Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग १९

श
श्रीगुरुजी
Tue, 01/02/2018 - 05:55
🗣 151 प्रतिसाद
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे. http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military-aid-to-pakistan/1/1121799.html

प्रतिक्रिया द्या
40076 वाचन

💬 प्रतिसाद (151)
श
श्रीगुरुजी Wed, 01/17/2018 - 09:37 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/mla-bacchu-kadu-get-one-year-imprisonment-and-fine-for-beating-traffic-police-achalpur-court-1617663/
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/18/2018 - 09:24 नवीन
डोकलामचे फेक ऑर्गझम
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 09:33 नवीन
आश्चर्य नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रदीप गुरुवार, 01/18/2018 - 15:16 नवीन
तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? डोकलाममधे असे काही झालेच नाही? किंवा काहीतरी झाले, पण चीनने माघार वगैरे काही घेतली नाही, तरीही आपण उगाच तसे म्हणत आहोत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 15:27 नवीन
तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? डोकलाममधे असे काही झालेच नाही? किंवा काहीतरी झाले, पण चीनने माघार वगैरे काही घेतली नाही, तरीही आपण उगाच तसे म्हणत आहोत ?
तसे नाहीए, चीनने तात्पुरती माघार घेऊन वापस येऊन अपेक्षेपेक्षा त्यांनी आधीपेक्षा जास्तच तयारी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप गुरुवार, 01/18/2018 - 15:41 नवीन
काय नक्की अभिप्रेत आहे ते. कारण त्यांनी 'फेक' शब्द वापरलाय, म्हणून विचारतोय. वास्तवात चीनने, आपण ह्या प्रकरणात इतके नेट लावू, असे जमेस धरलेच नव्हते. तेव्हा ह्या प्रकरणात खरे तर त्यांचा 'लॉस ऑफ फेस' झाला. आता ते पुढे काहीतरी कुरापत काढणार, ह्याविषयी कुणाच्याही मनांत संदेह नसावा. तेव्हा आपणही तशी तयारी ठेवली असेलच, अथवा तशी ती सुरू असेल. इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की झाल्या प्रकरणी आपल्या सरकारने कुठेच कसलाही गाजावाजा केला नाही. अतिशय संयत प्रकारे आपण (म्हणजे आपल्या सरकारने) हे सर्व प्रकरण हाताळले. आणि हे 'आप'ण समजत नसलो, तरी जगास ते समजले आहे. आता कधीतरी पुन्हा गेल्या वेळेसारखीच परिस्थिती उदभवेल, तेव्हा आपल्याकडील अनेकजण 'पाहिलंत, कसली माघार, कसले काय' असे काहीतरी म्हणणार! जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/18/2018 - 16:10 नवीन
जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार? बैलाचा डोळा ! खरं तर हे सगळे माहिती असले तरीही, भारतात हीच मानसिकता (देशाचे हित गेले खड्ड्यात असे मनातल्या मनात म्हणत) गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाखवली जात आहे (दुर्दैवाने) ! (कपाळावर हात मारणारी स्मायली) :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सुबोध खरे गुरुवार, 01/18/2018 - 15:29 नवीन
ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत. मोदी विरुद्ध लिहिण्यासाठी काहीतरी शोधात असतात. फेक ऑर्गझम सारखे शब्दप्रयोग करून सनसनाटी निर्माण करण्याचा हा भंपक प्रयत्न आहे. चीन काही डॉकलामवरून कायमचा परत जाईल अशी अंधश्रद्धा सरकारची किंवा लष्कराची अजिबात नाही. याला कडेलोटाचे राजकारण(BRINKMANSHIP) म्हणतात. तेंव्हा तो परत तेथे येईल हि शक्यता १०० % होतीच म्हणून भारताने आपले "टेहळणी उपग्रह" तेथे केंद्रित केलेले आहेत. त्यातूनच आलेल्या बातम्या आहेत या. भारत सरकार काय करते ते पाहू असा त्यांचा विचार आहे. उगाच काहीतरी सनसनाटी करून जीव रमवायचा झालं. दुर्लक्ष करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप गुरुवार, 01/18/2018 - 15:52 नवीन
केले असते, पण पोरकटपणाला काही सीमा असावी? मी चीनच्या उंबरठ्यावर रहातो, आणि ते तीन-चार महिने त्यांची चाललेली उलाघाल अतिशय जवळून पहात होतो. 'धरताही येत नाही, सोडताही येत नाही' अशी त्यांची परिस्थिती झाली होती. नेहमीप्रमाणे दात-ओठ खाऊन चिनी ऑपेरातील पात्रांचे बरेच ठणठणाटी प्रयोग झाले. त्या सर्वात, आपले सरकार अतिशय शांत होते. अर्थात पडद्याआड त्यांचे संपर्क झाले असणार, काही मार्ग काढण्याचे प्रयत्न झाले असणार. अशा प्रसंगी समोरच्याला 'सुटकेचा मार्ग' (एस्केप रूट) ठेवणे जरूर आहे, कारण त्यांना त्यांच्या जनतेस तोड दाखवायचे आहे. ते सर्व आपण अतिशय मुत्सद्दीपणे निभावून नेले. ह्याचे नीट समजून, कौतुक करायचे का नुसतेच तिरस्करणीय उद्गार काढत बसायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/18/2018 - 16:03 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/18/2018 - 16:01 नवीन
मोदींना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करता यावी यासाठी त्यांच्या काळात भारतावर काहीतरी संकट येऊन भारताचे नुकसान व्हावे यासाठी अनेकजण कासावीस झाले आहेत. यासाठी ते चीन, पाकिस्तानशी हातमिळवणीही करीत आहेत. 'नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी व्हायला पाहिजे' ही देशद्रोही मानसिकता यामागे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/18/2018 - 15:32 नवीन
>>> डोकलामचे फेक ऑर्गझम + १ फक्त १९६२ मध्येच ख-या ऑर्ग्याझमचा आनंद मिळाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
L
lakhu risbud Sat, 01/20/2018 - 07:12 नवीन
केजरीवालच्या उदयानंतर बऱ्याच जणांना सच्ची लोकशाही अवतरल्याचा अॉर्ग्याझम झाला होता.काळाच्या कसोटीवर तो अॉर्ग्याझम भंपक आणि दिखावू होता हे सिद्ध झाल्याने त्यांना नैराश्याचा जो प्रचंड असा झटका बसलाय त्यातून हे नवेनवे शोध लावले जाताहेत. माझं "अॉर्ग्याझम" वांझोटं ठरलं,मग काय झालं ? त्याच कसोटीवर बाकीच्याची मापे काढण्याचा निसर्गदत्त अधिकार मला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 01/18/2018 - 10:45 नवीन
त्रिपुरात 18 फेब्रुवारी, मेघालय-नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान! पुन्हा ते कामधन्दे सोडून प्रचार करत बसणार
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 01/18/2018 - 10:49 नवीन
मग काय पैसे वाटत फिरायचं म्हणता हे करतात तसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/18/2018 - 15:39 नवीन
>>> पुन्हा ते कामधन्दे सोडून प्रचार करत बसणार त्यांना कामधंदे होते कधी? म्हणून तर दोनदोन महिने Bangkok ला मुक्काम ठोकतात किंवा चुकुन भारताच्या दौ-यावर असले तर सद-यावरून जानवे परीधान करून दिसेल त्या देवळात घुसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 01/18/2018 - 13:06 नवीन
iCreate मधील आय (i) हे अक्षर लहान का ठेवण्यात आले आहे, यासंदर्भात माहितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आय (i) चे मोठे होणे क्रिएटिव्हिटीमध्ये अडथळा आणणारे होते. त्यामुळे iCreate मधील i हा लहान करण्यात आला आहे. तसचे, यामध्ये जर आय (i) मोठा असता तर यामध्ये महत्वाचा असा अहंकार आडवा आला असता. यामुळे सुरुवातीपासूनच लहान आय करुन मोठी स्वप्ने पाहिली आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/18/2018 - 16:20 नवीन
लहान आय घालण्याची कारणे द्वेषाची पातळी किती खाली आणावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुबोध खरे गुरुवार, 01/18/2018 - 13:43 नवीन
अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची पाचवी आणि शेवटची (संपूर्ण अणूशस्त्रसकटची) चाचणी आज यशस्वी झाली. हे आता ट्रकवर बसवलेल्या नळकांड्यातून डागले गेले आणि आता फक्त लष्करातर्फे होणाऱ्या (user trial) केल्या की ते लष्करात समाविष्ट केले जाईल. याचा टप्पा चीनच्या सर्वात दूर भागात पोहोचण्याइतका आहे त्यामुळे आता भारत अख्ख्याचीनभर कोठेही क्षेपणास्त्र पाठवू शकतो. https://timesofindia.indiatimes.com/india/india-test-fires-nuclear-capable-icbm-agni-v/articleshow/62550347.cms
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका गुरुवार, 01/18/2018 - 15:35 नवीन
https://www.nytimes.com/2018/01/18/world/asia/india-ballistic-missile-icbm.html China has criticized India’s development of the Agni 5 in the past. After an early test of the missile, Du Wenlong, a researcher at the Chinese Academy of Military Science, told the Global Times that the Agni 5 had a strike range of about 5,000 miles, rather than 3,000 miles. He said the Indian government had deliberately played down its range “to avoid causing concern to other countries.” कांगावा सुरु झाला आहे, पण हे खरे असेल तर बसू दे बोंबलत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 01/18/2018 - 16:04 नवीन
Though Agni 5 is said to have a range of 5,000 kms, its range has been a contentious issue. Even India initially did not divulge the exact range of the missile, but later DRDO hinted that it has the capability to reach 5,000 kms. Chinese experts say that the missile actually has the potential to reach targets 8,000 kilometres away and that the Indian government had deliberately downplayed the missile's capability in order to avoid causing concern to other countries. India is striving hard to gain into NSG and it may not go down well with the superpowers if it comes out in the open that India has a missile capable of carrying nuclear warheads to a distance of around 8,000 kms. It may hamper India's chance of gaining entry in the elite NSG group. Read more at: https://www.oneindia.com/india/the-mystery-surrounding-agni-5-s-range-2622954.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
ग
गामा पैलवान गुरुवार, 01/18/2018 - 15:39 नवीन
खरे डॉक्टर, संबंधितांचे अभिनंदन. हा टप्पा बराच रखडला होता असं ऐकून आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 01/18/2018 - 16:17 नवीन
https://www.rbth.com/articles/2012/04/26/missile_impossible_why_the_agni-v_falls_short_15594 २०१२ मध्ये रशियाच्या मासिकात आलेला हा एक लेख मुद्दाम वाचावा असा आहे. आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र सूर्य सद्यस्थिती https://defenceupdate.in/surya-indias-most-lethal-missile-update/
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 10:26 नवीन
लाभाचे पद प्रकरणी आम आदमी पक्षाच्या दिल्ली विधानसभेतील २० आमदारांना अपात्र ठरवावे अशी शिफारस निवडणुक आयोगाने राष्ट्रपतींकडे केली आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/ec-recommends-disqualification-of-20-aap-mlas-for-over-office-of-profit/articleshow/62567741.cms पंजाब, गोवा, राजौरी गार्डन आणि दिल्ली महापालिका निवडणुका असे एकामागोमाग दुसरे दणके बसल्यानंतर केजरीवाल गेले काही महिने गप्प होते. बहुदा परत थयथयाट, विदुषकी चाळे इत्यादी गोष्टी करायला त्यांना संधी मिळेल.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 01/19/2018 - 10:50 नवीन
जर हे आमदार अपात्र ठरले तर राज्यसभा निवडणुकीवर याचा काय परीणाम होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 11:07 नवीन
जर हे आमदार अपात्र ठरले तर राज्यसभा निवडणुकीवर याचा काय परीणाम होईल?
याचा राज्यसभा निवडणुकीवर मतदारांची संख्या कमी होणे इतकाच परिणाम होईल. दिल्ली विधानसभेतील ७० ऐवजी ५० आमदारच मतदान करायला पात्र ठरतील. त्या आकड्यांवरून निवडणुक होईल. समजा काही कारणाने ७० पैकी ५० आमदारांनीच मत दिले असते आणि बाकी आमदारांनी मत दिले नसते तर जो परिणाम झाला असता तोच परिणाम यामुळे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 01/19/2018 - 11:35 नवीन
मला वाटते आआपचे तीन खासदार आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत त्यामुळे निवडणुकीवर फरक पडणार नाही. शिवाय दिल्ली राज्यसभेच्या जागा बहुतेक समभाग पद्धतीने ना होता बहुमत पद्धतीने होत असल्याने (सगळे आमदार प्रत्येक उमेदवाराला मतदान करतील - थोडक्यात तीन जागांच्या तीन वेगळ्या निवडणुका) आआपचे तिन्ही उमेदवार निवडूनच येणार होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 11:51 नवीन
शिवाय दिल्ली राज्यसभेच्या जागा बहुतेक समभाग पद्धतीने ना होता बहुमत पद्धतीने होत असल्याने (सगळे आमदार प्रत्येक उमेदवाराला मतदान करतील - थोडक्यात तीन जागांच्या तीन वेगळ्या निवडणुका)
ही माहिती नवीनच आहे. आंतरजालावरील याचा संदर्भ मिळू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 01/19/2018 - 12:55 नवीन
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhis-winner-gets-all-rajya-sabha-mps-quirk/articleshow/27231313.सिम्स मला माहित होते त्यापेक्षा थोडे वेगळे गणित आहे पण शेवटी बहुमत वाल्यांच्या ३ जागा निवडून येतात हे बरोबर आहे. आआपचे तगडे बहुमत बघता यावेळेला कोणीच उमेदवार दिला नाही आणि त्यांचे तिन्ही उमेदवार बिनविरोध झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/19/2018 - 12:31 नवीन
राज्यसभेसाठीच्या निवडणूकीला खालील समीकरण वापरतात : विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान आवश्यक मते = (वैध मतदान केलेले एकूण आमदार / मतदानास ठेवलेल्या राज्यसभेच्या एकूण जागा) + 1 उदा: समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर... विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६. मत मोजणी प्रक्रिया : प्रत्येक मतदार प्रत्येक उमेदवाराला १, २, ३, (एकूण उभ्या उमेदवारांइतका) यापैकी एक प्राधान्यक्रम देतो. सर्वात प्रथम १ प्राधान्यक्रमांची मोजणी होते व त्यात विजयी मत मिळालेले उमेदवार विजयी होता. जर त्यांची संख्या निवडीस ठेवलेल्या एकूण जागांपेक्षा कमी असल्यास २ प्राधान्यक्रमांची मोजणी जमेस धरली जाते... असे निवडीस ठेवलेल्या एकूण जागा भरेपर्यंत केले जाते. या प्रक्रियेत बराच घोळ घालण्यास बरीच जागा असते : १. आठवणीत असेलच... गुजरात विधानसभेच्या वेळेस झालेली गडबड आणि ३ आमदारांची मते बाद झाल्यामुळे बदलेले समीकरण व त्यामुळे झालेला अहमद पटेल यांचा विजय. ती मते बाद झाली नसती तर पटेलांचा पराभव नक्की होता. २. राज्यसभेच्या निवडणूकीत बर्‍याचदा घोडेबाजार होतो आणि... तो केवळ राजकीय पक्षा-पक्षांमधेच होतो असे नाही तर त्याचा फायदा घेऊन (आपली पत वाढविण्यासाठी व त्याचा वैयक्तिक हितसंबंधांसाठी उपयोग करून घेण्यासाठी) विजय मल्ल्यासारखे पैसेवाले लोक राज्यसभेची जागा खरेदी करतात, हे उघड गुपित आहे ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी Fri, 01/19/2018 - 18:38 नवीन
समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर... विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६. दुरूस्ती - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/५) + १ = २९. यासाठी असलेले सूत्र - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = { (एकूण आमदार / (निवडणुकीच्या जागा + १) } + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/20/2018 - 15:50 नवीन
बरोबर आहे तुमचे. धन्यवाद. गडबडीत लिहिताना, गलती से मिष्टेक हुवा ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/19/2018 - 11:19 नवीन
या आमदारांना निलंबित करण्यास राष्ट्रपतींनी संमती दिल्यास त्यांच्या मतदारसंघांत परत मध्यावधी निवडणूका होतील आणि त्या जागा परत मिळवता आल्या नाही तर "आआप"चे (आणि पर्यायाने केजरीवालांचे) राजकीय भांडवल कमी होईल. त्या जागा आआपने परत मिळवल्या तर केजरीवालांचा बसलेला आवाज परत जरा जास्तच जोमदार होईल ! :) अर्थातच, हे आमदार बाद झाल्यावरही सद्याच्या विधानसभेत आआपकडेच बहुमत असेल, त्यामुळे सद्य सरकारला धोका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 11:33 नवीन
सगळ्या २० जागांवर जिंकणे आआपला नक्कीच शक्य होणार नाही. जितक्या जागा गमावाव्या लागतील तितक्या प्रमाणात तो आआपला आणि केजरीवालांना धक्का असेल. त्यातून पोटनिवडणुकांच्या वेळी आआपमधील गटबाजी परत डोके वर काढू शकेल. निवडणुक आयोगाच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येते का नाही याची कल्पना नाही. तसे आव्हान देता आल्यास आआप आणखी दोन वर्षे टोलवाटोलवी करून दिल्ली विधानसभेचा ५ वर्षाचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत पोटनिवडणुक होऊ देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 01/19/2018 - 11:36 नवीन
बहुतेक कोर्टात आव्हान देता येते आणि आआप सुप्रीम कोर्टात जाईलच असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 11:44 नवीन
हो. https://timesofindia.indiatimes.com/india/ec-recommends-disqualification-of-20-aap-mlas-what-it-means-for-arvind-kejriwals-party/articleshow/62568740.cms वर पण म्हटले आहे की या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 11:43 नवीन
आआपच्या माकडचाळ्यांना सुरवात झालेली दिसते. हा निर्णय देऊन निवडणुक आयोगाने सर्वात खालची पातळी गाठली आहे आणि पी.एम.ओ च्या इशार्‍यांवर निवडणुक आयोग काम करते असे आआपने म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/mlas-disqualification-row-aap-says-election-commission-has-hit-a-new-low/articleshow/62569034.cms म्हणजे मजा बघा. कायद्यातील तरतुदी काय आहेत हे माहित करून न घेता हे बिनडोकासारखे पार्लामेन्टरी सेक्रेटरी नेमणार. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी 'असे करू नका अन्यथा लाभाच्या पदाचा मुद्दा उभा राहिल' असे दिल्ली सरकारला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करणार. त्याविरूध्द प्रशांत पटेल हा एक सामान्य नागरीक तक्रार दाखल करणार. आणि कायद्यातील तरतुदींप्रमाणे निर्णय निवडणुक आयोगाने घेतला तर त्याचा दोषारोप कोणावर? तर पी.एम.ओ वर. या सगळ्या भानगडीत पी.एम.ओ कुठे आले?
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 01/19/2018 - 12:27 नवीन
त्याविरूध्द प्रशांत पटेल हा एक सामान्य नागरीक तक्रार दाखल करणार.
पी.एम.ओ येथून आलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनुप ढेरे Fri, 01/19/2018 - 14:04 नवीन
सोनिया गांधींना पण २००५साली राजीनामा द्यायला लागला होता याच कारणामुळे. NAC चे अध्यक्षपद हे लाभाचं पद होतं आणि त्या खासदारपण होत्या. त्यांनी रितसर राजीनामा दिला. कायद्यात दुरुस्ती केली की NAC चे अध्यक्षपद लाभाचं नाही. मग आल्या निवडुन परत रायबरेलीतून. आपने ही जी कायदेदुरुस्ती केली ती पूर्वलक्ष्यीप्रभावाने केली पण ती दुरुस्ती अमान्य झाली. आणि आता आपची तशी ताकद नाही की आरामात २० लोक परत निवडुन येतील. काँग्रेस आता पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल आणि २०१५ मध्ये काँग्रेसची मत आपला जाऊन लँड स्लाईड विजय मिळाला तसा आता मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/19/2018 - 14:38 नवीन
हो. कायदा गाढव असतो म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. अमुक एक पद लाभाचे पद नाही असा कायदा राज्य विधानसभांनी/संसदेने पास केला तर संबंधित व्यक्ती विधानसभा/लोकसभेचे सदस्य असतानाही त्या पदावर राहू शकते. तसा कायदा दिल्ली विधानसभेने करून त्यावर राष्ट्रपतींची मंजुरी मिळवून मग या आमदारांची पार्लामेंटरी सेक्रेटरी पदावर नियुक्ती केली असती तर काहीच प्रश्न आला नसता. पण इतक्या गोष्टी समजतील तर आपले युगपुरूष कुठचे. माझ्या माहितीप्रमाणे दिल्ली विधानसभेने केवळ मुख्यमंत्र्यांसाठी पार्लामेंटरी सेक्रेटरी ठेवण्याविषयीचा कायदा केला होता. साहिबसिंग वर्मा आणि शीला दिक्षित यांनीही एकेका आमदाराला (शीला दिक्षित यांनी अजय माकन यांना) असे पार्लामेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमले होते. पण इतर मंत्र्यांना असे पार्लामेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमले तर ते लाभाचे पद होणार नाही असा कायदा दिल्ली विधानसभेने पास केला नव्हता. त्यामुळे या आमदारांचे पद धोक्यात आलेच होते. दुसरे म्हणजे स्वतः केजरीवालांनी आणि त्यांच्या विविध ठिकाणच्या समर्थकांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही असे पार्लामेंटरी सेक्रेटरी नेमले होते मग त्यांची पदे धोक्यात का आली नाहीत असा प्रश्न विचारलाच. असे प्रश्न विचारणार्‍यांना असल्या गोष्टींचे आकलन होणे शक्य नाही आणि केवळ आआपचे समर्थकच असा प्रश्न विचारू शकतील हे नक्की. फरक हा की गुजरात, राजस्थान इत्यादी विधानसभांनी हे पद लाभाचे नाही असे ठरविणारा कायदा पास केला होता तो दिल्ली विधानसभेने केला नव्हता. पण हे आम आदमी पार्टीसारख्या पक्षाच्या नेत्यांना आणि समर्थकांना समजेल ही अपेक्षाच नाही. आपला हा खेळ गोत्यात आणेल हे लक्षात येताच केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत पूर्वलक्षी प्रभावाने कायदा करायचा प्रयत्न केला. त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मंजुरी दिली नाही.त्यावेळी समजा कोविंद राष्ट्रपती असते आणि त्यांनी अशी मंजुरी नाकारली असती तर केजरीवालांनी किती थयथयाट केला असता याची कल्पनाही करवत नाही.
आता आपची तशी ताकद नाही की आरामात २० लोक परत निवडुन येतील. काँग्रेस आता पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल आणि २०१५ मध्ये काँग्रेसची मत आपला जाऊन लँड स्लाईड विजय मिळाला तसा आता मिळणार नाही.
आणि स्वतः आआपच्या मतांमध्येही बरीच घट झाली आहे त्याचा परिणाम होईल तो वेगळाच. २०१५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मत देणार्‍या दर १० मतदारांपैकी जवळपास ४ मतदार आपने २०१७ मधील दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये गमावले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Sat, 01/20/2018 - 05:42 नवीन
असे प्रश्न विचारणार्‍यांना असल्या गोष्टींचे आकलन होणे शक्य नाही आणि केवळ आआपचे समर्थकच असा प्रश्न विचारू शकतील हे नक्की.
Never attribute to stupidity that which can adequately be explained by malice.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/20/2018 - 14:17 नवीन
आआपच्या २० आमदारांना अपात्र ठरवून निवडणुक आयोगाने पंतप्रधान मोदींना भेट दिली आहे असे सडेतोड विधान आआपचे नेते गोपाल राय यांनी केले आहे. https://www.ndtv.com/delhi-news/aap-mlas-disqualification-election-commissioners-gift-for-pm-modi-gopal-rai-1802526 मला गोपाल रायांचे हे सडेतोड विधान अजिबात पटलेले नाही. पंतप्रधान मोदी आणि भारताच्या जनतेसाठी खरी भेट कोणती असेल? आम आदमी पार्टीच नव्हे तर भारतीय राजकारणात, विविध विद्यापीठांमध्ये, मिडियामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी असलेले यच्चयावत सगळे बुबुडाविपुमाधवि, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत स्वस्थ बसणे मान्य नसलेल्या आणि असले बरळलायला मोठे व्यक्तिस्वातंत्र्याचे लेबल लावणारे विचारवंत ही जमात राजकारणातून कायमची हद्दपार होणे ही खरी भेट असेल. सध्या डायनॉसॉर जसे केवळ पुरातन काळाशी संबंधित पुस्तकांमध्येच बघायला मिळतात त्याप्रमाणे समस्त तथाकथित विचारवंतांच्या बाबतीत व्हायला हवे . अशी भेट आपल्या या जन्मात मिळावी ही फार मोठी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 01/20/2018 - 15:36 नवीन
तोगडियांचे काय झाले पुढे ?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/20/2018 - 15:55 नवीन
तोगडियांचे काय झाले पुढे ?
जर का काही झालेच असेल तर ते पुरोगाम्यांच्या गळ्यातले ताईत बनले एवढेच झाले. कधीकाळी तोगडियांच्या बाजूने पुरोगामी बोलतील अशी कल्पना जरी केली असती तरी आपण जागे आहोत ना, स्वप्न तर बघत नाही ना याची खात्री करायला चिमटे काढून बघितले असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सुबोध खरे Sun, 01/21/2018 - 15:15 नवीन
मोगा खान नवी आय डी घेऊन आले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
क
कपिलमुनी Sun, 01/21/2018 - 09:37 नवीन
दुवा केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह ने दावा किया है कि मानव के क्रमिक विकास का चार्ल्स डार्विन का सिद्धांत ‘वैज्ञानिक रूप से गलत है.’ उन्होंने स्कूल और कॉलेज के पाठ्यक्रम में इसमें बदलाव की भी हिमायत की. मानव संसाधन विकास राज्य मंत्री सिंह ने कहा कि हमारे पूर्वजों ने कभी किसी कपि के इंसान बनने का उल्लेख नहीं किया है. उन्होंने शुक्रवार (19 जनवरी) को संवाददाताओं से बातचीत में यहां कहा, ‘‘(इंसानों के विकास संबंधी) चार्ल्स डार्विन का सिद्धांत वैज्ञानिक रूप से गलत है. स्कूल और कॉलेज पाठ्यक्रम में इसे बदलने की जरूरत है. इंसान जब से पृथ्वी पर देखा गया है, हमेशा इंसान ही रहा है
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 01/21/2018 - 09:41 नवीन
सर्व अभ्यासक्रमात विमाने उडवायला आणि हत्ती , माणसाची सर्जरी करायला शिकवणार बहुधा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Sun, 01/21/2018 - 15:26 नवीन
या तद्दन पोरकट प्रतिसादावरून सपाटून मार खाल्ल्यानंतर मुनीवर्यांनी पलायन केले होते. आता वातावरण थंड झाले आहे या समजूतीत परत येऊन पुन्हा एकदा तेच कार्य सुरू केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 01/22/2018 - 07:11 नवीन
इथे काथ्या कुटत बसणे एवढेच काम नाही. पलायन करायला हे काही माझा करो या मरो युद्ध नाही . आणि शेवटचा प्रतिसाद माझा हा बालिशपणा ही नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/22/2018 - 07:30 नवीन
इथे काथ्या कुटत बसणे एवढेच तुमचे काम नाही. वेगवेगळ्या धाग्यांवर जाऊन पो टाकून पलायन करणे हे काम सुद्धा तुमच्या महत्त्वाच्या कामात अंतर्भूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा