Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणेशोत्सव हायजॅक ?

प
पगला गजोधर यांनी
Sat, 08/12/2017 - 08:14  ·  लेख
लेख
"शिवजयंती सार्वजनिक उत्सव", याचे जनक महात्मा फुले असून, तो उत्सव हायजॅक होऊन, दुसऱ्या कोणाच्या नावे प्रोपागेंडा केला जात असू शकतो काय ?, याबाबत मागे मिपावर मी एक धागा काढला होता. (रेफ: शिवजयंती हायजॅक ) असो आता "सार्वजनिक गणेशोत्सवाचे" जनक कोण ? यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे. गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली. 1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ? तुम्हाला काय वाटते ? (जाता जाता अवांतर : नामांकित न्यूज ब्युरो च्या संदर्भाने ... "राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे." या बातमी मागच्या बातमीचा वर वरील उल्लेखलेल्या हायजॅकिंगच्या घटनांमागील एम. ओ. मधे काही साम्यस्थळे आढळतात काय ?)

प्रतिक्रिया द्या
28919 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 17:13 नवीन
सचिन पगारे उर्फ ट.फि.
↩ प्रतिसाद: arunjoshi123
व
विशुमित Sat, 08/12/2017 - 17:23 नवीन
धाग्यावर ब्राह्मण्यवाद चवताळला..!! चालू द्यात टॉयलेट एक प्रेम कथा स्पॉन्सरड बाय नागपूर ब्रिगेड..!!
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 17:39 नवीन
टॉयलेट नाय हागणदारी....बायकांच्या डोक्यावर तर ह्यांना पदर पाहिजे....पण त्या बिचार्‍या कश्या आपलि लाज झाकत हागणदारीत जातात ते ह्यांना नाहि दिसत. आणि ब्राह्मण्यवाद ह्याचा विषयच नाहिये. हे नागपूर ब्रिगेड काय आहे हे ही नाहि माहित पण तु मे रि खुजा मै तेरि खुजाता हु असय ते. इथे एक गोष्ट लक्षात आलिये कि हागणदरी वाल्यांना त्यांच्या भाषेतच बोलायच.
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Mon, 08/14/2017 - 15:47 नवीन
...आणि स्वत:ला बिचारा बळीराजा असे संबोधून सहानुभुतीचा ओघ स्वतःकडे वळवून घेता येतोच.
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
थ
थिटे मास्तर Sat, 08/12/2017 - 17:42 नवीन
ह्या धाग्यावर वर जाल तर माझि आणखि एक प्रतिक्रिया दिसेल तुम्हाला. काल आणखी कुठल्यातरी बी ग्रेडी ला देवगिरी च्या वैभवात आनखी काहितरी दिसल होत :)) अर पावन्या देवगिरी चे साम्राज्य कवा व्हुत... देवगिरी चा भुई कोट किल्ला कुठ हाय..खिलजी चे आक्रमन कवा झालते... दे ठोकुन काय बी कदिबी वाचलेल नसतांना. तुम्हि जे वाचता तेच तुमच्या लीखानात दिसते... तुम्हि वाचलेला ईतिहास पवारां पासुन सुरु होउन ...मुंबै च्या मोर्चात संपतो. मा.म. केकाटे
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 15:45 नवीन
तुमच्याच पारखी नजरेला बरा दिसून आला!
↩ प्रतिसाद: विशुमित
ध
धर्मराजमुटके Sat, 08/12/2017 - 17:31 नवीन
आपण भारतीय नेहमीच भुतकाळातच रमतो त्यामुळेच आपल्याला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असत नाही !
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 17:57 नवीन
बरोबर आहे । उदा. आता भूतकाळात रमणे, म्हणूनच मस्जित पाडुन मंदिर बांधने, बॉम्बे चे मुंबई नामकरण, वेदांचे दाखले देउन गोमांस राजकरण करुन, लोकांचा जीव घेणे। पद्मावती चित्रपटाचा सेट जाळणे .... अश्या सर्व गोष्टी आल्या
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मैत्र Mon, 08/14/2017 - 09:55 नवीन
बरोबर?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 14:00 नवीन
:)
↩ प्रतिसाद: मैत्र
ब
बांवरे Sat, 08/12/2017 - 18:26 नवीन
अभ्या. धन्यवाद. नवीन माहिती कळाली. मला शिकवलेल्या इतिहासानुसार सार्वजनिक गणेशोत्सवाचा वापर जनजागृतीसाठी लो. टिळकांनी केला.
म
मनिमौ Sat, 08/12/2017 - 18:51 नवीन
ला जोरदार अनुमोदन तस पाहिल तर आमचा आजोबा गणपतीच प्रणेता म्हणायला हवा सार्वजनिक गणेशोत्सवाचा. भाऊ रंगारी फार नंतरची गोष्ट आहे. पण ईतकी वर्षे रंगारी मंडळाने काहीच हरकत घेतली नाही ते का बरे
प
पगला गजोधर Sat, 08/12/2017 - 19:02 नवीन
आजोबा गणपति मंड़ल / कार्यकर्ते, यानी काही दावा केला का ? संदर्भ देता का प्लीज ? आजोबा गणपतिने सार्वजनिक उत्सव सुरु करण्या मागे कशाची प्रेरणा होती ? कोण होते पुढाकार घेणारे ? वाचायला आवडेल .
↩ प्रतिसाद: मनिमौ
स
सुबोध खरे Sat, 08/12/2017 - 19:11 नवीन
या धाग्याचा नक्की हेतू काय आहे?
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 13:59 नवीन
... नसते वाद उकरून काढणे,आणि जमलंच तर इतिहासाचे पुनर्लेखन.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा Sun, 08/13/2017 - 06:04 नवीन
चला, इतिहासाचे पुनर्लेखन करूया!
झ
झेन Sun, 08/13/2017 - 10:34 नवीन
आम्हाला पूर्वीच्या आक्रमण कर्त्यांबद्दल तेवढा राग नाही आज चिन, पाकिस्तानचा राग नाही, आजच्या काळात "चोटीकटवा" वर आम्ही विश्वास ठेवू पन जातीपाती, राजकीय पक्ष म्हनलं की तिच्या... एकदम एकमेकांच्या ऊरावर बसायला तयार.
ग
गामा पैलवान Sun, 08/13/2017 - 15:50 नवीन
पगला गजोधर,
"इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. त्यामुळे टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक नसून, फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे" या मंडलाच्या दाव्याला तुमचा पाठिम्बा आहे, असे दिसते.
यांत इतिहासाचं चुकीचं लेखन कसं काय? टिळकांच्या नावाने गणेशोत्सव सुरू झाला म्हणूनंच लोकप्रियता लाभली ना? भाऊसाहेब रंगारींना कोण विचारत होता? आ.न., -गा.पै.
प
पगला गजोधर Sun, 08/13/2017 - 19:28 नवीन
टिळकांच्या नावाने गणेशोत्सव सुरू झाला
कालचा गोंधळ बरा होता... बाकी तुमचें चालू दया _/\_
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 08/14/2017 - 09:28 नवीन
प.ग., त्याचं काये की जे मोठमोठे तत्त्वचिंतक होऊन गेलेत ना म्हणजे विवेकानंद, टिळक, जिद्दु कृष्णमूर्ती, इत्यादि; त्यांच्या लेखनातून एक गोष्ट ठळकपणे जाणवते. ती म्हणजे, आपण नवं काहीतरी सांगताहोत, अशी त्यांची स्वत:ची धारणा आजिबात नव्हती. ते जे काही बोलले ते अगोदर इतरांनी सांगितलेलंच होतं. फक्त ते ते प्रेषित जरा वेगळ्या आणि लोकांना पटेल अशा शब्दांत तीच तीच सत्ये परतपरत मांडत असंत. गणेशोत्सवात टिळकांचं योगदान काय आहे हे तुम्हाला कळले असेलशी आशा आहे. पटलं तर पहा, अन्यथा सोडून द्या. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 10:16 नवीन
पै, टिळक, कृष्णमूर्ति यांच्या लेखना बाबत, किंवा टिळकांचे प्रचार योगदान नाकारण्याच्या इथ विषयच नाहीये. तुमच्यासाठी पुन्हा विशद करु इच्छितो, की एकंदरीत बनवून देण्यात आलेले पब्लिक परसेप्शन व फॅक्ट, यांच्यात प्रथम दर्शनी तफावत आढळते आहे, आणि काय आहें नै, की पब्लिक परसेप्शनलाच पुढे इतिहास म्हणून ठसवन्यात काही भक्त लोक तरबेज आहेत. आता तरी धाग्यामधले उद्गम, तुम्हाला कळले असेल आशी आशा आहे. पटलं तर पहा, अन्यथा तुमचा अनअपडेटेड प्रचार प्रसार तसाच चालू राहुन द्या.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Mon, 08/14/2017 - 10:26 नवीन
भाषांतरकार ज्ञानेश्वरांबद्दल असंच म्हणायला हवं. कोण्या यकःश्चित भाषांतरकाराचा इतका उदोउदो?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Mon, 08/14/2017 - 10:28 नवीन
गीतेतली आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानातली अहिंसा देखिल लोक आपल्या नावाने चेपतात काय म्हणावं!!
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मराठी_माणूस Mon, 08/14/2017 - 08:21 नवीन
हा उत्सव पहील्यांदा बंद करण्याचा मान कोण मिळवणार ?
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 09:14 नवीन
कदाचित सुप्रीम कोर्ट ..... हु नोज़ !!!
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
पैसा Mon, 08/14/2017 - 10:27 नवीन
पण हे काय म्हणतात बघा, Shree Sarvajanik Ganeshotsav Sanstha had also hosted freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak in 1901. Tilak had first started Ganeshotsav celebrations in Maharashtra. The Sanstha is known as the pioneer of Mumbai’s Ganeshotsav. The residents of Keshavji Naik Chawl in Mumbai and Shri Bhau Rangari, Shri Khajgiwale, and Shri Ghotwadekar in Pune had first started celebrating Ganeshotsav publicly in 1893, after an appeal by freedom fighter and statesman Bal Gangadhar Tilak. The celebration was begun to provide a platform for national awakening, uniting people and social education. Lectures by eminent personalities and performances by ‘Mela’, a group of singers, including men and women, were the programmes which used to be organised during the festival.
प
पैसा Mon, 08/14/2017 - 10:33 नवीन
सोलापूर चा आजोबा गणपती त्याहून जुना असेल तर या उत्सवाद्वारे लोकांना एकत्र करता येईल ही प्रेरणा लोकमान्यांनी सहज घेतली असेल. निदान शंभर सवाशे वर्षांनी कोणीतरी एखाद्या ट्रोल आयडीप्रमाणे आपण उत्सव हायजॅक केल्याचा आरोप करील हे त्यांना माहीत असते तर बिचारे या लोकजागृती, असंतोष फैलावणे वगैरे भानगडीत पडलेच नसते. गणित आणि खगोलशास्त्र हे त्यांचे पाहिले प्रेम होते. त्याचे अध्ययन अध्यापन करत त्यांनी गप्प बसायला हवे होते. टिळकांचं चुकलंच ते!
↩ प्रतिसाद: पैसा
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 10:50 नवीन
ताई, टिळकांचे योगदान नाकारण्याच्या इथ विषयच नाहीये. तुमच्यासाठी पुन्हा विशद करु इच्छितो, की एकंदरीत बनवून देण्यात आलेले पब्लिक परसेप्शन व फॅक्ट, यांच्यात प्रथम दर्शनी तफावत आढळते आहे.
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 08/14/2017 - 11:20 नवीन
इंटरनेट वर कित्येक समकालीन उल्लेख पुरावे उपलब्ध आहेत. http://changeforbetter.org.in/briefing/413-the-making-of-ganesh-utsav उदा. हा एक लेख. थोडे थांबायची आणि न चिं केळकर यांच्या टिळक चरित्रावर विश्वास ठेवायची तयारी असेल तर त्यातले गणेशोत्सवाबद्दलचे स्क्रीनशॉट्स देऊ शकेल. पण माफ करा, मला असल्या ट्रोल सदृश लिखाण आणि वादात आता काही रस राहिला नाही. तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचं असेल तर समकालीन चरित्रे, लिखाण यांचा अभ्यास करा ही विनंती. टिळकांनी उत्सव हायजॅक केला वगैरे भाषा मला पेलवणारी नाही तेव्हा मी इथून रजा घेणे योग्य. पुण्यातल्या एका इतिहास संशोधकाने लोकसत्ता ला सांगितले की टिळकांनी सांगितल्यावरून 1893 ला खाजगीवाले घोटवडेकर रंगारी, नातू, पटवर्धन, दगडूशेठ हलवाई यांच्या पुढाकाराने पुण्यात 3 ठिकाणी आणि मुंबईत केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. पण या संशोधकाने आपले नाव घेऊ नका कारण आपण लोकांना भितो असेही म्हटले. आम्ही त्या भिणाऱ्या लोकांपैकीच एक आहोत. तेव्हा गणेशोत्सव ब्रिटिश सरकारने सुरू केला असे म्हटलेत तरी मला काही प्रॉब्लेम नाही. मी तेव्हा नव्हते हे एक आणि आता या उत्खननातून अस्मिता गळवे सुजण्यापालिकडे काहीही साध्य होणार नाही. अजून जरा शोधले तर ग्वाल्हेर येथेही 1891 पूर्वी गणेशोत्सव सुरू होता असे दिसते. तेव्हा असे अजून काय उल्लेख सापडतात ते कृपया शोधा. शुभेच्छा!
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अभ्या.. Mon, 08/14/2017 - 13:22 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: पैसा
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 13:25 नवीन
धन्यवाद, नवीन माहिती, मुद्देसूद पुढे आणली.
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पैसा Mon, 08/14/2017 - 13:43 नवीन
धन्यवाद! शक्य असेल तर श्रद्धानंद समाजाच्या सोलापुरातील इतिहासाबद्दल कधीतरी जरूर लिहा.
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मैत्र Mon, 08/14/2017 - 11:10 नवीन
१ पुण्यात बहुतेक लोकांना भाऊ रंगारी मंडळ माहिती आहे. पहिले पाच मानाचे गणपती आहेत तसे शेवटी तीन आहेत भाऊ रंगारी, मंडई आणि दगडूशेठ. हे कित्येक दशके चालू आहे.आणि हा मान असतो. २. गणेशोत्सवाला शंभर वर्षे झाली तेव्हा मी एका उपक्रमात सहभागी होतो. केसरी वाड्यात मोठे ग्रंथालय आहे तिथे बसून माहिती शोधली होती. जुनी वृत्तपत्रे आणि पुस्तके होती. तेव्हा स्मरणिकेत स्पष्ट लिहिले होते की भाऊ रंगारी यांनी प्रथम गणपती बसवला. पुढच्या वर्षी टिळकांनी विंचूरकर वाड्यात गणपती बसवला आणि त्याला उत्सवी स्वरूप दिले. मग त्यांच्या पुढाकाराने मंडळे वाढली. ही माहिती केसरी वाड्यात मिळाली. म्हणजे इतिहास बदलला वगैरे धादांत खोटा कांगावा आहे. पुण्यात बहुतेक लोकांना हे माहिती आहे. नवीन शोध काही नाही. गणपती बघत फिरताना असंख्य लोक आवर्जून भाऊ रंगारी मंडळाची मूर्ती बघायला जात असत. तरीही गणेशोत्सवाचे प्रणेते टिळक मानले जात, त्यांच्या भूमिका आणि उद्देशामुळे. शतक महोत्सवात काही वाद झाला नव्हता. मग आता काय कारण? तेव्हा कारभारी कलमाडी होते. आता मुक्ता टिळक आहेत. टिळक परिवार यापूर्वी कायम कॉंग्रेस मध्येच आणि तेही मोठ्या पदावर राहिला आहे. त्यामुळे टिळक, गणेशोत्सव याचा आणि धाग्यावर बळंच ओढून आणलेल्या नागपूरचा काहीही संबंध नाही. टिळकांनी उत्सव सुरू केला नाही असे ठाम मत असेल तर पुरावे द्यावेत. १८९३-९४ चे पुरावे आहेत.
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 11:31 नवीन
धन्यवाद, अतिशय मुद्देसुद, विषयला धरुन, मला ब्रिगेड़ी/ट्रोल, अशी दूषणे न देता, मिळालेला प्रतिसाद आहे हा. दूसरी बाजू समजावून सांगितल्या बद्दल बिग थैंक्स.
↩ प्रतिसाद: मैत्र
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 11:50 नवीन
तुमच्या वरील प्रतिक्रीयेनुसार
स्मरणिकेत स्पष्ट लिहिले होते की भाऊ रंगारी यांनी प्रथम गणपती बसवला..............
परंतु वृत्तपत्रातील बातमी नुसार , महापौरांचे वेगळेच मत आहे ...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत. त्यासाठी ऐतिहासिक पुस्तकात असलेले संदर्भ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने तपासून पहावे, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष नसून 126 वे वर्ष असल्याचे सरकारी कागदपत्रांमध्येच नमूद असताना शासन 125 वे वर्ष साजरे करत आहे, हा विरोधाभास असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना महापौर म्हणाल्या, लोकमान्य टिळक हेच निःसंशय सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत.
महापौरांनी कदाचित केसरी वाड्यात असलेली (जिचा उल्लेखास आपण वरील प्रतिक्रियेत केलाय) कागदपत्रे अभ्यासली नसावीत. त्या समोरच्याच पार्टीला कागदपत्रे तपासा असा जाहीर सल्ला देत आहेत. आणि आम्ही मिपावर हे नम्रपणे सांगू इच्छितो, कि तरीही त्यांना कोणी ट्रोल वैगरे संबोधू नये...
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Mon, 08/14/2017 - 12:00 नवीन
भाऊ रंगारी, खाजगीवाले आणि तिसरे नाव घोटावडेकर (तिसरे नीट लक्षात नाही. कर होते नक्की) ही नावे आहेत . पण त्याला सार्वजनिक स्वरूप नव्हते. ते टिळकांनी दिले. हेही स्मरणिकेत लिहिले होते. टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक किंवा प्रणेते आहेत. पहिला गणपती बसवणारे नाहीत. ही दोन्ही विधाने खरी आहेत. त्यामुळे वाद नाहीये. उकरून काढू नका. हवे असल्यास केसरी वाड्यात जाऊन शोध घ्यावा. मुक्त प्रवेश असतो.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ज
जयंत कुलकर्णी Mon, 08/14/2017 - 12:15 नवीन
संपादक महाशय, या असल्या धाग्यांनी मिपावरचा वावर कमी झाला आहे. ज्या गोष्टींची समाजाला गरज नाही असे वाद उकरून समाज प्रबोधन करतोय असे भासवून इतरांच्या डोक्याला ताप द्यायचा या वृत्तीला काय म्हणतात हे माहीत नाही पण हा नतद्रष्टपणा आहे हे निश्चित. काव्य शास्त्र विनोदेन हा मिपाचा उद्देश असफल होतो आहे की काय असा मला आता संशय येऊ लागला आहे. मला वाटते काथ्याकूट हा विभाग बंद केला तरी चालण्यासारखं आहे. संपादक मंडळांनी हे असले खोडसाळ धागे त्वरित उडवावेत. एक दोन सभासद कमी झाले तरी हरकत नाही. कारण मी अनुभवले आहे या असल्या धागाकर्त्यांच्या सगळ्या प्रश्नाला पुराव्यासकट उत्तरे दिली तरी ते मान्य करत नाहीत कारण त्यांचा छुपा हेतू वेगळाच असतो. या धाग्यावर तो साध्य झालाय असे मला वाटते.
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 13:22 नवीन
संपादक महाशय, जुने पुराणे झडून जावे,
ही वाटे पानझड जरी,ती असते चाहूल वसंताची, बहरणे आणिक झडणे,ही तर रीत निसर्गाची चुकला कुणास नियम निसर्गाचा सांगावे अन,पुन्हा बहरण्यासाठी झाडाने झडून जावे @कवयित्री -मंजिरी पाटील,पुणे
या ओळींतून प्रेरणा घेऊन मी तर असे म्हणीन की अन,पुन्हा बहरण्यासाठी मिपाझाडाने झडून जावे, जख्ख पिकली, जुनी पुराणी, पाने ही झाडून जावो, नवयुगाच्या नवं विचारांनी मिपा पुन्हा बहरो ...
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
म
मैत्र Mon, 08/14/2017 - 13:37 नवीन
दीनानाथ मंगेशकर आणि मूळव्याध याची आठवण झाली.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
शैलेन्द्र Mon, 08/14/2017 - 13:50 नवीन
बरेचसे डुप्लिकेट आय डी झडले तरी मजा येईल, डुप्लिकेट आय डी या प्रकाराने मिपाचे फार नुकसान केलंय.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 13:59 नवीन
आय अग्रि
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 13:58 नवीन
संक्षींसोबत जशी कठोर पण गरजेची कार्यवाही केली गेली तशी करायची गरज पुन्हा निर्माण झालीये असे वाटते.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 14:03 नवीन
सर्वसमावेशक प्रकारच्या धागा आयडी यांच्यावर कारवाई व्हावी, एकांगी पूर्वग्रहदूषित कारवाईने घेट्टोकारण होईल.
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 15:16 नवीन
नाही का?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ब
बबन ताम्बे Mon, 08/14/2017 - 13:45 नवीन
शिवाजी महाराज - काही रेखाटने या धाग्यात मी खालील प्रतिक्रिया लिहिली आहे तीच इथे देत आहे. "आज जातीजातीत द्वेष आहे. संधीसाधू पुढारी त्यात तेल ओतत आहेत. मेडिया फालतू पुढाऱ्यांना आणून आगीत तेल ओतणाऱ्या चर्चा घडवून आणत आहेत. समाजाला योग्य दिशा दाखवणारा आज कुणीच दिसत नाही. मिपावर देखील चांगले , कसदार साहित्य, कला फार कमी बघायला मिळायला लागलेय. त्याऐवजी द्वेषमुलक चर्चा जास्त दिसतात."
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 13:56 नवीन
?
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Mon, 08/14/2017 - 14:35 नवीन
शंभर सव्वाशे , दोनशे ,तीनशे वर्षांपूरवीचं काहीतरी खोदून काढायचं आणि समाजमने कलुषित करायची हे उपदव्याप महाराष्ट्रात खूप वाढलेत हल्ली. फेसबुकवर नितेश राणेंचे भाषण पाहिले. वा वा, काय ते विचार आणि काय ती प्रगल्भता! हे असले पुढारी महाराष्ट्राला भविष्यात कुठे नेऊन ठेवणार आहेत हे खरोखर काळजीचे कारण आहे.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 14:42 नवीन
सहमत, नितेश राणे, कोकाटे, प्रवीण तोगडिया, अभय वर्तक, झाकीर नाईक, नथुराम इ इ सर्वच एका माळेचे मणी.
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 15:21 नवीन
नक्की कोणती माळ आणि हे मणी कसे ओवलेत ते?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Mon, 08/14/2017 - 14:40 नवीन
जयंतरावांशी मी पूर्ण सहमत आहे. या धाग्याचा मूळ हेतू काय आणि शेवटी निष्कर्ष काय निघाला हे पहा. सर्वात पहिला गणेशेत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला असे कुणाचेही म्हणणे नव्हते तर त्यांनी उत्सवाला "लोकजागृतीसाठी" सार्वजनिक स्वरूप दिले असाच इतिहास आहे आणि तोच शिकवला गेला होता किंवा जात आहे. केवळ खोडसाळ पण किंवा दुसराच अंतर्गत हेतू ठेवून धागा काढला गेला असेच वाटते.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा