PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली.
त्यानंतर हा उठलेला गदारोळ !!
PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ?
ह्या राम सुब्रमण्यंम चे काम :
While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory.
Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party.
गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.
म्हणजे मोदिजींनी जे केलं (शपथविधीला आमंत्रण, 'पाकड्यांच्या' प्रधानमंत्र्याला सरप्राइज व्हिजिट देणं इ.) ते सगळं शेखमहंमदी मूर्खपणा होता?"मित्रत्वाची पुरेशी संधी देऊन नंतर दुसरा कोणताच उपाय बाकी राहीला नाही म्हणून कडक उपाय सुरू केले आहेत" असे जगापुढे सिद्ध करावे लागते. युद्ध/सामरिक कारवाई करताना आणि त्यानंतर, आपल्या बाजूने महत्वाचे देश असावेत किंवा कमीत कमी ते तटस्थ तरी असावेत यासाठी आवश्यक मुत्सद्देगिरी असते. असे काही सर्वमान्य मानदंड महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही पाळावे लागतात. म्हणूनच कोणतेही युद्ध किंवा सामरिक कारवाई करण्याअगोदर अमेरिका युएनचा आधार घेते. जर मोदींनी तसे करून, "खूप प्रयत्न करूनही पाकिस्तान सुधारत नाही" हे जगासमोर सिद्ध न करता ताबडतोप कडक कारवाया केल्या असत्या तर आता आंतारराष्ट्रीय राजकारणात पाकीस्तान जितका एकाकी पडला आहे ते झाले नसते. आज पाकीस्तानचे आंतरराष्ट्रीय मंचावर पाठींबा देईल असा (भारतविरोधी हितसंबंधांस असलेला) चीन सोडून इतर कोणही देश नाही. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर एकाही देशाने भारताला आक्रमक म्हटले नाही. हे झाले देशाबाहेरील पाठींब्याचे. देशांतर्गत पाहिले तर, पाकिस्तानला पुरेशी संधी न देता, मोदींनी कडक धोरण सुरू केले असते तर भारतातले विरोधी पक्ष गप्प बसले असते का ? आधिपासूनच ते मोदींना हिटलर, आक्रमक एकाधिकारशहा, इ म्हणतच होते, त्यांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असते आणि... मोदींना विरोध करताना पाकिस्तानला मदत होत आहे का, याचा विचार केला जात नाही हे तर आपण दिवसगणिक नवीन उदाहरणात पाहत आहोतच. राजकारण साध्या सोप्या सरळ लॉजिकने चालत नाही, ते करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वस्तूस्थितीचा विचार करावाच लागतो. ते दोन्ही बाजूंना समान असलेल्या खेळाच्या लॉजिकल नियमांनी बांधील नसते. ते प्रत्येक देशाचे हितसंबंध आणि काही सर्वमान्य दंडक यांच्या क्रमांतरण आणि संयोजन (permutation and combination) यावर चालते. देशातील आणि देशाबाहेरील विरोधक, संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल त्याप्रमाणे, पाय ओढायला टपलेले असतातच. त्यांना जरूर ते, जरूर तसे उघड व छुपे शह द्यावेच लागतात. मोदींचे वर्तन हा त्याचा भाग होता, हे आता त्याचे जागतिक परिणाम समोर आले असताना, मानायला हरकत नसावी.रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा देऊन कोणाचे भले झाले म्हणा ?हे मात्र वट्ट खरे आहे ! एफटीआयआयमधले विद्यार्थीही दोन वर्षांचा अभ्यासक्रम ९-१० वर्षे करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे आणि त्या वाढीव काळासाठी त्यांना शिष्यवृत्ती वाढवून मिळत होती असे मागे उघड झाले आहेच ! :)