ताज्या घडामोडी: भाग ७
राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे.
मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत.
पुढच्या फेर्यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.
कारण सरकारच्या प्रत्येक कृतीचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करणारा हा सेनेचा एकमेव नेता होता.असहमत. आजतगायत राणेंचा 'अभ्यासपूर्ण' (!) प्रतिवाद दिसलेला नाही. मागील वर्षी राणे विधानपरीषदेत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका करणारे व अनेक आरोप करणारे एक जोरदार भाषण केले होते. त्यातील बहुसंख्य आरोप निराधार होते. त्या भाषणानंतर इतर विरोधी पक्षनेत्यांनी वाहिन्यांवरील चर्चेत सांगितले होते की राणेंच्या भाषणाचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला कारण महत्त्वाच्या गंभीर विषयांवर बोलायचे सोडून ते निराधार आरोप करीत होते व ते आरोप मंत्र्यांनी लगेच आकडेवारीसहीत खोडून काढल्यामुळे विरोधकांची विश्वासार्हता कमी झाली आहे. राणे विरोधी पक्षनेता असताना १९९९ ते २००२ अशी लागोपाठ ३ वर्षे राज्याचे अंदाजपत्रक सादर झाले की भरपूर आकडेवारी देऊन त्या अर्थसंकल्पाची चिरफाड करणारा जवळपास एक पूर्ण पानी अभ्यासू लेख 'लोकसत्ता'मध्ये त्यांच्या नावाने प्रसिद्ध होत होता. तो लेख एखाद्या अनुभवी अर्थतज्ज्ञाने लिहावा इतका सविस्तर व अभ्यासू असायचा. राणेंसारखा फारसा न शिकलेला माणूस इतका अभ्यासू लेख लिहू शकेल का याविषयी सुरवातीपासूनच संशय होता. त्या लेखाचा खरा लेखक कोणतरी वेगळाच होता अशी वदंता होती. २००३ पासून तसा लेख प्रसिद्ध होणे बंद झाले. हा माणूस खरोखरच अभ्यासू असता तर त्यांच्याकडून सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर असे लेख आले असते. मुळात राणे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेना नेत आणि अभ्यास यांच्या ३६ चा आकडा आहे हे आजही दिसून येते. फुशारक्या, भावनिक मुद्दे, गुंडगिरी यापलिकडे सेना नेत्यांची मजल जात नाही. अभ्यास, चिंतन, विचार करणे इ. यांच्या कक्षेत येत नाही. राणेंनी अशा पक्षात आयुष्यातील बराच काळ घालविलेला आहे. काँग्रेसवासी झाल्यानंतरही या संस्कारात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण प्रतिवाद वगैरे निव्वळ गफ्फा आहेत.ते भाजपत परत जाणार नाहीत असे म्हणाले आहेत. मला वाटते की १९९९ चा अनुभव लक्षात घेऊन वाघेला भाजपमध्ये परत आल्यापेक्षा स्वतंत्रपणे लढले तर काँग्रेसचे जास्त नुकसान करतील असे वाटून अमित शहांनी त्यांना निवडणुका होईपर्यंत थांबायला सांगितले असावे.देवेगौडा, पवार, केशुभाई पटेल अशा इतर अनेक नेत्यांप्रमाणेच वाघेला is a spent force. त्यांचे राजकीय जीवन आता जवळपास संपुष्टात आले आहे. ते आता काँग्रेसमध्ये राहिले किंवा काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात गेले किंवा स्वतःचा वेगळा पक्ष काढला तरी कोणत्याही पक्षाला फारसा फायदा/तोटा होणार नाही व त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. काँगेसने मुळात गुजरातमध्ये १९९५ नंतर नवीन नेतृत्व आणण्यासाठी जवळपास काहीच केले नाही. कधी वाघेला, कधी माधव सोळंकी (आणि नंतर भरत सोळंकी), कधी केशूभाई पटेलांना गुपचुप पाठिंबा इ. वरच काँग्रेस विसंबून राहिली. भाजपच्या हिंदु कार्डला उत्तर म्हणून काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळून पाहिले. परंतु त्याचा उपयोग शून्य झाला. चिमणभाई पटेलसारख्या खमक्या नेत्यानंतर काँग्रेसला आजपर्यंत तिथे योग्य नेता मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे.त्यावर सामनात लिहिताना बाळासाहेबांनी 'तशीच वेळ आली तर हल्लेखोर ज्या रंगाचा असेल तो रंग हिंदुस्तानातून मिटवून टाका' असे म्हटले होते.याचे मी ऐकलेले वर्जन असे आहे की "ज्या रंगाची गोळी माझा वेध घेईल तो रंग हिंदूस्थानातून मिटेल" तुम्ही म्हणत आहात त्या वाक्यामध्ये आवाहन आहे तर मी म्हणतो आहे त्यात त्यांनी (त्यांच्या अनुषंगाने) वस्तुस्थिती मांडली होती, जी किमान महाराष्ट्राच्या बाबतीत खरी होती. अगदी रंग नामशेष झाला नसता पण दंगली नक्की झाल्या असत्या.