Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयटी कंपन्यांची मग्रुरी

ए
एकुलता एक डॉन
गुरुवार, 06/15/2017 - 18:11
🗣 111 प्रतिसाद
तसे आयटी वर भरपूर धागे आहेत पण हा धागा प्रासंगिक आहे एक महिन्या आधी विप्रो वगैरे कंपन्या ५६००० हुन जास्त लोकांना काढणार http://www.livemint.com/Industry/4CXsLIIZXf8uVQLs6uFQvK/Top-7-IT-firms-including-Infosys-Wipro-to-lay-off-at-least.हटमळ आज मात्र नवीन कंपन्या विकत घेत आहेत http://www.wipro.com/newsroom/press-releases/Wipro-to-acquire-Appirio-A-global-cloud-services-company/ कायदेशीर दृष्ट्या ,अर्थ शाश्त्र दृष्ट्या चालत असले तरी हा प्रकार दुभती गाय दूध काढून कत्तल खाण्याकडे टाकायची व पोपट पाळायचा असे नाही वाटत ?

प्रतिक्रिया द्या
42495 वाचन

💬 प्रतिसाद (111)
आ
आदूबाळ Fri, 06/23/2017 - 07:39 नवीन
तुमचे अनुभव माझ्या पेक्षा वेगळे असल्याने, तुमची मते वेगळी असणे पण स्वाभाविकच आहे.
सहमत आहे. म्हणून तुमच्या अनुभवातून जन्म घेतलेल्या तत्वांबरहुकूम तुमच्या मुलाला वागायला लावणं पटलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अभ्या.. Fri, 06/23/2017 - 07:44 नवीन
सल्ले मुलाला देण्यापेक्षा त्याला त्याचे स्वतःला काय येते अन काय करायचे ह्याचा विचार करायला पात्र करायला हवे.
वई तो कय रिया मई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अप्पा जोगळेकर Fri, 06/23/2017 - 10:08 नवीन
कशाकरता स्थिर नोकरी पाहिजे. त्याने शैथिल्य येते उगाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/22/2017 - 15:56 नवीन
या विषयात अनेक मुद्दे आहेत. काही वर मांडले गेले आहेत तर काही नाहि. मी आता एकच मुद्दा मांडू इच्छितो. ज्या कंपन्या मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कमी करत आहेत त्य स्वतःचेही नुकसान तर करुन घेत आहेत आणि एका दुष्टचक्रात स्वतःला अडकवत आहेत असे मला वाटते. म्हणजे असे की एखादी कंपनी (उदा: विप्रो) मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कमी करत असेल तर एखादा अनुभवी व्यक्ती विप्रोत जाण्यापुर्वी दहावेळा विचार करेल , गरजेच्या वेळेला विप्रोला लवकर योग्य गुणवत्ता असणारे कर्मचारी मिळणे कठीण होईल. मग त्यातून मार्ग म्हणजे मार्केटपेक्षा जास्त वेतन द्या.. म्हणजे मग जॉब सिक्युरिटीची रिस्क आहे तर रिस्कसाठी अधिक प्रिमियम म्हणून काही लोक विप्रोत येतील. पण याने विप्रोची ARC (average resource cost) वाढेल. त्यामुळे गिर्‍हाईकाला ते भाव वाढवणार, परिणामी त्यांची स्पर्धात्मकता कमी होणार, परिणामी त्यांना मिळणारे काम कमी होणार, परिणामी पुन्हा कर्मचारी कपात.... आणि पुन्हा नवीन कर्मचार्‍यांना आकर्षित करण्याकरता मोठाले पगार. बघा पटतंय का ?
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 06/22/2017 - 16:24 नवीन
उपयुक्तता नसलेले कर्मचारी कमी केल्यास ते वेतन उपयुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडे वळवता येईल. वेतन सुधारल्यास नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे शक्य होईल. अनुपयुक्त असल्यास नोकरीवरून कमी करण्याची शक्यता असल्याने कर्मचारी reskill होण्याचा किमान प्रयंत्न करतील. आणि हेच तत्त्व बऱ्याचशा कंपन्यांनी अवलंबल्यास वेतन फुगवटा होणार नाही. लिन प्रोसेसेस मध्ये अनुपयुक्त गोष्टी काढूनच टाकायच्या असतात. अर्थात वरील कपात हि केवळ उपयुक्तता या एका मुद्द्यावर असल्यास हे सर्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Fri, 06/23/2017 - 14:33 नवीन
उपयुक्तता कशी ठरते ? एखादा कर्मचारी .Net वर काम करत होता तो प्रोजेक्ट आता संपला , .Net चे आणखी प्रोजेक्ट नाही, त्याला जावा येत नाही म्हणून तो उपयुक्त राहिला नाही असे नसते. जो कर्मचारी मनापासून काम करत नाही, बेजबाबदारपणे वागतो, नवीन शिकण्याची इच्छा नाही, टीमसोबत नीट मिसळून काम करत नाही ई आणि समज देवूनही त्याच्यात सुधारणा होत नाही अशा कर्मचार्‍याला जरुर काढावे. अजून लिहिण्यासारखे आहे या मुद्यावर, नंतर पुन्हा लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
थ
थॉर माणूस Wed, 07/12/2017 - 21:29 नवीन
सपोर्टचे वा मेंटेनंसचे काम करणार्‍या कंपन्यांना कधी कधी हायर एन्ड फायर पॉलिसी सोयीची वाटते. आपल्याकडे नव्या दमाच्या इंजिनीअर्सची कमतरता नसते. मग काही वर्ष जुने आणि स्कील फारसे न बदललेले कर्मचारी काढून तिथे नवे स्वस्त कर्मचारी येतात. प्रॉडक्ट किंवा रीसर्च ओरिएंटेड कंपन्यांना असे करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/13/2017 - 12:16 नवीन
इंजिनिअर्सची कमी नसते हे जरी खरं असलं तरी जॉब बदलताना कर्मचारी पगारवाढ मिळेल हे बघतातच आणि ज्या कंपनीत जॉब सिक्युरिटी कमी तिथे जॉईन करायचे असेल तर जास्त हाईक मागतात किंवा जॉईन करतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
द
दादा कोंडके गुरुवार, 06/22/2017 - 16:49 नवीन
'नोकरी म्हणजे गुलामगिरी, स्वतः स्वतःचे मालक व्हा' या आशयाची यलायशीची अतिशय भंपक जाहिरात आहे. वास्तविक ही एजंट लोकं अतिशय लाळघोटे असतात. मागे यलायशी आणि आरटिओ चा एजंट असलेल्या माझ्या मित्राने या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे (संपादित)
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 06/23/2017 - 07:44 नवीन
धन्यवाद संमं.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 05/18/2021 - 14:56 नवीन
धन्य वाद
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा