आकर्षण, प्रेम आणि जवळीक
आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत.
हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ?
***********************************************************
पण प्रश्न पुढचा आहे. त्याची ,तिची जवळीक अधिकृतरीत्या समाजमान्य झाली. दोघांचे लग्न झाले. काही वर्षे गेलीत.. चाळीशी जवळ आली..म्हंटलं तर तरुण म्हंटलं तर थोडं वय होत आहे... आता हातात हात घेतल्याने अंगावर रोमांच उभे रहात नाहीत, त्याच्या वा तिच्या स्पर्शाने मनात हुरहुर निर्माण होत नाही... ती एक चांगली व्यक्ती आहे, तो ही चांगला आहे. एकमेकांबद्दलची काळजी आदर, प्रेम अजूनही कायम आहे. पण आधी होतं तसं जबरदस्त शारिरीक आकर्षण आता वाटत नाही (एकतर त्याला किंवा तिला..हे कुणाबद्दलही होवू शकतं पण सध्या जास्त करुन त्याच्याबद्दल लिहित आहे) ..तसं म्हंटलं तर तो अजून तरुण आहे, जवळून सुंदर , तरूण मुलगी गेली की हमखास वळून पहातो, पण पत्नीकडे पुन्हा वळून पाहावे असे वाटत नाही. ती चांगली वागते, त्याची तिच्याबद्दल काही तक्रार नाही पण तरी विशेष आकर्षण वाटत नसल्याने तो शारिरिक जवळीक फारशी करत नाही. असं करुन आपण तिच्यावर अन्याय करतो आहे असंही त्याला वाटतं , पण शरीराने ओढ दिल्याशिवाय जवळीक करण्यात त्याला रस वाटत नाही. तो दुसर्या स्त्रीशी जवळीक करतो आहे असंही नाही. पण तरी त्याची-तिची बराच काळ जवळीक होत नाही.
प्रत्येक लग्नात (किंवा तत्सम दीर्घकालीन स्त्री-पुरुष संबंधात) हे असं (एका बाजूने अथवा दोन्ही बाजूने ) होत असावं का ? यावर उपाय काय ? आहे तसं चालू द्यावं का ? की शरीराने ओढ दिली नसतानाही स्वतःच्या शरीराला जवळीक करण्याची आज्ञा देत रहावं का ?
हा विषय तुम्हाला महत्वाचा वाटतो का ? मला वाटतं हा विषय बहूधा कधी मिपावर चर्चिला गेला नसावा. बहूधा कुणाला स्वतःचे अनुभव सांगणे प्रशस्त वाटणार नाही पण जनरिकली चर्चा होवू शकते.
त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये.इतक्या रिबाऊंड पद्धतीनं चर्चा निरस होते. आणि जनरल विचार मांडणं म्हणजेच रेनकोट घालून आंघोळ !मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा.१०० !खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं.१,००० !आता कदाचित नवर्याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो...१०,००० !तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना,.....लावली ना वाट नेमका मुद्दा पकडून ! गेली आता जेनरिक मजा, झाला व्यक्तिगत प्रश्न !!