Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोदीप्रेम आणि मोदीद्वेष: -१०० ते +१००

A
arunjoshi123
Fri, 10/06/2017 - 14:34
🗣 91 प्रतिसाद
मित्रहो, तुमच्या मते तुमची आणि मिपावरच्या इतर आयडींची मोदीभावना काय आहे? याच्या सर्व्हेमधे जर तुम्हाला रस असेल तर सहभागी व्हा. शून्यापेक्षा जास्त ते १०० = चढती चांगली भावना. शून्यापेक्षा कमी ते -१०० = चढती वाईट भावना. इथे चांगली आणि वाईट हे शब्द पात्रता, चांगुलपणा, नशीब, क्षमता, इ इ अनेक गुण आणि तसलेच अवगुण अशा अर्थाने आहेत. ============================ अर्थातच लोकांचं मत नेहमी तेच नसतं. शिवाय प्रत्येक मुद्द्याबद्दल तेच नसतं. प्रत्येक मुद्द्याचं महत्त्व तेच नसतं. कोणाला हे रिलेटीव नजरेने पाहायचं असेल, कोणाला संदर्भ पाहायचे असतील, कोणाला देशाचं पडलं असेल, कोणाला संकुचित अस्मितांचं पडलं असेल, कोणाला काही दूरगामी बाबी आवडत असतील. तर मोदी आहेत, असतील, पंतप्रधान झालेत, होतील, काही करताहेत, काही करत नाहीयेत, खरे आहेत, खोटे आहेत, सच्चे आहेत, नाटकी आहेत, सक्षम आहेत, अक्षम आहेत, असायला पाहिजेत, असायला नको होते, इ इ अनेक विचार असणार. या सर्वांचं एकत्रीकरण करून, गेल्या ७० वर्षांत जे पंतप्रधान होऊन गेले आणि येत्या १०-१५ वर्षांत जे होतील (मोदी राजकारणात असेपर्यंत), त्यांच्या तुलनेत वा अशी काही तुलना न करता, -१०० ते १०० पैकी किती मार्क द्यावे वाटते? =================================== तुम्ही तुमचे मार्क्स या धाग्यात बदलू शकता, एकदा दिलेले मार्क्स लढवायची फार आवश्यकता नाही. वाटल्यास स्पष्टीकरण देऊ शकता. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या एकूणत्वात त्या त्या संदर्भात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं हे तुम्ही कसं ठरवता हे तुम्ही सांगाल तर उत्तमच. ========================= रेंजच्या बाहेरची उत्तरे बाद. अग्राह्य. ============================================= ज्यांचे उत्तर ० नाही ते लोक देखिल संतुलित मानण्यात येतील. असल्यास. ==================================== लेखात तुम्ही मार्क दिले मंजे तुम्ही मत देणार असं मानलं जाणार नाही. त्याचा संदर्भ वेगळा असू शकतो. ============================ व्यक्तिशः मला लोक जेव्हा एखाद्या सार्वजनिक व्यक्तिस "खोटा तो खोटा" वा "खरा तो खराच" हे कसे, कधीपासून, का मानायला चालू करतात यात रुची आहे.
वर्गीकरण
राष्ट्रीय राजकारण
शब्द बुडबुडे आणि गोलगप्पा

प्रतिक्रिया द्या
24587 वाचन

💬 प्रतिसाद (91)
स
साहना Fri, 10/06/2017 - 15:10 नवीन
माझ्या मते : वाजपेयी => +२५ मन्नूजीं => -१०० नरेंद्र मोदी => -५० पॉलिसी च्या दृष्टीने मोदी आणि मनमोहन ह्यांत विशेष फरक नाही. विदेशनीती ह्या एका क्षेत्रांत मोदींनी भरीव कामगिरी केली आहे असे दिसते पण त्यांत सुद्धा पॉलिसी बदल असा काही नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 03/20/2018 - 07:04 नवीन
पी व्ही नरसिंहराव सारखा द्रष्टा पंतप्रधान आपल्याला लाभला नसता तर आपण बहुतेक व्ही पी सिंग आणि प्रभुतींच्या मूर्ख आणि योजनाशून्य व्यक्तींच्या पॉलीसीज मुळे आज आपल्या शेजार्‍यांपेक्षाही मागासलेले राहिलो असतो. काँग्रेस ने त्याना नेहमीच अनसंग हीरो ठेवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
प
प्रचेतस Fri, 10/06/2017 - 15:20 नवीन
मोदी +१००
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 10/06/2017 - 15:23 नवीन
मोदीकाका १०० पैकी १००
  • Log in or register to post comments
य
यश राज Fri, 10/06/2017 - 15:36 नवीन
मोदी +१००
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 10/06/2017 - 15:36 नवीन
नेहरू +१०० इंदिरा +५० लालबहादूर , नरसिम्हा राव +२५ राजीव गांधी , अटल बिहारी +२० मनमोहन , देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर - ० मोदी -२० देसाई -४०
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 10/06/2017 - 16:21 नवीन
मनमोहन+5 नेहरू -100 इंदिरा+10 बाकीच्यांचे माहीत नाही
  • Log in or register to post comments
ए
एक छायाचित्रकार Fri, 10/06/2017 - 17:09 नवीन
मोदि +५० १. अटल पेन्शन योजना. खुप फायदेशिर आहे. तपासुन पहा. २. प्रधान मंत्रि जन धन योजना ३. प्रधान मंत्रि जीवन बिमा योजना ४. प्रधान मंत्रि सुरक्षा बिमा योजना ५. बर्याच सरकारि योजना / कामे ओनलाइन होत असल्यामुळे कमी होत चाललेलि खाबुगिरी. उदा. आरटीओ साठि एम परिवहन , सर्व ठिकणी आधार लिंक करणे , ग्रुह खरेदि व विक्रि , आणि अनेक . ६. सुधारलेली रस्त्यांची अवस्था. झटपट होत असलेली रस्त्यांची कामे. मेरि सडक अअ‍ॅप ( वापरुन पह, मी स्वत: वापरलेले आहे ७. नोटबंदी. ८. देशाच्या संरक्षणाच्या द्रुश्टीने चालु असलेली भरीव कामे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sat, 10/07/2017 - 12:34 नवीन
पोलिसी documents घरी आली ? कि नुसते पैसेच भरत आहात ? ३. प्रधान मंत्रि जीवन बिमा योजना ४. प्रधान मंत्रि सुरक्षा बिमा योजना इथे सर्व कागदपत्रे बरोबर असताना पण विमा कंपन्या पैसे अडकवतात. मग तुमच्या कडे काहीही कागदपत्रे नसताना कोण पैसे देणार ? कि राष्ट्रसेवा म्हणून पैसे भरता ? ३३० रु दर वर्षी , प्रति माणशी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक छायाचित्रकार
आ
आनंदयात्री Fri, 10/06/2017 - 18:55 नवीन
मोदींना +७५, कारण, ९०च्या दशकात शाळकरी वयात जसा रोजचा पेपर वाचायला सुरुवात केला तसे अमके हजार कोटी - तमके हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आणि त्याचा वर्षानुवर्षे चालणारा तपास ही अगदी अपघातांच्या बातम्यांसारखी रोजची गोष्ट होती. यात झालेली लक्षणीय घट ही मोदी सरकारचं एक मुख्य यश आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/06/2017 - 18:58 नवीन
मला बरेच पंतप्रधान आवडतात. अगदीच चंद्रशेखर देवेगौडा असले लोक आवडायचे काही कारण नाही म्हणा! पण आवड ही फार वैयक्तिक गोष्ट आहे नाही का! एखादा माणूस दुर्गुणी आहे हे माहीत असले तरी आवडतो त्यामुळे तसे कारण देऊ शकणार नाही. मोदी मला नक्कीच आवडतात, +१००? हरकत नाही. तसा राहुल गांधी जर भावी पंतप्रधान असेल तर त्याच्या करमणूक मूल्यामुळे तोही आवडतो! :P किती ते त्या त्या वेळच्या मूडवर अवलंबून! अर्णव गोस्वामीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तोही +१०० आवडला होता. =))
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 10/11/2017 - 17:37 नवीन
मला तर वाटतं, अर्णवच पंतप्रधान झाला तर कित्ती मज्जा येईल! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पगला गजोधर Wed, 10/11/2017 - 20:07 नवीन
विकास.... वेड्या.... अक्खा देश तुला देशभरात सगळीकडं हुडकतोया .... अन तू फकस्त हिथ, मोदींच्या धाग्यावरच फकस्त, कसा सापडतुया लका....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Wed, 10/11/2017 - 20:51 नवीन
मी विकास आहे, पगला नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 10/12/2017 - 04:24 नवीन
असं प्रत्येक पगला म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पगला गजोधर गुरुवार, 10/12/2017 - 05:45 नवीन
आजका हर 'पगला', पहले कभी 'विकास' हुआ करता था | गुमशुदा रहाता है आजकल वो मगर, कभी उसके चाहने वालोकीं आँखोका, 'प्रकाश' हुआ करता था ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
पगला गजोधर गुरुवार, 10/12/2017 - 05:52 नवीन
आजका हर 'पगला', पहले कभी 'विकास' हुआ करता था | गुमशुदा है आजकल, भक्तीकीं अंधियारी गालियोमें वो मगर, कभी उसके चाहने वालोकीं आँखोका, 'प्रकाश' हुआ करता था ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पिवळा डांबिस Fri, 10/06/2017 - 19:15 नवीन
माणूस वैयक्तिक भ्रष्टाचारमुक्त वाटतोय, भरपूर श्रम करतांना दिसतोय, जुन्या सरकारचे चांगले प्रयत्न उगाचच जुन्या सरकारचे म्हणून मोडीत (नो पन इंटेंडॅड!) काढत नाहिये. बाकी आता यापुढे चढणीवर वा उतरणीवर जाईल हे त्याच्या यापुढील कर्मावर अवलंबून!!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 10/11/2017 - 17:36 नवीन
पहील्या ३ ओळींमधे सगळे बरे लिहून शेवटी फक्त २५ मार्कच? बरे झाले तुम्ही माझे मास्तर नव्हता! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुचिता१ Fri, 10/06/2017 - 19:24 नवीन
नोटबंदी पूर्वी +१०० होते. पण एव ढ्या धाडसी निर्णया ची अंमलबजावणी जमली नाही , म्हणून +७५
  • Log in or register to post comments
क
कोण Fri, 10/06/2017 - 20:02 नवीन
मोदि +७५
  • Log in or register to post comments
य
योगेश लक्ष्मण बोरोले Fri, 10/06/2017 - 20:03 नवीन
मोदींईतकी टिका कोणाच्याच वाट्याला आली नसेल. पण जराही विचलीत न होता हा माणुस प्रचंड कष्ट उपसतोय. +१००
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 20:47 नवीन
नेहरू = -१०० (यापेक्षा कमी आकडा द्यायला परवानगी असेल तर त्यातील सर्वात कमी आकडा देईन. खरं तर मायनस इन्फिनिटी द्यायची इच्छा आहे). शास्त्री = +५० इंदिरा गांधी = +२५ देसाई = ० राजीव गांधी = -५० वि. प्र. सिंह = -५० चंद्रशेखर = ० नरसिंहराव = +२५ देवेगौडा = -२५ गुजराल = -२५ वाजपेयी = +५० म. म. सिंह = -९९ मोदी = आतापर्यंत +७५ गुलझारीलाल नंदा २ वेळा पंतप्रधान होते. परंतु ते अत्यंत अल्पकाल व हंगामी पंतप्रधान असल्याने गुण दिलेले नाहीत. सर्वाधिक वाईट नेहरू आणि म. म. सिंह. या दोघांच्या वाईट कामगिरीत फारसा फरक नाही. सर्वात चांगले मोदी, वाजपेयी, शास्त्री, इंदिरा गांधी व नरसिंहराव.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/06/2017 - 22:46 नवीन
माझेही हेच गुण. फक्त काही फरक असे : मनमोहन सिंग = -१०० कारण टेररिस्ट फायनान्सिंग मोरारजी देसाई आणि गुजराल = -१०० कारण दोघांनी भारतीय गुप्तचर खात्यांची वाट लावली -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 05:01 नवीन
चरणसिंह राहिले. त्यांना अर्थातच ० गुण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गौतमीपुत्र सातकर्णि Sat, 10/07/2017 - 05:56 नवीन
1) जवाहर लाल नेहरू : -30 2) गुलझारीलाल नंदा : 00 3) लाल बहादुर शास्त्री : 20 4) इंदिरा गांधी : 80 5) मोरारजी देसाई : -20 6) चरण सिंह : 00 7) राजीव गांधी : -50 8) वी. पी. सिंह : -20 9) चंद्र शेखर : -20 10) पी. वी. नरसिम्हा राव : 60 11) अटल बिहारी वाजपेयी : 60 12) एच. डी. देवेगौडा : -100 13) इंदर कुमार गुजराल : - 100 14) मनमोहन सिंह : -40 15) नरेंद्र मोदी : 40*
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 10/07/2017 - 05:58 नवीन
माझा या प्रश्नाला पास आहे कारण खरोखरच " प्रधानमंत्री" पद शक्तीमान पद आहे की नाही याविषयी मला शंका आहे. समजा एखादा माणूस पंतप्रधान पदी अगदी अचाट असे व्यवस्थापन कौशल्यवाला असेल , प्रामाणिक असेल तर भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असली तरी सर्वात " भंपक" लोकशाही आहे हे ही तितकेच खरे. सबब आपले पुरे कसब दाखवायला त्याला भारतीय जनता वावच देणार नाही इतका प्रचंड अन्तर्विरोध भारत देशात आहे. इथे शेतीमालाचे भाव उतरले तर ते एक संकट मानणारे लोकही आहेत. माझ्या मते भारताची सर्वांगीण प्रगति " शहाणी" हुकुमशाही आली तरच शक्य आहे व " शहाणी हुकुमशाही " ही संज्ञाच मुळी वाद निर्माण करणारी आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 08:56 नवीन
वरील प्रतिसाद नक्कीच एक मत म्हणून ग्राह्य आहे. पण लेखात म्हटलं आहे तसं उत्तर फक्त -१०० ते १०० इथेच असायला हवं. म्हणून लेखातील प्रकट उद्देशाच्या दृश्टीने अग्राह्य मानण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
अ
अभिजीत अवलिया Sat, 10/07/2017 - 06:09 नवीन
गुण देणार्यांनी कोणत्या मुद्द्याच्या आधारावर गुण दिलेत हे जरा लिहिले तर बरे होईल. म्हणजे अमक्या तमक्या पंतप्रधानाने ही कामे चांगली केलीत म्हणून त्याला इतके जास्त गुण, ही कामे वाईट केली म्हणून कमी गुण वगैरे. म्हणजे निदान प्रत्येक पंतप्रधानाने नक्की काय काय चांगले वाईट केले हे तरी सगळ्यांसमोर येईल.
  • Log in or register to post comments
ए
एमी Sat, 10/07/2017 - 06:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
च
चौकटराजा Sat, 10/07/2017 - 07:17 नवीन
हे काम श्री गुरुजी च करू शकतीलसे वाटतेय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया Sat, 10/07/2017 - 08:59 नवीन
श्रीगुरुजींनी व्यवस्थित विश्लेषण करून मार्क दिले तरी ते त्यांचे वैयक्तिक मत राहील. त्यामुळे प्रत्येकाने विश्लेषण करून मार्क दिले तर बरे होईल. नाहीतर अंदाजपंचे काहीतरी आकडा टाकून द्यायला काय जातंय. अर्थात ही माझी फक्त अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
त
तिमा Sat, 10/07/2017 - 07:18 नवीन
मार्कस देण्याबद्दल पास. कारण, या देशांत खरे सत्य कधीच समजत नाही. मिडियावर जे दाखवले जाते, त्यावरुन मत ठरवणे मूर्खपणाचे ठरेल. आजवर झालेल्या आणि सध्याच्या पंतप्रधानांना त्यांचे अनेक निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागले, ते सामान्य नागरिकांना माहित असणे शक्य नसते. आजपर्यंतच्या सर्वाच पंतप्रधानांनी देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असणार. ते निर्णय बरोबर होते का चुकीचे ठरले, हे काळच सांगू शकेल. पण त्यांचा हेतू चांगलाच असणार. इतक्या अवाढव्य देशांत, सर्व प्रवृत्तीची माणसे रहातात. त्यामुळे काहींना वाटणारे अच्छे दिन, बाकी अनेकांसाठी बुरे दिन असणार. जनतेला एकदा 'चकटफु' ची संवय लावली की त्याच गोष्टींसाठी पैसे मोजावे लागले की दु:ख्ख होते. आता ही संवय लावणारे वाईट की ती संवय मोडायचा प्रयत्न करणारे वाईट, याबद्दल मतभिन्नता असणार. भ्रष्टाचाराने देश अंतर्बाह्य पोखरलेला असताना, तो सुधारायला अनेक वर्षे लागतील. पण तेवढा संयम अगदी विचारवंतांमधेही नसतो तर सामान्य जनतेत कसा असणार ?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 09:06 नवीन
प्रिय तिमाजी, तत्त्वज्ञानाच्या दृश्टीने सत्य कशास म्हणावं यावर चिकार गहमागहमी झालेली आहे. विज्ञानाच्या दृष्टिने देखिल सत्याचं नक्की स्वरुप काय याच्या बद्दल बरीच वादावादी दिसते. वास्तविक जीवनात देखिल सत्याचा कटू आग्रह नसायला हवा. प्राप्त परिस्थितीत आपलं एक मत असतं. ते हवं आहे. ====================================== तसंच @ चौकटराजा, जे हवं ते नसलं तरी जे आहे ते कसं आहे त्याबद्दल एक मत असतंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
मराठी_माणूस Sat, 10/07/2017 - 09:21 नवीन
आजपर्यंतच्या सर्वाच पंतप्रधानांनी देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असणार. ते निर्णय बरोबर होते का चुकीचे ठरले, हे काळच सांगू शकेल. पण त्यांचा हेतू चांगलाच असणार.
"आणीबाणी" चा हेतु सुध्दा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
श
श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 09:32 नवीन
आजपर्यंतच्या सर्वाच पंतप्रधानांनी देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असणार. असहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 09:08 नवीन
पाचच्या पटीत सोडून आकडे दिसत नाहीत. हा हा हा
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 10/07/2017 - 09:43 नवीन
मुळात मोदी हे गोरक्षक टाइप हिंसाचाराला आळा न घालण्याच्या अपेक्षेवर पंतप्रधान झाले आहेत. त्याचसाठी आम्ही त्यांचा द्वेष करतो. त्यामुळे इथेच -१०० होतात. त्यांचीआर्थिक धोरणे आणि परफॉर्मन्स खरे तर इर्रिलेव्हंट आहेत. (तो ही वाईटच आहे).
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 12:57 नवीन
नितिनजी, आपण मत व्यक्त करू शकावं इतपत आजपावेतो बीजगणिताचा विकास होऊ शकलेला नाही हे आमच्यासारख्या सर्व्हेकर्त्यांचं दुर्भाग्य. पण तरिही जे काही लुळं पांगळं विज्ञान उपलब्ध आहे, त्याचा आपण उपयोग करून काहितरि मत नोंदवलं यासाठी आभार. पण आमच्या मागच्या अनुभवावरून या अपेक्षा तुमच्या नाहीत तेव्हा तुमचे मार्क्स किती ते सागा. ============================== आळा न घालण्याच्या अपेक्षा असणारांची एक लिस्ट मिळेल काय? यांचा फार वारंवार उल्लेख आपण करता. आपण एका मिनी गांधीस्तानात राहत असाल तर निवासस्थान बदलावे अशी विनंती. (गांधिजींना गाईंचा फार पुळका होता, मंजे इतका कि बाबाने आयुष्यात एकदाच हिंसेचे समर्थन केले ते गोरक्षेसाठी! आता अहिंसेच्या पुजार्‍याची ही हालत तर बाकी भारत किती मागास असावा!!!). ======================================== या अपेक्षा मोदिंसोबत कुठे कशा अ‍ॅग्री झाल्या होत्या ते कळेल का? तुमचे मायक्रोफोन कुठे कुठे पेरलेत? ते रेकॉर्डिंग्ज मिडियाला द्यायला हवे. ================================================ हे अशा अपेक्षा असलेले लोक इतकी वर्षे मन मारून का जगत होते म्हणे? गोरक्षा करायला वा तिच्या नावे धिंगाणा करायला स्वतःचे सरकारच लागते का? अहो, दिल्लित पाकिस्तानचे सरकार नसताना देखिल लोक काश्मिरात धिंगाणा घालतात. १९४७ ते २०१४ मधे किती गोररक्षक कोंडवाडे पुरोगामी सरकारने ठेवलेले? किंवा गोरक्षा नावाचं भारताच्या संस्कृतीशी काही संबंध नसलेलं मूल्य अचानक भूतकाळात कधीच महत्त्वाचं नव्हतं तर तुमच्या लाडक्या काँग्रेसची सत्ता असताना ते वर्धित कसं झालं? लाडक्या काँग्रेसने हिंसाचाराची मानसिकता, जी मागे कधी नव्हती, ती कशी काय स्फोटक स्थितीला आणली? गाईच्या नावाने धिंगाणा करणारी लोक मंजे काय पावसाळी बेडकं आहेत का जी फक्त २०१४ च्या पावसातच पडली? इतकी लाडिक काँग्रेस असताना, ती हारली तर अजून १५०० पक्ष असताना हे हिंसाचारी कसे काय आपले लोक पंतप्रधानपदी बसवू शकतात? करत काय होतात तुम्ही? ================= आणि त्यांचा भ्रमनिरास झाला आहे म्हणजे काय? मोदींना हिंसा जमली नाही? का धमक नाही? नियोजन नाही हिंसेचं? का ती फसवणूक होती हिंसावाद्यांची सत्तेसाठी? नक्की काय? समजा जरी मोदिंना हिंसा जमत नाही वा त्यांनी फसवलं हिंसावाद्यांना यापैकी काहीही सत्य असलं तरी हिंसावाद्यांची संख्या अतिप्रचंड आहे हे आपण मानताय. देशात पंतप्रधान, राष्ट्रपती, १०-१५ मुख्यमंत्री जमवण्याईतकी!!! मोदिंनी त्यांना २०१४ मधे फसवलं वा अपेक्षापूर्ती केली नाही मंजे मोदी असं नेहमीच करू शकतील असं नाही. म्हणजे देशाच्या भविष्यात ते ज्याला +१०० मार्क देणार आहेत असा पुढचा हिंसाचारी बाबा वाढून ठेवला आहे पुढच्या १-२ निवडणूकींत! ======================================== पुरोगाम्यांकडून तार्किकतेची अपेक्षा केली तर आपल्या म्हणण्याचे असे निश्कर्ष निघत जातात. आपलं असंच म्हण्णं आहे नं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 10/07/2017 - 14:30 नवीन
>>आळा न घालण्याच्या अपेक्षा असणारांची एक लिस्ट मिळेल काय? माझे फेसबुकवर ५०० + फ्रेंड आहेत. त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक फ्रेंड्स [जे आंतरजालावर माझे मित्र झाले आहेत ते सोडून - नातेवाईक व कलीग्ज] हे अशी अपेक्षा ठेवणारे आहेत असे मी म्हणू शकतो. यात नातेवाईक महिलांचाही अपवाद नाही. माझ्या नातेवाईकांपैकी ९० टक्के + इतके लोक नथुराम भक्त असतील. >>या अपेक्षा मोदिंसोबत कुठे कशा अ‍ॅग्री झाल्या होत्या ते कळेल का? हा हा हा. अपेक्षा अशा अ‍ॅग्री होत असतात का? एक ट्रेंड पहा १९८४ पासून भाजपाला मिळणार्‍या सिटांचा. १९८४- गांधीवादी समाजवाद- २ सिटा (हिंदुत्ववाद बाजूस ठेवलेला असताना) १९८९ ते १९९९- बाबरी मशीद आंदोलन, रथयात्रा, बाबरी पतन, दंगली- सिटा सातत्याने वाढून भाजपचे सरकार स्थापन झाले. (मुस्लिमविषयक २००४- (मुस्लिमविषयक) अपेक्षा पूर्ण होत नसल्याने पराभव. मधल्या काळात २००२ गुजरात घडले. भाजपचा केंद्रात पराभव झाला तरी गुजरातमध्ये भक्कम स्थिती झाली. २००९- अडवाणी जिनांना सेक्युलर वगैरे म्हणू लागले म्हणजे पुरताच भ्रमनिरास. २००९ च्या निवडणुकीत पुन्हा पराभव २०१४- मोदींचा भावी पंतप्रधान म्हणून उदय. २००२ मध्ये अपेक्षा पूर्ण केलेल्या असल्याने देशपातळीवर अपेक्षा ठेवणार्‍यांकडून (उत्तरेतील आणि पश्चिमेतील राज्यांत) भरभरून मते. शत-प्रतिशत भाजप. ५६ इंची छातीचा महिमा पाकिस्तान परिप्रेक्ष्यात असण्यापेक्षा देशांतर्गत परिप्रेक्ष्यात जास्त. >>आणि त्यांचा भ्रमनिरास झाला आहे म्हणजे काय? मोदींना हिंसा जमली नाही? मोदींनी या बाबतीत अपेक्षा ठेवणार्‍यांचा भ्रमनिरास केला असं मी कधी म्हणालो? >>गोरक्षा नावाचं भारताच्या संस्कृतीशी काही संबंध नसलेलं मूल्य अचानक भूतकाळात कधीच महत्त्वाचं नव्हतं आता गोरक्षकांकडून जे उपदव्याप सुरू आहेत ते "गायींच्या रक्षणासाठी" आहेत असा तुमचा समज आहे की काय? धन्य आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मोदक Sun, 10/08/2017 - 04:32 नवीन
त्यांचीआर्थिक धोरणे आणि परफॉर्मन्स खरे तर इर्रिलेव्हंट आहेत. गांधी न्हेरू घराण्याची हुजरेगिरी तुमच्यासाठी रिलेव्हन्ट असेल तर तुमचे म्हणणे (नेहमीप्रमाणे) बरोबरच असेल. विरोध आणि द्वेष मध्ये फरक असतो, तुमच्याकडून अपेक्षा नाही पण हा मुद्दा शिकून घ्या. काँग्रेसच्या फायद्यासाठी तरी वापरता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 10/07/2017 - 09:58 नवीन
नेहरू- १०० इंदिरा- ४० शास्त्री ८० राजीव- ३५ नरसिंहराव- ६५ गौडा,गुजराल्,चंद्रशेखर- २० वाजपेयी- ७० मनमोहन- ४५ मोदी-(सध्याच्या अनुभवानुसार) ६५
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 12:14 नवीन
हे हायफन आहे, ॠण चिन्ह नाही , असं मानायचं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 10:32 नवीन
कायप्पावरून - _______________________________________ अभक्त - अबब!! कोण आहात तुम्ही? मोदी - नरेंद्र दामोदरदास मोदी अभक्त - अशक्य आहे, मोदी पंतप्रधान आवास सोडून इथे कशाला येतील...भ भ भूत तर नाही ना? मोदी - मित्रा, मी हल्ली इथेच असतो... अभक्त - ई ई इथे म्हणजे कुठे...? मोदी - इथे म्हणजे तुझ्या डोक्यात...! अभक्त - नाही नाही हे कसं शक्य आहे, माझ्या डोक्यात केमिकल लोचा नाही, मी वेडा नाही, मी वेडा नाही... मोदी - तू वेडा मुळीच नाही, पण तुझ्या मनन, चिंतन, लेखन, वदन यात सतत मीच असतो, त्यामुळे मी तुला सर्वत्र दिसतो... अभक्त - अरे देवा, मग यावर उपाय काय...? मोदी - फार सोपा उपाय आहे, तू तुझा अमूल्य वेळ, तुझी सारी क्रयशक्ती माझ्यावर खर्च करतो आहे... माझं राजकारणात काय बरं वाईट व्हायचं ते होऊ दे, पण तू पहिले स्वतःचा विचार कर... माझा विकास गांडो असेल किंवा नसेल, ते लोक ठरवतील, पण तू तुझी प्रगती कशी होईल याचा विचार कर... मी किती वाईट आहे हे सांगत असताना तू लोकांपुढे सक्षम पर्याय उभा कर. दुसरा कसा चांगला आहे, हे लोकांना पटवून दे. माझे समर्थक तर माझा प्रचार करतातच, पण तुझ्यासारखे विरोधकही अप्रत्यक्षपणे माझाच प्रचार करतात... अभक्त - मी कुठे तुमचा प्रचार करतो, मी तर तुमच्यावर प्रचंड टीका करतो... मोदी - कुणी माझी प्रशंसा करो वा निंदा, पण सर्व प्रसार माध्यमांमधील चर्चा, फेसबुक पोस्ट्स, कमेंट ट्रोल्स, ब्लॉग्ज, वर्तमानपत्र यात केंद्रबिंदू कोण असत...? अभक्त - मोदी...म्हणजे तुम्ही!! मोदी - मित्रा, राजकारणात एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी म्हटल्या जाते. मला सोनियाबाईंनी "मौत का सौदागर" म्हटले होते, त्याचा फायदा कुणाला झाला...? अभक्त - मोदींना, म्हणजे तुम्हाला...! मोदी - तू दिवसभर किती पोस्ट टाकतोस...? अभक्त - दहा ते बारा...! मोदी - कुणाबद्दल टाकतोस...? अभक्त - तुमच्याच विरोधात...! मोदी - तुझ्या आवडत्या नेत्याच्या समर्थनार्थ किती पोस्ट्स टाकतोस...? अभक्त - एकही नाही...! मोदी - मग ज्या वर्गात माझ्याखेरीज अन्य कुणी विद्यार्थीच नाही, तिथे मी पास झालो अथवा फेल झालो, काय फरक पडतो...? अभक्त - काहीच नाही...! मोदी - मग माझ्या समर्थकांपेक्षा मला अधिक फायदा कुणाचा होतो...? अभक्त - विरोधकांचा म्हणजे आमचा...! मोदी - मग अशाने दिवसेंदिवस अधिक बलशाली कोण होत जाईल...? अभक्त - तुम्हीच...! मोदी - मग लोक गांडो कुणाला म्हणतील...? अभक्त - आम्हाला आय मीन तुमच्या विरोधकांना...! मोदी - मग मनोरुग्ण किंवा नमोरुग्ण होऊन माझा द्वेष करण्यापेक्षा माझे राजकीय विरोधक होणे योग्य नाही का...? अभक्त - पण मला उठता, बसता, खाता-पिता, दिवसरात्र तुम्हीच दिसता, यावर उपाय काय...? मोदी - स्वतःमधील नकारात्मकता सोडून सकारात्मक विचार करणे. मोदी किती वाईट आहे, हे सांगण्यात सर्व ऊर्जा दवडण्यापेक्षा मी कसा चांगला आहे किंवा होऊ शकेल याचे चिंतन करणे... अभक्त - धन्यवाद मोदीजी, तुम्ही माझे डोळे उघडले. आता मी तुमचीच भक्ती करणार...! मोदी - हा हा हा गेट वेल सून मामू!! तुला तसे करायची गरजच नाही, फक्त स्वतःवर, स्वतःच्या पक्ष्यावर, स्वतःच्या नेत्यावर विश्वास ठेव... अभक्त - हो हो पण तुम्ही मला दिसता हे गुपित कुणाला सांगू नका हं प्लिज!! हॅलो...मोदीजी...हॅलो...कुठे गायब झालात...?? *(मी तुझ्या डोक्यातच आहे मित्रा, हा हा हा!!)*
  • Log in or register to post comments
ओ
ओरायन Sat, 10/07/2017 - 10:53 नवीन
राजीव : +२५ (जरी सहानभुतीने सत्ता मिळाली,तरी ंकाँम्प्युटर युगालां चलाना दिली. इंदिरा : +५० सुवर्णमंदिरात कारवाईचा योग्य धाडसी निर्णय, सिक्कीम ला मुख्य प्रवाहात आणले. शास्ञी: +६० जय जवान जय किसान वाजपेयी : + ७० मोदी : + ७५ नेहरू : + ३० मनमोहनसिंग : + २० ( पंतप्रधान म्हणून ) : +८० ( अर्थमंञी म्हणून ) व़्हि पी सिंग : उणे ५०
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 13:02 नवीन
नेहरूंबद्दल लोकांच्या मतांत वाईल्ड डिफरंस आहे. सर्वसाधारणपणे मिसळपाव वाचकांत मोदींची छवी चांगलीच आहे असं वाटतं.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 10/07/2017 - 13:19 नवीन
+७५ राजकीय जीवन पणाला लावून काही धाडसी निर्णय घेतले आहेत बरेचदा सहकार्याची मतं, अपेक्षा पहात नाहीत म्हणून काही गुण कमी मनमोहन पहिला डाव +५० सुधारणा राबवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न दुसरा डाव -१२५ पहिल्या डावात कमावले त्याच्या चौपट घालवून टाकलं अधेर नगरी चौपट राजा नरसिंहराव​ +१०० मोह माया ममता संभाळून शकट हाकला स्वतः ते अस्तित्व दाखवून दिले परिणिती मरणोपरांत अवहेलना नशीबी नेहरू -५० गांधी भांडवल चालवून काश्मीर विचका, राजीव +४५ उदारीकरणाच्या धोरणामुळे विकासाने वेग घेतला चांडाळ चौकडी दूर ठेवू शकले नाहीत लालबहादूर+८० अल्पजीवी कारकीर्द, तरीही परिणामकारक कदाचित अजुन ५-१० वर्ष जगले असते तर कॉंग्रेस गांधी नेहरू मुक्त झाली असती गुजराल+चरणसिंग+देवेगौडा अपघाती पंतप्रधान गुण नाहीत मोरारजी -५० प्रांतीय पक्षपाती वागणूक पंतप्रधान असताना त्यांनी वारंवार दिली अटलबिहारी वाजपेयी+१०० अगदी उशीराने संधी मिळाली तरी अगोदर केलेल्या कामांचे अनुभव पंतप्रधान असताना पुरेपूर उपयोग करून घेतला मोदी भक्त असा शिक्का बसलेला वाचकांचीच पत्रेवाला नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 13:57 नवीन
मोदींना निवडून दिलं तेव्हा काही वाहिलेल्या विरोधकांची ते कसे निघतील याबद्दल अशी अपेक्षा होती: १. हा एकदम रावडी सांड निघेल. मॅनरलेस. घाण भाषा बोलणारा. उद्धट. भारताचा अपमान. पदाचा अपमान. घटनेची अजिबात इज्जत नसणारा. २. हा टोटल फ्रॉड निघेल. उघड. ३. हा आणिबाणी लावेल. काहीही कायद्दे करेल. विरोधकांना जेलात टाकेल. ४. स्पष्ट मुस्लिम विरोधी बोलेल. त्यांना मरू देईल. लोकांना त्यांना मारू देईल. दंगली माजवेल. प्रशासन मुसलमान मारायला (२००२ प्रमाणे हो) मदत करेल. ५. भारत हिंदू देश घोषित करेल. ६. अर्थव्यवस्थेची वाट लावेल. ७. प्रशासन, पोलिस, सेना वाहवत जातील. व्यवस्थात्मक अनागोंदी माजेल. ८. संपूर्ण एकाधिकारशाही असेल. (यशवंत, शत्रुघ्न, जोशी, आडवाणी, बंगारू, इ कोणी नसेल) ९. गांधीजींना व्हिलेन नि गोडसेंना हिरो म्हणेल. १०. मुसलमानांचे घटनात्मक अधिकार खाडकन काढून घेईल. संपत्तीचे अधिकार पण काढून घेतले जातील. ११. जर्मनीप्रमाणे जाहिर काँसेंट्रेशन कँप्स निघतील. १२. मुसलमानांना पाकिस्तानात ढकलले (दुसरं क्रियापद सुचत नाहिये) जाईल. १३. भारतात लोकशाही नष्ट होइल. १४. भारतीय सेक्यूलरिझम नश्ट होइल. १५. भारतात मध्ययुगीन नंगानाच चालू होइल. १६. अगदी घाणेरड्या हिंदू परपरांना, प्रथांना जिवंत केले जाईल. १७. हिंदू धर्मांला सरकारी करातून पैसे मिळतिल. १८. पाकिस्तानवर अणूबाँब टाकले जातील आणि ते आपल्यावर टाकतील तेव्हा किमान २५-३० कोटी लोक मरतील. संपत्तीचं नुकसान वायलं. १९. अखंड भारत करायचा म्हणून प्रत्येक शेजार्‍यावर हल्ला करतील. २०. स्वकिय उद्योग नको तितके सुरक्षिले जातील. २१. शिक्षणात फक्त पुराणे शिकवतील आणि प्रयोगशाळेत सत्यनारायण हे मुद्दे मी बरीच वर्षे एकतोय आणि अजूनही सोशल मिडियावर दिसतात. ================================================================== (नितिनजींसारख्या) विरोधकांच्या डोक्यात मोदींची, संघाची हीच प्रतिमा आहे. पण वास्तवात मोदींनी पहिल्यांदा भूअधिग्रहण कायद्यात चक्क संसदेसमोर गुडघे टेकले. नंतर न्यायिक सुधार कायदा (चांगला पास झालेला) जेव्हा कोर्टानं रद्द केला तेव्हा कोर्टासमोर गुडघे टेकले. मग मात्र २१ कलमी विरोधकांना कळेना कि या माणसाचा, पक्षाचा वा विचारसरणीचा पूर्वीच्यासारखा अपमान कसा करावा. पदं संपली, अवार्डं संपली, मुद्दे संपले, त्यांची स्वतःची प्रतिष्ठा संपत आली, आपल्या कटुतेचा फायदा कोणाला होतोय याचा गोंधळ उडाला, सत्ता संपू लागली, आपल्याला अजिबात अकलेचा गंध नसलेल्या क्षेत्रांत काहीच्या बाही विरोधी मतं प्रकटून झाली तरी मोदी नावाचं प्रकरण स्नोबॉलच होतंय. मोदी नावाचं प्रकरण फेकू, खोटारडं असल्याची आत्मिक ग्वाही असताना देखिल ज्यांना ज्यांना ते सांगायला जाऊ ते आपल्यालाच खोटारडा मानू लागले अशी गोची झाली. छिद्रान्वेष चालू झाला. चिडचिड वाढली. ================================================================================= मोदी हा काही बिळातून बाहेर आलेला विषारी साप नाही. उगाच इतका कल्ला करायला. ही इज जस्ट अनादर पिएम ऑफ इंडिया. अजून एक पंतप्रधान. कोणाला थोडा बरा वाटेल कोणाला थोडा वाईट. पण इतकं बाऊ करण्याइतकं काय? पदास किति लायक आहे नाही, देशाचं किती मोठं सुदैव वा दुर्दैव आहे हे १९-२० असेल. पण असं अव्वाच्या सव्वा अपेक्षा ठेवणं किंवा दुसर्‍या बाजूला ती जातच घातक मानणं अनुचित आहे. आपल्या इतक्या खासदारांना, आमदारांना, लोकांना आवडले आहेत आणि अनेक विरोधकांना पण ५ वर्षे मान्य आहेत तेव्हा आपली देखिल कटुता सिमित असावी. =========================================================================================== वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो. कंपनीचे चेअरमन "चीप, मीन" असू शकतात, पण त्यांच्यात काहीही चांगलं नाही असं कसं? नेहरूंमधे सत्ताहव्यास एकिकडे आणि देशाचे हित काँप्रो करणारा भाबडेपणा दुसरीकडे होता म्हटलं तरी त्यांनी केलेल्या कार्यांत बरिच चांगली पण असणार ना? तुम्हाला -१०० (सर्वस्वी दुर्गुणी?) मार्क्स द्यावेत असा वाटणारा मनुष्य १५ वर्षे निवडून कसा आला? लोक इतके मूर्ख होते? किंवा इतर शब्दांत माझे, तुमचे पणजोबा इतके मूर्ख होते? हा त्या काळातल्या त्यांना नेते मानणार्‍या सर्व खासदारांचा अपमान नाही का? नेहरूंना एकही मार्क न देण्यातलं अनौदार्य आणि मोदींना २१ कलमी दोष देणे यात गुणात्मक फरक आहे का? (नाही असं माझं मत आहे. नाहीच असा दावा तुमच्यासाठी नाही, आहे का असा प्रश्न आहे.). त्यांच्या विचारसरणी आपल्याला मान्य नसणं वेगळं, त्याच्या चुका दिसणं वेगळं मात्र त्यांची त्यांचि जी काही विचारसरणि आहे तिच्याशी देखिल त्यांची प्रामाणिकता नव्हती याची खात्री असणं विचित्र आहे. पहा, एकूणात, मला देखिल नेहरू द्वेष (तसलं कैतरि) आहे, मात्र -१०० वैगेरे नाही हो. ================================================================ -१०० च्या मानाने +१०० बद्दल माझं चांगलं मत आहे, नेता कोणताही असो.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 10/07/2017 - 14:36 नवीन
क्र २, ३ ६ व ८ हे ऑलरेडी झाले आहे/होऊ घातले आहे. यातलं विरोधकांना तुरुंगात घालण्याचं काम सरकारतर्फे होत नाहीये तर त्यांच्या एजंट्सकडून होत आहे. परवाच प्रकाश राज या अभिनेत्याने मोदींवर टीका केली म्हणून त्याच्यावर लखनौ न्यायालयात खटला दाखल झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 17:02 नवीन
एखाद्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणे हा घटनादत्त अधिकार आहे. परंतु मोदी विरोधकांविरूद्ध कोणी कायदेशीर मार्ग सुद्धा वापरू नये आणि तो वापरल्यास तुम्ही असहिष्णु अशी मोदी विरोधकांची धारणा दिसते. गौरी लंकेशला कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गाने शिक्षा झाली. पण तरीही ती निर्दोष आणि तिच्याविरूद्ध कायद्याच्या मार्गाने जाणारे दोषी. थोडक्यात म्हणजे आम्ही काहीही करू, पण आम्हाला विरोध करायचा नाही. आम्ही वाटेल ते आरोप करू, पण आमचे आरोप खोडण्याचा प्रयत्न करायचा नाही. आम्ही वाटेल त्या घाण शब्दात टीका करू, पण आमच्या बरळण्याविरूद्ध कायदेशीर मार्गाने दाद मागायची नाही. आम्ही जे करतो किंवा बरळतो त्याला विरोध न करता गप्प बसा. आमच्या टीकेला उत्तर दिले किंवा न्यायालयात गेलात तर आम्ही तुम्हाला असहिष्णु म्हणून पुरस्काराचा कागद परत करू (पुरस्काराची रक्कम अर्थातच परत देणार नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा