का केली पेट्रोल व डिझेलची दरकपात ?
२०१४ पासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सतत घसरत असताना सरकारने वेळोवेळी एक्साईज ड्युटी वाढवून देशातील पेट्रोल व डिझेलचे भाव चढेच ठेवले. देशाच्या विकास कामासाठी हा ज्यादा महसूल वापरला जाईल असं जनतेला सांगितलं गेलं, समजदार जनता सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. गेल्या तीन वर्षात कधीही पेट्रोल डिझेल भाववाढीच्या विरोधात देशात कुठेही मोर्चे निघाले नाहीत, किंवा कोणाचेही बजेट कोसळले नाही. पूर्वी पेट्रोलचे ५० पैसे जरी वाढले की लगेच महागाईचा भडका होत असे, तसा महागाईचा भडका गेल्या तीन वर्षात झाला नाही. हां, देशाचा GDP थोडासा घटला, पण तसा तो अनेकवेळा मागील सरकारच्या काळातही घटला होता. सगळं काही आलबेल असताना अचानक दोन दिवसापूर्वी कच्च्या तेलावरील एक्साईज ड्युटी २ रुपयांनी कमी करून सरकारने जनतेला संभ्रमात टाकले.
काय अर्थ काढायचा जनतेने ह्या दरकपातीचा ? अशी दरकपातीची मागणी कोणत्याही 'देशप्रेमी'जनतेने केली नव्हती. गेल्या तीन वर्षात कोणीच गरीब राहिले नव्हते, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरकपातीची मागणी कोणी करेल अशीही शक्यता नव्हती. विकासकामे जोरात चालू होती, त्यामुळे बेरोजगारीही शून्यावर आली होती. भविष्यात अजून मोठे प्रकल्प राबविण्यासाठी पैसे लागणार , ८ नोव्हेंबरला एका मोठ्या योजनेच्या वर्धापनदिन साजरा करण्यासाठी पैसे लागणार आहेत. कुठून आणणार सरकार ह्यासाठी पैसा?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुंग फू कुमारी... ;) :- Bruce Lee The Fighterकृपया नोटबंदीच्या मुद्द्यावर आपले अज्ञान नका ना दाखवू.खरं तर समोरचा कोण आहे, काय करतो हे माहित नसताना त्याचे ज्ञान, अक्कल ईई काढू नये. तरीही या विषयात तुम्ही कुठे प्रतिसाद दिलेत त्याची लिंक द्या. जरा भारताचे Income Classification बघा. किती लोकांचं वार्षिक उत्पन्न महिना १०,००० रुपयांच्या आत आहे बघा. मुळात तुम्हाला माझा मुद्दाच समजला नाही असं मला वाटतंय.आणि हॉटेलची जी बिल सांगत आहात, अजून बंगलोर मध्ये तरी दर कमी झालेलं हॉटेल सापडायचं आहे. हॉटेल चालकांनी जुन्याच किमतीवर(आधीचे टॅक्स असलेल्या) नाव जीएसटी लावून कर लावले आहेत.आत्ता कसं ... हेच तर मी म्हणतोय ना! या लोकांना फक्त संधी मिळाली की लुबाडायला बरोब्बर जमतं. पहिल्यापासून मी म्हणतोय की मनोवृत्ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कोणतंही सरकारच काय ब्रह्मदेव आला तरी काही फरक पडणार नाही. कोणतं सरकार आहे एक जरा बाजूला ठेऊन अगदी तटस्थपणे बघू. छोट्या ते मध्यम उद्योगांमध्ये काम करणाऱ्यांना ८-१० हजार महिना पगार मिळत असेल. पण या उद्योगांच्या मालकांनी त्यांच्याकडचे रोख पैसे या कामगारांच्या माध्यमातून पांढरे करायचा प्रयत्न केला. म्हणजेच मालकांबरोबर कामगारही या अनैतिक व्यवहारात सामील झाले. आधी याच लोकांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैश्यांविरुद्ध आंदोलन केलं, पण जेव्हा वेळ आली तेव्हा तोच काळा पैसा पांढरा करायला मदतही केली. व्यापाऱ्यांनी हीच पैसे द्यायला उशीर करायची संधी आहे म्हणून देणेकऱ्यांना पैसे द्यायचे टाळले, तर अगदी काही सीए लोकांनी सुद्धा पैसे पांढरे करायचे नवीन मार्ग शोधून काढले. एवढंच कशाला अगदी बँकांनीही पैसे कमवायची हीच संधी आहे असं मानून कार्ड वापरण्यावर आणि बँक व्यवहारांवर चार्जेस लावले. म्हणजेच नोटबंदी अयशस्वी व्हावी म्हणून कळत नकळत किती लोकांनी हातभार लावला बघा.प्रत्येक वेळी सामान्य माणसाने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे हे उपदेश कामाचे नाहीत.आणिजो नागरिक जर कायदे पळत असेल, कर भरत असेल त्याने आता इतरही कामे करावीत हे सांगणे त्याची थट्टा करण्यासारखेच आहे.तुमचा भेळवाला पण सामान्य नागरिकच आहे. मग जर आधी होते ते सगळे टॅक्स काढून त्याजागी जीएसटी लावायचा असा नियम काढला आहे. नंतर जर तो रु. ६५ वर (आधीची टॅक्स सहितची किंमत) परत जीएसटी लावत असेल तर चुकीचं काम करतोय ना? मधल्यामध्ये त्याने भाववाढ करून घेतली आणि तो फायदा स्वतःच्या खिश्यात टाकला. जीएसटी हे आधीचं सरकार काय किंवा आत्ताचं सरकार काय आणणारच होतं. पण मग सरकार कुठलही असो, प्रत्येक नियमातून पळवाट काढून स्वतःचा फायदा बघायचा ही वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कशी सुधारणा होणार? तो भेळवाला स्वतः अशी छुपी भाववाढ करून मग दुसऱ्या दुकानदाराकडे गेला आणि त्या दुकानदाराने पण अशीच चलाखी केली म्हणून बोटं मोडणार. मग या सगळ्यात दोषी कोणाला ठरवणार? तर सरकारला. असो. मोदी, भाजपा, काँग्रेस, कोणाचं सरकार हे सर्व बाजूला ठेऊन तुम्हाला मी काय म्हणतोय हे समजलं आणि पटलं तर ठीकच आहे नाहीतर काय... आहेच २०१९.