क्रिकेट
क्रिकेट
इंग्रज गेले पण गुलामगिरी ची सवय भारतीयांत भिनवून.
याचं ऊत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट.
बाकी जगात नाही पण भारतीय ऊपखंडात हा खेळ अगदी डोक्यावर घेतला जातो.कामधंदे सोडून क्रिकेट मँच बघत बसणारे फक्त नी फक्त भारतातच सापडणार. जगातले ईन मीन अकरा देश हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. पण भारतीयांच्या बूध्दीवर काय गारूड केलंय ह्या खेळाणे देव जाने. ह्याचा फायदा Bcci सारख्या संस्थांनी उचलुन तिथल्या अधीकार्यांनी रग्गड कमाई केली. व करताहेत. आम्हा 125 कोटी भारतीयांना आँलीम्पीक मध्ये सुवर्णपदक न मिळाल्याची, फुटबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा न भेटल्याची कोणतीच खंत नसते. पण भारत पाकिस्तान बरोबर हारला तर......हाय हाय. जसं स्वताच्या घरात कोणी मेल्यासारखं सुतंक पाळतील. बर ठीक आहे समोर पाकिस्तान होता म्हणून वाईट वाटलं वैगेरे पण ईतर खेळात पाकिस्तान सोबत हारल्यावर कसे ईतकं दुःख होत नाही???
मागे मारीया शारापोव्हा who is sachin tendulkar?? बोलल्यावरून तर कहरच झाला. समाजमाध्यमात यथेच्छ शिव्यांची लाखोली वाहिली गेली. पण क्रिकेट ला भारतीय उपखंडा बाहेर कोणी कुत्र विचारत नाही ह्यात तीची काय चुकी???...
शेवटी अतीक्रिकेट मुळे भारतात ईतर खेळांकडे दुर्लक्ष होतंय का?
आणि ह्या दुर्लक्षा मुळे 125 कोटी लोकसंख्येचा भारत आँलम्पीक सारख्या जागतीक स्पर्धांमध्ये पदकं मिळवायला कमी पडतोयं का?? मीपाकरांच मत??
प्रतिक्रिया