मि मराठि शूध्धलेखन शीकावे का?
[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही :) ]
कायप्पा व मि.पा. वरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते.
शुद्धलेखनाच्या अभावाला कारणे बरीच असतील (उदा. लेखक शुद्धलेखनाविषयी अनभिज्ञ असणे, शुद्धलेखनाविषयी तिरस्कार असणे, ट॑कनातील बारकावे माहित नसणे, मराठी स्पेल-चेकची सुविधा उपलब्ध नसणे वगैरे...) पण तरीही असे लेखन वाचताना वाचकाचा रसभ॑ग तर होतोच पण पुढे पुढे वाचकही अशुद्धलेखनाबाबत बेफिकिर व अ-स॑वेदनशील बनत जातो.
सध्याच्या सोशल मिडियावरच्या मराठी लेखनात वारंवार अशुद्ध लिहिल्या जाणार्या शब्दा॑ची जंत्री फार मोठी आहे, पण वानगीदाखल काही नमुने देत आहे:
मि, हि, तु, हीला, तूला, खुप, दुध, चुक, ईतर, ईथले, ईतके, ईकडे, वैगरे ( मी, ही, तू, हिला, तुला, खूप, दूध, चूक, इतर, इथले, इतके, इकडे, वगैरे च्या ऐवजी)
भविष्यात लिखित मराठी भाषेचे स्वरूप व अवस्था काय असेल ते भाषाशास्त्रज्ञ कदाचित सा॑गू शकतील, पण शुद्धलेखनाबद्दल मराठी लेखक/वाचक असेच बेपर्वा राहिले तर प्रमाणित मराठी लेखन तेव्हा नामशेष झाले असण्याची शक्यता बरीच आहे.
प्रतिक्रिया