Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोलशील तर मरशील...

श — शिव कन्या, Tue, 09/05/2017 - 21:24
बंदुकीची गोळी कशी गोल गोल गोल गोल रक्ताचा रंग कसा लाल लाल लाल लाल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.... पैशाचा झोल कसा गोल गोल गोल गोल सत्तेचा माज कसा खोल खोल खोल खोल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.. सोनूची केस कशी वायलंट वायलंट सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट सोनू, बोलशील तर मरशील मरशील..... सोssssनूssss शिवकन्या #GauriLankesh etc....

प्रतिक्रिया द्या
46802 वाचन

💬 प्रतिसाद (79)
म
मोदक Fri, 09/08/2017 - 18:32 नवीन
* भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळला याची व्हिडीओ क्लिप किंवा त्या नेत्याचे भाषण उपलब्ध आहे का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मोदक Fri, 09/08/2017 - 13:11 नवीन
काय राव गुरूजी... दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या मानवी हक्कांची काळजी करणारे हे विचारवंत लोक कधी सैनीक आणि स्फोटात मरणार्‍यांच्या मानवी हक्कांची काळजी करतात का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 13:38 नवीन
म्हणून तुमच्यामते ही हत्या जस्टिफाईड आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 09/08/2017 - 18:09 नवीन
हत्या जस्टीफाईड आहे असे मी म्हणालो आहे? गुरूजी दुटप्पीपणाविषयी बोलत आहेत आणि मीही त्याच दुटप्पीपणाविषयी बोलत आहे. असे असताना तुमच्या वैयक्तीक स्वार्थासाठी रेटत असलेला दांभीक अजेंडा आमच्या जीवावर ओढू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/07/2017 - 15:27 नवीन
प.ग., खोट्या बातम्यांचा भांडाफोड करणाऱ्या गौरी लंकेश यांना सलाम. बाबरी नामक कोणतीही मशीद नसतांना सारखा बाबरी म्हणून उल्लेख करणे ही सुद्धा फेक न्यूजच आहे ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर गुरुवार, 09/07/2017 - 17:34 नवीन
तुमच्यामते बाबरी संदर्भात non-fake-version काय पाहिजे होत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/07/2017 - 19:00 नवीन
प.ग., हिंदूंनी जुनं राममंदिर पाडलं. मुस्लिमांनी उगीच गोंधळ घालू नये. हे खरं व्हर्शन आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 09/08/2017 - 04:08 नवीन
हिंदूंनी जुनं राममंदिर पाडलं.
होय हे तुमच वर्शन बरोबर आहे, लिबरहान आयोगापुढे जुन्या नव्या मंदिरातील सर्वच पुजार्यांनी तसाच जबाब दिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मामाजी गुरुवार, 09/07/2017 - 18:23 नवीन
प ग साहेब, गेल्या दोन वर्षात (कलबुर्गी व गौरी यांच्या हत्यांच्या मधल्या काळात) कर्नाटकात एकूण 12 संघ व भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या त्या वेळी या बिगुलातून पिचक्या पीपाणी चा देखील आवाज निघाला नाही. तसेच या दरम्यान देशभरात 22 पत्रकारांच्या हत्या झाल्या, बंगाल मध्ये अनेक दंगे झाले व केरळ मधले हत्याकांड घडत असताना या बिगुलातून ओशो आणि मुल्ला नसरूद्दीन याच्या सुरस आणि चमत्कारिक कथांचा अखंड रतिब घातला जात होता. त्यामुळे गौरी यांच्या हत्येनंतर अत्यंत कर्कश्य आवाजात केकाटणार्या या बिगुलावर फक्त आपल्यासारखी विद्वान व्यक्तिच विश्वास ठेवू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मोदक गुरुवार, 09/07/2017 - 20:41 नवीन
सोयीचे असते ते दांभीकपणे उचलायचे असते. इतका विचार केला तर कसे होईल..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 20:03 नवीन
मी आधी लिहिल्याप्रमाणे ही तथाकथित निधर्मी, पुरोगामी, विवेकवादी, विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी इ. मंडळी (म्हणजेच निधर्मांध मंडळी) आधी मरणार्‍याचा व मारणार्‍याचा धर्म बघतात व ते बघून ठरवितात की बेंबीच्या देठापासून भेसूर आवाजात किंचाळायचे का डोक्यावर पांघरूण ओढून गाढ झोपी जायचे. स्वतःला निधर्मी, मानवतावादी, धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍या या मंडळींचे वर्तन प्रत्यक्षात अत्यंत जात्यंध व धर्मांध असते व कोणाच्याही संबंधात कोणतीही कृती करण्याआधी त्या व्यक्तीचा धर्म, जातपात इ. गोष्टीच सर्वप्रथम यांच्या विकृत मेंदूत घुसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
व
वरुण मोहिते Fri, 09/08/2017 - 06:26 नवीन
इतके नमूद केले तरी ठीक आहे ना ?? एकांगी बोलणाऱ्या भाजप समर्थकांमुळे हा प्रश्न अजून वाढतो . दिवसाढवळ्या हत्या होते आणि त्यावर राजकीय किस पाडत बसतात हे योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 09/08/2017 - 07:51 नवीन
एकदम अयोग्य आहे.. तुम्ही प्रश्न वाढतो ते विश्लेषण बरोब्बर केलेत. मात्र "प्रश्न तयार का होतो??" हा मुद्दा सोयीस्कररीत्या का टाळत आहात..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ग
गामा पैलवान Fri, 09/08/2017 - 16:31 नवीन
लोकहो, गौरी लंकेश यांनी रास्व संघाच्या स्वयंसेवकाची हत्या झाल्यावर चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार नामे लेख लिहिला होता. अधिक माहिती : http://www.lokmat.com/national/had-not-been-written-against-sangh-today-gauri-would-have-survived-bjp-mla/ मग गौरी लंकेश यांची हत्या झाल्यावर कुत्र्याची मौत म्हणून हिणवावे का? चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 09/08/2017 - 19:57 नवीन
संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार असे लिहिणे किंवा गौरी लंकेशच्या हत्येनंतर कुत्र्याची मौत असे लिहिणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच चूक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
य
यशवंत पाटील Fri, 09/08/2017 - 16:43 नवीन
औघडय. इथं काय लिहायला पण इतकं औघड झाल्यैगत आहे का काय.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 09/08/2017 - 22:31 नवीन
लोकहो, कर्नाटकातलं बाबा बुदनगिरी हे स्थान मूळचं दत्तपीठ असून ते मुस्लिमांनी बळकावलेलं आहे अशी हिंदूंची धारणा आहे. त्यानुसार हिंदूंचं आंदोलन चालू होतं. या आंदोलनात गौरी लंकेश यांनी मुस्लिमांची बाजू घेतली. स्वत: नास्तिक असतांना ही बाई देवाच्या उठाठेवी कशाला करंत होती? शिवाय या बाईस लिंगायत समाजाने उर्वरित हिंदूंपासून वेगळं होण्यात रस होता. या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या बाईची हिंदूंनी का म्हणून पत्रास बाळगावी? स्वत: नास्तिक आहे तर धर्माच्या बाबतीत लुडबूड कशाला? भारताला अस्थिर करायलाच ना? मग ही बला स्वकर्माने टळल्याचा आनंदोत्सव का साजरा करू नये? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 09/09/2017 - 01:46 नवीन
गुड रीडन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Sat, 09/09/2017 - 10:44 नवीन
गौरी लंकेश यांचे भूतपुर्व पती चिदानंद राजघट्टा हेही प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत आमेरीकेतून लिहित असतात. शिवाय त्यांचे भाऊही पत्रकार आहेत. त्यांच्या अलिकडील लेखातील काही मुद्दे लक्षात घेण्याची गरज असावी गौरी लंकेश यांनी त्यांचा दिल्ली विद्यापीठातला कुणी भूतपुर्व मित्र नक्षलवादी झाल्यामुळे काही प्रसंगी नक्षलवाद्यांची अनुचित पद्धतीने समर्थन केले तरीही वैचारीक दृष्ट्या त्या लोहीयावादी म्हणजे फार-फारतर लालु मुलायमाम्च्या समाजवादी-जनतादल विचारात बसणार्‍या असाव्यात पण नक्षलींच्या हिंसाचाराचे सरसकट समर्थन करणार्‍या नक्षलवादी नव्हे. वस्तुतः काही नक्षलवाद्यांना त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडण्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेले दिसतात. त्यांचे भावाच्या मता प्रमाणे नक्षलवाद्यांच्या सहकार्‍यांना पण राजकीय दृष्ट्या आशात त्यांच्या प्रकट संघ विरोधामुळे त्यांची आणि काँग्रेसची परस्पर मदत पोहोचत होती का हा वेगळ्या अभ्यासाचा मुद्दा असावा. रिलिजीअस हार्मोनी बद्दलच्या सक्रीयतेतील त्यांचा उद्देश्य चांगला असला तरीही हार्मोनीसाठी सर्व बाजूंना सांभाळून घ्यावे लागते सर्वांचीच बाजू समजून घ्यावी लागते. इथे गौरी लंकेश संघीष्टांची बाजू चूक असो अथवा बरोबर ऐकण्याचे दूर चड्डीवाले म्हणून हिणवण्यात धन्यता मानत होत्या हे त्यांच्या माजी पतींच्या लेखावरुन दिसते. दुसरे, रिलिजीअस हार्मोनी म्हणजे कोणत्याही एका पक्षाचे लांगुलचालन नव्हे एका पक्षाचे लांगुलचालन केले की दुसरापक्ष नाराज होणार हे निश्चित होते. म्हणजे एकुण हा विषय हाताळण्यासाठी लागणारी वैचारीक प्रगल्भता नव्हती केवळ एका पक्षाच्या राजकीय विरोधासाठी दुसर्‍या राजकीय पक्षांची हुजरेगिरीपलिकडे त्यातून साध्य काही नव्हते. त्यांची जी काही हिंदूत्ववाद विरोधी भूमिका असेल त्याने त्या प्रभावित असतील निर्मात्या नव्हेत. त्यांच्या वैचारीक भूमिकेची पहिली बाजू त्यांच्या पित्याकडून ? आल्याचे दिसते ज्यांनी प्रस्थापित विरोधी द्राविडी राजकारणाचा दृष्टीकोण स्विकारला होता का काय कोण जाणे पण त्यांचे स्वतःचे नाव लंकेश असणेच नव्हे तर मुलाचे नाव इंद्रजित ठेवण्यावरुन तसेच वाटते. त्या शिवाय त्यांच्या रॅशनल विचारांची भूमिका नॅशनल कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातूनही झाल्याचे चिदानंद राजघट्टा यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे. म्हणजे वैचारीक भूमिका प्रस्थापित विरोधी २०व्या शतकातील द्राविडी राजकारण , नॅशनल कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातून आली असेल तर केवळ एका व्यक्तीला संपवून काय साधणार आहे. त्यांच्या हत्येत कुणाचा हात असेल याचा गेसवरुन हिंदूत्ववाद्यांना पुराव्या अभावी टिका करण्यात हशील नाही. पण त्यांच्या हत्येने त्यांच्या मारातील वैचारीक अडसर दूर झाला असे काही हिंदूत्ववादी विचार करत असतील तर कितपत सयुक्तीक आहे ? विचारांचा विरोध विचारांनी करावयाचा असतो कायदा हातात घेऊन नव्हे हे साधे तत्व आहे. व्यक्तीगत टिका असोत अथवा हत्या या नकारात्मक बाबी आहेत, त्याने काही झालेच तर समाजातील त्यांच्या विचारांना आणि समर्थकांना बळकटी येते, त्यांच्या विचारातील तार्कीक उणिवा पुढे आणणे अधिकच कठीण होते आणि या अर्थाने तात्कालीक नकारात्म्क कृती स्ट्रॅटेजिकली दीर्घकालिक नुकसानीची असू शकते. पण ज्यांना दूरचा विचार समजण्याची तयारी, कुवत आणि संयम नसतो ते त्यांच्याच स्वकीयांचे नुकसानही करत असू शकतात. पण असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Sat, 09/09/2017 - 10:51 नवीन
त्यांचे भावाच्या मता प्रमाणे नक्षलवाद्यांच्या सहकार्‍यांना पण मुख्यधारेत आणल्यामुळे नक्षलवाद्यांचा कार्यकर्त्यात घट होऊन त्या नकोशा झाल्या असु शकतात . असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 09/09/2017 - 10:47 नवीन
स्वत: नास्तिक आहे तर धर्माच्या बाबतीत लुडबूड कशाला? भारताला अस्थिर करायलाच ना?
एकतर त्या नास्तिक नव्हे अज्ञेय होत्या असे राजघट्टांच्या लेखावरुन वाटते. सामाजिक समरसते बद्दलतर संघपण बोलतो त्याने भारत अस्थिर होतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 14:52 नवीन
माहितगार, संघाच्या सामाजिक समरसतेने भारत अस्थिर होतो? खरंच? की आपलं उगीच काहीतरी ठोकून देताय? संघ तर गेल्या ९० वर्षांपासून कार्यरत आहे. संघामुळे भारताचे किती तुकडे पडले? संघामुळे भारतात किती दंगली झाल्या? द्राविडी चळवळीने भारत तोडून वेगळं द्रविडीस्थान मागितलं होतं. हे पण संघाचंच अपत्य का? खलिस्तानी चुकार शिखांनी वेगळा देश तोडून मागितला होता. यांच्यासोबत संघाचं नाव औषधालाही सापडंत नाही. याउलट डाव्या चळवळीतल्या नेत्यंचे नक्षल्यांशी खुलेआम संबंध आहेत. नक्षली भारत तोडायला निघालेत हे सर्वांना माहित आहे ना? कुठूनतरी ओढूनताणून संघावर देश तोडल्याचे आरोप करायचे, यापलीकडे तुमच्या युक्तिवादात दम दिसंत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 09/09/2017 - 16:13 नवीन
गापै आपण माझे विधान भावनांच्या भरात नीट वाचले नाही अथवा अन्वयार्थ लावताना आपली गल्लत होते आहे. माझ्या " सामाजिक समरसते बद्दलतर संघपण बोलतो त्याने भारत अस्थिर होतो का ? " याचा अर्थ जसा "संघाच्या सामाजिक समरसते बद्दल बोलण्याने देश अस्थीर होत नाही" तसेच सामाजिक समंजसतेचा आग्रह नास्तीकांनी जरी धरला तरी भारत अस्थीर बनण्याचा प्रश्न येत नाही. (इथे मी त्यांच्या धार्मिक सामंजस्यत्वाच्या भूमिके बद्दल बोलतो आहे. मी गौरी लंकेशांच्या त्यांच्या संघ-भाजपा विरोधाच्या भरात नक्षल मित्राचे किंवा जे एन यू आगाऊ अप्पांची तळी उचलण्याचे समर्थन करत नाही हे अधोरेखीत करतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 14:58 नवीन
श्रीगुरुजी,
संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार असे लिहिणे किंवा गौरी लंकेशच्या हत्येनंतर कुत्र्याची मौत असे लिहिणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच चूक आहेत.
तुमच्या अंगभूत चांगुलपणामुळे तुम्ही दोन्ही चूक म्हणंताहात. मात्र माझं मत वेगळं आहे. मी माझा चांगुलपणा केवळ भारताच्या हितासाठी राखून ठेवला आहे. त्यामुळे भारताचे तुकडे पाडणारी कुत्रीण स्वत:च्या मौतीने मेलेली मला मान्य आहे. याउलट भारत बलशाली व्हावा म्हणून झटणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्येस चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार म्हणणे निषेधार्ह आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 09/09/2017 - 16:31 नवीन
त्यामुळे भारताचे तुकडे पाडणारी कुत्रीण स्वत:च्या मौतीने मेलेली मला मान्य आहे.
गापै तीने कायद्यांचे उल्लंघन केले असेल तर त्याला कायदेशीर न्यायालयीन मार्गाने इलाज योजावयास हवा. आपण कायदा हातात घेण्याचे समर्थन कसे करता हे अद्याप उमगलेले नाही. ( मी कम्यूनीस्टांनी केलेल्या संघ कार्यकर्त्यांच्या हत्त्यांचेही समर्थन करत नाही हे ही स्पष्ट नमूद करतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 15:29 नवीन
मेल्या म्हशीला मणभर दूध : http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/my-friend-and-first-love-gauri-lankesh-was-the-epitome-of-amazing-grace/articleshow/60436982.cms तर अर्धमेल्या म्हशीला वीस शेरांपर्यंत न्यायला हरकत नाही : http://www.lokmat.com/national/security-protection-sonia-gandhis-security-has-been-missing-three-days/ -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 09/09/2017 - 16:04 नवीन
चिदानंद राजघट्टांच्या लेखाचा मराठी अनुवादाचा दुवा दिलात ते बरे केलेत त्यातूनच उधृत करतो. त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात काम केले पण श्रद्धेबद्दल आदरही ठेऊन असत असे खालील वाक्यावरून लक्षात येते.
.....आपल्या कुटुंबीयांचे, मित्रमंडळींचे विचार, समजुती आपल्याला भलेही मान्य नसतील त्यांना कधी दुखवायचं नाही. आपली तारुण्यातील उर्मी त्यांच्या श्रद्धेच्या आड येऊ द्यायची नाही, असा संकल्पच आम्ही केला होता.... हा संकल्प आमच्या नात्याला बांधणारा एक अतूट धागा झाला होता. त्यामुळंच पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात आणि घटस्फोटानंतरही २७ वर्षे आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र राहिलो.
खालील वाक्यात उल्लेख अज्ञेयवादाचा आहे नास्तिकतेचा नाही.
....भारतातील बुद्धीप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी लोक येथील अति-धर्मांध लोकांच्या निशाण्यावर आहेत, हे मला इथं सुचवायचं आहे...
गौरी लंकेशाचे सोडून द्या आणि नास्तिक व्यक्ति चांगल्या हिंदू असू शकतात या बद्दल विवेकानंदांची विधाने मी मागच्या मिपा धाग्यातून उधृत केलेली आहेत. आपण सरसकट सर्व नास्तिकांना दोष देण्याची आप्णास सवय नाही ना अशी सवय योग्य हिंदूत्वात मोडते आहे का हे आपण स्वतः तपासण्याची गरज आहे किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 17:41 नवीन
माहितगार,
सरसकट सर्व नास्तिकांना दोष देण्याची आप्णास सवय नाही ना अशी सवय योग्य हिंदूत्वात मोडते आहे का हे आपण स्वतः तपासण्याची गरज आहे किंवा कसे.
लेखातलं शेवटून दुसरं वाक्यं एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतं. त्यात लेखकाने तिला हिंदुत्वविरोधी व धर्मनिरपेक्ष आणि इतर अनेक ही लेबलं लावल्याचं नमूद केलं आहे. हिंदुत्वाचे विरोधक नेमके सेक्युलर (मूळ इंग्रजी लेखात हाच शब्द असावा असं गृहीत धरतो) कसे निपजतात? हिंदुत्वाचे प्रायोजक नि:पक्षपाती का असू शकंत नाहीत? ज्याप्रमाणे सर्व नास्तिकांना दोष देणं योग्य नाही, त्याप्रमाणे हिंदुत्वास सरसकटपणे पक्षपाती ठरवणं योग्य नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गामा पैलवान Sat, 09/09/2017 - 17:22 नवीन
माहितगार, १.
अथवा अन्वयार्थ लावताना आपली गल्लत होते आहे.
याबद्दल तुमची क्षमा मागतो. २.
इथे मी त्यांच्या धार्मिक सामंजस्यत्वाच्या भूमिके बद्दल बोलतो आहे.
या भूमिकेत मलातरी समंजसपणा दिसला नाही. लिंगायतांना हिंदूंहून वेगळं काढण्यात बाईंना एव्हढा का रस होता? हेतू शंकास्पद आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा