रामदेव व पतंजलीच्या प्रोडक्ट्स आपले मत काय आहे?
नुकतेच प्रियांका पाठक – नारायण ह्यांचे “Godman to tycoon –The untold story of Baba Ramdev” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.तसेच आंतरजालावर हा पुस्तक परिचय वाचनात आला म्हणून उत्सुकता वाढलेली आहे.
मी पतंजली चे प्रोडक्ट्स कधी वापरले नाहीत. परंतु आंतरजालावर थोडा अभ्यास केल्यानंतर , पतंजलीच्या उत्पादनांच्या मागील काही चिंताजनक गोष्टी आढळून आल्या. उदाहरणार्थ , पतंजली चे गायीचे तूप हे गायीचे नसल्याचा दावा एस. के . पात्रा ह्या त्यांच्या EX-CEO ने केला आहे. “कारवान “ मासिकाने त्याबाबत एक लेख प्रकाशित केला आहे. तसेच त्यांची काही उत्पादने FSSAI च्या टेस्ट्स मध्ये नापास झाल्याचे समजले. तसेच त्यांच्या जाहीराती ह्या फसव्या असल्याचा दावा इतर कंपन्यांनी केल्याचे वाचनात आले.
रामदेव हे कमालीचे हुशार व्यापारी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या उत्पादनांबाबत मी आधीपासूनच साशंक होतो. जर आपण त्यांची उत्पादने वापरली असल्यास आपला काय अनुभव होता हे जाणण्यास उत्सुक.
प्रतिक्रिया
निव्वळ भावनांवर आधारित ग्राहक एकदा मिळतील पण ते दीर्घ मुदतीत टिकवायचे असतील तर भारतात तरी सतत विनाव्यत्यय पुरवठा, चांगला दर्जा आणि स्पर्धकांपेक्षा कमी किंमती हे सातत्याने देत रहावे लागेल.किती योग्य शब्दात मांडलसं पैसा ताई..