Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पुढील लोकसभेसाठी काँग्रेसकडे असलेले पर्याय..

म
मराठी कथालेखक
Wed, 09/27/2017 - 13:25
🗣 101 प्रतिसाद
राजकारणातला माझा अभ्यास दांडगा नाही. पण सध्या देशातले उलट सुलट मतप्रवाह बघितल्यास निदान काही प्रमाणात तरी मोदी सरकार विरोधात जनमत तयार होत आहे असे दिसते आहे (मुद्दे: नोटाबंदी , GST ई). पण या विरोधी जनमताचा फायदा पुढील लोकसभेत पदरात पाडून घ्यायचा असल्यास काँग्रेसला पंतप्रधानपदासाठी सक्षम उमेदवार द्यावा लागेल (म्हणजे लगेच काँग्रेसला बहूमत मिळेल असे मला म्हणायचे नाही, पण निदान असलेल्या जागा टिकवता येतील वा काही प्रमाणात वाढवता येतील ) राहूल गांधींची लोकप्रियता फारशी नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने कोणत्या नेत्याला समोर आणावे असे तुम्हाला वाटते ? [मी मोदीभक्ती वा मोदीप्रेम यापैकी कशानेही प्रेरित न होता तटस्थपणे हा धागा काढत आहे, फक्त कॉंग्रेसकडे असलेल्या पर्यांयाचा उहापोह करणे इतकाच माफक उद्देश]
वर्गीकरण
काथ्याकूट; राजकारण

प्रतिक्रिया द्या
19517 वाचन

💬 प्रतिसाद (101)
म
मराठी कथालेखक Wed, 09/27/2017 - 13:27 नवीन
पृथ्वीराज चौहान कारणे : १) स्वच्छ प्रतिमा, २) मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात लाभलेली माफक लोकप्रियता ३) एक अभ्यासू तसेच खंबीर नेता अशी काहीशी प्रतिमा
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 13:31 नवीन
सगळ्यात महत्वाचे क्वालिफिकेशन तर तुम्ही दिलेच नाही ४) गांधी घराण्याशी निष्ठावंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Wed, 09/27/2017 - 13:40 नवीन
नाही.. कारण मला ते महत्वाचं वाटत नाही (सोनिया/राहूल गांधीना वाटू शकतं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 13:57 नवीन
कारण मला ते महत्वाचं वाटत नाही
मला सांगा, तुम्हा-आम्हाला वाटून काय उपेग ? शेवटी सोनिया / राहुल च तिकीट देणार, पक्षाचा पंप्र चा चेहेरा कोण ते ठरवणार ... बाकी पक्षांतर्गत निवडणूक इज जस्ट फॉर्मॅलिटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Wed, 09/27/2017 - 14:01 नवीन
अहो असं कसं .. आपल्याला जे वाटतं त्याचाच आपण काथ्या कुटणार ना.. काँग्रेसवाले तर 'रागा'चाच राग आवळत राहणार निदान सोनिया हयात असेपर्यंत तरी.. त्यांच्या पश्चात काय होते ते बघायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पुंबा Wed, 09/27/2017 - 13:43 नवीन
उत्तम पर्याय.. पण गांधींना लोक जास्त विटलेत हो.. त्यांचा पत्ता कट करू शकणारा असेल कुणी तरच त्याला स्विकारतील लोक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ज
जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 13:56 नवीन
त्यांचा पत्ता कट करू शकतील अश्या नेत्यांना काँग्रेस मध्ये गांधी लोकच कट करून टाकतात. ह्याच निर्नायकी परिस्थिती मुळे त्यांचे लोकसभेत पानिपत झाले, असं आपलं माझं वैयक्तिक मत. काँग्रेस मध्ये अतिशय गंभीर लीडरशिप डेफिसिट आहे, पण हे काँग्रेस पैकीच कितीजण मंजूर करतील? त्यांच्यामते राहुल गांधी ह्यांचे 'सक्षम युवा नेतृत्व' मोदींच्या 'फासिस्ट हुकूमशाही सरकारला' धूळ चारणारच आहे २०१९ मध्ये. शहामृगाप्रमाणे काँग्रेसी नेते वाळूत डोके खुपसून बसलेले आहेत, आता हे देशाचं सुदैव म्हणा का दुर्दैव पण पृथ्वीराज चव्हाण सुद्धा जितकं वजन राखून आहेत ते एकतर त्यांच्या वैयक्तिक घराण्याच्या नावामुळे अन दुसरे म्हणजे 'गांधी फॅमिली लॉयलिस्ट' असल्यामुळे, एक ते दुसरे अशोक चव्हाण , त्यांची तर छवी सुद्धा साफ नाही अन ते 'गांधी फॅमिली लॉयलिस्ट' आहेतच. बाकी दिग्विजय अन थरूर वगैरे न बोललेलं बरं. पर्यायच नाहीये, अन अशी अवस्था काँग्रेसने स्वतःची स्वतःच करुन घेतली आहे असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ज
जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 13:45 नवीन
पृथ्वीराज साहेब कराडचे आहेत म्हणजे मराठी आहेत तरी ते 'चौहान' ऐवजी 'चव्हाण' असं लिहिलंत तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Wed, 09/27/2017 - 13:58 नवीन
चूक मान्य.. पण आता कशी दुरुस्त करणार ? संम पैकी कुणी इकडे फिरकले तरच दुरुस्त होईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 14:00 नवीन
संपादक मंडळ कृपया मराठी कथालेखक ह्यांना मदत कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
विशुमित Wed, 09/27/2017 - 14:00 नवीन
१) मनमोहन सिंग (रिटर्न्स, माझी पहिली पसंती) - त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि धोरणात्मक निर्णयाची फळे आता जनतेला पटू लागली आहेत. २) प्रियांका गांधी - गांधी घराण्याची छाप बाकी नेतृत्वाबद्दलची माहिती नाही. ३) नंदन नीलकेणी (काँग्रेस कडून लढायला तयार झाले तर) - अभ्यासू व्यक्तिमत्व. भारताच्या सोशो-इकॉनॉमिक प्रश्नांची चांगली जाण. 4) सचिन पायलट/ ज्योतिरादित्य - खूप तरुण आहेत पण अभ्यासू बरोबर ग्लॅमर्स चेहरे आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 14:12 नवीन
नंदन निलकेणी, थेट पंतप्रधान चेहरा? आय एम स्केपटीकल, त्यांना अंतर्गत थेरं सांभाळता सांभाळताच घाम फुटेल, काँग्रेस मधली बडी धेंड इतक्या सहज कोणालाही मागाहून येऊन पुढं जाऊ देतील असं वाटत नाही पाटील. प्रियांका गांधी म्हणजे चक्क काँग्रेसच्या गांधी घराणे अवलंबित्वाचं उदाहरण वाटतं, त्या स्वतः राजकारणात रस नाही असं म्हणल्याचे स्मरते तरी , 'मॅडम आता तरी या म्हणत आळवणे' म्हणजे घराणेशाहीचा परमोच्च अध्याय वाटतो. सचिन पायलट/ज्योतिरादित्य शिंदे, हे तर दोन पिढ्यांपासून गांधी घराणे अंकित लोक, वाडवाडीलांपासून गांधी फॅमिली लॉयलिस्ट, ते पर्याय कसे होणार? ते स्वतःच रेजिमेंटेड आहेत ते काय पर्याय होणार? जयराम रमेश हे एक नाव आहे, पण त्यांच्या गांधी परिवार भक्ती बद्दल मला कल्पना नाही, त्यातल्या त्यात स्वतंत्र बाणा असणारे तेच एक आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 09/27/2017 - 14:24 नवीन
२-३-४ तशी तगडी नावे नाहीत याची मला जाणीव आहे. फक्त काँग्रेसच्या उपलब्ध पर्यायामधील माझी पसंती होती. प्रियांका गांधींच्या घराणेशाहीला सपोर्ट नाही पण गांधी घराण्याच्या वालयामुळे सक्षम नेतृत्व उभे राहू शकते म्हणून पसंती होती. जयराम रमेश हे नाव लिस्ट मध्ये घायला विसरलो. त्यांच्या स्वतंत्र बाणा याबद्दल सहमत. अजून आठवली तर टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/28/2017 - 09:23 नवीन
थोडे निर्भीड वाटतात खरे ! माझी पसंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
म
मराठी कथालेखक Wed, 09/27/2017 - 14:40 नवीन
काँग्रेसचे वेगवेगळ्या राज्यांतील कोणते विद्यमान/माजी मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत /होते ? राज्य सांभाळण्याचा अनुभव असलेल्यास पंतप्रधानपदाची संधी द्यावी असे मला वाटते (मोदींप्रमाणे )
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 09/27/2017 - 14:45 नवीन
मला वाटते गांधी घराण्याशी असलेली एकनिष्ठा ही अनेक काँग्रेस नेत्यांसाठी अपरिहार्य असावी. अशी एकनिष्ठा आहे म्हणून ती व्यक्ती पंतप्रधान बनण्यास अयोग्य असे मला वाटत नाही. योग्य वेळ आल्यावर सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याची क्षमता असलेला नेता काँग्रेसच्या सर्वोच्चपदी यावा, पण योग्य वेळ न येताच असे काही धाडस महागात पडू शकते.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 14:52 नवीन
योग्य वेळ आल्यावर सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याची क्षमता असलेला नेता काँग्रेसच्या सर्वोच्चपदी यावा
असा पी व्ही नरसिंहा राव विरळाच .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ज
जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 15:19 नवीन
सूत्रं स्वहाती घेतली अन मयत झाले तेव्हा बाईंनी अकबर रोड मुख्यालयात त्यांचे पार्थिवही कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन व्हावे म्हणून ठेऊ दिलं नाही, थेट दारं लावून घेतली की हो , काँग्रेस मध्ये सूत्रे हाती घेणे म्हणजे ब्लास्फेमी म्हणावी असली परिस्थिती आजही आहे (सुदैव/दुर्दैव सापेक्ष)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 15:48 नवीन
काही का असेना, पी व्ही आणि ममो या जोडगळी ने भारताला वाचवले असेच माझे मत राहील.... तसं बघायला गेलं तर, माझी आई सांगते, ती लहान असताना, नेहरू गेले, तेव्हा घरातले सर्व काळजीयुक्त चर्चा करत असल्याचे तिला स्मरते की "आता कसं होणार या देशाचं",पण पहा देशाने तरीही प्रगती केलीच न .... त्यामुळे भारतातील लोकांची ही भीती अनाठायी वाटते, की फक्त एकच विशिष्ठ व्यक्ती, या देशाला वाचवू शकतो .... या अश्या व्यक्तिपूजक मेन्टॅलिटी पासून दूर व्ह्यायला हवं ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 16:56 नवीन
त्या मतात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाहीये. ऑन अ लार्ज आजही अर्थव्यवस्था 'राव-सिंह पॅरामीटर' वर चालत असेलही. पण त्यांना गांधी फॅमिली कडून चांगली वागणूक मिळाली नाही, हे पण खरं, मनमोहन पंप्र असताना अध्यादेश फाडून टाकणे वगैरे निषेधार्ह प्रकार झाले होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/27/2017 - 15:55 नवीन
एक व्यक्ती देश बदलू शकते ह्यावर अनेकांचा विश्वास आहे हे बघून आश्चर्य वाटले. खंबीर नेत्रुत्व,वाक्चतुर्य ह्यांचे एका मर्यादेपर्यंत कौतुक असते. अमेरिकन स्टाईल अध्यक्षीय पद्धत लोकांना आवडायला लागली आहे की काय असे वाटायला लागले आहे.!
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 16:48 नवीन
तिथेही बोंबच आहे, "मेक अमेरिका ग्रेट अगेन" म्हणत सत्तेत आला, पण तो एक जुमला होता हे दिसतंय. ओबामाकेअर रिपिल करेन म्हणाला ... चांगला पर्याय देऊ शकला नाही त्याच्या पार्टीत सर्वमान्य होईल.. निओनाझींनी दंगल केली तर म्हणे बऱ्याच बाजू जबाबदार ... मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा पांढरा हत्ती मनोनित , पैसे म्हणे मेक्सिकोकडून घेणार .... हा माणूस ट्विटरवर एवढा फेकूगिरी करतो की आता अमेरिकेत याचा सपोर्ट कमी होतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
थ
थॉर माणूस Wed, 09/27/2017 - 22:15 नवीन
तिच भीती आहे, अध्यक्षीय लोकशाही चा प्रयोग सध्या ग्रामपंचायतीमधे सुरू झालाच आहे. आपल्या व्यक्तीपूजक जनतेला अशी लोकशाही कीतपत परवडेल ही जरा शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 07:26 नवीन
ग्रामपंचायत निवडणूक मी आता अनुभवतो आहे. खरंच जनतेतून सरपंच निवडणे गावासाठी परवडण्यासारखे नाही आहे असे वाटते. अजून थोडा अनुभव घेऊन या विषयांबद्दल.टंकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
प
पैसा Wed, 09/27/2017 - 16:19 नवीन
नरेंद्र मोदी
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 09/27/2017 - 17:14 नवीन
सुब्रमण्यम स्वामी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 17:12 नवीन
सध्या तरी काँग्रेसकडे देशपातळीवरील मतदारांना आकर्षित करेल असा चेहरा नाही. काँग्रेसने असा कोणताही चेहरा तयार होऊन दिलेलाच नाही. निदान २०१९ साठी काँग्रेस कोणताही नवीन चेहरा पुढे न करता राहुलचाच चेहरा पुढे करेल असे वाटते. २०१९ मध्ये अर्थातच काँग्रेसची संख्या ४४ च्या खाली न उतरता त्यात वाढच होईल. त्यात किती वाढ होईल त्यावर राहुलचे भवितव्य अवलंबून राहील. काँग्रेस ४४ वरून ११० च्या पुढे पोहोचली तर संख्या वाढविण्याचे श्रेय राहुलला दिले जाऊन तो नेतेपदावर कायम राहील. जर काँग्रेस ७०-७५ पर्यंतच पोहोचली तर मात्र राहुल काँग्रेसला यश मिळवून देण्यास समर्थ नाही असा निष्कर्ष निघून काँग्रेसमध्ये नेता बदलाचे वारे सुरू होतील. राहुलला पर्याय आणणे सोपे नाही. काँग्रेसमधील कोणताही जुना किंवा सध्या राजकारणात असलेला नेता निवडून फायदा नाही. यश मिळविण्यासाठी जनतेपुढे एक पूर्णपणे नवीन चेहरा आणायला लागतो जो लोकांना नवीन असल्यामुळे आशादायी वाटू शकेल. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने अतिशय योग्य चाल खेळून मोदींचे नाव पुढे आणले. जरी मोदी त्यावेळी गुजरातच्या राजकारणात ११-१२ वर्षे होते, तरीसुद्धा देशपातळीवर नेता म्हणून त्यांचे नाव कधीच आले नव्हते. २०१३ पर्यंत भाजपच्या नेतेपदासाठी वाजपेयी, अडवाणी, कधीतरी जेटली किंवा सुषमा स्वराज हीच नावे चर्चिली जायची. त्यापैकी वाजपेयींची कारकीर्द २००९ मध्येच संपली. अडवाणी हे २००९ मध्ये पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार होते. त्यांना जनतेने नाकारले होते. २०१३ मध्ये त्यांचे वयसुद्धा ८५ हून अधिक होते. त्यामुळे त्यांचा चेहरा पुढे करण्यात काहीच अर्थ नव्हता. उरलेल्यांपैकी जेटली हे जनाधार नसलेले नेते होते. सुषमा स्वराज या नक्कीच लोकप्रिय होत्या व अनेकवेळा निवडूनही आल्या होत्या. परंतु मोदी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीमुळे सर्वत्र माहित असणारे नाव होते. त्यांचे जितके कट्टर विरोधक होते तितकेच त्यांना कट्टर समर्थनही होते. त्यांना मुख्य विरोध २००२ ची गुजरात दंगल या कारणावरून होता. या कारणावरून त्यांना जितका विरोध व्हायचा तितके जास्त समर्थन त्यांना मिळत गेले कारण हा विरोध हिंदू वि. मुस्लिम, राष्ट्रवादी वि. राष्ट्रद्रोही, पाकिस्तानवादी वि. पाकिस्तानविरोधी या पातळीवर नेऊन ठेवण्यात ते यशस्वी झाले. त्यांना अडकविण्याचे काँग्रेसने असंख्य प्रयत्न केले. परंतु प्रत्येक वेळी ते त्यातून सहीसलामत निसटले व त्यातून त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि काँग्रेसबद्दल वाईट मत होत गेले. जेव्हा त्यांना २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडले तेव्हा जनतेसमोर राष्ट्रीय पातळीवर एक पूर्णपणे नवीन पर्याय निर्माण झाला. जर २०१३ मध्ये भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलाच नसता किंवा मोदींऐवजी अडवाणी किंवा जुन्या नेत्यांपैकी एखादा चेहरा पुढे आणला असता तर भाजपला फारसे यश मिळाले नसते. मोदींनी निवडणुक प्रचारात दोन धोरणांवर भर दिला. मनमोहन सिंह यांची कारकीर्द किती भ्रष्ट आहे, अकार्यक्षम आहे इ. वाईट गोष्टींवर भर दिला आणि त्याचवेळी आपण कोणते चांगले बदल करणार आहोत, परिस्थिती कशी सुधारणार आहोत हेही लोकांसमोर मांडले. त्यामुळे मोदींनी एकाचवेळी नकारात्मक आणि त्याच बरोबरीने सकारात्मक प्रचार करून निवडणुक जिंकली. त्यांनी आपण काय करणार आहोत हे फारसे न सांगता मनमोहन सरकार किती वाईट आहे याच मुद्द्यावर भर दिला असता तर त्यांना एवढे यश मिळाले नसते. काँग्रेसला जर नेता बदलायचा असेल राष्ट्रीय पातळीवर जनतेला माहित असलेला परंतु राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात नसणारा एखादा लोकप्रिय नेता निवडावा लागेल. राहुलला पर्याय म्हणून ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट, पृथ्वीराज चव्हाण इ. पैकी कोणीही योग्य पर्याय नाही कारण हे अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात आहेत व त्यांनी आजतगायत फारसे काही स्पृहणीय केले नाही हे जनतेला माहित आहे. फारसे काही न करणार्‍या अनेक वर्षे राजकारणात असणार्‍या एखाद्या जुन्या नेत्यापेक्षा ज्याची पाटी पूर्ण कोरी आहे व जो फारसा राजकारणात नाही असा नेता पर्याय म्हणून लोकांना आवडतो. यादृष्टीने २०१९ नंतर काँग्रेसमधून प्रियांका गांधी-वडरा हे एकमेव नाव डोळ्यांसमोर येते. प्रियांका जनतेला माहित आहे. आजवर राजकारणात नसल्याने पाटी कोरी आहे. वयाने तरूण आहे. गांधी आडनावाचा फायदाच आहे. या सर्व दृष्टीने प्रियांका गांधी-वडरा हेच नाव २०२४ मधील काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा चेहरा असेल असे वाटते. अर्थात काँग्रेसने प्रियांकाला लगेच २०१९ मध्ये राजकारणात आणण्याची घाई करू नये, कारण तसे झाले तर २०२४ पर्यंत तिच्याभोवतीचे वलय फिके झाले असेल. मोदींप्रमाणेच निवडणुकीला काही महिने असताना २०२३ मध्ये प्रियांकाचे नाव पुढे आणले तर २०२४ मध्ये नक्कीच काँग्रेसला पुष्कळ फायदा होईल. अर्थात त्यावेळी कॉंग्रेसला बहुमत मिळेल का नाही हे पुढील ६-७ वर्षांवर अवलंबून राहील.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 09/27/2017 - 17:40 नवीन
योग्य विवेचन. भारतासारख्या खंडप्राय देशात सक्षम विरोधक नाही हे सत्य पचवणे जड जात आहे, अर्थात राहूल आणि सोनीया गांधी यांच्या लघुदृष्टीला याचे श्रेय जाते. पक्ष टिकावा आणि वाढावा म्हणून दुसर्‍या फळीतले नेतृत्व उभे करणे ही पक्षनेतृत्वाची आणि वरिष्ठ नेत्यांची जबाबदारी असते, अशा ठिकाणी हुजरे शोभावेत असे मर्जीतले नेते ठेवल्याने काँग्रेसवर ही अवस्था आली आहे. २०१९ ला भाजपाचे संख्याबळ कमी होईल हे नक्की आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी भाजपाला आत्ताच तातडीने पाउले उचलावी लागतील. २०२४ ला भाजपाला उजवीकडेच पण सक्षम विरोधक तयार झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 11:00 नवीन
बहुतांशी मुद्दे पटले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जानु Wed, 09/27/2017 - 19:39 नवीन
रागा कडे एक राजकीय व्यक्ती म्हणुन अद्याप कोणीच पाहत नाही. सोनियांच्या मुलाचे आयुष्य सेटल करणे हेच कॉग्रेसी नेत्यांच्या आयुष्याचे परम ध्येय्य आहे. रागांना आपल्याला सिध्द करण्यासाठी अजुन किमान ५ ते १० वर्ष रात्रंदिवस कष्ट करावे लागतील. तेवढी तयारी त्यांची आहे असे वाटत नाही. प्रियंका गांधी यांना नेता म्हणुन स्विकारणे म्हणजे रागांचे करीयर संपले यावर शिक्कामोर्तब. आणि त्यांच्या पतिदेवांची करणी कितीही कष्ट केले तरी त्यांना मातीमोल करणारे पुर्वायुष्य.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 09/27/2017 - 20:17 नवीन
राँबर्ट वाड्रा ची जमीन घोटाळ्या संबंधात सीडी बनवून ठेवलीय भाजपने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
प
पुंबा गुरुवार, 09/28/2017 - 07:17 नवीन
पर्फेक्ट.. खरं तर राहूल गांधीला इंटरेस्टच नाहीये या सार्‍यात असे वाटते. एखादा बळंच आई म्हणतो म्हणून इंजिनीअरींगला डोनेशन भरून अ‍ॅडमिशन घेतो तसल्यातला तो प्रकार आहे. कष्ट तर सोडूनच द्या निदान धंदा बुडतोय म्हटल्यावर दुकानाच्या धाकट्या मालकाला वाटेल तसे दु:ख सुद्धा कधी वाटल्याचे आढळ्ले नाही. १६ मे चे ते सुप्रसिद्ध स्मित आठवा. ५६ दिवसांची थायलंड ट्रिप आठवा. असं पार्टटाईम राजकारण कसं होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
व
विकास Wed, 09/27/2017 - 20:43 नवीन
आजचा खरा प्रश्न आहे की एकही विरोधी पक्ष नाही. त्यात काँग्रेसपण आले. दुसरे म्हणजे एकही स्वच्छ प्रतिमा नाही. मनमोहनसिंग जरी असले तरी त्यांची प्रतिमा ही दुर्दैवाने प्रधानमंत्री/प्रधानसेवक असण्या पेक्षा गांधीघराण्याचे (त्यातही सोनिया-राहूलचे) निष्ठावंत पाईक अशी झाली आहे. काँग्रेस स्वबळावर जिंकून येण्याची शक्यता कमी वाटते. कडबोळी सरकार मधे काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळणे आत्ता तरी अवघडच वाटत आहे. महाआघाडी वगैरे शब्द आणि त्यातील नेतृत्वाबद्दल चर्चा करणे आणि त्यातून ते जिंकण्याची आणि देशाचे चांगभल होण्याची आशा करणे म्हणजे Not failure but low aim is a crime असेच नुसते म्हणणे नाही तर वागण्यासारखे आहे. आत्तापर्यंत तरी, या सरकारकडून कुठलेही भ्रष्ट वर्तन दिसलेले नाही. त्यांची काही/बरीच मते कुणाला आवडतील तर कुणाला आवडणार नाहीत. त्याला पर्याय देणारे, पक्षी: स्वच्छ प्रतिमा असलेले आणि तसे राहू शकणारे पर्याय आहेत का? का केवळ मोदींना हरवण्यासाठी, पप्पू गांधी, मुलायम, अखिलेश, लालू आणि लालूची पिलावळ चालणार आहे? त्यामुळे काँग्रेसचा प्रधानमंत्री म्हणून उमेदवार कोण असेल याची एकदम चर्चा करायला लागण्याआधी काँग्रेसने (आणि इतर विरोधी पक्षांनी देखील) भाजपाला टक्कर देण्यासाठी नक्की काय करायला हवे या वर चर्चा (इथेच नाही तर इतरत्रही) झाली पाहीजे असे वाटते. दुर्दैवाने आपली माध्यमे आणि समाज यांच्या अपेक्षा कमी आहेत. राजकारण हे (प्रामुख्याने) देश घडवण्यासाठीचे क्षेत्र आहे आणि सत्ताकारण हा त्यातील एक अविभाज्य आणि अपरीहार्य भाग आहे हे आपण लक्षात घेत नाही आणि राजकारण्यांच्या खेळाकडे दोन बैलांच्या झुंजींप्रमाणे बघून बैलांचा पण अपमान करतो आणि देशाचा पण खेळखंडोबा...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 09:38 नवीन
डॉ मनमोहन सिंह यांचे वय आता ८५ आहे आणि निवडणूक होईस्तोवर ८६. मी स्वतः त्यांना २००८ मध्ये दुसऱ्या बायपासच्या वेळेस पाहिले होते तितके ते चौकस आणि एकाग्र वाटत नाहीत. एकंदर वयाचा आणि प्रकृती अस्वास्थ्याचा( मधुमेह आणि हृदय विकार दोन्ही रोग आहेत) बऱ्यापैकी परिणाम दिसतो आहे. परवाच म्हणजे २६ सप्टेंबर रोजी त्यांचा ८५ वा वाढदिवस झाला. पण एकंदर पत्रकार किंवा काँग्रेस गटात कुठेच त्याबद्दल बातमी सुद्धा आली नाही. म्हणजेच निश्चलनीकरण कसे चूक होते एवढे सांगण्यापुरता त्यांचा काँग्रेस आणि वृत्तपत्रांना त्यांचा उपयोग राहिला आहे. माझ्या मताने त्यांनी आता सन्माननीय रित्या राजकारणातून निवृत्त व्हावे अन्यथा काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीत त्यांच्यासारख्य अत्यंत हुशार आणि विद्वान माणसाचे हे लोक "पोतेरे" करून टाकतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सर टोबी Fri, 09/29/2017 - 19:00 नवीन
मागच्या एक-दीड महिन्यापूर्वी एक बातमी होती कि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन समोर २५ केसेस अशा आहेत कि त्यांची चौकशी होण्याची गरज आहे. पण त्यांना त्या साठी मुहूर्तच सापडत नाहीये. म्हणजे सध्या भ्रष्टाचार होत नाहीये कि त्याच्या बद्दल बोलले जात नाहीये? मला वाटते कि दुसरी शक्यताच जास्त आहे. अण्णा हजारेंचे आंदोलन राजकारण मुक्त आहे असा त्यांचा अभिनिवेश होता. पण एवढे अटीतटीचे आंदोलन ज्या कारणासाठी केले ते कारण संपले कि मुदलात कारण वेगळेच होते? तीच गोष्ट बाबा रामदेव यांच्या काळ्या पैशांचे आंदोलन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विशुमित Mon, 10/02/2017 - 08:17 नवीन
<<<आत्तापर्यंत तरी, या सरकारकडून कुठलेही भ्रष्ट वर्तन दिसलेले नाही>> ==> काय झालंय, आता जे विरोधक आहेत ते पूर्वी बराच काळ सत्तेत होते. त्यामुळे आंतरिक बाबींचे खाचखळगे त्यांना चांगले अवगत असणार. त्यामुळे या सरकारमधील लोकांना गफला करणे एवढे सोपे नसणार. गफला करण्याचा प्रयत्न जरी केला तरी लगेच एक्सपोस होतील. त्यात आता जनता पण प्रशासन आणि राजकारणाबाबत खूप सजग झाली आहे. आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं तर " तूर घोटाळा, चिक्की घोटाळा, भोसरी घोटाळा, लोकमंगल घोटाळा'. पचवायला जमलंच नाही. लगेच उघडे पडले. म्हणून तर मिस्टर क्लीन आहेत. --- त्यामुळे ते "हाणून मारून इमानदार झाले आहेत"... असो.!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
श
श्रीगुरुजी Mon, 10/02/2017 - 09:40 नवीन
आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं तर " तूर घोटाळा, चिक्की घोटाळा, भोसरी घोटाळा, लोकमंगल घोटाळा'. पचवायला जमलंच नाही. लगेच उघडे पडले. म्हणून तर मिस्टर क्लीन आहेत. हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब मलिक, धन्या मुंडे, अजित पवार असल्या असंतुष्ट निरूद्योग्यांनी पत्रकार परीषदेत केलेले बिनबुडाचे फुसके आरोप होते. आरोपात दम असता तर ते न्यायालयात गेले असते. त्यामुळे ते "हाणून मारून इमानदार झाले आहेत"... असो.!! कॉंंग्रेस-राष्ट्रवादीवाले फासावर चढवले किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली दिले तरी ते इमानदार होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 10/02/2017 - 13:49 नवीन
<<<हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब मलिक, धन्या मुंडे, अजित पवार असल्या असंतुष्ट निरूद्योग्यांनी पत्रकार परीषदेत केलेले बिनबुडाचे फुसके आरोप होते. आरोपात दम असता तर ते न्यायालयात गेले असते.>>> ==>> माझ्या माहिती प्रमाणे धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी नुसती पत्रकार परिषदच नव्हे पण विधानपरिषदेत/ विधानसभेत "तूर आणि चिक्की घोटाळ्याबाबत" आवाज उठवला होता. न्यायालयाचे सुद्धा दार ठोठावले आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी (बहुदा हेमंत पाटील आहेत). (डिटेल्स देतो). भोसरीच्या एम आय डी सी घोटाळ्यातून दाऊदचे कथित मित्र अजून सहीसलामत सुटलेले नाहीत. देशमुखांचे 'लोकमंगल" नोटबंदीच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच वादाच्या भोऱ्यात अडकले होते. पण मिस्टर क्लीन यांच्याकडून जास्त अभ्यास न करता लगेच क्लीन चिट मिळाली. माझा सांगायचा मुद्दा एवढाच होता की मनात इच्छा असून आणि कितीही प्रयत्न केले तरी सध्याच्या मंत्र्यांना मोठे भ्रष्टाचार करणे वाटते तेवढे सोपे नाही. कारण विरोधक खाचखळग्यात माहीर आहेत, मीडिया असल्याच खुराकावर टपून आहे आणि डेटाच्या मुबलक उपलब्धीमुळे जनता सजग आहे. ('धन्या मुंडे' असले पातळीहीन शब्द तुमच्याकडून अपेक्षित नव्हते. सयंत आणि सुसंस्कृत प्रतिक्रियांसाठी मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. असो. ज्याची त्याची मर्जी.!!) --- <<<कॉंंग्रेस-राष्ट्रवादीवाले फासावर चढवले किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली दिले तरी ते इमानदार होणार नाहीत.>> ==>> हसायला आले तुमची प्रतिक्रिया वाचून. विनोद ऎकुवून मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/02/2017 - 14:21 नवीन
विधीमंडळाच्या सदनात वाटेल ते निराधार आरोप करता येतात, कारण सदनातील वक्तव्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. घोटाळ्यांच्या आरोपात थोडेसे तथ्य असते तरी न्यायालयाने त्याची दखल घेतली असती. मागील वर्षी नबाब मलिक गिरीश बापटांवर असेच हास्यास्पद आरोप करीत होता. आधी म्हणाला की त्यांनी तूरडाळ खरेदीत २०० कोटींचा घोटाळा केला. काही दिवसांनी त्याने हाच आकडा २००० कोटींवर नेला. नंतर हा आकडा २०००० कोटींवर नेला. आता हा आकडा २००००००००००००० कोटींवर गेला असेल. या आरोपामागे पुरावे शून्य. त्यामुळे न्यायालयात जायची हिंमत नाही. याच मलिकला २००३ मध्ये घोटाळा बाहेर आल्याने राजीनामा द्यावा लागला होता. तथाकथित चिक्की घोटाळा तसाच पोकळ. नुसतेच आरोप, पुरावे काहीही नाहीत. धन्याच्या आरोपांमागे चुलत घराण्याचे शत्रुत्व आहे हे लपलेले नाही. हा माणूस सूतगिरणीमधील घोटाळ्याच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. सुब्रह्मण्यम् स्वामी बघा. २ जी घोटाळा, कोळसा घोटाळा, National Herold प्रकरण इ. घोटाळ्यांबाबतीत ते नुसते आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी प्रकरण न्यायालयात नेले. भाजपच्या मंत्र्यांविरूद्ध न्यायालयात जायची विरोधकांची हिंमत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सर टोबी Mon, 10/02/2017 - 17:03 नवीन
एकदम स्वच्छ असण्याचा दावा केला गेला आणि इतके प्रतिसाद? स्वच्छता थोडी संशयास्पद आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/02/2017 - 20:16 नवीन
दाऊदचे कथित मित्र आआपची अंजली दमानिया ही केजरीवालांप्रमाणेच एक वाचाळ महिला आहे. बेफाट निराधार आरोप करायचे एवढेच आआपवाल्यांना चांगले जमते. मागील वर्षी आआपच्या गुजरातस्थित मनीष भंगाळे नामक व्यक्तीने असा आरोप केला होता की त्याने पाकिस्तानी फोन कंपनीचे संकेतस्थळ हॅक केले व त्यातून त्याने दाऊदचा क्रमांक मिळविला. त्या क्रमांकावरून केलेल्या कॉल्सच्या यादीत एकनाथ खडसेंचा क्रमांक आहे. या आरोपानंतर लगेचच दमानिया बाईंनी पत्रकार परीषद घेऊन खडसेंचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करून त्या मोकळ्या झाल्या. वास्तविक हे प्रकरण व हा आरोप अत्यंत हास्यास्पद होता. दाऊदला पाकिस्तानने संपूर्ण संरक्षण दिले आहे. तो २४ तास आयएसआयच्या संरक्षणात असतो. असल्या माणसाचा दूरध्वनी क्रमांक सार्वजनिक रित्या त्याच्या नावावर नोंदलेला असणे अशक्य आहे. हा आरोप करणार्‍या भंगाळेने आपण हॅक करून मिळविलेल्या पाकिस्तानमधील दूरध्वनी क्रमांकाची यादी ( ज्यात खडसेंचा क्रमांक आहे असा त्याचा दावा आहे) कोणालाही दिलेली नाही अथवा दाखविलेली नाही. सगळी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! या आरोपानंतर खडसेंनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले ही तो क्रमांक एक वर्षापासून वापरात नसल्याने बंद आहे व मला त्या क्रमांकावर पाकिस्तानमधून कधीही फोन आलेला नव्हता. पण हे ऐकण्याच्या मनःस्थितीत दमानिया बाई नव्हत्या. त्यांचे बेलगाम आरोप सुरूच होते. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन भंगाळेला आपले पुरावे घेऊन चौकशीसाठी बोलाविले. दोन वेळा बोलावून सुद्धा तो हजर झाला नाही. शेवटी तिसर्‍या वेळी समन्स पाठविल्यानंतर तो नाईलाजाने पोलिसांसमोर हजर झाला. पुराव्यांविषयी विचारल्यानंतर त्याने कानावर हात ठेवले व असे हास्यास्पद स्पष्टीकरण दिले की कोणीतरी त्याचा संगणक हॅक करून ते पुरावे नष्ट केले. जो माणूस स्वतः हॅकर आहे त्याने आपल्या संगणकाला इतरांच्या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी संरक्षण व्यवस्था उभारली नसेल यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. समजा त्याचा संगणक कोणीतरी हॅक केला यावर क्षणभर विश्वास ठेवला तरी त्याने जे पुरावे गोळा केल्याचा दावा केला होता त्या पुराव्यांचा एखादा बॅकअप ठेवला नसेल यावर विश्वास ठेवणेही अशक्य आहे. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व कोणतेही पुरावे समोर न आल्याने पोलिसांनी बदनामीच्या आरोपावरून त्याला अटक केली. कालांतराने तो जामिनावर सुटला. त्यानंतर दमानिया बाईंचा आवाज गप्प झाला होता. आता जवळपास सव्वा वर्षानंतर दमानिया बाईंनी तेच नाटक परत सुरू केले आहे. मागील आठवड्यात त्यांनी आरोप केला की त्यांना पाकिस्तानहून एक फोन आला होता व फोनवरील माणसाने त्यांना खडसेंवरील खटले मागे घेण्यासाठी धमकी दिली. त्यांनी तो क्रमांक कॉलरआयडीवर तपासल्यावर त्यावर दाऊद-२ असे नाव आले. हा आरोप सुद्धा अत्यंत हास्यास्पद आहे. दाऊद-२ या नावाने दाऊदच्या नावावर दूरध्वनी नोंदलेला आहे या कल्पनेने सुद्धा हसू येते. दमानिया बाईंचा हा बार सुद्धा फुसकाच ठरला. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी व चर्चेत राहण्यासाठी असे हास्यास्पद बिनबुडाचे आरोप करीत राहण्याचे काही व्यक्तींना व्यसन लागलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पगला गजोधर Tue, 10/03/2017 - 05:47 नवीन
गुरुजी तुम्ही म्हणताय तसंही असेल कदाचित, . . . पण मग, जाहिरपणे खडसे असे का म्हणाले ? की माझ्या स्वतः च्या पक्षातीलचं उच्च पदस्थ लोक माझ्या वाईटावर टपून, बाहेरच्या लोकांकडून माझ्यावर असे छुपे हल्ले करत आहेत ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
थ
थॉर माणूस Mon, 10/02/2017 - 19:02 नवीन
>>>आरोपात दम असता तर ते न्यायालयात गेले असते. १००% सहमत. सत्ताधार्‍यांवर केलेल्या विरोधकांच्या बर्‍याचशा आरोपांमधे फारसे तथ्य नसतेच. तसे असते तर आज कित्येक नेते तुरूंगात असते. तरीही त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेऊन अमुक एक नेता भ्रष्टच (आमचे साहेब म्हणाले म्हणून) आणि तमुक एक नेता स्वच्छच (तुमच्या साहेबांनी आरोप केले म्हणून) असे म्हणत फिरणार्‍यांची गंमत वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/02/2017 - 19:56 नवीन
ज्यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य असते त्यांच्याविरूद्ध न्यायालयात गेल्यानंतर कायदेशीर कारवाई होतेच. महाराष्ट्रात छगनबाप्पा, त्यांचा पुतण्या समीर, रमेश कदम भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून दीड वर्षाहून अधिक काळ तुरूंगात आहेत. अशोक चव्हाणांचे आदर्श घोटाळ्याच्या आरोपपत्रात नाव आहे व आरोपपत्रातून आपले नाव वगळावे यासाठी त्यांनी केलेले आटोकाट प्रयत्न आतापर्यंत तरी फोल ठरले आहेत. सुरेश जैन बराच काळ तुरूंगात होते. सध्या जामिनावर बाहेर आहेत. दुसरे आरोपी गुलाबराव देवकरही काही काळ तुरूंगात होते. पद्मसिंह पाटलांवर दोन खुनांचा आरोप असून काही दिवसांच्या अटकेनंतर ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. दस्तुरखुद्द मनमोहन सिंहांचे नाव कोळसा घोटाळ्याच्या आरोपपत्रात असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयातील कारवाईला स्थगिती मिळविली आहे. राहुल, सोनिया समवेत एकूण ६ जण नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. सुरेश कलमाडी ११ महिने तुरूंगात राहून सध्या जामिनावर मुक्त आहे. जर आरोपांमध्ये तथ्य असेल आणि सरकार किंवा तपास यंत्रणा कारवाई करीत नसतील तर न्यायालयात गेल्यास न्यायालय नक्कीच कारवाईचा आदेश देते. चिक्की घोटाळा, तूर डाळ घोटाळा इ. आरोप हे पोकळ आरोप आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. २०१५ पासून हे आरोप होत आहेत. आरोप करणार्‍यांकडे कोणतेही पुरावे नाहीत. असते तर त्यांनी केव्हाच पुरावे बाहेर आणले असते व सरकार कारवाई करीत नाही असे सांगून त्यांनी न्यायालयात दाद मागितली असती. हे आरोप करणारे पुरावेही देत नाहीत व न्यायालयात जाण्याचीही त्यांची तयारी नाही. पुरावे नसल्याने न्यायालय आपल्या आरोपांची दखल घेणार नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळे पत्रकार परीषदेतून किंवा विधिमंडळाच्या सदनात बिनबुडांच्या आरोपांचा भडीमार करणे इतकेच ते करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
अ
अस्वस्थामा Tue, 10/03/2017 - 17:11 नवीन
जर आरोपांमध्ये तथ्य असेल आणि सरकार किंवा तपास यंत्रणा कारवाई करीत नसतील तर न्यायालयात गेल्यास न्यायालय नक्कीच कारवाईचा आदेश देते. चिक्की घोटाळा, तूर डाळ घोटाळा इ. आरोप हे पोकळ आरोप आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. २०१५ पासून हे आरोप होत आहेत. आरोप करणार्‍यांकडे कोणतेही पुरावे नाहीत. असते तर त्यांनी केव्हाच पुरावे बाहेर आणले असते व सरकार कारवाई करीत नाही असे सांगून त्यांनी न्यायालयात दाद मागितली असती. हे आरोप करणारे पुरावेही देत नाहीत व न्यायालयात जाण्याचीही त्यांची तयारी नाही. पुरावे नसल्याने न्यायालय आपल्या आरोपांची दखल घेणार नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळे पत्रकार परीषदेतून किंवा विधिमंडळाच्या सदनात बिनबुडांच्या आरोपांचा भडीमार करणे इतकेच ते करू शकतात.
ह्म्म.. या न्यायाने शरद पवार महाराष्ट्रातील निर्विवाद स्वच्छ असे नेते आहेत, असे तुम्ही म्हणावे अशी आशा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शब्दबम्बाळ Wed, 10/04/2017 - 21:10 नवीन
अगदी हेच म्हणणार होतो! :P इथून पुढे पवारांवर आरोप केले कि हाच प्रतिसाद त्याखाली चिटकवता येईल! बाकी ते व्यापम ची काय भानगड? माणसेच गायब होतात म्हणे नाव काढलं कि! आणि "दामाद श्री" ची सीडी काढून काय घरी बघत बसतात का ३ वर्ष होऊन गेली तरी? सगळे पुरावे होते ना? राजस्थान मधून आता केसेस फाईल होऊ लागल्यात, तयारी सुरु झाली का पुन्हा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/05/2017 - 10:44 नवीन
ह्म्म.. या न्यायाने शरद पवार महाराष्ट्रातील निर्विवाद स्वच्छ असे नेते आहेत, असे तुम्ही म्हणावे अशी आशा. ;) पवारांवर न्यायालयात खालील खटले दाखल आहेत. http://indiatoday.intoday.in/story/hazare-files-pil-alleging-25000-crore-scam-names-sharad-pawar/1/849047.html http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/Case-against-Sharad-Pawar/article14872167.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
थ
थॉर माणूस गुरुवार, 10/05/2017 - 22:57 नवीन
ते इनोसंट अंटील प्रूव्हन गिल्टी का काहीतरी असतं म्हणे न्यायदानात. तसं नसेल तर मग निवडून गेलेले किती नेते तुमच्या निकशांवर स्वच्छ ठरतील हा मोठा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मनो गुरुवार, 09/28/2017 - 04:28 नवीन
राहुल गांधी नुकतेच बे एरिया मध्ये येऊन गेले. त्यांचा दौरा आखणारे मिलिंद देवरा आणि सॅम पित्रोदा अचानक निवांत भेटले. मिलिंद देवरांशी थोडा वेळ मराठीतून बोललो. एकंदरीत या अमेरिका दौऱ्यातून असे दिसते की राहुल गांधी स्वतःची PM इन waiting अथवा शॅडो PM अशीच प्रतिमा बनवत आहेत. जर त्यांना पंतप्रधान पद नाही मिळाले तरी त्यांची अजून ५ वर्षे वाट पाहण्याची तयारी आहे. त्यामुळे ते इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याला पंतप्रधान बनू देणार नाहीत. मंत्री बनण्याची घाई काँग्रेस नेत्यांना आहे, कारण त्यांना निवडून आल्यावर मिळालेल्या 'संधीचा पुरेपूर फायदा' उठवायचा आहे. राहुल गांधींचे पद वारशाने आहे, त्यांना निवडून यावे लागत नाही, असे काही पराभव ते नक्की पचवू शकतात. जयराम रमेश यांनी हे बरोबर मागच्या निवडणुकीच्या वेळी मांडले होते. शशी थरूर याना भेटायचे होते पण ते शक्य झाले नाही, नाहीतर नक्कीच काहीतरी चांगले ऐकायला मिळाले असते - त्यांचा पक्ष कोणताही असो, त्यांचे भाषण नक्कीच श्रवणीय असते. चर्चिल आणि ब्रिटिश राज्य यावर त्यांचे भाषण नक्की ऐका जर ऐकले नसेल तर. राहुल गांधी त्यांच्यापुढे अगदी नवशिके वाटतात. अजूनही राहुल गांधी प्रश्नाची उत्तरे देताना गोंधळ करतात. भारतासारख्या देशाचा कारभार चालवणे अत्यंत अवघड आहे, कधी कधी सरकारची चूक नसतानासुद्धा त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे राहुल गांधी यांची भिस्त मोदी काय चुका करतात त्यावर आहे. एकदा मोदींनी स्वतःच स्वतःचे रेकॉर्ड डागाळून घेतले की भाजपला पर्याय मग तो स्वतः किती का खराब असेना तो काँग्रेस आणि राहुल गांधी हा आहे असे त्यांना वाटते.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 09/28/2017 - 11:03 नवीन
राहुल गांधी त्यांच्यापुढे अगदी नवशिके वाटतात.
भयंकर आक्षेप! कोणाची कोणाबरोबर तुलना करताय ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा