Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग १६

ग
गॅरी ट्रुमन
Mon, 11/13/2017 - 15:51
🗣 176 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे हा नवीन धागा.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
39220 वाचन

💬 प्रतिसाद (176)
स
सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 11:26 नवीन
तुम्ही चालवायला घ्या आणि फायद्यात आणून दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Wed, 11/22/2017 - 14:00 नवीन
एकाच वेळी शिस्तबद्ध विकासप्रिय सरकार आले असा कांगावाही करायचा आणि सरकारी कंपन्यांचे दुसर्‍याना देवून टाकायचे, मला तरी यात विरोधाभास वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
B
babu b Wed, 11/22/2017 - 14:01 नवीन
शेअर्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 17:56 नवीन
सरकारी कंपन्यांचे शेअर्स फुकट मिळतायत का? मला पण मिळाले तर आनंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 17:58 नवीन
रच्याकने तुम्ही डावे की साम्यवादी की समाजवादी? नाही म्हणजे एवढा जळफळाट होतोय म्हणून विचारले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तर्राट जोकर Wed, 11/22/2017 - 11:00 नवीन
१२८ शेतकरी संघटनांचा संयुक्त मोर्चा. दिल्लीत ३ लाखाच्या वर शेतकरी मोर्च्यात सहभागी.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 11/22/2017 - 12:08 नवीन
एक खरी विनोदी बातमी आहे, दिल्ली आंदोलनास (कि बघण्यास ) गेलेले १५०० महाराष्ट्रीय शेतकर्‍यांची रेल्वेगाडी परतीच्या वेळी चक्क तीचा मार्ग भटकून मध्यप्रदेश मध्ये पोहचली नी प्रवासी अनपेक्षीत गावात जाऊन अडकले. :) आजतक वृत्त त्यांच्या यात्रेची एक जमेची बाजू मंडळी फुकटेपणा न करता राजरोस विशेष ट्रेन बूक करून गेली. businesstoday चे वृत्त खरे असेल तर विशेष ट्रेन करण्यासाठी मंडळींनी ३९ लाख मोजले असावेत . ३९ लाख भागीले १४९४ प्रवासी म्हणजे प्रती माणसी २६०० प्रती शेतकरी फार लहान रक्कम झाली. प्रत्येकी ३०,०००च कर्ज माफ झाल तर ३००० चा खर्च मोठा नाही आणि नाही झाल तर फक्त ३००० मध्ये दिल्ली पाहून येण्याची हौस फिटली. संदर्भःबिझनेस टुडे वृत्तपत्र हा प्रतिसाद लिहिताना जसे पाहीले पण आख्खी ट्रेन बूक करण्यासाठी पैसे एकरकमी आधी भरावे लागले असणार. अशा दहा जरी ट्रेन बूक केल्या असतील तर रेल्वेचा चार एक कोटीचा किफायतशीर धंदा झाला पर्यटनही झाले. आता १५ हजार शेतकर्‍यांकडून गावोगावी जाऊन पैसे गोळा करणे अवघड गेले असेल. त्या पेक्षा आधी कुणीतरी एक रकमी पैसे मोजून नंतर शेतकर्‍या कडून पैसे वापस घेतले असतील तर अशा आसामी बड्याच म्हणावयास हव्यात. आता वाचलेल्या बातकीत आमच्या कयासात अथवा गणितात त्रुटी असेल तर चुकभूल देणेघेणे , पण गणिताचा विचार एकुण रोचक आहे ! आधिकधिक आंदोलने झाली पाहीजेत देश वासींयांना देशाच्या राजधानीचे दर्शन अत्यल्प खर्चात झालेच पाहीजे असे आमचेही मत आहे. असो. (मंडळी विनोदाने लिहिलय तेव्हा हलकेच घ्या )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 11/22/2017 - 12:22 नवीन
तुमचा प्रतिसाद म्हणजे शुद्ध खोडसाळपणा आहे, तुमच्यासाठी दोन प्रश्न १. ३० हजार रुपये इतके कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांची यादी आहे तुमच्याकडे? २. शेतकरी दिल्लीला आंदोलनाला गेले की फिरायला बघायला गेले हा भोचकपणा कशासाठी? माहितगार, तटस्थपणाचा बुरखा फाटतोय बरं का... सांभाळून. सरकारविरुद्ध होणारी प्रतेक गोष्ट तुम्हाला कटकारस्थान वाटायला लागली आहे, जणू शेतकर्‍यांना काही म्हणजे काहीच प्रश्न नाहीत आणि फुकटात दिल्लीवारी करायची म्हणून मोर्च्याचे निमित्त काढून दिल्ली फिरायला जात आहेत असं काही तुम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करता आहात. बेशरमपणाची हद्द आहे. वरुन विनोद करतोय म्हणून सांभाळून घ्या चा शहाजोगपणा.... सरकार इकडे शेतकर्‍यांवर गोळ्या झाडतंय आणि तुम्हाला विनोद सुचतायत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 11/22/2017 - 18:48 नवीन
त.जो. आपणास नेमके काय झोंबले आहे ? अपण आपले मिपावरचे सदस्य नाव काय घेतले आहे? मग कुणी जरासे हसले हसवले तर एवढे अस्वस्थ का व्हावे? भारतीय रेल्वे अनेक गंभीर प्रसंगातून गेली असेल म्हणून वेगळ्या दिशेनी झालेल्या अचानक प्रवासा बद्दल हसूही नये म्हणजे विनोदातला विनोद आहे. आंदोलनाला जाऊन आलेली समस्त मंडळी सातत्याने सुतकी चेहेरे करून बसली होती असे आपले म्हणणे आहे का ? कोणतीही गोष्ट अती झाली की हसू येते हा निसर्ग नियम नव्हे काय. कोणत्याही सरकारने अती केले की सरकारचेही हसू होते. मी अती केले तर माझे हसू होते. आपण किंवा इतर जण अती केले तर त्याचेही हसू होते किंवा कसे. माझ्याकडून अती होते तेव्हा माझे मला लक्षात येत नाही पण इतर लोक हसू शकत असतात. आता माझ्याकडून अती होते आहे हे वास्तव मी स्विकारावे की नाही - जड असते खरे. तुमच्या प्रमाणेच भावनेच्या ओघात असताना कदाचित माझी अतीरंजीत बाजू मला लक्षात येईलच असे नाही. हसणार्‍यांचा तुमच्या प्रमाणेच राग येईल पण असे राग क्षणिक असतात. उठता बसता महात्मा गांधींचे नाव घेणारी तथाकथित नेते मंडळी (कोणत्याही पक्ष संघटनांची असोत) आंदोलनांना हिंसाचार होई पर्यंत आंदोलने ताणतातच कशी काय ? वरून हिंसाचार आणि मृतांच्या बद्दलचे सांत्वन करून प्रत्यक्षात सत्तेतले काय आणि बाहेरचे काय तूप कुणाच्या पोळ्यांवर ओढले जाते ते काय गुपीत आहे की त्याचे भांडवल करून लेखकांच्या लेखन स्वातंत्र्यावर आपण गदा आणू इच्छित आहात ? खर्‍या समस्याग्रस्त शेतकर्‍यांबद्दल कामगारांबद्दल सर्वांनाच सहानूभूती असते. त्या बद्दल वेगळे सांगण्याची गरज आहे की प्रत्येकवेळी खोट्या सहानुभूती दाखवण्याची गरज आहे ? - तुम्ही व्यक्तीगत टिका केलीत म्हणून सांगतो, शेतकर्‍यांनाही समोर ठेऊन खेळते भांडवल अशा विषयावर मी स्वत लेखन केले आहे आणि ग्रामीण भागात उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षण देण्यातही सामील झालो आहे ते प्रश्नांचा काहीच अभ्यास नसताना नसावे स्वतः बद्दल अधिक बोलू नये असो- भारतात कोणत्याही सभेला गर्दी जमवणे हे एक हुकमी तंत्र झाले आहे, आणि अशा सभां जे भरवतात आणि उपस्थिती लावतात त्यांना त्याचा स्वयमेव अनुभव भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा पुन्हा आलेला असणार आहे किंवा कसे. आपण मला प्रश्न विचारत आहात, विनोदी प्रतिसादाचा उद्देश आंदोलनास हजेरी लावणार्‍यांपेक्षा ट्रेन बुकींगच्या खर्चांचे 'अर्थपूर्ण' नियोजन करणार्‍यांकडे लक्ष वेधतो हे आपल्याही लक्षात आले असणार. असो. सरकारे कुणाची आहेत याचा संबंध नाही; आम्ही मुंबई मधल्या कापड गिरणी कामगार ते बँक कर्मचारी; हे कर्मचारी ते ते कर्मचारी आंदोलने आणि त्यांचे पुढे काय झाले ते पहाताच आलो आहोत. समस्या असतात पण कोणत्याही आंदोलनांना सहानुभूती एका मर्यादेपर्यंतच मिळतात खूप ताणले तर सरकारचे सोडा उर्वरीत जनतेची सहानुभूती गमावली जाण्याची शक्यता आंदोलन कर्त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वास लक्षात येत नाही. आंदोलनात सहभागी लोक अनाहुतपणे आपापल्या पोळीवर तूप ओढणार्‍यांकडून वापरले जातात. मागच्या एखाद दोन निवडणूकांपासून शहरांचा प्रभाव वाढत असला तरीही, भारतातील ग्रामपंचायत ते संसद राजकारणावर ग्रामीणांचे आणि शेतकर्‍यांचेच स्वातंत्र्यापासून वर्चस्व राहीलेले नाही का ? सरकारे कोणत्याही पक्षाची असोत शेतकर्‍यांच्या मतांशिवाय निवडून आलेली नाहीत काय मग त्यांच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत संसदीय मार्गाने विधानमंडळे संसदेतून चर्चा दबाव न येता आंदोलने मर्यादे बाहेर ताणण्याची गरज का भासते आहे ? की या मागे लोक नियुक्त सरकारांनी कामच करू नये अशा राजकीय भूमीकांची पेरणी आहे ? ब्रिटीश पूर्व काळात सर्व कर केवळ शेतकर्‍यांकडून घेतले जात ते अव्वाच्या सव्वा असले तरी असंख्य लढायांचे खर्च निघून राजे राजवाडे अय्याशी करू शकतील एवढा पैसा भारतीय शेतकर्‍यांकडूनच उभा केला जात असे ना ? स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामपंचायतींना दिल्या जाणार्‍या पैशा पलिकडे कोणता पैसा श्रीमंत शेतकरी देतो ? ग्रामीण भागात कारचा विक्री वाढते ऐन दुष्काळ ग्रस्थ ग्रामीण शहरात सोन्याची दुकानदारी आणि उलाढाल वाढलेली हे शहरात येऊन रोजंदारी करणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलांना कळत नाही असे वाटते का काय ? आणि दर वर्षी कर्ज माफीसाठी आंदोलने करण्यापेक्षा बँकातील पैसा अनुदान म्हणून का मागितला जात नाही म्हणजे पुन्हा पुन्हा माफ करण्याचा प्रश्नच नाही. सरकार तुम्हीच निवडून देता, कर्ज माफीच्या नोटा छापण्यासाठी रिझर्व बँक तुमचीच आहे. पण निव्वळ नोटा छापून सबसिड्या आणि कर्ज माफ्या केल्याने दुष्टचक्र कमी होते का वाढते हे कोणत्याही अर्थतज्ञाने स्पष्ट करावे. आज असंख्य शेतकर्‍यांची मुलांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे. आणि शहरातील महागाईला तोंड देणारा कामगारवर्गीही शेतकर्‍यांचाच भाऊ बंध असावा. अर्थशास्त्रीय समस्या केवळ भावनांच्या आणि संकुचित राजकारणाच्या (संघटना पक्ष सरकारे कोणतेही असू देत) जोरावर सोडवता आल्या असत्या तर आंदोलनांची भाषा करण्याचीही वेळ आली नसती. भावनेच्या बळावरचे राजकारण हे तर्कशास्त्राच्या नियमात बसतेच असे नाही त्यामुळे आमच्या समजेच्या बाहेरचे आणि क्वचित चेष्टेचा विषय होते याचा अर्थ ज्यांचे हेतु साशंकीत आहेत त्यांचा निर्देश होतो आहे त्यांनी आपण टिकेचा विषय का होतो आहोत याचे आत्मपरीक्षण केल्यास कोणत्याही चळवळीती त्रुटी दूर होण्यासच मदत होईल न पेक्षा कालाय तस्माय नमः म्हणून येरे माझ्या मागल्या म्हणून रडत पुढे जाणे नशिबी शिल्लक राहू शकते. ज्याचे नशिब त्याच्या सोबत हेही खरे आहे म्हणून आमच्या सारख्या इतरांनी मनाला लावून घेण्याचेही कारण नसावे. आता तुमच्या तथाकथित प्रश्नांकडे येतो
१. ३० हजार रुपये इतके कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांची यादी आहे तुमच्याकडे?
१) मनमोहनसिंगांच्या काळात एकदा कर्ज माफ करून झाली आहेत त्यास नेमकी किती वर्षे झाली त्यानंतर त्यांच्याच काळात कर्जपद्धतच बंद करून अनुदान पद्धतच का मागून घेतली नाही. कर्ज माफ्याच हव्यात तर त्यास कर्ज का म्हणावे ? २) ३ हजराचा प्रवास खर्च करणारे शेतकरी ३० हजारापेक्षा कमी कर्ज असलेले असतील का या बाबत साशंकता वाटते. ज्यांचे कर्ज ३०,००० पेक्षा कमी असेल तो ३००० प्रवास खर्च का करेल - अंदोलनात सहभागी होणारे शेतकरी खरेच एवढे दुधखुळे असतात ? आणि ३०००० पेक्षा कमी कर्ज असूनही प्रवास करत असेल तर प्रवास खर्च 'गर्दी मॅनेजर' अरेंज करत असण्याच्या संशयास जागा रहाते किंवा कसे २. शेतकरी दिल्लीला आंदोलनाला गेले की फिरायला बघायला गेले हा भोचकपणा कशासाठी? त्यात भोचकपणा नव्हे, विसंगती आणि विरोधाभास दर्शन असावे. बाकी तटस्थपणा हे माझे व्यक्तीगत मुल्य आहे, विचार स्वातंत्र्य वापरून मांडणी करताना माझ्या व्यक्तीगत मुल्यांपलिकडे कुणाशीही बांधील असणे अभिप्रेत नाही आणि मातृभाषा देश संस्कृती प्रेम आणि मतमतांतरे बाळगूनही आपल्या माणसांच्या प्रती आस्था या मुल्यांशी इतरांच्या सांगण्यावरून नव्हे स्वतःस पटते आणि जमते तेवढे जागत असतोच.असो. आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार. इति लेखन सिमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
B
babu b Wed, 11/22/2017 - 18:52 नवीन
ब्रिटीश पूर्व काळात सर्व कर केवळ शेतकर्‍यांकडून घेतले जात ते अव्वाच्या सव्वा असले तरी असंख्य लढायांचे खर्च निघून राजे राजवाडे अय्याशी करू शकतील एवढा पैसा भारतीय शेतकर्‍यांकडूनच उभा केला जात असे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
त
तर्राट जोकर गुरुवार, 11/23/2017 - 06:47 नवीन
तुमच्याकडे शष्पभर खात्रीलायक माहिती नाही, केवळ तुमच्या मनगढंत शंकांच्या जोरावर उड्या मारत आहात. असल्यास कोणते शेतकरी, कोणती संघटना, कोणती ट्रेन, प्रवाशी शेतकरी म्हणजे तेच सर्व कर्जमाफी मान्य झालेले आहेत का यासर्वांची शहानिशा करुन आपली (विनोदाच्या नावाखाली केलेली) बकवास केली असती तर बरे झाले असते. शंका काढायला काय ढिगभर काढू शकतो, त्याला काय लागतं विशेष कौशल्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मोदक गुरुवार, 11/23/2017 - 07:06 नवीन
शंका काढायला काय ढिगभर काढू शकतो, त्याला काय लागतं विशेष कौशल्य. अरेरे तुमच्या कौशल्यक्षेत्रात अतिक्रमण झाल्याने जळजळ झाली काय..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
महेश हतोळकर Wed, 11/22/2017 - 12:41 नवीन
असं डायरेक्ट पंच्याला हात नाय घालायचा ओ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 13:14 नवीन
हहपुवा शालजोडीतून मस्त हाणलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
B
babu b Wed, 11/22/2017 - 13:58 नवीन
असाच हिशोब अयोध्या / कारसेवकांचा मिळेल का ? की ते तिकिट न काढता गेले होते ? बायदिवे , कारसेवक शब्दाचा अर्थ काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मोदक Wed, 11/22/2017 - 14:10 नवीन
खिक्क.. ते सरकारचे जावई नव्हते, किंवा ते बाटगे बिटगे नसल्याने निष्ठा देशाशी असतात - अल्लाशी नाही. निष्ठा हा शब्द माहिती आहे ना..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
म
माहितगार Wed, 11/22/2017 - 14:18 नवीन
मी अ ते ज्ञ समस्त गर्दी चिमुटभर मिठा सोबत घेतो. खारट होईल एवढे मीठ न घेण्याबद्दलही तसा जागरूक असण्याचा प्रयत्न असतो. या वेळी बातमीत संख्या होती गणित आमच्या गुरुजींनी शिकवले होते. आणि बातमी ते माझे गणितात चुका असू शकतात हे कबूल केलेले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
त
तर्राट जोकर Wed, 11/22/2017 - 14:36 नवीन
मिळाली का यादी, कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची... ? तिथे तर उजेड पडतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 17:54 नवीन
http://chsma.in/maharashtra-karj-mafi-list-news-name-village-wise-csmssyin/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
र
रानरेडा Wed, 11/22/2017 - 20:36 नवीन
इकडे काही जण सरकारची २ हजार स्क़्वेअर फुल जागा ढापून त्यावर या गोष्टी बरोबर कशा याचेही समर्थन करीत होते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
M
mayu4u गुरुवार, 11/23/2017 - 05:01 नवीन
बलात्कारातून झाला असावा अशी शन्का सुद्धा घेत होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
श
श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 11:07 नवीन
इन्फोसिस व विप्रोने समभाग बायबॅकची ऑफर दिली आहे. इन्फोसिसची बायबॅकची प्रक्रिया ३० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या काळात असेल. बायबॅकसाठी कंपनी प्रति समभाग ११५० रू. देणार आहे. समभागाचा आजचा बाजारभाव ९६६ रूपये आहे.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 11/22/2017 - 11:42 नवीन
काय उपयोग नाही होत. आपण घेतलेले सगळेच शेअर ते बायब्याक नाही करत आणि नंतर रेट ढासळतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 14:10 नवीन
काय म्हणताय? माझे HCL आणि NHPC चे सगळेच समभाग त्यांनी परत घेतले. तुमचा नशीबच खोटं बहुधा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Wed, 11/22/2017 - 14:28 नवीन
तुमचे घेतले म्हणजे सर्वांचे सर्व शेअर्स परत घेतले का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 14:30 नवीन
तुमचा नशीबच खोटं बहुधा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
श
श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 15:48 नवीन
त्याची आंतरजालीय कीर्ति कंपन्यांपर्यंत पोहोचलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रानरेडा Wed, 11/22/2017 - 20:38 नवीन
मग बायब्याक चा अर्थ काय ? असे कोठल्या कोम्पान्य बद्दल झाले आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ग
गंम्बा Wed, 11/22/2017 - 12:05 नवीन
जे समभाग तुमच्या खात्यात १-नोव्हेंबर ला असतील तेच फक्त बायबॅक साठी वापरता येतील, त्यामुळे आता ह्या बातमीचा काही उपयोग नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे Wed, 11/22/2017 - 20:15 नवीन
दोन लाखापेक्षा कमी रकमेच्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के कोटा असतो. अशा किती गुंतवणूकदारांनी ही ऑफर स्वीकारली ह्यावर तुमच्याकडील किती समभाग कंपनी स्वीकारेल ह ठरते. १०० % गुंतवणूकदारांनी ऑफर स्वीकारल्यास entitlement ratio प्रमाणे समभाग परत घेतले जातात. मोठ्या गुंतवणूकदारांचे सगळेच शेअर परत घेतले जाण्याची शक्यता कमी असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
स
सुबोध खरे गुरुवार, 11/23/2017 - 05:37 नवीन
लहान गुंतवणूकदार म्हणून मी त्यांनी दिलेल्या "प्रमाणापेक्षा जास्त" परत केलेले संभागही बऱयाच कंपन्यांनी स्वीकारले उदा. टी सी एस.(२७५० रु)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 11/23/2017 - 10:37 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Mon, 11/27/2017 - 07:25 नवीन
कोण नाकारतय ? माझा प्रतिसाद नीट वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
त
तर्राट जोकर Wed, 11/22/2017 - 14:42 नवीन
माहितगार, जे आरोप तुम्ही करताय ते संघाच्या कुजबूज प्रकाराने का करताय? खुलेपणाने पुरावे मांडून करा की? इथे फाटते का हातभर? फक्त दुसर्‍यांना पुरावे मागायचा नालायकपणा करता येतो? बेशरम लोक.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 16:15 नवीन
वा ! काय पण भाषा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
M
mayu4u गुरुवार, 11/23/2017 - 05:04 नवीन
भाषेच्या वापराविषयीची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Wed, 11/22/2017 - 16:16 नवीन
अरेरे... भलतीच जळाली वाटते... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 16:37 नवीन
जळफळाट, चडफडाट, जळजळ, मळमळ . . . सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. परिस्थिती समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
L
lakhu risbud Wed, 11/22/2017 - 17:37 नवीन
जो दावा करताय त्याचा काही पुरावा असेलच तुमच्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
माहितगार Wed, 11/22/2017 - 19:13 नवीन
"योगेंद्र यादव" हे नाव बरोबर आहे का ? पारदर्शकते बद्दल ते स्वतः आग्रही असावेत. आणि गर्दी जमवण्याच्या अर्थकारणाबाबत इतर राजकारण्यांनी अद्याप पारदर्शकता दाखवली नसेल पण योगेंद्र यादव आणि त्यांच्या सच्च्या अनुयायांसाठी ही पारदर्शकता दाखवण्याची चांगली संधी असू शकते. वृत्तपत्रातील मला दिसलेले आकडे आणि गणिती कयास - ज्यास तुम्ही कुजबूज म्हणताय ते माझ्याकडून मांडून झाले आहेत - माझ्या गणिती कयासांचा संघाशी संबंध लावणे हा मला गणित शिकवलेल्या गुरुजींना हसवणारा वेगळा विनोद आहे :). जळफळाट आणि असभ्य शब्दांचा वापर न करता माझ्या मांडणीचे व्यवस्थीत पारदर्शक खंडन ही योगेंद्र यादव आणि त्यांच्या सुज्ञ अनुयायांची नैतीक जबाबदारी असावी. ही जबाबदारी काही कायदेशीर नाही की कुणाची चिडचिड व्हावी. असो. इति लेख्न समाप्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
B
babu b गुरुवार, 11/23/2017 - 07:01 नवीन
कसले मंडण आणि कसले खंडण ? ३००० लोकानी पर हेड ३००० काढून यात्रा केली तर त्याचा कसला अन कुणाला पुरावा द्यायचा ? आजवर कुठल्याच राजकारण्याने माहिती दिली नाही ... ह्यांनी का द्यायची ? विद्यमान सरकारला काही विचारले की गोपनीयतेचे तुणतुणे अन राष्ट्रभक्तीचे नगारे वाजू लागतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मोदक गुरुवार, 11/23/2017 - 07:11 नवीन
मग यात्रा होती तर शेतकर्‍यांचे शोषण आणि आंदोलने असल्या फालतू पुड्या कशाला सोडायच्या..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b गुरुवार, 11/23/2017 - 09:29 नवीन
यात्रा म्हणजे travel हो , नंतर त्यानी आंदोलनही केले ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
B
babu b गुरुवार, 11/23/2017 - 09:35 नवीन
यात्रा म्हणजे travel हो , नंतर त्यानी आंदोलनही केले ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 11/25/2017 - 08:17 नवीन
आजवर कुठल्याच राजकारण्याने माहिती दिली नाही ... ह्यांनी का द्यायची ? दरवेळी चांगल्या गोष्टीची सुरूवात भाजपाने करावी असे कुठे लिहून ठेवले आहे का..? आख्खी रेल्वे बुक करण्याइतके पैसे कुठून आले याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली तर काय फरक पडतो..? भ्रष्ट आहेत का आंदोलनकर्ते..? मग माहिती द्यायला का घाबरत आहेत..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Sat, 11/25/2017 - 08:53 नवीन
त्यानी माहिती कुणाला कुठे कशी द्यायची ? इथे मिसळपावावर मन की बात लिहून डिक्लेर् करावे की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गामा पैलवान Sat, 11/25/2017 - 09:27 नवीन
उत्तम निर्णय! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
म
मोदक Sat, 11/25/2017 - 09:46 नवीन
पोगोचा डोस जास्ती झाला काय..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
अ
अनुप ढेरे गुरुवार, 11/23/2017 - 05:39 नवीन
परवाच खुलेपणाने एक टेबल दिलं होतं. त्यावर तुमची तिच तिच टेप बघता इथे पुरावे मांडले तरी फार काही फरक पडेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
B
babu b Sat, 11/25/2017 - 05:13 नवीन
पीएफ चे १५ % सरकार शेअर मारकेटात गुंतवणार .. https://m.maharashtratimes.com/business/business-news/epfo-approves-proposal-to-credit-etf-units-to-pf-accounts/articleshow/61789456.cms
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा