही निवडप्रक्रिया बऱ्याचअंशी दिखाव्यावर आधारीत असते. शिवाय पहायला गेल्यावर मुलगा अन मुलगी फक्त पाच ते दहा मिनीटं समोरासमोर असतात. अन तेवढ्या भेटीवरच लग्नाचे निर्णय घेतले जातात. एकमेकांचे स्वभाव कळण्याचा प्रश्नच नाही.
यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.
मला पडलेला गहन प्रश्न असा आहे की वरील परिस्थितीवर काही उपाय शक्य आहे का जेणेकरून ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही याची थोडी तरी चाचपणी करता येईल? मत,कल्पना, सल्ला, अनुभव ?
यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.) घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.मुलं सुद्धा मुली पटवायला स्वतःची इमेज आदर्श पतीसारखीच दाखवतात. ते वाइसवर्सा आणि नॉर्मल आहे. कारण एकमेकांना इंप्रेस करु शकले नाहीत तर विषय तिथेच संपतो.मला घरच्यांनी आणि नातेवईकानी सुचवलेल्या मुलींना भेटून त्यातली जी आवडेल तिच्याशी लग्न करायच आहे. माझा प्रश्न फक्त पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि त्यात काही सुधारणा शक्य आहे का या बाबतीत आहे.लग्न ठरवून करा की प्रेम करुन शेवटी तुम्हाला माणसाची पारख काय आहे यावर वैवाहिक यश अवलंबून आहे. आणि ते बव्हंशी केवळ तुमच्यावरच डिपेंडंट आहे. ती तशी आहे म्हणून आमचं जमत नाही ही पश्चात बुद्धी कायम निरुपयोगी आहे, मग तो विवाह पहिला असो की पाचवा. आणि ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही मग तो एका आठवड्यापूर्वी झाला असो की काही दशकांपूर्वी. एकच करा, भेटीमधे प्रश्नोत्तरांचा तास घेण्यापेक्षा तिच्या सहवासात आपण रमतो की नाही हे पाहा. जीचा सहवास हवाहवासा वाटेल तिला एकदाच आपली म्हणा आणि मग मागे वळून पाहू नका, कोणताही अॅनॅलिसिस करायच्या भानगडीत पडू नका. तुमचं वैवाहिक जीवन मजेचं होईल."पदरी पडलं, पवित्र झालं"यात मागच्या पिढ्यांचा नाईलाज दिसतो. जे आहे ते ओढण्याची भावना (दोन्ही कडून) दिसते. त्यात मजा नाही.ती कशीही असली तरी माझी आहेयात आपल्या सिलेक्शनचा गौरव आहे. तिच्यात काही तरी भावलं आहे जे शब्दांच्या पलिकडे आहे आणि ते शेवटापर्यंत वर्णन करता येणार नाही. मतभेद आहेत पण ते पदरी पडलं म्हणून अॅडजेस्ट केलेले नाहीत. त्यावरनं नेहमी वादंग होतील पण एकमेकांच्या सहवासाची खुमारी त्यांना पार करुन जाईल हा विश्वास आहे. आणि तो दोघांनाही एकमेकांबद्दल आहे.जुळवून घ्यायची इच्छा प्रबळ असणे म्हणजे संक्षींच्या भाषेत तिला आपले म्हणणे होय.एकमेकांच्या सहवासात मस्त वाटणं हा फॅक्टर आहे. त्याची कारणमिमांसा होऊ शकत नाही. तो एक फील आहे. एकदा तो फील आला की मग सगळं आपोआप जुळून येतं. एकमेकांशी `जुळवून घेतलं' असा भाव दोन्हीकडे राहात नाही. ते अगदी असं आहे :पार्टीतल्या मुली सुल्तानला म्हणतात, इतकी वर्ष झाली तुझ्या पत्नीनं तुला सोडून, हर एक चिज़का एक एक्सपायरी डेट होता है.त्यावर सुल्तान म्हणतो, मॅडम, हमरे यहां लडाई झगडे होते है. लेकीन इष्कका कोई एक्सपायरी डेट नही होता !त्यावर मुली विचारतात की तिच्यात अशी काय खास बात आहे जी आमच्यात नाही ?आणि सुल्तान म्हणतो, तसं नाही. तुम्ही सगळ्या सुरेख आहात पण तिच्यात एक फिल आहे...आणि तो फक्त अनुभवता येतो!जग घूमेया थारे जैसा ना कोई |