Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी: भाग ७

ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 07/20/2017 - 10:11
🗣 172 प्रतिसाद
राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे. मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत. पुढच्या फेर्‍यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
36191 वाचन

💬 प्रतिसाद (172)
ग
गामा पैलवान Wed, 07/26/2017 - 17:12 नवीन
शिवसेनेचं नाव आलं आणि तुमचा प्रतिसाद नसेल तर दिवस खराब जातो आमचा. उगीच सूर्य पश्चिमेस उगवल्याचा भास होतो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/26/2017 - 17:34 नवीन
त्यासाठी आमच्या प्रतिसादाची गरज नाही. तुमचा मुक्काम भारताच्या पश्चिमेला असल्याने तुमच्या ठिकाणी सूर्य पश्चिमेलाच उगवणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 07/26/2017 - 19:03 नवीन
गुरू, हो जाव शुरू! तुमचं हेच तर्कट आम्हांस फार्फार आवडतं :
तुमचा मुक्काम भारताच्या पश्चिमेला असल्याने तुमच्या ठिकाणी सूर्य पश्चिमेलाच उगवणार.
आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/27/2017 - 07:38 नवीन
आता काय सुरू करणार? 'सामना' केव्हाच संपला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/27/2017 - 09:49 नवीन
फारंच 'मार्मिक' टिपणी हो तुमची. 'पांचजन्या'चं 'प्रबोधन'च जणू. फक्त इतक्या लवकर हार नका मानू. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/27/2017 - 10:40 नवीन
काय हे न. गा. पै.! हार कशी काय मानणार? मी 'सामना' कधीच जिंकलाय. आज तुमच्या उधोजींचा प्रकटदिन असला तरी उधोजींसारखंच बोललं पाहिजे असं नाही. आ. न. - उ. श्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/27/2017 - 14:44 नवीन
सामना जिंकल्याची आगाऊ जाहिरात करणे ही उद्धवगिरी नाहीका? असो. तुमच्याकडे वारंवार 'प्रहार' करण्याचा 'स्वाभिमान' नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/27/2017 - 16:22 नवीन
आगाऊ जाहिरात कसली? 'सामना' केव्हाच संपला आहे. आम्ही पराभुतांवर 'प्रहार' करीत नाही. तो शिवसेनेवरील धागा जरा वाचा म्हणजे समजेल. आ. ऊ. - श्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 गुरुवार, 07/27/2017 - 12:37 नवीन
तुमचं त्यांना इतकं ताणणं तुमच्या आजपर्यंतच्या इंप्रेशन्च्या विपरित वाटलं गामाजी. कि यारि दोस्ती मे चाललंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 15:15 नवीन
बहुदा थोड्या वेळात एक चांगलि बातमी असेल बिहार मधुन.....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/26/2017 - 15:21 नवीन
नितीश कुमारांनी राजीनामा दिला. "नौटंकी" याशिवाय दुसरा शब्द वापरता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 15:32 नवीन
गुर्जि नौटंकी नाहि आहे, मला तरी नाहि वाटत. अजुनहि नितिशकुमार बोलताहेत मिडीया सोबत. अक्षरश: कपडे फाडले आहेत त्यांनी सो कॉल्ड महागठबंधन चे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/26/2017 - 17:33 नवीन
लालूच्या मुलाने नोव्हेंबर २०१५ नंतर भ्रष्टाचार केलेला नाही. लालू व त्याचे सर्व कुटुंबीय खूप पूर्वीपासून भ्रष्टाचार करीत होते. परंतु २०१५ मध्ये लालूशी युती करून लालूला मिठ्या मारताना नितीशकुमारांना त्यात काहीही वावगे वाटले नव्हते. २०१३ व २०१४ मध्ये आपले अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी महाभ्रष्टाचारी लालूचा पाठिंबा घेताना त्यांना अजिबात संकोच वाटला नव्हता. मग आज अचानक त्यांना भ्रष्टाचाराविरूद्ध जाण्याची का गरज भासली? आज तेजस्वी यादवचे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने व त्यांमुळे त्याने राजीनामा द्यावा ही मागणी लालूने अमान्य केल्यामुळे आपली प्रतिमा उंचाविण्यासाठी नितीशकुमारांनी ही राजीनाम्याची नौटंकी केली आहे. तेजस्वीला मंत्रीमंडळातून हाकलणे त्यांना सहज शक्य होते. तसे केले असते तर लालूने पाठिंबा काढून घेतला असता व तसाही त्यांना राजीनामा द्यावाच लागला असता. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राजीनामा द्यावाच लागणार आहे. त्यामुळे सत्ता सोडल्याचे नाटक करून आपण भ्रष्टाचाराविरूद्ध आहोत अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठीच हे नाटक आहे. परंतु हे करताना पुन्हा एकदा नितीशकुमारांची खेळी चुकली आहे. २०१३ मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा मोदींवर सोपविल्यानंतर नितीशकुमारांनी तडकाफडकी भाजपशी संबंध तोडून राजद व कॉंग्रेसची मदत घेऊन आपले अल्पमतातील सरकार वाचविले होते. भाजपशी संबंध तोडून टाकण्याची खेळी म्हणजे दुर्री मारण्यासाठी हातात असलेल्या हुकुमाचा एक्का टाकून देण्यासारखे होते. जी चाल सर्वात शेवटी करायला हवी होती तीच चाल त्यांनी सगळ्यात पहिली चाल केल्याने नंतर करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. त्याचाच फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसून लोकसभा निवडणुकीत संजदचे ४० पैकी फक्त २ खासदार निवडून आले होते. मोदींची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपशी तडकाफडकी संबंध न तोडता रालोआतच राहून मोदींना आपला विरोध सुरू ठेवायला हवा होता. त्यामुळे भाजपवर दबाव कायम राहिला असता व त्यांची तडजोडीची ताकद वाढली असती. ते न करता थेट संबंध तोडून टाकल्याने भाजपला रान मोकळे मिळाले. त्यावेळी अडवाणींनी देखील हीच चूक केली होती. नितीशकुमारांनी आता कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली दिसते. राजीनाम्याचे नाटक करून आपली प्रतिमा उजळून घ्यावी व २०-२१ महिन्यानंतर होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी आपण विरोधकांचा केंद्रबिंदू असावे हा एक हेतू त्यामागे असावा. दुसरी शक्यता अशी आहे की डोईजड झालेल्या लालूशी संबंध तोडल्याने भाजप आता आपल्याला स्वतःहून पाठिंबा देईल व त्यायोगे आपले सरकार वाचू शकेल असाही त्यांचा विश्वास असावा. समजा मुदतपूर्व निवडणुक झाली तर आपल्या उजळलेल्या प्रतिमेमुळे आपल्याला फायदा होईल असेही गणित असावे. परंतु यात धोकेही आहेत. लालूकडे ८० व काँग्रेसकडे २७ आमदार आहेत. दोघांचे एकत्रित १०७ आमदार आहेत. बहुमतासाठी त्यांना फक्त अजून १५ आमदार हवे आहेत. लालूने काही अपक्ष आमदार गोळा केले व संजदमधील ९-१० आमदार फोडले तर लालू व काँग्रेसचे एकत्रित सरकार येऊ शकते. दुसरा धोका असा की आता भाजप बिनशर्त पाठिंबा न देता आपल्या अटींवर पाठिंबा देईल ज्या संजदशी जाचक असू शकतील. अशा परिस्थितीत भाजपच्या अटी मान्य करून सरकार वाचवायचे का हा प्रश्न उभा राहील. समजा मुदतपूर्व निवडणुक झाली तर संजदला स्वबळावर किंवा जास्तीतजास्त काँग्रेसबरोबर युती करून निवडणुक लढवावी लागेल. बिहारमध्ये सर्वांच्या मतपेढ्या भक्कम आहेत. लालूकडे १८% मतांची भक्कम मतपेढी आहे. संजदची मतपेढी १६-१७% च्या पुढे जात नाही. काँग्रेसकडे अजूनही ६-७% मते आहेत. भाजप आघाडीकडे किमान ३४% मते आहेत. संजदने अगदी काँग्रेसशी युती करून निवडणुक लढविली तरी त्यांची मतसंख्या २३-२४% मतांच्या पुढे जात नाही. अशा परिस्थितीत भाजपला बहुमत मिळेल. त्यामुळे भाजपला चुचकारून भाजपच्या कमीतकमी अटी स्वीकारून सरकार चालविणे हाच मार्ग योग्य वाटतो. एक शक्यता अशी आहे की सत्ता गमाविण्याच्या भीतिने लालू तेजस्वीला राजीनामा द्यायला लावून व त्या बदल्यात काहीतरी नवीन मिळवून पुन्हा एकदा संजद + राजद + काँग्रेस हे सरकार नव्याने सुरू होईल. मला तरी हा शेवटचा पर्यायच प्रत्यक्षात येण्याची सर्वाधिक शक्यता वाटते. भाजपने मात्र स्वतःहून नितीशकुमारांना पाठिंबा द्यायची अजिबात घाई करू नये. स्वतःचे पत्ते अजिबात दाखवू नयेत. समजा पुन्हा एकदा नितीशकुमारांशी युती करण्याची वेळ आली तर ती २०१३ पूर्व अटींवर न करता नव्या अटींवर युती करावी ज्यात भाजपचे स्थान मोठ्या भावाचे असेल. भाजपने १९८९ मध्ये फारसा जनाधार नसलेल्या शिवसेनेशी युती करताना शिवसेनेला मोठ्या भावाचे स्थान देऊन तब्बल २५ वर्षे स्वतःची फरपट होऊन दिली होती. तीच चूक भाजपने २००० मध्ये संजदबरोबर जागावाटप करताना केली. भाजपच्या तुलनेत संजदचा जनाधार कमी असताना सुद्धा भाजपने लोकसभेसाठी भाजप १५ व संजद २५ आणि विधानसभेसाठी भाजप १०२ व संजद १४१ असे विषम जागावाटप स्वीकारले होते. आता युती करायची असेल तर भाजपने किमान ५०% जागा असतील तरच युती स्वीकारावी व युतीत बरोबरीचे स्थान मिळवावे. अन्यथा आपल्या इतर मित्रपक्षांच्या बरोबरीने स्वबळावर लढावे. जर भाजपने उतावीळपणे आपले पत्ते उघड करून नितीशकुमारांना स्वतःहून पाठिंबा द्यायची घोषणा केली तर पुन्हा एकदा भाजपला संजदपेक्षा बलवान असूनसुद्धा कनिष्ठ भूमिका स्वीकारावी लागेल. भाजपने संयम दाखविला तर बिहारमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 15:33 नवीन
शालजोडी तुन हाणलय.
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Wed, 07/26/2017 - 15:57 नवीन
तु मारल्यासारखं कर मी ओरडाल्यासारखं करतो.
  • Log in or register to post comments
स
संग्राम Wed, 07/26/2017 - 16:27 नवीन
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली आहे
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/26/2017 - 17:04 नवीन
नितीशकुमार हे पक्के राजकारणी आहेत. कधी त्यांचे डावपेच यशस्वी होतात तर कधी होत नाहीत. राजीनामा देण्यामागे त्यांचा नक्की काय उद्देश आहे याविषयी माझे अंदाज लिहित आहे. नितीशकुमारांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदींनी खालील दोन ट्विट केल्या आहेतः

देश के, विशेष रूप से बिहार के उज्जवल भविष्य के लिए राजनीतिक मतभेदों से ऊपर उठकर भ्रष्टाचार के ख़िलाफ़ एक होकर लड़ना,आज देश और समय की माँग है

— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2017

भ्रष्टाचार के ख़िलाफ़ लड़ाई में जुड़ने के लिए नीतीश कुमार जी को बहुत-बहुत बधाई।
सवा सौ करोड़ नागरिक ईमानदारी का स्वागत और समर्थन कर रहे हैं

— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2017
मागे एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे नितीशकुमारांना राजदबरोबरचे संबंध तोडून भाजपबरोबर हातमिळवणी केली तर आपल्या मागे पक्ष उभा राहिल याची खात्री नव्हती. अशावेळी राजीनामा देऊन बिहार विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे असे वातावरण निर्माण करायचे जेणेकरून शरद यादव कॅम्पमधील आमदारांवर वेसण घालता येईल हा एक उद्देश असावा. त्यातून बिहारचे राज्यपाल आहेत केशरीनाथ त्रिपाठी. हे भाजपचे नेते आहेत आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनीच मागच्या वेळी जीतनराम मांझी मुख्यमंत्री असताना नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपदावर परतण्यावरून बरेच तंगवले होते. अशावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट येऊन मध्यावधी निवडणुका होतील ही एक भिती घालायची आणि त्याचवेळी मोदींकडून ट्विट आल्यामुळे भाजप नितीशकुमारांना पाठिंबा द्यायला तयार आहे असेही वातावरण उभे करायचे. म्हणजे जर भाजपचा पाठिंबा न घेता शरद यादव कॅम्पमधील आमदारांनी राजद बरोबर हातमिळवणी करायचा प्रयत्न केल्यास राष्ट्रपती राजवट लागेल ही टांगती तलवार आहेच. राजद-जदयुमध्ये परत समझौता होईल का? १९९६ मध्ये काँग्रेसला देवेगौडा नको होते म्हणून आधी पाठिंबा काढून घेतला पण सरकार पडल्यावर गुजराल यांना पाठिंबा काँग्रेसने दिला. त्याच धर्तीवर सुरवातीला राजीनामा द्यायचा आणि राजदला नमायला लावून परत तेजस्वीशिवाय सरकार स्थापन करायचे असे होईल का? ही शक्यता कमी आहे. जदयु-भाजप एकत्र न येता निवडणुका होतील का? २०१५ मध्ये राजद आणि जदयुच्या मतांची बेरीज झाल्यामुळेच या युतीला विजय मिळाला. जर जदयु आणि भाजप स्वतंत्रपणे लढले तर जदयुला स्वबळावर बहुमत मिळेलच याची खात्री नितीशकुमारांना असेल असे वाटत नाही. तसेच राजदबरोबर परत समझौता झाला तरी हे पाऊल उचलून नितीशकुमारांनी विरोधकांच्या आघाडीपासूनही फारकत घेतल्याचे चित्र आहे. सध्या मोदी विरूद्ध इतर अशा काळात दोन्ही कॅम्पमध्ये न जाता स्वतंत्र अस्तित्व ठेवायला नितीश तयार होतील ही शक्यता कमी. एकूणच पुढील काही दिवस इंटरेस्टींग असणार आहेत. जशा घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहितोच.
  • Log in or register to post comments
म
मामाजी गुरुवार, 07/27/2017 - 15:55 नवीन
मोदिंनी नितीशकुमारांचे डंकर्क केले. सर्व बाजूंनी अभूतपूर्व कोंडी करून यशस्वी माघार घ्यायला लावली. नितीशकुमारांचा राजीनामा व NDA प्रवेश ही घटना म्हणजे माझ्या अंदाजा प्रमाणे येत्या काही दिवसांत मोदि सर्व काळापैसा व भ्रष्टाचारावर मोठी कारवाई करणार असल्याची नांदी आहे. दोन दिवसां पूर्वी झालेल्या भेटीत मोदिंनी नितीशकुमारांना याची स्पष्ट शब्दात कल्पना दिली असावी व दोन पर्याय त्याच्या पुढे ठेवले असावेत. तात्काळ महागठबंधनातून बाहेर पडा व भाजपा बरोबर सरकार बनवून मुख्यमंत्री ह्वा आणि जर लालू व काँग्रेस बरोबर राहीलात तर त्यांच्याबरोबर तुमचीही राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 17:18 नवीन
समझौता होण्यापलिकडे गेलय भौ आता. 302 / हत्येचा आरोप लावतायत लालु नितीश कुमार ह्यांच्यावर ती केस सुध्दा 1991 ची आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/26/2017 - 17:24 नवीन
हत्येचा आरोप लावतायत लालु नितीश कुमार ह्यांच्यावर
हो. हा प्रकार नवीनच ऐकला आहे. एकूणच पुढे काय होईल याची उत्सुकता लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
द
दशानन Wed, 07/26/2017 - 17:39 नवीन
नितीशकुमार यांनी मोठी खेळी केली आहे क्रॉस टेबल वर! भाजपा सोबतच जावे लागेल किंवा परत निवडणुका/राष्ट्रपती राजवट!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/26/2017 - 17:45 नवीन
नितीशकुमारांनी राजीनामा द्यायच्या घटनेमुळे २०१९ मध्ये विरोधक एकत्र जरी आले तरी ती आघाडी कितपत स्थिर राहिल हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आणि त्यातूनच विरोधकांच्या प्रस्तावित आघाडीची विश्वासार्हता कमी होणार हे नक्की. एकूणच मोदी-शहा विरोधकांना एकत्र येण्याच्या फारशा संधी देत नाहियेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये रामनाथ कोविंद हा दलित उमेदवार देऊन विरोधकांमध्येच फाटाफूट घडवली. अन्यथा राष्ट्रपती निवडणुकांच्या निमित्ताने विरोधकांची मजबूत आघाडी उभी करायची प्रक्रीया सुरू झाली असती. ती संधी मोदी-शहांनी विरोधकांना मिळू दिली नाही. अशा बातम्या आहेत की केशवप्रसाद मौर्य उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि त्यांना केंद्रात मंत्री केले जाईल. याचे कारण ते सध्या फूलपूर मतदारसंघातून निवडून आलेले लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांना उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदावर कायम राहायचे असेल तर उत्तर प्रदेश विधानसभा किंवा विधानपरिषदेत जावे लागेल आणि फूलपूरची लोकसभेची जागा सोडावी लागेल. त्या ठिकाणी पोटनिवडणुक होईल तिथे मायावती उमेदवार असतील आणि समाजवादी पक्ष-काँग्रेस तिथे आपला उमेदवार उभा करणार नाही ही शक्यता आहे म्हणजे २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात सपा-बसपा-काँग्रेस युती कितपत चालते हे चाचपून बघायची संधी फूलपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मिळेल. ती संधी पण विरोधकांना मिळू द्यायची नाही हा मोदी-शहांचा उद्देश आहे अशा बातम्या आहेत. तसे योगी आदित्यनाथही गोरखपूरचे खासदार आहेत आणि तिथेही पोटनिवडणुक होईलच. पण गोरखपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातून मायावती निवडणूक लढवून पराभवाचा धोका पत्करतील ही शक्यता कमी. आणि मोदी शहांचे डावपेच जिथे कमी पडत असतील तिथे विरोधकच त्यांना मदत करत आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार ठरवायला उशीर केला ही अक्षम्य चूक विरोधकांची झालीच. आणि आता नितीशकुमारसारखा मोहरा गमावावा लागत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/26/2017 - 18:10 नवीन
संयुक्त जनता दल आणि भाजपचे आमदार आज रात्रीच राज्यपालांची भेट घेऊन नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचा दावा करणार आहेत. भाजप सरकारमध्ये सामील होणार आहे अशा बातम्या आहेत. अरे अरे अरे. पुढील फोटोतील मंडळींनी उगीचच आपले पुरस्कार परत केले म्हणायचे. Image removed. आता यापुढे नितीशकुमारांनी बिहारसाठी काहीच कसे केले नाही वगैरे विचारवंती बडबड सुरू होईल :)
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/26/2017 - 18:14 नवीन
वरील फोटो चुकून दुसराच आला आहे. त्याजागी पुढील फोटो टाकता आला तर बरे होईलः Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/26/2017 - 19:13 नवीन
उद्या शपथ घेणार आहेत नितीशकुमार अशा बातम्या आहेत. सुशील मोदीही उद्याच शपथ घेणार आहेत असं दिसतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 18:21 नवीन
२०१९ मध्ये विरोधक एकत्र जरी आले तरी ती आघाडी कितपत स्थिर राहिल हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भौ कोण कुठले विरोधक एकत्र येणार ? फुटकळ कम्युनिस्ट, दिशाहिन कॉंग्रेस, हिस्टेरीक ममता, किंवा ईतर सैरभैर झालेले सो कॉल्ड** पक्ष ? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे ह्या आतुन कंप्लिटली सैरभैर, भयभित झालेल्या लोकांच नेतृत्व करणार कोण ? *** हो हे कधिकाळी पक्ष, संघटना होते ज्याला नेतृत्व होते आता त्या फक्त मोदि विरोध करणार्या टोळ्या आहेत ज्या त्यांच्या प्रवक्तयां मार्फत चालवल्या जातात. माझ्या मते तरी केंद्र सरकार व्यवस्थित काम करतय पण आज मोदि जे प्रचंड मोठे झालेय ( विराट दर्शन) ते फक्त ह्या वैचारीक भयाणपणा आलेल्या टोळ्यांमुळे. मोबाईल टंकन क्षमता त्यामुळे क्रमश:
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/26/2017 - 19:03 नवीन
या प्रकारामुळे पवारांसारखीच नितीशकुमारांची विश्वासार्हता ढासळली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी हा माणूस कधीही धोका देऊ शकतो हे आज दुसऱ्यांदा घडलंय. तत्वाचा कितीही मुलामा चढविला तरी त्यामागचा संधीसाधूपणा लपलेला नाही. दुर्दैवाने भाजप इतिहासातून धडा घेत नाही असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/26/2017 - 19:13 नवीन
तत्वाचा कितीही मुलामा चढविला तरी त्यामागचा संधीसाधूपणा लपलेला नाही.
राजकारणात सगळेच संधीसाधूच आहेत. भाजपनेही मायावती, जयललिता, करूणानिधी, चंद्रबाबू नायडू, नवीन पटनायक, शिबू सोरेन, ममता बॅनर्जी इत्यादी अनेकांबरोबर कधीनाकधी हातमिळवणी केलीच होती. या मंडळींचा आणि भाजपच्या ध्येयधोरणांशी कधीही काहीही संबंध नव्हता. तो पण संधीसाधूपणाच होता की. जर नितीशकुमारांना बरोबर घेऊन विरोधकांच्या प्रस्तावित ऐक्यात पाचर मारली जाणार असेल तर मला वाटते तसे करावे. उगीच अतिआत्मविश्वासात गेल्याचे परिणाम २००४ मध्ये एकदा भोगून झाले आहेत. तो प्रकार परत नको. तेव्हा विरोधकांच्या ऐक्याला इतके कमीही लेखले जाऊ नये आणि तेच हाणून पाडता येत असेल तर करावे. बाकी मनमोहन सरकारपेक्षा मोदी सरकार बरेच उजवे आहे. ते २०१९ मध्ये परत जिंकायला हवे. नितीशकुमार संधीसाधू म्हणून त्यांना दूर ठेवायचे, नितीश-लालूंना एकत्रच ठेवायचे आणि २०१९ मध्ये बिहारमधून २०१४ पेक्षा लोकसभेच्या ८-१० जागा गमावायच्या असे करून काहीच उपयोग नाही. दुसरे म्हणजे नितीशकुमारांची 'सुशासनबाबू' ही प्रतिमा आहेच. आणि तेच सुशासनबाबू मोदींबरोबर जाणार असतील तर चांगल्या गव्हर्नन्ससाठी मोदींशिवाय पर्याय नाही हे चित्र अधिक ठळकपणे मतदारांपुढे अधोरेखित करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/26/2017 - 19:26 नवीन
नितीशकुमार संधीसाधू म्हणून त्यांना दूर ठेवायचे, नितीश-लालूंना एकत्रच ठेवायचे आणि २०१९ मध्ये बिहारमधून २०१४ पेक्षा लोकसभेच्या ८-१० जागा गमावायच्या असे करून काहीच उपयोग नाही. नितीश-लालू आता एकत्र येणार नाहीत. भाजपने स्वतः सत्तेवर येण्यासाठी दोघांनाही संपवायला हवे. भाजपने नितीशना पाठिंबा दिल्याने लालू संपला तरी संजदचे अस्तित्व राहील. नितीशना पाठिंबा न देता भाजपने मुदतपूर्व निवडणूक लादली तर ते दोघेही संपतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 07:41 नवीन
नितीशना पाठिंबा न देता भाजपने मुदतपूर्व निवडणूक लादली तर ते दोघेही संपतील.
या शक्यतेचा मोदी-शहांनी विचार केला नसेल असे वाटत नाही पण भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे कठिण आहे हे त्यांनी जाणले असावे. राजद-जदयुमध्ये काडीमोड झाल्यावर राजद हौतात्म्य मिळाल्याचा आणि नितीशकुमारांनी विश्वासघात केल्याचा दावा करेल तर जदयु नितीशकुमारांनी सुशासनबाबू ही प्रतिमा कायम ठेवली हा दावा करेल. अशावेळी राजद आणि जदयुमागे मतांचे अधिक ध्रुवीकरण होईल ही शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक पक्षांची कामगिरी लोकसभा निवडणुकांमध्ये होते त्यापेक्षा चांगली होते तर लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांची कामगिरी विधानसभा निवडणुकांमध्ये होते त्यापेक्षा चांगली होते हा कल देशात कित्येक वेळा बघायला मिळालेला आहे. तेव्हा भाजप इथे बॅकफूटवर असणार आहे आणि नितीशकुमारांना त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा फायदा मिळायची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या म्हणण्यात मुदतपूर्व निवडणुकांमध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल हे गृहितक वाटत आहे. तसे होईल असे वाटत नाही. अर्थात नितीशकुमारांनाही स्वबळावर बहुमत मिळेल असे नक्कीच नाही. त्रिशंकू विधानसभा येईल ही शक्यता सर्वात जास्त. त्रिशंकू विधानसभा आली तर परत लालू-नितीश हातमिळवणी करायची शक्यता मोकळी राहते आणि त्यातून नितीश २०१९ मध्ये विरोधकांच्या आघाडीत जातील ही पण शक्यता मोकळी राहते. ते काही केल्या होऊ द्यायचे नाही आणि विरोधकांची निवडणुकपूर्व आघाडी 'स्टीलबॉर्न' असावी हा मोदी-शहांचा डाव दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/26/2017 - 19:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/26/2017 - 19:25 नवीन
त्यांच्या उद्याच्या शपथविधीच्या बातम्या झळकत आहेत तेव्हा ऑप्शन 2 आधीच निश्चित झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनुप ढेरे Wed, 07/26/2017 - 20:25 नवीन
उधोजीरावांची प्रतिक्रिया काय असेल आजच्या घडामोडींवर ?
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 21:15 नवीन
शेवटि कोणितरी हा प्रश्न विचारलाच ;) थांबा सध्या कलानगर ची हवा टाईट आहे :) तसेहि हे राजीनामे खिशात घेउन फिरतात आणि काल तर अजित पवारांनी ऑफर दिलीच आहे सेने ला सरकार स्थापनेची. बराय जर हे पवारांसोबत गेले तर त्याने एक फायदा होईल निदान ऊर्वरीत महाराष्ट्रालाहि पेंग्विन नावाचा पक्षी / प्राणि तिथे बघता येईल जिथे जिथे कार्यसम्राट माजी सिंचन मंत्री अजित दादा पवार ह्यानी धरणे, बंधारे बांधलेयत. पाऊस नाहि पडला तरी धरणातिल पाण्याचि लेव्हल 12 महिने शेम राहिल. कशी ? ते अजितदादा सांगतील.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 07/27/2017 - 06:25 नवीन
मटातील बातमीनुसार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना केंद्र सरकारने सैन्य अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या शिध्याला कात्री लावली आहे. जुलै २०१७पासून या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून त्यानुसार शांतता काळातील युनिटवर नियुक्त असलेल्या सैन्याधिकाऱ्यांना आता प्रत्यक्ष शिधा देण्याऐवजी दिवसाला ९६ रुपये तीन पैसे शिध्यापोटी देण्यात येतील. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/armed-forces-officers-to-get-96-rupees-instead-of-ration-during-peace-postings/articleshow/59778595.cms
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 07:32 नवीन
नितीशकुमार यांनी आज सकाळी १० वाजता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली. त्यांच्याबरोबर भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी यांना शपथ दिली. Image removed. उद्या म्हणजे २८ जुलैपासून बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. उद्याच नितीशकुमार आपल्या सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडतील. जदयु आणि भाजपने काल समर्थन देणार्‍या २४३ पैकी १३२ आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केली होती. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव मंजूर व्हायला अडचण येऊ नये. हा ठराव मंजूर झाल्यावर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येईल आणि दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १३ मंत्री मंत्रीमंडळात असतील अशा बातम्या आहेत. म्हणजे भाजपला ५०% प्रतिनिधीत्व मंत्रीमंडळात द्यायला नितीशकुमार राजी झालेले दिसतात.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 07/27/2017 - 07:50 नवीन
नितीशकुमार यांनी आज सकाळी १० वाजता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली.
आता पाठ झाली असेल. राज्यपाल दिसले रे दिसले की आपोआप सुरू होत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुज्ञ गुरुवार, 07/27/2017 - 07:35 नवीन
नितीशकुमार यांच्या राजीनाम्याने आणि खांग्रेस लालू बरोबर राहिल्याने मात्र खांग्रेस का हाथ भ्रष्टाचारियों के साथ हे अधोरेखित होत आहे याची त्यांना अजूनही जाणीव होताना दिसत नाही . एका अर्थाने खांग्रेसमधील नेतृत्व हताशपणे बघत बसणे याशिवाय काहीच करू शकत नाही . अर्थात नेतृत्वपदी महाबुद्धिमान माणूस असल्यावर हेच होणे अपेक्षित आहे . बाकी ते भ्रष्टाचार निर्दालक, लालूंची गळाभेट घेतलेले श्री 420 यावर अजून काही बोलले नाहीत हे आश्चर्य आहे .
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 08:44 नवीन
एका अर्थाने खांग्रेसमधील नेतृत्व हताशपणे बघत बसणे याशिवाय काहीच करू शकत नाही . अर्थात नेतृत्वपदी महाबुद्धिमान माणूस असल्यावर हेच होणे अपेक्षित आहे .
एक गोष्ट कळत नाही. लालू आणि नितीश यांच्यातील मतभेद तुटेल इतके ताणले गेले तरी काँग्रेसने त्यांच्यात मध्यस्थी करून महागठबंधन टिकवायचा फार प्रयत्न केल्याचे दिसत नाही. सुमारे २० वर्षांचे वैर विसरून लालू आणि नितीश यांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते. तसेही दोघेही २०१४ च्या मोदीलाटेत वाहून गेल्यावर एकत्र आलेच असते ही शक्यता आहे. पण त्यावेळीच नितीशकुमारांकडे झालेगेले विसरून जाऊन थोडी पडती भूमिका घेऊन भाजपबरोबर जायचा पर्याय होताच (तो त्यांनी आता वापरला आहे). पण तसे न करता त्यांनी लालूंबरोबर (आणि लालूंनी नितीशबरोबर) हातमिळवणी करावी यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते. इथपर्यंत सगळे ठिक चालू आहे. पण आता मात्र नितीशकुमार महागठबंधनमधून बाहेर पडले आणि ते काँग्रेसवाले बघत बसले. नितीश हा विरोधी पक्षांमधला मोठा मोहरा होता आणि त्यांची चांगली प्रतिमा ही २०१९ मध्ये एक चांगला 'अ‍ॅसेट' झाली असती हे राहुल गांधींना कळत नव्हते का? मग सुरवातीलाच एक तर लालू किंवा नितीश या दोघांपैकी एकाला नमायला लावायचा आणि महागठबंधन टिकवायचा कोणता प्रयत्न त्यांनी केला? की २०१४ पासून काँग्रेसला पराभूत मनोवृत्तीने पछाडले आहे आणि काहीही झाले तरी आपण जिंकू शकत नाही आणि मोदींना हरविणे कठिण आहे असेच त्यांनी ठरवून टाकले आहे हे समजत नाही. अन्यथा हिमंत बिस्व शर्मा, शंकरसिंग वाघेला, अजित जोगी इत्यादींना काँग्रेसमधून इतक्या सहजपणे बाहेर पडू दिले गेले नसते. मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर हिमंत बिस्व शर्मा दिल्लीला राहुल गांधींना भेटायला गेले होते तेव्हा आपण कुठे कमी पडलो, काय करायला हवे याविषयी राहुल काहीतरी बोलतील ही त्यांची अपेक्षा होती. पण राहुल गांधींनी त्यापैकी काहीही न करता ते आपल्या कुत्र्यांबरोबर खेळत होते अशा बातम्या आल्या होत्या. स्वतः नेताच जर का असा बेफिकिर असेल तर काँग्रेस पुनरागमन करणार कधी आणि कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/27/2017 - 17:33 नवीन
तुमचे नाव चेतन रावळ आहे काय ? मला वाटते नसावे. तो तुमचे इथले प्रतिसाद ढापून जसेच्या तसे सकाळमधे टाकतोय. ह्या बातमीखालील प्रतिक्रिया बघा ! काय दिवस आलेत ! पहिले लोक कथा, कविता ढापायचे. आता डायरेक्ट प्रतिसादच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनुप ढेरे गुरुवार, 07/27/2017 - 07:36 नवीन
जदयु केंद्रातल्या मंत्रिमंडळातपण जाणार वाचलं.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/27/2017 - 08:38 नवीन
अजून कशातच काही नाही असे दिसते. शरद यादवांनी कालच्या घाईघाईतील युतीच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केलेल्च्या बातम्या येत आहेत. राजद मध्ये फूट पडली तर काय असा प्रश्न उभा राहताना दिसतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 08:48 नवीन
नितीशकुमारांच्या परत भाजपबरोबर हातमिळवणी करायच्या निर्णयामुळे जदयुमध्ये मतभेद झाले आहेत अशा बातम्या आल्या आहेत. शरद यादव आणि अली अन्वर यासारख्या नेत्यांनी त्याविरूध्द नाराजी व्यक्त केली आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/jdu-leaders-such-as-sharad-yadav-or-ali-anwar-criticising-nitish-kumar-move-to-join-hands-with-jdu/articleshow/59785880.cms जर का शरद यादवसारख्या जुन्या समाजवादी खोडांना हाकलून देऊन विकासाभिमुख नेत्यांचा पक्ष उभारण्यात नितीशकुमार यशस्वी ठरले तर ते नक्कीच चांगले होईल. तसाही शरद यादवांना फार जनाधार नाही. त्यामुळे ते गेले तरी फार परिणाम होऊ नये. नितीशकुमारांनी जॉर्ज फर्नांडिसना गुंडाळून ठेवलेच होते. आता शरद यादव यांचा नंबर दिसतो आणि तो नंबर लवकरात लवकर यावा असे फार वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 09:02 नवीन
२०१५ मध्ये दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा जोरदार पराभव झाला. आता वाटते की तो पराभव झाला हे चांगलेच झाले. भाजपचा पराभव झाला त्यामुळे मोदीविरोधी राजकारण्यांना सत्तेत यायची संधी मिळाली आणि त्यातूनच उघडे पडायचीही संधी मिळाली. ते मुळात सत्तेतच येऊ शकले नसते तर त्यांची झाकली मूठ राहिली असती. दिल्लीत केजरीवाल जिंकल्यावर त्यांना स्वर्ग दोन बोटे राहिला आणि त्या नशेत ते एकामागोमाग दुसरी चूक करत गेले आणि स्वतःच गाळात आले. तो विजय मिळाला नसता तर त्यांनी त्यांचे 'मी भ्रष्टाचारविरोधी आहे, मी लोकाभिमुख प्रशासन देणार' हे बिनबुडाचे पालूपद चालूच ठेवले असते. ते लोकांना परत खरे वाटायची शक्यता होतीच. पण ते २०१९ मध्ये न होता २०१५ मध्येच झाले हे बरे झाले. तसेच बिहारमध्ये मोठा गाजावाजा करून मोदीविरोधी विरोधी पक्षांची आघाडी झाली आणि त्या आघाडीला विजयही मिळाला. त्यानंतर सगळ्या पुरोगाम्यांनाही स्वर्ग दोन बोटे राहिला होता. पण नुसता मोदीविरोध या आधारावर झालेली आघाडी स्थिर होऊ शकत नाही हा धडा २०१९ पूर्वीच मिळाला हे पण चांगले झाले. तसेच बिहारमध्ये आपण कोणत्या चुका केल्या हे भाजप आणि अमित शहांच्या लक्षात आले. बिहारमध्ये विनाकारण गाय हा मोठा मुद्दा बनविला गेला पण त्याला लोक महत्व देत नाहीत हे कळले. त्यानंतर आसाम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशात ती चूक टाळली गेली. एका अर्थी दिल्ली आणि बिहारमधील पराभव हा 'ब्लेसिंग इन डिसगाईस' ठरले असे दिसते.
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ गुरुवार, 07/27/2017 - 10:00 नवीन
अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत आणि ते तिथे निवडूनही जातील. त्यांचा दिल्लीत कायम आवश्यक असलेला वावर पाहता ते आवश्यकच होते. गेली तीन वर्षे राज्यसभेचा तंबू एकखांबी लढवणार्या जेटलीना आणि पक्षालाही झोकदार वक्तृत्वकला अवगत असणाऱ्या अमित शहांमुळे राज्यसभेत चांगलेच बळ मिळेल हे नक्की.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/27/2017 - 11:23 नवीन
या घटनेच्या निमित्ताने नितीशकुमारांची विश्वासघातकी वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. विश्वासघाताच्या कसोटीवर नितीशकुमारांची तुलना फक्त पवारांशी होऊ शकते. फरक एवढाच आहे की पवारांनी आपल्या विश्वासघाताला तात्विक मुलामा चढवायचा प्रयत्न करूनही त्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. परंतु नितीशकुमार अजूनपर्यंत आपल्या विश्वासघातकी कृत्यांना तात्विक मुलाला चढविण्यात यशस्वी झालेत. १९९६ पासून तब्बल १७ वर्षे नितीशकुमार भाजपला बरोबर घेऊन लालूच्या 'जंगलराज' व 'भ्रष्टाचारी' राजवटीविरूद्ध लढत होते. २०१३ मध्ये अचानक मोदींचे निमित्त करून त्यांनी एका रात्रीत भाजपशी संबंध तोडला. हा भाजपचा केलेला विश्वासघातच होता. हे करताना त्यांनी आपल्या निर्णयाला धर्मनिरपेक्षतेचा मुलामा चढविला. मोदींमुळे आपली राष्ट्रीय राजकारणाची संधी हुकणार हे लक्षात आल्याने मोदींवर खार खाऊन त्यांनी भाजपचा विश्वासघात केला. भाजपच्या शिडीवर चढून सत्ता मिळविल्यावर त्यांनी बिनदिक्कतपणे पायाखालची शिडी ढकलून दिली. त्यानंतर स्वतःची सत्ता टिकविण्यासाठी १७ वर्षे शत्रुत्व केलेल्या आणि सलग १५ वर्षे 'जंगलराज' व 'भ्रष्टाचारी' राजवट राबविणार्‍या लालूची गळाभेट घेऊन त्याच्याशीच युती केली. हा बिहारी जनतेचा केलेला विश्वासघात होता. असे करताना पुन्हा एकदा बिहारी वि. बाहेरचे, धर्मनिरपेक्षता, असहिष्णुतेविरूद्ध लढाई असा तात्विकतेचा मुलामा त्यांनी आपल्या निर्णयाला चढविला. सत्ता टिकविण्यासाठी ते आता नव्या शिडीवर चढले. २०१५ मध्ये लालूबरोबर युती करून स्वतःची सत्ता टिकविण्यात यश मिळाल्यानंतर नितीशकुमारांची लालूची गरज संपली. लालू व त्याची मुले डोईजड व्हायला लागल्यावर लगेच त्यांनी पायाखालची लालूची शिडी ढकलून दिली व भाजपने स्वतःहून पुढे केलेल्या शिडीवर चढले. हा निर्णय म्हणजे लालूचा व २०१५ मध्ये बिहारी जनतेने दिलेल्या कौलाचा विश्वासघात होता. हे करतानाही त्यांनी आपल्या आधीच्या निर्णयाला चढविलेला धर्मनिरपेक्षता व सहिष्णुतेचा मुलामा खरवडून काढला व नवीन निर्णयाला 'स्वच्छ प्रतिमा', 'भ्रष्टाचाराविरूद्ध लढाई' असा तात्विक मुलामा दिला आहे. काही दिवसांतच उपराष्ट्रपती पदाची निवडणुक आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी आपला पक्ष संपुआच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे असे नितीशकुमारांनी आधीच जाहीर केले आहे. परंतु आता रालोआत परत आल्यानंतर त्यांचा पक्ष नक्की कोणाच्या बाजूने मत देणार? गोपाळकृष्ण गांधींना मत दिले तर तो भाजपशी विश्वासघात होईल आणि नायडूंना मत दिले तर आधीच्या निर्णयावर टोपी फिरविल्याने तो संपुआचा विश्वासघात होईल. अर्थात या दोघांपैकी कोणालाही मत दिले तरी त्या निर्णयाला ते तात्विकतेचा मुलामा चढवतील हे नक्की. २०१४ व २०१५ मध्ये मोदींना 'राजधर्मा'ची आठवण करून देणारे नितीशकुमार आता त्यांच्याशीच पुन्हा एकदा युती करणार. २०१३ मध्ये मोदी पाटण्याला सभेसाठी आले असताना जाणूनबुजून त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ढिसाळपणा करून सभास्थानी बाँबस्फोट होऊन देणार्‍या नितीशकुमारांना आता मोदींचेच नेतृत्व मान्य करायला लागणार. अत्यंत नालायक व भ्रष्टाचारी असलेल्या लालूला नितीशकुमारांनी सत्तेतून हाकलून लावल्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. उलट या निर्णयाचा आनंदच झाला आहे. परंतु नितीशकुमार हे अत्यंत विश्वासघातकी व बेभरवशाचे आहेत हे कालच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपने अत्यंत उतावीळपणे त्यांना पाठिंबा देऊन चूक केली आहे. २०१९ मध्ये किंवा नंतरही नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपचा विश्वासघात करून नवीन घरोबा करतील याविषयी मला खात्री आहे. वर चढण्यासाठी जी शिडी वापरायची ती शिडी वर चढल्यानंतर ढकलून देणे हेच त्यांचे आजवरचे धोरण राहिले आहे. असेच विश्वासघातकी निर्णय घेऊन पवार बदनाम झाले, परंतु नितीशकुमार मात्र आपली प्रतिमा काळवंडू न देण्यात अजूनपर्यंत यशस्वी झाले आहेत. 'उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग' असेच भाजपचे चित्रे यानिमित्ताने पुढे आले. इतरवेळी अतिशय विचारपूर्वक धोरण आखणारे अमित शहा व मोदी इतक्या उतावीळ्पणे हा निर्णय घेतील असे वाटले नव्हते. भाजपने संयम राखून काही काळ तटस्थ राहून सूत्रे आपल्या हातात यायची वाट पहायला हवी होती. तसाही राजद व संजद यांचा संसार फार काळ टिकला नसताच. नितीशकुमारांना राजदशी संबंध तोडावेच लागले असते व रालोआत जावे लागले असतेच. त्यावेळी आपल्या अटींवर त्यांना पाठिंबा देऊन भाजपला बिहारमध्ये आपली कनिष्ठ भूमिका सोडून वरीष्ठाची किंवा किमान बरोबरीची भूमिका मिळविता आली असती. मात्र नितीशकुमारांना अत्यंत उतावीळपणे पाठिंबा देऊन भाजपने ही संधी गमाविली आहे. बिहारमध्ये नितीशकुमार स्वबळावर सत्तेत येऊन शकत नाहीत. त्यांना सत्तेत येण्यासाठी इतर पक्षांची मदत लागते. हे माहीत असूनसुद्धा भाजपने इतकी घाई करावी याचे आश्चर्य वाटते. शिवसेनेसमोर कनिष्ठ भूमिका घेऊन भाजपने स्वतःहून २५ वर्षे फरपट होऊन दिली. सुदैवाने २०१४ मध्ये संधी मिळवून भाजपने सेनेचे जोखड मानेवरून भिरकावून दिले. अशीच संधी बिहारमध्ये स्वतःहून चालत आलेली असताना भाजपने ही संधी गमाविली आहे असे दिसते. नितीशकुमारांच्या महत्त्वकांक्षेमुळे व विश्वासघातकी वृत्तीमुळे संजद व भाजपचा पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेला संसार फार काळ टिकेल असे वाटत नाही. नवीन शिडी मिळताच नितीशकुमार भाजपची शिडी सुद्धा ढकलून देतील हे नक्की.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 11:56 नवीन
मला वाटते की या निर्णयात मोदी-शहांचा मोठा डाव आहे. नितीशकुमारांनी हा निर्णय घेतला तो काही एकाएकी घेतलेला असेल असे वाटत नाही नाही. भाजपबरोबर पडद्याआड त्यांची बोलणी आधीपासूनच चालूच असली पाहिजेत. आणि भाजपकडून सकारात्मक संदेश आल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेऊन ते स्वतः तोंडघशी पडतील हे शक्य वाटत नाही. काहीही झाले तरी बिहारमध्ये नितीश आणि लालूंना दूर करणे भाजपसाठी अत्यावश्यक होते. प्रश्न केवळ बिहारमधील ४० जागांचा नव्हता. तर बिहारमधील महागठबंधनचे यश म्हणजे मोदीविरोध या एका कारणावर परस्परविरोधी विरोधक एकत्र आले तरी केवळ मतांची बेरीज होऊन भाजपला हरवता येऊ शकते हा एक आत्मविश्वास विरोधकांना आला होता. तो हाणून पाडणे अत्यावश्यक होते. आणि त्याबरोबरच केवळ मोदीविरोध या कारणाने एकत्र आलेले विरोधक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत हा संदेशही मतदारांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक होते. त्यातूनच २०१९ मध्ये विरोधकांची प्रस्तावित आघाडी मुळातच अंतर्विरोधांनी भरलेली असेल आणि असे खिचडी सरकार फार काळ स्थिर राहू शकणार नाही हा संदेश मतदारांपर्यंत आपोआपच गेला. तसे करणे अधिक महत्वाचे होते. तसेच नितीश विरोधकांबरोबर राहिले असते तर त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा विरोधकांनी २०१९ मध्ये उपयोग करून घेतला असता. ती संधी विरोधकांना मिळवू न देणे हा उद्देश असावा. आणि भाजपने पाठिंबा देऊ असे कबूल केल्याशिवाय नितीशनी लालूंबरोबरचे महागठबंधन तोडले असते असेही नाही. म्हणजे एक शिडी सोडण्यापूर्वी दुसरी तयार असल्याशिवाय ते पहिली शिडी सोडतील ही शक्यता कितपत होती? तसेच लालू-नितीश मतभेदांच्या सुरवातीलाच जाहिरपणे भाजपने आपण पाठिंबा द्यायला तयार आहोत असे म्हटल्यामुळे नितीशना ती शिडी लवकर सोडायचा आत्मविश्वास आला आणि त्याचबरोबर महागठबंधनमध्ये कुरबुरी वाढायला सुरवात झाली. भाजपला आणखी काय हवे होते? काहीही झाले तरी २०१९ मध्ये विरोधकांची पक्की आघाडी उभी राहता कामा नये. अन्यथा २०१९ ची निवडणुक वाटते तितकी सोपी जाणार नाही. आता या धक्क्यातून सावरून पक्की आघाडी उघडायचा प्रयत्न करायलाही विरोधकांना आणखी वेळ लागेल. आणि २०१९ च्या जितक्या तोंडावर ही आघाडी उभी राहिल तितकी त्या आघाडीची विश्वासार्हता वादात असणार आहे. त्यामुळे मुळातच आधी पाचर मारणे गरजेचे होते. त्यातून नितीशनी २०१३ मध्ये उतावळेपणा करून भाजपबरोबरचे संबंध तोडून टाकले याबद्दल शिक्षा द्यायचीच असेल तर ती २०१९ च्या निवडणुका झाल्यावरही देता येऊ शकेल. पण काहीही झाले तरी २०१९ मध्ये विरोधकांकडे नितीश हा मोहरा असता कामा नये (आणि त्यातूनच विरोधकांच्या अशा आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे) हा उद्देश असावा. मला वाटते की भाजपने हे पाऊल उचलून चांगले केले. हे करायला जितका उशीर लागला असता तितके भाजप आणि नितीश या दोघांनाही जड गेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/27/2017 - 12:07 नवीन
- बिहारमध्ये नितीश स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाहीत हे नितीशनाही माहित आहे व भाजपलाही. - काँग्रेस इतर पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली कधीही लोकसभा निवडणुक लढणार नाही हे नितीशनाही माहित आहे व भाजपलाही. निवडणुक निकालानंतर मात्र स्वतः सरकार बनविण्याच्या स्थितीत नसताना काँग्रेसने इतर पक्षाच्या नेत्याला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. - नितीश्कुमारांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही हेदेखील सर्वांना माहित आहे. अशा परिस्थितीत २०१९ मध्ये नितीशकुमार हे विरोधी पक्षांचा नेता/चेहरा नसणार हे नक्की होते (किमान काँगेसने तरी त्यांना नेता मानून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढविली नसती). ते चेहराच नसतील तर त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा बिहारच्या बाहेर उपयोग होणार नव्हता. त्यामुळे २०१९ मध्ये नितीशकुमारांची भीति बाळगण्याचे भाजपला कारण नव्हते. तशीही संजद-राजद युती २०१९ पर्यंत टिकणे अवघड होते. २०१९ पूर्वीच ही युती टिकली असती. जरी टिकली असती तर लालूपुत्रांच्या बाळलीलांमुळे नितीशकुमारांची स्वच्छ प्रतिमाही काळवंडली असती. मला वाटते की भाजपने हे पाऊल उचलून चांगले केले. हे करायला जितका उशीर लागला असता तितके भाजप आणि नितीश या दोघांनाही जड गेले असते. हा निर्णय चांगला होता का वाईट ते २०१९ पर्यंत समजेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/27/2017 - 12:33 नवीन
पण या घटनेतून विरोधी पक्षांच्या आघाडीचे स्थैर्य आणि विश्वासार्हता वादात सापडली आहे त्याचबरोबर 'मोदींशिवाय पर्याय नाही' हा संदेशही मतदारांपर्यंत गेला आहे याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? प्रश्न नुसत्या बिहारमधील राज्य सरकारचा नाही तर व्यापक आहे. प्रश्न २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/27/2017 - 17:02 नवीन
पण या घटनेतून विरोधी पक्षांच्या आघाडीचे स्थैर्य आणि विश्वासार्हता वादात सापडली आहे त्याचबरोबर 'मोदींशिवाय पर्याय नाही' हा संदेशही मतदारांपर्यंत गेला आहे याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? प्रश्न नुसत्या बिहारमधील राज्य सरकारचा नाही तर व्यापक आहे. प्रश्न २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा आहे. विरोधी आघाडीला तसेही स्थैर्य आणि विश्वासार्हता नव्हतीच. निष्प्रभ विरोधी पक्षांमुळे व नाकर्त्या विरोधी नेत्यांमुळे 'मोदींशिवाय पर्याय नाही' हा संदेश यापूर्वीच गेला आहे. सध्याच्या विरोधी नेत्यांपैकी एकही नेता मोदींना आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाही. ज्याप्रमाणे भाजपने राष्ट्रीय पातळीवर अडवाणींसारख्या जुन्या नेत्याला पूर्णपणे बाजूला करून मोदी हा नवा चेहरा समोर आणला व विजय मिळविला, त्याचप्रमाणे भाजपला नमविण्यासाठी विरोधी पक्षांना विशेषतः काँगेसला राहुलऐवजी प्रियांकाला आणावेच लागेल. अन्यथा मोदींचा विजय निश्चित आहे. जिथे विरोधी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे ती राज्ये पाहू आणि कालच्या निर्णयामुळे त्यात किती फरक पडला असता ते पाहू. (१) महाराष्ट्र - पुढील निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची युती होणार हे नक्की आहे. नितीश लालूबरोबर राहिले असते किंवा आता भाजपबरोबर आल्याने या संभाव्य युतीवर अजिबात परीणाम होणार नाही. शिवसेना व भाजप युती विधानसभेत होणार नाही हे पण नक्की आहे. लोकसभेला युती होण्याची १००% खात्री नाही. परंतु कालच्या घडामोडींमुळे शिवसेनेच्या निर्णयात तसूभरही बदल होणार नाही. आपला महाराष्ट्रातील एकंदरीत जनाधार ओळ्खून सेनेने व्यावहारीक भूमिका घेतली तरच ही उती शक्य होईल. अन्यथा नाही. म्हणजे कालच्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. (२) बंगाल - २०१९ मध्ये काँग्रेस तृणमूल किंवा डाव्या पक्षांबरोबर युती करणार हे नक्की आहे. तॄणमूल व डावे यांच्यात अजिबात युती होणार नाही. कालच्या घडामोडींमुळे बंगालमधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. (३) उत्तर प्रदेश - २०१९ मध्ये काँग्रेस सप किंवा बसपबरोबर युती करणार हे नक्की. परंतु काँग्रेस + बसप + सप अशी युती होणे अत्यंत अवघड आहे. समजा अशी युती करायचे ठरविले तर ८० पैकी किमान १० जागा काँग्रेसला द्यावा लागतील. उर्वरीत ७० पैकी प्रत्येकी ३५ जागा सप व बसप मान्य करतील याची शक्यता फार कमी आहे. २०१२, २०१४ व २०१७ मध्ये सपने बसपपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आपल्या बरोबरीने बसपला जागा देण्यास सप अजिबात तयार होणार नाही. म्हणजेच उर्वरीत ७० जागांपैकी सप किमान ४० जागांचा आग्रह धरेल आणि बसपसाठी जास्तीत जास्त ३० जागा सोडेल. मायावती ८० पैकी फक्त ३० जागा लढण्यास अजिबात तयार होणार नाही. जर अजितसिंगसुद्धा यांच्या आघाडीत सामील झाले तर त्यांनाही ४-५ जागा द्यावा लागतील व त्या जागा सप आणि बसपच्या कोट्यातून जातील. एकंदरीत असे जागावाटप होणे अत्यंत अवघड आहे. नितीशकुमार राजदबरोबर राहिले असते किंवा आता ते भाजपबरोबर आहेत या परिस्थितीचा उ. प्र. मधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर अजिबात परीणाम होणार नाही. (४) तामिळनाडू - देशात काय घडते यावर तामिळनाडूचे राजकारण चालत नाही. कालच्या घडामोडींमुळे तामिळनाडूमधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. भाजपला तसेही तिथे किरकोळ स्थान आहे. तिथे कोणाचीही कोणाही बरोबर आघाडी झाली तरी भाजपला फरक पडणार नाही. (५) बिहार - कालच्या घडामोडींमुळे जो फरक पडणार आहे तो फक्त याच राज्यात पडणार आहे. संजदबरोबर केलेल्या नवीन आघाडीमुळे रालोआचा व संजदचा फायदा होईल, पण भाजपचे नुकसान होईल. समजा काँग्रेस + राजद + संजद ही युती २०१९ मध्ये टिकली असती तरीसुद्धा भाजप व रालोआला नुकसान झालेच असते. परंतु कालच्या घडामोडी झाल्या नसत्या तरी काँग्रेस + राजद + संजद ही युती २०१९ मध्ये टिकली असती याची खात्री नाही. तसेच कालपासून संजद व भाजप एकत्र आले असले तरी नितीशकुमारांचा विश्वासघातकी इतिहास बघता यांची युती २०१९ मध्ये टिकेल किंवा निवडणुकीनंतर संजद भाजपबरोबर राहीलच याची खात्री नाही. एकंदरीत बिहार वगळता इतरत्र कालच्या घडामोडींमुळे फरक पडणार नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा