मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?
मराठी माध्यमात शिकणार्या मुलांच्या पालकांचा हा धागा
http://www.misalpav.com/node/41541 वाचला.चांगला उपक्रम होतोय.शुभेच्छा!
याच विषयावर ग्रुपमधे चर्चा सुरु होती.त्या दरम्यान एक मुद्दा असा पुढे आला की विषयाचं आकलन चांगलं होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणं वगैरे ठिक आहे.पण हे चांगलं आकलन झालेले मराठी माध्यमातले विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संस्थांमधे का दिसत नाहीत?
मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँकिंग अशा क्षेत्रात आहेत? किंवा स्टार्टअप्समधे आहेत? ज्यांचं वय आज ३० ते ३५ किंवा याच्या आतलं आहे असे कितीजण मराठी माध्यमातून शिकून पुढे जागतिक दर्जाच्या संस्थेत शिकलेले आहेत?
मराठी शाळेतल्या शिक्षणाला दर्जा असेलंच तर साधारण इ.स.२००० किंवा त्यापूर्वी होता आता नाही.असा याचा अर्थ घ्यावा का? किंवा असेल अजून तो दर्जा तर मग ही मुलं या वर दिलेल्या किंवा तशाच टॉपच्या संस्थांमधे जिथे प्रवेश सहजासहजी नाही,खुप बौध्दिक मेहनत घ्यावी लागते अशा ठिकाणी का दिसून येत नाहीयेत?
लेखनाचीही हीच अवस्था आहे.चेतन भगत किंवा असेच नावाजलेले लेखक हे इंग्रजीतून लिहितात त्यामुळेच त्यांना त्याचं मानधनही रग्गड मिळतं.प्रादेशिक भाषेत लिहिलं तर इंग्रजीतून लिहिल्यावर मिळतं तेवढं काही मिळत नसावं.(असल्यास माहिती द्यावी).ब्लॉग्जबद्दलही तेच.
मराठी पत्रकारांचे पगार हे इंग्रजीतून लिहिणार्या पत्रकारांपेक्षा कमी असतात/असावेत.
फक्त पैसाच बघणार का? मातृभाषेबद्दल अनास्था का? असे भावनिक प्रश्न गैरलागू आहेत.वर दिलेल्या संस्थांमधील शिक्षणाचा समाजासाठी सुध्दा बराच उपयोग होऊ शकतो.पण मुळात तिथे शिकलं पाहिजे.मराठी माध्यमातून शिकलेली मुलं पुढे जाऊन या संस्थांमधे शिकली पाहिजेत.पण मागच्या १० वर्षात तसं घडलेलं दिसत नाही.
याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?
💬 प्रतिसाद
(56)
न
नमकिन
Sat, 12/02/2017 - 15:15
नवीन
मी 【राज्यातील तेराशे शाळा बंद - one thousand three hunderd school will shut down - Maharashtra Times】 | https://www.google.co.in/search?hl=mr-IN&ie=UTF-8&source=android-browser&q=%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6+%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE+%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6&gfe_rd=cr&dcr=0&ei=arIiWsLFEbKdX4mSruAB&gws_rd=ssl ची मजा घेत आहे
आता शिकायचं कुटं? आन् कसं वो?
लोकसंख्या वाढतेय पण पटसंख्या घटतेय.
- Log in or register to post comments
B
babu b
Sat, 12/02/2017 - 16:17
नवीन
पटसंख्या स्थलांतरीत होते.
बाकी , सत्तांतर होउनही संस्कृती , भाषा वाचेना , हे गौडबंगाल काय म्हणे ?
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sat, 12/02/2017 - 19:16
नवीन
- Log in or register to post comments
B
babu b
Mon, 12/04/2017 - 19:07
नवीन
Taj terror attack has become a massive psychology case study in Harvard. Not ONE Taj employee abandoned the hotel and ran right through the attack. They helped guests escape and many died . It confounds psychologists . Finally they pin pointed 3 recruitment strategies 1) Taj did not recruit from big cities , they recruited from smaller cities where traditional culture still holds strong 2) They did not recruit toppers, they spoke to school masters to find out who were most respectful of their parents, elders , teachers and and others .3) They taught their employees to be ambassadors of their guests to the organisation not ambassadors of the company to their guests . The results are stupefying . The Indian army too does not recruit toppers, they recruit people through intensive psychological testing, perhaps that is why they have one of the most effective govt organisations in the country , unlike bureaucrats recruited for being topers but suspect psychologies . This has implications on parenting too
https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=vQGz1YRqBPw
- Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे
Tue, 12/05/2017 - 06:32
नवीन
माझा मोठा मुलगा गेल्या वर्षी 12 वी त होता . तो मराठी (Semi english) माध्यमात होता . 12 वी CET त तो top 100 मधे होता , bits pilani ला प्रवेश मिळत होता . पण IIT च हवं होतं त्याला त्यामुळे I IT इंदौर ला प्रवेश घेतला . तो हुशार आणि अभ्यासू होताच पण त्याच्या मते अशा competitive परीक्षंत माध्यम महत्वाचे नसते . Basic concept समजून घेतली तर कठीण नाही . त्ाने अकरावीत क्लास लावला .सुरवातीचे सहा महिने icse cbse ची मुले क्लास मधे पुढे होती कारण काही portion आधीच झाला होता त्यांचा. पण नंतर अर्थातच मेहनत घेउन याने स्पेशल बॅच , स्पेशल टीचर मिळवले. यात त्यची हुशारी मेहनत धरली तरीही त्याचा अनुभव अगदीच ताजा आहे हे पण खरं . माझ्या मते एकूणच दर्जा खालावला आहे . मराठी माध्यमातून शिकणं कधीही चांगलेच. उगाचच भपका पाहून दुसरीकडे धावण्यापेक्षा हे बरं .
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 12/25/2017 - 10:38
नवीन
माध्यमापेक्षा शिक्षक महत्वाचे आहेत हे माझं मत पक्के आहे. आजूबाजूला पाहिलं तर इंग्रजी माध्यमाच्या गेल्या काहीच वर्षात सुरू झालेल्या शाळांमध्ये शिक्षक अगदीच सुमार आहेत. अत्यंत कमी पगारावर काम करणारे हे लोक दर्जेदार असतील तरी कसे? जुन्या मराठी शाळेत अजून काही शिक्षक शिल्लक आहेत (पण अशा शाळाच आता शिल्लक नाहीत. आहेत त्यांनीं माध्यम इंग्रजी करून घेतले आहे.) मी सध्या शाळाच शोधतेय आणि प्राधान्य मराठीलाच आहे.
बाकी आयुष्यात यशस्वी होणे ही घटना अगणित घटकांवर अवलंबून आहे. एकट्या माध्यमाचा काय संबंध?
आमच्या शाळेतला मुलगा आयआयटी आणि आयआयएम ला होता. भारतात पहिला आला होता cat मध्ये. एक काका पंढरपूरचे आहेत. मराठीच माध्यम. तेही ह्या दोन्ही संस्थमध्ये गोल्ड मेडलिस्ट आणि आज फार मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहेत. माझे बाबा खेडे गावात झाडाखाली भरणाऱ्या शाळेत शिकलेत, परिस्थितीमुळे डिप्लोमाच फक्त करू शकले. आज मोठ्या पदावर आहेत.
हे तिघे मराठीतून शिकले म्हणून पुढे गेले नाहीत तर ते अत्यंत हुशार किंवा मेहनती होते. माध्यम महत्वाचं असत तर त्याच शाळेतले आम्ही सुद्धा आयआयटी मध्ये गेलो असतो. एवढ्या मोठ्या ठिकाणी जायला केवळ माध्यम (इंग्रजी वा मराठी) कसे महत्वाचे असेल? इतर अनेक पूरक गोष्टी हव्यात. त्यामुळे रानरेडा ह्यांचे प्रश्न पटले नाहीत.
बाकी सगळ्याच शाळांचा दर्जा घसरतो आहे. मराठीचाच नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2